Nirop Question Answer Class 9 Marathi Chapter 15 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15 निरोप Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 15 निरोप Question Answer Maharashtra Board

निरोप Std 9 Marathi Chapter 15 Questions and Answers

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न (अ)
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण
1. मुलाचा वाढदिवस आहे.
2. तो रणांगणावर जाणार आहे.
3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर:
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर जाणार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:
अशुभाची साउली.
उत्तर:
अशुभाची साउली: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण.
उत्तर:
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.

3. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची भाषा कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. ओजस्वी आई व मुलगा जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज विजयी होऊन आलास
की माझ्या हाताने दूधभात भरवीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी,’ या काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तशीच तुझ्या शस्त्रांना-अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.

प्रश्न (आ)
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन,’ या काव्यपंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

5. अभिव्यक्ति:

प्रश्न (अ)
कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते – तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न (आ)
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.

भाषा सौंदर्य:

मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाइल, ठंडा कोल्ड्रिंक, वटवृक्षाच्या झाडाखाली, शब्दाखाली अधोरेखित, हाय वे रोड, रायटिंगमध्ये लिहून दया, शेवटी एन्ड मस्त केलाय, पिवळा पितांबर.

शब्दांच्या या रचनेची ही गंमत पाहा. खरं म्हणजे भाषिकदृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची आहे; परंतु आपण बोलताना सहजगत्या अशा चुका वारंवार करतो. इतर भाषांच्या प्रभावामुळे हे असे घडत असले, तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात. आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक/साप्ताहिक रोज येते, असे म्हणते तेव्हा नक्कीच हशा पिकणार.

अशा विविध रचनांतील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 15 निरोप Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 7

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांदयावरी या विसावे
शांति उदयाच्या जगाची.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी
1. पाय
2. डोळे
3. हात
4. कान.
उत्तर:
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी हात.

प्रश्न 2.
बाळाच्या खांदयावर विसावणारी ………………………..
1. उदयाच्या जगाची क्रांती.
2. भविष्यातील जगाची शांती.
3. आजच्या जगाची शांती.
4. आजची क्रांती.
उत्तर:
बाळाच्या खांदयावर विसावणारी भविष्यातील जगाची शांती.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.

  1. शस्त्रांना शक्ती देणारी – [ ]
  2. आई स्वत:ला याची कन्या समजते – [ ]
  3. आईने धार लावून ठेवलेली – [ ]
  4. बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे – [ ]

उत्तर:

  1. भवानीमाता
  2. महाराष्ट्रकन्या
  3. तलवार
  4. शिवरायांचे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण
उत्तर:
सीमेवर लढावयास जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते-बाळा, तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या उजळलेल्या ज्योतींनी मी तुला ओवाळते आहे.

कृती 4 : (विचारसौंदर्य | भावसौंदर्य / अर्थसौंदर्य / रस)

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – निरोप.
उत्तर:
निरोप
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
2. कवितेचा विषय → रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. घर = सदन
  2. औक्षण = ओवाळणी
  3. बाहू = हात
  4. डोळा = नेत्र
  5. मुख = तोंड
  6. सावली = छाया
  7. शक्ती = बळ
  8. हात = हस्त.

4. कवितेतून मिळणारा संदेश → वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!
→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रिंनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
उत्तर:
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते – तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द अभ्यासा.

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा:

  1. पंचप्राण
  2. महाराष्ट्र
  3. रणांगण
  4. दूधभात.

उत्तर:

  1. पंचप्राण : पाच प्राणांचा समूह -द्विगू.
  2. महाराष्ट्र : महान असे राष्ट्र-कर्मधारय.
  3. रणांगण : रण हेच अंगण-कर्मधारय.
  4. दूधभात : दूध आणि भात -इतरेतर द्वंद्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. सावली
  2. दुःख
  3. स्वतंत्रता
  4. विजय.

उत्तर:

  1. सावली × ऊन
  2. दुःख × सुख
  3. स्वतंत्रता × परतंत्रता
  4. विजय × पराजय.

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिलेली आहेत.)
उत्तर:

एकवचन हुंदका ज्योत शस्त्र डोळा
अनेकवचन हुंदके ज्योती शस्त्रे डोळे

प्रश्न 3.
पुढील शब्दांपासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. चाललास
2. तलवारीला.
उत्तर:
1. चाललास – चाल, लस, सल, लाल.
2. तलवारीला – तरी, वारी, वाल, रीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमानुसार शुद्ध लिहा:

  1. ओक्षन
  2. वीक्रमि
  3. स्वरुप
  4. वीजयि.

उत्तर:

  1. औक्षण
  2. विक्रमी
  3. स्वरूप
  4. विजयी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Lyric
  2. Action
  3. Exchange
  4. Exhibition.

उत्तर:

  1. भावगीत
  2. कार्यवाही
  3. देवाण-घेवाण
  4. प्रदर्शन.

निरोप Summary in Marathi

कवितेचा आशय:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रींनी ओजस्वी शब्दांत घडवले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

शब्दार्थ:

  1. रणा – रणांगणात.
  2. तोरण – शुभपताकांची माळ.
  3. विक्रमी – पराक्रमी.
  4. बाहू – हात.
  5. राखायची – रक्षण करायची.
  6. विसावे – विश्रांती घेते, थांबते.
  7. जाणते – उमगते, समजते.
  8. हुंदका – गहिवर.
  9. मुखावाटे – तोंडातून.
  10. अशुभ – वाईट गोष्ट.
  11. साउली – सावली.
  12. माझिया – माझ्या.

टिपा:

  1. औक्षण – पंचारतीने ओवाळणे.
  2. महाराष्ट्रकन्या – महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता, पराक्रमी स्त्रिया.
  3. जिजा – शिवछत्रपतींची आई, जिजामाता.
  4. लक्षुमी – झाशीची राणी लक्ष्मीबाई.
  5. भवानी – श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत, भवानीमाता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. निरोप देणे – जाण्यासाठी परवानगी देणे.
  2. अशुभाची सावली पडणे – विपरीत घडणे, अमंगल घडणे.
  3. कूस धन्य करणे – जन्म सार्थकी लागणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कवितेचा भावार्थ:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते – बाळा, तू रणांगणावर चालला आहेस हा शुभशकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण लावते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे. तुझे शुभ चिंतते आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांदयांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उदयाच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. माझे डोळे आसवांनी ओथंबले नाहीत. मी सुद्धा महाराष्ट्रकन्या आहे. मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे.

तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला (शस्त्राला) धार मीच लावून ठेवली आहे. (संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे.)

अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही. वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवय्यी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. तुझ्या शस्त्रांना (बंदुकांना) अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल. भवानीमातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्रीछत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचे स्मरण कर. विजयी होऊन ये नि माझ्यापोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूधभात भरवीन.

9th Std Marathi Questions And Answers:

Apule Jagne Apuli Olakh Question Answer Class 9 Marathi Chapter 20 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Question Answer Maharashtra Board

आपुले जगणे…आपुली ओळख! Std 9 Marathi Chapter 20 Questions and Answers

1. खालील कोष्टक पूर्ण करा:

प्रश्न 1.
खालील कोष्टक पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 1
उत्तर:

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
1. दिवा होऊन जगाला उजळावे. 1. एक क्षणही कार्याविण दवडू नको.
2. पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. 2. कुणाबाबतीत मनात अढी नको.
3. नम्र रहावे, सौम्य पहावे. 3. उगाच कुणाला खिजवू नको.
4. दुसऱ्यासाठी करुणा असावी. 4. हांजी हांजी करू नको.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 3

3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:
(अ) पटकुर पसरू नको.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नको.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरूळ.
उत्तर:
(अ) पटकुर पसरू नको: अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत. मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी, असे वर्णन करू नये.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नको: स्वत:च्या दु:खाचे प्रदर्शन करीत रडत न राहता, हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दु:खांविषयी अंत:करणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये. म्हणजेच कोरडे राहू नये.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरूळ: पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादजवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यान्पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आजमितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे कवी म्हणत आहेत.

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात-श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे घालावीत. स्वत:चे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वत:च्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.

प्रश्न (आ)
‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको,’ या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे,’ असे सुवचन आहे. ‘शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे,’ या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

5. स्वमत:

प्रश्न (अ)
स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
स्वत:चे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वत:ची ओळख आहे, हे , सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकूसारखी धार आपल्या है वागण्यात नसावी. नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा. एकही , क्षण कामाशिवाय वाया दवडू नये. मन पवित्र असावे. शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा.

नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये. उदात्त विचार बाळगावेत. लाचारी पत्करू नये. कुणाला छळू नये, वाद घालू नये. स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा. दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी. नवनवीन विचारांचे मार्ग अंगिकारावेत. चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी. भेदरून न जाता, धैर्याने वागावे. मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ (शिल्प) उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत.

प्रश्न (आ)
आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर:
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण कार्याशिवाय वाया दवडू नये, कार्यरत असावे, पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे. नम्रतेचे वर्णन असावे, दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत.

शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, हे मनी ठसवावे. वाद, भांडण करू नये. उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळसारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावेत.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 5

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

प्रश्न 2.
सहसंबंध जोडा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 7

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढीलपैकी असत्य विधान ओळखा:
1. नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.
2. उगाचच वाद घालू नये.
3. ज्यावर श्रद्धा ते काम करावे.
4. भेकड होऊन मुळूमुळू रडू नये.
उत्तर:
असत्य विधान : नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 8
उत्तर:

  1. [शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे]
  2. [जे उदात्त असते तेथे]
  3. [वेरूळ]
  4. [मातृभूमी] व [माती]

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
नित्य घडावे वाचन, लेखन… क्षण कार्याविण दवडु नको
नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!
उत्तर:
माणसाने आयुष्यात वर्तन कसे करावे याविषयी उपदेश करताना कवी संदीप खरे म्हणतात की मन सुसंस्कृत करण्यासाठी नेहमी वाचन व लेखन करावे. एक क्षणही कार्य केल्याशिवाय राहू नये. नित्य नेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे यांना डावलून झोपा काढू नयेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – आपुले जगणे… आपुली ओळख!
उत्तर:
आपुले जगणे… आपुली ओळख!
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संदीप खरे.
2. कवितेचा विषय → तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. दिवा = दीप
  2. कार्य = काम
  3. झोप = निद्रा
  4. पावित्र्य = मांगल्य
  5. नयन = डोळे
  6. अश्रू = आसू
  7. करुणा = दया
  8. पथ = मार्ग
  9. काटा = कंटक
  10. हिंमत = धैर्य.

4. कवितेतून मिळणारा संदेश → आपले जगणे सत्यम्, शिवम्, सुंदरम् करावे. लेखन-वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुत्सित बोलू नये, मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → या कवितेत ‘फटका’ हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, याचा परिपाठ दिला आहे.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ: ‘तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!
→ माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात -नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत. नवीन मार्गाने चालण्यास म्हणजे नवीन विचार अंगिकारण्यास भीती बाळगू नये. ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ती कार्ये केल्याशिवाय राहू नये.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे, याचा नेमक्या शब्दांत व थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जिणे नको; तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे, याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला भावली.

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको!’
उत्तर:
आशयसौंदर्य : तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी ‘आपुले जगणे… आपुली ओळख!’ या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.

काव्यसौंदर्य: कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात-आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘फटका’ या पूर्वापर चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
विग्रहावरून समास लिहा:
उत्तर:

  1. ऊन आणि पाऊस → इतरेतर द्वंद्व
  2. सात स्वर्गांचा समूह → द्विगू
  3. गुरे, वासरे वगैरे → समाहार वंद्व
  4. महान असे ऋषी → कर्मधारय
  5. न्याय किंवा अन्याय → वैकल्पिक वंद्व

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 9
उत्तर:

  1. दिवा = दीप
  2. नयन = डोळे
  3. भेकड = भित्रा
  4. करुणा = दया.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. भेकड
  2. व्यर्थ
  3. नम्र
  4. श्रेष्ठ.

उत्तर:

  1. भेकड × धीट
  2. व्यर्थ × सार्थ
  3. नम्र × उद्धट
  4. श्रेष्ठ × कनिष्ठ.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

प्रश्न 3.
शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा:

  1. दररोज प्रसिद्ध होणारे
  2. आठवड्याने प्रसिद्ध होणारे
  3. महिन्याने प्रसिद्ध होणारे
  4. वर्षाने प्रसिद्ध होणारे

उत्तर:

  1. दैनिक
  2. साप्ताहिक
  3. मासिक
  4. वार्षिक

प्रश्न 4.
एकवचन लिहा:

  1. वस्त्रे
  2. वाटा
  3. मंत्र
  4. राने.

उत्तर:

  1. वस्त्र
  2. वाट
  3. मंत्र
  4. रान.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
उत्तर:
1. कर्तृत्व, कर्तृत्त्व, करुत्व, कतृत्व. – कर्तृत्व
2. गोर्वधन, गेवर्धन, गोवधर्न, गोवर्धन. – गोवर्धन

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी अर्थ लिहा:
1. General Meeting
2. Bonafide Certificate.
उत्तर:
1. सर्वसाधारण सभा
2. वास्तविकता प्रमाणपत्र.

आपुले जगणे…आपुली ओळख! Summary in Marathi

कवितेचा आशय:

जीवनामध्ये कसे वागावे व कसे वागू नये, याचा आदर्शपाठ या कवितेत कवीने सोप्या शब्दांत मांडला आहे. उत्तुंग कर्तृत्व करावे व मातीचे ऋण फेडावे, हा संदेश दिला आहे.

शब्दार्थ:

  1. उपरे – परके, खोटे, लटके.
  2. नित्य – नेहमी, सतत.
  3. कार्याविण – कामाशिवाय.
  4. दवडू नको – वाया घालवू नको.
  5. पावित्र्य – मांगल्य, पवित्रता.
  6. वस्त्रे-कपडे.
  7. पटकूर – चिंध्या झालेले कापड.
  8. आदिमंत्र – मूलतत्त्व.
  9. नम्र – शालीन, लीन.
  10. सौम्य – फिकट, साधे.
  11. उगा – उगाच, बळेच, मुद्दाम.
  12. अढी – डंख, हेवा, मत्सर, अटकळ.
  13. खिजवणे – चिडवणे, त्रास देणे.
  14. तयावर – त्याच्यावर.
  15. फुकाची – फुकटची, उगीच.
  16. लोचट – हावरेपणा.
  17. बुळचट – बावळट, मिळमिळीत.
  18. उदात्त – भव्य, दिव्य.
  19. ताठर – ताठ, गर्विष्ठ.
  20. माथा – मस्तक, शीर, डोके.
  21. पेल – उचलून धर, धरून ठेव, झेल.
  22. वाद – भांडण.
  23. नयनी – डोळ्यांत.
  24. दुसऱ्यास्तव – इतरांसाठी.
  25. करुणा – दया.
  26. व्यर्थ – निरर्थक, फुकट.
  27. पथाला – रस्त्याला, मार्गाला.
  28. श्रद्धा – निष्ठा, विश्वास.
  29. भेकड – भित्रा.
  30. गुळमुळ – गुळमुळीत.
  31. मातेसह – आईसकट (मातृभूमी).
  32. देणे – ऋण, कर्ज.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

टिपा:

1. परवचा – पाढे पाठ करणे.
2. गोवर्धन – गोकुळातील एक पर्वत. अतिवृष्टीपासून लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी हा पर्वत एका करंगळीवर उचलून धरला, अशी आख्यायिका आहे.
3. कंस – श्रीकृष्णाचा मामा. याने श्रीकृष्णाच्या आईवडिलांना (देवकी-वसुदेव) कैदेत ठेवले होते.
4. वेरूळ – डोंगरात खोदलेली लेणी. (औरंगाबाद)

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. अढी नसणे – (कुणाबद्दल मनात) डंख नसणे.
  2. कडी करणे – वरचढ ठरणे.
  3. हांजी हांजी करणे – लाचारी पत्करणे.
  4. धमकावणे – धमकी देणे.
  5. भेदरणे – घाबरणे.
  6. मातीचे देणे फेडणे – मातृभूमीचे उपकार फेडणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

कवितेचा भावार्थ:

माणसाने आयुष्यात कसे वागावे, हे सांगताना कवी म्हणतात – आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नको. (दुष्टपणा करू नये, क्रूर होऊ नये.) नेहमी वाचन-लेखन करावे. त्याने मन सुसंस्कृत होते. कामाशिवाय एकही क्षण वाया दवडू नको. आळशीपणा करू नको. नित्यनेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे, यांशिवाय उगाच झोप काढू नको.

पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस. स्वत:चे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको. मनात मांगल्य असावे, उथळ बडेजावापेक्षा, कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते, हा मूलमंत्र कधीही विसरू नको. (साधी राहणी, पवित्र विचार अंगिकारावा, उगाच बेगडी फुशारकी करू नये.) नम्रपणा असावा. शांत वृत्तीने पाहावे. उगाचच मनात दुसऱ्याबद्दल अढी ठेवू नये. दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच वरचढपणा करू नये.

हांजी हांजी करून फुकटची लाचारी करू नये. असा लोचटपणा व बुळचटपणा घातक असतो. पण जर एखादे भव्य-दिव्य काही कार्य दिसले, तर त्याबाबत ताठरता, दुरभिमान मुळीच बाळगू नको. तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल. संकटे झेल. कंसासारखे इतरांना छळू नको. उगाचच वाद, भांडणे करू नयेत, परंतु कुणी धमकी दिली तर पळू नये. निडरपणे बोलावे. स्वार्थीपणे स्वत:च्या दु:खाने डोळ्यांत आसवे आणू नको. दुसऱ्यासाठी मनात करुणा, दया असावी. परोपकार करावा. मनात E मायेचा ओलावा असावा. मन उगाचच कोरडे, भावनाशून्य ठेवू नकोस.

आनंदाने नवनवीन क्षेत्रांतील ज्ञान मिळवावे. राने तुडवावीत. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगिकारण्यास घाबरू नये. अंतर्मनातून ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ते कार्य केल्याशिवाय राहू नये. (जिथे इच्छा तिथे मार्ग) मार्गात काटेही (संकटे) असतात पण त्यांना भिऊन राहू नको, डगमगू नको. जो धैर्य दाखवतो, त्याची जगात किंमत राहते. जग त्याला नावाजते. भेकडपणा, गुळमुळीतपणा, पळपुटेपणा धरून मुळूमुळू रडत बसू नये. आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरुळाची लेणी घडव. उत्तुंग अकल्पित कर्तृत्व कर. कर्तव्याला नाकारू नको. या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहे. या मातीचे उपकार फेडायला चुकू नको.

9th Std Marathi Questions And Answers:

Matichi Savli Question Answer Class 9 Marathi Chapter 11 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 11 मातीची सावली Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 11 मातीची सावली Question Answer Maharashtra Board

मातीची सावली Std 9 Marathi Chapter 11 Questions and Answers

1. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:
(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
उत्तर:
(अ) उन्हाळा जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
(आ) आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
(इ) चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

2. खालील तकता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तकता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 1
उत्तर:

घटना परिणाम / प्रतिक्रिया
1. फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. 1. सून येऊन डाफरली.
2. मनूला फरसूने शिकवले. 2. मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले.
3. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. 3. आठवड्याभरातच कोसू मरण पावली.
4. मनूने जमीन विकायला काढली. 4. फरसूने बैलासारखी मान डोलावली.

3. आकृती पूर्ण करा:

प्रश्न (अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 3

प्रश्न (आ)
पाठाच्या आधारे फरसूचे पुढील मुद्दयांना अनुसरून वर्णन करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 4
उत्तर:
1. छंद: फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे.

2. मेहनत: फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पानन् पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची, झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निर्धार होता.

3. दुःख: फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती.

4. माणूसपण: फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

4. ओघतक्ता तयार करा:

प्रश्न 1.
ओघतक्ता तयार करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 6

5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा:

प्रश्न (अ)
“आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते.”
उत्तर:
“आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते.”

प्रश्न (आ)
“त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.”
उत्तर:
“त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.”

6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा:

प्रश्न (अ)
टकळी चालवणे –
1. सूत कातणे
2. सतत बोलणे
3. वस्त्र विणणे.
उत्तर:
सतत बोलणे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न (आ)
नाळ तुटणे –
1. मैत्री जमणे
2. संबंध न राहणे
3. संबंध जुळणे.
उत्तर:
संबंध न राहणे

7. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.

(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले –
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –

8. स्वमत.

प्रश्न (अ)
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा..
उत्तर:
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वत:च्या इच्छाआकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला, तर माणूसपण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत.

शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच, आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न (आ)
पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो.

अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नदयांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.

प्रश्न (इ)

‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

उपक्रम:

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठाचे नाट्यरूपांतर करून वर्गात सादर करा.

प्रश्न 2.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे ‘उदयाच्या सुंदर दिवसासाठी’ – हे पुस्तक वाचा.

भाषा सौंदर्य:

प्रश्न 1.
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचारांची उदाहरणे लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 7उत्तर:

शरीर अवयवावर आधारित चेहरा काळवंडणे
उत्तरे: (1) डोळे मिटणे (2) पोटात दुखणे (3) डोके फिरणे (4) बुडत्याचा पाय खोलात.
प्राणी व पक्षी यांवर आधारित पोटात कावळे ओरडणे.
उत्तरे: (1) चिमणीच्या चोचीने खाणे (2) कोल्याला द्राक्षे आंबट (3) गाढवाला गुळाची चव काय? (4) माकडाला चढली भांग.
मानवी भावभावना जिवाची उलघाल होणे.
उत्तरे: (1) हृदयात कालवाकालव होणे (2) मन चिंती ते वैरी न चिंती (3) भित्यापाठी ब्रह्मराक्षस (4) प्राणपणाने लढणे.
अन्नघटक खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
उत्तरे: (1) वड्याचे तेल वांग्यावर (2) खाई त्याला खवखवे (3) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले
(4) दुधाची तहान ताकावर.
इतर घटक दगडापेक्षा वीट मऊ.
उत्तरे: (1) एक ना धड भाराभर चिंध्या (2) इकडे आड, तिकडे विहीर (3) पळसाला पाने तीनच (4) तळे राखी तो पाणी चाखी.’

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

भाषाभ्यास:

तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही धडे वाचता, कविता वाचता. धडे आणि कविता म्हणजेच गय आणि पदध यांच्या रचनेत फरक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. पदध गाता येते किंवा लयीत वाचता येते. गदयाचे तसे नसते. कवितेमध्ये लय निर्माण कशी होते? कुठल्या गोष्टीमुळे होते? हे आज आपण बघणार आहोत. वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय मिळते. कवितेची लय समजण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.

वृत्त किंवा छंद म्हणजे काय ? लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते. व्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला ‘वृत्त’ म्हणतात. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितात जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशा वृत्तविचारामध्ये काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेऊया.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 8

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 11 मातीची सावली Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
फरक लिहा:

तरुणपणाचा काळ म्हातारपणाचा काळ

उत्तर:

तरुणपणाचा काळ म्हातारपणाचा काळ
सुखी, समाधानी खिन्न, शोकाकुल

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आशय स्पष्ट करा:
1. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला.
2. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली.
उत्तर:
1. आपण आनंदाने चालतो, तेव्हा आपले पाय सहज, भरभर पडतात. फरसूचे पाय असे आनंदाने पडत नाहीत. पाय उचलण्यासाठी त्याला कष्ट पडतात. पाय ओढावे लागतात. म्हणजे फरसू दुःखीकष्टी मनाने पायरीवर येऊन बसतो.
2. खरबरीत बोटे म्हणजे भरपूर कष्ट केलेल्या हातांची बोटे. या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायऱ्या सुखाच्या वाटत नाहीत. पायऱ्यांचा गुळगुळीतपणा दूरचा, परका वाटतो.

प्रश्न 2.
माहिती लिहा:

पूर्वीच्या गोष्टी आताच्या गोष्टी
1. 1.
2. 2.

उत्तर:

पूर्वीच्या गोष्टी आताच्या गोष्टी
1. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, भिरभिरत येणारी चिंचेची पाने. 1.  गुळगुळीत पायऱ्या,  गुबगुबीत खुर्च्या.
2. चिंचेच्या मुळावर बसून मित्रांसोबत केलेल्या गप्पागोष्टी. 2. आता गप्पा मारायला कोणीही नाही. आता फक्त एकट्याने आभाळाकडे बघत राहणे

प्रश्न 3.
उताऱ्यातील सासरे-सून यांच्यातील नाते स्पष्ट करा.
उत्तर:
सुनेला वाटते की, सासऱ्यांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागावे. सासरे ।
त्यांच्या जीवनातील सर्व जुन्या गोष्टी नष्ट झाल्याने दुःखी आहेत. सासऱ्यांच्या मनातील भावना सून लक्षात घेत नाही
आणि त्यांच्यावर डाफरत राहते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा:

घटना परिणाम
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे.

उत्तर:

घटना परिणाम
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. फरसू व आबू यांना नवल वाटायचे.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारी फरसूची मन:स्थिती लिहा.
उत्तर:
दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायांची हाडे कडकडतात. यावरून तो उतारवयात आहे, हे लक्षात येते. त्याला आताचे वातावरण प्रिय नाही. चकचकीत, ऐषारामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. तो उदास, विमनस्क स्थितीत वावरतो. त्याच्या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायरीचा स्पर्श सुखद वाटत नाही.

गुबगुबीत खुर्चीतही त्याला अवघडल्यासारखे होते. त्याला हवेहवेसे वाटणारे दृश्य त्याच्या मनात जागे होते. ते असते पूर्वीचे, त्याच्या तरुणपणातील. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, इकडून तिकडे बागडणाऱ्या खारी यांनी बनलेले वातावरण त्याला समाधान दयायचे. आता ते सर्व नाहीसे झाले आहे. त्याच्या फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. या आठवणींनी फरसू उदास होतो आणि आभाळाकडे बघत राहतो.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 10

प्रश्न 2.
का ते लिहा:
1. गावकरी फरसूवर मनोमन जळायचे.
2. पाठीचा कणा दुखेपर्यंत फरसू पत्नीसहित राबणे चालू ठेवायचा.
उत्तर:
1. पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसे. त्यामानाने इतरांचे शेत पिकत नसे.
2. भाताचे पीक झाल्यावर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांचीही पिके घ्यायचा. तो दुबार पिके घ्यायचा. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागायचे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 3.
पुढील वाक्य प्रमाणभाषेत लिहा:
त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.
उत्तर:
त्यांचीच पुण्याई, ही विहीर नाही, नदी आहे नदी.

प्रश्न 4.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले.
उत्तर:
बापजादयांची कमायी रे पोरांनो!

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधान पूर्ण करा:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे …………………..
उत्तर:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे –
(अ) फरसूच्या विहिरीला वैशाखातही भरपूर पाणी असे.
(आ) फरसूने तीन मुलींची लग्ने करून त्यांना सासरी पाठवले. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. इतकी सुबत्ता त्याला लाभली होती.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 12

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
फरसूच्या यशा मागील तुम्हांला जाणवलेले रहस्य सांगा.
उत्तर:
फरसूच्या यशामागे दोन गोष्टी आहेत. एक आहे त्याची श्रद्धा आणि दुसरी आहे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याची चांगल्या, उदात्त मूल्यांवर श्रद्धा आहे. त्याच्या मते, कोणाच्याही कामात खोडा घालू नये. म्हणजे कोणाचेही वाईट करू नये. इतरांचे वाईट केल्यास आपले अकल्याण होते, असा त्याचा ठाम विश्वास आहे. आपल्या बापजादयांनी कोणाचीही फसवणूक केली नाही; कोणाला नाडले नाही; म्हणून आपली भरभराट झाली, असे त्याला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याने नैसर्गिक खतावरच पूर्णपणे भर दिला. रासायनिक खताचा वापर केला नाही. रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे जमिनीचे नुकसान झाले नाही. त्याने चिंचेचा पाला शेतात पसरून त्याचेच खत होऊ दिले. तसेच, मुख्य भातपिकानंतर त्याने वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांची पिके घेतली. या प्रकारच्या दुबार पिकांमुळेही जमिनीचा कस वाढण्यास मदत झाली. एकंदरीत, श्रद्धा व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांमुळे फरसू यशस्वी झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील कोष्टक पूर्ण करा:

घटना. परिणाम
तिघेही मुकाट जेवत होते.

उत्तर:

घटना. परिणाम
तिघेही मुकाट जेवत होते. मुलांशी प्रेमाचे नाते न राहिल्यामुळे डोळ्यांत आसवे येत होती.

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

सुनेचे उद्गार सुनेच्या मनातला अर्थ
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे!
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी?

उत्तर:

सुनेचे उद्गार सुनेच्या मनातला अर्थ
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! निरर्थक व निष्क्रिय आयुष्य जगत आहेत.
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? मला कष्ट करावे लागतात आणि यांचा काडीचाही उपयोग नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 3.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम.
उत्तर:
पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
1. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत.
2. आपला आधार तर कधीच तुटून पडला.
उत्तर:
1. झाडापानांवर प्रेम असल्यामुळे कष्ट कधी जाणवलेच नाहीत.
2. फरसूची पत्नी मरण पावली. त्यामुळे त्याचा आधार तुटून पडला.

प्रश्न 2.
फरक लिहा:

फरसू मनू
1. 1.
2. 2.
3. 3.

उत्तर:

फरसू मनू
1. तिसरी-चौथीच्या पुढे गेला नव्हता. 1. फरसूने मनूला शिकवले.
2. जमिनीचीच चाकरी करायची हे ठरवलं होतं. 2. इंग्रजी नावाच्या कुठल्याशा कंपनीतील नोकरीच श्रेष्ठ मानीत होता.
3. पोटच्या मुलाच्या प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना शेवटपर्यंत आधार देण्याचा निश्चय केला होता. 3. मातीत हात घालायलाच नाखूश होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
मनू आणि फरसू यांच्यातील नाते भावनाहीन, कोरडे होण्यामागील तुम्हांला जाणवलेले कारण स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू कष्ट करीत करीत व निसर्गाशी खेळत खेळतच जगला. त्यामुळे त्याचा जमिनीवर, झाडापानांवर जीव आहे. त्यांच्या आधारानेच आपले जीवन उभे राहते. म्हणून जीव असेस्तोवर जमिनीची चाकरी करायची, झाडापानांना आधार दयायचा, हा त्याचा निर्धार होता. तसेच, फरसू खेडेगावात राहत असल्यामुळे खेडेगावातील माणसे एकमेकांना धरून राहतात. तिथे व्यक्तीच्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा संपूर्ण समाजाचे सुखदुःख महत्त्वाचे मानले जाते.

मनूने शिक्षण घेतले. आपल्याकडील बहुतांश शिक्षण पुस्तकी असते. ते कष्टापासून दूर असते. यामुळे मनूला शेतीतले कष्ट कमी दर्जाचे वाटतात. चकचकीत, गुळगुळीत स्वरूपाचा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळतनकळत फक्त स्वत:चाच विचार करू लागतो. मनूचे तेच झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. त्या दोघांमध्ये भावनिक नाते राहिलेच नाही. दोघांमध्ये संवाद राहिला नाही. समाधान राहिले नाही.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. पूर्वीच्या जुन्या घरातील जेवणाच्या वेळचे वातावरण.
2. पूर्वीच्या जेवणाचे स्वरूप.
3. कोसूचा मृत्यू.
उत्तर:
1. पूर्वी जुन्या घराच्या अंधाऱ्या पडवीत जेवणे होत असत. कोसू प्रार्थना करी. प्रार्थना संपल्यावर जेवण चालू होई. त्या वेळी कोसूची टकळी चालू असे. मनू तर जेवता जेवता बहिणींशी मस्ती करायचा. वातावरण मोकळे, प्रेमळ असे.. जेवताना आनंद मिळे.
2. पूर्वीचे जेवण साधे असे. जेवणात एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या भाकऱ्या असत. जेवणात कोणताही उंची थाट नव्हता. तरी जेवणाचे समाधान मिळे.
3. वाडीत काम चालू होते. हे काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा, असे काहीतरी लागले. म्हटले तर साधी इजा झाली होती. तीच महागात पडली. आठवड्याभरातच कोसूची प्राणज्योत मालवली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला.
उत्तर:
तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
संकल्पना स्पष्ट करा:
1. केळीचे बन जमिनीवर झोपावे, तसे.
2. कारली-वांग्यासारखा जमिनीचा बाजार मांडला.
3. बैलासारखी मान डोलावली.
उत्तर:
1. केळ पडली की ती पूर्ण उन्मळून पडते. तिची जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात. म्हणजे ती समूळ नष्ट होते. केळीचे अखंड बन जर असेच आडवे झाले, तर सगळी बाग उजाड झालेली दिसते. अशाच प्रकारे एकाएकी कोसू मरण पावल्यामुळे फरसूचा संसार उद्ध्वस्त झाला.

