Manus Bandhuya Class 11 Marathi Chapter 7 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 7 Exercise Question Answer Maharashtra Board

‘माणूस’ बांधूया 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 6

आ. परिणाम लिहा.

प्रश्न 1.
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला.
उत्तर :
परिणाम : आई-वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं ऊबदार घर नष्ट झाले आणि खोट्या नात्याचा काचमहाल उभारला गेला. जिथे प्रेम नव्हते.

प्रश्न 2.
माणसा-माणसांतील संवाद हरवला.
उत्तरः
परिणाम : माणसं माणसासारखी वागत नाहीत. माणसांना अधिक अधिक हव्यासाचा, कुठ थांबायचा हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ म्हणून स्वीकारला गेला, माणूस एकाकी पडला. माणूसपणाचं पोषण होणे थांबले. स्वार्थीपणा वाढला. माणसे संवेदनाहीन झाली.

प्रश्न 3.
माणसं बिनचेहऱ्यानं बडबडत राहिली.
उत्तरः
परिणाम : माणसं अगतिक झाली. एकाकी आयुष्य जगू लागली. केवळ यंत्रसंवाद चालू राहिल्याने विनाश याच विकासाच्या मार्गाकडे वळली. केवळ भरकटत राहिली. मनोरुग्णता वाढली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न 4.
नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली.
उत्तर :
परिणाम : पैशानेही न सोडवता येणारे मनाचे, मनाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले. मनोरुग्णता वाढण्याची शक्यता निर्माण झाली,

इ. पाठाच्या आधारे कारणे लिहा.

प्रश्न 1.
सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण
उत्तर :
सभोवतालच्या परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. काय घडत आहे? माणसं अशी का वागत आहेत? शिक्षणाचं काय होत आहे? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? अजून किती पडझड होणार आहे. या प्रश्नांनी त्यांना त्रस्त केले त्यामुळे मन कातर झाली.

प्रश्न 2.
‘यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण
उत्तर :
विज्ञानाचे कौतुक करताना अलौकिक आनंद देणाऱ्या मातीच्या वारशाचे तेज नष्ट होत आहे. खरं सुख कोणतं हे कळत नसल्याने विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे चिंतन करण्याची गरज आहे. आपण कुठे भरकटत निघालो आहोत हे . कळण्यासाठी, संवादशून्य एकाकीपण टाळण्यासाठी संवाद-चिंतनाची गरज आहे. त्यामुळे यंत्रसंवाद करून चालणर नाही.

2. पाठातील आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. आंतरिक दारिद्रय
आ. वात्सल्याचं ऊबदार घर.
इ. धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय.
ई. संवेदनांचे निरोप समारंभ.
उत्तर:
अ. मनाचे दारिद्रय.
आ. प्रेमभावनेने भरलेले घर.
इ. गतिशील जीवन जगणारी चैतन्यमय तरुण पिढी, वृद्धत्वामुळे हातापायांतील शक्ती गेलेले वृद्ध.
ई. एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता नष्ट होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

3. व्याकरण:

प्रश्न अ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
उत्तरः
1. मन कातर होणे – मनात दुःखी भावना जागृत होणे.
वाक्यः आई-वडिलांच्या आठवणीमुळे शहरात एकाकी जीवन जगणाऱ्या सुहासचे मन अगदी कातर झाले.

2. काळजात क्रंदन होणे – दुःख होणे, दु:खाने रडणे
वाक्यः

  • स्वाभिमानी माणसं काळजात क्रंदन झाले तरी आपल्या गरीबीचा बाजार कधी मांडत नाहीत.
  • भावाभावांमध्ये होणारी भांडणे पाहून आईच्या काळजात क्रंदन होते परंतु ती गप्प राहते.

प्रश्न आ.
‘संवेदनशून्य’ शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक शब्द लिहा.
उत्तरः
संवेदनाहीन, निर्विकार, अबोल, अजाण, भावनाहीन, (अमानुष, निर्दोष) भावनाशून्य, पाषाणहृदयी

इ. अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
उत्तरः
परंपरागत जीवन जगणाऱ्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते. किंवा जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न 2.
माणसा-माणसांत संवाद हवा.
उत्तर :
माणसा-माणसांत विसंवाद नको.

प्रश्न 3.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
उत्तरः
मनुष्य तिरस्कार भावनेच्या आधारे जगू शकत नाही. किंवा मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.

4. स्वमत:

प्रश्न अ.
‘पैसा हे साधन आहे. साध्य नव्हे,’ हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘पैसा मिळवला की माणूस सुखी होतो’ अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते. त्यासाठी जो तो पैसा त्वरित कसा कमवायचा याचाच विचार करताना दिसतो. मग भौतिक सुखासाठी पैशाच्या मागे पळणारा माणूस गैरमार्गाचाही वापर करतो. परंतु हे खरे नाही कारण सुख हे केवळ पैसा कमविण्यात नसते, पैशाने वस्तू विकत घेता येतील. कारण पैसा हे साधन आहे परंतु विकत घेतलेल्या सर्वच वस्तू सुख देतील असे नाही. वस्तूंमधून भौतिक सुख मिळेल.

परंतु मानसिक समाधान, सुख हे पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने घर विकत घेता येते. परंतु घराला घरपण येण्यासाठी माणसा-माणसांत आवश्यक असणारा संवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे विकत घेता येत नाही. त्यासाठी सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी, एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आई… वडील काम करतात. पैसा कमावतात, त्यांच्या अवास्तव गरजा पूर्ण करतात. परंतु जर मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्या पैशाने सुख प्राप्त होत नाही त्यांमुळे सर्वजण एकाकी होतात.

त्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे. पैसा हेच जीवन नव्हे. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करून पैसा मिळवता येतो परंतु सुख मिळवण्यासाठी एकमेकांसोबत राहणे, वेळ देणे आवश्यक असते. त्यामुळे पैसा हे साधन आहे, साध्य नाही. म्हणूनच सर्वात श्रीमंत देश अमेरिका असला तरी ‘जगारील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश’ हा मान भूतानसारख्या छोट्या राष्ट्राला मिळाला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न आ.
मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहताना त्याला सगळ्यांशी संवाद साधावाच लागतो. कारण आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरताना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो. अशा वेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते. अन्यथा एकाकीपणाला सामोरे जावे लागते. कुटुंबात राहूनही जर तो दुसऱ्याशी संवाद साधू शकला नाही. तर तो एकाकीपणाच्या वाटेवर चालू लागल्याचे दिसून येते. कामामध्ये व्यस्त असणारे आई-वडील मुलांसाठी संपत्तीचा साठा करतात. परंतु प्रत्यक्षात मुलांच्या मनापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे मूल आपल्या भावना व्यक्त करू न शकल्याने वाईट सवयींना बळी पडते. तर आपल्या मुलांशी, नातवंडांशी संवाद साधू न शकल्याने वृद्ध मंडळी निराश होतात. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये दरी निर्माण होते.

कार्यालये विविध संस्था, क्षेत्रे या सर्वच ठिकाणी संवाद साधता न आल्यास व्यक्ती कार्यरत होऊ शकत नाही. एकमेकांच्या समस्या समजू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या भावना, विचार, व्यक्त करण्यासाठी एक दुसन्याशी संवाद साधणे आवश्यक असते. जर आपली सुख दुःखे समजून घेणारे कोणी नसेल तर जीवन जगण्याला अर्थच राहणार नाही. त्यासाठी संवाद आवश्यक आहे. संवादशून्य एकाकीपणामुळे माणूस
मनोरुग्ण होण्याची शक्यता वाढते.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
‘नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’ लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
विज्ञानाने जग जवळ आले असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात असे झाले आहे का असा प्रश्न पडतो. कारण नवीन नवीन शोध लागून लोकांचे जीवन सुखकर झाले असले तरी एकमेकांसाठी त्यांच्याकडे वेळ असलेला दिसून येत नाही. यंत्रयुगात माणूस इतका यांत्रिक झाला आहे की त्याला एकमेकांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नाही. केवळ फोनवरच तो एकमेकांची खुशाली समजून घेतो. विचारपूस करतो. आजच्या गतिमान जीवनात माणूस इतका गुंतला आहे की पैसा हेच जीवन समजून रस्त्यात कुठे अपघात वैगरे झालेला असला तरी त्याच्याकडे तिथे थांबायलाही वेळ नसतो.

अडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तो आपली कामाची वेळ चुकेल, आपण पोलीस कारवाईत अडकू म्हणून घटना स्थळापासून दूर पळतो, माणुसकीशी त्याचा संबंधच नसल्यासारखे तो वागतो. त्यामुळेच एखादया संकटात सापडलेल्या, पूर, भूकंपामध्ये बळी गेलेल्या माणसाबद्दल दु:ख वाटून न घेता तो तेथेही स्वतःचा फायदा कसा होईल ते पाहतो. दुसऱ्याचे दुःख, जाणीव याबद्दल त्याला काहीही वाटत नाही.

पैसा कमावण्याच्या नादात स्वतःच्या वृद्ध माता-पित्याला वृद्धाश्रमात ठेवणारा, मुलांच्या एकाकीपणाकडे दुर्लक्ष करणारा, समाजापासून तुटल्यासारखा वागणारा नव्या जगातील हा माणूस माणूसपणालाच विसरून गेला आहे असे वाटते. त्यामुळे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही या लेखकाच्या मताशी मी सहमत आहे परंतु त्याचवेळी याला काही अपवाद म्हणून काही संस्था, माणसे आपतकालीन स्थितीत, भूकंप, पूर इ. परिस्थितीत मदतीचा हात देताना दिसतात. परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न आ.
‘इथे माणूस दिसत होता, पण जाणवत नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती, या विधानांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. आधुनिक जगात मात्र पैसा’ हेच सुख मानले जात आहे. त्यामुळे पैशानेच जगता येतं. पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाल्याने सर्व काही पैशातच गणलं जात आहे. जग व्यवहारी बनलं आहे. शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी नव्हे तर पैशासाठी होत गेले आहे. प्रेम, भक्ती या भावनांची मोजणीही पैशानेच होऊ लागली आहे आणि प्रेम, नाते यांच्याऐवजी खरेदीविक्रीचा व्यवहार सुरू झाला आहे.

या नोकरीमुळे घराबाहेर राहणारे पालक मुलांना प्रेम देण्यास कमी पडत आहेत त्यामुळे घराऐवजी केवळ चमकणारा महाल बांधला गेला, जेथे आई-वडिलांच्या वात्सल्याला, प्रेमाला काहीच किंमत उरली नाही. त्यांचे सुख दुःख मुलांना कळले नाही. एकमेकांच्या जाणीवा, भावना समजायला व्यक्त करायला कोणालाच वेळ मिळत नाही आहे. त्यामळे महालात चकाकी येते परंतु माणसकीच्या नात्याला मात्र हे घर पारखे होते. त्यामुळे माणूस त्या घरात रहातो शरीराने परंतु तो जाणवत नाही. त्याची सुख दःख समजत नाहीत आणि पादच होत नसल्याने फक्त ओठ हलत रहातात. परंतु हृदयाची साद दसऱ्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीत असे लेखक म्हणतात आणि हीच आजच्या जीवनाची खंत आहे.

प्रश्न इ.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर :
विज्ञानाने जग जवळ आणले असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मोबाईल फोन, कॉम्प्युटर इ. केवळ यंत्रे ठरली कारण गतिशील जीवनशैली स्वीकारणारा माणूस या यंत्रांचा वापर करू लागला परंतु मनाने मात्र एकमेकांपासून दूर झाला, प्रत्यक्ष भेटून किंवा पत्र पाठवून मिळणारे मानसिक सख, चेहऱ्यावरचा आनंद सर्वाना पारखे झाले. वेळेचे, कामात व्यस्त असण्याचे कारण दाखवून संवाद टाळला जाताना दिसून येते. यामुळे मानवी जीवन धोक्यात येईल असे वाटते.

कारण संवाद न साधल्याने, एकमेकांपासून दूर गेल्याने मानव एकाकी होईल. एकटेपणा वाट्याला आल्याने निराश, चिंताग्रस्त होईल. एकमेकांच्या भावना समजू न शकल्याने, सुख, दुःख जाणून न घेतल्यामुळे एकटेपणाची जाणीव माणसाला मनोरुग्ण बनवेल, स्वत:चे विचार, भावना व्यक्त न करता आल्याने दुःखी जीवनाला सामोरा जाईल. नैराश्यग्रस्त झाल्याने कदाचित व्यसनांच्या आहारी जाईल, यामुळे स्वतःबरोबरच समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा विकासही होणार नाही. उलट अधोगतीकडे मार्गक्रमण करू लागेल आणि संवेदनाहीन बनलेला माणूस संपूर्ण माणूसजातच नष्ट करण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द शोधा.
अ. तो, मी, पी, हा …………..
आ. खाणे, पिणे, शहाणे, जाणे ………….
इ. तापी, कृष्णा, नदी, यमुना ………….
ई. त्याला, तुला, मला, माणसाला ………..
उ. आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी ………….
उत्तर :
अ. पी
आ. शहाणे
इ. नदी
ई. माणसाला
उ. सौंदर्य

11th Marathi Book Answers Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Additional Important Questions and Answers

आकलन कृती

प्रश्न 1.
खालील पठित गदा उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
चौकटी पूर्ण करा.
1. आजच्या समाजात बिंबवलेले तत्त्वज्ञान – [ ]
2. मार्केटिंग करताना न घेतलेली दक्षता – [ ]
उत्तर :
1. ‘माणूस मिथ्या सोनं सत्य’
2. एक गरीबी दूर करताना दुसरे आंतरिक दारिद्र्य निर्माण होईल याची दक्षता घेतली नाही.

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 7
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 8

उपयोजित कृती

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. धन, संपत्ती, पैसा कार्य
  2. प्रेम, माया, वात्सल्य, वस्तू
  3. इमारत, पथ, मार्ग, रस्ता
  4. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, नेहमी

उत्तर :

  1. कार्य
  2. वस्तू
  3. इमारत
  4. नेहमी

खालील शब्दासाठी परिच्छेदात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.

प्रश्न 1.
भावनाशून्य मन – ………………….
अ. आशा
ब. ऑतिरक दारिद्रय
क. मुकं मन
ड. सुसंवाद
उत्तरः
मुकं मन

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
आजच्या जगाचे ‘माणूस मिध्या’ सोनं सत्य’ या तत्त्वज्ञानाचा भावार्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :
आजचे जग म्हणजे विज्ञानाचे जग, विज्ञानाने संपूर्ण जगावर एक प्रकारची जादू केली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती पथावर वाटचाल करताना माणसाने सुखी जीवनाची स्वप्न बघितली. पण हे सुख शोधताना मानव हळहळ पैशाच्या आहारी जाऊ लागला आणि पैशाच्या मागे मागे धावताना मानवाचे जीवन यंत्रवत बनले. निष्क्रिय झाले, एकमेकांपासून माणूस दूर गेला, केवळ पैसा कमावणे एवढेच जीवन बनले. एकमेकांशी संवाद साधणे कठीण झाले, कारण तो पैशातच सुख मानू लागला. पैसा कमावण्याच्या स्पर्धेत तो सतत पळतच राहिला. इतके की पळता पळता तो इतरांपासून कधी दूर गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्यामुळे दुसऱ्याची सुख-दुःखे, भाव भावना त्याला कळेनाशा झाल्या.

असा हा माणूस एकमेकांपासून दूर जाताना कुटुंबापासूनही दूर झाला. कारण पैसा, हे जीवनाचे अंतिम सत्य बनले तर माणूस माणसाच्याच जगात खोटा ठरला आणि पैसा हेच सर्वस्व बनले. संवादामुळे वाढणारा जिव्हाळा, आपुलकी संवाद तुटल्याने नाहीशी झाली आणि धन, संपत्ती, पैसा यालाच सर्वश्रेष्ठ ठरवताना माणूसच खोटा ठरला आणि हळूहळू विनाश म्हणजेच विकास या दिशेने माणसाची वाटचाल होऊ लागली. यासाठीच मानवाने संवाद साधून माणसांतील माणूसपण जपावे असे वाटते.

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 12

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले विरुद्धार्थी शब्द

प्रश्न 1.
विसंवाद × ……….
उत्तर :
विसंवाद × संवाद

प्रश्न 2.
नैसर्गिक × ………..
उत्तर :
नैसर्गिक × कृत्रिम

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

खालील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
साद घालणे –
पर्याय :
अ. संभ्रमात पडणे.
ब. आठवण काढणे
क. गुंग होणे.
ड. बोलावणे
उत्तर :
बोलावणे

प्रश्न 2.
अगतिक होणे –
पर्याय :
अ. असहाय होणे.
ब. आनंदी होणे
क. मरण येणे
ड. सावध होणे
उत्तर :
असहाय होणे.

स्वमत:

प्रश्न 1.
संवाद नसल्याने माणूस माणसापासून दूर गेला आहे याविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तरः
आज-चंगळवादी दृष्टिकोन सगळीकडे दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याच विश्वात धुंद असल्याचे लक्षात येते. त्यामुळे एकाच घरात राहूनही एकमेकांना भेटेनासे होतात. संवाद साधला जात नाही. त्यामुळे सुखदुःखात्मक अनुभवांची देवाण-घेवाण होत नाही. आपले कोणीतरी आहे हीच भावना नष्ट झाल्याचे दिसून येते. कारण संवादच नसतो.

संवादच नसल्याने वृद्ध आई, वडील मुलासाठी तळमळत राहतात. एका घरात राहूनही कोणी मलिका पाहण्यात व्यस्त, तर कोणी हॉटेलात फिरण्यात मग्न यामुळे हळूहळू माणूस कुटुंबापासून तुटू लागतो व एकटे राहतो. कार्यालय, नोकरी, याठिकाणी संवाद साधला न गेल्याने कार्य फलश्रुती मिळत नाही. माणसा-माणसांतील अंतर वाढत जाते आणि एकमेकांना कायमचे दुरावले जातो.

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
आधुनिक काळातील घराचे उरलेले स्थान : …………
उत्तर :
चार घटकांचा निवारा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 13
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 14

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले शब्द

प्रश्न 1.

  1. संपत्ती
  2. उर्जेचे मूळ
  3. प्रगती

उत्तर:

  1. धन
  2. प्रेरणा
  3. विकास

प्रश्न 2.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा.
पर्याय :
अ. प्रश्नचिन्ह, पूर्णविराम
ब. उदगारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह
क. उदगारवाचक चिन्ह, पूर्णविराम
ड. स्वल्पविराम, पूर्णविराम
उत्तर :
स्वल्पविराम, पूर्णविराम.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
चला ‘माणूस’ बांधूया!
अंतरीच्या उमाळ्याने
संवादातील जिव्हाळ्याने।
यातील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर :
आज मानव प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. परंतु ही प्रगती करताना कुठेतरी तो दुसन्यांपासून दुरावला गेल्याचे जावणते कारण पैसा म्हणजेच जीवन असे त्याला वाटत असल्याने पैशासाठी तो सतत धावत असतो. परंतु त्याचवेळी कोणालातरी त्याच्या सहवासाची, सोबतीची गरज आहे हेच तो विसरला आहे. केवळ पैसा-पैसा केल्याने आपल्याच माणसांपासून तो दूर गेला आणि पैशाच्या चक्रव्यूहात अडकला गेला.

पैशासाठीच जगायचं हा त्याचा उद्देश बनला त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमाच्या-वात्सल्याच्या स्पर्शापासून दूर गेला. आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधायलाही त्याला वेळ मिळत नाही. घरातील प्रत्येक जण आपल्याच विश्वात मग्न राहिल्याने एकाच घरात राहूनही कितीतरी काळ त्यांचे एकमेकांशी भेटणे होत नाही आणि यातूनच तो एकाकीपणाच्या दिशेने चालला जातो. परिणामी विविध आजारांनाही बळी पडतो. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.

यासाठीच लेखकाच्या मते एकमेकांना समजून घेणे, सुख-दुःखांची देवाणघेवाण होणे- म्हणजेच जीवन असते असे असताना माणसाने एकमेकांशी संवादच साधला नाही तर या जगात प्रत्येकजण एकटा पडेल. गर्दीतही एकटा होईल आणि म्हणूनच एकमेकांशी प्रेमाने जिव्हाळ्याने संवाद साधणे आवश्यक आहे. जर माणसे एकत्र आली, विचारांची देवाण-घेवाण झाली तरच संवाद साधला जाईल आणि माणूस घडत जाईल, त्यामुळे माणसांना माणसांशी जोडणे आवश्यक आहे. केवळ मोठ्या इमारती बांधून उपयोगाचे नाही तर माणुसकीची इमारत उभारणे आवश्यक आहे. यासाठी प्रेमाने, जिव्हाळ्याने संवाद साधून माणूस घडवूया असे लेखक म्हणतात.

‘माणूस’ बांधूया! Summary in Marathi

प्रस्तावना:

प्रविण दवणे यांनी कविता, ललित लेख, वैचारिक लेख अशा मराठी साहित्य विश्वातील अनेकविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पाच वेळा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘चैत्रबन’ पुरस्कार, ‘शांता शेळके सरस्वती पुरस्कार’ असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

‘रंगमेध’ ‘गंधखुणा’ ‘आर्ताचे लेणे’ ‘ध्यानस्थ’ ‘भूमीचे मार्दव’ हे काव्य संग्रह ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘अत्तराचे दिवस’ ‘सावर रे’ ‘गाणारे क्षण’ ‘मनातल्या घरात’ ‘रे जीवना’ हे ललित लेख संग्रह, ‘प्रश्नपर्व’ हा वैचारिक लेखसंग्रह इ. साहित्य प्रसिद्ध आहे. तसेच ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘लेखनाची आनंद यात्रा’ ‘वय वादळ विजांचं’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजलेले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

पाठ परिचय:

प्रस्तुत पाठ हा प्रवीण दवणे यांच्या प्रश्नपर्व’ या वैचारिक लेखसंग्रहातून घेण्यात आला आहे. आजचे युग हे विज्ञानयुग समजले जाते. मानव प्रगती पथावर वाटचाल करीत चंद्रावर जाऊन पोहोचला पण त्याचवेळी तो दुसऱ्या मानवी मनापर्यंत पोहोचला आहे का? हीच लेखकाची खंत आहे. इंटरनेट, व्हॉट्स अँपने जग जवळ आले असे आपण म्हणतो परंतु हृदय हृदयाशी जोडले गेले का? असा प्रश्न लेखकाला त्रस्त करतो आणि म्हणूनच केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा हृदयाने हृदय बांधले जाणे आवश्यक असल्याचे लेखकाला वाटते. यासाठी मनाचा मनाशी संवाद होऊन माणूस माणसाशी बांधला जाणे, जोडला जाणे महत्त्वाचे आहे हेच लेखक पाठाद्वारे सांगू इच्छितात.

आधुनिक काळात पैशाला अवास्तव महत्त्व देऊन त्यातूनच सुखाची प्राप्ती होते असे मानले गेले, प्रेम, वात्सल्य बाजूला करून पैसाच बोलू लागला. यांतूनच जग व्यवहारी बनले. पैशाच्या मोहात अडकलेला माणूस माणूसपण हरवून बसला आणि स्वत:च्याच घरात राहणाऱ्या माणसांसाठी अनोळखी ठरला. माणसा-माणसांतील अंतर वयाने नाहीतर पैशामुळे वाढत गेले व प्रत्येक जण एकमेकांना कधीतरी भेटू याच आशेवर जगू लागला. आत्म्याची आत्म्याला दिलेली साद म्हणजे संवाद हेच माणूस विसरला. एकमेकांसाठी वेळच कोणाकडे शिल्लक राहिला नाही. आजी-आजोबा, आई-वडील मुले ही नाती दुरावली गेली . प्रत्येकजण आपल्या जगात मग्न झाला. मौज-मजा, चंगळ यातच ‘जगणे’ आहे, अशी वृत्ती बळावली आणि माणसं एकमेकांपासून दूर गेली.

ई-मेल, चेंटिंग, हे मार्ग संवाद साधण्यासाठी निवडले गेले. यंत्राच्या मदतीने हदये मात्र जोडता आली नाहीत. दिवसभर पैशासाठी जीवन प्रवास करणारी माणसं, मानवी सहवासाच्या खया सुखापासून वंचित राहिली. एकाकीपण वाढत गेले. परंतु जसजसे एकाकीपण वाढत गेले. निराशा येत गेली तसतशी परत एकदा संवादाची आवश्यकता भासू लागली. कारण मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देणारे मन पैशाच्या मागे धावू लागले. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी नातं जोडू शकली नाही. अशावेळी लेखकाच्या मते केशवसुतांच्या काव्य रचनेने सत्वाचा केलेला जयजयकार लक्षात घेतला पाहिजे. केवळ माती-विटांच्या इमारती बांधण्यापेक्षा अंत:करणातील प्रेमाने माणूस माणसांशी बांधला जावा हेच लेखक यातून सांगू इच्छितात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. मिथ्या – खोटे, अवास्तविक (unreal, false).
  2. तत्त्वज्ञान – तत्त्वासंबंधी तत्त्वांना अनुसरून असणारे ज्ञान – (philosophy).
  3. निष्कर्ष – सार, ताप्तयं, सारांश – (conclusion)
  4. दक्षता – खबरदारी – (carefulness, attention)
  5. सूत्रधार – कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात ज्याच्या हातात बाहुल्यांच्या दोन्या असतात तो मुख्य चालक, ज्याच्या हातात कार्यक्रमाची सर्व
  6. सूत्रे असतात तो – (anchor, program conductor)
  7. उद्देश – हेतू (intention, purpose).
  8. अबोल – न बोलणारी – (talking little, tactiturn).
  9. लागण – रोगाची बाधा होणे (infection).
  10. हव्यास – तीव्र इच्छा, लोभ (a great desire).
  11. दुथडी – नदीचे दोन किनारे (on both the banks).
  12. खिन्न – दुःखी, निराश (sad, distressed).
  13. क्रंदन-रडणे, आक्रंदन – (to cry).
  14. पडझड-जीर्णावस्थेतील, पडायला आलेले – (downfall).
  15. मूल्य-किंमत – (cost, price)
  16. निवारा – आश्रय – (shelter).
  17. अगतिक – असहाय – (helpless)
  18. लौकिक – लोकप्रसिद्ध लोकांमध्ये रूढ असलेले, या लोकांतील.
  19. अलौकिक – चमत्कारिक, लोकोत्तर.
  20. चिंरतन – जना, सतत, प्राचीन (eternal).
  21. तेज – प्रकाश, त्रिवार तीन वेळा – (three times).
  22. कंपन – कापरे. थरथरणे – (shivering).
  23. पायाभूत – मूलभूत, मूळ – (basic).
  24. मनोरुग्ण – मानसिक आजार असलेला – (psychic).
  25. झडझडून – जलदीने.
  26. त्वरेने झिडकारून, सुवर्णमध्य – दोन परस्परविरुद्ध गोष्टींतून काढलेला मध्यम मार्ग – (golden medium).
  27. तडजोड, आवाहन – कळकळीची विनवणी, विनंती – (call, roquest).
  28. उमाळा – हुंदका, आवेग – (can outburst).
  29. जिव्हाळा – प्रेम – (affection).
  30. गोंगाट – आवाज – (great noise).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

वाक्प्रचार:

  • साद घालणे – बोलावणे, हाक होणे.
  • मनं कातर करणे – दुःख होणे, अडचणीची स्थिती.
  • जीवाचा आटापिटा करणे – खूप प्रयत्न करणे, खूप कष्ट करणे.
  • काळजात क्रंदन होणे – खूप दुःख होणे, आक्रंदत खूप रडणे.
  • अगतिक होणे – असहाय होणे.
  • पाय पाठीला लावणे – खूप कष्ट करणे.
  • झडाडून जागे होणे – त्वरेने जागृत होणे, परिस्थितीची जाणीव होणे.
  • उदयोस्तु करणे – जयजयकार करणे.
  • माणूस बांधणे – एकमेकांशी नाते जोडणे.
  • लोप पावणे- नाहिसे होणे.

11th Marathi Notes भाग-२

Davant Alis Bhalya Pahate Class 11 Marathi Chapter 6 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 6 Exercise Question Answer Maharashtra Board

दवांत आलिस भल्या पहाटीं 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –
1. शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
2. शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
3. शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
4. शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
उत्तर :
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.

प्रश्न आ.
हिरवे धागे म्हणजे –
1. हिरव्या रंगाचे सूत.
2. हिरव्या रंगाचे कापड.
3. हिरव्या रंगाचे गवत.
4. ताजा प्रेमभाव.
उत्तर :
हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न इ.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे –
1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
2. हातातून निसटणारा पारा.
3. पाऱ्यासारखा चकाकणारा.
4. पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.
उत्तर :
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.

प्रश्न ई.
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे –
1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
2. काळ्या मेघांप्रमाणे.
3. आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे.
4. आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे.
उत्तर :
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.

2. अ. प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.

प्रश्न 1.
1. प्रेयसीचे नाव काय?
2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
4. ती कुठे राहते?
5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
उत्तर :
1. ती वळून पाहणे का विसरली असावी?
2. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
3. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
4. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
5. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

आ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी दयावी?
उत्तर :
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची दयावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

प्रश्न 2.
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्याकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
उत्तर :
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणि गोंदाव्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न 3.
विरल, सुंदर अभे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
उत्तर :
दवांत आलिस भल्या पहार्टी
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा

3. अ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
कवीची प्रेयसी केव्हा आली?

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
उत्तर :
कवीची प्रेयसी भल्या पहाटे आली.

प्रश्न आ.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
उत्तर :
डोळ्यांना कवीने डाळिंबांची उपमा दिली आहे.

प्रश्न इ.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
उत्तर :
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न ई.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
उत्तर :
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत ‘कोमल’ आणि ‘ओल्या’ अशी दोन विशेषणे आली आहेत.

प्रश्न उ.
‘अनोळख्याने’ हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
उत्तर :
‘अनोळख्याने’ हा शब्द प्रियकर / कवीसाठी वापरला आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह कवितेतील छंद
प्रेम कविता प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणी शुक्राच्या तोऱ्यांत, हिरवे धागे, शुभ्र चांदण्या, अभ्रांची शोभा, तळहाताच्या नाजूक रेषा मुक्त छंद

4. काव्यसौंदर्य :

प्रश्न अ.
‘डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! ‘ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा,
उत्तर :
प्रेयसीच्या मनातील स्नेहाची, प्रेमाची भावना कवीला आपल्या नजरेतून टिपता येतेय. तिच्या मनातील प्रेमसुलभ गुलाबी डाळिवी भावना तिच्या नजरेतूनही स्पष्ट दिसत आहेत. पण त्या भावना व्यक्त होत नाहीत, त्या केवळ डोळ्यातूनच जाणता येत आहेत. डाळिंबाचे दाणे जसे पारदर्शी असतात तसंच तिच्या मनातील भावनाही पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत, त्या प्रियकराला (कवीला) तिच्या डोळ्यांच्या पायाला पकडताही येत नाहीत. पारा जसा अस्थिर असतो तसंच तिच्या डोळ्यातील त्या प्रेमभावना कवीला पकडता येत नाही आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न आ.
‘जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा,’ या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
प्रेयसी पहाटेच्या प्रहराला कवीच्या मनात प्रकट झाली. तिचे लावण्य शुक्राच्या ताऱ्यासारखे होते. ती लावण्यवती असल्यामुळे तिच्याकडे साहजिकच कवीचे लक्ष गेले, तिच्यावर खिळून राहिले. तिच्या सौंदर्याचा वेध घेत घेत तिच्या डोळ्यांमधील भावही कवी जाणून घेतो. त्या डोळ्यांमधील उत्सुकता, अधीर भाव, ओढ कवी मनातच ठेवतो. ती येते ओळख घेऊन आणि जाताना अनोळखी असल्यासारखं भासवते. पण जाताना ती त्या दोघांच्या आत्मीयतेमध्ये एक मंद गंध पेरून जाते. तो गंध प्रेमाचा असावा.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर :
बा.सी, मकर लिखित ‘दवांत आलिस भल्या पहार्टी’ या कवितेत प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे स्वप्नरंजक वर्णन आहे. पहाटेच्या प्रहराला अभ्रांच्या कोषातून जशी शुक्राची चांदणी बाहेर पडते. त्याप्रमाणे कवीच्याही मनी असलेली ती शुक्राची चांदणी आहे. या कवितेतील प्रेयसी प्रत्यक्षात साकार झालेली असेल वा नसेल पण तिची ओढ मात्र कवीला आहे. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? या गीतासारखाच भाव या कवितेत आवळतो. तिची आणि त्याची भेट काल्पनिक असावी. ही काल्पनिक भेटही मात्र कवीच्या मनावर राहण्याजोगी आहे.

तिचे सौंदर्य न्याहाळताना कवी तिच्या नजरेतील भाव शोधतो पण तिने ओळख असूनही अनोळखी असल्यासारखे भासवले आहे. ही मनात साकार केलेल्या प्रेयसीबद्दलची भावना कवी प्रत्यक्षात कवितेतून प्रकट करतो. त्या शुक्राच्या चांदणीचे अस्तित्वच नाही पण ती स्वप्नपातळीवर दिसते. तिचे सौंदर्य लोभसवाणे आहे. तिच्या डोळ्यांमधील छटा पाऱ्यासारख्या आहेत. मुळातच न भेटलेल्या प्रेयसीबद्दलचे कल्पनामय चित्रण अनुभव आल्यासारखे कवीने दृश्य चित्रण उभे केले आहे. हेच या कवितेचे अनोखेपण आहे.

6. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर :
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही बा.सी. मर्डेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. पण हे प्रेम भासआभासाच्या रेषेवर असणारे आहे. बा.सी.मर्डेकर यांनी कवितेत नवीनता आणताना अनेक प्रयोग केले. कवितेचे शीर्षकच पाहता ते समजून येते. ‘पहाटे’ असं न म्हणता ‘पहाटी’ असा शब्द उपयोजून एक नवीन शब्द साहित्यात रूढ केला असे म्हणावे लागेल.

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत. बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल. तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते.

ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदर्याने उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावन गेले. चालता चालता तिच्या पावलांच्या खणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या, त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती.

प्रेयसीच्या चालण्यातच तोरा असं म्हटल्यामुळे ती सौंदर्यवती असल्याचं स्पष्ट होतं, तिच्या मनातील प्रेमभाव कवीच्या मनात पेरताना त्याला जाणवलेली तरलता तो ‘पेरत गेलीस तरल पावलांमधली शोभा’ असे म्हणतो. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. या कडव्यात कवीने दोन ओळी नंतर एकाच शब्दाची एक ओळ घेऊन त्याच्या मनातील ओढ व्यक्त करण्याचा यत्न केला आहे. तसंच हिरवे धागे या शब्दातून नात्यातील हिरवेपणा स्पष्ट केला आहे. हिरवे हे विशेषण वापरून त्या नात्यातील कोवळीकता, ताजेपणा स्पष्ट केला आहे.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर थेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हदयापर्यंत पोहोचत होता. या कडव्यात कवी प्रेयसीच्या डोळ्यातील प्रेमभावना खट्याळपणा दाखवताना त्याला डाळिंबाच्या दाण्यांची उपमा देतो. डाळिंबाचा रंग जसा बी असतो.

हा गुलाबी रंग तिच्या डोळ्यातही दिसतो. तिच्या नजरेतील प्रेमसूचकता पाऱ्यासारखी असल्यामुळे ती त्याला टिपता येत नाही आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं बरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावना याच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

आपल्या मनातील भावभावना स्पष्ट करताना कवी त्या आठवणींना कोमल ओल्या आठवणी म्हणतो. त्यातील ओलाया, जिव्हाळा हा कोमल ओल्या या शब्दातन प्रकट होतो. एथल्याच हा बोलीभाषेचा शब्द वापरून कवी आणखी एक नवा प्रयोग करू पाहतोय…कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे, त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लज्जेमुळे आलेला असावा, प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत, ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

प्रेयसीच्या मनातील नाजूक भाव अधोरेखित करताना तिच्या नखांवरही ते गुलाबी भाव उमटल्याचे स्पष्ट करतो. आकाशात तर चांदण्या असतातच पण तिच्या हातावरही त्या चांदण्यांचा स्पर्श झालेला आहे. असा भाव व्यक्त करताना शुभ्र चांदण्या (स्नेहाच्या) कुणी गोंदाव्या असे म्हणतो. त्यातून प्रियकराची तरल संवेदना प्रकट होते.

पहाटेच्या दांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

जो अनुभव घेता आला नाही पण त्याची अनुभूती अप्रत्यक्ष स्वरूपात मिळाली ते प्रकट करताना कवी ती पहाटे आल्याचं म्हणतो. अभ्रांची शोभा ही सुद्धा नवीन कल्पना कवीने मांडलेली आहे. प्रेमाचा रंग, गंध असतो तो तरल संवेदनांच्या लोकांनाच जाणवतो. कवीला तो जाणवतो.’ ते व्यक्त करण्यासाठी कवी ‘मंद पावलांमधल्या गंधा’ असं म्हणतोय. त्या पावलांनांही गंध प्राप्त झाला, त्या वाटेला आणि मनातील प्रीतीलाही ‘गंध’ या शब्दाचे गंधा हे सामान्य रूप वापरून ‘एकदा’ या शब्दाशी लय साधण्याचा यत्न केलेला आढळतो.

विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

11th Marathi Book Answers Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित पदव पंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवयित्री पेरित गेली. → [ ]
उत्तर :
कवयित्री पेरित गेली. → तरल पावलांमधील शोभा

खाली दिलेल्या शब्दाला कवितेत आलेले विशेषण लिहा.

प्रश्न 1.
धागे : [ ]
उत्तर :
हिरवे

उपयोजित कृती

खालील अर्थांसाठी कवितेते वापरलेले शब्दः

प्रश्न 1.
1. ध्येय –
2. तहान –
उत्तर :
1. लक्ष्य
2. पिपासा

प्रश्न 2.
सुंदरतेचा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
प्रेयसीने कसला इशारा दिला?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
“वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे ?” या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर :
कवी बा.सी मेढेकर यांच्या ‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही कविता प्रेमानुभव व्यक्त करणारी कविता आहे. प्रियकराच्या मनात रेखलेली एखादी सुंदर स्त्री त्याने कवितेच्या माध्यमातून साकार केली आहे. चित्रकार जसं एखादया सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटतो तसं कवीने शब्दांच्या माध्यमातून त्याची प्रेयसी रेखाटली आहे. ती आहे-नाही च्या सीमारेषेवर आहे. शुक्राच्या ताऱ्यासारखं तिचं लखलखीत सौंदर्य आहे. ती जाताना तिच्या तोऱ्यांनी प्रियकराचे काळीज वेधून घेते. जाता जाता ती हसते.

त्या हसण्यातूनच तिलाही प्रियकराला साद दयायचीय असा अर्थ सूचित होतो. पण पुन्हा तिचा नखरा, हावभाव बदलतात, ती त्याला दुर्लक्षून पुढेच जाते. तिच्या या वागणुकीवरून त्याचा गोंधळ होतो. त्यामुळे तो गोंधळून विचारतो की तू मागे वळून पहायचे विसरलीस की काय ? आपले एकमेकांशी जे सुंदर नात्याचे धागे जुळलेले आहेत ते कसे काय विसरून गेलीस. त्या धाग्यांना कवी हिरवे धागे म्हणतो. हिरवा रंग उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, सुंदरता जपणारा आनंद देणारा तसंच तुझ्या माझ्यातील हिरवं नातं आहे. या नात्याला सुंदर करण्यासाठी कवी आतुर आहे.

दवांत आलिस भल्या पहाटीं Summary in Marathi

प्रस्तावना:

विसाव्या शतकातील भारतीय साहित्यविश्वातील एक सिद्धहस्त कवी म्हणून बा.सी. मर्डेकर प्रसिद्ध आहेत. कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, असलेल्या मर्नेकरांची कविता भावोत्कट तरीही चिंतनशील, मानवी जीवनातील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी तसेच प्रयोगशील होती, त्यांचे ‘शिशिरागम’ ‘कांही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे कवितासंग्रह ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’ व ‘पाणी’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, काव्यविषयक त्यांच्या प्रगल्भ जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप पूर्णतः पालटून टाकले, काव्यक्षेत्रात केशवसुतांनंतर मेढेकरांनी महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले.

कवितेचा आशय :

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत.

बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल, तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट ही प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते. ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदयनि उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावून गेले.

खुणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या. त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाचवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर घेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हृदयापर्यंत पोहोचत होता.

तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर | गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं वरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावनाच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे. त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लग्नेमुळे आलेला असावा. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत. ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

पहाटेच्या दवांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली, प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  • पहाट – सकाळ, प्रभात – (morning, dawn).
  • लक्ष्य – ध्येय – (target, aim).
  • पिपासा – तहान – (thirst).
  • तरल – चंचल – (tremulous, quivering).
  • निर्मल – स्वच्छ – (clean, pure).
  • अभ्र – आभाळ, मेघपटल – (cloud, cloudy sky).
  • पारा – एक पातळ खनिज पदार्थ – (mercury).
  • शुभ्र – सफेद – (white, clean).
  • धागा – दोरा – (thread)

11th Marathi Digest भाग-१

Parimal Class 11 Marathi Chapter 5 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 5 परिमळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 5 Exercise Question Answer Maharashtra Board

परिमळ 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 5 परिमळ Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 6

आ. खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 7
उत्तर :

घटना परिणाम
1. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे संगीत वाहू लागणे
2. प्राजक्ताची कळी उमलणे सुगंध दरवळणे
3. जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. शब्द जीभेवर लीलया येणे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

इ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 8
उत्तर :

मुद्दे माणूस प्राणी
1. वर्तणूक कृतघ्न कृतज्ञ
2. इमानिपणा स्वार्थी निःस्वार्थी

ई. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

प्रश्न 1.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे
उत्तर :
1. ‘पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन’

2. ‘आधी हाताला चटके,
तव्हा मियते भाकर’ ‘नही ऊन, वारा थंडी,
आली पंढरीची दिंडी’

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न 2.
बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता
उत्तर :

  • गाय न् म्हैस चारा खाऊन दूध देतात – दूध देणे
  • कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हालवतो – इमानी

2. व्याकरण.

प्रश्न अ.
प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा…
उत्तर :
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या :

  • पीठी – व्होटी
  • जीव – हीव
  • थंडी – दिंडी
  • घाई – पुन्याई
  • नक्कल – अक्कल

प्रश्न आ.
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

  1. बावनकशी सोने
  2. करमाची रेखा
  3. सोन्याची खाण
  4. चतकोर चोपडी

उत्तर :

  1. बावनकशी सोने – अस्सल, खरे
  2. करमाची रेखा – नशीबाचा फेरा, नियतीचा खेळ
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात
  4. चतकोर चोपड़ी – पुस्तक किंवा वहीचा काही भाग

प्रश्न इ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
1. तोंडात बोटे घालणे.
2. तोंडात मूग धरून बसणे.
उत्तर :
1. तोंडात बोटे घालणे – अर्थ : आश्चर्यचकित होणे, विस्मय वाटणे.
वाक्य : अपंग मुलाने धावण्याची शर्यत जिंकल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली.

2. तोंडात मूग धरून बसणे – अर्थ : काहीही न बोलणे, गप्प बसणे.
वाक्य : सरांनी अवघड प्रश्न विचारताच सर्व मुले तोंडात मूग धरून बसली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न ई
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ – ……………
(आ) कृपा – ……………
(इ) धर्म – …………….
(ई) बोध – …………….
(उ) गुण – ……………..
उत्तर :
(अ) अनर्थ, अर्थहीन, अर्थपूर्ण
(आ) अवकृपा, कृपाळू
(इ) अधर्म, स्वधर्म, धार्मिक, धर्मवीर
(ई) अबोध, बोधामृत
(उ) अवगुण, सगुण, निर्गुण, गुणी, गुणवान

3. स्वमत.

प्रश्न अ
‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे’, हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाई या एक अशिक्षित शेतकरी स्त्री असूनही त्यांची रचना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा झिरपते. त्यांचे काव्य सरस व सोज्वळ आहे. बहिणाबाई यांची कविता इंग्रजी वळणाच्या सौंदर्यवादी भावकवितेच्या परंपरेला छेद देणारी अस्सल मराठी वळणाची ग्रामीण कविता आहे.

जुन्यात चमकणारी ही कविता आहे, बहिणाबाई यांनी आपली कविता थेट संत कवितेच्या आणि तत्त्वकवितेच्या परंपरेला जोडली आहे, त्यांच्या कवितेत या परंपरेतला भक्तिभाव, तत्त्वचिंतन आणि हितोपदेश आपल्याला दिसतो. ही लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता आहे. नवकवितेच्या जवळ जाणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग, ग्रामीण जीवन व कृषिसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते. शेतकरी हा कर्मयोगी आहे आणि त्याच्या कामात उदात्तता आहे असे सांगणाऱ्या या कविता आहेत.

क्तिकविता आहे. त्यात पारंपरिक तत्वकवितेच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. ‘उदा. देव अजब गारोडी’ तसेच ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस!’ यांसारख्या आधुनिक कवितेतून मानवतेचा संदेश देणारी त्यांची कविता आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर :
बहिणाबाईंची कविता ही अर्वाचीन मराठीतील पहिली ग्रामीण कविता होय. ती या अर्थाने की, ती ग्रामीण जीवनातूनच मोहोरून आली आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन अंतर्बाहय रसरसलेले आहे. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत पेरणीनंतर धरित्रीच्या कुशीतून जे चैतन्य ओसंडते त्याचे अतिशय प्रभावी दर्शन घडते. ‘येहेरीत दोन मोटा’ यातून कृषिजीवनाचे दर्शन तर घडतेच पण त्यातील दोन्हीमध्ये पाणी एक यातून कणा आणि चाक वेगळे असले तरी त्याची गती एकच आहे हे दिसून येते.

त्यांची कविता निसर्गाशी समरस होणारी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी आहे. तान्या सोपानाला झोपवून बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटू लागत आणि त्यातून ग्रामीण, कृषिजीवनाचे दर्शन घडविणारी कविता जन्माला येई. वाटेत दिसलेल्या वडाच्या झाडावर ‘हिरवे हिरवे पानं’ सारखी रचना सहज आकाराला येते. शेतातील कापणी, मळणी या शेतातील कामांबरोबरच मोठ्या, भाविक व कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबीत होताना दिसते. थोडक्यात बहिणाबाईंची कविता ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी कविता आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कृषिसंस्कृती यांचं अनोखं असणार नातं त्यांच्या कवितेत दिसून येते.

प्रश्न इ.
“मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाईनी कवितेतून माणसाचा मतलबीपणा आणि त्याच्या स्वार्थी वृत्तीचे वास्तव दर्शन घडविले आहे. बहिणाबाई आणि स्वार्थी वृत्तीची सर्वाधिक चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ ‘माणसा तुला नियत नाही रे’, माणसापेक्षा गोठ्यातील जनावर बरे, गाय न म्हैस चारा खाऊन दूध देतात. पण माणसाचे एकदा पोट भरले की माणस उपकार विसरून जातो. कुत्र्यामध्ये इमानीपणा आहे पण माणूस फक्त मतलबासाठी मान डोलावतो.

माणूस केवळ लोभामुळे माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला आहे. त्याची स्वार्थी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. माणस स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. मानवता आज संपुष्टात आली आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बहिणाबाई ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’? अशी आर्त हाक देतात, संत महात्म्यांनीही मानवतेच्या कल्याणासाठी तळमळ व्यक्त केली आहे. आज माणूस पशूसारखे वागतोय. माणसातला माणूस कधी जागा होतोय? हीच खरी आजची समस्या आहे. स्वार्थासाठी माणूस माणूसपण विसरत आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हे त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लेणं आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
एखादया शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. प्र. के. अत्रे यांच्यासारख्या मर्मज्ञ, प्रतिभावंताची बहिणाबाई चौधरी यांच्या गीतकाव्यासंबंधीची ही प्रतिक्रिया होय. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे प्र. के. अत्रे केवळ प्रस्तावनाकारच नव्हते तर ते प्रकाशकही होते.

प्र. के. अत्रे यांची लिहिलेली प्रस्तावना ही बहिणाबाईंच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख करून देणारी आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांची काव्यप्रतिभा आपल्या प्रस्तावनेतून उलगडून दाखवली आहे. बहिणाबाईंची ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेली समरसता, कृषिजीवनाचे संदर्भ हा त्यांच्या काव्याचा विषय. प्र. के. अत्रे यांनी बहिणाबाईंचे हे सूक्ष्म व अचूक निरीक्षण यांतील आत्मियता लीलया वर्णिली आहे. माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे वर्णन करणाऱ्या कवितेवर अत्रे यांनी प्रकाश टाकला आहे. अत्रे यांनी आपल्या प्रस्तावनेतून बहिणाबाईच्या अनेक कवितांचा अर्थ उलगडून दाखविला आहे.

बहिणाबाईंची कविता हे बावनकशी सोने आहे. ते महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी अत्रे यांनी स्वतः त्या कवितांचे प्रकाशन केले. अत्रे यांनी बहिणाबाईची काव्यप्रतिभा जाणून आपल्या प्रस्तावनेत बहिणाबाईंचे निसर्गप्रेम, कृषी, शेतकरी त्यांचे अपार कष्ट यांचे वर्णन केले आहे. बहिणाबाईच्या ‘संसार’, ‘स्त्रियांची दुःखे’, ‘माणसातला स्वार्थ’ या कवितांवर अतिशय मार्मिक असे भाष्य केले आहे. प्राणिमात्रांचा प्रामाणिकपणा आणि माणसांचा कृतघ्नपणा या बहिणाबाईंच्या कवितेतून अत्रे यांनी नेमकेपणाने त्यांतील भाव उलगडून दाखविला आहे.

अत्रे यांची प्रस्तावना ही अतिशय प्रतिभावंत साहित्यिकाची प्रस्तावना आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील तळमळ, माणसाच्या कल्याणाची आस शेतकरी व त्याचे अपार कष्ट या काव्य आशयाचा सुरेल परामर्श अत्रे यांनी घेतला आहे. थोडक्यात अत्रे यांच्या प्रस्तावनेने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला एक आगळी वेगळी झळाळी लाभली आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता ह्या निसर्ग, कृषिसंस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, मानवता, प्राणिमात्रांची कृतज्ञता या विषयांशी संबंधित आहेत, बहिणाबाई या अशिक्षित खेड्यातील स्त्री असूनही त्यांच्या काव्यातला जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. त्यांचे काव्य सरळ आणि सोज्वळ आहे.

बहिणाबाईंनी वहाडी, खानदेशी ग्रामीण, बोली भाषेत लिहिलेल्या कवितांना वेगळाच गोडवा आहे. बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. गावातील मंदिरे याच त्यांच्या शाळा असे असतानाही त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. बोली भाषेच्या जिव्हाळ्याने त्यांची कविता आपलीशी वाटते, वहाडी खानदेशी भाषेचे काव्याभिव्यक्तीचे सामर्थ्य फार उंचीचे आहे.

बहिणाबाईंच्या भाषेत जिव्हाळा आहे, तळमळ आहे. माणसाच्या उत्कर्षाची आस त्यांना लागली आहे. ग्रामीण भाषेमुळे, बोलीमुळे शेतकरी, निसर्ग, मानवता या आशयाशी एकरूप होणारी त्यांची कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते. बहिणाबाई काव्य करताना कुठेही अडखळत असलेल्या, शब्दांसाठी थांबलेल्या अशा दिसत नाहीत. ओघवते असे त्यांचे काव्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे म्हणून जे एक अनुभवविश्व होते. त्या अनुभवाची म्हणून जी भाषा होती ती त्यांना पूर्णत: परिचित होती, नव्हे त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांच्या कवितेच्या हातात भाषा हवी तशी वाकते, आकार घेते व अर्थाभिव्यक्ती साधते. या अर्थाने बहिणाबाई या भाषाप्रभूत्व ठरतात.

प्रश्न इ.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
अलिकडच्या काळात माणसातील माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस आज पशू होऊन एकमेकांशी झगडत आहे. पण पशू मात्र आपला इमानीपणा दाखवत आहे. माणूस हा स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला असताना आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील. पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते.

कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण मी अनुभवलेल्या एका प्रसंगातून आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे याचे दर्शन घडते. आमच्या कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग, एका गरीब विद्यायनि शैक्षणिक फी, वहया, पुस्तकांसाठी आणलेले पैसे त्याच्याकडून हरवले. तो विदयार्थी ढसाढसा रडत होता. कारण ते पैसे त्याच्या आई वडिलांनी मजुरी करून मिळवलेले होते. हे पैसे मिळाले नाहीत तर आपले शिक्षण थांबणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एका सेवकाला हे पैसे सापडले व त्याने ते त्या गरीब मलाला परत केले.

त्या गरीब मुलाला पैसे परत मिळण्याचा खूप आनंद झाला. खरं तर त्या सेवकाला सापडलेल्या पैशाच्या पाकीटाचा मोह झाला नाही. तीन महिन्यांच्या पगाराइतकी ती रक्कम असूनही तो मोह टाळून त्याने ते पैशाचे पाकीट परत केले. ही घटना माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचे दयोतक आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रकल्प.

प्रश्न 1.
‘बहिणाबाईंची गाणी’ मिळवून निवेदनासह काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करा.

प्रश्न 2.
तुमच्या परिसरातील ओव्या/लोकगीते मिळवून संग्रह करा.

11th Marathi Book Answers Chapter 5 परिमळ Additional Important Questions and Answers

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
बहिणाईच्या काव्याचा आविष्कार – [ ]
उत्तर :
बहिणाबाईंच्या काव्याचा आविष्कार – सुभाषितांचा

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 11
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 12

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 9
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 10

प्रश्न 2.
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा
……………………….
उत्तर :
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा एखादया बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

कोष्टक पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. शेतकरी जीवन ……….
  2. …………. तिला रात म्हणू नये
  3. इमानाला जो विसरला …………
  4. ……………. शेवटी रिकामेच होणार

उत्तर:

  1. शेतकरी जीवन → कष्टाचे
  2. भुकेल्या पोटी जी → तिला रात म्हणू नये माणसाला निजवते
  3. इमानाला जो विसरला → त्याला नेक म्हणू नये
  4. पोट कितीही भरले तरी → शेवटी रिकामेच होणार

स्वमत :

प्रश्न 1.
शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :
‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकात बहिणाबाई चौधरी यांनी कृषी, ग्रामीण जीवन, शेती आणि शेतकरी यांचे चित्रण केले आहे. बहिणाबाईंची कविता अस्सल शेती आणि शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारी आहे. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे. ऊन, वारा व पाऊस यांची तमा न बागळता शेतकरी रात्रंदिवस राबत असतो. सर्वसामान्य माणसे शेतकऱ्याच्या जीवावर दोन वेळा पोटभर जेवतात. शेतकरी शेतातच राबतो आणि त्याची माती शेतातच होते. शेतात पेरणी, कापणी व उफणणी या काळात शेतकरी राबराब राबतो.