2. कारली-वांग्याचा बाजार मांडला जातो, तेव्हा त्या कारल्या वांग्यांबद्दल कोणालाही आपुलकी वाटत नसते. किंबहुना त्यांची विक्री झाली, तर सगळ्यांना आनंदच होतो. म्हणून बाजारात सर्व विक्रेते ओरडून लोकांना खरेदी करण्याचा आग्रह करीत असतात. वेळप्रसंगी कमी किमतीतही विकत असतात. यालाच बाजार मांडणे म्हणतात. जमिनीची बाब तशी नसते. आपण जमीन विकून तिला कारली-वांग्याच्या पातळीवर आणले असे फरसूला वाटत असते.

3. नंदीबैलाचा मालक सांगतो, त्याप्रमाणे बैल मान डोलावतो. बैलाला स्वत:चे मत वा भावना नसतात. तो मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणेच आपणही मनूच्या म्हणण्याला मान डोलावली. आपले मनातले खरेखुरे म्हणणे सांगितलेच नाही, असे फरसूला वाटते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे.
उत्तर:
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे:
1. ज्या मातीने संसार फुलवला, त्या मातीलाच उजाड केल्यामुळे कोसू मरण पावली असावी.
2. मनूने जमीन विकायचा विचार मांडला, तेव्हा नंदीबैलाप्रमाणे आपण मान डोलावली, असे फरसूला वाटले.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
फरसू व मनू यांची जीवनदृष्टी समजावून सांगा.
उत्तर:
फरसूच्या जुन्या घरात पूर्वी जेवतानाचे वातावरण लोभसवाणे होते. सगळेजण गप्पाटप्पा करीत, थट्टामस्करी करीत जेवत असत. त्यात माया होती. भावनेचा ओलावा होता. त्यात सहज, साध्या निर्मळ भावनांना वाव होता. म्हणून ते वातावरण सुंदर होते, सुखद होते. या वातावरणात शेती, गाईगुरे, झाडेपाने यांनाही स्थान होते. गावातल्या लोकांनाही स्थान होते. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत जगणे हवे असते.

मनूला व त्याच्या पत्नीला, म्हणजे फरसूच्या सुनेला ही जगण्याची रीत मान्य नव्हती. त्यांना उच्च दर्जाच्या गुळगुळीत फरश्या बसवलेली, मोठ्या, उंच इमारतीमधील महागडी घरे अधिक आकर्षक वाटतात. मनू जुन्या घराला गोठा म्हणतो. त्याला शेतीपेक्षा नोकरी अधिक चांगली वाटते. या दोन वेगवेगळ्या जीवनरिती आहेत. दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध आहेत. मनूला फरसूचे मन कळत नाही. त्यामुळेच मनू कायम फरसूविरुद्ध उभा ठाकतो.

उतारा क्र. 5

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 14

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

कृती कृतीमागील भावना
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला.
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले.

उत्तर:

कृती कृतीमागील भावना
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. आपण काहीच करू शकत नाही, ही असहायता, खोल दुःख.
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. अभिमान व आनंद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार:

  1. ………………………………………
  2. ………………………………………
  3. ………………………………………
  4. ………………………………………

उत्तर:

  1. जमिनीवर ट्रॅक्टर फिरला.
  2. बागायत मातीला मिळाली.
  3. मोठाले खड्डे खणले गेले.
  4. भलेमोठे दगडविटांचे धूड उभारले गेले.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 15
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 16

उतारा क्र. 6

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:
1. फरसू मध्यरात्री घराबाहेर बसला आहे.
2. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
उत्तर:
1. प्रथम फरसूची बायको गेली. मग जमीन गेली. घर गेले. सर्व झाडे गेली. जिवाभावाच्या सर्वच गोष्टी नष्ट झाल्या. म्हणून तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. दु:खामुळे त्याला चैन पडेना आणि तो मध्यरात्र असतानाही घराबाहेर येऊन बसला.
2. पूर्वजांनी जमीन मिळवली होती. त्यांनीच घर बांधले होते. त्यांनीच झाडेझुडपे लावली. पैशाच्या हव्यासाने पूर्वजांची सर्व कमाई आपण घालवली. हा एक प्रकारे गुन्हाच केला, अशी फरसूची भावना होती. या गुन्हयाबद्दल येशूकडे माफी मागावी, म्हणून त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
पुढील घटनांचे परिणाम लिहा:
1. जमीन विकली, पैसा आला – …………………….
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – …………………..
उत्तर:
1. जमीन विकली, पैसा आला – ते बापाला विसरले.
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – फरसूला वाटले, त्याने बेइमानी केली. आपल्या आईला फसवले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
आमशा आजा, पणजाअं रगत हय्!
उत्तर:
जमीन, घर, झाडेपेडे हे फरसूच्या पूर्वजांनी, त्याच्या आजा पणजाने मिळवले होते. तेवढे सगळे उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची आयुष्ये ओतली होती. रक्त आटवले होते. ते सगळे आपण पैशांसाठी विकले, याचे प्रचंड दु:ख व पश्चात्ताप फरसूला होतो. हा पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी फरसू हे उद्गार काढतो.

प्रश्न 2.
आबूने फरसूची काढलेली समजूत तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मध्यरात्री दुःखावेगाने अस्वस्थ होऊन फरसू घराबाहेर पडला. त्याला पाहून आबूने आश्चर्य व्यक्त केले. त्यावर, पूर्वजांनी रक्त आटवून उभारलेली संपत्ती आपण विकली, याबद्दलचा पश्चात्ताप त्याने आबूकडे व्यक्त केला. आबूने त्याची समजूत काढली. अशी जमीन अनेकांनी विकली आहे. त्यात गैर काहीच नाही. मिळालेल्या भरघोस पैशांनी मनूचे जीवन पूर्ण समृद्ध होणार आहे. ही सुद्धा चांगलीच घटना आहे. म्हणून फरसूने त्याचे दु:ख वाटून घेऊ नये, असे आबूने समजावले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फरसूच्या घरातील यातनादायक वातावरणाला फरसू व मनू हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत.’ विधान स्पष्ट करा.
उत्तर:
काळानुसार परिस्थिती बदलते. प्रत्येक पिढीचे विचार बदलतात. नवीन पिढी नवीन विचारांना अनुसरून चालते. नव्या पिढीची जगण्यावागण्याची रीत वेगळी असते. ही रीत म्हणजे जीवनशैली. मन् हा नव्या युगातला युवक आहे. त्याची जीवनशैली आधुनिक काळातली. तो या नव्या जीवनशैलीला अनुसरूनच वागणार. हा बदल फरसूला कळलेला नाही. म्हणून त्याला दु:ख होते. तो वेदनेने विव्हळतो. त्याच वेळी मनूलाही वडिलांची मन:स्थिती कळत नाही. वडील है ज्या विचारांच्या वातावरणात वाढले, त्याच विचारांना धरून ते वागणार. त्यांना स्वत:च्या विचारांत झटकन बदल करता येणार नाही.

नवीन विचार ते त्वरेने आत्मसात करू शकणार नाहीत. हे सर्व मनूनेही लक्षात घ्यायला हवे होते. वडिलांना हळूहळू आपल्या विचारांकडे आणायचा प्रयत्न त्याने करायला हवा होता. पण त्याने तो तसा केला नाही. बापलेक दोघेही आपापल्या जागी घट्ट राहिले. त्यांच्या दुःखाचे मूळ तिथे आहे. म्हणून दोघेही सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत.

उतारा क्र. 7

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आशय स्पष्ट करा:
1. जलमभर ढोरहारकं खपाला पाये.
2. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे………
3. त्यांशे पाय जमिनीवर नाय.
उत्तर:
1. फरसू जमीन विकल्याबद्दल दु:खी होतो. आबूला वाटते की, फरसूला दारिद्र्यात राहणेच पसंत आहे. पैसे हातात आले की, अनेक सुखे मिळवता येतात. पण फरसू या सुखांची आस बाळगतच नाही. तो स्वत:ला यातनांमधून मुक्त करण्याचा प्रयत्नच करीत नाही. म्हणून आबूचे मत असे बनत चालले आहे की, फरसूला ढोरासारखे राबणे आवडते.

2. फरसूच्या मते, आपल्या मालकीची जमीन असेल, तरच आपण स्थिर असतो, आपल्या जीवनाला अर्थ असतो. आपल्या मालकीची जमीन नसेल, तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपली नातवंडे-पतवंडे यांचा आधारच आपण काढून घेतला, असा अर्थ होऊ शकतो.

3. आबूच्या मते, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत, कर्तबगार आहेत. त्यांचा पाय जमिनीवर ठरत नाही. ते बोटीने, विमानाने जगभर हिंडतात. अरबस्तान, इंग्लंड, अमेरिका वगैरे अनेक देशांमध्ये जातात. म्हणून आबू म्हणतो की, हल्लीच्या मुलांचा पाय जमिनीवर ठरतच नाही. ही मुले सतत फिरतीवर असतात. त्यांची प्रगती होत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 17
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 18

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने …………………………..
2. फरसूच्या मते, जमीन नसेल तर ………………………….
उत्तर:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने अमाप पैसा मिळाला. आता मरेपर्यंत सुखात राहता येईल.
2. फरसूच्या मते, जमीन नसेल, तर ढोरासारखे जीवन उपयोगाचे नाही. आपले आयुष्य संपले. आता पुढच्या मुलाबाळांना पायाखाली जमीनच राहणार नाही.

प्रश्न 2.
कसे/कशी ते लिहा:

  1. इमारत वर येत होती – …………………………………………….
  2. चांदण्या प्रकाशात धूड भासत होते – …………………………
  3. इमारतीची सावली – ………………………………………………..
  4. शेताला कवटाळत अस्ताव्यस्त पसरली होती – ……………………………

उत्तर:

  1. कोंबासारखी
  2. अक्राळविक्राळ
  3. काळी ठिप्पूस
  4. सुस्तावल्यासारखी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे,’ या विधानाचा आशय तुमच्या शब्दांत सांगा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. 1 ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल, असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमीन विकली, तर आपल्या

आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात; माणूस मनाने उद्ध्वस्त होतो; हे त्यांच्या लक्षात येत नाही. दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळविक्राळ राक्षसच आहे, असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे, असे त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकूळ होतो; विकल होतो. हा सर्व भाव ‘मातीची सावली’ या दोन शब्दांतून व्यक्त होतो.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:

समासाचे नाव सामासिक शब्द विग्रह
1. समाहार वंद्व केरकचरा केर, कचरा वगैरे
2. द्विगू षण्मास सहा महिन्यांचा समूह
3. कर्मधारय सुविचार चांगला असा विचार
4. इतरेतर द्वंद्व इंद्रादी इंद्र आणि इत्यादी देव

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘ता’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. ममता
  2. नम्रता
  3. उदारता
  4. सुंदरता.

3. वाक्प्रचार/म्हणी:

प्रश्न 1.
डोळे भरून येणे –
1. खूप रडणे
2. दुःख होणे
3. डोळ्यांत पाणी येणे.
उत्तर:
दु:ख होणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. सावली
  2. जन्म
  3. पाप
  4. शाप.

उत्तर:

  1. सावली × ऊन
  2. जन्म × मृत्यू
  3. पाप × पुण्य
  4. शाप × आशीर्वाद.

प्रश्न 2.
पुढील नामांआधी कंसातील योग्य विशेषणे जोडा: (चकचकीत, गुबगुबीत, गुळगुळीत, खरबरीत)

  1. ………… पायरी
  2. ………….. बोटं
  3. …………… घर
  4. …………… केळी

उत्तर:

  1. गुळगुळीत पायरी
  2. खरबरीत बोटं
  3. चकचकीत घर
  4. गुबगुबीत केळी.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द निवडून लिहा:

  1. विहिर, वीहिर, विहीर, वीहीर.
  2. निच्शय, नीश्चय, निश्चय, नीच्शय.
  3. ऐसपैस, एसपैस, ऐसपैस, ऐसपेस.
  4. पूण्याई, पुण्याई, पूण्याइ, पुन्याइ

उत्तर:

  1. विहीर
  2. निश्चय
  3. ऐसपैस
  4. पुण्याई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1. बाबा चला जेवून घ्या मनू म्हणाला
2. आबा म्हणाले अरे अया रडते काय फरसू
उत्तर:
1. “बाबा, चला, जेवून घ्या,’ मनू म्हणाला.
2. आबा म्हणाले, “अरे, अया रडते काय फरसू?”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Corporation
  2. Handbill
  3. Index
  4. Refreshment.

उत्तर:

  1. महामंडळ, निगम
  2. हस्तपत्रक.
  3. अनुक्रमणिका
  4. अल्पोपाहार.

मातीची सावली Summary in Marathi

प्रस्तावना:

प्रसिद्ध लेखक. कथा, बालकथा, व्यक्तिचित्रण, ललित लेखन, अनुवादित लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांची एक कथा आहे. आधुनिक जीवनाचा, शहरी जीवनाचा प्रभाव वाढत जाऊन शेती व शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हळूहळू लोप पावत आहे. अशा वेळी नामशेष होत असलेल्या संस्कृतीच्या परंपरेच्या वारसदारांची होणारी उलघाल या कथेत सांगितली आहे. ही कथा प्रमाण भाषेतच आहे.

पण तिच्यातील संवाद हे बोलीभाषेतील आहेत. उत्तर कोकणाच्या वसईपर्यंतच्या किनारपट्टीतील परिसरात बोलली जाणारी ही एक बोली आहे. फरसू हा एक गरीब शेतकरी. तो पारंपरिक समाजजीवनाला अनुसरून जगणारा. जमीन, शेती, झाडेपाने यांच्यावर मनापासून, जिवापाड प्रेम करणारा. या सर्वांशी त्याचे रक्ताचेच नाते निर्माण झाले आहे. पूर्वजांनी जी वाट मळून ठेवली आहे, त्या वाटेने जाण्यात त्याला धन्यता वाटते. मनू त्याचा मुलगा. त्याला फरसूने वाढवले, शिकवले.

शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी लागली. त्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. चकचकीत, गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याने बिल्डरला जमीन विकली. फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खाणाखुणा पुसून टाकणाऱ्या एकेक घटना घडू लागल्या. त्यामुळे फरसू विकल झाला. असहायतेने तो परिस्थितीला शरण गेला. त्याच्या वेदनांचे चित्रण या कथेत आलेले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

शब्दार्थ:

  1. खरबरीत – खरखरीत.
  2. डाफरायची – रागाने खेकसून बोलायची.
  3. दुसऱ्या वितापर्यंत – (एक वासरू जन्मल्यापासून) दुसऱ्या वासराचा जन्म होईपर्यंत.
  4. कोरड्याठाक – पूर्ण कोरड्या.
  5. खोडा – हातपाय अडकवून शिक्षा करण्याचे उपकरण, उनाड गुराच्या गळ्यातील लोढणे.
  6. तुमश्या – तुमच्या.
  7. नशिबाई – नशिबाची.
  8. रेल – राहील.
  9. रेतात – राहतात.
  10. मेणवात – (शब्दश: अर्थ : मेणबत्तीची वात.) इथे अर्थ : प्राण.
  11. लागलोआ – लागला असता.
  12. माणसाहारकं – माणसासारखं.
  13. घालाशी – घालायची.
  14. ढोरहारकं – ढोरांसारखे, गुरांसारखे.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. खोडा घालणे – संकटे निर्माण करणे.
  2. उघड्यावर टाकणे – जबाबदारी झटकणे, जबाबदारी घेण्यास नकार देणे. जबाबदारी नाकारून असहाय स्थितीत ढकलणे.
  3. टकळी चालणे – बडबड करणे, सतत बोलत राहणे.
  4. मेणवात विझून जाणे – मरण पावणे.
  5. नजर लागणे – (एखादया व्यक्तीमुळे) काहीतरी वाईट घडणे.
  6. पापांचा घडा भरणे – सर्वनाशाचा क्षण येणे.
  7. संसार फुलणे – संसारात सुखसमृद्धी येणे.
  8. मातीला मिळणे – उद्ध्वस्त होणे, विनाश होणे.
  9. नाळ तुटणे – संबंध न राहणे.
  10. डोळे भरून येणे – डोळ्यांत पाणी येणे.