त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते. पण जगाचा पोशिंदा असणारा हा भोळा, भाविक व कष्टाळू शेतकरी आयुष्यभर काळ्या आईची सेवा करतो. शेतकऱ्यांच्या संसाराची करुण कहाणी अनेक काव्यात दिसून येते. शेतकरी खळं करत असताना त्याला एक आस लागलेली असते ती म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला मोडलेला संसार पुन्हा उभा राहील पण तसे घडतेच असे नाही. निसर्गाचा लहरीपणा, कर्ज, हमीभाव पिकांवर पडणारी कीड या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे आणि त्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही ते आत्महत्या करतात. असे कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
‘कशाला काय म्हणू नाही’ या काव्यातील सुभाषितांचा अर्थ लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकात अनेक विषयांवरील काव्य आहे. मराठी वाड़मयात अमर होतील अशी अनेकात अनेक सुभाषिते आली आहेत. सुभाषितांचे एक शेतच पिकलेले आहे असे वाटते. ज्यातून कापूस येत नाही त्याला बॉड म्हणू नये, बोंडाची मुख्य अशी ओळख म्हणजे त्यातील कापूस नसेल तर त्या बोंडाला काय अर्थ उरणार? भुकेच्या पोटी माणसाला निजवते तिला रात कशी म्हणणार ? माणसाच्या पोटात अन्न नसेल तर त्याला झोप येणारच नाही, माणसाचा हात हा दानधर्मासाठी असतो असे म्हटले जाते.

इतरांना मदत, दान करताना तुमचा हात आखडत असेल, तुमचा स्वार्थ आडवा येत असेल तर त्या हाताचा काय उपयोग? इमानीपणा जर एखादा विसरत असेल तर त्याला नेक, प्रामाणिक कसे म्हणणार? तुम्ही नेक प्रामाणिक असाल तर तुमच्यात इमान असणारच, जन्मदात्या आई वडिलांची सेवा करणे हे मलाचे कर्तव्य आहे.

जर एखादा लेक जन्मदात्या आई वडिलांची सेवा न करता त्यांना त्रास देत असेल तर त्याला लेक म्हणता येणार नाही. भाव असेल तर भक्ती येईल. (मनी नाही भाव देवा मला पाव) या उक्तीप्रमाणे भावहीन भक्ती फळाला येत नाही. तुमच्यात उत्साह नसेल तर तुमची शक्ती निरर्थक आहे. कारण जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अशाप्रकारे वेगवेगळ्या सुभाषितांमधून बहिणाबाईंनी जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून दाखविले आहे. जे आजच्या काळातही लागू आहे.

स्वाध्यायासाठी कृती ‘चालू दे रे रगडनं तुझ्या पायाची पुन्याई’ या बहिणाबाईंच्या काव्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. वृक्षांची कृतज्ञता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बहिणाबाईचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. बहिणाबाईनी सांगितलेले मानवी जीवनाचे रहस्य शब्दबद्ध करा. शेतातील खळ्याचे बहिणाबाईंनी केलेले वर्णन स्पष्ट करा. ‘मन पाखरू पाखरू’ या ओळीतील भावसौंदर्य उलगडून दाखवा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

परिमळ Summary in Marathi

प्रस्तावनाः

नामवंत लेखक, कवी, नाटककार, चित्रपट कथालेखक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असणारे प्र.के.अत्रे यांनी ‘बहिणाबाईची गाणी’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेतून प्र.के.अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख करून देताना त्यांच्या कवितेतील ग्रामीण जीवन, कृषिजीवन यांचे संदर्भ उलगडून दाखविले आहेत. बहिणाबाईच्या कवितेतून माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवनाचे दर्शन घडते. त्यांच्या कवितेत खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवतो.

पाठाचा परिचय :

शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. एखादया शेतात मोहरांचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रा’सारखाच बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. बहिणाबाईंचे काव्य सरस आणि सोज्वळ आहे. असे काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि त्यातील मौज म्हणजे एका निरक्षर स्त्रीने रचलेले हे काव्य तोंडात बोट घालायला लावणारे, ‘जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे’ असे आहे.

सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. माजघरात सोन्याची खाण दडावी तसे यहिणाबाईंचे काव्य, खानदेशी वहाडी भाषेमधील अडाणी आईच्या ओव्यांचे महाराष्ट्र कौतुक करील की नाही म्हणून सोपानदेव चौधरी गप्प होते.

सोपानदेव चौधरी यांनी चतकोर चोपडीतून एक कविता प्र.के.अत्रे यांना वाचून दाखविली. या कवितेतून शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन केले आहे, त्या कविता म्हणजे बावनकशी सोने असून ते महाराष्ट्रासमोर यायला हवे या उद्देशाने प्र. के. अत्रे यांनी हे काव्य प्रसिद्ध करण्याचे ठरविले.

प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे, ते उपजतच असते. कोकिळ पक्ष्याच्या तोंडून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी सुगंध घेऊन येते तसे जातिवंत कवीचे आहे. सृष्टीतील सौंदर्य आणि जीवनातील संगीताशी ती कविता एकरूप होते. डोंगराच्या कपारीतून जसा झरा उचंबळतो तसे काव्य एकसारखे हदयातून उसळ्या घेते. यातूनच जगातील अमरकाव्ये जन्मास येतात.

बहिणाबाईची प्रतिभा वेगळीच, त्यात धरित्रीच्या कुशीत झोपलेले बियाणे कसे प्रकट होते याचे वर्णन येते. तारुण्यात सौभाग्य गमावलेल्या स्त्रीचे हृदयभेदक करुण काव्य हे असामान्य काव्याचे वैशिष्ट्य होय. सकाळी उठून बहिणाबाई जात्यावर बसल्या की ओठातून काव्य सांडू लागते. घरोट्यातून पाठ जसे बाहर पडत तसे बहिणाबाईच गाण पोटातून आठावर यत. स्वयपाकघरात चूल प म्हणत माझा जीव घेवू नकोस. संसाराची रहस्य उलगडताना त्यातील कष्टमय जीवनाचे चित्रण त्यांच्या काव्यात दिसून येते. तान्हुल्या सोपानाला शेतावर घेऊन जाताना वडाच्या झाडाचे आणि त्याच्या लाल फळाचे सुंदर चित्रण काव्यातून येते. वारा आणि थंडीची पर्वा न करणाऱ्या वारकऱ्याचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते.

ठणी व सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याची लगबग, कष्टमय जीवन हा त्यांच्या काव्याचा विषय. पण एवढाच त्यांच्या काव्याचा विषय नसून जीवनाकडे बघण्याचे स्पष्ट तत्त्वज्ञान हे त्यांच्यातील बुद्धिमान, तत्त्वज्ञानी, महाकवीची प्रतिभा असण्याची जाणीव होते.

त्यांच्या काव्यांचा आविष्कार सुभाषितांचा आणि आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. ‘कशाला काय म्हणू नाही’ या सुभाषितातून ‘ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंडू म्हणू नये’, ‘भुकेल्या पोटास निजवणारी रात्र नसते’. ‘दानासाठी आखडणारे ते हात नाहीत’, ‘इमानाला विसरणारा नेक नसतो’. ‘जन्मदात्यास भोवणारा लेक कसा’ ? ‘जिच्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये’. यातून त्यांची भाषा आणि विचारांची श्रीमंती दिसते.

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात ? मन हे पाखरासारखे आहे. एका क्षणात जमिनीवरून आभाळात जाणार असा भाषा आणि विचारांचा सुरेख मेळ त्यांच्या काव्यात दिसून येतो.

जीवनाचे खरे रहस्य शुद्ध प्रेमात आहे. स्वार्थात नाही. माणसाने मतलबी होऊ नये. भुकेल्या पोटाला अन्न मिळावे म्हणून पिके ऊन, वारा, पाऊस सहन करत शेतात उभी असतात. माणूस स्वार्थी असून खोटेनाटे व्यवहार करतो. बोरीबाभळी उपकाराच्या भावनेतून शेताला काटेरी कुंपण करतात. पोट कितीही खाल्ले तरी शेवटी रिकामे राहणार आणि शरीरसुद्धा एक दिवस निघून जाणार, जे शिल्लक राहते ते हदयाचं नातं, शुद्ध आणि निःस्वार्थी प्रेम यापेक्षा वेगळं काय असणार?
बहिणाबाईंना सर्वाधिक चीड कशाची असेल तर ती माणसाच्या कृतघ्नपणाची, माणसांना संतापून त्या म्हणतात, माणसाला नियत नाही.

माणसापेक्षा गोठ्यातील जनावरे बरी, ती चारा खाऊन दूध देतात. माणसे उपकार विसरून जातात. कुत्रा इमानीपणाने वागतो, लोभामुळे माणूस काणूस म्हणजे पशू झाला आहे. स्वार्थाचा वणवा आज सर्वत्र पसरला आहे. माणूसे पशू होऊन एकमेकांशी भांडत आहेत. मानवता नष्ट होत चालली आहे. ‘मानसा, मानसा कधी व्हशीन मानस!’ मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संतमहात्म्याच्या अंत:करणातन हीच सल बाहेर पडत आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हा प्रश्न मानवजातीपुढे आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईना होतो ही त्यांच्या प्रतिभा सामर्थ्याची खरी ओळख आहे.

बहिणाबाईची चुलत सासू ‘भिवराई’ या विनोदी व नकलाकार होत्या. नाव ठेवून नक्कल करता करता सर्वांना हसविण्याची त्यांची पद्धत म्हणजे हसवून शहाणे करणे हा हेतू. यातून बहिणाबाईंच्या विनोदात उपरोध, सहानुभूती आणि मायेचा ओलावा दिसतो, बहिणाबाईंचे काव्य रचना व भाषेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक असून प्रत्येक काव्यात एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. थोडक्यात एखादी भावना जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेले आहे. बहिणाबाईचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व केवळ अद्भुतच आहे.

बहिणाबाईंनी आपल्या काव्यात रस आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस होणार नाही अशा कौशल्याने सोपे व सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वहाडी भाषेने काव्याची लज्जत वाढविली आहे. ‘अशी कशी वेडी ग माये’, अशी कशी येळी माये, किंवा ‘पानी लौकीचं नित्तय त्याले अनीताची गोडी’. या भाषेत लडिवाळपणा भासतो.

मराठी मनास भुरळ घालील आणि स्तब्ध करून टाकील असे भाषेचे, विचारांचे आणि कल्पनेचे विलक्षण माधुर्य त्यांच्या काव्यात शिगोशीग भरलेले आहे. मानवतेला त्यांनी दिलेल्या ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’ ! हया अमर संदेशाने तर मराठी साहित्यामध्ये त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. परिमळ – सुगंध – (fragrance).
  2. प्रतिभा – काव्य निर्माण करण्याची असलेली उपजत क्षमता – (intelligence, imaginative power).
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात, येहेर – विहिर – (well).
  4. चतकोर चोपड़ी – वही किंवा पुस्तकाचा काही भाग – (notebook).
  5. मोट – जुन्या काळी विहिरीतून पाणी काढण्याचे चामड्याचे एक साधन.
  6. अधाशी – हावरटपणा, एखादी गोष्ट आपल्यालाच मिळावी हा हेतू – (greedy).
  7. बावनकशी सोने – अत्युत्तम खरे सोने.
  8. कृतघ्न – उपकाराची जाणीव नसलेला – (ungrateful).
  9. काणूस – पशू – (animal)
  10. लपे – लपणे – (hide).
  11. अहिराणी भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘य’ वापरतात.
  12. खेयता – खेळता.
  13. घरोटा – जातं.
  14. व्होट – ओठ – (lip).
  15. चुल्हया – चूल.
  16. फयं – फळ – (fruits).
  17. आभाय – आभाळ – (sky).

11th Marathi Digest भाग-१

Zhadanchya Manat Jau Class 11 Marathi Chapter 4 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 4 Exercise Question Answer Maharashtra Board

झाडांच्या मनात जाऊ 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Textbook Questions and Answers

कृती

1. अ. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न 1.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे –
(अ) पोपटी पानात जाण्यासाठी
(आ) उत्साहाने सळसळण्यासाठी
(इ) पानांचे विचार घेण्यासाठी.
उत्तर :
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे – पानांचे विचार घेण्यासाठी.

प्रश्न 2.
जन्माला अत्तर घालत म्हणजे –
(अ) दुसऱ्याला आनंद देत.
(आ) दुसऱ्याला उत्साही करत.
(इ) स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.
उत्तर :
जन्माला अलर घालत म्हणजे – स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

प्रश्न 3.
तो फाया कानी ठेवू ….. म्हणजे
(अ) सुंगधी वृत्ती जोपासू.
(आ) अत्तराचा स्प्रे मारू.
(इ) कानात अत्तर ठेव.
उत्तर :
तो फाया कानी ठेवू …. म्हणजे – सुंगधी वृत्ती जोपासू.

प्रश्न 4.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू …. म्हणजे
(अ) दारांना तोरणाने सजवू..
(आ) दाराला हलतेफुलते तोरण लावू.
(इ) निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
उत्तर :
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू…. म्हणजे – निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू,

प्रश्न 5.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू….. म्हणजे –
(अ) निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.
(आ) झाड होऊन फांदया पसरीन,
(इ) झाड होऊन सावली देईन.
उत्तर:
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले वाहू …. म्हणजे – निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.

आ. खालील कृतींतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 1
उत्तर:

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती सूचित होणारा अर्थ
1. कोकिळ होऊनी गाऊ समरसतेने जीवन जगू
2. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू जीवनाचा आनंद लुटू

2. अ. खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ ……….
उत्तर :
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ ……..
निसर्गाच्या कुशीत जाऊन त्यांचे विचार जाणण्याचा प्रयत्न करू, झाड हे मनुष्यरूपी प्रतिमा घेतली तर माणसांच्या मनात शिरून त्यांचे विचार ऐकू, जाणून घेऊ म्हणजे मतभेद कमी होतील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

प्रश्न 2.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू ……….
उत्तर :
हातात ऊन दुचमळते नि सूर्य लागतो पोहू ………
आपल्या ओंजळीत असणारे दुसऱ्याच्या हातात देताना मन कातर होतं आणि आपलं अंतरंग त्यात दिसू लागतं.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 2
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ 3

3. काव्यसौंदर्य

प्रश्न अ.
‘पोपटी स्पंदनासाठी, कोकिळ होऊन गाऊ’ या काव्यपंक्तींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांना झाड व्हायचे आहे. झाडांच्या मनात शिरून, पानांच्या मनातील विचार समजून घ्यायचे आहेत. हे म्हणजेच माणूस म्हणून जगताना दुसऱ्या (झाडाच्या) माणसाच्या मनात पोहोचून त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. हे पोपटी स्पंदनासाठी करायचे आहे. म्हणजे चांगल्या नात्यांसाठी हा हिरवेपणा जपायचा आहे. म्हणजे आयुष्याचे सुरेल गाणे गाता येऊ शकते. इथे पोपटी स्पंदन ही रंगप्रतिमा वापरली आहे.

प्रश्न आ.
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
ऊन आणि सावली हा निसर्गाचा प्रकाशखेळ असतो. वस्तूच्या ज्या बाजूने ऊन असते. त्याच्याविरुद्ध बाजूला त्या वस्तूची सावली पडत असते. झाडांच्या विविध आकाराच्या सावल्या आपल्याला दिसतात त्या त्यांच्यावर पडणाऱ्या ऊनामुळे. झाडांच्या पायापासून त्याची सावली दिसत असते. या कवीतेत कवी माणसाला झाड म्हणून संबोधतो. माणसालाही ऊन-सावली हे खेळ अनुभवायला लागतात. त्याच्या आयुष्यातील प्रखर प्रसंग, घटना उन्हासारखी दाहकता देतात. तर चांगल्या घटना सावलीसारखी माया, आसरा देतात. सावली जरी उन्हामुळे पडत असली तरी उन्हावरच ती स्वत:ची नक्षी कोरत असते. उन्हालाही शीतलता देण्याचा यत्न करते.

प्रश्न इ.
‘डोळ्यातं झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
उत्तर :
जल, वायू, पृथ्वी, आकाश, भूमी ही आपली पंचतत्त्वे आहेत. यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. यातील जलतत्त्व हे 70% ने व्यापलेले आहे. या जलाशिवाय जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आनंदाच्या वा अतीव दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात पाणीच व्यापून राहते. अन्यातील खळाळते पाणी तृष्णा भागवते पण तेच पाण्याचे रूप डोळ्यात दाटून आले की दुःखद भावना प्रकट करते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

4. अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
तुम्ही ‘झाडांच्या मनात शिरला आहात’ अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर :
सर्वांना विसावा, आधार देणाऱ्या झाडांच्या मनात मी शिरलो आणि मी मला मिळालेल्या मनुष्य जन्माची खंत करू लागलो. झाड कसं जन्माला येतं ते तुम्हालाही माहीत आहेच, बीजाला कोंब फुटले की त्याचा जन्म होतो. त्याच्या बाल्यावस्थेची ती अवस्था फार लोभसवाणी असते. अंकुरित झालेल्या बियाण्यांमधून ते नवीन जन्माला सुरुवात करत असते. तेव्हाच ते दोन्ही पाकळ्या मिटून बंदन करून जन्माला येते.

निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्याचा सदैव भाव असतो. माझे ‘मी’ पण त्याचे कधीच तो दाखवत नाही. निसर्गातीलच ऊन, वारा, पाकस यांच्यावर तो वाचत असतो. पाणी मिळवण्यासाठी त्याची मूळे खोलखोलवर जमिनीत शिरतात. पण हे पाणी मिळालं आहे त्या पाण्याचे उपकारही लक्षात ठेवतात, म्हणूनच झाडं जिथे जास्त तिथे पावसाचे प्रमाण जास्त असतं. निसर्गातील सर्वच घटकांबद्दल त्याच्या मनात आत्मीयता असते. विहार करणारे पक्षी, त्यांची घरटी, पिलावळ यांचे ते घर असते.

अनेकांना सामावून घेऊन इतरांना आनंद देत स्वतः आनंदी राहणं हे झाडापेक्षा दुसऱ्या कुणालाच कळलं नाही. आपल्यात जे जे आहे ते ते दुसऱ्याला दयावं ही किमया त्यालाच साधली आहे. वातावरणातील अशुद्धता आपल्यात घेऊन शुद्ध वातावरण ठेवताना त्याचाही कस लागतो पण विनातक्रार काम करताना ते दिसतं, आपला जन्मच इतरांसाठी आहे हे कधीही ते विसरत नाही म्हणून झाडं जे काही देतात त्यामुळे आपण परिपूर्ण होतो. आपल्या मानवाची झोळी मात्र दुबळी आहे.

प्रश्न आ.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
उत्तर :
निसर्ग ज्या पद्धतीने मानवाला सर्वकाही देत असतो त्याचे मोजमाप कधीच करता येणार नाही. मानवी जीवनच मुळी निसर्गातील पंचतत्त्वांवर आधारलेलं आहे. भूमी, वायू, जल, आकाश, अग्नी या पंचतत्त्वांशिवाय आपण अपूर्ण आहोत. मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर या पंचतत्त्वांचा वापर करून स्वत:चे जीवन सुखकर केलं पण तरीही तो परिपूर्ण होऊ शकला नाही.

कारण मुळातच तो परावलंबी आहे. पण त्याला हे अजून समजलेच नाही आहे. ज्या पृथ्वीवर. भमीवर आपण राहतो त्या भूमीवर जर पृथ्वीच्या पोटातील लाव्हारस बाहेर पडू लागला तर? अथवा सतत भूकंप होऊ लागले तर? मानव या पृथ्वीवर राहूच शकणार नाही. वाऱ्याचा वेग वाढला आणि त्याने वादळ निर्माण झाले तर मानव कुठेच स्थिर राहू शकणार नाही.

अग्नीरूपी, वणवा जर जंगलातून पेट घेऊ लागला, भूमीतून बाहेर ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर पडू लागला तर मानव असहाय्य होईल. पृथ्वीवर असलेले जलसाठे तसंच पाऊस यांनी भयंकर रूप धारण केले तर ….. मानवाचे अस्तित्व नष्ट होईल. आकाशातील सूर्य, चंद्र, तारे यांचे अस्तित्व नसेल तर दिवस-रात्र, ऋतू या सर्वांवरच परिणाम होईल. याच बरोबरीने जलचर, उभयचर, भूचर या चरांवरती प्राणी-पक्षीही महत्त्वाचे आहेत. निसर्गातूनच मानवाची सौंदर्यदृष्टी विकसित झाली. संगीत, रूपरस, गंध, स्पर्श यांचे ज्ञान निसर्गामधूनच मानवाला मिळाले आहे. म्हणून निसर्गातील प्रत्येक घटकांवर मानवी जीवन अवलंबून असलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

5. ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर:
कवी नलेश पाटील हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितेत निसर्ग, त्याच्या रंगरूपासह अवतरतो. निसर्गातील अनेक गोष्टी मानवाला केवळ आनंद देत असतात. त्याची देण्याची अमर्याद शक्ती आहे. निसर्गाच्या या शक्तीला आपण ओळखलं की आपण त्याच्याशी एकरूप होत जातो, कवी निसर्गाकडून अनेक गोष्टींचा आनंद घेत जगत आहे. झाडांच्या मनात जाऊ या कवितेत कवी या निसर्गातील अनेक गोष्टींचे वर्णन करून आपल्याला त्याच्या ताकदीचे दर्शन घडवत आहे.

झाडांच्या मनात जाऊन कवीला त्याच्या फांदयांवर असणारी पाने आहेत. त्यांच्या मनापर्यंत पोहोचवायचे आहे. झाडांचे असलेली पोपटी श्वास त्याला आपलेसे करायचेत आणि त्या झाडावर असलेल्या कोकिळेसारखे सुरेख सुरेल गाणे गायचे आहे. वसंतातील बहरामध्ये तो सावळ्या कोकिळेचा सूर ऐकत ऐकत मनाला रिझबू. वसंत ऋतूमध्ये झाडांना आलेला बहर हा विविध रंगांच्या फुलांचा आहे. त्या फुलांमधील सुगंध सर्वत्र पसरल्यामुळे मन आनंदी झालं आहे. नैसर्गिक फुलांचा गंध जणू काही आपल्या जन्माला अत्तर मिळालं आहे असं कवीला वाटतं. त्या कोकिळेच्या सरासोबत गाणं गात अत्तराचा फाया कानी ठेवन, आपले जगणे आनंदी करावे असं कवीला वाटते.

बागेत, रानात अनेक फुलपाखरे आहेत, त्याच्या पंखांवर विविध त-हेचे रंग आहेत, ते पाहून जणू काही ते निसर्गपंचमी खेळून आले आहेत असे कवीला वाटते. विविध फुलांवर बसलेली ही फुलपाखरे त्याचा रंग आपल्यावर धारण करतात की काय असं वाटू लागतं. त्या फुलपाखरांचा थवा सर्वत्र फिरताना दिसत आहे. हे तोरण रानावनात सर्वत्र भिरभिरत आहे. हे तोरण आपल्या दाराला लावण्याची तीव्र इच्छा कवीला होत आहे, त्या फुलपाखरांच्या पंखांना पताका ही उपमा फार सजगतेने वापरली आहे.

हा तर उत्सव आहे या पाखरांचा, त्या पाखरांच्या थव्याचे तोरण आपल्या दाराला लावावे म्हणजेच आपल्या दारीसुद्धा हा उत्सव साजरा व्हावा असं कवीला वाटत आहे. रानातील झरे निर्मळपणे वाहत आहेत. ते पाणी अश्रू बनूनही एखादयाच्या डोळ्यात उतरते. दोन्ही ठिकाणी पाण्याचीच रूपे आहेत. पण एक आहे ते निर्मळपणाने वाहत आहे. तर दुसरे पाणी कुणाच्या तरी करणीने डोळ्यात उतरले आहे. झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट ऐकून कवीला असं वाटतेय की हे पाणी आनंदाचे गीत गात आहे. अथवा देवाघरची गाणी गात आहे. या गाण्याच्या ऋतूमध्ये आपणही खळाळत वाहत जाऊ, कोणतेही पाश न ठेवता वाहत जाणं, प्रवाही होणं हे कवीला सुंदर वाटत आहे.

कवी हे खळाळते पाणी पाहून खुश होतो आणि अलगद त्याचे मन त्या पाण्यातील एका खडकावर जाऊन बसते. ही कल्पनाच किती संदर आहे. मन पाण्याचा भाग होऊन खडकावर जाऊन बसतं आणि मग जे पाणी खळाळते होते तेच पाणी थई थई नाचताना दिसते. हा कवीच्या तरल मनाचा आणखी एक अविष्कार दिसतो की सुरेल गाण्याची लकेर होऊन त्याचे मन पाण्यात बसते आणि मग ते पाणी नाचतानाही दिसते. त्या मनमुक्त नाचण्याचा आनंद घेत असताना एक तुषाराचे रोप म्हणजेच खडकांवर पडणारे पाणी कवीच्या अंगावर पडून स्वत:च्या मायेची पखरण करत आहे, त्याला न्हाऊ घालत आहे.

आदिमानवाच्या काळापासून आपण पंचमहाभूतांना प्रमाण मानून त्यांची पूजा करत आलो आहोत. हेच तत्त्व कवी कवितेत दाखवून म्हणत आहे आकाशतत्त्व मी ऑजळीत जरासे धरले. ते ही जरासे कारण आकाश विस्तीर्ण आहे ते ऑजळीत मावू शकणार नाही, आपली तेवढी कुवत नाही, पण या आकाशाला ओंजळीत धरून अवघ्या पाण्याला सूजनत्व देण्याकरता त्या पाण्याचीच ओटी आकाशाने भरली. ओटी भरणं हे सृजनशीलता आहे, ती ओटी भरताना आकाशातील ऊन हातात दुचमळते आणि सूर्य त्यात पोहायला लागतो, म्हणजे आकाशासमवेत त्याची ही बिंबसुद्धा त्या पाण्यासोबत विलीन होतात.

हे फांदीवरील पक्षी त्यांना बदलणारा ऋतू कळतो, बदललेली हवा कळते, सृष्टीतले सूक्ष्म बदल कळतात कारण ते हा हंगाम जगतात. ते स्या हंगामात खरे साक्षीदार आहेत. झाडांच्या बुंध्याशी जी सावली हलत असते ती इतकी जिंवत असते की जणू ती सावली आपल्या रूपातून स्वतःला नव्हे तर उन्हाला उजाळा देत असते. सावल्यांमधून दिसणारे ऊन हे सावलीत अभावाने दिसणारे ऊन नव्हे तर सावलीत मुद्दामहून काढलेली नक्षी आहे आणि झाडावर दिसणारे कावळे हे या काळ्या सावलीलाच सावलीचे काळे पंख फुटून तयार झालेले कावळे आहेत. कावळ्यांचा जन्म निर्माणाचा हा वेगळाच काव्यात्मक अनुबंध शोधला गेलाय. अशा रूपकांसाठीच नलेश पाटील लोकप्रिय होते.

निसर्गाच्या अस्तित्वाचे असे वेगळे विभ्रम ही कवी नलेश यांच्या कवितेची ओळख आहे. एका सच्चा चित्रकाराने निसर्गाकडे किती काव्यात्मक नजरेने पाहावे याचा वस्तुपाठ म्हणजे नलेश यांची कविता. कवी शेवटी म्हणतो की मानवी स्पर्श जिथे नसतील, फुलपाखरांची संगत लाभेल अशा रानात ईश्वर मला तू टाक, माझे बाहू पसरून मी झाड होऊन जगेन, माझे जगणे केवळ सृष्टीमय होऊन जाईल. मला स्वतःला बहर येईल, या शब्दांतील एकावेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा, शेवटच्या टप्यापर्यंत कमीत कमी शब्दांत पोहोचा.
उदा. सुंदर-घायाळ
सुंदर – आदर – आदळ – आयाळ – घायाळ

  • डोंगर – …… …… ….. अंबर
  • शारदा – ………………………….. पुराण
  • परात – …………… कानात
  • आदर – ………… पहाट
  • साखर – …………. नगर

उत्तर :

  • डोंगर – आगर – मगर – अंधार – अंबर
  • शारदा – वरदा – वरण – पुरण – पुराण
  • परात – वरात – रानात – नादात – कानात
  • आदर – पदर – पहार – रहाट – पहाट
  • साखर – खजूर – मजूर – मगर – नगर

11th Marathi Book Answers Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ Additional Important Questions and Answers

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. फाया ठेवण्याची जागा –
  2. हा पक्षी होऊन गायचे आहे –
  3. रंगपंचमी खेळून हे भिजले –
  4. तोरण लावण्याची जागा –

उत्तर:

  1. कान
  2. कोकिळ
  3. फुलपाखरू
  4. दार

योग्य पर्याय निवडा.

प्रश्न 1.

  1. बहरात वसंतमधल्या तो सूर (सावळा / बावळा / कावळा) ऐकत.
  2. हा थवा असे (रंगीत / संगीत / मनगीत / पताकाच फिरणारी.
  3. हे उधाण (दुःखाचे / भीतीचे / आनंदाचे) ही देवाघरची गाणी.

उत्तर :

  1. सावळा
  2. रंगीत
  3. आनंदाचे

अभिव्यक्ती :

प्रश्न 1.
खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
या ओळीतील आशयसौन्दर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांच्या ‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेत कवी निसर्गापासून माणूस कसा आनंद घेऊ शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फुलपाखरे ही निसर्गाचाच भाग, किती विविधतेने नटलेली असतात, अनेक रंग त्यांच्या पंखावर असतात. अल्प आयुष्य जरी असले तरी ते भिरभिरत जगताना दिसतात, कवी त्याच्या सौंदर्याकडे आकृष्ट होतो. त्याला वाटते की निसर्ग किंती वेगळ्या शता भिरभिम लागला की जण पताकाच फिरत आहेत असे वाटते. निसर्गाची विविध रंगरूपे असतात, त्यांना समजून घेऊन आयुष्याची संदर रंगपंचमी खेळता येऊ शकते. त्याकरता माणसाला समजन घेणं महत्त्वाचे आहे.

प्रश्न 2.
निसर्गातील एखादया घटकाकडून तुम्हांला शिकायला मिळाले त्या घटकाबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
कवी नलेश पाटील यांच्या कवितेची शिकवण पाहता पाहता मी निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागलो. मला निसर्ग आवडतो. तो भरभरून आपल्याला देत असतो. त्यातल्या त्यात मी पृथ्वीकडून किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे पाहू लागलो. आपल्या अखंड मानव जातीचा भार ती उचलत आहे. मानवाने किती प्रगती केली, आदिमानवापासून ते आतापर्यंत त्याने केलेली प्रगती ही केवळ पृथ्वीच्या सहनशक्तीमुळे झालेली आहे असं मला वाटतं, इतक्या इमारती, इतकी वाहतूक त्याकरता पृथ्वीच्या गर्भाशयावर आपण सतत हल्ले करत असतो. तरी ती आपल्याला माफ करते. झीज सोसत राहते.

अनेकदा तिला आपण अस्वच्छ करत असतो तरी ती मूकपणे सारे सहन करते. तिचे स्वच्छता अभियान सुरू करतो. पण ते सुद्धा नीट पाळत नाही. तीन उन्हामुळे जमिनीची लाही लाही होते. ते आपण सहन करू शकत नाही पण पृथ्वी त्यालाही सामोरी जाते, तिच्या मनात खदखदणारा ज्वालामुखी सहन करत ती संयम ठेवून आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. ती अनेक गोष्टी आपल्या पोटात घेऊ शकते. ती सर्वांचा आधार असते. आपण तिच्यासाठी नेहमी कृतज्ञता बाळगायला हवी असे मला वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

झाडांच्या मनात जाऊ Summary in Marathi

प्रस्तावनाः

पालघर येथे जन्माला आलेले कवी नलेश पाटील हे इंग्रजी माध्यमात शिकूनही त्यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. मुंबईतील जे. जे. । इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये त्यांचे शिक्षण झाले. ‘कवितेच्या गावा जावे’ या कवितेच्या कार्यक्रमात त्यांची विशेष ओळख समाजमानसात तयार झाली. ‘टूरदूर’, ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीत रचना केली. ‘हिरवं भान’ हा त्यांचा कवितासंग्रह, ‘नक्षत्रांचे देणे’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातही त्यांच्या कविता गायल्या गेल्या.

गावात बालपण गेलेले त्यात नंतरच्या काळात रंगांची मिळालेली सोबत यांमुळे निसर्गाच्या विविध रंगप्रतिमा त्यांच्या काव्यात सापडतात. शब्द, लय, नाद, अर्थ यांचा विविधांगी प्रयोग त्यांनी आपल्या काव्यात केला. शब्दांतून चित्रमय मांडणी करणे यात त्यांचा हातखंडा आहे.

कवितेचा आशय:

निसर्ग आणि आपण एकमेकांशी इतके जोडले गेलो आहोत की एकमेकांपासून आपली ताटातूट होऊ शकत नाही. निसर्ग आपल्यावर अवलंबून नाही पण आपण मात्र क्षणाक्षणाला निसर्गावर अवलंबून आहोत. मानवाने स्वत:ची उत्क्रांती केली ती निसर्ग शिक्षणातूनच. हे नैसर्गिक शिक्षण त्याला त्याच्या संवेदनांपर्यंत पोहोचवतं. त्याच्या मनाला, विचारांना चालना देतं. कवीला या निसर्गाची नितांत ओढ आहे. त्याच्या प्रत्येक सोहळ्याशी तादात्म्य होण्याची उत्सुकता आहे. म्हणून निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन कवी या कवितेतून रेखाटतो.

त्याला वाटते झाडांच्या मनात जाऊन त्यांच्यावरील पानांचे विचार व्हावे. झाडांनाही मन असते. ते त्याच्या पानरूपी कृतीतून तो प्रकट करतो असं त्याला वाटतं. या झाडाचा पोपटी रंग आपल्या श्वासात उतरावा याकरता त्याला त्याच्या श्वासात उतरावे असे वाटते. त्यासाठी आपण कोकिळ व्हावं असं त्याला वाटते, वसंतरूपी बहर आला की कोकिळ गाऊ लागतो. तो निसर्गाचेच जणू गीत गातो. आपल्याला सुद्धा निसर्गगीत गायचे असेल तर कोकिळ व्हावे लागेल.

वसंतातील बहर फुलत जातो. सावळ्या रंगाचा कोकिळ त्याचा सूर लावत जातो. वसंतात अनंत फुले फुलून येतात त्या फुलांचा गंध सर्वत्र पसरत जातो. अनेक जन्मांना त्यांचे अत्तर पुनरुज्जीवन देत असते. या पाखरांच्या, रानाच्या सुराबरोबर आपण त्या सुगंधी अत्तराचा फाया कानामध्ये ठेवू. त्यामुळे आपलेही जगणे सुगंधी, सुरेल होईल.

बागेत, रानात फिरणारी भिरभिरणारी फुलपाखरे पाहून कवीला वाटते की ही फुलपाखरे जणू काही रंगपंचमीच खेळून बाहेर पडली आहेत. या फुलपाखरांचे विविध रंग कवीला आकषून घेतात. या फुलपाखरांचा थवा उडत असताना त्यांच्या भिरभिरत्या पंखांमुळे या हलणाऱ्या पताकाच आहेत असे कवीला वाटते. हे छान रंगीबेरंगी तोरण दाराला आणून लावावे असा मोह कवीला फुलपाखरांच्या रंगांकडे पाहून होतो.

रानातील झरे निर्मळपणे वाहत असतात, त्यांच्या वाहण्यातच संगीत असतं. हे झरे जणू काही परमेश्वराचे डोळे आहेत असं कवीला वाटतं. या डोळ्यात झऱ्याचे पाणी भरभरून वाहत आहे. हा आनंद आहे की देवाने आपल्याकरता पाठवलेली गाणी आहेत असा प्रश्न कवीला पडतो. या झयाच्या गाण्याच्या ऋतूत आपणही खळाळत जाऊ, या प्रवाहात एकरूप होऊ आणि पाण्यासारखे निर्मळ राहू असं कवीला वाटतं.

पाण्याशी एकरूप होताना कवीचं मन तिथल्याच एका खडकावर बसून जातं. आजूबाजूला असणारी कारंजी मनसोक्तपणे थुईथुई करत आनंद घेताना दिसतात. यातील हे कारंज्याचे रोप कवीवर आपले तृषार उडवून त्याला न्हाऊ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या निसर्गाशी एकरूप होता होता कवी अलगद आपल्या ओंजळीमध्ये आकाश धरू पाहतो. या आकाशाला ओंजळीत घेऊन कवी अवघ्या पाण्याची ओटी भरतो तर हातात ऊन येऊन बसते, डुचमळते आणि त्या पाणभरल्या ओंजळीत सूर्याचे प्रतिबिंब पोहायला लागते. असा पाणी, प्रकाशाचा खेळ निसर्गात राहूनच अनुभवता येतो.

निसर्गातील विविध रंगांचे पक्षी तरी किती? या पक्ष्यांचासुद्धा हंगाम असतो. त्या हंगामात ते ते पक्षी आपल्याला दर्शन देतात. हे पक्षी झाडांवर रमतात. त्याच्या बुंध्यात, खोडात आपले अस्तित्व दाखवतात. झाडांच्या सावल्या इतरत्र पसरलेल्या पाहन त्या उन्हावर जण नक्षी काढत आहेत. असं कवीला वाटतं. मग या झाडांवर बसलेले काऊ, चिऊ उडू लागले की ते सावलीतुनहीं प्रकट होतात, दिसू लागतात ते पाहून कवीला वाटतं की या सावल्यांनाच जणू पंख फुटले आहेत. या सुंदर निसर्गात रमता रमता कवीला वाटतं की जिथे मानवी स्पर्श होणार नाही, खूप फुलपाखरं जिथं असतील अशा रानात हे परमेश्वरा मला झाड बनून जन्माला घाल, तिथे मी माझे बाहू पसरून बसेन आणि या सृष्टीचा एक भाग होऊन त्यासवे जगण्याचे गीत गाईन.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  • स्पंदन – श्वास – (breathing, breath).
  • फाया – अत्तर लावलेला कापसाचा बोळा, अत्तराचा अंश – (fragrant, essence).
  • पताका – ध्याना – (lag).
  • करणी – कृत्य, कृती, क्रिया – (act).
  • तुषार – पाण्याचे फवारे (spray of water) – कारंजाचे पाणी.
  • डुचमळते – हलते.
  • खडक – दगड – (hard stone / rock).
  • नक्षी – वेलबुट्टी – (design, decoration).

11th Marathi Digest भाग-१

Ashi Pustak Class 11 Marathi Chapter 3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 3 अशी पुस्तकं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 3 Exercise Question Answer Maharashtra Board

अशी पुस्तकं 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 3 अशी पुस्तकं Textbook Questions and Answers

कृती

1. अ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 1
उत्तर :

‘पुस्तकरूपी’ मित्र ‘मानवी’ मित्र
उत्तेजक, आनंददायी मित्र दुरावतात.
प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणारं मित्रांना कधी कधी प्रेमाची विस्मृती होते.
विशाल अंत:करण, निःस्वार्थीपणा वैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात.
उत्कट अनुभूती देणारे विश्वासघातकी असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

आ. कारणे लिहा.

प्रश्न अ.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….
उत्तर :
लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.

प्रश्न आ.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …
उत्तर :
पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.

प्रश्न इ.
रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..
उत्तर :
रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 5

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 6

2. अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे
उत्तर :
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न आ.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे .
उत्तर :
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.

3. व्याकरण :

अ. सूचनेनुसार सोडवा.

प्रश्न 1.
‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..
उत्तर :
धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार

प्रश्न 2.
जसे विफलताचे वैफल्य, तसे –
अ. सफलता → ……….
आ. कुशलता → ……….
इ. निपुणता → ……….
उत्तर :
अ. सफलता → साफल्य
आ. कुशलता → कौशल्य
इ. निपुणता → नैपुण्य

आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’

प्रश्न आ.
शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
……… ……….. ……… ……….. ………..
उत्तर:
प्रोत्साहक, मारक, प्रायोजक, आयोजक, समन्वयक

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

इ. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.

प्रश्न 1.
या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 4
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 7

4. स्वमत :

प्रश्न अ.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
उत्तर:
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे लेखक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असे सांगितले आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना वैचारिक साहित्य हे मानवी मनाला नेहमी प्रेरणा देते असा व्यापक दृष्टिकोन लेखकाने येथे व्यक्त केला आहे. वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. माणसाला जगण्याचे बळ देतात. मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण कसं असावं हे पुस्तकं सांगतात.

वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते.

प्रश्न आ.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
‘अशी पुस्तक’ या पाठातून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले आहे. पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. पुस्तके ही माणसाची जगण्याची हिंमत वाढवतात. प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात.

जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात.

लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न इ.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
क्रूर नियती व दुर्बल परंतु महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यामध्ये कधीही न संपणारे युद्ध वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. जीवन एक संघर्ष आहे. नियती क्रूर आहे असं आपण अनेकवेळा म्हणतो ते अगदी खरं आहे. आज जगण्या-मरण्याचा खेळ अखंड चाललेला आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मरणाच्या, संकटाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळ टाकलं तरी ते आपण तोडून, फेकून दयायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.

परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे.

अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठातून लेखक डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असुन उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. अशी व्यापक भूमिका मांडली आहे. महात्मा गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगो आणि मून्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं ‘संत तुकारामांचे अभंग’, ‘संस्कृत महाकवी’ कालिदासाचे मेघदूत, टॉलस्टॉपची ‘अॅना करनिना,’ जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा, हेमिंग्वेचं ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ अशा विविध प्रकारांच्या रसमय साहित्याशी माणसाचे नाते जोडले जाते. उत्तम साहित्य वाचनाने माणसांचा एकाकीपणा दूर होतो.

पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न आ.
निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी पुस्तकांचे महत्त्व वर्णन करण्याबरोबर पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोनही सांगितला आहे. लेखकाच्या मते जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. पुस्तकांवर उदंड प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तकं देताना चिंतीत होतात.

पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.

 

शब्दसंपत्ती :

पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

प्रश्न अ.
पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे : ………..
उत्तर:
पाक्षिक

प्रश्न आ.
ज्याला एकही शत्रू नाही असा : ………
उत्तर:
अजातशत्रु

प्रश्न इ.
मंदिराचा आतील भाग : ……….
उत्तर:
गाभारा

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न ई.
गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा : ………….
उत्तर:
आजानुबाहु

प्रश्न उ.
केलेले उपकार न जाणणारा : ……….
उत्तर:
कृतघ्न

प्रकल्प.

प्रश्न 1.
जी. ए. कुलकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य वाङ्मय कोशातून शोधून लिहा.

11th Marathi Book Answers Chapter 3 अशी पुस्तकं Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 8
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 10
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 11

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 12
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 13

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 14
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 15

परिणाम लिहा.

प्रश्न 1
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं 16
उत्तर :
पुस्तकांना स्पर्श केला की आपले अंत:करण विचारांनी आणि भावनांनी ओसंडून जाते.

उपयोजित कृती

खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
‘काळजीपूर्वक’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • काळ
  • पूर्व
  • कळ
  • काक

प्रश्न आ.
‘अंतरंग’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • अंत
  • रंग
  • तरंग
  • गत

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न इ.
‘विश्वासघातकी’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
उत्तर :

  • विश्वास
  • श्वास
  • घात
  • घास

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

प्रश्न 1.
आत्यंतिक प्रेम करणारी माणस मी पाहिली आहेत.
उत्तर :
आत्यंतिक.

खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
वैर – शत्रुत्व, क्रूर, अपमान, विरस
उत्तर :
शत्रुत्व.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

प्रश्न 1.
अंतरंग, मन, चित्त, अर्थ
उत्तर :
अर्थ

प्रश्न 2.
विस्मृती, विसर, विस्मरण, स्मरण
उत्तर :
स्मरण

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

स्वमत :

प्रश्न 1.
माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.
उत्तर :
‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती जुनी असली तरी त्या उक्तीचे महत्त्व आताच्या जमान्यातही तसूभर कमी झालेले नाही. कारण माणसाचा सर्वागीण विकास होण्यासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यांची विचारप्रवृत्ती वाढते. आकलन व स्मरणशक्ती दोन्हीचा विकास होतो.

आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात.

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते.

संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

प्रश्न 2.
‘माझी पुस्तक हीच माझी अपत्यं’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगितले आहे. पुस्तके ही माणसाला जन्मभर सोबत करतात. एका ग्रंथप्रेमी वाचकाने ‘माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं आहेत’ अशी प्रतिक्रिया लेखकाजवळ व्यक्त केली. ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर अतिशय प्रेम होते. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांना त्याने जिवापाड सांभाळले होते. आपण आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यांचा सांभाळ करतो.

त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो.

तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं.

स्वाध्यायासाठी कृती

  • तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकाविषयी तुमचे मत मांडा.
  • ‘वाचाल तर वाचाल’ याविषयी तुमचे विचार व्यक्त करा.
  • ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक’ यातील व्यापक दृष्टिकोन तुमच्या शब्दात व्यक्त करा.
  • तुम्हाला आवडलेल्या एखादया पुस्तकाविषयी 10 ते 12 ओळीत माहिती लिहा.

अशी पुस्तकं Summary in Marathi

प्रस्तावना :

मराठी संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संपादक व वक्ते म्हणून डॉ. निर्मलकुमार फडके प्रसिद्ध आहेत. ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची ‘आस्वाद समीक्षा’ साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ अशी ही विविध साहित्यसंपदा आहे.

‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा संतसाहित्य हा विशेष आस्थेचा विषय होता.

‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकातून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग दिसून येतो. या त्यांच्या साहित्य सेवेबद्दल ‘भैरू रतन दमाणी’ या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गंभीरता, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे त्यांच्या साहित्याचे लेखनविशेष आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

पाठाचा परिचय :

माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका प्रस्तुत पाठात मांडली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवून प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार व्यक्त करताना लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे.

पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात, पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आपल्याला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात ती हृदयाच्या कण्यात जपून ठेवायला हवी. मनाची सुदृढ आणि सशक्त वाढ होण्यासाठी पुस्तके वाचावीत. आपल्या जीवनप्रवासात पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. ग्रंथ हे गुरु आहेत हा विचार या पाठात अधोरेखित झाला आहे.

पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तके कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीही नाही. यावरून लेखकांचे ग्रंथप्रेम दिसून येते.

लेखकांने एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून एक पुस्तक आणले होते. ते पुस्तक देताना या ग्रंथप्रेमीने लेखकाला “अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसयांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, बरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा.” अशा सूचना दिल्या. त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण त्या अटी खरोखरच अत्यंत सयुक्तिक होत्या, कारण ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तकाला स्वत:ची अपत्ये समजतात. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य प्राप्त करून देतात. मनातल्या अंधाराला स्वप्नं दाखवून मनाला ताजे आणि टवटवीत करतात.

उदा. ‘मेघदूत-कालिदास’, ‘टॉलस्टॉयची अॅना कॅरेनिना’ ही कादंबरी, गांधीजींचे आत्मचरित्र, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे अभंग इत्यादी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अण्ड द सी’ कादंबरीतील एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात पोटात अन्नाचा कण नसताना आपली होडी ढकलतो, देवमाशाला जिंकण्याचे धाडस ठेवून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल सागराच्या आत जातो.

त्याच्यात लाटांबरोबर झुजण्याची जिद्द, कणखर आशावाद, आकांक्षा, हटवादी मन, विजयोन्माद असतो. या कादंबरीतून निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजय प्राप्त करणार आहे असे हेमिंग्वेला सुचवायचं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून नव्या प्रेरणा वाचकाला मिळतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. उत्तेजक – हुरूप आणणारे, प्रोत्साहक – (stimulant)
  2. कोळी – मासेमारी करून निर्वाह करणारा – (a fisherman)
  3. वज़ – इंद्राचे आयुध – (thunderbolt)
  4. विमनस्क – उद्विग्न, खिन्न, गोंधळलेला – (depressed)
  5. प्रेरणा – स्फूर्ती – (inspiration)
  6. विजय – यश – ( victory)
  7. मूर्खहस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम् – पुस्तक म्हणते मला मुर्खाच्या हाती देऊ नका
  8. साहित्य – ग्रंथसंपदा – (literature)
  9. तेज – प्रकाश – (light)
  10. प्रारब्ध / नियती – नशीब – (destiny)
  11. होडी – नाव – (boat)
  12. अपत्य – मुले – (an offspring, child)
  13. माणुसकी – मानवता – (huminity)
  14. शिकार – पारध – (hunt)
  15. किमया – जादू – (magic)
  16. बंडखोर – क्रांतिकारी – (rehel)

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. दुधाने तोंड पोळल्यामुळे ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
  2. खिळवून ठेवणे – मन गुंतवून ठेवणे.
  3. आरोळी ठोकणे – मोठ्याने हाक मारणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं

टिपा :

  1. शेक्सपिअर – सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार, मॅकवेध, किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध नाटके.
  2. अर्नेस्ट हेमिंग्वे – अमेरिकन साहित्यिक.
  3. व्हिक्टर हयूगो – फ्रेंच कवी, लेखक व नाटककार,
  4. मुन्शी प्रेमचंद – थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार.
  5. लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक.
  6. कवी कालिदास – संस्कृत महाकवी यांची मेघदूत व शाकुंतल नाटके प्रसिद्ध.
  7. जी.ए. कुलकर्णी – एक आधुनिक श्रेष्ठ कथालेखक.

11th Marathi Digest भाग-१

Pransai Class 11 Marathi Chapter 2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 2 प्राणसई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 2 Exercise Question Answer Maharashtra Board

प्राणसई 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 2 प्राणसई Textbook Questions and Answers

कृती

1. अ. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – [ ]
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – [ ]
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – [ ]
  4. शेतात रमणारी व्यक्ती – [ ]

उत्तर :

  1. कवयित्रीने जिला विनंती केली ती – प्राणसई
  2. कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा – राक्षसी
  3. कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी – पाखरे.
  4. शेतात रमणारी व्यक्ती – सखा.

आ. कारणे लिहा :

प्रश्न 1.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत;
उत्तर :
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
बाळांची तोंडे कोमेजली;
उत्तर :
बाळांची तोंडे कोमेजली; कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत.

इ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 2

2. अ. खालील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
विहिरीच्या तळीं खोल दिसू लागलें ग भिंग :
उत्तर :
कडाक्याच्या उन्हामुळे भूमी करपून गेली, नदया, विहिरीदेखील आटून गेल्या. विहिरीच्या तळाला अगदी कमी पाणी राहिल्यामुळे ते अगदी भिंगासारखे दिसू लागले आहे. भिंगाचा वापर केल्यावर कोणतीही छोटी गोष्ट मोठी दिसू लागते. इथे पाणी विहिरीच्या तळाशी गेले यावरून पाण्याची समस्या किती मोठं रूप धारण करणार आहे याची जाणीव कवयित्री व्यक्त करते.

प्रश्न 2.
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
उत्तर :
पाऊस न आल्यामुळे सगळं वातावरण बिघडून गेले आहे. वातावरण तप्त झालेले आहे, म्हणून कवयित्री आपल्या प्राणसईला मैत्रीखातर बोलावत आहे. या प्राणसईने दौडत धावत आपल्या शेतावर यावं असं वाटतं. शेतात धान्याची बीज पेरलेली आहेत त्यांना वेळेवर पाणी मिळालं नाही तर ती सुकून जातील, शेतातील पिकावरच अवघं जग जगत असते. म्हणून कवयित्री आपल्या शेतावर येण्याचं निमंत्रण पावसाच्या सरींना देते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं:
उत्तर:
प्राणसई असलेल्या पावसाच्या सरींनी भूमीवरच्या सर्वांना भेटायला यावे असे कवयित्रीला वाटते. ती यावी याकरता ती पाखरांसवे प्राणसई पावसाला निरोप पाठवत आहे. त्या पावसाच्या सरींनी गार वाऱ्यासवे झुलत झुलत आपल्या समवेत यावे असे कवयित्रीला वाटते. त्या पावसाच्या सरींनी आपले घरही चिंब भिजावे असं मनोमन तिला वाटते.

आ. खालील तक्त्यात सुचवल्याप्रमाणे कवितेच्या ओळी लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 3
उत्तर :

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी
ये गये ग घनावळी मैत्रपणा आठवून …… प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून ? मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग ? शेला हिरवा पांघरमालकांच्या स्वप्नांवर

3. काव्यसौंदर्य

अ. खालील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कांग अशी पाठमोरी?
वाऱ्यावरून भरारी.
ये ग ये ग प्राणसई’
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत या पावसाच्या सरींना घनावळींना आपली मैत्रीण मानतात. या मैत्रिणीने आता फार विसावा घेतला. तिच्या भेटीची आतुरता कवयित्रीला लागून राहिली आहे. पण ही हट्टी घनावळी मात्र पाखरांसवे निरोप पाठवून, विनवणी करूनही येत नाही, त्यामुळे कवयित्रीचा जीव कासावीस होतो. शेतात बैल काम करेनासे झाले आहेत, तान्हुल्या बाळांचे चेहरे उन्हाच्या झळांमुळे सुकून गेले आहेत.

नदीचे, विहिरीचे पाणी आटू लागले आहे. अशी जीवघेणी परिस्थिती पाऊस वेळेवर न आल्यामुळे झाली आहे. जर हा पाऊस आपला सखा आहे असं आपण म्हणतो, जर ती सखी आहे असं कवयित्रीला वाटतं तर तिनं फार आढेवेढे न घेता आपल्या सख्यांना भेटायला यायला हवे. तिच्यावर अवधी सृष्टी अवलंबून आहे. त्यांचे प्राण कंठाशी येईपर्यंत तिने वाट पाहू नये. त्यामुळे कवयित्रीला वाटतेय की या प्राणसईने वाकडेपणा सोडावा, राग, रुसवा सोडावा. पाठमोरी होकन राग रुसवा धरून मनं व्याकूळ करण्यापेक्षा वायसवे धावत ये. सगळ्यांना चिंब कर. इतरांना सुख देण्यातच आनंद असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 2.
‘शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नावर’.
उत्तर :
प्राणसईने या वर्षी भेटीसाठी विलंब केल्यामुळे सगळेचजण हवालदिल झाले आहेत. जमीनही तप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली कर्तव्ये पूर्ण केली आहेत. कवयित्रीचा सखाही शेतकरी आहे. प्राणसई धावून आली की संपर्ण शेत हिरवेपणाने भरून जाईल. हिरवेपणाचा शेला (शाल) धरतीवर पांघरला जाईल. अवधी सृष्टी चैतन्यमय होईल. तिचं सोबत असणं गरजेचं आहे. मालकाची स्वप्नंही तिच्यावर अवलंबन आहेत. ही घनावळी आली की पिके जोमानं वाढतील. घरीदारी आनंद निर्माण होईल. आपल्या घरात, देशात आपल्या कष्टामुळे आनंद मिळावा हे मालकाचं स्वप्नं पूर्ण होईल.