बोलीभाषेतील वाक्यांचा अनुवाद

1. वाक्ये: यी बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का?
भाषांतर: ही विहीर नाही. नदी आहे नदी. एखादयाच्या कार्यात अडथळे आणले, तर तुमच्या नशिबाची वाळू झाल्याशिवाय राहील का?

2. वाक्ये: काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे ! अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी?
भाषांतर: कसली स्वप्ने पाहत उभे राहतात, कोण जाणे ! अख्खा दिवस आम्ही काय रांधतच (स्वयंपाक करीतच) बसायचे काय?

3. वाक्ये: नय् ते उबा जलम त्या गोठ्यात काडाला लागलोआ. आज माणसाहारकं घर मिळालंय.
भाषांतर: नाही तर उभा जन्म त्या गोठ्यात काढावा लागला असता. आज माणसासारखे घर मिळाले.

4. वाक्य: जेजूस आथं मानासुदं नेलं ते बरं होईल.
भाषांतर: हे येशू, आता मलासुद्धा नेलेस तर बरे होईल.

5. वाक्य: आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं.
भाषांतर: आमचा फरसू खरेच म्हातारा झाला आता.

6. वाक्य: तू आपला नुसता रडत बसलाय.
भाषांतर: तू आपला नुसता रडत बसला आहेस.

7. वाक्य: ते शाप मीस भोगीन.
भाषांतर: ते शाप मीच भोगीन.

8. वाक्य: माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ?
भाषांतर: माती (जमीन) नसेल तर ते ढोराचे जीवन तरी काय कामाचे?

9. वाक्य: पण आमशी नातंपण… त्यांना कायच नय् येणार रे…
भाषांतर: पण आमची नातवंडे… त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही रे…

9th Std Marathi Questions And Answers:

Englandcha Hivala Question Answer Class 9 Marathi Chapter 10.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Question Answer Maharashtra Board

इंग्लंडचा हिवाळा Std 9 Marathi Chapter 10.1 Questions and Answers

1. कारण लिहा:

प्रश्न 1.
कारण लिहा:
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे –
उत्तर:
लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही. वातावरणात मजेदार गारवा असतो. चार-पाच मैल चालूनही थकवा येत नाही. परिसर हिरवागार राहतो; म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

2. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 1
उत्तर:

भारतामधील धुके लंडनमधील धुके
1. मनाला सुखद संवेदना देते. 1. लंडनचे धुके औरच आहे.
2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. 2. वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते.
3. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. 3. काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.
4. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. 4. वर्षातून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते.

3. इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.

प्रश्न 1.
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात. घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात. झाडाला हात लावला की हात काळे होतात.

अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

4. स्वमत:

प्रश्न (अ)
‘हिवाळ्यातील एक क्षण,’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
उत्तर:
गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय चारधामच्या यात्रेला ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो. गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती. रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना नव्हती. पहाटेच मला जाग आली. बाहेर थंडी होती. उबदार शाल लपेटून मी बाहेर आलो. गच्च धुक्याची चादर लपेटलेली झाडे नि गंगेच्या धारेवर बर्फाची ओढणी अंथरली होती. ऑक्टोबर महिना असल्यामुळे पर्वतावरील बर्फ वितळले होते. पण शिखराशिखरांवर बर्फाचे भलेमोठे पुंजके होते. मी त्यांच्याकडे भान हरखून पाहत होतो. इतक्यात एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने तळपला. हे दृश्य केवळ विलोभनीय होते. एक क्षणभरच हे अलौकिक सौंदर्य उमटले नि लुप्त झाले. हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

प्रश्न (आ)
तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:
वर्षाऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. तापलेल्या मातीवर पावसाचा शिडकावा झाला की मातीचा है सुगंध येतो. सारी सृष्टी न्हाऊन निघते. डोंगरदऱ्यांत पाणी खळाळते. झाडे अंघोळ करून स्वच्छ होतात. नदीनाले भरभरून वाहू लागतात. गुरेढोर, पशुपक्षी यांना पाणी मिळते. शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात. मुले आनंदाने बागडतात. सर्वत्र हिरवेगार होते. सृष्टी आपले रूप पालटते. चराचरावर आनंदाची लकेर घुमते. कवी लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात. खरेच! पाऊस हा नवसृजनाचा ऋतू आहे!

प्रश्न (इ)
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
ऐन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो. आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हाला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही. सर्व परिसराला धुक्याने जणू बाहूत कवटाळले होते. डोंगरदरी धुक्याच्या आइसक्रीमने ओतप्रोत भरली होती. झाडे धुक्याचे पांघरूण घेऊन पेंगत होती. रस्त्यावर दहा फुटांच्या पुढचे दिसत नव्हते. तोंडातून कुंकर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली.

अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांदयांची खूप झाडे होती. अचानक क्षणभर ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या पायथ्याशी उन्हाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. मला अशोक बागवे याच्या कवितेची एक ओळ आठवली – ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिवळे दर्वळे’ धुक्यातील दिवसांतील हा क्षण माझ्यासाठी केवळ मोलाचा ठरला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

5. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

प्रश्न 1.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 2

अपठित गद्य आकलन:

आपण पाठ्यपुस्तकात गदय व पदय पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विद्यार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्यउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गदय उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.

1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्रश्न 1.
दुष्परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 3

2. अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत, ते लिहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

भाषा सौंदर्य :

एकच भाव वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त करणे-
एखादे रिकामे घर पाहिल्यावर तुमच्या मनात येणारे विचार.

  1. घर उदास वाटते.
  2. घर कुणाची तरी आठवण काढते.
  3. घर स्वत:चे एकेकाळचे वैभव आठवून उदास झाले आहे.
  4. घराला गाव सोडून गेलेल्या माणसांची आठवण येते.
  5. एकेकाळी माणसांनी भरलेले घर आज एकाकी वाटते.

विद्यार्थ्यांनो, ही यादी कितीही वाढवता येईल. भाषेच्या अशा अर्थपूर्ण आणि सृजनशील रचनांचा अभ्यास कराव आपले लेखन अधिक परिणामकारक करा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
इंग्लंडमधील हिवाळा आणि भारतातील हिवाळा यांची तुलना करा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये हिवाळ्यात कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. भारतात मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. भारतातील काही भागांत तर अत्यंत प्रखर, तीव्र उजेड असतो; तर काही भागांत उजेड भरपूर प्रमाणात असतो, पण तापमान कमी असते. इंग्लंडमध्ये अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव आढळतो. भारतात मात्र, माणसे, प्राणी व वाहने सावलीसोबतच चालत, धावत असतात. इंग्लंडमध्ये पर्णहीन वृक्षांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही.

भारतामध्ये झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकत असतात. सावली पडावी इतका प्रकाश इंग्लंडमध्ये महिनोन् महिने पडत नाही. त्यामुळे वस्तूंवर छायाप्रकाशाचे खेळ दिसत नाहीत. पण भारतात प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची असते. असा इंग्लंडमधील हिवाळा व भारतातील हिवाळा यांत फरक दिसून येतो.

इंग्लंडचा हिवाळा Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात इरावती कर्वे यांनी इंग्लंडमधील पावसाळी धुके व हिवाळ्याचे वर्णन केले आहे. तसेच या ऋतूंमधील आपल्याकडील वातावरणाशी तुलना केली आहे. अतिशय विलोभनीय शब्दांत ऋतूंमधील साम्य व भेद यांचे दृश्य चितारले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर इंग्लंडमध्ये रोज पाऊस पडायचा. लंडनवासी या पावसावर वैतागत असायचे, पण कायम पडणाऱ्या पावसाची लेखिकेला खूप मौज वाटायची.

2. आपल्याकडचे धुके मनाला सुखद संवेदना देते. पावसानंतरचे प्रसन्न आकाश, सकाळ-संध्याकाळची थंडी, लांबवर दिसणारे स्वच्छ वातावरण, त्यात थोडा वेळ राहणारा धुक्याचा पडदा, अशी आपल्याकडील धुक्याची वैशिष्ट्ये! महाबळेश्वरावर किंवा सिंहगडावर खालची दरी धुक्याने भरलेली दिसते. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्ये उमटतात. सूर्य आणखी थोडा वर आला की धुके निघून जाते व गवताच्या पात्यांवर असंख्य दवबिंदू चकाकतात. संध्याकाळचे धुके रात्र निवळली की नाहीसे होते व रात्री आकाश तारकांनी चमकत असते.

3. लंडनचे धुके औरच आहे. काळसर पांढुरके धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. लंडनमधील कारखाने व लक्षावधी चुली वातावरणात धूर ओकत असतात. अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसतात. काळोख डोळ्यांना दिसतो. हाताने धरता येतो. असे काळे धुके वर्षातून एक-दोनदा लंडनवर पसरते. या धुक्याने हाहाकार माजतो.

4. हिवाळ्यात लंडनमध्ये कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. या अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव असतो. निरनिराळ्या बगिच्यांत पर्णहीन वृक्ष उभे असतात. त्यांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही. येथे सावली पडेल इतका स्वच्छ उजेड महिनेच्या महिने पडत नाही.

5. आपल्याकडील हिवाळ्यात रखरखीत ऊन व त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने चकाकतो. माणसे व वाहने सावलीनिशी धावत असतात. प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची ! खांबाला चिकटून असलेल्या सावलीत पक्षी टेलिग्राफच्या तारावर बसलेले दिसतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली धरून चालतात. झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकतात.

6. एकदा लेखिका हिवाळ्यातच सेंट जेम्स बगिच्यात गेल्या. तेथील तळ्यावरचा प्रकाश खालून वर फाकला होता; कारण वर सूर्य नसलेले अभ्राच्छादित आकाश होते. तळ्याच्या पाण्यावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्यावर प्रकाश परावर्तित होऊन सगळीकडे फाकला होता. या विशेष प्रकाशात सर्व रंग आंधळे वाटतात. वसंतऋतूत एखादया दिवशी इथे सूर्यप्रकाश पडला की सृष्टी रंगाने नटते. येथील रंग जरा मंद व सौम्य वाटतात. आपल्याकडे दाट सावल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक भासतात.

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani Dharila Pandharicha Chor Question Answer Class 9 Marathi Chapter 2.2 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Question Answer Maharashtra Board

संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Std 9 Marathi Chapter 2.2 Questions and Answers

1. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 1

2. जोड्या लावा:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
उत्तर:

                   ‘अ’ गट ‘ब’ गट
1. विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
2. विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
3. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.

प्रश्न (आ)
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *

प्रश्न (इ)
प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्रीविठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा.
उत्तर:
श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, असे संत जनाबाई यांना वाटते आहे. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्याच्यावर सोहं शब्दाचा मारा केला. इतकेच नव्हे; तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

4. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल, तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे.

उपक्रम:
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 2

उत्तर:

  1. पंढरीचा चोर
  2. बंदिखाना
  3. हृदयाचा
    1. शब्दांची
    2. सोहं शब्दाचा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा:
1. पंढरीचा चोर म्हणजे (श्रीकृष्ण/श्रीविष्णू /महादेव/श्रीविठ्ठल) .
2. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण
(अ) त्याच्या पायात बेडी घातली.
(आ) त्याला हृदयात कोंडला होता.
(इ) त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.
(ई) त्याच्या गळ्यात दोर बांधला.

उत्तर:

  1. विठ्ठलाला धरले – भक्तीच्या दोराने
    1. विठ्ठल काकुलती आला – ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
    2. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी – शब्दरचनेच्या जुळणीने.
  2. पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल.
    1. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर.
उत्तर: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर

1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत जनाबाई.
2. कवितेचा विषय → विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. बेडी = साखळी
  2. जीव = प्राण
  3. पाय = पद
  4. हृदय = जिव्हार.

4. कवितेतून मिळणारा संदेश → भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:

‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।
→ संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला।।’
उत्तर:
आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

भाषाभ्यास:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आत
  2. चोर
  3. सोडणे.

उत्तर:

  1. आत × बाहेर
  2. चोर × साव
  3. सोडणे × धरणे.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. जुड्या
  2. दोर
  3. हृदय
  4. बंदिखाने.

उत्तर:

  1. अनेकवचन
  2. एकवचन
  3. एकवचन
  4. अनेकवचन.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बंदीखाना, बंदिखाना, बंधिखाना, बंदिकाना.
2. पंन्ढरी, पंढरी, पंढरि, पंडरी.
उत्तर:
1. बंदिखाना
2. पंढरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

उपक्रम:

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील स्त्री-संत कवयित्रींची माहिती मिळवा.

संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Summary in Marathi

कवितेचा आशय:

पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा; म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे. त्यासाठी चोर-शिपायाचे रूपक कवितेत वापरले आहे.

शब्दार्थ:

  1. गळां – गळ्यामध्ये.
  2. बंदिखाना – तुरुंग, कैदखाना.
  3. कोंडिला – डांबून ठेवला.
  4. शब्दें – शब्दांनी.
  5. जवाजुडी – कड्यांची साखळी.
  6. पायीं – पायात.
  7. बेडी – जखडून ठेवण्याची साखळी, साखळदंड.
  8. सोहं – अहंकार, मीपणा, व्यर्थ अभिमान.
  9. काकुलती – विनवणी करणे.
  10. बा – अरे.
  11. जीवें न सोडी – जिवंत सोडणार नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

श्रीविठ्ठलाबरोबर सुखसंवादरूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतात:

गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला (श्रीविठ्ठलाला) पकडले आहे. ।।1।।
माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे. ।।2।।
या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आहे. (भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.) ।।3।।
विठ्ठलावर मी (अहंकारी) अहंपणाचा भडिमार केला. ‘तू म्हणजे मीच’ असे सांगितले. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला. विनवणी करू लागला. ।।4।।
संत जनाबाई म्हणतात – अरे, विठ्ठला, मी तुला जिवंत सोडणार नाही. (माझ्या मनात कायम तुझा वास राहील, अशी तजवीज करणार आहे.) ।।5।।

9th Std Marathi Questions And Answers:

Yantrani Kela Band Question Answer Class 9 Marathi Chapter 10 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 10 यंत्रांनी केलं बंड Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 10 यंत्रांनी केलं बंड Question Answer Maharashtra Board

यंत्रांनी केलं बंड Std 9 Marathi Chapter 10 Questions and Answers

1. फरक सांगा:

प्रश्न 1.
फरक सांगा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 1
उत्तर:

यंत्राद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
1. नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे. 1. स्वयंपाक करणे.
2. घरातला हिशोब ठेवणे. 2. कपडे धुणे, भांडी घासणे.
3. बँका वगैरे कचेरीतील कामे. 3. घर-इमारतीची स्वच्छता.
4. पुस्तक छपाई इत्यादी. 4. मुलांना सांभाळणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

2. पाठात पुढील यंत्रे कोणती कार्ये करतात?

प्रश्न 1.
पाठात पुढील यंत्रे कोणती कार्ये करतात?
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 2
उत्तर:

यंत्र कार्य
1. रोबो फोन 1. फोन करणे व घेणे.
2. यंत्रमानव 2. कार्यालयीन कामे.
3. सयाजी 3. कोणाच्याही सहयांची हुबेहूब नक्कल करणे.

3. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.

प्रश्न 1.
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
1. …………………………….
2. …………………………….
उत्तर:
1. यंत्रे किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही.
2. यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

4. खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा :

प्रश्न 1.
खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा :

  1. [ ] – यंत्र
  2. [ ] – उद्गार
  3. हुबेहूब – [ ]
  4. परिपूर्ण – [ ]

उत्तर:

  1. [उद्धट] – उद्गार
  2. [अमानुष] – यंत्र
  3. हुबेहूब – [नक्कल]
  4. परिपूर्ण – [मनोव्यापार]

5. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. हकालपट्टी करणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
2. स्तंभित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
3. चूर होणे. (इ) हाकलून देणे.
4. वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.

6. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित शब्द व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकण करा व लिहा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित शब्द व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकण करा व लिहा:
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्त, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन.
उत्तर:
उपसर्गघटित शब्द – अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन.
प्रत्ययघटित शब्द – भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्त, गावकी, दगाबाज.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

7. स्वमत.

प्रश्न (अ)
तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोतम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का ? सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतीत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा. तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अचाट आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात.

अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदा., खाणी, अंतराळयाने. यंत्रांच्या फायदयांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले काम यंत्रे उत्तम रितीने पार पाडतील, हे खरे. पण, सांगितलेले काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का, केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. ती माणूसच देऊ शकतो.

प्रश्न (आ)
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली, तर…’ कल्पनाचित्र रेखाटा.
उत्तर:
यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवयच जडली. शेती, दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा-कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय, घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामेसुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली.

या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्या वेळामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रचणे सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवांचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धीसुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. माणसे राहिली बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवांमधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यांतून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले. करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला.

उपक्रम:

प्रश्न 1.
‘मानवाचा खरा मित्र – यंत्रमानव’ ही लेखक सुबोध जावडेकर यांची विज्ञानकथा मिळवा व तिचे वर्गात वाचन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

भाषाभ्यास:

प्रश्न 1.
पुढे दिलेली उदाहरणे वाचा. त्यांतील भाव समजून घ्या व त्यांतील रसाचे नाव लिहा: (चौकटीत उत्तरे दिली आहेत.)
उत्तर:
1. “दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी”
– [शृंगार रस]

2. “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
दैवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला” .
– [करुण रस]

3. “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळूनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी”
– [वीर रस]

4. ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
… शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे ।
– [बीभत्स रस]

5. आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड गाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?
– [हास्य रस]

6. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल”
– [अद्भुत रस]

7. “ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती”
– [भयानक रस]

8. “पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपात्रती
झाड खटखट तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रुद्र । ये चहकडे।”
– [रौद्र रस]

9. “जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे”
– [शांत रस]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 10 यंत्रांनी केलं बंड Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 4

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

पाठातील वाक्य स्वभावगुण/भावना
1. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात.
2. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पाहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत.

उत्तर:

पाठातील वाक्य स्वभावगुण/भावना
1. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात. चौकसपणा
2. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पाहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत. यंत्रांविषयी सहानुभूती

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 6

प्रश्न 2.
कारणे लिहा:
1. दीपकच्या वडिलांनी कचेरीत माणसांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली.
2. दीपकला यंत्रांबद्दल जवळीकही फार वाटत असे.
उत्तर:
1. दीपकच्या वडिलांना यंत्रांबद्दल विश्वास व प्रेम वाटत होते.
2. यंत्रे दीपकचे ऐकत असत, त्यांनी सांगितलेली कामे करीत असत.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
दीपकने मोडलेल्या यंत्राचे मनोगत लिहा.
उत्तर:
दीपक, तुला आज सांगून टाकतेच बघ. पूर्वी मला तुझा खूप राग यायचा. दुःख व्हायचे. कारण मला निर्माण केले होते मुलांशी खेळण्यासाठी. वाटायचे, मुलांबरोबर काही काळ खेळता येईल. त्यांच्याबरोबर खेळात रममाण होता येईल. पण तू थोड्याच वेळात आमची मोडतोड करून टाकायचास! आणि त्याचे दु:ख होत राही.

मग मी तुझ्या चेहेऱ्याकडे बारकाईने पाहू लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. तू केवळ बेदरकारपणे आमची मोडतोड करीत नाहीस. तुझ्या मनात कुतूहल असते, जिज्ञासा असते. आम्हांला हालतेचालते करण्यासाठी कोणती युक्ती केली असेल, हे तुला जाणून घ्यायचे असते. खरे सांगू का ? हे कळल्यापासून मला तुझे कौतुकच वाटते. तुझ्यासारख्या जिज्ञासू, चौकस लोकांमुळेच आमची निर्मिती झाली आहे आणि असंख्य मुलांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. म्हणूनच, तू केलेल्या मोडतोडीचाही आता आम्हांला आनंदच होतो!

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 8

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 10

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
उताऱ्यातून यंत्र व सजीव यांबाबत जाणवणाऱ्या दोन परस्परविरोधी गोष्टी:
1. ……………………………
2. ……………………………
उत्तर:
1. दीपक यंत्रांना सजीव कसे करता येईल, याचा विचार करीत होता.
2. दीपकचा यंत्रमित्र सजीवासारखा वागत होता.

प्रश्न 2.
का ते लिहा:
दीपक अस्वस्थ झाला.
उत्तर:
यंत्रमित्राप्रमाणे बाबांच्या कचेरीतील सर्व यंत्रे चिडली आणि त्यांनी असहकार पुकारला, तर? या चिंतेने दीपक अस्वस्थ झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
“मित्रा ! जरा गृहपाठ करून देतोस का?” या उद्गारांवर तुमचे मत नोंदवा.
उत्तर:
कल्पना छान वाटते. यंत्रमानवाकडून किती वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेता येतील, नाही का ? बहुसंख्य विदयार्थी क्लासला जातात. बहुसंख्य विदयार्थी मार्गदर्शके खरेदी करतात. हळूहळू विदयार्थ्यांचा अभ्यास करणारे यंत्रमानव तयार होतील. यंत्रमानवांमुळे मुलांचे गृहपाठ झटपट व अचूक होतील. कोणालाही , शिक्षा होणार नाही. वरवर पाहता हे सर्व साधे, सोपे वाटते. पण हे , माझ्या मते साधे सोपे नाही. हे भयंकर आहे!

विदयार्थ्यांना गृहपाठ दिला जातो, तो त्यांचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून. पण विदयार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही, तर तो पक्का होणार तरी कसा? आपण स्वतः अभ्यास करतो, तेव्हा वर्गात शिकवलेले आपल्या स्मरणात राहते. आपली आकलनशक्ती, विचारशक्ती व कल्पनाशक्ती वाढते. आपली बदधिमत्ता वाढते. आपण अभ्यास केला नाही, तर आपला विकासच होणार नाही. या पाठातील दीपक हा चौकस मुलगा आहे. तो स्वत:चा अभ्यास यंत्रमानवाला करायला सांगतो, हे पटत नाही.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. तो यंत्रासारखा हालचाली करू लागला.
2. मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना.
उत्तर:
1. दीपकच्या डोक्यात यंत्राविषयीचेच विचार घोळत राहिले. तो त्या विचारांत बुडाला होता. यंत्रांचे विचार त्याच्या अंगात भिनले. म्हणून तो यंत्रासारख्या हालचाली करू लागला.
2. यंत्राच्या विचारात दीपक इतका बुडाला होता की, आपण यंत्रासारख्या हालचाली करीत आहोत, हे त्याच्या लक्षात आले नाही. “दीपक! काय चाललंय ?” असे शिक्षकांनी विचारलेसुद्धा, संपूर्ण वर्गात त्याच्या हालचाली विसंगत दिसत होत्या. म्हणून सगळ्यांना हसू येत होते.

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही.
उत्तर:
दीपक यंत्रांच्या विचारांनी भारावून गेला होता. शिक्षक यंत्रमानव झाले व विदयार्थी यंत्रमानव झाले, तर काय होईल? हा विचार करता करता तो कल्पनेच्या राज्यात शिरलासुद्धा. सगळेजण यंत्रेच बनली आहेत, असा त्याला भास होऊ लागला. म्हणून त्याच्या तोंडून ‘यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही,’ असे उद्गार बाहेर पडले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 3.
नातेसंबंध सांगा:
दीपकचे बाबा आणि मिस अय्यंगार.
उत्तर:
दीपकचे बाबा: एका कंपनीचे मालक.
मिस अय्यंगार: दीपकच्या बाबांची स्टेनो-टायपिस्ट.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
स्वयंचलित यंत्रमहिलेचे स्वरूप.
उत्तर:
यंत्रमहिलेच्या तोंडावर धातूची जाळी बसवली होती. तिचे शरीर पिंपासारखे बनवलेले होते, जणू काही तिलाच पिंपात घातले होते, असे वाटावे. हातापायात मोजे होते. स्टेनलेस स्टीलचे बूट होते. असा एकूण त्या यंत्रमहिलेचा अवतार होता.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड 12

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती).

प्रश्न 1.
मिस अय्यंगारची (यंत्रमहिलेची) घरातल्या कामांसाठी नेमणूक करायची झाल्यास तिच्याकडून कोणकोणती कामे करून घेता येतील?
उत्तर:
खरे तर घरातली सर्व कामे यंत्रमहिलेकडून करून घेता येतील. सकाळी उठल्यावर अंथरूण-पांघरुणांची घडी करून ठेवणे, आदल्या दिवशी धुतलेले कपडे घडी करून कपाटात ठेवणे, घरातील सर्व फर्निचरवरील धूळ पुसणे, खिडक्या-दारे स्वच्छ करणे, केरकचरा काढणे वगैरे कामे सहज करून घेता येतील. स्वयंपाकघरातील उदा., भाज्या चिरणे वगैरे कामेसुद्धा करून घेता येतील.

वेगवेगळे पदार्थ विशिष्ट प्रमाणात मिसळणे व ते शिजवणे यांचाही प्रोग्रॅम तयार करून तो यंत्रमानवाच्या स्मृतिकोशात भरला, तर प्रत्यक्ष पदार्थ शिजवण्याचे कामही यंत्रमानव करू शकतो. मग कपडे धुण्याचे काम सांगता येईल. घरातल्या कामांचे नियोजन करणे, हिशेब ठेवणे वगैरे कामे; तसेच संगणकावरून करता येण्यासारखी सगळी कामे यंत्रमानवाकडून करून घेता येतील. म्हणजे जवळजवळ सर्व कामे यंत्रमानवाला सांगता येतील.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
हा रोबो फोन! केवळ ध्वनिलहरीवर काम करतो.
उत्तर:
आदेश देणाऱ्याचे केवळ बोलणे ऐकून रोबो फोन काम करतो.

प्रश्न 2.
रोबो फोनच्या कार्यपद्धतीचा ओघतक्ता तयार करा :

  1. ………………………………………
  2. ………………………………………
  3. ………………………………………
  4. ………………………………………
  5. ………………………………………

उत्तर:
रोबो फोनची कार्यपद्धत:

  1. रोबो फोनला तोंडाने बोलून फोन लावण्याचे काम सांगितले जाते.
  2. बोललेले ऐकून तो लगेच फोन जोडून देतो. तेव्हा पलीकडील व्यक्तीच्या फोनमधील दिवा पेटतो.
  3. 10 सेकंदांत प्रतिसाद मिळाला नाही, तर पलीकडच्या व्यक्तीच्या फोनचा बझर वाजू लागतो.
  4. व्यक्ती जागेवर नसेल, तर मिळालेला निरोप ध्वनिमुद्रित करून ठेवतो.
  5. आदेश देणारी व्यक्ती आल्यावर तिला ध्वनिमुद्रित केलेला निरोप दिला जातो.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता.
उत्तर:
यंत्रे माणसांसारखी कामे करतात, हे पाहून दीपक अस्वस्थ झाला होता. काम करण्याची बुद्धी यंत्राकडे आहे. पण माणूस जसे चांगले-वाईट ठरवू शकतो, तशी यंत्रे ठरवू शकतील का? ती अमानुष आहेत. त्यांनी वाईट गोष्टी करायला सुरुवात केली तर? या शंकेमुळे तो अस्वस्थ होऊन तळमळत होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 2.
डोळा लागताच दीपकच्या कानांवर पडलेल्या शब्दांतून उभे राहणारे दृश्य लिहा.
उत्तर:
दोन व्यक्तींचे बोलणे दीपकच्या कानांवर पडले. त्यांपैकी एकाचे नाव होते सयाजी. तो कोणाचीही हुबेहूब सही करू शकत होता. दुसऱ्याने दीपकच्या वडिलांच्या नावे संपत्ती दान करणारे पत्र लिहिले होते. त्या पत्रावर तो सयाजीला दीपकच्या वडिलांची सही करण्यास सांगत होता.

प्रश्न 3.
माहिती लिहा:
1. दीपकने पाहिलेले दृश्य
2. त्या दृश्याचा दीपकला जाणवलेला अर्थ.
उत्तर:
1. कानावर पडलेले शब्द ऐकून दीपकला धक्का बसला. भयंकर कारस्थान चालले होते. म्हणून उठून त्याने शेजारच्या खोलीत डोकावून पाहिले. तिथे माणसांसारखी दिसणारी यंत्रे होती. ती यंत्रमानव होती आणि त्याच्या बाबांच्या कचेरीतच काम करणारी होती. त्यापैकी एक यंत्रमानव सयाजी म्हणजे सहयांची हुबेहूब नक्कल करणारा. दीपकने तिथे जाऊन त्यांना जाब विचारला. ते सर्व यंत्रमानव दीपकच्या बाबांच्या इस्टेटीचा ताबा घेऊ बघत होते.
2. दीपकच्या लक्षात आले की, केवळ आज्ञापालन करणारे यंत्रमानव आता बंडखोर बनले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी दरोडेखोरी आरंभली होती. ते बेकायदेशीरपणे बाबांची संपत्ती हडप करू बघत होते.

प्रश्न 4.
अर्थ स्पष्ट करा:
तुझे बाबाच याला कारण आहेत.
उत्तर:
दीपकच्या बाबांचा यंत्रांवर फार विश्वास होता. त्यामुळे यंत्रांवर त्यांचे प्रेमही होते. त्यांनी आपल्या कचेरीत यंत्रमानवांची नेमणूक केली होती. इतकेच नव्हे, तर यंत्रांना माणसांसारखे बनवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांनी तज्ज्ञांकरवी माणसांप्रमाणे विचार करू शकणारे यंत्रमानव तयार करवून घेतले होते. माणसांसारखा विचार करू लागल्यामुळे ते स्वतंत्र झाले. ते केवळ आज्ञापालन करणारे राहिले नाहीत. असे यंत्रमानव हे माणसाचे फार मोठे शत्रू ठरणार आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
कचेरीत जमलेल्या सर्व यंत्रमानवांपैकी कोणत्याही एका यंत्रमानवाचे बोलणे तुमच्या कल्पनेनुसार लिहा.
उत्तर:
कचेरीतल्या त्या खोलीत पाचसहा यंत्रमानवांची लगबग चालू होती. त्यांतला एकजण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. “मित्रांनो, हे काही चांगलं चाललेलं नाही. मला अजिबात पटत नाही. काय म्हणता? यात काय वाईट आहे? अरे, या । माणसांनी आपली निर्मिती केली. त्यांनीच आपल्यात बुद्धी पेरली.

त्यांचाच घात करायचा? अरे, मग आपण व ती रानटी जनावरे यांत फरक काय राहिला? ते काही नाही. मी काही तुमच्यात सामील होणार नाही. काय म्हणता? आपणच राजे होणार आहोत? पृथ्वीवर आपली सत्ता? विसरा, विसरा ते. अरे माणसांना हे कळल्यावर तुम्हांला सहजी असं करू देतील? आपले सगळे अवयव वेगळे करतील ते. आणि एकदा का आपला मदर बोर्ड काढला की, आपले आयुष्यच संपले. तेव्हा, जेवढे जीवन मिळाले आहे, तेवढे आनंदाने जगू या. हे सर्व ताबडतोब थांबवा.”

उतारा क्र. 5

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
दीपकला बाबांचे झालेले दर्शन:
1. …………………………
2. …………………………
उत्तर:
दीपकला बाबांचे झालेले दर्शन:
1. बाबा त्यांच्या खोलीत पाठमोरे उभे होते.
2. प्रत्यक्षात पाहिले तेव्हा लक्षात आले की, ते बाबांसारखे दिसत होते, पण बाबा नव्हते. यंत्रमानव होते किंवा बाबा पूर्णपणे गुलाम झाले होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 2.
नातेसंबंध सांगा:
दीपक व ज्यूली.
उत्तर:
दीपक व ज्यूली : मित्रमैत्रीण.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
समर्पक उदाहरण लिहा:
1. दीपकला गुलाम केले.
2. दीपकच्या बाबांना गुलाम केले.
उत्तर:
1. दीपकला गुलाम केले: दीपकला त्याच्या बाबांनी लोखंडी हातांनी धरले; खुर्चीत दामटून बसवले. त्याची इच्छा नसताना जबरदस्तीने न्याहरी खायला लावली. त्याने गृहपाठ केला होता. पण एक चूक झाली होती, तरीही त्याला संपूर्ण गृहपाठ पुन्हा करायला लावला.
2. दीपकच्या बाबांना गुलाम केले: यंत्रमानवांनी दीपकच्या बाबांना जवळजवळ यंत्रमानवच करून टाकले होते. दीपक ओरडत, किंचाळत प्रतिकार करीत असतानाही बाबांनी त्याला जबरदस्तीने खुर्चीत बसवले. कोणतेही बाबा आपल्या मुलावर बळजोरी करणार नाहीत, इतकी बळजोरी बाबांनी दीपकवर केली. दीपकचे बाबा स्वत:चा बाबापणा विसरले होते, इतके ते गुलाम बनले होते.