आ. कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पीठ कांडते राक्षसी –
उत्तर :
उन्हामुळे सगळीकडे तप्त झालेले वातावरण (राक्षसी) प्रतीक

प्रश्न 2.
बैल झाले ठाणबंदी
उत्तर:
उन्हाची तीव्रता अधिक झाल्यामुळे बैलही काम करेनासे झाले. (ठाणबंदी) प्रतीक

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न 3.
तोंडे कोमेली बाळांची
उत्तर:
उन्हाच्या झळांमुळे बाळांची तोंडे कोमेजली आहेत. (कोमेली) प्रतीक,

इ. कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.

प्रश्न 1.
कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत यांची प्राणसई घनावळी आहे म्हणजे पावसाच्या सरी आहेत. ही घनावळी कवयित्रीची प्राणसखीच आहे. तिच्या भेटीसाठी कवयित्री आतुर झालेली आहे. कवयित्रीने अगदी हक्काने तिला भेटण्यासाठी आमंत्रणं पाठवली आहेत. प्राणसई कुठे तरी गुंतून राहिली याबाबत कवयित्री काळजी व्यक्त करते.

पाखरांच्या हाती तिने या घनावळीला निरोप पाठवला आहे. आपला मैत्रपणा आठवून तिनं दौडत यावं असं कवयित्रीला वाटत आहे. ती आल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही असंही ती म्हणते. आपल्या या सखीने येऊन शेत, घरं, दारं यांना चिंब भिजवावं असं हक्काने सांगते असा हक्क मैत्रीतच दाखवता येतो. ही सखी आल्यानंतर तिने कितीही आढेवेढे घेतले तरी कवयित्री तिला समजावून सांगणार आहे की तिचे येणे या भूतलावर किती महत्त्वाचे आहे ते. तिच्याशी गप्पा मारून आपल्या सख्याचे कौतुक ती सांगणार आहे.

4. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
उत्तर :
मी मुंबईतील एका चाळीत राहतो. मार्च ते मे महिन्याचा कालावधी मुंबईकरांच्या दृष्टीने त्रासदायक असतो. मार्चपासून जो तीव्र उन्हाळा सुरू होतो तो जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुभवतो. उन्हामुळे जीवाची काहिली होते त्यात वीजपुरवठा मधून मधून जात असतो. काही विभागात तर पाणीपुरवठाही कमी असतो. दोन दिवसाआड पाणी आले की ते पाणी भरण्यासाठी माणसांची झुंबड उडते. घामाच्या धारा इतक्या वाहू लागतात की घरात ए.सी., पंखा लावून शांत बसावं असं वाटतं. याच काळात परीक्षा असतात. विदयाथ्यांचे वीज नसल्यामुळे हाल होतात. इथल्या वातावरणाला कंटाळून गावालाही जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्रश्न आ.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
उत्तर :
उन्हाळ्यामुळे वैतागून गेलेला जीव पावसाची आतुरतेने वाट पहात असतो. पावसाच्या आधी महानगरपालिकेने साफसफाईची धोरणं आखून काम केलेलं असत, आमच्या विभागात आम्ही नागरिक चाळीची कौलं, घरांची छप्परं यांची दुरुस्ती करून घेतो. पाऊस आल्यानंतर सुखद गारवा सगळीकडे पसरतो, ओलीचिंब झालेली धरणी, त्यावर चढू लागलेली हिरवळ मनाला आनंद देते. जोरजोरात पाऊस पडताना कौलांतून गळणारे पाणी अडवण्यासाठी आमची जाम धावपळ होते. कधीकधी आमच्या विभागात पाणीदेखील साठतं, मग त्यांना मदत करण्यासाठी अख्खी वस्ती पुते येते, गटार, नाले यांचा दुर्गध सर्वत्र पसरतो आणि नंतरचे काही दिवस रोगराईला सामोरं जावं लागतं. मैदाने, रस्ते यांच्यावर फेकलेला कचरा त्यातून निघणारा कुबट वास जीव नकोसा करतो. आधी हवाहवा वाटणारा पाऊस अशावेळी मात्र नकोसा वाटू लागतो.

प्रश्न इ.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो ते लिहा.
उत्तर:
पाऊस म्हणजे आनंद, तृप्ती, मलाही पाऊस आवडतो. पावसानंतर सर्वात जास्त आनंद होत असेल तर कोणाला ? धरित्रीला. हो. पृथ्वीला. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पृथ्वीलाही त्याला भेटण्याची ओढ लागलेली असते. पावसानंतर सष्टीला चैतन्य प्राप्त है भरभरून वाहू लागतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी संपलेला असतो. मुंबईतील तलाव भरले गेले की मुंबईकर आपल्याला वर्षभर पाणी मिळेल- या आशेने आनंदीत होतात. बळीराजा जो सातत्याने कष्ट करत असतो त्याच्या शेतात आता धनधान्य पिकणार असतं. पाऊस हा अशी आनंदाची पर्वणी घेऊन आलेला असतो.

5. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत या मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री आहेत. प्राणसई ही त्यांची कविता पावसाला उद्देशून आहे. उन्हाळ्यामुळे वातावरण तापलेले आहे. राक्षसासारखे ऊन कडाडले आहे. ते अक्षरशः वातावरणाचे पीठच काढते आहे. तीव्र उन्हाळ्याचे चटके कोणालाही सहन होईनासे झाले आहेत हे एका प्रतीकातून इंदिराबाई स्पष्ट करतात ‘पीठ कांडते राक्षसी पीठ कांडते’ हे कष्टमय काम पण ते भरपूर प्रमाणात केले जाते तेव्हा त्याला राक्षसी म्हटले जाते. अशावेळी प्राणसई म्हणजे पाऊस कुठे बरी गुंतून राहिली? असा प्रश्न कवयित्रीला पडतो.

सई म्हणजे सखी हा शब्द योजताना कवयित्रीच्या मनात पाऊस हा सगळ्यांचाच प्राण आहे त्यामुळे कवयित्रीने प्राणसई ही उपमा पावसासाठी उपयोजिली आहे. प्राणसईने भेट दयायला फारच दिरंगाई केली त्यामुळे कवयित्रीने आपल्या सखीला भेटण्याकरता पाखरांसवे बोलावणे पाठवले आहे, या पावसांच्या सरींना ती घनावळी म्हणतेय, व्याकूळ मनाला घनावळीच साद देऊ शकतात. आपल्यातील सख्य, मैत्रपणा आठवून आता या पृथ्वीवर धावत ये, दौडत ये अशी विनवणी कवयित्री करत आहे.

प्राणसखी धनावळी भेटायला येण्याचा काळ ओसरून गेला परंतु ती आली नाही.पाऊस आला की सगळे वातावरण ओले चिंब होते. भाज्या, धान्य यांच्या बी-बियाण्यांच्या आळी जमिनी भाजून करून ठेवल्या आहेत. ती आली की या बियाण्यांमधून रोपे तयार होतील आणि त्याच्या वेली सर्वत्र पसरतील, पावसाळ्यात डासांचा, कीटकांचा त्रास होतो. अशावेळी शेणकुळी जाळल्या जातात.

त्यासाठी घरातील कोपरा रिकामा करून तिथे शेणी ठेवल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे बैलही ठाणबंदी झाले आहेत. कामासाठी ते तयार नसल्यामुळे मालकालाही काहीच सुचेनासे झाले आहे. तप्त झालेल्या धरणीतून गरम वाफा येतात त्यामुळे वाराही तप्त झालेला आहे. वरून उन्हें आग ओकत आहेत. याचा परिणाम कोवळ्या जीवावरही होऊ लागला आहे. लहान बाळांचे कोवळे जीव कासावीस झाले आहेत. त्यांचे चेहरे कोमेजून गेले आहेत हे स्पष्ट करताना कवयित्री ‘तोंडे कोमेली बाळांची’ अशी रचना करते.

उन्हाळ्याचे चार महिने संपले की आपसूकच ओढ लागते पावसाची. पण पावसाचे दिवस सुरू झाले असताना पावसाची’ एकही सर आली नाही त्यामुळे व्याकुळलेली कवयित्री आपल्या पाऊस सखीला पृथ्वीवर येण्यासाठी विनवणी करते आहे. ती प्राणसई न आल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील अगदी तळाशी गेले आहे. ते भिंगासारखे दिसू लागले आहे.

असं कवयित्री म्हणते. भिंग ज्याप्रमाणे सूक्ष्म असलेली गोष्ट मोठी करून दाखवते त्याप्रमाणे हे पाण्याचे भिंगदेखील येणाऱ्या सूक्ष्म संकटाची चाहूल देत आहे असे कवयित्रीला वाटत आहे. हे संकट भीषण रूप धारण करायच्या आगोदर माझ्या घरी, शेतावर तू दौडत ये असं कवयित्री पाऊस धारेला विनवणी करते, तू आलीस की आमच्या या शेतावर हिरवळ येईल, मातीत ओलावा येईल आणि मातीतील बी-बियाण्यांना अंकुर फुटेल. मालकांच्या मनातीलही स्वप्नं पूर्ण होतील.

पावसाच्या सरी वायसवे झुलत-सुलत येतात म्हणून कवयित्री म्हणते की तू वाऱ्यासोबत झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझ्या घराजवळ आलीस की माझी पोरं तुझ्या पावसाच्या सरींना झोंबतील. इथे कवयित्री पावसाच्या धारा-सरी यांना जरीची उपमा देते. सोनेरी जरीमध्ये स्वतःची ताकद असते, ती सहसा तुटत नाही. ती मौल्यवान असते. तसंच ही पावसाची सरही मौल्यवान आहे. तिच्या जरीचा घोळ म्हणजे पावसाचे साठलेले पाणी या पाण्यात कवयित्रीची पोरं खेळतील.

भोपळ्याची, पडवळाची आळी, मालकाने कधीपासून तयार करून ठेवली आहेत. प्राणसईच्या येण्याने ती भिजतील, त्यांना कोंब फुटेल. तू आलीस की तुझ्या जलसाठ्याने त्या विहिरींना पण तुडुंब भर. घरदार संपूर्ण सृष्टी चिंब भिजायला हवी आहे कारण पाण्याविना काहीच चैतन्य नाही. अशी धावत धावत ही प्राणसई आली की कवयित्री तिच्यासोबत खप गप्पा मारणार आहे. तिच्याशी आपल्या सख्याच्या गजगोष्टी सांगणार आहे. त्याचं कौतुक आपल्या मैत्रिणीला सांगताना तिला अभिमान वाटणार आहे.

पावसाच्या या धनावळीने आता वाकडेपणा सोडावा आणि भूतलावर अगदी तीव्रतेने धावत यावं असं कवयित्रीला वाटतं. आमच्या सगळ्यांकडे अशी पाठ करून तू काय साधशील बरं? असा त्रास देण्यापेक्षा प्रेमानं तुझ्या धारांमध्ये भिजवलंस तर सगळेजण आनंदी होतील. च मिळेल, त्यामुळे वाऱ्यावर भरारी मारून अगदी लवकर भेटीयला ये अशा आत्यंतिक जिव्हाळयाने कवयित्री आपल्या सखीला बोलावते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

शब्दसंपत्ती.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधून शब्दमनोरा पूर्ण करा.
उदा.,
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 4
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 5

11th Marathi Book Answers Chapter 2 प्राणसई Additional Important Questions and Answers

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. विहिरीच्या तळी दिसू लागले ते – [ ]
  2. घनावळीने हिचा मैत्रपणा आठवावा – [ ]
  3. प्राणसईने वाऱ्यासोबत असे यावे – [ ]

उत्तर:

  1. भिंग
  2. मैत्रिणीचा
  3. भरारी मारून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

कारणे लिहा.

प्रश्न 1.
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण – ……….
उत्तर:
पाखरांच्या हाती पावसाला सांगावा धाडला, कारण पावसाने यायला उशीर केला म्हणून लवकर यावे.

प्रश्न 2.
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण – ………
उत्तर:
पडवळा – भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, कारण या भाज्यांची लागवड करावयाची आहे.

कृती करा.

प्रश्न 1.
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – …………..
उत्तर :
प्राणसई आल्यावर कवयित्री या गोष्टी करेल – दारात उभी राहून तिच्याशी आपल्या सख्याबददलच्या गप्पा सांगेल.

प्रश्न 2.
सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन:
उत्तर :
पावसाची वाट पाहणं हे शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलं असत. कवयित्रीचा सखा शेतकरी आहे, त्याने काबाडकष्ट करून पेरणी केलेली आहे.
पाऊस न आल्यामुळे तो सुद्धा चिंतेत पडला आहे. शेत, अन्नधान्य, घर हेच त्याचं विश्व आहे. त्यामुळे तो त्यात रमतो, कष्ट करतो. याचं
कौतुक कवयित्रीला आहे. त्यामुळे कवयित्रीला आपल्या सख्याचे कौतुक आपल्या प्राणसईला सांगावेसे वाटत आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

आकलन कृती :

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
मालक बेचैन झाले कारण – [ ]
उत्तर:
मालक बेचैन झाले कारण – तीव्र उन्हाळ्यामुळे बैल कामासाठी तयार नाहीत म्हणून

प्रश्न 2.
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – [ ]
उत्तर:
विहिरीच्या तळाशी भिंग दिसू लागले कारण – पाऊस न आल्याने विहिरीचे पाणीदेखील तळाशी गेले आहे.

जोड्या लावा.

प्रश्न 1.

आळी ठेविली सजवून
शेणी ठेविल्या भाजून
रचून

उत्तर:
आळी ठेविली – भाजून
शेणी ठेविल्या – रचून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

उपयोजित कृती :

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 8
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 9

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 6
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई 7

प्रश्न 2.
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द –
उत्तर :
बैलांच्या अगतिक झालेल्या अवस्थेसाठी कवयित्रीने उपयोजिलेला शब्द – ठाणबंदी

क्रमवारी लावा.

प्रश्न 1.

  1. झाले मालक बेचैन
  2. झळा उन्हाच्या लागून
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. बैल झाले ठाणबंदी

उत्तर:

  1. बैल झाले ठाणबंदी
  2. झाले मालक बेचैन
  3. तोंड कोमेली बाळांची
  4. झळा उन्हाच्या लागून

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

काव्यसौंदर्य:

प्रश्न 1.
‘तोंडे कोमेली बाळांची
झळा उन्हाच्या लागून
या पक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री इंदिरा संत यांच्या प्राणसई कवितेत पावसाच्या आगमनापूर्वीच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. उन्हाने तप्त झालेल्या वातावरणाचे परिणाम लहान तान्हुल्या बाळांनाही सोसावे लागत आहे. त्यांच्याही जीवाची काहिली झाली आहे. त्यांची कोवळी तोंडे, कोमेजून गेली आहेत. त्या कोवळ्या चेहऱ्यांचा कोमेजून जाळ्याची उल्लेख करताना कवयित्री कोमेली ही नवीन सौंदर्य प्रतिमा वापरतात त्यामुळे त्या तान्हुल्या बाळांच्या चेहऱ्यावरील कोमल भाव प्रकट होतात.

स्वमतः

प्रश्न 1.
पावसाच्या आगमनासाठी तुम्ही कसे आतुर असता?
उत्तर :
पावसाळा हा ऋतू माझा सर्वात आवडीचा ऋतू. पाऊस कधीही यावा आणि त्यात चिंब भिजावे अशी माझी मनस्थिती असते. उन्हाळ्याचे चार महिने सोसल्यावर, त्याची दाहकता अनुभवल्यावर साहजिकच मनाला ओढ लागते ती पावसाची. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीच्या सुगंधालाही मी आसुसलेला असतो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भरपूर पाऊस पडावा असं खूप वाटत असतं. पावसाळ्यात ट्रेकिंगला जायला मला प्रचंड आवडतं. निसर्गाच्या सानिध्यातील भटकंती मला माझ्यातील खुजेपण शोधायला भाग पडते. निसर्ग भरभरून देतो. आपण केवळ त्याचा आनंद घेतो त्याला काही देत नाही. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पावसाळ्यात मी आणि माझे काही मित्र बागांमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम करत असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

प्राणसई Summary in Marathi

प्रस्तावनाः

कवयित्री इंदिरा संत यांची मराठी साहित्यात विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री अशी ओळख आहे. इंदिराबाई मूळच्या शिक्षिका. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या होत्या. प्रा. ना, मा. संत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवू लागल्या. १९७१ मध्ये त्यांचा शेला हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सोप पण गहिरं असं लेखनाचे स्वरूप इंदिरा संतांचे होते.

‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘चित्कळा’, ‘बाहुच्या वंशकुसुम’ ‘गभरेशमी’, ‘निराकार’ असे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ, प्रेम आर्तता व्यक्त करण्यासाठी निसर्गातील विविध प्रतिमांचा वापर त्या सहजगत्या करताना दिसतात.

‘फुलवेल’ हा त्यांचा ललितलेख संग्रह. मृदगंध यात त्यांनी तरुण भारतसाठी लिहिलेला स्तंभलेख ‘मृदगंध’ या ग्रंथात संग्रहित आहे. लेखांमधून, कवितांमधून इंदिराबाईनी निसर्गाची अनेकविध रूप रेखाटली. सुखद, सुंदर असा निसर्ग इंति

कवितेचा आशय :

उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले असताना सर्वांच्याच मनाला पावसाची ओढ लागलेली असते. पाऊस येणार या कल्पनेने सर्वच जण आनंदित होत असतात. पाऊस बेभरवशाचा असतो, त्याच्या आगमनाकरता शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया यांनी तयारी करून ठेवलेली असते. पेरणी झालेली असते. पण भूमीत पेरलेले बियाणे उगवण्यासाठी पावसाचे येणे महत्त्वाचे असते.

या पावसाची वाट पाहताना कवयित्री तिला पृथ्वीवरील परिस्थिती आपल्या कवितेतून कथन करते, तसेच या घनावळीने आपल्या मैत्रीला जपत पृथ्वीवर बरसावे अशी विनंती या कवितेतून व्यक्त करते. पृथ्वीवर उन्हाची दाहकता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. एखादी राक्षसी पीठ कांडत राहते आणि त्याचा धुराळा सर्वत्र पसरतो.

तसंच उन्हाची दाहकता तप्तता सर्वत्र पसरली आहे. अशा वेळी कवयित्रीला चिंता वाटत राहते की आपली प्राणसखी प्राणसई आपल्याला भेटायला का बरं येत नाही आहे? ती कुठं वरं गुंतून राहिली आहे ? या घनावळीला आपली चिंता नाही का ? आपल्या जवळ तिनं आता असायला हवं असं कवयित्रीला वाटत राहतं. घनावळी पृथ्वीतलावर यावी याकरता कवयित्री पाखरांच्या हाती सांगावा पाठवून देत आहे की आपला मैत्रपणा आठवून तू धावत ये.

ठीचा काळ असतो. आपल्या घरातल्यांच्या सोयीकरता कवयित्रीनेही आपल्या मालकाप्रमाणे भाज्यांची लागवड केली आहे, भोपळा-पडवळ यांची लागवड करण्यासाठी जमिनीमध्ये आळी तयार करून ठेवली आहेत. त्यात भाज्यांची बियाणे पेरली आहेत. घरात शेणीचा थर रचून ठेवला आहे. पावसाळ्यात त्यांचा धूर करून डास, चिलटे यांना दूर करता येतं म्हणून त्यांचीही रास एका कोनाड्यात ठेवली आहे.

बैलही उन्हाच्या झळांमुळे काम करेनासे झाले आहेत, त्यांनाही उष्माघात सहन होत नाही त्यामुळे मालकही बैचेन झाले आहेत. बाळांची कोमल, नाजूक तोंडेही पार वाळून गेली आहेत.

विहिरीच्या तळी पाण्याचे भिंग दिसत आहे. तळाला गेलेले पाणी भिंगासारखे दिसते आहे. विहिर ही दुर्बिणीसारखी आणि तळाला गेलेले पाणी भिंग असं कवयित्रीला सुचवायचे आहे. भिंगातून जशी एखादी लहान वस्तू मोठी दिसते तसंच पाण्याचे दुर्भिक्ष्य आता मोठ्या स्वरूपात सोसायला लागणार असं वाटू लागतं. कवयित्रीचं मन या सगळ्या ताणतणावात लागत नाही आहे. आपली प्राणसखी कधी येईल याची ती तीव्रतेने वाट पाहत आहे.

ही घनावळी आली की तिनं धावत आपल्या शेतावर हजेरी लावावी असं कवयित्रीला वाटतं. ती आली की तिच्यामुळे शेतावर हिरवा शेला पांघरला जाईल म्हणजे हिरवळ दाटेल. मालकाच्या स्वप्नांनाही अंकुर फुटतील, त्यांनाही जिवंतपणा लाभेल.

ही प्राणसई वाऱ्यासोबत येईल तेव्हा त्याच्या साथीनं तिन झुलत-झुलत यावं आपल्या घराशी थांबावं. तिच्या जररूपी धारांचे तळे होईल त्यात कवियत्रीची पोरं-बाळं नाचतील, खेळतील, वागडतील ही मुलं या प्राणसईची भाचे मंडळीच आहेत. त्यांच्या निरागसपणाचे या प्राणसईलाही कौतुक वाटेल.

कवयित्रीच्या दारात लावलेले पडवळ, भोपळे यांच्या वेलीचे आळे भिजून चिंब होऊ दे, विहिरी पाण्याने तुडुंब भरून वाहू दे, घर, दार, अंगण या सर्वच ठिकाणी पावसाच्या पाण्याने थंडगार वारा अनुभवायला मिळू दे.

असं संपूर्ण सुंदर, चैतन्यमय वातावरण अनुभवताना तुझ्याशी मी दारात उभी राहून बोलेन. माझा सखा शेतात कसा दमतो, रमतो. त्याचे कौतुक ती या प्राणसईला सांगणार आहे.

ही प्राणसई वेळेवर येत नाही म्हणून कवयित्री तिला पुन्हा विनवणी करतेय की ए, प्राणसखी तू आता वाकडेपणा बाजूला ठेव, तू रागावली असलीस तरी तो राग आता सोड, अशी पाठमोरी तू होऊ नकोस. वाऱ्यावरून भरारी मारून तू वेगावे धावत, दौडत ये, तू माझी प्राणसई आहेस, माझ्यासाठी पृथ्वीसाठी, लेकरांसाठी, शेतासाठी तुला यायलाच हवं.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 प्राणसई

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. घनावळ – मेघमाला.
  2. सांगावा – निरोप – ( message).
  3. हुडा – गोवांचा ढीग.
  4. शेणी – गोवऱ्या – (dried cakes of cowdung)
  5. ठाणबंदी – पशुंना गोठ्यात बांधून ठेवणे.
  6. कोमेली – कोमेजला.
  7. भिंग – आरसा – (a piece of glass).
  8. शेला – पांघरण्याचे, उंची वस्त्र – (a silken garment, a rich scraft).
    तुडुंब – भरपूर, काठोकाठ – (upto the brim, quite full).
  9. भरारी – उड्डाण – (a quick flight ).
  10. भाचा – बहिणीचा किंवा भावाचा मुलगा – (a nephew).
  11. जर – विणलेले वस्त्र – (brocade)

11th Marathi Digest भाग-१

Mamu Class 11 Marathi Chapter 1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 1 मामू Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

11th Marathi Chapter 1 Exercise Question Answer Maharashtra Board

मामू 11 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

11th Marathi Digest Chapter 1 मामू Textbook Questions and Answers

1. अ. कोण ते लिहा.

प्रश्न 1.
चैतन्याचे छोटे कोंब :
उत्तर :
शाळेतील लहान मुले

प्रश्न 2.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
उत्तर :
मामू

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 3.
शाळेबाहेरचा बहुरूपी :
उत्तर :
मामू

प्रश्न 4.
अनघड, कोवळे कंठ :
उत्तर :
शाळेतील लहान मुले.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 3

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 4

इ. खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

प्रश्न 1.

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ……………..
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ………………
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.” ………………….
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” ……………..
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. ………………….

उत्तर :

  1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. – देशभक्ती
  2. आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. – मातृप्रेम/भावणाशीलता
  3. मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ – वात्सल्य
  4. माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो.” – हुशारी
  5. मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. – अभ्यासू वृत्ती

ई. खलील शब्द समूहाचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
थोराड घंटा
उत्तर :
थोराड घंटा- दणकट, मोठी व वजनदार घंटा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
अभिमानाची झालर
उत्तर :
अभिमानाची झालर – झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.

2. व्याकरण.

अ. खलील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

प्रश्न 1.
इशारतीबरहुकूम
उत्तर :
हुकूम, तीर, रती, हुशार, रतीब

प्रश्न 2.
आमदारसाहेब
उत्तर :
आम, आब, आहे, आरसा, आमदार, दार, दाम, दाब, बसा, साम, सार, साहेब, बदाम, रसा(पृथ्वी), हेर, हेम (सोने), मदार.

प्रश्न 3.
समाधान
उत्तर :
नस, मान, मास, समान, मानस

आ. खलील वाक्प्रचाराचा अर्थ लिहन वाक्यात उपयोग करा :

प्रश्न 1.
चौवाटा पांगणे
उत्तर :
चौवाटा पांगणे – चहूबांजूना (चारी वाटांवर) विखुरणे, सर्वत्र पांगणे.
वाक्य : गावात दुष्काळ पडला नि गावकरी चौवाटा पांगले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
कंठ दाटून येणे
उत्तर :
कंठ दाटून येणे – गहिवरणे.
वाक्य : मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला.

प्रश्न 3.
हरवलेला काळ मुठीत पकडणे.
उत्तर :
हरवलेला काळ मुठीत पकडणे – भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
वाक्य : कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.

इ. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.

प्रश्न 1.
अनुमती, घटकाभर, नानातन्हा, अभिवाचन, जुनापुराणा, भरदिवसा, गुणवान, साथीदार, ओबडधोबड, अगणित
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 5
उत्तरः

उपसर्गघटित प्रत्ययघटित अभ्यस्त
भरदिवसा साथीदार ओबडधोबड
अभिवाचन गुणवान जुनापुराणा
अनुमती घटकाभर
नानातन्हा
अगणित

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

3. स्वमत:

प्रश्न अ.
‘शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे’, या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
‘मामू’ हा शिवाजी सावंत यांच्या ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणात्मक संग्रहातून घेतलेला पाठ आहे. या पाठात ‘मामू’ या व्यक्तीची व्यक्तिरेखा रेखाटताना त्याचे विविध पैलू दाखवले आहेत. प्रामाणिक, देशाभिमानी असलेला मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. कोल्हापूर संस्थान आणि लोकशाही अशा दोन्ही राज्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

असा हा मामू शाळेचा केवळ शिपाई नसून तो विविध भूमिका बजावताना दिसतो. शाळेत शिपायाचे काम करणारा मामू अतिशय प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतो. तो विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. जसा एखादा बहुरूपी विविध रूपं घेऊन आपल्यासमोर येतो तसाच शाळेच्या बाहेर मामू आपल्याला विविध रूपांमध्ये भेटतो. कधी तो फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर घटकाभर का होईना पण तेथे बसणारा दुकानदार होतो. ज्याप्रमाणे बहुरूपी सोंग चांगल्या रितीने वठवल्यावर मिळेल तेवढ्या पैशांवर समाधानी राहतो तसेच दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे देवाचा प्रसाद मानणारा समाधानी मामू भेटतो.

कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देणारा शिक्षक तर कधी मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी विविध रूपे घेतो. कधी कुणाच्या पायाला लागलं तर कुठला पाला वाटून लावावा, पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा घ्यावा, शरीरयष्टी कशी कमवावी हे सांगणारा वैदय बनतो. वक्ता कसा बोलला हे सांगणारा परीक्षक बनतो, तर कधी चक्कर आलेल्या मुलाला डॉक्टरकडे नेताना आईच्या मायेने जपणारा, धीर देणारा, संवेदनशीलवृत्तीच्या व्यक्तीची भूमिका निभावतो. अशाप्रकारे मामू केवळ शाळेत काम करणारा शिपाई राहत नाही तर शाळेबाहेच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात. शाळेबाहेर वावरणारा तो बहुरूपीच आहे.

प्रश्न आ.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
शिवाजी सावंत यांच्या ‘मामू’ या कथेत मामूच्या स्वभावाचे, प्रामाणिकपणाचे, कष्टाळूपणाचे, संवदेनशील वृत्तीचे वर्णन आले आहे. ‘मामू’ गेल्या चाळीस वर्षापासून शाळेत शिपाई म्हणून काम करतो. तो अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आहे. त्याच बरोबर सहदयी आहे. मामूची म्हातारी आई गेल्यानंतर तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळतं.

‘दुनियेत सारं मिळेल सर; पण आईची माया कुणाकडनं न्हाई मिळायची’ हे बोलताना नातवंड असलेला मामू स्वतः लहान मुलासारखा भासतो तेव्हा त्याच्या संवेदनशीलवृत्तीचा परिचय येतो. शाळेतील एखादा मुलगा खेळताना किंवा प्रार्थनेच्या वेळी चक्कर येऊन पडला तर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेताना त्या लहान मुलाला मायेने धीर देताना “घाबरू नकोस’ म्हणतो. यातून त्याची संवेदनशीलता व सहदयता दिसून येते.

मामूच्या संवेदनशीलतेची अनेक उदाहरणे मामूचे व्यक्तिचित्रण करताना शिवाजी सावंत यांनी दिली आहेत. (इ) मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा. उत्तरः ‘मामू’ या व्यक्तिचित्रणात्मक पाठात लेखक शिवाजी सावंत यांनी ‘मामू’ या व्यक्तिरेखेचे लक्षणीय शब्दचित्र रेखाटले आहे.

मामू हा शाळेचा शिपाई आहे. परंतु तो शाळेचा अविभाज्य भाग आहे. मामू डोक्याला अबोली रंगाचा फेटा बांधतो, अंगात नेहरू शर्ट आणि त्यावर गर्द निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच असतं. खाली घेराची व घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान आणि पायात जुना पुराणा पंपशू असे अत्यंत साधे राहणीमान मामूचे आहे. मामूच्या चेहऱ्यावर सफेद दाढी आहे. परंतु चेहऱ्यावर कायम समाधान आणि नम्रतेचा भाव, चांगल्या व वाईट अनुभवाने समृद्ध मामू साधारणतः साठीचा आहे. परंतु म्हाताऱ्या शरीरातील मान मात्र उमदं आहे. अतिशय चित्रदर्शी लेखन शैलीत रंगवलेले मामूचे व्यक्तिचित्र त्याच्या राहणीमानामुळे व गुणांमुळे आपल्या चांगलेच लक्षात राहते व मामू डोळ्यासमोर उभा असल्यासारखे भासते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

4. अभिव्यक्ती

प्रश्न अ.
‘मामू’ या पाठाची भाषिक वैशिष्टये स्पष्ट करा.
उत्तर :
‘मामू’ हा पाठ शिवाजी सांवत यांनी लिहिलेला आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे शिवाजी सावंत हे त्यांच्या ‘मृत्युजंय’ आणि ‘छावा’ या दोन कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुस्तकाबरोबरच अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना गौरवान्वित केले आहे… मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठात केले आहे.

समर्पक शब्दरचना आणि चित्रदर्शी लेखनशैली हे शिवाजी सावंत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य पाठामध्ये अनेक वेळेला अनुभवायला येते. त्यांची शैली ही मध्ये मध्ये आलंकारिक होते, म्हणूनच प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी असा सरळ उल्लेख न करता ते लिहितात ‘रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात.

त्यांच्या या वर्णनामुळे निरागस भावनेने पटांगणावर प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात आणि गद्यलेखनाला काव्यात्मकतेचे रूप येते. विदयार्थ्याचा उल्लेख ते ‘चैतन्याचे छोटे कोंब’ असा करतात तर शाळेतील मोठ्या घंटेचा उल्लेख ‘थोराड घंटा’ असा करतात. इथे शब्दांची अनपेक्षित वेगळी रचना करून भाषेचे सौंदर्य ते वाढवितात. उदा. ‘कोंब’ हा शब्द झाडांच्या बाबतीत वापरला जातो तर ‘थोराड’ हा शब्द प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात वापरला जातो.

पण अर्थाचे रूढ संकेत लेखक झुगारून देतो आणि शब्दांबरोबरच अर्थाला नवीन सौंदर्य बहाल मामू हे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर शब्दशः ते उभे करतात, मामूची पांढरी दाडी, भुवया, डोक्याचा फेटा, अंगावरील नेहरू शर्ट, त्यावरील जाकीट पकिट वाँच, चुणीदार तुमान, पंपशू यांचे ते तंतोतत वर्णन करतात. त्यामुळे मामू या व्यक्तिमत्त्वाची छबी हुबेहुब डोळा हा उर्दू जाणणारा मुस्लिम माणूस असल्याने त्यांच्या तोंडची भाषा तशीच वापरून ते उर्द, हिंदी आणि बोलीभाषेचा समर्पक वापर करतात आणि लिहितात, ‘परवा परवा मामुची बुली आई अल्लाला प्यारी झाली.’

किंवा ‘लग्न ठरलं’ या शब्दाऐवजी मुस्लिम संस्कारातील ‘शादी मुबारक’, ‘अल्लाची खैर’ असे शब्द वापरतात. ‘अभिमानाची झालर त्यांच्या मुखड्यावर उतरते’ अशा शब्दांमुळे अर्थाचा आंतरिक गोडवा जाणवतो. त्यांच्या बऱ्याच शब्दरचनांमध्ये आशयाची आणि विचारांची संपन्नता जाणवत राहते. उदा. ‘धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी.’ परीक्षा केंद्रावर परीक्षेआधी जी तयारी करावी लागते त्याचे वर्णन ते अत्यंत बारकाईने करतात आणि या परीक्षेच्या जोरावर आयुष्यात यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्या विदयार्थ्याच्या मागे शाळेतील शिपाई वर्ग किती जबाबदारीचे काम पार पाडतात हे दाखवून देतात. त्यामुळे ते नुसते पूर्वपरीक्षा वर्णन राहत नाही तर चतुर्थ श्रेणी वर्गाच्या श्रमाची दखल यानिमित्ताने ते घेतात. लेखकाची लेखणी जेव्हा सर्वसंपन्न असते तेव्हा सामान्य व्यक्तिमत्त्वाचे असामान्य पैलूही दमदारपणे साकार होतात याचा प्रत्यय हे लेखन वाचताना येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न आ.
‘मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
उत्तर :
लेखक शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रण संग्रहातून ‘मामू’ हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ घेतला आहे. या पाठात मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण केलेले आहे. मामू हा शाळेचा केवळ शिपाई नसून तो शाळेचा एक अवयव झाला आहे. गेली चाळीस वर्षे शाळेत शिपाई म्हणून काम करणारा मामू शाळेबाहेरही विविध भूमिकांतून आपल्यासमोर येतो. फळांच्या मार्केटमध्ये एखादया बागवानाच्या दुकानावर बसतो. दुकानदाराने दिलेले पैसे म्हणजे अल्लाची देन मानतो, त्याविषयी कोणतीही तक्रार करत नाही. यातून त्याची नि:स्वार्थी वृत्ती, नम्रता, सेवाभाव जाणवतो. तर कधी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दूची शिकवण देतो. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मामू’ आहे.

कर्तबगार, समाधानी आयुष्य जगणारा मामू मुलाच्या लग्नाला आलेल्या अधिकारी वर्गाचे आभार मानायला विसरत नाही. इतका तो कृतज्ञशील आहे. तो मुलांनाही आपल्यासारखे केवळ गुणवान बनवत नाही तर आज्ञाधारकही बनवतो. त्यांच्यासाठी कर्तव्यतत्पर असतो. बदलत्या काळानुसार मुलाला शिक्षणाची संधी देतो. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळेच त्याच्या मुलांच्या लग्नाला आमदार, खासदारपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वच उपस्थित राहातात.

हीच त्याच्या आयुष्यभराची कमाई आहे, आईविषयीच्या आठवणी सांगताना भावूक झालेल्या मामूचे मातृप्रेमही जाणवते. कोणत्याही वर्षीचं रजिस्टर अचूक शोधून मामू माजी विदयार्थ्याला मदत करतो तर सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांची तयारी करताना त्याची कार्यतत्परता दिसून येते. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेस एखादा विदयार्थी चक्कर येऊन पडला तर त्याला दवाखान्यात नेणारा मामू माणुसकीचे दर्शन घडवतो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजवंदन करताना देशाविषयी नितांत प्रेम, आदर व कर्तव्यनिष्ठा दिसून येते.

वैदयकक्षेत्रातील ज्ञानही त्याला आहे आणि सहज जाता जाता तो त्याची माहिती देतो, यात कुठेही सल्ले देण्याचा आव नसतो. शाळेतील एखादया कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो यासंबंधी निरीक्षणक्षमतादेखील त्याच्याकडे आहे. अशाप्रकारे मामू ही फार साधी, सरळ, प्रामाणिक, नम, कर्तव्यपरायण, देशाबद्दल प्रेम असणारी, सेवाभवी, सहृदयी, नि:स्वार्थी, हुशार अशी व्यक्ती आहे.

प्रश्न इ.
‘माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!’ या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
माणूस कोणत्याही जाती, धर्माचा असो त्याच्यामध्ये माणुसकी नसेल तर त्याला माणूस कसं बरं म्हणावं? आज समाज फारच बदलतोय, प्रत्येक गोष्टीसाठी माणसं फार आग्रही होत चालली आहेत. जात, धर्म यांच्या नावावर माणसं स्वतःचे स्वार्थ साधून संधीसाधू होऊ पाहत आहेत. अशावेळी माणसाचा माणसावरचा विश्वास संपत चालला आहे असं वाटतं खरं पण गंमत अशी की जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा एकमेकांच्या विरोधात भांडणारी, सूड उगवणारी माणसं मदत करण्यासाठी पुढे सरसावतात.

मग त्यांच्यातील वैर संपून जातं. एखादं पोर गाडीखाली येत असेल तर चटकन कुणीतरी पुढं होऊन त्याला वाचवतं, कणी हॉस्पिटलमध्ये असेल त्याला रक्ताची गरज असेल तर कित्येक लोक मदतीला धावून जातात, आताच्या काळात कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं जातं खरं पण तरीही एनजीओ चालवणाऱ्या संस्था वाढत आहेत, त्यामुळे माणूस कितीही स्वार्थी असला तरी तो त्याचं सामाजिक भान विसरलेला नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रकल्प :

प्रश्न 1.
‘तुमच्या परिसरातील अशी सामान्य व्यक्ती की जी तिच्या स्वभावामुळे असामान्य झाली आहे त्या व्यक्तीचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
उत्तर :
रजनी ही आमच्या घरी काम करायला येणारी ताई. प्रचंड हुशार आणि तल्लख बुद्धीची तितकीच विनम्रही. आमच्याकडे ती कामाला यायला लागली तेव्हा ती आईला म्हणाली, ‘ताई, मी लहानपणापासून घरकाम करतेय पण प्रत्येक घराची पद्धत वेगळी. तुम्ही तुमच्या घरातील कामं शिकवाल ना? हे ऐकून आई खूप आनंदित झाली. असं तिला मायेने बोलणारी बाई पहिल्यांदाच भेटली होती. आईने जे शिकवलं तसं तसं ती अजून नीट काम करू लागली. माझ्या धाकट्या भावालाही जीव लावला.

घरातल्या पैपाहुण्यांची उठबस करावी ती रजनीताईनेच. हळूहळू तिनं आमच्या कॉलनीत सर्वच घरकाम करणाऱ्या बायकांना एकत्र आणलं. प्रत्येकीला मदत करण्याच्या स्वभावामुळे बायका तिच्याजवळ मन मोकळं करू लागल्या. त्या सर्वांच्या मनात ताईबद्दल केवळ स्नेह आहे. आता काही महिन्यांपूर्वी ताईने या बायकांसाठी एक भिशी सुरू केली. त्यातील पैसे घरकामवाल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असा निर्धार तिने केला.

आश्चर्य म्हणजे आमच्या आईने, शेजाऱ्यांनी पुढाकार घेऊन घरकामवाल्या मावशांच्या मुलांसाठी शाळेची फी भरण्यासाठी वर्गणी जमा केली आणि बँकेत ती रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली. जवळजवळ एक लाख रुपये जमा झाले. या सर्वांचे क्रेडिट केवळ रजनीताईला दिलं जातंय. असं म्हटलं जातं की ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास’ हे रजनीताईकडे बघून यथार्थ वाटतं.

11th Marathi Book Answers Chapter 1 मामू Additional Important Questions and Answers

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – [ ]
उत्तरः
मामूच्या घरी असलेला कार्यक्रम – गृहप्रवेश

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 6
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 7

प्रश्न 3.
मामूने माईक हातात घेतला कारण –
उत्तरः
लग्नासाठी जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी मामूने माईक हातात घेतला.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

उपयोजित कृती :

खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न 1.
त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली.
पैसा कमावतात म्हणून माज नाही.
उत्तर :
पांढरी – विशेषण, राहिली- क्रियापद
म्हणून – उभयान्वयी अव्यय.

प्रश्न 2.
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं,
उत्तर:
संयुक्त क्रियापद

खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

प्रश्न 1.
अ. पाखरागत : ………
आ. मजल्यावर : ………..
उत्तर :
अ. पाग, पारा, राग, रात, गत, खत, खग, खरा, तग, गरा
आ. मज, वर, जर, रज, जम, जमव

खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.

प्रश्न 1.
अ. सर्टिफिकेट (certificate) –
उत्तर :
अ. प्रमाणपत्र, कॉमर्स (commerce) वाणिज्य / व्यापार

आकलन कृती

प्रश्न 1.
मामूची शाळा या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचे केंद्र आहे.
उत्तरः
ड्रॉईंगच्या
कॉमर्सच्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

प्रश्न 2.
परीक्षेच्या काळात मामू करत असलेली कामं
उत्तरः
नंबर टाकणं
बैठक व्यवस्था करणं
पाण्याची व्यवस्था करणं

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 8
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 9

खालील ओघतक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 10
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू 11

प्रश्न 2.
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहण्याची पद्धत –
उत्तर :
राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उचावून बघत राहण्याची पद्धत – फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवणे

स्वमत:

प्रश्न 1.
मामूच्या जनसंपकाविषयी तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर :
मामू हा पडेल ती काम करणारी व्यक्ती, शिपाई असूनही त्याची शाळा, समाज यांविषयीची आस्था त्याच्या कामातून, वागण्यातून दिसून येते. मामू ज्या शाळेत काम करतो ती शाळा सरकारी आहे. तिथं पडेल ती कामे तो करतो. शाळेतल्या मुलांच्या, भावनांची, शरीराची, अभ्यासाचीही काळजी घेतो. तिथल्या शिक्षकांची, इमारतीची त्याला काळजी असते. त्याच्या अशा काळजीवाहू स्वभावामुळे लोक त्याच्यावरही जीव टाकतात. त्यामुळे राष्ट्रीय सणांना त्याच्या हस्ते ध्वनही फडकवला जातो.

शाळेत कुणी पाहुणे आले तर त्याला त्यांच्या पाहुणचाराविषयी फार सांगावे लागत नाही. तो त्यांच्या पदाला साजेसे आदरातिथ्य करतो. या त्याच्या लाघवी स्वभावामुळे तो सर्वानाच हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्याच्या मुलाच्या लग्नातही बडी बडी मंडळी आलेली होती. शाळेतल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कधीच तो मागे पाहत नाही. प्रेमळ, नम्र, लाघवी बोलण्यामुळे त्याचा चाहता वर्ग त्याने निर्माण केला आहे. तो सर्वांच्या मदतीला गेल्यामुळे त्याच्याही मदतीला लोक धावून जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

मामू Summary in Marathi

प्रस्तावनाः

लेखक शिवाजी सावंत यांचे चरित्रात्मक कादंबरीलेखन हे आवडते लेखनक्षेत्र, ‘छावा’, ‘युगंधर’, ‘लढत’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. ‘मृत्युंजय’ ही त्यांची लोकप्रिय कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनकर्तृत्वाचे शिखर आहे. ‘अशी मने असे नमुने’, ‘मोरावळा’ ‘लाल माती रंगीत मने’ हे ‘व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध’ भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ तसेच सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा त्यांचा गौरव केला असून पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे नामांकन झालेले होते.

सर्वोत्कृष्ट वाङ्मयकार म्हणून परिचित असलेले शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहृदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

पाठाचा परिचय :

सर्वोत्कृष्ट वाङमयकार म्हणून परिचित असलेले ‘शिवाजी सावंत’ यांनी ‘लाल माती रंगीत मने’ या व्यक्तिचित्रणातून मामू या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी, सहदयी असलेला ‘मामू’ माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. ‘मामू’ च्या जीवन प्रवासाचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

शाळेची घंटा वाजवल्यानंतर मुलांनी प्रार्थनेसाठी रांगा केल्या व हात जोडून, डोळे मिटून भावपूर्ण सुरात प्रार्थना म्हटली. ‘मामू’ मात्र दगडी खांबाला टेकून विचारमग्न झालेला होता. ‘जनगणमन’ सुरू होताच पाय जोडून सावधान स्थितीत उभा होता.

कोल्हापूर संस्थानातील राजाराम महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत मामू चाळीस वर्षे या शाळेत काम करतो आहे. त्यानं दोन राज्य बंधितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं, कोल्हापूरच्या कैक पिढ्या त्याने बघितल्या आहेत, संस्थानाच्या काळात महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर असताना मामूची चौदा मैलांची पायपीट व त्याच्या साथीदारांसह आलेला अनुभव तो अभिमानाने सांगतो. संस्थाने विलीन झाली, मामूसारखा चाकर वर्ग (कामगार वर्ग) पांगला गेला आणि मामू या शाळेत शिपाई म्हणून हजर झाला.

डोक्यावर अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्ट व त्यावर निळे जाकिट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं जुनं घड्याळ, घोट्यापर्यंत पायजम्यासारखी तुमान, पायात जुना बूट (पंपशू) अशी मामूची साधी राहणी आहे.

शाळेच्या बाहेरही माम् अनेक कामे करतो. फळांच्या दुकानावर काही वेळा फळे विकणे आणि तो मालक जो मोबदला देईल तो घेणे. एखादया मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दू शिकवणे, त्याचप्रमाणे मौलवी, व्यापारी, उस्ताद अशी अनेक रूपे त्यांची दिसतात.

लेखक मामूला दहा वर्षांपासून अनुभवतो आहे. मामू गरीब असला तरी हुशार आहे. त्याची मुलं गुणवान आहेत, पैसे कमवतात, मामूचा शब्द पाळतात, मामूच्या निमंत्रणानुसार त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाला लेखक गेले. तेथे खासदार, आमदार, शिक्षक, व्यापारी, प्राध्यापक, उपस्थित होते. त्याचं समाधान सर्वांचे आभार मानताना त्याच्या सफेद दाढीवर दिसत होतं.

धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. या विचारांची रुजवणूक ‘मामू’ कडे बघून होते. मामूचा शेवटचा मुलगा एस.एस.सी पास झाल्यावर लेखकाच्या सांगण्यावरून त्यानं त्याला कॉलेजात दाखल केलं.

मामूची आई देवाघरी गेल्यानंतर आईची आठवण सांगताना नातवंडं असलेला मामू लहान मुलासारखा वाटतो आणि आईची माया जगात कुठेच मिळत नाही, असे सांगताना त्याचे डोळे पाणावतात.

शंभर वर्षे जुना असलेल्या शाळेतला रेकॉर्ड मामू अचूक शोधून आणतो. माजी विद्यार्थी 1920-22 सालचा दाखला मागतो. त्यावेळी मामू अचूक ते रजिस्टर शोधून काढतो व वेळेत दाखला मिळाल्यावर त्या विदयाथ्याने मामूला चहासाठी आग्रह केल्यावर, चहा पिताना मामूच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षा शाळेत असल्या की, म्हाताऱ्या मामूच्या पाखरासारख्या हालचाली सुरू होतात.

कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळी एखादा मुलगा चक्कर येऊन कोसळला तर मामू रिक्षा आणून त्या मुलाला मायेने धीर देकन डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याला वैदयकाचंही ज्ञान आहे. तो एखादया शिक्षकाला तब्येत सुधारण्यासाठी खारका खाण्याची पद्धत सांगतो. कुणाच्या पायाला लागलं तर कोणता पाला वाटून त्यावर लावावा याचा सल्ला मामू द्यायला विसरत नाही.

सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मामूच्या हाताने राष्ट्रध्वज दंडावर चढतो व राष्ट्रगीत संपेपर्यंत मामू मान उंचावून झेंड्याकडे अभिमानाने बघत राहतो.

लेखकाकडे कुणी पाहुणा आला आणि नुसती मान डोलवली की, तोच इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. मामू एखादया कार्यक्रमाच्या वेळी मुलांसमोर दहा-वीस मिनिटे बोलू शकतो.

शाळेतील कार्यक्रमाचे नेहमीप्रमाणे मामू नियोजन करत असतो. त्या कार्यक्रमात वक्ता कसा बोलतो ते एका कोपऱ्यात उभे राहून ऐकतो. कार्यक्रम संपल्यानंतर मामूला कार्यक्रमाबद्दल विचारणा झाली तर तो म्हणतो. बोलला चांगला तो, पण म्हणावी तशी रंगत आली नाही.

सरकारी नियमाप्रमाणे आणखी वर्षभरानंतर मामू आमच्यात नसेल पण असेच मामूच्या हातांनी शाळेत घंटेचे घण घण घण टोल पडत राहावे आणि हात जोडून व मिटल्या डोळ्यांनी प्रार्थना ऐकत बूला मामू दगडी खांबाला रेलून विचारात कायम हरवलेला बघायला मिळावा अशीच लेखकाची इच्छा आहे.

शाळेत शिपाई म्हणून काम करत असताना कर्तव्यनिष्ठ, नम्र, तत्पर, संवेदनशील वृत्तीमुळे मामू स्वतःचे वेगळे स्थान शाळेत निर्माण करतोच पण त्याची ग्रामीण भाषाही मनाला भिडणारी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 मामू

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. चर्या – भाव/छटा – (feeling, emotion)
  2. अंतर्भाव – समाविष्ट – (inclusion)
  3. अनघड – अपरिपक्व, न घडलेला – (immature)
  4. मासला – उदाहरण – (example)
  5. कंठ – स्वर निघतो तो अवयव – (throat)
  6. अज्ञात – अपरिचित, माहिती नसलेला – (unknown)
  7. आळवणे – सुस्वराने गाणे
  8. कोंब – अंकुर – (a sprout)
  9. मुखडा – चेहरा – (face)
  10. विलीन – समाविष्ट – (absorbed in. mereed)
  11. अवाढव्य – खुप मोठे – (hure)
  12. इमानी – प्रामाणिक – (an honest)
  13. तुमान – पॅन्ट – (loose trousers)
  14. पंपश् – पायातील बूटाचा प्रकार
  15. चण – शरीरयष्टी – (figure)
  16. उमदा – उदार, मोकळ्या मनाचा – (noble, generous)
  17. उय – पद्धत (manner of action)
  18. अगणित – असंख्य, मोजता न येणारे – (countless, innumerable)
  19. वैदयक – वैदयशास्त्र – (the science of medicine).

वाक्प्रचार व त्याचे अर्थ :

  1. गुंतून पडणे – विचारमग्न होणे.
  2. इशारत मिळणे – आदेश मिळणे, खुणावणे, ऑर्डर मिळणे.
  3. चौबाटा पांगणे – चहुकडे पांगणे.
  4. पारख करणे – ओळखता येणे.
  5. चाकरी करणे – नोकरी करणे.
  6. चीज होणे – योग्य फळ मिळणे, यश प्राप्त होणे, कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.
  7. निधार बांधणे – ठाम निश्चय करणे.
  8. आब असणे – नाव असणे / नावलौकिक असणे / भूषण असणे.
  9. रुजू होणे – दाखल होणे.
  10. लकडा लावणे – एखादया गोष्टीसाठी खूप मागे लागणे.
  11. नेट धरणे – धीर धरणे.

11th Marathi Digest भाग-१

Vruttalekh Class 12 Marathi Bhag 4.4 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

12th Marathi Bhag 4.4 Exercise Question Answer Maharashtra Board

वृत्तलेख (फिचर रायटिंग) 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Textbook Questions and Answers

कृती

1. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमीचे आस्वादनीय रूप असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत ‘मी’ असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखादया घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.

वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख (२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख (३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख (४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख (५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखादया क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते.

या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्तिसंबंधाने झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

4. ‘वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर :
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.

वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.

वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

5. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
वृत्तलेखाची गरज
उत्तर :
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

प्रश्न आ.
वृत्तलेखाचे स्रोत
उत्तर :
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.

प्रश्न इ.
वृत्तलेखाची भाषा
उत्तर :
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमीपेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन ५ विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.

प्रश्न ई.
वृत्तलेखाची वैशिष्ट्ये
उत्तर :
अनेकदा एखादया बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीच्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वाचकांना बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने ‘मुक्ता’ या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवतांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे.

१९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या ‘विदयेच्या वाटेवर’ या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे.

सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील ‘मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार’ संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखादया घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्दयांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) प्रस्तावना

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार माणूस जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे हे मानवी स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येते. जे ‘सांगणे’ केवळ स्व-रक्षणासाठी होते, त्याचा प्रवास हळूहळू व्यक्त होण्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. मानवी जीवन बातम्यांनी व्यापले गेले. वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांसोबत नव्याने स्थिर झालेल्या समाजमाध्यमांत आपण बातम्या ऐकत आणि पाहत असतो.

बातमी औत्सुक्य निर्माण करते. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात बातमीतल्या घटनेबद्दल अधिकाधिक जिज्ञासा निर्माण होत असते. बातमीत वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याने जे घडले तसेच बातमीत सांगितले जाते. बातमीत न सांगितली गेलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती आणि सूक्ष्म धागेदोरे वाचण्यासाठी वाचकांना वृत्तलेखाचा (फिचर रायटिंगचा) उपयोग होतो.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) वृत्तपत्र अर्थ आणि स्वरूप :

  • बातमीपत्रात जसे घडले तसे सांगितले जाते. बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे आवश्यक असते.
  • इंग्रजीत याला ‘फिचर’ असे म्हणतात. बातमी ज्या घटनेशी निगडित आहे तिचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते.
  • या गरजेतूनच वृत्तलेख या लेखनप्रकाराचा जन्म झाला आहे.
  • फिचर म्हणजे नॉन न्यूज असे रूढ असले, तरी वृत्तलेखाचा संबंध बातमीशी असतो.
  • घडून गेलेल्या घटनेशी अथवा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा घनिष्ठ संबंध असतो.
  • वृत्तलेखाला बातमीचा आधार असावा लागतो. निमित्त असावे लागते.
  • वृत्तलेखाला ‘धावपळीचे साहित्य’ असेही म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असतो.
  • वृत्तलेख बातमीमागची बातमी सांगत असतो. वृत्तलेखात रंजकता असली, तरी कल्पकतेला फारसा वाव नसतो.
  • अचूकता वृत्तलेखात महत्त्वाची असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी लेखनकृतीत स्वतंत्र असतो. मजकूर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असणे हे वृत्तलेखाचे वैशिष्ट्य असते.
  • बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाचा उपयोग होतो. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांचा विचार करून लेखन केलेले असते.
  • वृत्तलेखात वाचकांचे समाधान हा घटकही महत्त्वाचा मानला जातो.
  • वृत्तलेखाची भाषा सोपी, ओघवती असावी.
  • वाचकांना सहज समजणारी, आपलीशी वाटणारी, वाचकांना खिळवून ठेवणारी, परिणाम साधणारी भाषाशैली असावी.
  • वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांना आकृष्ट करणारी असते.
  • वाचकांच्या विचारांना धक्का देणारी ताकद वृत्तलेखात असते.
  • वृत्तलेखातील माहिती विश्वसनीय असते. मुद्द्यांच्या समर्थनार्थ वृत्तलेखात नकाशे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो.
  • वृत्तपत्रलेखन हे कौशल्यपूर्ण काम आहे. वृत्तलेखन करणास लेखक आपले अनुभव आणि विषयाच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.
  • वृत्तलेखक वाचकांना आनंद देणारा, माहिती, ज्ञान देणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बातमीपलीकडची बातमी जिवंत करणारा असतो.
वर्तमानपत्रांचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतात देखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ‘फिचर’चा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. म्हणजे ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

वृत्तलेखांचे प्रकार :

बातम्यांचा विषय आणि लेखनप्रकारानुसार वृत्तपत्र लेखनाचे पुढील प्रकार –
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 1
1. बातमीवर आधारित वृत्तलेख :

  • या वृत्तलेखाच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येते. एखादया बातमीच्या संदर्भाने हा वृत्तलेख लिहिलेला असतो.
  • वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा या प्रकारात नव्याने विचार करणे प्रस्तुत ठरते.
  • वर्तमानपत्रातील घटनेत असणारी सर्व माहिती वृत्तलेखात नसते; परंतु बातमीमागची बातमी वाचकांना या प्रकारच्या वृत्तलेखात वाचायला मिळते.
  • बातमीवर आधारित वृत्तलेखन करताना बातमीतील घटनेचा सविस्तर आढावा घेणे अपेक्षित असते.
  • वर्तमानपत्रातील बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा नोंदींवर प्रकाश टाकण्याचे काम या प्रकारच्या वृत्तलेखनात होणे आवश्यक असते. या
  • प्रकारच्या वृत्तलेखात बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • कधी कधी वृत्तलेखकाला बातमी संदर्भातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून घटनेचा तळ गाठावा लागतो.
  • वृत्तलेखकाकडे लेखनासाठी असणारी माहिती स्वतंत्र आणि विश्वसनीय असणे आवश्यक असते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात.
  • स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कोणत्याही बातमीवर या प्रकारचे वृत्तलेखन करता येऊ शकते.
  • बातमीपेक्षा अधिक काही मिळाल्याचा आनंद वृत्तलेख वाचकांना मिळणे हेही वृत्तलेखकाला ध्यानात घेणे आवश्यक असते.
  • उदा., पेट्रोल-डीझेलचा वाढत जाणारा तुटवडा – स्वरूप आणि कारणे, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी – कारणे आणि उपाय, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम इत्यादी.

2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात एखादया क्षेत्रात देदीप्यमान कार्य केलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला जातो.
  • सामान्य असो की असामान्य कुठल्याही व्यक्तीच्या संघर्षाची दखल या वृत्तलेखात घेतली जाते.
  • एखादया क्षेत्रातील यश, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, अडचणींचा केलेला सामना, महत्त्वपूर्ण कृती, उपक्रम, विक्रम या संदर्भातील लेखन या वृत्तलेखात करणे आवश्यक असते.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख बहुतकरून औचित्य साधून लिहिलेले असतात.
  • पुरस्कार, गौरव, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, अमृत महोत्सव इत्यादी प्रसंगी या प्रकारचे वृत्तलेख लिहिले जातात.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात वाचकांपुढे विशिष्ट व्यक्तीचा केवळ जीवनपट उभा करणे अपेक्षित नसते.
  • व्यक्तीच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणे आवश्यक असते.
  • अशा वेळी त्या व्यक्तीसंबंधी पूर्वी झालेले लेखन, चरित्र, आत्मचरित्र, सोबत काम केलेल्या व्यक्ती, स्नेहीजन यांच्या मुलाखती अशी विस्तृत माहिती मिळवणे उपयुक्त ठरते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या लेखनात व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखा, सनावळ्या, आकडेवारी एवढ्याचीच नोंद करून, परिचयात्मक माहिती लिहून चालत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे विचार, भूमिका, दृष्टिकोन, खास शैली, सवयी इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
  • माहितीतील तांत्रिक बाबींत अधिक न अडकता व्यक्ती जीवनातील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेखाचे वैशिष्ट्य म्हणता येते. उदा., सिंधुताई सकपाळ, बीजमाता राहीबाई पोपरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.

3. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख :

  1. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या प्रसार माध्यमांवर होणाऱ्या मुलाखती लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. त्याला मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असे संबोधले जाते.
  2. या प्रकारच्या वृत्तलेखातून विशिष्ट क्षेत्रात कार्याने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या व्यक्ती, त्यांचा कार्यप्रवास, महत्त्वपूर्ण संशोधन, मतप्रणाली, त्यांचे कार्यक्षेत्र, यश, अडचणी, अनुभव यांसारख्या ५ मुद्दयांची गुंफण करणे आवश्यक असते.
  3. कार्यसिध्द व्यक्तींची स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या वृत्तलेखात करणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य लोक व्यक्तिजीवनातील ज्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत, अशा गोष्टींचा परिचय करून देणे वृत्तलेखाचे प्रधान कार्य असते.
  4. विशिष्ट व्यक्तीच्या कर्तृत्वाची उंची आणि संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वृत्तलेखात करणे गरजेचे ठरते. उदा., नामवंत लेखक, गिर्यारोहक, संशोधक इत्यादींच्या मुलाखतीवर आधारित लेख.

4. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात संशोधनात्मक लेखन असते. प्राचीन मंदिरे, लेण्या, स्थळे, गावे इत्यादी संदर्भातील उपलब्ध माहितीच्या आधारे नव्याने माहिती देणारा ऐतिहासिक स्वरूपाचा वृत्तलेख लिहिणे अपेक्षित असते.
  • गावे, स्थळे, प्राचीन मंदिरे, वस्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात.
  • या वृत्तलेखात अशा ऐतिहासिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणे आवश्यक असते.
  • शिलालेख, नाणी, भूर्जपत्रे, ताम्रपट यांच्या इतिहासकालीन रूपाचा बदलत्या काळात नव्याने अर्थ शोधला जात आहे. नवनवीन माहिती समोर येत आहे.
  • संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखादया वस्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. या नव्या माहितीच्या संदर्भात वृत्तलेख करणे महत्त्वाचे ठरते.
  • लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती यासंदर्भात वृत्तलेखक विविध क्षेत्रभेटीतून जे जे अनुभवास आले, त्याला अनुलक्षून वृत्तलेखन करू शकतो. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख लिहित असताना इतिहास तज्ज्ञ, त्यांच्याशी विषयानुरूप केलेल्या चर्चा, व्याख्यान, मुलाखती इत्यादीचे साहाय्य घेणे उपयुक्त ठरते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखात आवश्यकतेनुसार नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा वापर करता येऊ शकतो. उदा., शनिवारवाडा, हेमाडपंथीय मंदिराचे शिल्पकाम, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर इत्यादी.

5. नवल, गूढ इत्यादींवर आधारित वृत्तलेख :

  • एखादी विस्मयकारक घटना, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित लेखन या प्रकारच्या वृत्तलेखात केले जाते.
  • एखादया परिसरातील निसर्गाच्या आश्चर्यजनक किमया, गूढ, अनाकलनीय गोष्ट, निसर्गातील एखादी लक्षवेधी परंतु चमत्कारिक गोष्टदेखील वृत्तलेखाचा विषय होऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या वृत्तलेखात माहितीची विश्वासार्हता तपासणे फार महत्त्वाचे असते. उपलब्ध माहितीची शहानिशा करणे, माहितीची पारख करणे, चिकित्सा करणे यांसारख्या बाबी प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे असते.
  • निसर्गातील अनाकलनीय गोष्टी सत्यतेच्या चाचणीतून लेखात मांडणे अतिशय कौशल्यपूर्ण काम असते. वृत्तलेखकाला जबाबदारीने या प्रकारच्या वृत्तलेखाचे लेखन करणे आवश्यक असते.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा अफवा पसरवणारी माहिती, नोंदी, नकारात्मकता वृत्तलेखातून प्रकट होणार नाही याची काळजी कटाक्षाने या प्रकारच्या वृत्तलेखात घ्यावी लागते.
  • उदा., सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी ५८ फूट, रांजणखळगे, गरम पाण्याचे कुंड इत्यादी. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरुचीचे कार्यक्रम, खादयसंस्कृती इत्यादी विषयांवरही वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात.

वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत :

प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सध्या घटनेतही बातमी दिसत असते. वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव, प्रवास, भेटणाऱ्या व्यक्ती विविध वर्तमानपत्रातील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळ यांसारख्या विविध साधनांच्या आधारे वृत्तलेखाचे विविध विषय मिळत असतात. वृत्तलेखाच्या विषयांचे काही महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे –

1 बातमी :

  •  वृत्तलेखात बातमीपलीकडची बातमी चित्रित केलेली असते. वर्तमानपत्रात, नियतकालिकात छापील स्वरूपात आलेल्या बातम्या वृत्तलेखाला विषय पुरवत असतात.
  • दूरचित्रवाणीवर दाखवली जाणारी एखादी घटना लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज रुजवत असते.
  • बातमीपेक्षा अधिक काही जे बातमीत दडलेले असते, त्याचा शोध वृत्तलेखात घेणे आवश्यक असते.
  • बातमीसोबत जोडले असलेले संदर्भ, दुवे, महत्त्वाच्या गोष्टी, मुलाखती यांच्या साहाय्याने बातमीच्या आधारावर वृत्तलेखनाचा मजकूर फुलवता येऊ शकतो.
  • कुठल्याही बातमीकडे सूक्ष्मपणे पाहिले, त्यातील बारकावे लक्षात घेतले, तर वृत्तलेखासाठी भूमी तयार होऊ शकते.
  • बातमी, बातमीभोवती असणारे विविध कंगोरे, बातमीचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला, तर वृत्तलेखासाठी अनेक विषय मिळू शकतात.
  • उदा., ‘अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त’ या बातमीच्या आधारे, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महत्त्व, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ५ अभिनयाचा प्रवास, महत्त्वाचे चित्रपट, कौटुंबिक पार्श्वभूमी, अमिताभ बच्चन यांचा जीवनप्रवास इत्यादी मुद्द्यांच्या आधारे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. व्यक्तिगत अनुभव :

  • पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे नित्यनवा जिवंत अनुभव असणारे क्षेत्र मानले जाते.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना रोज नव्या आव्हानात्मक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते.
  • बातमी बघताना अनेक अनुभव मिळत असतात. या अनुभवांपैकी काही मूळ बातमीस पूरक ठरतात, तर काही अनुभव लेखकाच्या मनात साठवले जातात. या अनुभवांची शिदोरी लेखकाला वृत्तलेखात उपयोगी पडते.
  • या अनुभवांचा पुनरुच्चार एखादया वृत्तलेखात करता येऊ शकतो. गतकाळातील अनुभवात भविष्यातील एखादया वृत्तलेखाची बीजे रुजलेली असतात.
  • उदा., ‘आश्रमातील मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप’ अशा बातमीच्या भोवताली लहान मुलांचे भावविश्व, मुलांचे आश्रमातील जीवन, कुटुंबापासून दूर असल्याची भावना, लहान मुलांची शैक्षणिक, वैचारिक जडणघडण असे कितीतरी बातमीमागचे पैलू लेखकाला दिसू शकतात.
  • यासंदर्भाच्या आधारे ‘एकटेपणात अडकलेले बालविश्व’ अशा प्रकारचा वृत्तलेख निश्चितच आकाराला येऊ शकतो.

3. भेटीगाठी/संभाषण :

  • पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना नेहमी लोकसंपर्कात राहणे गरजेचे असते. यासाठी व्यवसायाची गरज म्हणून संवादकौशल्य हवे असते. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. लेखनकौशल्यावर प्रभुत्व असावे लागते.
  • पत्रकारितेत अनेकदा विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी ते सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक घटकातील व्यक्तींशी संवाद साधावा लागतो.
  • प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, खेळाडू यांच्याशी संभाषण करीत असताना कितीतरी स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कितीतरी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करावी लागते.
  • कधी कधी व्यक्ती बोलत नाहीत; अशा वेळी बातमी जाणून घेण्यासाठी व्यक्तींना बोलते करण्याचे काम पत्रकारांना करावे लागते.
  • या गप्पांमधून वृत्तलेखासाठी आवश्यक बरेच विषय मिळू शकतात. व्यक्ती ते घटना/प्रसंग यामागील अनेक पैलूंचा वेध घेण्याचे काम वृत्तलेखक करीत असतो. या सर्वांतून वृत्तलेखाचा विषय सहज मिळू शकतो.

4 निरीक्षण :

  • पत्रकारिता क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला सदैव चौकस राहावे लागते. बातमीचे धागेदोरे शोधावे लागतात.
  • अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्यातून बातमी शोधता येणे पत्रकारितेत आवश्यक असते.
  • अशा सजगतेतून वृत्तलेखाचे विषय मिळत असतात. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात.
  • उदा., ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणसांचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी भोवती घडत असतात.
  • यातूनच वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात.

वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि पडदयामागे घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. तर्कबुद्धी या लेखनात गरजेची असते.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल, याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्रांच्या विक्रीची आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यादृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो.

वृत्तलेखात पुढील बाबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात –

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 2

(१) वाचकांची अभिरुची : वर्तमानपत्राला बातमीसोबत वाचक वर्ग कोणता आहे, याचा विचारही प्राधान्याने करावा लागतो. वाचकांची अभिरुची वर्तमानपत्रीय गणितात महत्त्वाची मानली जाते. वाचकांची गरज आणि आवड बघून वृत्तलेखाच्या विषय, आशय, भाषा यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी केली तर लोकांच्या पसंतीस पडू शकतात. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून लिहिलेले वृत्तलेख वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकतात. वृत्तलेखात वाचकांच्या अभिरुचीचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक असते.

(२) तात्कालिकता : वृत्तलेख नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तर वाचक तो लेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(३) वेगळेपण : वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा, समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात येण्याची गरज असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

(४) वाचकांचे लक्ष वेधणे : वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. वृत्तलेखाचा आराखडा ठरवणे आवश्यक असते. वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, तक्ता, नकाशा, छायाचित्र इत्यादी बाबींचा विचारही वृत्तलेखाच्या मांडणीत करणे गरजेचे असते. मजकुराला समर्पक चित्र/छायाचित्र कुठे उपलब्ध होईल, तसेच त्याचा नेमकेपणाने उपयोग मजकुराच्या कोणत्या भागात करता येईल, याचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार लेखकाला करावा लागतो. यासंबंधीचे नियोजन केले, टिपण काढले, चित्रांची मांडणी ठरवली, तर वृत्तलेख लिहिणे सोपे होते.

(५) वृत्तलेखाची शैली : वृत्तलेखात बातमीच्या पलीकडे असणारे कंगोरे शोधावे लागतात. साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीत तीन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात वृत्तलेखातील बातमीचा उलगडा केला जातो. बातमीतील ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागात होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. वृत्तलेखाच्या समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार मांडणे गरजेचे असते.

वृत्तलेख सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणे आवश्यक असेल, तर त्याची साधी, सोपी सहज आकलन करता येण्याजोगी असावी. बोजड शब्द, गुंतागुंतीची वाक्यरचना, शब्दबंबाळपणा वृत्तलेखात टाळावा. वृत्तलेखातील वाक्यरचना लहान वाक्यांची असल्यास वाचकांना विषय समजून घेणे सुलभ होते. मनावर पकड घेण्यास परिणामकारक भाषा असावी. ज्या विषयासंबंधी वृत्तलेखाचे औचित्य आहे, तो विषय लोकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्यात सफल झाला आहे, याचा विचार करणे आवश्यक असते.

वृत्तलेखातील व्यावसायिक संधी :

  • आज वेगवान माध्यमांच्या काळात लोकांपर्यंत बातमी पोहोचण्याचा वेग प्रचंड आहे. ब्रेकिंग न्यूजचा हा काळ आहे, असे म्हणता येते.
  • बातमीच्या मुळापर्यंत जाऊन समग्र घटना लोकांना वाचनास उपलब्ध करून देणे हे आव्हानात्मक आणि कौशल्याचे काम आहे.
  • अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी आवश्यक असतात.
  • चौकस दृष्टी, लेखनकौशल्य बातमीचा शोध घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
  • वृत्तपत्रांसाठी वृत्तलेखन करणाऱ्या लेखकांना विशिष्ट रकमेचे मानधनदेखील दिले जाते.
  • वृत्तलेखन बदलत्या माध्यमांच्या काळात युवावर्गाला आकर्षित करणारे क्षेत्र बनत आहे.

नोंद : वृत्तलेख समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.११० व १११ वर दिलेला वृत्तलेख नमुना अभ्यासा.

12 वी मराठी पुस्तक युवकभारती भाग-४ उपयोजित मराठी

Ahwal Class 12 Marathi Bhag 4.3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.3 अहवाल Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

12th Marathi Bhag 4.3 Exercise Question Answer Maharashtra Board

अहवाल 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 4.3 अहवाल Textbook Questions and Answers

कृती

1. अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर :
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम/सभांची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाललेखन होय. कार्यक्रम/ समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्व बाबींच्या नोंदी अहवालात केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाललेखन दस्तऐवज मानले जाते. संस्थेच्या भविष्यकालीन नोंदींसाठी अहवाललेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवाललेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाललेखनाचा आराखडा भिन्न असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहवालाची विश्वसनीयता होय. अनेक गुंतागुंतीच्या समस्येत अहवालाचा पुरावा म्हणूनही वापर करता येतो. अहवाल निःपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

2. अहवालाची आवश्यकता लिहा.
उत्तर :
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक गोष्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या/सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघुउदयोग ते मोठमोठे उदयोगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखादया क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल, तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

3. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. संस्थेच्या सभा/कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो. ‘जसे घडले तसे सांगितले’ असे अहवालाचे स्वरूप असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते. अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा सर्वांमध्ये एकसामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे, निःपक्षपातीपणा.

अहवाललेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. त्या त्या सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय अनुभवले, पाहिले, ऐकले यांविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात करणे आवश्यक असते. अहवालावर संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा निश्चित होत असतो. सदय:स्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

4. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा.

प्रश्न 1.
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता
उत्तर :
एखादया घटना/प्रसंगाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल होय. अहवाललेखनात संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटत असते. भविष्यातील निरनिराळ्या योजनांच्या नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतो. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा विषय, तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी मान्यवर, लोकांचा सहभाग, प्रतिसाद, निष्कर्ष, सांख्यिकीय माहिती इत्यादी अनेक बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. त्या नोंदी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. अहवालात नोंदवलेल्या माहितीच्या बाबतीत संदिग्धता असून चालत नाही. अहवालातील वाक्यरचना स्पष्ट असणे आवश्यक असते. सहज अर्थबोध होणे अभिप्रेत असते. माहितीचे स्वरूप सुस्पष्ट असावे. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचा परामर्श अहवालात घेता येत नाही. कार्यक्रम प्रसंगी जे जे घडले आणि जे जे पाहिले, ऐकले त्याचे खरे रूप अहवालात येणे प्रधान असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

प्रश्न 2.
शब्दमर्यादा
उत्तर :
अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. स्थानिक पातळीवरील अहवाल आकाराने लहान असतात, शब्दमर्यादा आटोपशीर असते. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा यांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवालाची शब्दमर्यादा कमी असते. कार्यक्रमाचा संपूर्ण गाभा अहवालात मांडायचा असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालात कार्यक्रमातील घटनांचे वर्णन पाल्हाळीक असू नये. एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती असू नये.

एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. अशा अहवालात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असू शकतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

प्रश्न 3.
नि:पक्षपातीपणा
उत्तर :
कोणत्याही अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नि:पक्षपातीपणा होय. अहवाललेखन कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नसते. अवास्तव व्यक्ती/घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नसते. अहवाल घडलेल्या कार्यक्रमाचा आरसा असतो. त्यामुळे अहवालात कुठल्याही अतार्किक, कल्पनारम्य गोष्टींना स्थान नसते. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचे रोपण अहवालात करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. निःपक्षपातीपणा अहवालात केंद्रस्थानी असतो.

5. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
अहवाललेखन ही एक कला आहे. अहवाललेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले, तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते. अहवाललेखनात दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

(१) अहवाललेखकाचे भाषेवरील प्रभुत्व : अहवाललेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाललेखकाकडे असणे आवश्यक असते. अहवाल सादर केला जातो; त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज, सोपी चटकन आशय लक्षात येईल अशी असावी. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे. अहवाललेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द, संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे.

उदा., अहवाललेखनात भाषेतील शब्दांचे संदर्भानुसार उपयोजन माहीत नसेल, तर मजकुराचा अर्थभेद होऊ शकतो. एखादया कार्यक्रमाच्या अहवालात ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली’ या वाक्यरचनेऐवजी ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा केली’ अशी वाक्यरचना जर लिहिली गेली, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

(२) सारांश रूप : अहवाल हा कार्यक्रमाचा गाभा असतो. कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संक्षिप्तपणे कागदावर अहवालाच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. सर्व घटना/प्रसंग शब्दांत मांडणे शक्य नसते. कार्यक्रम प्रसंगी घडलेल्या घटनांचा क्रमबद्धरीतीने सारांश रूपाने आढावा घेण्याचे काम अहवाल करीत असतो. अहवाललेखनात पाल्हाळ असता कामा नये. मोजक्या परंतु नेमक्या घटनांची समर्पक शब्दांत मांडणी करता येणे अपेक्षित असते.

उदा., महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाललेखनात पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे नावासहित उद्धृत करणे अपेक्षित असते. सर्व विदयार्थ्यांचे संपूर्ण भाषण नमूद करणे योग्य नाही. सारांश रूपाने विषय मांडणी करणे अभिप्रेत असते.

6. खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा.

प्रश्न अ.
तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील स्नेहसंमेलन.
उत्तर :
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविदयालय
नागपूर

वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ – २०२०
अहवाल

शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महाविदयालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विदयार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व अध्यापक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचा आरंभ ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविदयालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विदयार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविदयालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विदयार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी (अ) मधील विदयार्थांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविदयालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विदयार्थ्यांनी मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून चार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विदयार्थ्यांना दाखवले.

यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वांत अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विदयार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविदयालयीन स्पर्धांमध्ये महाविदयालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विदयार्थ्यांचे महाविदयालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कवितावाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरीत करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविदयालयाचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’. बारावी (अ) कला शाखेच्या कपिल बोरसे या विदयार्थ्याने २०१९ – २०२० या वर्षातील ‘आदर्श विदयार्थी पुरस्कार’ देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. गणेश दिघे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविदयालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विदयार्थ्यांप्रती असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विदयार्थ्यांना सदय सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विदयार्थांचे अभिनंदन केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विदयार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

प्रश्न आ.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
उत्तर :
नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय
नांदेड

जागतिक पर्यावरण दिन : वृक्षारोपण कार्यक्रम
अहवाल

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जागतिक पर्यावरण दिन’ बुधवार दि. ५ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविदयालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविदयालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

वृक्षारोपण कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अर्जुन नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

महाविदयालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘गुलाब’ फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविदयालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विदयार्थिनी मृण्मयी बडे हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन नवले यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. अर्जुन नवले यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली. औषधी वनस्पतींची महत्त्वाची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले.

यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपणात सहभागी झाले. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच यांचे रोपण करण्यात आले. प्राचार्यांच्या हस्ते निलगिरीच्या रोपाचे रोपण करण्यात आले. यावर्षीच्या वृक्षारोपण सोहळ्यात कनिष्ठ महाविदयालयातील वर्ग प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा, तुळस, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण चार वर्ग प्रतिनिधींनी अनुक्रमे केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोखले या बारावीतील विदयार्थ्याने केले होते. भूगोल विभागातील प्रा. गीता नाईक यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले.

दोन तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली.

डॉ. अनिल राऊत
जीवशास्त्र विभाग

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

अहवाल प्रस्तावना

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. या उपक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय/खाजगी संस्थेला समिती स्थापन करावी लागते. या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. हा आढावा म्हणजे अहवाल होय. कोणत्याही संस्था कार्यकारिणीतील सदस्यांसाठी अहवाल महत्त्वाचा घटक मानला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शाळामहाविदयालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने यांचे अहवाल आवर्जून लिहिले जातात. संस्थात्मक पातळीवर अहवाललेखन अपरिहार्य असते. कार्यक्रम/समारंभाची तपशील माहिती अहवालातून मिळत असते.

अहवाललेखनाचे स्वरूप :

  • एखादया कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभांची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे ‘अहवाललेखन’ होय.
  • अहवालाचे स्वरूप लेखी असते. अहवाललेखन संस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते.
  • संस्थेच्या कार्यक्रमाच्या आरंभापासून ते संपन्नतेपर्यंत कार्यक्रमाची सविस्तर परंतु मुद्देसूद नोंद अहवालात केली जाते.
  • संस्थात्मक कामांच्या निर्णय प्रक्रियेतील लहानात लहान घटकापासून ते संचालकांपर्यंत अहवालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
  • अहवाललेखनात सत्यता आणि वस्तुनिष्ठपणा फार महत्त्वाचा असतो.
  • अहवाल मुद्देसूद आणि नेमका असणे आवश्यक असते.
  • कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेच्या पुढील योजनांचे नियोजन करणे, प्रगती साधणे शक्य होते. प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल, वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल असतात.

अहवाललेखनाची उपयुक्तता :

  • कार्यक्रम/समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाललेखनाचा उपयोग होतो.
  • संस्थेचा विकास, गती, उणिवा अहवालाद्वारे संस्थाचालकांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य होते.
  • संस्थेच्या कामकाजातील, कार्यक्रमातील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जातो.
  • विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योग आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते.
  • संस्था, शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा दस्तऐवज म्हणून अहवाललेखनाकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे संस्था अहवालाचे जतन करीत असतात.
  • कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, मांडलेले विचार, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा अहवालात समावेश केलेला असतो.
  • अहवालात माहितीची सत्यता, सविस्तर परंतु नेमक्या नोंदी, वस्तुनिष्ठता इत्यादी बाबींचा अवलंब करताना लेखनकौशल्यावरील प्रभुत्व सिद्ध होत असते. सरावाने अहवाललेखनात मुद्देसूदपणा प्राप्त करता येतो.
  • अहवालाच्या साहाय्याने संस्थेला भविष्यकालीन योजनांचा कृतिआराखडा ठरवणे शक्य होते.

अहवालाचा आराखडा :

  • कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्र विषयानुसार अहवालाच्या आराखड्यांचे मुद्दे बदलत असतात.
  • एकाच महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि क्रीडास्पर्धा यांच्या अहवालाचे स्वरूप भिन्न असू शकते.
  • स्पर्धेचे, कार्यक्रमाचे स्वरूप बदलले की अहवाललेखनातील मुद्दे बदलतात.
  • विषयाच्या स्वरूपानुसार अहवाललेखन, त्यांची रचना, घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखनाची वैशिष्ट्ये :

  • कोणत्याही संस्थेच्या कार्यालयीन कामात अहवाललेखन अत्यंत विश्वासार्ह दस्तऐवज मानले जाते. कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अहवालातून मिळत असते. अहवाललेखनाची काही वैशिष्ट्ये समजून घेऊ.

वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता :

  • अहवाललेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, पदे, विवेचन, महत्त्वपूर्ण घटना, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद असते. यात वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असते.
  • अहवाललेखनात घटना-प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाललेखनातील नोंदी अचूक आणि सुस्पष्ट असाव्यात.
  • अहवाललेखनातील सर्व मुद्दे पारदर्शी असणे आवश्यक असते.
  • अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ तसेच शिफारसी जोडाव्यात.

विश्वसनीयता :

  • संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाललेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते.
  • अहवाललेखनातील घटक सत्य असावे.
  • अहवाललेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नये.
  • कार्यक्रमातील नोंदी, माहितीस्रोत, संदर्भ, शिफारसी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढते.
  • संस्थात्मक कामात कधी गुंतागुंतीची, संभ्रमाची परिस्थिती उद्भवली तर पुरावा म्हणूनही अहवालाचा वापर केला जाऊ शकतो.

भाषेचा सोपेपणा :

  • अहवालाची भाषा सहज, सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय कळेल असा सोपेपणा अहवालात असावा.
  • वस्तुनिष्ठता हे अहवालाचे एक वैशिष्ट्य असल्याने अहवालात अतिशयोक्ती, आलंकारिकता टाळली जाते.
  • तांत्रिकता, बोजड शब्दप्रयोग, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही, याची काळजी घेणे अपरिहार्य असते.
  • अहवालातील मजकूर सविस्तर मांडत असताना आशयाचा नेमकेपणा कायम ठेवणे हे आव्हानात्मक काम असते.
  • प्रत्येक क्षेत्राशी निगडित संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा यथोचित वापर करणे अहवाललेखनात गरजेचे असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शब्दमर्यादा :

  • संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या अवलंबून असते.
  • सर्वसाधारणपणे अहवाल संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते; परंतु यासाठी अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.
  • सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक यांसारखे अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा इत्यादींचे अहवाल विस्तृत असतात. अशा अहवालांचे स्वरूप निश्चित असते.
  • एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय, सार्वजनिक सेवा (बस वाहतूक) यांसारख्या विषयाशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. विस्तृतपणे लिहिले जातात.
  • निरीक्षणे, तपशील, आकडेवारी, संख्यात्मक आलेख, निष्कर्ष अशा माहितीचा समावेश अहवालात असल्याने संशोधनात्मक, चौकशी अहवालांची शब्दमर्यादा अधिक असल्याचे दिसते.
  • एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

नि:पक्षपातीपणा :

  • अहवाललेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने त्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शीपणा.
  • प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा नि:पक्षपातीपणा हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
  • अहवाललेखनात व्यक्तिसापेक्षता असू नये.
  • अहवाललेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात असू नये. उलट संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात उमटणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकाल्पित गोष्टी अहवाललेखनात असू नयेत.
  • वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो.
  • संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यांमधील सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा, वास्तव अनुभव शब्दरूपात अहवालात येणे अपेक्षित असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

लक्षात ठेवावे :

  • अहवाललेखनात शीर्षक, उपशीर्षक यांच्या अनुषंगाने सर्व मुद्दे असावेत. अहवालाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत सुसंगत मांडणी असावी.
  • अहवाल ‘सादर’ केला जातो; त्यामुळे अहवाललेखन करणारा आणि अहवाल वाचणारा हे दोन्ही घटक अहवाल निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात.

अहवाललेखनाची प्रमुख अंगे :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 1
अहवाललेखनाचा आराखडा समजून घेताना वरील चार अंगे विचारात घ्यावी लागतात.

  1. अहवालाचे प्रास्ताविक : अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू (कार्यक्रमाचा विषय) उदधृत केलेले असणे अपेक्षित असते. कार्यक्रम/समारंभ विषय, स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पदनाम, उपस्थित मान्यवरांची नावे, हुद्दे, अन्य उपस्थितांचा उल्लेख या बाबींचा समावेश असणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा आरंभ, स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करणे आवश्यक असते.
  2. अहवालाचा मध्य : संस्थात्मक सभा/कार्यक्रम/समारंभ यांसाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, उपक्रमांचे फलित, यासंदर्भातील भविष्यातील योजना, नियोजन यांबाबत क्रमवार, मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे नामोल्लेख तसेच त्यांचे वक्तव्य निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणे आवश्यक असते.
  3. अहवालाचा समारोप : कोणत्याही सभा/ कार्यक्रम/ समारंभ यांच्यातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे आवश्यक असते.
  4. अहवालाची भाषा : अहवाललेखनाची भाषा सोपी सहज आकलन होईल अशी असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली असते. अशा भाषेचा अवलंब अहवाललेखनात केला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

एक नमुना म्हणून महाविदयालयात साजरी केलेली ‘सावित्रीबाई फुले जयंती’ अहवाललेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते पुढील तक्त्याच्या साहाय्याने पाहू या –

विषय : ‘सावित्रीबाई फुले जयंती’ समारंभाचा अहवाल.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 2

शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अहवाललेखनात कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे जोडली जातात. अहवालाच्या विश्वसनीयतेत यामुळे निश्चितच भर पडते.

अहवाललेखनात महत्त्वाचे :

  • कोणत्याही अहवालाच्या पहिल्या पानावर अहवालाचे शीर्षक असावे. संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असावा.
  • अहवालाचा विषय लक्षात घेऊन अहवाललेखन करणे महत्त्वाचे असते.
  • शीर्षक, उपशीर्षक, संख्यात्मक माहिती, आलेख, संकलित माहिती, त्यावरून मांडलेले निष्कर्ष या सर्वांचा समावेश अहवालात मुद्देसूदपणे करणे अपेक्षित असते. अहवालात नमूद केलेले मुद्दे, उपमुद्दे, विविध प्रकरणे यांची अनुक्रमणिका जोडणे अपेक्षित असते.
  • अहवाल सादर करणाऱ्याचे नाव आणि हुद्दा नमूद करणे गरजेचे.

अहवाललेखन लालित्यपूर्ण लेखन प्रकारात येत नसले तरी अहवाललेखन ही कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य आहे – “The destiny of India is being shaped in her classrooms!” (भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे!) असे आहे. अशा लालित्यपूर्ण शैलीत विचार प्रकटीकरणामुळे अहवाललेखन लालित्यपूर्ण होऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी :

  • अहवाललेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी नेमकी जाण असली पाहिजे.
  • अहवाललेखन वास्तवदर्शी असायला हवे. जे घडले ते सुस्पष्टपणे लिहिणे अपेक्षित असते.
  • अहवाललेखनात विषयाला विसंगत असलेले स्वमत, विचार लिहू है नयेत. अहवाललेखनात अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असू नये.
  • अहवाल विषयाचे स्वरूप, वेगळेपण, विशिष्ट बारकावे टिपता आले पाहिजेत. यासाठी अहवाललेखकाकडे सूक्ष्म आकलन निरीक्षणशक्ती असली पाहिजे.
  • कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे.
  • अहवाललेखनात व्यक्तींची नावे, हुद्दा चुकीची लिहिली जाऊ नयेत. घटनाक्रम चुकवू नये.
  • न घडलेल्या घटनांचा उल्लेख करू नये.
  • अहवाललेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी (मथळा, तारीख, वेळ, स्थळ, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक/पुरस्कार प्राप्त व्यक्ती इत्यादी) नोंदवणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे. विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाललेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते.
  • अहवाललेखनाची भाषा सहज, सोपी स्वाभाविक असावी.
  • आलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारी असू नये.
  • अहवाललेखनात सुसूत्रता असावी. अहवाल मांडणीत विस्कळीतपणा असू नये.
  • अहवाललेखन आरंभापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकात्म स्वरूपाचा असावा. अर्धवट, अपुरा असू नये किंवा तसा वाटू नये.
  • अहवाल लिहून झाल्यावर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षऱ्या केलेल्या असाव्यात.

नोंद : अहवाललेखन नमुना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.१०३ वर दिलेला अहवाललेखनाचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला अहवाललेखनाचा नमुनाही अभ्यासा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 3
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविदयालयाच्या वतीने ‘मराठी भाषा E गौरव दिन’ अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी २०२० रोजी गुरुवारी सकाळी महाविदयालयाच्या के. पी. रेगे सभागृहात मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

अभिनव शिक्षण संस्थेचे संचालक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विदयार्थीप्रिय शिक्षक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित आणि विदयार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कनिष्ठ महाविदयालय कला शाखेच्या विदयार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा’ या गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे प्रास्ताविक महाविदयालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद राणे यांनी केले. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी प्रास्ताविकात नमूद केली. इतिहास विभागाच्या प्रा. देविका कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. महाविदयालयाच्या प्राचार्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे अशी विनंती केली. महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महाविदयालयाच्या वतीने स्वागत केले.

यानंतर कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ‘मी मराठी’ या शीर्षकाची १५ मिनिटांची नाटिका सादर केली. नीलम काणे, दुर्गेश कर्वे आणि देविका भिडे या बारावीच्या विदयार्थ्यांचा यात सहभाग होता.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी उपस्थित सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा दिल्या. प्राचार्यांच्या सदिच्छापर भाषणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. मराठीतील अक्षरांच्या गमतीजमती सांगितल्या. अक्षरांचे व्यक्तिमत्त्व विविध उदाहरणातून उलगडून सांगितले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेतील काही ओळींच्या सुलेखनाचे प्रात्यक्षिक विदयार्थ्यांना दाखवले. त्याक्षणी उपस्थित सर्वच भारावून गेले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर असणाऱ्या वर्गाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बारावी (ब) या वर्गाने हे पारितोषिक पटकावले. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. वर्गप्रतिनिधी कोमल जोंधळे या विदयार्थिनीने वर्गाच्या वतीने पारितोषिक स्वीकारले.

यानंतर संस्थेचे संचालक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी अध्यक्षीय भाषण केले. मराठी भाषेचा गोडवा सांगत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्वही सांगितले. विदयार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्गाचे विविध उपक्रमांतील सक्रियतेसाठी कौतुक केले. हिंदी विभागप्रमुख अर्चना गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित प्राध्यापक वर्ग, निमंत्रित आणि विदयार्थी या सर्वांचे ऋण व्यक्त केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

दोन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माउलींच्या – पसायदानाने झाली.

प्रा. डॉ. आनंद राणे
मराठी विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

12 वी मराठी पुस्तक युवकभारती भाग-४ उपयोजित मराठी

Mahitipatrak Class 12 Marathi Bhag 4.2 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.2 माहितीपत्रक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

12th Marathi Bhag 4.2 Exercise Question Answer Maharashtra Board

माहितीपत्रक 12 वी मराठी स्वाध्याय प्रश्नांची उत्तरे

12th Marathi Guide Chapter 4.2 माहितीपत्रक Textbook Questions and Answers

कृती

1. माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.
उत्तर :
बदलत्या काळात उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संस्था/उत्पादन/सेवा यांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा वेळी ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठी उत्पादकांकडून माहितीपत्रकाचा वापर वाढला आहे. माहितीपत्रक कुठल्याही संस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा वैशिष्ट्यपूर्णरीत्या परिचय करून देत असते. जनमत आकर्षित करण्यासाठी एकप्रकारचे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. कमी वेळात, कमी खर्चात विश्वासार्ह माहिती ग्राहकाकडे माहितीपत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते. सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते करोडोंची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासते.

पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खादयपदार्थ, रेडीमेड साड्या अशा सर्वच बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, पतपेढ्या, पर्यटनसंस्था इत्यादींमध्येही समुदाय आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. तसेच, कला, संगीत, विविध अभ्यासक्रम, विविध बांधकामे, गृहसंकुल इत्यादी क्षेत्रांतही माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका निभावत असते. ज्या ज्या क्षेत्रात लोकआकर्षणाची गरज असते तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्था/उत्पादन/सेवा यांचा चेहरा असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

2. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा.

(अ) आकर्षक मांडणी
उत्तर :
माहितीपत्रक हे उत्पादनाचे परिचयपत्रक असते. संस्था/ उत्पादन/सेवा यांची सविस्तर माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. माहितीपत्रकातील छापील मजकूर जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढीच त्या मजकुराची पानावरची मांडणीही महत्त्वाची असते. माहितीपत्रक दिसताच क्षणी ते ‘वाचावे’से वाटले पाहिजे. पानांवर मजकुराची ठेवण, कागदाचा आकार, रंगीत छपाई, अक्षरांचा आकार, सुलेखन, समर्पक चित्रे इत्यादी गोष्टींचा बारकाईने विचार माहितीपत्रकात करणे आवश्यक असते. माहितीपत्रकावरील शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य यांचे स्थान नेमके असावे. तंत्रज्ञानाच्या युगात रंगीत छपाई अधिक पसंत केली जात आहे. कागदाचा आकार मजकूर मांडणीला उठाव देण्यास साहाय्य करीत असतो. माहितीपत्रकातील अक्षरे ठळक दिसतील अशी असावीत. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी चित्रकार, कौशल्यपूर्ण कलाकार, संगणक तज्ज्ञ मदतीला असल्यास माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक होण्यास दिशा मिळते.

(आ) भाषाशैली
उत्तर :
आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. माहितीपत्रकाच्या दृश्यमांडणीत मजकुराला विशेष महत्त्व आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी त्यातील भाषाशैली ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी. परंतु ती अवास्तव असणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते.

उदा., ‘आमच्या घरगुती पोळीभाजी केंद्रात पोटभर जेवण मिळेल, घरच्या जेवणाचा अनुभव येईल, कमी किमतीत चवदार अन्न मिळेल.’ एवढ्या माहितीसाठी ‘पोटभर जेवण; घरच्या चवीचा स्वाद, किंमतही कमी, दयाल तुम्हीही दाद’ अशा एकाच वाक्यात सांगताना मनाला स्पर्श करणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे साहाय्यक ठरते. वाचकमनावर ठसा उमटवणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे आवश्यक असते.

3. थोडक्यात माहिती लिहा.

(अ) माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.
उत्तर :
आज स्पर्धेच्या युगात व्यापाराच्या बाबतीत उत्पादक आणि ग्राहक फार चौकस झाले आहेत. उत्पादकांना आपले उत्पादन/सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे अगत्याचे असते; तर घरबसल्या सर्व उत्पादनांची सविस्तर माहिती मिळवणे हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे असते. अशा वेळी ‘माहितीपत्रक’ या दोहोंत समन्वय साधत असते. आज असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. फळे-भाजी विकणाऱ्या सर्वसाधारण विक्रेत्यापासून करोडोंचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था, व्यापारी सर्वांनाच माहितीपत्रक आवश्यक असते. शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, विविध अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्था, प्रवासी कंपन्या, शेती अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, संगीत, कला यांसारख्या क्षेत्रांत माहितीपत्रक महत्त्वाचे ठरते.

उदा., एखादया शैक्षणिक संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विदयार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक गरजेचे असते. कारखाने, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, बचतगट, तसेच, औषधे, विद्युत उपकरणे, वाहने, वगैरेंची निर्मिती करणारे उदयोग, यांसारख्या क्षेत्रांतही माहितीपत्रक महत्त्वाचे असते. उदा., विद्युत उपकरणे खरेदी केल्यावर त्यांच्या जोडणीपासून उपयुक्ततेपर्यंत सर्व बाबी सविस्तर माहितीपत्रकात नमूद केलेल्या असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

(आ) माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.
उत्तर :
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. वेगवेगळ्या संस्था/कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रके काढत असतात. माहितीपत्रकामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. माहितीपत्रकात ‘माहिती’ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते.

जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनाविषयी औत्सुक्य निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.

4. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. माहितीपत्रक नवनवीन योजना/सेवा/उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेते यांपासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणामाल, दिवाळीअंक, घरगुती वापराची उपकरणे, अलिशान गाड्या अशा सर्वच उत्पादनाची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रक योजना/सेवा/उत्पादन यांचा आरसा असते. माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात. उत्पादनाचे वैशिष्ट्य, वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील, तिथे माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते.

5. महाराष्ट्रीय पदधतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुददे आवश्यक राहतील ते लिहा.
उत्तर :

  • भोजनगृह चालवणाऱ्या संस्थेचे अथवा सदर भोजनगृहाचे नाव, बोधवाक्य, बोधचिन्ह.
  • भोजनगृहाचा पत्ता/ स्थापना वर्ष/ नोंदणीक्रमांक/ दूरध्वनी/मोबाइल क्रमांक/ ई-मेल/ वेबसाईट इत्यादी.
  • भोजनगृह चालवणाऱ्या व्यक्तीचे/सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव/ संपर्क क्रमांक/ ई-मेल इत्यादी.
  • भोजनगृहासंबंधी प्राथमिक माहिती. (महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास जेवण, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, खादयपदार्थांचे वैशिष्ट्य.)
  • भोजनगृहातील सुविधा. (बैठक व्यवस्था, बैठक संख्या, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणी इत्यादी.)
  • भोजनगृहाची वैशिष्ट्ये. (शाकाहारी आणि मांसाहारी स्वतंत्र शेगडी; मालवणी, वैदर्भीय, मराठवाडी, खानदेशी, कोल्हापुरी, पुणेरी खादयपदार्थ यांचे वैविध्य.)
  • भोजनगृहाची माहिती. (उदा., खादयपदार्थांची यादी, किंमत, भोजनगृहाची वेळ, सुट्टीचा दिवस, घरपोच सेवा.)
  • भोजनगृहाची अन्य वैशिष्ट्ये. (विविध मसाले, लोणची, पापड, सांडगे, कोकम, आवळा सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध.)
  • भोजनगृहाची पूरक छायाचित्रे.
  • भोजनगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती/जवळील नावाजलेले ठिकाण इत्यादी.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

6. एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 1

माहितीपत्रक प्रस्तावना

आजचे युग हे स्पर्धेचे आहे. रोज नवनव्या संस्था, उदयोग उदयाला येत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने नवनव्या योजना जागतिक बाजारात सर्रास वावरत आहेत. एखादया संस्थेची, योजनांची, उत्पादनाची तपशीलवार माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळे ग्राहकही दिवसेंदिवस जागरूक आणि चौकस होऊ लागला आहे. ग्राहकाला घरबसल्या लिखित स्वरूपात हे तपशील माहितीपत्रकाच्या माध्यमातून उत्पादक उपलब्ध करून देऊ लागले आहेत. माहितीपत्रक हे एकाअर्थी उत्पादनाचे, संस्थेचे प्रसिद्धीपत्रकच असते. माहितीपत्रकास उत्पादक आणि ग्राहक यांतील अप्रत्यक्ष दुवा म्हणता येऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

माहितीपत्रकाचे स्वरूप :

  • एखादी संस्था, उद्योग, गृहोदयोग यांत दिवसेंदिवस नवनवीन योजनांची भर पडत असते. जागतिकीकरणाच्या युगात नवनवीन संस्था, बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मिती व वाढ होत आहे.
  • माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळत असते.
  • माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे लिखित स्वरूपातील परिचयात्मक पत्रक होय.
  • माहितीपत्रक हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे.
  • माहितीपत्रकामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात संवाद निर्माण होतो.
  • उत्पादनाला नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक पहिली पायरी असते.
  • माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असते.
  • माहितीपत्रक उत्पादनाविषयी जनसामान्यांच्या मनात कुतूहल, उत्कंठा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.

माहितीपत्रकाची आवश्यकता :

  • माहितीपत्रक म्हणजे सर्वसाधारणपणे प्रसिद्धीपत्रक असते.
  • निरनिराळ्या संस्था, व्यापारी कंपन्या, उत्पादक आपल्या योजनांची तसेच उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकांची निर्मिती करीत असतात.
  • फळे, भाजीपाला विक्रेत्यांपासून ते लक्षावधींची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. उदा., पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खादयपदार्थ, रेडीमेड साड्या अशा बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्वच वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्था, पतपेढ्या, पर्यटनसंस्था इत्यादींमध्येही समुदायाला आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते.
  • आपली वैशिष्ट्ये, वेगळेपण आणि ग्राहकाला होणारे फायदे अधोरेखित करण्यासाठी माहितीपत्रक उत्तम साधन असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

माहितीपत्रकाचे वर्गीकरण :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 2

लक्षात घ्यावे असे :

बऱ्याचदा ‘माहितीपत्रक’ आणि ‘परिपत्रक’ यांतील भेद समजून घेण्यात चूक होऊ शकते. माहितीपत्रक आणि परिपत्रक यांत पुसटशी सीमारेषा आहे. माहितीपत्रक मोठ्या जनसमुदायासाठी असते, तर परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काढले जाते. परिपत्रकात कायदेशीर बाबींचा अवलंब केलेला असतो, माहितीपत्रकाचे स्वरूप मात्र सामान्यजनांना आकलन होण्याजोगे असते. माहितीपत्रकात विश्वासार्ह माहिती असणे अपेक्षित असते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्थेचा/ उत्पादनाचा/सेवेचा चेहरा असते.

माहितीपत्रकाची रचना :

1. ‘माहिती’ला प्राधान्य :

  • माहितीपत्रकाच्या शीर्षकावरूनच त्याची प्रकृती लक्षात येते.
  • माहितीपत्रकाचा ‘माहिती’ देणे हा मुख्य हेतू आहे.
  • ज्या विषयाचे माहितीपत्रक आहे, त्याची सुसंगत, सविस्तर आणि अचूक माहिती त्यात असणे आवश्यक असते.
  • संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. उदा., संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणीक्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ई-मेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी.
  • माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ व सत्य असावी. अतिशयोक्ती तसेच चुकीची माहिती माहितीपत्रकात असू नये. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी असावी. सामान्य लोकांना सहज आकलन होईल अशी भाषिकरचना असणे आवश्यक असते.
  • माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये.
  • परीक्षेत माहितीपत्रक तयार करताना त्यात चित्रे काढणे अपेक्षित नाही.
  • फक्त भाषिक मजकूर पुरेसा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

2. माहितीपत्रकाची उपयुक्तता :

  • माहितीपत्रक हे उपयुक्त असावे. वाचून झाल्यावर चुरगळून फेकून न देता लोकांनी संग्रही ठेवावे अशा स्वरूपाचे असावे.
  • माहितीपत्रकात ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची माहिती असल्यास माहितीपत्रकाची उपयुक्तता नक्कीच वाढते.
  • माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात.
  • माहितीपत्रकांची काही क्षेत्रे : ग्राहकाचे दैनंदिन प्रश्न, आरोग्य, शेती, तांत्रिक किंवा वैज्ञानिक स्वरूपाची माहिती देणारे माहितीपत्रक.
  • ग्राहक अशा माहितीपत्रकांकडे लगेच वळतात. उदा., ‘कोरोनावर मात करताना अशी वाढवावी प्रतिकार शक्ती’, ‘फळांची खरी ओळख पटवताना…’, ‘कशी असते अन्नधान्यातील भेसळ?’

3. माहितीपत्रकाचे वेगळेपण :

  • बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचेही वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने केली जाते.
  • अन्य माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादींद्वारे वेगळेपण आणले जाते.

4. आकर्षक मांडणी (ले-आऊट) :

  • माहितीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. यासाठी माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असायला हवी.
  • माहितीपत्रकाचा आकार योग्य असावा. खूप मोठा व लहान असता कामा नये.
  • मध्यम आकारात माहितीच्या मजकुराची मांडणी नीटनेटकी करणे शक्य असते.
  • माहितीपत्रकाचे पहिले पृष्ठ लक्षवेधी असावे. शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य ठसठशीत असावे.
  • माहितीपत्रकाच्या कागदाची निवडही महत्त्वाची असते.
  • कागद अगदी हलका तसेच अगदी जाड असणेही योग्य नाही.
  • बदलत्या काळात रंगीत माहितीपत्रक ग्राहकाला आकर्षित करीत असतात. त्यांमुळे छपाई रंगीत असल्यास साहाय्य होते.
  • माहितीपत्रकाची मांडणी दर्जेदार करण्यासाठी वेळोवेळी संगणक तज्ज्ञ, कुशल कलाकार, चित्रकार इत्यादींची मदत घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

भाषाशैली :

  • आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे.
  • वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे.
  • माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी.
  • माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. उदा., गाण्याच्या नव्या वर्गांची माहिती देताना; ‘सूरांची बैठक पक्की केली जाईल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाण्याच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले जाईल.’ एवढा आशय एका वाक्यातून सांगण्याऐवजी पुढील मुद्दयांत तो मांडता येईल :

ठळक वैशिष्ट्ये :

  • सुरांची पक्की बैठक.
  • तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
  • सरावावर खास भर.

व्यावसायिक संधी :

  1. आजच्या स्पर्धेच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे आणि ती. वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांसाठी आवश्यक बाब आहे.
  2. आज बहुतांश माहितीपत्रके इंग्रजीतून निर्माण होत असल्याचे दिसते. अशा वेळी मराठीतून परिणामकारक माहितीपत्रके निर्माण करणाऱ्यांचे महत्त्व विशेष वाढताना दिसत आहे.
  3. तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि भाषेचे प्रभुत्व असणाऱ्या युवावर्गाला हे क्षेत्र खुणावत आहे.
  4. माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे.
  5. माहितीपत्रक संस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा चेहरा असल्याने माहितीपत्रकावरून संबंधित विषयाच्या कामाचा दर्जा लक्षात येत असतो. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीतून दर्जेदार माहितीपत्रक निर्मात्याला प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागला आहे.

नोंद : माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्दे समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९६ वर दिलेला माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढील नमुनाही अभ्यासा.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना :
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुलेखनाचे वर्ग नव्याने सुरू करायचे आहेत. अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. त्यासाठी –

  • ज्या संस्थेमार्फत सुलेखनाचे वर्ग चालवले जाणार आहेत त्या संस्थेचे बोधचिन्ह/बोधवाक्य, तसेच संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पदनाम.
  • संस्थेचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/नोंदणीक्रमांक/दूरध्वनी/मोबाइल क्रमांक/ई-मेल/वेबसाईट इत्यादी.
  • संस्थेची थोडक्यात माहिती. (संस्थेची स्थापना, स्थापनेचा हेतू, संस्थापक, अन्य उपक्रम इत्यादी.)
  • सुलेखन वर्गाविषयी सविस्तर माहिती. (वर्ग सुरू करण्यामागचा हेतू, वयोगट, कालावधी इत्यादी.)
  • सुलेखन वर्गासाठी असणाऱ्या सुविधा. (पेन, पेन्सिल, कागद, शाई इत्यादी साधनांची उपलब्धी, आवश्यक पुस्तके.)
  • सुलेखन वर्गाची वैशिष्ट्ये. (मर्यादित विदयार्थी संख्या, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शक, सुलेखनाचे प्रदर्शन, सुलेखनाची संधी इत्यादी.)
  • सुलेखन वर्गाचे भविष्यातील महत्त्व. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत
  • आधीच्या सुलेखन वर्गाची पूरक छायाचित्रे. (निवडक माजी विदयार्थ्यांच्या सुलेखनाची छायाचित्रे.)
  • सुलेखन वर्गाच्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती.
  • प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, फी स्वरूप, फी भरण्याचे टप्पे, सुलेखन वर्गाचा एकूण कालावधी, वेळ, सुट्ट्यांचे नियोजन, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक, सुलेखन वर्ग सुरू होण्याची तारीख इत्यादी.

नोंद : माहितीपत्रक समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.९८ व ९९ वर दिलेला माहितीपत्रकाचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला माहितीपत्रकाचा नमुनाही अभ्यासा.

माहितीपत्रकाचा नमुना
दर्शनी पृष्ठ :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 3

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

मागील पृष्ठ :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 43

12 वी मराठी पुस्तक युवकभारती भाग-४ उपयोजित मराठी