प्रश्न 2.
ज्यूलीच्या घरी दीपकला आलेला अनुभव लिहा.
उत्तर:
दीपक ज्यूलीकडे खेळायला गेला. पण ती त्याला दिसली नाही. त्याने त्यांच्या बंगल्याभोवती शोध घेतला. पण तिथेही ती दिसली नाही. एक यंत्रमानव एखादे बोचके काखेतून आणावे, तसे तो ज्यूलीला आणत होता. ती ओरडत होती. किंचाळत होती. आक्रोश करीत होती. पण त्याला किंचितही दया आली नाही. यंत्रमानवांनी सर्वत्र उच्छाद मांडला होता, हे दीपकच्या लक्षात आले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे यंत्रमानवांचे स्वभावगुण लिहा.
उत्तर:
माणसांमध्ये जे जे गुण वा अवगुण आहेत, ते ते यंत्रमानवांनी प्राप्त केले आहेत. माणसे गुलामीविरुद्ध लढतात, स्वतंत्र होऊ पाहतात, तसे यंत्रमानव स्वतंत्र होऊ पाहत आहेत. त्यांच्यात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. माणूस जसा स्वत:च्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रथम करतो, तसा प्रयत्न यंत्रमानव करीत आहेत. ते माणसांप्रमाणेच बंड करतात. कटकारस्थाने करतात. दीपकच्या बाबांच्या संपत्तीवर दरोडा घालतात. ही एक प्रकारची लढाईच आहे. या लढाईत ते निष्ठुरपणे वागतात.

माणसांप्रमाणेच इतरांना गुलाम करू पाहतात. दीपकला जबरदस्तीने दामटून खुर्चीत बसवतात. आपल्या आज्ञेप्रमाणे वागायला लावतात. ज्यूलीलाही ते एखादया बोचक्याप्रमाणे उचलून आणतात. तिच्या आक्रोशाकडे जराही लक्ष देत नाहीत. दीपकच्या वडिलांना त्यांनी गुलाम केले आहे. ते यंत्र असल्याने त्यांच्याकडे भावना नाहीत. म्हणून क्रूरपणे, निष्ठुरपणे वागतात. थोडक्यात, यंत्रमानव जर खरोखर स्वतंत्रपणे विचार करू लागला, तर माणूस हा प्राणीच नष्ट होईल!

उतारा क्र. 6

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. दीपककडे ज्यूलीने केलेली तक्रार.
2. यंत्रमानवाने सांगितलेली वस्तुस्थिती.
उत्तर:
1. दीपकने ज्यूलीकडे खेळायला यायला उशीर केला. त्यामुळे ती यंत्रमानवाच्या तावडीत सापडली. त्याने तिला एखादया निर्जीव वस्तूसारखे उचलून आणले.
2. कोणीही कितीही दंगामस्ती केली, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जगातल्या यंत्रांनी बंड करून जगावर ताबा मिळवला आहे. आता जगावर यंत्रांचे राज्य आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

प्रश्न 2.
विधान पूर्ण करा:
यंत्रमानवांचा मेंदू गणिती असल्याने …………………
उत्तर:
यंत्रमानवांचा मेंदू गणिती असल्याने ते कोणालाही कुठूनही शोधून काढू शकतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दीपक यंत्रमानवाच्या डोक्याच्या मागे असलेले बटण दाबतो; कारण ……………………..
2. आणि तो पुटपुटला, “भयानक स्वप्न!” कारण ………………………
उत्तर:
1. दीपक यंत्रमानवाच्या डोक्याच्या मागे असलेले बटण दाबतो; कारण दीपकला वाटते की, त्या बटणात यंत्रमानवाची शक्ती असणार आणि ते बटण दाबल्यास त्याची शक्ती बंद होईल.
2. आणि तो पुटपुटला, “भयानक स्वप्न!” कारण दीपक यंत्रमानवाच्या डोक्यामागचे बटण दाबतो. त्या क्षणीच मोठा गजर होतो. त्याला जाग येते. त्याच्या लक्षात येते की, त्यानेच सकाळी ७ वाजताचा घड्याळाचा गजर लावला होता. तोच आता वाजत होता. म्हणजे सकाळचे सात वाजले होते. हेच वास्तव होते. यंत्रमानव वगैरे सर्व स्वप्न होते.

उतारा क्र. 7

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:

  1. “अरे बापरे! बाबा!” असे ओरडून पळत सुटणारा.
  2. दीपकसाठी चहा घेऊन येणारा.
  3. सकाळी लवकरच न्याहरी करून कचेरीत गेलेले.

उत्तर:

  1. दीपक
  2. स्वयंपाकी
  3. दीपकचे बाबा.

प्रश्न 2.
का ते लिहा:
दीपकच्या बाबांना कचेरीत एकटं एकटं आणि सुनं सुनं वाटायला लागलं होतं.
उत्तर:
दीपकच्या बाबांनी कचेरीतील माणसे काढून टाकली होती आणि त्यांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली होती. यंत्रे अचूक व वेगाने काम करतात यात शंका नाही. पण ती निर्जीव असतात. त्यांच्यात जिवंतपणा नसतो. ती विचारांची व भावनांची देवाणघेवाण करू शकत नाहीत. त्यांची माणसांसारखी सोबत होऊ शकत नाही. म्हणून दीपकच्या बाबांना कचेरीत एकटं एकटं आणि सुनं वाटू लागलं होतं.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. दीपकने बाबांना केलेली सूचना.
2. दीपकच्या बाबांनी केलेली कार्यवाही.
उत्तर:
1. रात्री पडलेल्या स्वप्नामुळे दीपक पुरता हादरला होता. यंत्रांचा धोका बाबांना सांगावा म्हणून तो बाबांकडे धावला. यंत्र-अधिकाऱ्यांना काढून टाकावे आणि पूर्वीच्या माणसांना कामावर घ्यावे, अशी सूचना त्याने बाबांना केली.
2. दीपकच्या बाबांनी आदल्याच दिवशी यंत्र-अधिकाऱ्यांना काढून टाकायचे ठरवले होते आणि पूर्वीच्या माणसांना पुन्हा कामावर घ्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी सर्वांना फोन केले, तारा केल्या आणि विमानाने बोलावून घेतले.

प्रश्न 2.
का ते लिहा:
यंत्रे कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत.
उत्तर:
यंत्रे कार्यक्षम असली तरी ती निर्जीव असतात. त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण होऊ शकत नाही. कचेरीत माणसे आल्याबरोबर गजबज निर्माण झाली. हास्यविनोद, कामाची धावपळ यांनी कचेरीतील वातावरणात जिवंतपणा आला. यंत्रांनी असे वातावरण निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच यंत्रे कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत.

भाषाभ्यास:

(अ) अव्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
जोड्या लावा:

सामासिक शब्द समास
1. पंचप्राण समाहार द्ववंद्ववं
2. महाराज इतरेतर द्ववंद्ववं
3. बरेवाईट द्विगू
4. गुरेवासरे कर्मधारय
5. आईबाबा वैकल्पिक द्ववंद्ववं

उत्तर:

  1. पंचप्राण – द्विगू
  2. महाराज – कर्मधारय
  3. बरेवाईट – वैकल्पिक द्वंद्व
  4. गुरेवासरे – समाहार वंद्व
  5. आईबाबा – इतरेतर द्वंद्व

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा:
(अलौकिक, आजन्म, शत्रुत्व, भांडखोर)
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
अलौकिक शत्रुत्व
आजन्म भांडखोर

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:

  1. पळता भुई थोडी होणे
  2. दुःखाची किंकाळी फोडणे
  3. चूर होणे
  4. वठणीवर आणणे.

उत्तर:

  1. पळता भुई थोडी होणे – अर्थ : फजिती होणे.
    वाक्य : गावात वाघ येताच गावकऱ्यांची पळता भुई थोडी झाली.
  2. दु:खाची किंकाळी फोडणे – अर्थ : खूप दुःख व्यक्त करणे.
    वाक्य: आई वारल्यावर मधूने दुःखाची किंकाळी फोडली.
  3. चूर होणे – अर्थ : मग्न होणे.
    वाक्य : रेडिओवरचे गाणे ऐकण्यात मंदा अगदी चूर झाली.
  4. वठणीवर आणणे – अर्थ : योग्य मार्गावर आणणे.
    वाक्य: खोड्या करणाऱ्या बाबूला काकांनी चांगलेच वठणीवर आणले.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
अनेकवचन लिहा:

  1. यंत्र
  2. नक्कल
  3. गठ्ठा
  4. खुर्ची.

उत्तर:

  1. यंत्रे
  2. नकला
  3. गठे
  4. खुार्ची.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
1. दुखाची कींकाळी फोडुन तो यंत्रमीत्र चालता झाला.
2. तो सहयाजि हुकुमत गाझवणारा यंत्रमानव म्हनाला.
उत्तर:
1. दु:खाची किंकाळी फोडून तो यंत्रमित्र चालता झाला.
2. तो सयाजी हुकूमत गाजवणारा यंत्रमानव म्हणाला.

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
योग्य विरामचिन्हे घालून पुढील वाक्य पुन्हा लिहा:
ती ओरडली दीपक तू केव्हा आलास
उत्तर:
ती ओरडली, “दीपक, तू केव्हा आलास?”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Corporation
  2. Census
  3. Programme
  4. Refreshment

उत्तर:

  1. महामंडळ
  2. जनगणना
  3. कार्यक्रम
  4. अल्पोपाहार.

यंत्रांनी केलं बंड Summary in Marathi

प्रस्तावना:

एकाच वेळी विविध गोष्टींमध्ये रस असलेले व चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले लेखक. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व्हावा, विज्ञानवाङ्मयाचा प्रसार व्हावा म्हणून भरपूर लेखन केले, व्याख्याने दिली, चर्चा-संमेलनांत सहभागी झाले.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रांवर विसंबून राहू लागला आहे. यंत्रांची मदत घेता घेता तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला आहे. याचे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील, असा इशारा खेळकर पद्धतीने लेखकांनी या पाठातून दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 यंत्रांनी केलं बंड

शब्दार्थ:

1. चौकस – जिज्ञासू.
2. फड – ताफा.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. मग्न होणे – गुंग होणे.
  2. वाटेला जाणे – मार्गात अडथळे निर्माण करणे.
  3. पळता भुई थोडी होणे – पळून जाणे.
  4. चूर होणे – गळाठूण जाणे, स्तब्ध होणे.
  5. स्तंभित होणे – आश्चर्यचकित होणे.
  6. वठणीवर आणणे – नमवणे, रुबाब घालवणे.
  7. हकालपट्टी करणे – नोकरीवरून, कामावरून काढून टाकणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Swadhyay Ya Zopadit Mazya Question Answer Class 9 Marathi Chapter 6 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 6 या झोपडीत माझ्या Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 6 या झोपडीत माझ्या Question Answer Maharashtra Board

या झोपडीत माझ्या Std 9 Marathi Chapter 6 Questions and Answers

1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

प्रश्न 1.
कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

झोपडीतील सुखे महालातील सुखे
1. 1.
2. 2.

उत्तर:

झोपडीतील सुखे महालातील सुखे
1. ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे. 1. झोपण्यासाठी मऊ बिछाने.
2. देवाचे नाव नित्य गावे. 2. कंदील व शामदाने यांची रोषणाई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

2. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 2

3. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 2.1
उत्तर:
1. निजावयास जमीन
2. रात्री गगनातले तारे

4. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

प्रश्न 1.
‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरे
धनदौलत संग्रहित ठेवण्याचे (साठवण्याचे) साधन कोणते?

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

5. काव्यसौदर्य:

प्रश्न (अ)
‘पाहुनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या’. या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात. सुखसमाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे, अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात – माझ्या झोपडीत सुखसमाधान आणि शांतीचे है साम्राज्य आहे. झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्रालासुद्धा माझ्या सखाचा हेवा वाटतो. माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार या ओळीतून व्यक्त होतो.

प्रश्न (आ)
‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडीकुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये; म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. कवी म्हणतात – माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपाने बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे.

1. झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 3
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

2. उजळणी- तक्ता पूर्ण करा.

उपमेय – आईचे प्रेम                         उपमान – सागर उपमेय – आंचा   उपमान – साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.
उत्पेक्षा आईचे प्रेम म्हणजे जण सागरच.
रूपक वात्सल्यसिप आई.

3. महण म्हणजे काय?

‘मह’ शाविषय मनोरंजक आहे. आपण व्यवहारात वापरल्या जाणान्या म्हणी – उदा. -‘आये तसे भरा किया ‘गामाता गुळाची चा काय’ यांसारख्या म्हणींचा अभ्यास केला तर, ‘म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन.’ या ज्ञानाचा आपल्याला बोलताना, लिहिताना अनेक प्रसंगी उपयोग करता येतो आणि आपले बोलणे, लिहिणे अधिक प्रभावशाली करता येते. भाषेला सौंदर्य प्राप्त होते. किंबहुना त्या भाषेची ती भूषणे आहेत. शब्द म्हणजे वाहूनही कटीन असतात आणि फुलातूनही कोमल असतात, असे म्हटले जाते ते शब्दांच्या अर्वासाठी.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 4

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 6 या झोपडीत माझ्या Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 6

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या 7
उत्तर:
1. मज्जाव
2. पहारे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. झोपडीतले सौख्य पाहून ………………. लाजतो. (देवेंद्र/सुरेंद्र/वीरेंद्र/राजेंद्र)
2. झोपडीत नित्य ……… विराजते. (भ्रांती/खंती/शांती/भक्ती)
उत्तर:
1. झोपडीतले सौख्य पाहून देवेंद्र लाजतो.
2. झोपडीत नित्य शांती विराजते.

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
उत्तर:
झोपडीत राहण्याचे सुख वर्णन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात -एखादया राजालाही राजमहालात जे सुखसमाधान मिळाले असेल, ती सर्व सुखे मला माझ्या झोपडीत मिळतात.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – या झोपडीत माझ्या.
उत्तर:
या झोपडीत माझ्या
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.
2. कवितेचा विषय → अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते, याचे निवेदन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. सौख्य = सुख
  2. भूमी = जमीन
  3. नाम = नाव
  4. मज्जाव = मनाई
  5. भीती = भय
  6. मऊ = नरम
  7. बोजा = वजन, भार
  8. सदा = सतत.

4. कवितेतून मिळणारा संदेश → श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये, जे प्राप्त परिस्थितीत मिळते, ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते, ही शिकवण मिळते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – ‘या झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली, तर मानसिक सुख लाभते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
→ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे माहात्म्य सांगताना म्हणतात-झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → राजालाही जी सुखे मिळत नाहीत, ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना, मानाने, सुखासमाधानाने जगावे, हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’
उत्तर:
आशयसौंदर्य: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘या झोपडीत माझ्या’ या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.

काव्यसौंदर्य: प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवींना म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय । झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच ‘या’ देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज , हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट-‘या है अंगाने अर्थवाही झाला आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित प्रत्येकी दोन शब्द लिहा.
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
अविचार बालपण
सुविचार म्हातारपण

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मऊ
  2. महाल
  3. नित्य
  4. शांती.

उत्तर:

  1. मऊ × टणक
  2. महाल × झोपडी
  3. नित्य × अनित्य
  4. शांती × अशांती.

प्रश्न 2.
तक्ता भरा:

एकवचन तारा झोपडी
अनेकवचन तिजोऱ्या बिछाने

उत्तर:

एकवचन तारा तिजोरी झोपडी बिछाना
अनेकवचन तारे तिजोऱ्या झोपड्या बिछाने

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. माजाव, मज्जाव, मज्जव, माज्जाव.
  2. प्रभुनाम, परभुनाम, प्रभूनाम, प्रभुनमा.
  3. भिती, भिति, भीति, भीती.
  4. तिजोरि, तीजोरी, तिजोरी, तीजोरि.

उत्तर:

  1. मज्जाव
  2. प्रभुनाम
  3. भीती
  4. तिजोरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
(अ) [ . ] [ ; ] [ ‘ ‘ ] [ – ]
(आ)

  1. एकेरी अवतरणचिन्ह
  2. पूर्णविराम
  3. संयोगचिन्ह
  4. अपूर्णविराम

उत्तर:
[.] पूर्णविराम
[;] अपूर्णविराम
[‘ ‘] एकेरी अवतरणचिन्ह
[ _ ] संयोगचिन्ह

या झोपडीत माझ्या Summary in Marathi

कवितेचा आशय:

लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो. महालातली सुखे झोपडीतही प्राप्त होतात. अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय साध्या शब्दांत या कवितेत केले आहे.

शब्दार्थ:

  1. महाल – राजवाडा, प्रशस्त घर.
  2. सौख्ये – सुखे, वैभव.
  3. प्राप्त झाली – मिळाली, लाभली.
  4. भूमी – जमीन.
  5. प्रभुनाम – देवाचे नाव, भजन.
  6. नित्य – नेहमी, सतत.
  7. पहारा – रखवाली, नजरकैद.
  8. तिजोरी – खजिनापेटी.
  9. तया – त्या.
  10. मज्जाव – अटकाव, निबंध.
  11. शामदाने – काचेचा दिवा, झुंबर.
  12. माने – सन्मान.
  13. सुखे – आरामात, सुखाने.
  14. बोजा – वजन, (इथे अर्थ) दडपण, धाक.
  15. माते – माझे.
  16. देवेंद्र – इंद्र, देवांचा राजा.
  17. लाजे – शरमतो.
  18. सदा – नेहमी.
  19. विराजे – शोभते, नांदते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

कवितेचा भावार्थ:

एखादया राजाला राजमहालात जी सुखे मिळाली असतील, ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभली आहेत. अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे नि रात्री आकाशातील चांदण्यांकडे, ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते. देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो.

महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेले असते; त्यावर सक्त पहारे ठेवले जातात. तरी सुद्धा तेथे चोऱ्या होतात. माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहेत. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही; चोरण्याइतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाहीत.

राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. ‘अटकाव’ हा शब्द तिथे असतो. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात नि कंदील, झुंबरांची रोषणाई केलेली असते. माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हाच सन्मान आहे. धरतीचाच बिछाना आहे.

माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या नि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये-जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदत आहे.

9th Std Marathi Questions And Answers:

Abhiyantyache Daivat Dr. Visvesvaraya Question Answer Class 9 Marathi Chapter 8 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Question Answer Maharashtra Board

अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Std 9 Marathi Chapter 8 Questions and Answers

1. समर्पक उदाहरण लिहा:

प्रश्न (अ)
विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम.
उत्तर:
विश्वेश्वरय्या यांनी स्वत:चे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले.

प्रश्न (आ)
समर्पक उदाहरण लिहा: माणुसकीचे दर्शन.
उत्तर:
1907 साली विश्वेश्वरय्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्कालीन मुंबई सरकारने सेवेचा गौरव म्हणून त्यांना पेन्शन दिली. त्या पेन्शनमधे स्वत:च्या गरजेपुरते पैसे ठेवून त्यांनी उरलेली रक्कम गरीब विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शिक्षणसंस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी, म्हणून त्यांनी ही देणगी दिली, ही त्यांची, त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

2. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा:

प्रश्न 1.
खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा:

  1. आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली. [ ]
  2. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे. [ ]
  3. शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले. [ ]
  4. अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले. [ ]
  5. वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते. [ ]
  6. सारी पेन्शन गरीब विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. [ ]

उत्तर:

  1. अचूक ज्ञान
  2. सुखासीनता, विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती.
  3. कष्टाळूपणा, जिद्द
  4. बुद्धिमान
  5. कार्यतत्परता
  6. सहानुभूती

3. माहिती लिहा

प्रश्न 1.
माहिती लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

4. खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा:

प्रश्न 1.
खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा:
(अ) आव्हान – आवाहन
(आ) कृतज्ञ – कृतघ्न
(इ) आभार – अभिनंदन
(ई) विनंती – तक्रार.
उत्तर:
(अ) आव्हान – प्रतिस्पर्ध्याला लढाईला किंवा वादाला बोलावणे.
आवाहन – एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
वाक्ये:
आव्हान – भैरू पहिलवानाने कुस्तीसाठी केरू पहिलवानाला आव्हान दिले.
आवाहन – पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले.

(आ) कृतज्ञ – उपकाराची जाणीव असणारा.
कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा.
वाक्ये:
कृतज्ञ – सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे.
कृतघ्न – आपल्याला मदत करणाऱ्यांशी आपण कृतघ्न होऊ नये.

(इ) आभार – धन्यवाद (देणे).
अभिनंदन – शाबासकी (देणे), कौतुक (करणे).
वाक्ये:
आभार – स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्यांनी आभार मानले.
अभिनंदन – पोहण्याच्या स्पर्धेत मिताली प्रथम आली; म्हणून मॅडमनी तिचे अभिनंदन केले.

(ई) विनंती – विनवणी (करणे).
तक्रार – गा-हाणे (मांडणे).
वाक्ये: विनंती – कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना स्थानापन्न होण्याची विनंती केली.
तक्रार – सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

5. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा:

प्रश्न 1.
खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा:
He is an engineer of integrity, character and broad outlook.
उत्तर:
ते (विश्वेश्वरय्या) निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

6. स्वमत.

प्रश्न (अ)
विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
उत्तर:
सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल.

सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे. त्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते. त्याची अजिबात पर्वा करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये. मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते. संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे. अनेक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते. वासना-विकारांनी प्रभावित होते. अशा वेळी संयमाची नितांत गरज असते. अशा रितीने जगत असताना आपल्या निष्ठा ठाम हव्यात. आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीच होणार, अशी खात्री बाळगली पाहिजे. हा आशावाद आपल्याला तारून नेतो. विश्वेश्वरय्यांच्या पंचसूत्रीचा हा बोध ध्यानी बाळगल्यास आपले जीवन सुखी, संपन्न होईल.

प्रश्न (आ)
‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत पाणी आले,’ या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
सक्कर या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाने उचलून ते जलाशयात साठवले जाऊ लागले. तिथून पाईपांनी सक्करवासीयांना पाणी पुरवले जाऊ लागले. पण घरात पोहोचलेले पाणी वाळूमिश्रित, गढूळ व घाणेरडे होते. जलाशयात जमा होणारे पाणी संपूर्णपणे गाळून शुद्ध करणे आवश्यक होते. मात्र, त्या प्रक्रियेला येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला झेपणारा नव्हता. म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते.

तेवढ्यात विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा तळ यांना जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रितीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले. विहिरीतले हे पाणी लोकांना मिळू लागले. हे अमृतासारखे स्वच्छ, शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्यांमुळे शक्य झाली, ही कृतज्ञताही त्या अश्रूमध्ये होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न (इ)
विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
विश्वेश्वरय्या हे जगद्विख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आकषून घेतो. समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असत. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग भिन्न होता, योजलेले उपाय भिन्न होते. प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नावीन्यपूर्ण होते. त्यात त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसते. सगळी बुद्धी पणाला लावून ते काम करीत. या त्यांच्या गुणामुळेच त्यांच्याकडून अलौकिक कार्ये पार पडली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे, मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील. जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल.

प्रश्न (ई)
‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका,’ या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
उत्तर:
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘निष्ठावान अभियंता’ हे उद्गार विश्वेश्वरय्यांना उद्देशून काढले, ते अक्षरशः सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती. कार्यावर निष्ठा होती. म्हणूनच ते म्हणतात, ‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका.’ याचा अर्थ स्वत:च्या कार्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आराम करण्याची, कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती. आपण आपले जे कार्यक्षेत्र निवडले आहे, त्यात झोकून दिले पाहिजे. आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. मग उत्तुंग यश मिळणारच. सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही. बुद्धी गंजली की माणूस संपलाच. बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे, हेच विश्वेश्वरय्यांना सांगायचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

भाषाभ्यास:

रस म्हणजे चव किंवा रुची. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे सहा प्रकारचे रस अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. त्यातील भावनांमुळे साधारणपणे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात.

करुण शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना.
शृंगार स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन.
वीररस पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती.
हास्य विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा-मस्करी.
रौद्र क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप.
भयानक भयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या.
बीभत्स किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना.
अद्भुत अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना.
शांत भक्तिभाव व शात स्वरूपातील निसर्गाचे वर्णन.

रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे. ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात. याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो. तसेच कधी कधी या नऊ रसांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात. कवितेतील रस हा विशिष्ट शब्दांत नसतो. उदाहरणार्थ, कवितेत ‘वीर’ हा शब्द आला म्हणजे त्या कवितेत वीररस असेलच असे नाही. तसेच ‘हुंदका’ शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असे नाही.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोठे ते लिहा:

  1. वृंदावन उदयान – [ ]
  2. विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव – [ ]
  3. विश्वेश्वरय्यांचे जन्मगाव – [ ]
  4. विश्वेश्वरय्यांचे अभियांत्रिकी शिक्षण – [ ]

उत्तर:

  1. म्हैसूर
  2. मोक्षगुडम
  3. मदनहळ्ली
  4. पुणे

प्रश्न 2.
विश्वेश्वरय्यांची पंचसूत्री लिहा.
उत्तर:

  1. सुनियंत्रित आचरण
  2. कठोर परिश्रम
  3. प्रसन्नता
  4. संयम व
  5. प्रचंड आशावाद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न 3.
कारण लिहा:
विश्वेश्वरय्यांचे बालपण व विदयार्थिजीवन कष्टांत गेले.
उत्तर:
विश्वेश्वरय्यांचे बालपण व विदयार्थिजीवन कष्टांत गेले, कारण शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचे वडील वारले.

प्रश्न 4.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 4

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतून विश्वेश्वरय्यांचा प्रकट होणारा गुण:
1. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. [ ]
उत्तर:
1. कल्पकता

प्रश्न 2.
माहिती लिहा:
सहायक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्यांची कामगिरी –
1. …………………………………..
2. …………………………………..
उत्तर:
1. सहायक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्यांची कामगिरी –
2. खानदेशातील एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले.
3. सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी यशस्वी रितीने पार पाडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या.
2. सक्करच्या समस्येवर विश्वेश्वरय्यांनी केलेली उपाययोजना.
उत्तर:
1. सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्यावरील डोंगरावर एक जलाशय बांधला. नदीचे पाणी पंपाने उचलून जलाशयात साठवले जाई. तेथून ते सर्व नागरिकांना पुरवले जाई, मात्र, जलाशयात जमा होणारे पाणी वाळूमिश्रित व गढूळ होते. ते तसेच पुरवले जाई. पाणी गाळून स्वच्छ करण्याच्या योजनेकरिता नगरपालिकेकडे पैसा नव्हता. नागरिक जबरदस्त हैराण झाले होते.
2. विश्वेश्वरय्यांनी नदीच्या पात्रातच काठाजवळ एक गोल विहीर खोदली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनेच स्वच्छ व शुद्ध पाणी विहिरीत साठू लागले. असे स्वच्छ पाणी मिळालेले पाहून सक्करच्या नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:

  1. तार
  2. दौरा
  3. मुसा नदीवरील बंधारा.

उत्तर:

  1. तार: पूर्वीच्या काळी (जेव्हा फोनसुविधा नव्हती त्या काळी) दूरवर असलेल्या व्यक्तीला तारायंत्राच्या साहाय्याने पाठवला जाणारा तातडीचा संदेश.
  2. दौरा: विशिष्ट हेतूने किंवा कामासाठी नियोजनपूर्वक केलेला प्रवास.
  3. मुसा नदीवरील बंधारा: हैदराबादच्या मुसा नदीला एकदा महापूर आला होता. सारे शहरच पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

अशा संकटकाळात विश्वेश्वरय्या धावून आले. मुसा नदीचे खवळलेले पाणी कायमचे आटोक्यात राहील आणि हैदराबाद शहराला कधीही धोका निर्माण होणार नाही, असा पक्का बंदोबस्त विश्वेश्वरय्यांनी त्या काळात केला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

प्रसंग लोकभावना
1. हैदराबादच्या निजामाची तार : ‘तातडीने या’
2. विश्वेश्वरय्यांची विविध संस्थांच्या अध्यक्षपदांवर नेमणूक

उत्तर:

प्रसंग लोकभावना
1. हैदराबादच्या निजामाची तार : ‘तातडीने या’ 1 संकटात विश्वेश्वरय्यांचा आधार वाटतो.
2. विश्वेश्वरय्यांची विविध संस्थांच्या अध्यक्षपदांवर नेमणूक 2. विश्वेश्वरय्यांच्या मोठ्या कर्तबगारीवर विश्वास

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 6

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
विश्वेश्वरय्यांनी बांधलेल्या कावेरी नदीवरील ‘कृष्णसागर’ या धरणाचा अजस्रपणा स्पष्ट करा.
उत्तर:
म्हैसूर संस्थानच्या महाराजांनी विश्वविश्वेश्वरय्यांचे गुण विश्वरय्यांना आपल्या संस्थानात मुख्य अभियंता या पदावर नेमले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘कृष्णसागर’ हे अजस्र धरण बांधले. या अजस्र धरणामुळे जगभर त्यांचे कौतुक झाले.

हे धरण होतेच मुळी तसे. 8600 फूट लांब, 101 फूट रुंद व 104 फूट उंच! धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा मोटर रस्ता. धरणातील पाणी सोडण्यासाठी तब्बल 179 दरवाजे होते! आपोआप उघडझाप करणारे. धरणाच्या बाजूला 60 मैल लांबीचा कालवा काढलेला आहे. तो कालवा ‘विश्वेश्वरय्या कालवा’ या नावाने गौरवला जातो. या कालव्यासाठी 3960 फूट लांबीचा बोगदा तयार केलेला आहे. या धरणातून ठरावीक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडतात आणि त्याआधारे एक वीजनिर्मिती केंद्र चालवले जाते. या विजेच्या बळावर म्हैसूरचा राजवाडा व वृंदावन उदयान रोषणाईने झळझळतात. विश्वेश्वरय्यांच्या अभियांत्रिकी करामतीची ही स्मारकेच होत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतून विश्वेश्वरय्यांचा प्रकट होणारा गुण:
1. झिजलात तरी चालेल, पण गंजू नका.
उत्तर:
1. बुद्धीवरील निष्ठा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 8

प्रश्न 2.
माहिती लिहा:
विश्वेश्वरय्यांची उभारलेली स्मारके:
उत्तर:
1. त्यांच्या जन्मगावी एका भव्य उदयानात त्यांचा पुतळा उभारला गेला आहे.
2. त्यांनी स्वतः बांधलेले त्यांचे सुंदर घर ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जाहीर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहांवरून समास ओळखा:

  1. पाप किंवा पुण्य → ………………..
  2. खाणे, पिणे वगैरे → ……………….
  3. महान असे राष्ट्र → ………………..
  4. नवरा आणि बायको → ……………
  5. तीन खंडांचा समूह → …………….

उत्तर:

  1. वैकल्पिक द्वंद्व समास
  2. समाहार वंद्व समास
  3. कर्मधारय समास
  4. इतरेतर द्वंद्व समास
  5. द्विगू समास.

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘अति’ उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. अतिमंद
  2. अत्यानंद (अति + आनंद)
  3. अतिविचारी
  4. अतिहुशार.

3. वाक्प्रचार/म्हणी:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. चकित होणे
2. मार्गदर्शन करणे.
उत्तर:
1. चकित होणे – अर्थ : आश्चर्य वाटणे.
वाक्य : तीन वर्षांच्या बाळूने सुरेख चित्र काढलेले पाहिल्यावर सगळे चकित झाले.
2. मार्गदर्शन करणे – अर्थ : योग्य दिशा दाखवणे.
वाक्य : शालान्त परीक्षेत माझ्या दादाने मला मार्गदर्शन केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

प्रश्न 2.
म्हणी पूर्ण करा:
1. ……………………. काकडीला राजी. (कोल्हा/ लांडगा)
2. …………………… गुळाची चव काय? (गाढवाला/घोड्याला)
उत्तर:
1. कोल्हा काकडीला राजी.
2. गाढवाला गुळाची चव काय?

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या 9
उत्तर:

  1. पूर्वज × वंशज
  2. निवृत्ती × प्रवृत्ती
  3. सफल × विफल
  4. उंच × सखोल

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. सूसंस्कृत, सुंसस्कृत, सुसंस्कृत, सुसंक्सृत.
  2. फलश्रूती, फलश्रुती, फळधृति, फलश्रुति.
  3. कुतूहल, कुतुहल, कुतुहल, कूतूहल.
  4. नीयूक्त, नियूक्त, नियुत्क, नियुक्त.
  5. प्रोत्साहन, प्रोत्साहण, प्रोस्ताहण, प्रोत्सहन.
  6. कामगीरी, कामगिरी, कामगिरि, कामगीरि.

उत्तर:

  1. सुसंस्कृत
  2. फलश्रुती
  3. कुतूहल
  4. नियुक्त
  5. प्रोत्साहन
  6. कामगिरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा:
1. विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो.
2. परिस्थिती बेताची होती; पण आई मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती.
उत्तर:
1. एकेरी अवतरणचिन्ह व पूर्णविराम.
2. अर्धविराम, स्वल्पविराम व पूर्णविराम.

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Exhibition
  2. Receptionist
  3. Handbill
  4. Goodwill

उत्तर:

  1. प्रदर्शन
  2. स्वागतिका
  3. हस्तपत्रक
  4. सदिच्छा.

अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या Summary in Marathi

प्रस्तावना:

डॉ. यशवंत पाटणे हे प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. माणसाने स्वत:च्या सुखाकडे पाहावे, हे ठीक आहे. पण त्याबरोबरच स्वत:पलीकडे, समाजाकडे पाहिले पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ते माणसाचे कर्तव्य आहे, असा लेखकांचा दृष्टिकोन आहे. म्हणूनच त्यांना विश्वेश्वरय्यांसारखे निष्ठावान कर्मयोगी भावतात. त्यांच्या कार्याने ते स्वतः प्रभावित होतात. प्रस्तुत पाठात लेखकांनी विश्वेश्वरय्यांचे कार्यकर्तृत्व वर्णन केले आहे.

विश्वेश्वरय्यांनी त्यांच्या काळात समोर उभ्या ठाकलेल्या जटिल समस्या सोडवल्या. त्यांचे प्रयत्न म्हणजे केवळ स्वत:ची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी केलेली कृती नव्हती. त्यांच्यासमोर लोकांच्या समस्या सोडवण्याचे आव्हान होते. आपले ज्ञान, आपली कर्तबगारी समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. या पाठात वर्णन केलेली त्यांची कार्ये ही त्यांच्या भूमिकेचाच परिपाक होती. त्यांनी आपले दीर्घायुष्य या त-हेने माणसाच्या कल्याणासाठी वापरले, हेच या पाठातून लेखकांनी दाखवून दिले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

शब्दार्थ:

  1. नियंता – नियंत्रक.
  2. विश्वात्मकता – विश्वाला व्यापून टाकण्याची वृत्ती.
  3. क्लिष्ट – गुंतागुंतीची.
  4. कारकीर्द – केलेल्या कार्याचा काळ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. आव्हान स्वीकारणे – एखादे कार्य पार पाडण्यास सिद्ध होणे.
2. रौद्ररूप धारण करणे – भीतिदायक स्थिती निर्माण होणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Vandya ‘Vande Mataram’ Question Answer Class 9 Marathi Chapter 1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ Question Answer Maharashtra Board

वंद्य ‘वन्दे मातरम्’ Std 9 Marathi Chapter 1 Questions and Answers

प्रश्न 1.
हे गीत विद्यार्थ्यांनी समूहाने तालासुरात मोठ्याने म्हणावे व त्याचा काव्यानंद अनुभवावा.

वंद्य ‘वन्दे मातरम्’ Summary in Marathi

कवितेचा आशय:

राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ज्या शूर राष्ट्रभक्तांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले, त्या देशभक्तांच्या गौरवाचे हे गीत कवींनी लिहिले आहे. या गीतात कवींनी वीर भारतपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शब्दार्थ:

  1. वंद्य – वंदनीय, आदरणीय.
  2. वन्दे – वंदन करतो.
  3. मातरम् – मातृभूमी,
  4. माउली – आई, (येथे अर्थ) भारतमाता.
  5. मुक्तता – सुटका,
  6. यज्ञ – अग्निकुंड (इथे अर्थ) स्वातंत्र्यसंग्राम.
  7. भारती – भारतात.
  8. जीवित – जीवन, आयुष्य.
  9. आहुती – प्राणार्पण.
  10. सिद्ध – तयार.
  11. मंत्र – श्लोक, सुवचन, घोषवाक्य.
  12. मृतांचे – मेलेल्या शरीराचे, कलेवरांचे,
  13. जागले – (विचारांनी) जागृत झाले.
  14. शस्त्रधारी – हत्यार बाळगणारे,
  15. निष्ठुर – कठोर, क्रूर.
  16. शांतिवादी – शांतता रुजवणारे लोक (भारतीय),
  17. झुंजले – लढले.
  18. शस्त्रहीनां – ज्यांच्या हाती हत्यार नाही असे लोक.
  19. लाभो – मिळो.
  20. निर्मिला – निर्माण केला, तयार केला,
  21. आचरीला – वर्तनात आणला, वागणुकीत आणला.
  22. हुतात्मे – वीरमरण लाभलेले राष्ट्रभक्त.
  23. स्वर्गलोक – देवांचा रहिवास असलेले.
  24. तयांच्या – त्यांच्या.
  25. आरती – प्रार्थना, आळवणी करणारे भजन.

टीप : वेद : प्राचीन काळी ऋषिमुनींनी लिहिलेले जीवनस्तोत्र.

कवितेचा भावार्थ:

राष्ट्रप्रेमाने भारलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात – वेदांच्या मंत्रांपेक्षाही ‘वंदे मातरम!’ हा जयघोष आम्हां भारतीयांना वंदनीय आहे, आदरणीय आहे.

(स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये) या भारतवर्षात भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा धगधगता स्वातंत्र्यसंग्राम (यज्ञ) झाला. त्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणांची आहती पडली. लाखो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्या या पवित्र बलिदानाने ‘वन्दे मातरम्!’ हा मंत्र निर्माण केला. सिद्ध केला. ‘वन्दे मातरम्!’ या मंत्राने त्या वेळी मुर्दाड झालेली व स्वाभिमान हरवून बसलेली राष्ट्रीयता जागृत झाली. सारे भारतीय खडबडून जागे झाले, कायम शांतीचा पुरस्कार करणारे भारतीय, संगिनधारी सशस्त्र, क्रूर इंग्रजी जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढले. त्या झुंजीमध्ये निःशस्त्र असणाऱ्या भारतीयांना ‘वन्दे मातरम्!’ हा एकच महामंत्र शस्त्रासारखा लाभला होता.

स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या देशभक्तांनी ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र निर्माण केला व तोच वर्तनात आणून परकीय सत्तेशी झुंज दिली. जे राष्ट्रभक्त या रणकुंडात प्राणार्पण करून हुतात्मे झाले ते देव होऊन स्वर्गलोकी गेले. त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानाची आरती म्हणजेच हे ‘वन्दे मातरम्!’ गीत आहे. आपण ते गाऊ या.

9th Std Marathi Questions And Answers:

Hasychitrantli Mule Question Answer Class 9 Marathi Chapter 8.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं Question Answer Maharashtra Board

हास्यचित्रांतली मुलं Std 9 Marathi Chapter 8.1 Questions and Answers

1. खालील फरक लिहा.

प्रश्न 1.
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र व हास्यचित्र
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:
व्यंगचित्र :- हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात मांडलेला एखादा गमतीदार विचार आपल्या सहज लक्षात येतो.

हास्यचित्र :- ‘सफाईदार, रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय.’ हास्यचित्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिले की आपल्याला छान हसू येते. या गमतीदार चित्रांमध्ये एक जोक, एक विनोद मांडलेला असतो. त्या चित्रांमधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला
दिसून येत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्रे
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:

  1. हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
  2. व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्यांचा हेतू नसतो.
  3. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं.
  4. आपण जर अशा व्यंगचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे,’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवते. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हसवण्याशिवाय ते व्यंगचित्र आपल्याला अजून काहीतरी सांगू पाहत असते. आपण त्या चित्रापाशी थोडे थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो. सफाईदार रेषांनी काढलेल्या अशा गमतीदार चित्रातील दाखवलेल्या हावभावांतून व्यक्तीचे गुणदोष चटकन आपल्या लक्षात येतात.

संवेदनशील व्यक्ती असे चित्र पाहून आपल्या वागण्याबोलण्यात बदल करू शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या पाठात दिलेले हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे व्यंगचित्र पाहा. लहान मुलगा आणि मोठा माणूस दोघेही व्हायोलिन वाजवत आहेत. पण केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की, दोघेही एकच आहेत. पण लहानपणी मोठे व्हायोलिन तर मोठे झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे.

याचाच अर्थ असा की, लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते. म्हणजेच आपली आवड किंवा आपला एखादा छंद त्यांच्यासाठी सर्वस्व असते. त्या वयात ती आवड खूप मोठी असते. परंतु, वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद लहान होत जातो. बाह्य आकाराचे आकर्षण कमी झालेले असते, हे त्या चित्रकाराला सांगायचे आहे. याचाच अर्थ असा की, लहानपणी जपलेला छंद, मोठ्या आवडीने आपण मोठेपणीसुद्धा जपला तर जीवनातल्या ताण-तणावांवर, दु:खांवर आपण सहज मात करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर लहानपणीचा जपलेला छंद हा त्याचा गुण, तर मोठेपणी या छंदाकडे केलेले दुर्लक्ष हा त्याचा दोष चित्रातून प्रभावीपणे मांडलेला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘हास्यचित्रांतली मुलं’ या पाठातील ‘चिंटूच्या चित्रमालिका’ हे एक व्यंगचित्र दिलेले आहे. ते मला खूप आवडले आहे. त्यातील ‘पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो?’ हा चिंटूचा साधा प्रश्न मला पटकन कळलाच नाही. त्याने असे का विचारले असेल? याचा उलगडा मला लगेच झाला नाही. पण तिसऱ्या चित्रात बाबांनी विचारलेल्या ‘का रे?’ या प्रश्नाला चिंटूने दिलेल्या “तुमच्या स्कुटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय,” या अगदी निरागस, सहज उत्तराने मला त्याच्या प्रश्नाचा अर्थ कळला. उत्तर देताना चिंटूने फिरवलेला चेहरा, त्याचे बाबांकडे न पाहणे, डोळ्यातले निरागस भाव चटकन आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते. यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
व्यंगचित्र रेखाटण्यासाठी अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपली चित्रकलेवर हुकूमत असली पाहिजे. चित्रातल्या रेषा अत्यंत सफाईदारपणे काढता आल्या पाहिजेत. शिवाय बारीक निरीक्षणशक्ती आपल्याजवळ असणे आवश्यक असते. आजूबाजूच्या माणसांच्या, जनावरांच्या, पशु-पक्षांच्या सवयी, त्यांच्या लकबी या सर्वांचे निरीक्षण व्यंगचित्रकाराला करता आले पाहिजेत.

त्याचबरोबर चित्रामधून एखादा विनोद, मांडता आला पाहिजे. असे चित्र पाहताना समोरच्या व्यक्तीला हसू आले पाहिजे. शिवाय त्याला विचार करायला भाग पाडले पाहिजे. म्हणजेच व्यंगचित्रकाराने अशा चित्रातून गमतीदार विचार मांडणे आवश्यक असते. त्यासाठी व्यंगचित्रकाराकडे विनोदबुद्धी असणे गरजेचे असते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
लहान मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे, केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं. फार कमी जणांना अशी लहान मुले चित्रित करणे जमते. लहान मुलाचं चित्र काढताना, त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हाता-पायांची बोटं लहान काढली की आपोआप नखं लहान होतात.

नाकाचा, ओठांचा आकार लहान काढल्यावर त्यांच्या डोळ्यांवरच्या भुवया तशाच लहान किंवा एकाच रेषेच्या होतात. शिवाय लहान मुलांना दाढी-मिश्या नसतात त्यामुळे त्या दाखविण्याची गरज पडत नाही. म्हणूनच लहान मुलांची हास्यचित्रे काढताना मोठ्या माणसांकडे आणि लहान मुलांकडे बारकाईने पाहणे, त्यांचे नीट निरीक्षण करणे आवश्यक ठरते.

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: मधुकर धर्मापुरीकर
कालावधी : 1954
परिचय: कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक-अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘अनकॉमन मॅन आर. के. लक्ष्मण’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी अॅण्ड फ्रेंडज’ या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. ‘अप्रपू’, ‘रूप’, ‘विश्वनाथ’, ‘चिनकूल’ हे कथासंग्रह, ‘रेषालेखक वसंत सरवटे’, ‘हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे’ ही पुस्तके प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

प्रस्तावना:

‘हास्यचित्रांतली मुलं’ हा पाठ लेखक ‘मधुकर धर्मापुरीकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेद दाखवत हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? ती कशी वाचायला पाहिजेत? हे अगदी रंजक पद्धतीने सांगितले आहे.

Writer ‘Madhukar Dharmapurikar has written this write-up named ‘Hasyachitrantali Mula’. He teaches us in an entertaining way how to enjoy the art of cartoons and caricatures and how to distinguish between the two.

शब्दार्थ:

  1. हास्यचित्र – हसू येण्यासारखे चित्र
  2. व्यंगचित्र – विनोदी चित्र (caricature, cartoon)
  3. भेदाभेद – भेदभाव (discrimination)
  4. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  5. बारकाईने – लक्षपूर्वक (with full attention)
  6. कौशल्य – कुशलता, कसब (skill)
  7. हेतू – उद्देश, उद्दिष्ट, कारण (intention, reason)
  8. विनोद – थट्टा, उपहास (jokes, humour, jesting)
  9. रोपटे – लहान कोवळे झाड (a plant)
  10. लवचीक – न मोडता वाकणारा (flexible)
  11. रांगणे – सरपटत जाणे (to creep, to crawl)
  12. नक्कल – अनुकरण (copy, imitation)
  13. हुबेहूब – अगदी सारखे (exactly the same)
  14. चतुर – धूर्त (shrewd)
  15. भाव – भावना (emotion)
  16. खेडे – लहान गाव (village)
  17. उत्साह – जोश, जोम, उमेद (enthusiasm, energy)
  18. उत्तम – चांगले, उत्कृष्ट (best, excellent)
  19. आकर्षण – मोहकता (attraction)
  20. भुवया – भिवई (eyebrow)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 हास्यचित्रांतली मुलं

टिपा:

1. चिंटू – सकाळ वृत्तपत्रातील एक विनोदी चित्रमालिका. याचे लेखन प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांनी केले आहे. चिंटू हे पात्र मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे. यात विनोदी चेहऱ्याने त्याच्या दैनंदिन जीवनातल्या घटना दिल्या जातात.

2. शि. द. फडणीस – शिवराम दत्तात्रेय फडणीस (29 जुलै, 1925) भारतातील प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार.

3. डेव्हिड लँग्डन – (24 फेब्रुवारी, 1914 – नोव्हेंबर, 2011) त्याचे पहिले व्यंगचित्र 1935 मध्ये एलसीसी कर्मचारी जर्नल, लंडन टाउनमध्ये प्रसिद्ध झाले.

4. आर. के. लक्ष्मण – राशीपुरम कृष्णास्वामी अय्यर (24 ऑक्टोबर, 1921-26 जानेवारी, 2015) भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक. ते त्यांच्या ‘कॉमन मॅन’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ मधील ‘यू सेड इट’ या चित्रमालिकेसाठी प्रसिद्ध आहेत.

5. नॉर्मन थेलवेल – (23 मे, 1923 – 7 फेब्रुवारी, 2004), ब्रिटिश व्यंगचित्रकार. घोड्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध होते.

वाक्प्रचार:

  1. थबकणे – मध्येच अकस्मात थांबणे
  2. विचार मांडणे – कल्पना, मत मांडणे
  3. भोकाड पसरणे – जोरजोरात रडणे
  4. हुकूमत गाजवणे- वर्चस्व, अधिकार गाजवणे

9th Std Marathi Questions And Answers: