Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

12th Marathi Guide Chapter 11 आरशातली स्त्री Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 2

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 4

आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्रश्न 1.
घनगर्द संसार – ……………..
उत्तर :
घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
प्रेयस चांदणे – ……………..
उत्तर :
प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

प्रश्न 3.
प्राण हरवलेली पुतळी – ……………..
उत्तर :
प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

प्रश्न 4.
फाटलेले हृदय – ……………..
उत्तर :
फाटलेले हृदय – विस्कटलेले वेदनामय मन.

2. अ. वर्णन करा.

प्रश्न 1.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल –
उत्तर :
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

प्रश्न 2.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
उत्तर :
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

प्रश्न 1.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर :
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
उत्तर :
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

इ. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंग अ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
2. आभाळ झुल्यावर झुलणारी आ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
3. देह तोडलेले फूल इ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
4. पारंपरिकतेचे वरदान ई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा उ. मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंग उ. मनातले सुंदर भाव
2. आभाळ झुल्यावर झुलणारी इ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
3. देह तोडलेले फूल ई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
4. पारंपरिकतेचे वरदान आ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा अ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न अ.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

प्रश्न आ.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली –
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते – तू रडू नकोस.

ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

6. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले.

तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

उपक्रम :

‘स्त्री’विषयक पाच कवितांचे संकलन करा. त्यांचे वर्गात लयीत वाचन करा.

तोंडी परीक्षा.

‘आरशातली स्त्री’ या कवितेचे प्रकट वाचन करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Additional Important Questions and Answers

(काव्यसौंदर्य / अभिव्यक्ती)

पुढील ओळींचा अर्थ लिहा :

प्रश्न 1.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य…!
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते -त् नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते – पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येये उराशी बाळगलीस. तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाहय बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा
स्वतःशी केलेला सार्थ संवाद आहे,’ हे विधान स्पष्ट करा. –
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला, परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली.

म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वत: केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

व्याकरण

वाक्यप्रकार :

आशयावरून पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती बदललीस तू अंतर्बाय! → [ ]
  2. आरशात पाहून डोळे भरून आले. → [ ]
  3. तू बोलत का नाहीस? → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. → [ ]
  2. तू रडू नकोस. → [ ]
  3. जर आत्मविश्वास असेल, तर जीवन समृद्ध होईल. → [ ]
  4. डोळ्यांतले आसू तळ्यात सोडून दे. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आशार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. तू रडू नकोस. (होकारार्थी करा.)
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घे, (विधानार्थी करा.)
  3. अंगणात दिवे लावावेत. (आज्ञार्थी करा.)
  4. शुभ्र कमळाची फुले आण. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. तू हसत राहा.
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घेतले पाहिजेत.
  3. अंगणात दिवे लाव.
  4. शुभ्र कमळाची फुले आणशील का?

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा व समास ओळखा :

सामासिक शब्द विग्रह समास
1. नवयौवना
2. ध्येयगंगा
3. पूर्वरंग
4. अस्तित्वहीन

उत्तर:

सामासिक शब्द विग्रह समास
1. नवयौवना नवीन अशी तरुणी कर्मधारय समास
2. ध्येयगंगा ध्येयाची गंगा विभक्ती तत्पुरुष समास
3. पूर्वरंग पूर्वीचा रंग विभक्ती तत्पुरुष समास
4. अस्तित्वहीन अस्तित्वाने हीन विभक्ती तत्पुरुष समास

प्रयोग :

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. → [ ]
  2. तळ्यात कमळे फुलली. → [ ]
  3. स्त्रीने आरसा पाहिला. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात.
2. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते.
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

आरशातली स्त्री Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्या वेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे.

संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अब्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले – ‘तूच तीच आहेस, जिला माझेच रूप लाभले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून-बाहेरून पूर्णत: बदलली आहेत. तू पूर्वीची ‘ती’ राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक. मी तुला सांगते तू कशी होतीस ते, तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते.

तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस, स्वप्नांचे पंख . लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आजमितीला, या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे.

आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासनू फूल तोडून घ्यावे, तसे तुझे ओठ म्लान, निपचित, पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुढत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवसरात्र तू आतल्याआत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे, अशी तू स्वत:ची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस.

तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहे. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवले आहे.

असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्त्व पाहून माझे काळीज वेदनेने आक्रंदते. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस, तनामनाला सहन न होणाऱ्या वेदना तु पदराने झाकतेस. नि बळेबळेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस.’

आरशातल्या स्त्रीचे (बाईच्या दुसऱ्या मनाचे) बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले. स्वत:च्या अस्तित्वाचे भान येऊ लागले; तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत, मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली – ‘अशी उन्मळून रडू नकोस. सावर स्वत:ला. ऊठ. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडू दे. दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीसत्वाने जग. जा त्या तळयात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम, ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड झुगारून टाक.’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

शब्दार्थ :

  1. ल्यालेली – अंगिकारलेली, घेतलेली.
  2. अंतर्बाहय – आतूनबाहेरून.
  3. अंतर – मन.
  4. पूर्वरंग – गतस्मृती.
  5. तरंग – लाटा.
  6. बहर – फुलोरा.
  7. नवयौवना – नवतरुणी.
  8. ध्येयगंधा – ध्येयाने प्रेरित व गंधित झालेली.
  9. नखशिखान्त – पावलांपासून डोक्याच्या केसापर्यंत.
  10. स्थितप्रज्ञा – स्थिर बुद्धीची.
  11. देह – अंग, शरीर.
  12. घनगर्द – घनदाट.
  13. अहोरात्र – रात्रंदिवस.
  14. पारंपरिकता – पूर्वीपासून आचरणात आलेली जीवनमूल्ये.
  15. वरदान – कृपा, आशीर्वाद
  16. प्रेयस – अतिशय प्रिय.
  17. भान – जाणीव.
  18. अल्लड – खेळकर.
  19. पेंगुळणे – झोपेची झापड असणे.
  20. अस्तित्वहीन – अस्तित्व नसलेली.
  21. पुतळी – स्थिर, शिल्प.
  22. हंबरणे – गहिवरणे.
  23. कंठ – गळा.
  24. हुंदका – रडण्याचा आवाज.
  25. असहय – सहन न होणाऱ्या (कळा).
  26. हिंदकळणे – पाणी हलणे.
  27. अधिकारवाणी – हक्काने बोलणे.
  28. खुळे – वेडे.
  29. आसू – अश्रू.
  30. शुभ्र – पांढरीस्वच्छ.
  31. प्रसन्न – टवटवीत.
  32. गोंजारणे – कुरवाळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. डोळे भरून येणे – गलबलून डोळयांत अश्रू येणे.
  2. मन उलगडणे – मनातील भावना मोकळ्या करणे.
  3. भान नसणे – जाणीव नसणे, गुंग होणे.
  4. काळीज हंबरणे – मन गलबलणे.
  5. फाटलेले हृदय शिवणे – विखुरलेल्या भावना एकत्र करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

12th Marathi Guide Chapter 10 दंतकथा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ………
उत्तर :
लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही; कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 2.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण ………
उत्तर :
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये, असे लेखकांना वाटते; कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 7

इ. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 9
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 11

2. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. [ ]
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. [ ]
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. [ ]
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. [ ]
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. [ ]
उत्तर :
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. दात
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. राक्षस
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. वनराज
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कमनशिबी
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. कुंदकळ्यांची

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
उत्तर :
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो – कर्तरी प्रयोग

प्रश्न 2.
सगळे खूष होतात-
उत्तर :
सगळे खूष होतात – कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
उत्तर :
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले – कर्मणी प्रयोग

प्रश्न 4.
डॉक्टरांनी लीलया दात उपटला-
उत्तर :
डॉक्टरांनी लीलया दात उपटला – कर्मणी प्रयोग

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 12
उत्तर :

सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
1. पंचमहाभूते पाच महाभुतांचा समूह द्विगू
2. परमेश्वर परम असा ईश्वर कर्मधारय
3. शब्दप्रयोग शब्दाचा प्रयोग विभक्ती तत्पुरुष
4. शेजारीपाजारी शेजारी, पाजारी वगैरे समाहार द्वंद्व
5. विजयोन्माद विजयाचा उन्माद विभक्ती तत्पुरुष

इ. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

प्रश्न 1.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
उत्तर :
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

ई. खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

प्रश्न 1.

  1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
  2. शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
  3. तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

उत्तर :

  1. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.
  2. शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.
  3. किती हाडं हैत तुझ्या अंगात!

4. स्वमत.

प्रश्न अ.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
उत्तर :
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.

मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.

डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.

दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, “एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो.” हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न आ.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.

दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.

दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल.

प्रश्न इ.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
उत्तर :
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.

प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.

माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत. आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

5. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर :
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी ‘दंतकथा’ हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.

वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे.

प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.

भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. ‘दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर’ अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

उपक्रम :

डोळे व नाक या अवयवांशी संबंधित वाक्प्रचारांची यादी करा.

तोंडी परीक्षा.

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. नक्षा उतरणे
  2. शंख करणे
  3. दात घशात घालणे
  4. खल करणे
  5. चारीमुंड्या चीत होणे
  6. सिंहाचा बकरा होणे
  7. मेख मारणे

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Additional Important Questions and Answers

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण –
लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण –
आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण –
परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण –
उत्तर :
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण माणसाला जन्मत:च सर्व अवयव फुटतात; पण फक्त दातच जन्मानंतर सहा-सात महिन्यांनी येतात.

लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार आढळत नाही.

आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण परशा स्वतःला लेखकांपेक्षा प्रचंड ताकदवान समजायचा आणि येताजाता लेखकांची मानहानी करायचा.

परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण परशाला दात घासायचा कंटाळा यायचा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 13
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 14

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा [ ]
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा [ ]
  3. परशाची सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी अवस्था करणारा [ ]

उत्तर :

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा – दगडाची
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा – शिव्ह (सिंह)
  3. लेखकांच्या मते, जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो – कमनशिबी

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण –
उत्तर :
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण त्यांचे सर्व दात दुखत असल्याचा त्यांना भास होत होता.

प्रश्न 2.
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण –
उत्तर :
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण हजर असलेले सगळेच जण इतके मोठमोठ्याने बोलत की लेखकांचे विव्हळणे ऐकूही येत नसे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण –
उत्तर :
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण लेखक कोणालाही दुखवू इच्छित नव्हते.

वैशिष्ट्ये लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 16

पुढील कोष्टक पूर्ण करा :

प्रश्न 1.

दिवसा सभ्य दिसणारा माणूस दुखरा दात
दिवसा
रात्री

उत्तर :

दिवसा सभ्य दिसणारा माणूस दुखरा दात
दिवसा सभ्यपणे वागतो. सभ्यपणे हळूहळू दुखत राहतो.
रात्री रात्री खरा (म्हणजे वाईट) वागतो. रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते [ ]
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे [ ]
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे [ ]

उत्तर :

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते – ब्रह्मांड
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे – चोर आणि दुखरा दात
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे – दाते व दातार

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयावरून वाक्याचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात हे एखादया सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत? → [ ]
  2. बापरे! दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चात्ताप! → [ ]
  3. मानवी देह पंचमहाभूतांचा बनला आहे. → [ ]

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य

क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात दुखणे सरळ असावे → [ ]
  2. जेव्हा माझा दात दुखायला लागला, तेव्हा माझी खात्री झाली. → [ ]
  3. सहाव्या महाभूताला ‘दात’ म्हणतात. → [ ]
  4. दाताचे दुखणे तू सहन कर. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. संकेतार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

अलंकार :
पुढील ओळीतील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजाताचे। → ………
2. होई जरी सतत दुष्टसंग
न पावती सज्जन सत्त्वभंग
असोनिया सर्प सदा शरीरी
झाला नसे चंदन तो विषारी → ………
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अर्थातरन्यास अलंकार.

दंतकथा Summary in Marathi

पाठ परिचय :

‘दंतकथा’ हा एक विनोदी लेख आहे. दातदुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर, गमतीदार नजरेने पाहतात. त्या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे हा लेख होय. हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडेही बोट दाखवले आहे.

दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव. या अनुभवाच्या वेदनामय भागाकडे लेखकांचे लक्ष नाही, त्यांचा रोख मानवी स्वभावातील विसंग:कडे आहे.

सुरुवातीला लेखक दातांचे महत्त्व सांगण्याचा पवित्रा घेतात. दात हा अवयव पंचमहाभूतासारखेच एक सहावे महाभूत आहे असे सांगतात, पंचमहाभूते म्हणजे विश्वरचनेची पाच मूलतत्त्वे होत. दात तसेच एक मूलतत्त्व असूनही लेखक त्याला महत्त्व देत नाहीत. मराठी भाषेतही दाताला महत्त्व नाही. कारण दाताविषयी मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, गालावरची खळी यात त्याचा जीव अडकतो. पण प्रेयसीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर आढळत नाही.

मात्र, दात त्रासदायक ठरू शकतो. शक्तिमान अशा परशा पहिलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरम केले. मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही, हे नवीन भान लेखकांना आले.

एके दिवशी लेखकांचा एक दात दुखू लागला. प्रचंड वेदना होऊ लागल्या, एखादा लाकूडतोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा, तसा लेखकांना अनुभव आला.

दातदुखीने लेखकांना हैराण केले. त्यांना रात्रभर विव्हळत राहावे लागले, पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरड करणे लेखकांच्या पत्नीला पसंत नव्हते.

दातदुखीच्या बातमीने लेखकांचे शेजारी एकएक करून सगळे तब्येतीच्या चौकशीसाठी जमले. दातदुखीबद्दल चर्चा झाली.’ प्रत्येकाने आपापला उपाय सुचवला. लेखकांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:चे उपाय करून पाहिले.

अखेरीस लेखकांनी दंतवैदयाकडून दुखरा दात काढून घेतला. त्या वेळी लेखकांची दातदुखीपासून मुक्तता झाली.

शब्दार्थ :

  1. मेख – खोच, रहस्य, गूढ गोष्ट.
  2. नकटे (नाक) – कापलेले, आखूड, चपटे, बसके (असे नाक).
  3. प्रेमविव्हल – प्रेमासाठी व्याकूळ झालेला.
  4. कुंदकळ्या – कुंदा नावाच्या फुलझाडाच्या कळया.
  5. (त्या. शुभ्र व सुंदर असतात. सुंदर दातांना त्यांची उपमा देतात.)
  6. विकट – भयानक, हिडीस, कुरूप.
  7. अल्याड – अलीकडे.
  8. ब्रह्मांड – अवकाशातील संपूर्ण विश्व.
  9. असार – निःसत्त्व, खोटे, निकामी.
  10. मिथ्या – खोटे, नश्वर, भ्रामक.
  11. लोकापवाद – अकारण पसरवलेले गैरसमज, आळ.
  12. आळी – गल्ली, गल्लीच्या आधाराने उभा राहिलेला घरांचा समूह.
  13. थैमान – रडण्या-ओरडण्याचा प्रचंड कल्लोळ, आदळआपट.
  14. मतैक्य – एकमत.
  15. खलदंत – दुष्ट दात.
  16. नतद्रष्ट – दुष्ट, वाईट (अत्यंत कंजूष.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. मेख मारणे – एखादया कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे.
  2. दाती तृण धरणे – शरण येणे.
  3. स्वत:चीच मनगटे चावणे – शत्रूविरुद्ध काहीही करता येत नसल्याने चडफडत बसणे.
  4. दातांत धरता येणे – सामान्य, क्षुल्लक, किरकोळ वस्तू बाळगणे.
  5. बोलणी खाणे – दोषारोप, निंदा, ठपका ऐकून घ्यावा लागणे.
  6. चारीमुंड्या चीत होणे – पुरता पराभव होणे.
  7. मागमूस नसणे – ठावठिकाणा न आवळणे, चिन्हहीन आढळणे.
  8. नक्षा उतरणे – ताठा, घमेंड, अभिमान उतरणे.
  9. साक्षात्कार होणे – ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडणे, (यावरून एखादया गोष्टीचे मर्म अचानक कळणे.)
  10. थैमान घालणे – आदळआपट, प्रचंड गोंधळ करणे.
  11. दात उपटून हातात देणे – घमेंड घालवणारा पराभव करणे.
  12. दात घशात घालणे – पुरता पराभव करणे.
  13. शक्तीचे प्रदर्शन करणे – शक्तिमान असल्याचा देखावा करणे.
  14. हसे करणे – हास्यास्पद करणे.
  15. दातओठ खाणे – मनात मोठा राग, त्वेष असणे.
  16. शंख करणे – बोंबाबोंब करणे, आरडाओरड करणे.
  17. खल करणे – (बहुतेकदा गुप्तपणे) चर्चा करणे.
  18. सिंहाचा बकरा होणे – सर्व अवसान गळून पडणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

12th Marathi Guide Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय Textbook Questions and Answers

कृती

1. अ. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
उंचच उंच पण अरुंद बालपण-
उत्तर :
किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद झालेले आहे.

प्रश्न 2.
डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-
उत्तर :
समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो, तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटते. त्याचे बालपण खुजे होत चाललेय, याची मनस्वी काळजी वाटते. त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो नि समुद्राच्या डोळ्यांत आभाळभर थकवा उतरतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

प्रश्न 3.
स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण-
उत्तर :
महानगरीय जीवनाची झालेली घुसमट पाहून समुद्र संत्रस्त होऊन शहरातून हिंडतो व थकून स्टेशनवरच्या बाकड्यावर बसतो. तेव्हा त्याला शेजारी एक मूल पाय पोटाशी दुमडून झोपलेले आढळते. त्याच्या मनात विचार येतो की, या शहराच्या रहदारीत या बालकाचे बालपण हरवले तर आहेच, पण ते खुंटत चालले आहे. बालपणीचा त्यांचा आनंद आक्रसला आहे. जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतेच मर्यादित व बंदिस्त झाले आहे.

आ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण ………
उत्तर :
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो; कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजांआड कोंडून पडलाय.

प्रश्न 2.
समुद्र अस्वस्थ होतो, कारण ……..
उत्तर :
समुद्र अस्वस्थ होतो; कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

प्रश्न 3.
समुद्र शिणून जातो, कारण ………
उत्तर :
समुद्र शिणून जातो; कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते.

2. अ. तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय 1
उत्तर :

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना मनाला भिडणारे शब्दसमूह
आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे. 1. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते

2. मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढे

आ. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय 3

3. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
उत्तर :
ओळींचा अर्थ : माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून विमनस्कपणे हिंडतो, वस्त्यांमधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. हातांवर डोके ठेवून हतबल होऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय ह्रास पाहत राहतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत.

महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात. समुद्र म्हणजे अफाट जीवन! ते आजमितीला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजांआड कोंडून पडले आहे. या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो. त्या वेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या बाकाएवढेच संकुचित असलेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी, ही शंकाही समुद्राच्या मनात डोकावते.

भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या भगभगीत संस्कृती उजाड व सिमित झाले आहे, हा विचार हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

प्रश्न आ.
‘समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
महानगरीय दुरवस्था नि घुसमट ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांत चित्रित केली आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थेकूनभागून रेल्वे-फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते.

बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो.

स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे, तिचा भावनिक ऱ्हास डोळ्यांदेखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी ‘समुद्र’ हे अथांग जीवनाचे रूपक घेऊन महानगरी जीवनाची मूल्यहीनता आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दाहक शब्दांत मांडली आहे. या संदर्भात उपरोक्त ओळीत समुद्राची असाहाय्य हतबलता अधोरेखित केली आहे.

काव्यसौंदर्य : किनाऱ्यावरील टोलेजंग, उत्तुंग इमारतीच्या गजांआड समुद्र म्हणजे पर्यायाने निर्मळ अथांग जीवन कैद झालेले आहे. संध्याकाळच्या वेळी अतिशय त्रासलेला समुद्र दाढी व झिंजा पिंजारून हताश झाला आहे. त्याला गगनचुंबी इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर एक मुलगा दिसतो. त्या मुलाचा विचार करताना समुद्राला हे जाणवते की मुलाचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद म्हणजे खुजे झालेले आहे, याची त्या बालकाला कल्पनाच नाही.

भौतिक प्रगतीची उंची आणि खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो. त्याच्या डोळ्यांत अफाट थकवा येतो. म्हणून तो नजर वळवून इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावरचे माणसांचे रखडत चाललेय पाय व सुसाट पळणारी बसची चाक पाहतो. तिथेही त्याला गती-अधोगतीचे विचित्र चित्र दिसते.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत कवीने मुक्तच्छंद योजिला आहे. कवीने मुक्तशैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दांतून दर्शवली आहे. त्यामुळे गिरमिटाने ऊर्ध्वमूल पोखरण जावे, तशी शब्दकळा हृदयाला थेट भिडते व व्याकूळ अनुभवांची प्रचिती येते. समुद्र चलत व गतिमान क्रियापदांमुळे समुद्राचा मानसिक प्रवास दृग्गोचर होतो.

‘पिंजारलेले केस व दाढी’ या शब्दबंधातून समुद्राचे मानवीकरण करून भावनिक पातळीत कविता जाताना दिसते. ‘उंचच उंच व अरुंद बालपण’, ‘डोळ्यांत थकव्याचं आभाळ’ या प्रत्ययकारी प्रतिमांतून आशयाचा विस्तार अधिक गडद झाला आहे. महानगरीय संवेदनेची ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
उत्तर :
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी ‘समुद्र अथांग आहे, असीम आहे.’ अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती.

कुसुमाग्रज यांनी तर ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेत “हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला / अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला” असे आव्हान दिले, तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही, याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा! पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट, मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो.

पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला; पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला.

पंचमहाभूतांपैकी मी एक ‘भूत’ तुम्हांला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत, तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल!

प्रश्न आ.
शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रथित केले आहे. किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचचउंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे.

दुसरीकडे एक, दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे, हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो. अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

प्रश्न इ.
‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
उत्तर :
समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन होय !समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादेत बंदिस्त होते, त्या वेळची बेचैन अवस्था, जीवघेणी घुसमट “समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्ययास आणली आहे.

शहरांमध्ये उंचचउंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत. त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उत्तुंग इमारतींच्या गजांआड समुद्र असाहाय्य होऊन अडकला आहे. समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण, अफाट व विशाल असते. ते सतत उचंबळलेले व जिवंत असते; परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणाऱ्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे. समुद्राची ही भावविवशता कवींनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकामधून प्रत्ययकारकरीत्या साकारली आहे. त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सार्थ आहे.

उपक्रम :

‘महानगरातील समस्या’ या विषयावर चर्चा करा.

तोंडी परीक्षा.

अ. शब्द ऐका. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

  1. गगनचुंबी
  2. संत्रस्त
  3. वयस्क
  4. खिन्न
  5. हताश

आ. ‘वाढत्या शहरीकरणाचा जीवनावर होणारा परिणाम’, या विषयावर भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय Additional Important Questions and Answers

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयावरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती अस्वस्थ झाला समुद्र! → [ ]
  2. लहान मूल काय करीत होते? → [ ]
  3. लहान मूल बाकड्यावर झोपले होते. → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. प्रश्नार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. समुद्र अस्वस्थ होतो. → [ ]
  2. लहान मुलाला कल्पना नसावी. → [ ]
  3. जेव्हा समुद्र खिन्न झाला त्याने पापण्या मिटून घेतल्या. → [ ]
  4. साऱ्या मुलांच्या बालपणाची काळजी घ्या. → [ ]

उत्तर :

  1. स्वार्थी वाक्य
  2. विध्यर्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

कंसांतील सूचनांप्रमाणे बदल करा :

प्रश्न 1.

  1. किती अस्वस्थ झाला समुद्र! (विधानार्थी करा.)
  2. मुलांचे बालपण सावरले पाहिजे. (आज्ञार्थी करा.)
  3. समुद्राने दुःखी होऊ नये. (होकारार्थी करा.)
  4. समुद्र कुठे हिंडला, ते मला सांग. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. समुद्र खूपच अस्वस्थ झाला.
  2. मुलांचे बालपण सावरा.
  3. समुद्राने सुखी व्हावे,
  4. समुद्र कुठे हिंडला?

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

समास :

विग्रहावरून समास ओळखा :

प्रश्न 1.

  1. नऊ रात्रींचा समूह → [ ]
  2. महान असे राष्ट्र → [ ]
  3. क्रीडैसाठी अंगण → [ ]
  4. प्रत्येक घरी → [ ]

उत्तर :

  1. द्विगू समास
  2. कर्मधारय समास
  3. विभक्ती तत्पुरुष समास
  4. अव्ययीभाव समास

प्रयोग :

पुढील वाक्यांचा प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. समुद्राने मुलाला पाहिले. → [ ]
  2. समुद्र बाकावर बसला. → [ ]
  3. समुद्राने झिंज्या पिंजारल्या. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

अलंकार :

पुढील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. ही आई नव्हे प्रत्यक्ष ममता. → [ ]
  2. मुंगीने मेरूपर्वत गिळला. → [ ]
  3. आईसारखी फक्त आईच! → [ ]

उत्तर :

  1. अपन्हुती अलंकार
  2. अतिशयोक्ती अलंकार
  3. अनन्वय अलंकार

समुद्र कोंडून पडलाय Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

महानगरीय गदारोळात समुद्र म्हणचे जीवन कसे नगण्य व काडीमोल झाले आहे. याचे चित्रण करताना कवी म्हणतात समुद्रकिनाऱ्यावरील उंचच उंच टोलजंग इमारतीच्या गजांपलीकडे समुद्र बंदिस्त झालेला आहे. अडकलेला आहे. तो संध्याकाळी खूप त्रासलेला वाटतो. आपली पिंजारली दाढी नि विस्कटलेल्या केसांनी हतबल होऊन समोरच्या उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे पाहत असतो, त्या मुलाचे बालपण उंचच उंच पण अरुंद नि खुजे झाले आहे. बालपण गुदमरलेले व घुसमटलेले आहे, हे त्या मुलांना कळतच नाही, कोंडलेल्या स्थितीत ते मूल बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाही. शहराने त्याच्यातल्या कोवळ्या भावना खच्ची केल्या आहेत.

समुद्राच्या डोळ्यांत थकवा आभाळभर भरून येतो. शिणलेले डोळे तो वळवतो इमारतींच्या पलीकडे. तिथे पलीकडच्या रस्त्यावर त्याला थकल्याभागल्या माणसांचे रखडत चालवलेले पाय नि बसची चाके दिसतात, चाकात प्रगतीची गती आहे, पण पावलातला जोर कमकुवत। झाला आहे, हा विरोधाभास समुद्राला व्याकूळ करतो.

शहरी जीवनाचा विचार करून करून समुद्र अस्वस्थ, बेचैन होतो आणि मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून पायपीट करतो, वस्त्यांमधून हिंडतो नि उशिरा रात्रीपर्यंत तो स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रूळांवरील गाड्यांची ये-जा निमूटपणे पाहत बसतो. हताशपणे हातांवर डोके ठेवून तो अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय पसारा पाहत असतो.

त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी पाय पोटाशी दुमडून एक निरागस मूल शरीराची मोटकुळी करून झोपलेले असते. त्याचे बालपण स्टेशनवरच्या त्या बाकड्याएवढेच सिमित झालेले आहे. त्याच्या बालपणाची वाढ खुंटलेली आहे, याची त्या बालकाला कल्पना असेल किंवा नसेल, समुद्राला काहीच कळेनासे होते.

समुद्र उदासपणे हसतो. दमलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला वयस्कांच्या शहरातल्या साऱ्या माणसांची, त्याच्या बालपणाची चिंता वाटू लागते. त्याचे मन काळजीने आक्रंदते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

शब्दार्थ :

  1. गगनचुंबी – टोलेजंग, खूप उंच (इमारती).
  2. संत्रस्त – अतिशय त्रासलेला.
  3. हताश – हतबल.
  4. थकवा – दमून जाणे.
  5. शिणून – दमून.
  6. मुक्त – मोकळा.
  7. रहदारी – जा-ये, दळणवळण, गर्दी.
  8. मुडपून – दुमडून.
  9. खिन्न – उदास.
  10. शिणलेल्या – दमलेल्या.
  11. वयस्क – प्रौढ, वयोवृद्ध.

टीप :

झिंज्या – डोक्यावरचे वाढलेले, विस्कटलेले केस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 8 रेशीमबंध Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

12th Marathi Guide Chapter 8 रेशीमबंध Textbook Questions and Answers

कृती

1. कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 5

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 6

प्रश्न इ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 7

प्रश्न ई.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 8.1

2. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न अ.
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण…
उत्तर :
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो; कारण नुकते कुठे तीन-साडेतीन वाजलेले असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण…
उत्तर :
मानवाला निसर्गाची ओढ लागते; कारण माणसाच्या मनात आदिमत्वही भरून राहिलेले असते.

3. अ. पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

प्रश्न 1.
सायली –
उत्तर :
सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते.

प्रश्न 2.
गुलमोहोर –
उत्तर :
गुलमोहोराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी, केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 3.
जॅक्रांडा –
उत्तर :
जॅक्रांडाची निळीजांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करत असतात.

प्रश्न 4.
चाफा –
उत्तर :
चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो; पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो.

आ. वर्णन करा.

प्रश्न 1.
उत्तररात्रीचे आगमन
उत्तर :
मध्यरात्र उलटली की उत्तररात्र हलकेच आकाशात पाऊल टाकते. उत्तररात्रीची पावले मुळातच मुलायम, त्यात ती रात्र आपली मुलायम पावले हळुवारपणे, अलगद ठेवीत येते. कुणालाही चाहूल लागणे कठीण. मात्र लेखकांचे उत्तररात्रीशी अत्यंत जवळिकेचे नाते आहे. त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकांच्या मनात उमटत राहतात. लेखकांना झोप लागत नाही. आपली झोप जणू पूर्ण झाली आहे, असेच त्यांना वाटत राहते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 2.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
उत्तर :
लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, ” पहाट आली का? ” पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, “मी येऊ का?” त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

इ. खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

प्रश्न 1.

  1. वृक्ष – …………..
  2. वेली – …………
  3. फुले – ………..
  4. पाखरे – ………….

उत्तर :

  1. वृक्ष – डोळा लागलेला असतो.
  2. वेली – डोळा लागलेला असतो.
  3. फुले – विसावलेली, सुखावलेली असतात.
  4. पाखरे – गाढ झोपलेली असतात.

4. व्याकरण.

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
मन समेवर येणे-
उत्तर :
अर्थ – मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे.
वाक्य – राहुल रात्रभर भरकटणारे मन प्रभातफेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले.

प्रश्न 2.
साखरझोपेत असणे-
उत्तर :
अर्थ – पहाटेच्या गाढ स्वप्निल निद्रेत असणे.
वाक्य – पहाटे मोहन साखरझोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता.

आ. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

प्रश्न 1.
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला
उत्तर :
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 2.
निशिगंध म्हणजे निशिगंधच
उत्तर :
निशिगंध म्हणजे निशिगंधच!

इ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 9
उत्तर :
वाक्यप्रकार → उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी → वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात.

वाक्यप्रकार → विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी → किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्हासाला!

वाक्यप्रकार → होकारार्थी वाक्य
नकारार्थी → वाफे तर ओले नाहीतच.

ई. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 10
उत्तर :

सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
पांढराशुभ्र शुभ्र असा पांढरा कर्मधारय
वृक्षवेली वृक्ष आणि वेली इतरेतर द्वंद्व
गप्पागोष्टी गप्पा, गोष्टी वगैरे समाहार द्वंद्व
सुखदुःख सुख किंवा दुःख वैकल्पिक द्वंद्व

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

उ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.

  1. खिडकी हलकेच उघडतो.
  2. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
  3. तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल.

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग

5. स्वमत.

प्रश्न अ.
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?…’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
उत्तर :
उत्तररात्रीचे दृश्य खरोखरच विलक्षण असते. सर्वत्र, सर्व काही शांतनिवांत असते. दिवसा इकडेतिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काहीजण दिवसा चिंतांनी ग्रासलेली असतात. काहीजण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या, सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदु:खे उत्तररात्रीच्या क्षणांमध्ये विरून गेलेल्या असतात.

दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही त्या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हाचे त्यांचे भाव आठवून पाहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळून आलेला असतो. तीच माणसे उत्तररात्री या सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील, तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहून ठरवताच येणार नाही. त्या क्षणी सर्वांचे मन निर्मळ, शुद्ध झालेले असते.

सर्व प्राणिमात्रांमध्ये, वनस्पतींमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो. आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप खूप पूर्वीचे. ऋजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किल्मिष, वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसतखेळत बोलू शकतात. एकमेकांच्या मदतीला धावतात. एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध, निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. लेखकांना या वाक्यातून हेच सांगायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळुवार, नाजूक नाते आहे. त्यांच्या मते, सर्व माणसांचेच तसे नाते असते. या हळुवार, कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात. हे नाते रेशमासारखे तलम, मुलायम आहे. म्हणून ते रेशीमबंध.

हे रेशीमबंध लेखकांनी अत्यंत मुलायमपणे, हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत. नीरव शांततेत उत्तररात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते. कोणाला चाहूलही लागत नाही. पण लेखकांच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्याच हळुवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायम पण इथे जाणवतो.

साखरझोपेत जग विसावलेले असते. साऱ्या काळज्या-चिंता मिटून गेलेल्या असतात. मन सुखदुःखांच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ, शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकांचे नाते या निर्मळपणाशी, त्या आत्म्याशी जडले आहे. त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो.

या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी आहे. कोणालाही चाहूल लागू न देता पहाट अलगद अवतरते, पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहूल लागते. त्या अनोख्या, नाजूक, तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपांनी, त्यांचे विविध रंग व सुगंध यांच्या रूपांनी लेखकांना स्वत:चे आदिमतेशी असलेले नाते जाणवते.

या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या स्वत:च्या नात्याचा शोध घेत आहेत. स्वतः प्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल, नाजूक, हळुवार भावनांनी बांधली गेली आहेत. ते बंध सहजासहजी दिसत नाहीत; दाखवून देता येत नाहीत. ते सूक्ष्म, तरल, कोमल भावनांचे बंध असतात. ते रेशमाप्रमाणे तलम, मुलायम असतात. म्हणून लेखक या बंधांना रेशीमबंध म्हणतात. संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीमबंधच आहेत. म्हणून या पाठाला रेशीमबंध’ हे शीर्षक खूप साजते.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की, मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते, असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की, अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की, खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे?

वनस्पती या सजीव आहेत; त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला, तर त्याही सुखावतात, हे सर्व आता लहानथोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की, माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वत:चे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने ‘चिपको आंदोलन’ उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले, याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले, त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण, अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न आ.
डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. यू. म. पठाण यांच्या भाषेचे सर्वांत पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी, सरळ, भाषा स्वतःचा अनुभव ते पारदर्शीपणे व्यक्त करतात. उत्तररात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहूल लागू न देणारे’ असे असते. पावलाचा हळुवारपणा, नाजुकपणा, मुलायम पण त्या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदा., उत्तररात्र प्रवेश करते, त्याचे वर्णन करणारे वाक्य पाहा – ‘उत्तररात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं येथे पाऊल ‘पडत’ नाही किंवा ‘टाकले जात नाही. उत्तररात्र ‘हलकेच पाऊल ठेवते’ अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय येतो. वाचकाला ती भाषा भावते. हे एक उदाहरण झाले. पण संपूर्ण पाठभर अशी अनुभवाचा प्रत्यय देणारी भाषा आढळते.

लेखकांना सृष्टीतले मानवेतर घटक कोरडे, भावनाविरहित वाटतच नाहीत. ते त्यांना माणसांप्रमाणेच भावभावनांनी भिजलेले, सजीव, चैतन्यपर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे ‘हळूहळू डोळे किलकिले’ करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना ‘खुणावतात ‘. पाखरे ‘कुजबुजली’. बोगनवेल ‘सळसळू’ लागते. दोन्ही वाफे ‘एकमेकांशी हितगुज’ करतात. मोगरा ‘खुदखुद हसतो’. तो कधी रुसून बसतो’. झाडे-वेली ‘भावुक होतात’ अशा रितीने सर्व घटक मानवी रूप घेऊन येतात. लेखन हृद्य बनते. लेखनातला अनुभव भावभावनांशी रसरशीत बनतो.

उत्तररात्री आगमन, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात. आणखी एक वैशिष्ट्य बघा. असं कोणतं बरं नातं’, ‘का बरं म्हटलं असावं’ ही शब्दरूपे पाहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाहीत. ही दैनंदिन जीवनातली बोलण्यातली शब्दरूपे आहेत. एखादा माणूस आपल्या जिवलग मित्राशी जिवाभावाच्या गप्पागोष्टी करीत बसला असावा, तसे हा लेख वाचताना वाटत राहते. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाल्याचे दिसून येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न इ.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर :
थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की, मनाला खूप आल्हाद मिळतो. शहरात आखीव रेखीव रस्ते आणि तशाच आखीव रेखीव इमारती. इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. याउलट, रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते. एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पाहा.

त्या एका हिरव्या रंगांच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता! पक्षी, प्राणी, किडेमुंग्या यांच्या हजारो जाती. त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते.

तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व कुभावनांपासून मुक्ती मिळावी; आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा; ईश्वराचे निर्मळ, सोज्वळ रूप दिसावे; त्याच्याशी एकरूप होता यावे; म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच, त्या रूपाच्या सान्निध्यात राहावे, षड्रिपू चा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो.

आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा, असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी’ मानले.

उपक्रम :

अ. तुमच्या परिसरातील देशी व विदेशी फुलांची माहिती इंटरनेटच्या माध्यमांतून मिळवून ती तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील काचफलकात प्रदर्शित करा.

आ. हिवाळ्यातील उत्तररात्री किंवा अगदी पहाटेच्या वेळी तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. पाहिलेल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन शब्दबद्ध करा. ते वर्गात वाचून दाखवा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

तोंडी परीक्षा.

शिक्षकांनी वाचून दाखवलेला उतारा ऐका. सारांश लिहा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 8 रेशीमबंध Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 1
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 11
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध 12

कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
उत्तररात्र हळुवारपणे अलगद पाऊल टाकते; कारण ………
उत्तर :
उत्तररात्र हळुवारपणे अलगद पाऊल टाकते; कारण तिच्या आगमनाची चाहूल कोणलाही लागू नये, अशी तिची इच्छा असते.

प्रश्न 2.
लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतात कारण ……….
उत्तर :
लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतात कारण रात्रीच्या नीरव शांततेचा भंग होऊ नये, असे लेखकांना वाटत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

प्रश्न 3.
पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही; कारण ……….
उत्तर :
पाखरांनी पंख फडफडवल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही; कारण पाखरांची झोपमोड होऊ नये, असे पहाटेला मनोमन वाटत असते.

प्रश्न 4.
निसर्ग आणि मानव यांना एकमेकांची ओढ लागलेली असते; कारण …………..
उत्तर :
निसर्ग आणि मानव यांना एकमेकांची ओढ लागलेली असते; कारण त्या दोघांमध्ये युगानुयुगे आदिम, ऋजू स्नेहबंध निर्माण झाले आहेत.

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. पहाटेचे आगमन.
2. मोगऱ्यात घडणारे मानवी भावभावनांचे दर्शन.
3. उजाडत जाणाऱ्या पहाटेसोबत आल्हादाला येणारी भरती.
4. पहाट व पाखरे यांच्यातील नाते.
उत्तर :
1. पहाटेचे आगमन : उत्तररात्रीचा काळोख हळूहळू विरत जातो. हळुवारपणे उजाडू लागते. गुलमोहोरावरील घरट्यांतून, जैक्रांडाच्या फांदयांवरून पाखरे डोळे किलकिले करून पाहू लागतात. त्यांचा आपापसातला आवाज कुजबुजीसारखा भासू लागतो. हळूहळू एखादया उत्सवासारखा हा चिवचिवाट वाढत जातो. सायली, बोगनवेल, क्रोटन्स, गुलमोहोर, जॅक्रांडा हे सर्वच सळसळू लागतात. हलू डोलू लागतात. अशा प्रकारे पहाटेचे आगमन होते.

2. मोगऱ्यात घडणारे मानवी भावभावनांचे दर्शन : लेखकांचे निसर्गाशी असलेले अत्यंत हृदय असे नाते या उताऱ्यातून व्यक्त झाले आहे. भोवतालच्या वृक्षवेली, पाखरे, पहाट, सकाळ हे सर्व मानवेतर घटक माणसासारख्याच भावभावनांनिशी वावरू लागतात. म्हणूनच पाणी न मिळाल्यामुळे कोमेजलेला मोगरा लेखकांना रुसल्यासारखा भासतो आणि पाणी मिळाल्यावर कळया आल्या की खुदखुद हसल्यासारखा भासतो. झाडेवेली भावुक होतात. कधीतरी थोडीफार रुसलीफुगली तरी त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवला, त्यांना पाणी दिले की गोंडस फुले देऊन आपल्याला केवडातरी विरंगुळा, तजेला देतात. अशी मानवी भावनांची देवाणघेवाण लेखकांना जाणवत राहते.

3. उजाडत जाणाऱ्या पहाटेसोबत आल्हादाला येणारी भरती : उत्तररात्रीचा काळोख विरत जातो आणि पहाटेचा उजेड सुरू होतो. हा काळोख नेमका कोणत्या क्षणी संपतो आणि उजेड कोणत्या क्षणी सुरू होतो हे सांगणे केवळ अशक्य असते. इतका तो क्षण तरल असतो. त्या क्षणी लेखकांना अनोख्या, लोभसवाण्या नाजूक अनुभवाचा प्रत्यय येतो. ही आल्हाददायकता निसर्गाच्या सर्व घटकांमध्ये लेखकांना दिसते. झाडांच्या, वेलींच्या सळसळण्यात, हलण्याडोलण्यात दिसते. सुरुवातीला मंद मंद असलेला चिवचिवाट हर्षोल्हासाचे रूप धारण करतो. जणू आनंदाला, आल्हादाला आलेली भरतीच वाटते.

4. पहाट व पाखरे यांच्यातील नाते : लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, ” पहाट आली का?” पहाटेचे हळुवार येणे पाहन लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, “मी येऊ का?” त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

केव्हा ते लिहा :

प्रश्न 1.
1. पहाट आकाशात हलकेच पाऊल टाकते, जेव्हा
2. पाखरांचा चिवचिवाट वाढत जातो, जेव्हा
उत्तर :
1. पहाट आकाशात हलकेच पाऊल टाकते, जेव्हा पाखरांच्या पंखांची फडफड त्याला ऐकू येते.
2. पाखरांचा चिवचिवाट वाढत जातो, जेव्हा पहाट हळूहळू उजाडत जाते.

म्हणजे काय ते लिहा :

प्रश्न 1.

  1. गुलमोहोरावरची पाखरे आपापसात कुजबुजू लागतात, म्हणजे जणू काही ………
  2. मोगऱ्याला चुकून एखादया दिवशी पाणी घालायचे राहून गेले, तर तो कोमेजू लागतो, म्हणजे जणू काही ……
  3. पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी मोगऱ्याला कळ्या येतात, म्हणजे जणू काही …………

उत्तर :

  1. गुलमोहोरावरची पाखरे आपापसात कुजबुजू लागतात, म्हणजे जणू काही तो त्यांच्या आल्हादाचा उत्सव असतो.
  2. मोगऱ्याला चुकून एखादया दिवशी पाणी घालायचे राहून गेले, तर तो कोमेजू लागतो, म्हणजे जणू काही तो लेखकांवर रुसून बसतो.
  3. पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी मोगऱ्याला कळ्या येतात, म्हणजे जणू काही तो कळ्यांच्या रूपाने लेखकांकडे पाहून खुदखुद हसू लागतो.

रेशीमबंध Summary in Marathi

शब्दार्थ :

  1. उत्तररात्र – मध्यरात्रीनंतरचा काळ.
  2. विरणे – विरविरीत होणे, विरळ होणे.
  3. असोशी – ओढ.
  4. आदिमत्व – आदिम म्हणजे पहिला, मूळचा, आदिमत्व म्हणजे मूळची अवस्था.
  5. ऋजू – सरळ, साधा, निर्मळ, पारदर्शी.
  6. आस – इच्छा.
  7. नितळ – गाळ, गढूळपणा नसलेले, स्वच्छ, शुद्ध.
  8. लोभस – उत्कटपणे आवडणारा.
  9. नजाकत – सुबकपणा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला…

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7 विंचू चावला… Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला…

12th Marathi Guide Chapter 7 विंचू चावला… Textbook Questions and Answers

कृती

1. अ. योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

प्रश्न 1.
तम घाम अंगासी आला, म्हणजे ……..
अ. संपूर्ण शरीराला घाम आला
आ. घामाने असह्यता आली
इ. घामामुळे मन अस्थिर झाले
ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली
उत्तर :
ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.

प्रश्न 2.
मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे ………..
अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते
आ. मनुष्याला इंगळी चावणे वाईट
इ. इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते
ई. मनुष्याला इंगळी नांगा मारते
उत्तर :
अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते

प्रश्न 3.
सत्त्व उतारा देऊन, म्हणजे …….
अ. जीवनसत्त्व देऊन
आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
इ. सात्त्विक आहार देऊन
ई. सत्त्वाचे महत्त्व सांगून
उत्तर :
आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रश्न 4.
‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे ……..
अ. भारूड उत्तम गाता येते
आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
इ. भारूडाला अर्थप्राप्त होतो
ई. भारूड अधिक रंजक बनत
उत्तर :
आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला 2

इ. खालील शब्दांचे अर्थ लिहा.

प्रश्न 1.

  1. वृश्चिक ………
  2. दाह ………
  3. क्रोध ………
  4. दारुण ………

उत्तर :

  1. वृश्चिक – विंचू
  2. दाह – आग
  3. क्रोध – राग, संताप
  4. दारुण – भयंकर

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।
उत्तर :
अर्थ : काम-क्रोधरूपी विंचू चावला, तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात – विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया. त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्त्विक गुणांचा अंगारा लावा. म्हणजे विंचू-इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।4।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.

तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।1।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।2।।
उत्तर :
आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराज यांनी ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा, याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम-क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे.

काव्यसौंदर्य : काम-क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो, तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : लोकशिक्षण देणारे ‘विंचू चावला’ हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा, असा मोलाचा संदेश हे भारूड देते. ‘विंचू, वृश्चिक व इंगळी’ अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. ‘तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर :
माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते; पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की, मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की, मी वेळेवर जेवण, झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही. त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले, तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले.

पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला, तरी तो नाहक आहे, हे जाणून घेतले. एखादया गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का, याची शहानिशा मी मनाशी करू लागलो नि माझ्या लक्षात आले की, माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले नि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे, ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रश्न आ.
‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा, यांचा उपदेश मार्मिक प्रतीकांतून केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकूळ करतो. येथे काम-क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता.

म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.

उपक्रम :

संत एकनाथ महाराज यांची इतर भारुडे मिळवून वाचा.

तोंडी परीक्षा.

‘विंचू चावला’ हे भारूड सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7 विंचू चावला… Additional Important Questions and Answers

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → [ ] व [ ]
  2. घामाचे नाव → [ ]
  3. व्याकूळ झालेला → [ ]
  4. अतिभयंकर असलेली → [ ]
  5. फुणफुण शांत करणारे → [ ]

उत्तर :

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → वृश्चिक व इंगळी
  2. घामाचे नाव → तम घाम
  3. व्याकूळ झालेला → पंचप्राण
  4. अतिभयंकर असलेली → मनुष्य इंगळी
  5. फुणफुण शांत करणारे → जनार्दन स्वामी

व्याकरण 

वाक्यप्रकार :

क्रियापदाच्या रूपावरून पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. पाऊस पडला असता, तर हवेत गारवा आला असता. → [ ]
  2. मनुष्य-इंगळी अतिदारुण आहे. → [ ]
  3. तुम्ही नक्की परीक्षेत यश मिळवाल. → [ ]
  4. संत एकनाथ महाराजांनी भारुडातून लोकशिक्षण दिले. → [ ]

उत्तर :

  1. संकेतार्थी वाक्य
  2. स्वार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. स्वार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.
1. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. (नकारार्थी करा.)
2. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :
1. भारतीय क्रिकेटसंघ पराभूत झाला नाही.
2. प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे.

समास :

तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

सामासिक शब्द समासाचे नाव
1. नीलकमल ………………….
2. …………….. इतरेतर द्वद्व
3. यथाशक्ती ………………….
4. …………….. बहुव्रीही

उत्तर :

सामासिक शब्द समासाचे नाव
1. नीलकमल इतरेतर दवद्व
2. भाऊबहीण इतरेतर द्वद्व
3. यथाशक्ती अव्ययीभाव
4. भालचंद्र बहुव्रीही

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

प्रयोग :

पुढील प्रयोगांच्या वैशिष्ट्यांवरून प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदात कुठलाच बदल होत नाही. → [ ]
2. कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपात बदल होतो. → [ ]
उत्तर :
1. भावे प्रयोग
2. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. → [ ]
2. एखादया गोष्टीचे वा प्रसंगाचे वा व्यक्तीचे वर्णन करताना असंभाव्य कल्पना केली जाते. → [ ]
उत्तर :
1. अर्थान्तरन्यास अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

विंचू चावला… Summary in Marathi

कवितेचा (भारुडाचा) भावार्थ :

‘बहुरूङ’ ते भारूड होय. भारुडात ‘आध्यात्मिक रूपक’ वापरलेले असते. प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. ___ ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात – मला (मनुष्याला) विंचू चावला. काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की, माझ्या अंगाला दुर्गुणाचा घाम फुटला. ।। धृ ।।

काम-क्रोधरूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव व्याकूळ झाला. प्राण कंठाशी आले. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत. माझ्या तनामनाची आग झाली आहे.।।1।।

मनुष्यरूपी ही इंगळी (विंचू) इतकी भयंकर आहे की, तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली. ठणका लागला. त्या इंगळीचे विष सर्वांगभर पसरले.।।2।।

या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्त्विक गुणांचा अंगारा लावा, या सत्त्वगुणाच्या अंगाऱ्याने विंचू-इंगळीरूपी विकार पटकन् दूर होतील.।।3।।

अशा प्रकारे सात्त्विक गुणाचा उतारा घेऊन सगळी तामसवृत्ती, दुर्गुण दूर केले, थोडीशी ठसठस राहिली आहे, ती गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत केली.।।4।।

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला...

शब्दार्थ :

  1. वृश्चिक – विंचू.
  2. तम – (येथे अर्थ) दुर्गुण.
  3. पंचप्राण – जीव.
  4. सांग – सगळे अंग.
  5. दाह – आग.
  6. इंगळी – (मोठा) विंचू.
  7. अतिदारुण – खूप भयंकर.
  8. मज – मला.
  9. नांगा – दंश.
  10. वेदना – कळ.
  11. सत्त्वगुण – चांगले गुण.
  12. अंगारा – उदी.
  13. झरझरा – पटकन.
  14. अवघा – सगळा.
  15. सारिला – मागे केला.
  16. फुणफुण – ठसठस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

12th Marathi Guide Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Textbook Questions and Answers

नमुना कृती

1. कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 2.1

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 4.1

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

2. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
उत्तर :
आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो. ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही. त्याचे कष्ट जाणवत नाहीत. उलट, ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय.

आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल, तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. तशी ती कळली, तर आपल्याला आत्मविश्वास येईल, म्हणजेच, आनंदी, सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो. कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोदयोग. दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो.

आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत, हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो, हीच बुद्धिमत्ता होय.

थोडक्यात, आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो, हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरश: खरे आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Additional Important Questions and Answers

फरक लिहा :

प्रश्न 1.

बालपणची बाबासाहेबांची स्थिती आजच्या गरीब मुलांची स्थिती

उत्तर :

बालपणची बाबासाहेबांची स्थिती आजच्या गरीब मुलांची स्थिती
बाबासाहेबांना चांगल्या सोयी मिळाल्या नव्हत्या. कोणतीही अनुकूलता नव्हती. आजच्या काळात साधनसामग्रीने सुसज्ज अशी अनुकूल स्थिती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 6

आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Summary in Marathi

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो.

माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विदयाथ्यांपेक्षा माझी त्या वेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही.

मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई-बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर तुम्हांस आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दी|दयोगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.

मी विद्यार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी त-हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. दीर्घोदयोग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

12th Marathi Guide Chapter 6 रंग माझा वेगळा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.

अर्थ ओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. …………….
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो ………………
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे? ……………..
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली? …………….

उत्तर :

अर्थ ओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो कोण जाणे कोठुनी ह्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा!
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे? हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा!
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली? अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 2

इ. योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्र अ. नैराश्यातील आशेचा किरण
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्य आ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्
3. माझा पेटण्याचा सोहळा इ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्र इ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्य अ. नैराश्यातील आशेचा किरण
3. माझा पेटण्याचा सोहळा आ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्

ई. एका शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. कवीची सदैव सोबत करणारी ……………….
  2. कवीचा विश्वासघात करणार ……………….
  3. खोट्या दिशा सांगतात त ……………….
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा ……………….

उत्तर :

  1. कवीची सदैव सोबत करणारी – आसवे
  2. कवीचा विश्वासघात करणारे – आयुष्य
  3. खोट्या दिशा सांगतात ते – तात्पर्य
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा – सूर्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

2. खालील शब्दांचे अर्थलिहा.

प्रश्न 1.

  1. तात्पर्य –
  2. लळा –
  3. गुंता –
  4. सोहळा –

उत्तर :

  1. तात्पर्य – सार, सारांश
  2. लळा – माया, ममता, प्रेम
  3. गुंता – गुंतागुंत
  4. सोहळा – उत्सव, समारंभ.

3. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न अ.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
उत्तर :
अर्थ : स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणारा नाही. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे.

प्रश्न आ.
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात – कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले, ते मला कळले नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.

कवी म्हणतात – मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही.

तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत.

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल, तर स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अत्यंत गरजेचे आहे.

स्वत:च्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची ‘माणूस’ असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन ‘आनंदवन’ उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता नि मनाचा विवेक जागवण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ एकहाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगेमहाराज आज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपणास वंदनीय आहेत.

प्रश्न आ.
कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवींनी स्वत:च्या बेधडक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे.

ते म्हणतात – मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो, मी स्वत:चे व्यक्तित्व वेगळे राखले. पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली; पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. ‘तात्पर्य’ सांगणारे महाभाग भेटले.

वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा’ नि पाहणाऱ्याला ‘आंधळा’ संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावध क्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्येतील सूर्य झालो.

प्रश्न इ.
‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणतो ते लिहा.
उत्तर :
समाजात पसरलेल्या दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वत:चे व्यक्तिमत्त्व कवीनी ‘रंग माझा वेगळा’ या कवितेत साकारले आहे.

ते म्हणतात – ‘तात्पर्य’ सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्येची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकोळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्येचा अंधकार दूर करीन, हा विचार शेरातून मांडताना कवी ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’ असे स्वत:बद्दल सार्थ उद्गार काढतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

उपक्रम :

अ. मराठी गझलकारांच्या गझला मिळवून वाचा.
आ. यू-ट्यूबरील विविध मराठी गझल ऐकून आनंद मिळवा.

तोंडी परीक्षा.

‘रंग माझा वेगळा’ ही गझल सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Additional Important Questions and Answers

कवितेतील यमक साधणारे शब्द लिहा :

प्रश्न 1.

  1. ………….
  2. ………….
  3. ………….
  4. ………….
  5. ………….
  6. ………….
  7. ………….

उत्तर :

  1. वेगळा
  2. मोकळा
  3. झळा
  4. लळा
  5. गळा
  6. आंधळा
  7. सोहळा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

कृती : (रसग्रहण)

प्रश्न 1.
पुढील ओळींचे रसग्रहण करा : रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
उत्तर:
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली, जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली, विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना। आवाहक वाटते.

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयानुसार पुढील वाक्यांचा प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. किती अफाट पाऊस पडला काल!
  2. हे फूल खूप छान आहे.
  3. तुझी शाळा कोठे आहे?

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. (विधानार्थी करा.)
  2. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा.)
  3. रांगेत चालावे. (आज्ञार्थी करा.)

उत्तर :

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे.
  2. जगात सर्व सुखी असा कोण आहे?
  3. रांगेत चाला.

समास :

तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

सामासिक शब्द विग्रह
1. नाट्यगृह ………………
2. ……………….. सहा कोनांचा समूह
3. खरे-खोटे ……………….
4. ………………. केर, कचरा वगैरे

उत्तर :

सामासिक शब्द विग्रह
1. नाट्यगृह नाट्यगृह
2. षट्कोन सहा कोनांचा समूह
3. खरे-खोटे खरे-खोटे
4. केरकचरा केर, कचरा वगैरे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

प्रयोग :

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. सुरेश भटांनी गझल लिहिली.
  2. रूपाने गाय झाडाला बांधली.
  3. अमर अभ्यास पहाटे करतो.
  4. माहुताने हत्तीस बांधले.

उत्तर :

  1. कर्मणी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. कर्तरी प्रयोग
  4. भावे प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. → [ ]
  2. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्यापरी. → [ ]
  3. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. → [ ]
  4. एक फळ नासके असेल, तर सर्व फळांवर परिणाम होतो; तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. → [ ]

उत्तर :

  1. अतिशयोक्ती अलंकार
  2. अनन्वय अलंकार
  3. अतिशयोक्ती अलंकार
  4. अर्थान्तरन्यास अलंकार

रंग माझा वेगळा Summary in Marathi

कवितेचा (गझलचा) भावार्थ :

स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – सर्व रंगात रंगले, तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्त्व साऱ्यांहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो, तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो.

मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या; पण मी असा संवेदनशील आहे की, या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात.

माझ्या डोळ्यांतले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात, अश्रूच माझे गाणे होते, हे असे कशाचे दु:ख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो.

कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला 5 कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि, माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली.

चारीबाजूंनी या दिशा, ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो, त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो, त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे.

जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना . दिव्य तेज आहे, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वत:साठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

शब्दार्थ :

  1. गुंता – गुंतागुंत.
  2. झळा – (गरम हवेचा) झोत.
  3. आसवे – अश्रू.
  4. गीत – गाणे.
  5. तात्पर्य – सार, सारांश, निष्कर्ष.
  6. पांगळा – दिव्यांग.
  7. सोहळा – उत्सव, समारंभ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

1. पाय मोकळा होणे – बंधनातून मुक्त असणे.
2. गळा कापणे – विश्वासघात करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

12th Marathi Guide Chapter 5 वीरांना सलामी Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 5

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 4

आ. चौकटीत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक [ ]
  2. भयाण पर्वतांवर चढणार [ ]
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी [ ]
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी [ ]
  5. चोवीस जणांची लडाख भेट [ ]

उत्तर :

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय
  2. भयाण पर्वतांवर चढणार – आमचे धैर्यधर सैनिक
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी – 22-23 वर्षांचे तेजस्वी तरुण
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी – ड्रायव्हर स्टानझिन
  5. चोवीस जणांची लडाख भेट – मिशन लडाख

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण ………
उत्तर :
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22 – 23 वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

प्रश्न 2.
‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण ……………
उत्तर :
‘मिशन लडाख ‘साठी ‘राखी पौर्णिमे ‘चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

प्रश्न 3.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण…
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण …………..
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

प्रश्न 5.
समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण ……
उत्तर :
समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

ई. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर :
आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

प्रश्न 2.
‘सेवा परमो धर्म:’
उत्तर :
लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर :
लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

प्रश्न 4.
लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर :
लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

2. व्याकरण

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
उत्तर :
अर्थ – खूप तफावत असणे.
वाक्य – सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रश्न 2.
अंगावर काटा येणे.
उत्तर :
अर्थ – तीव्र मारा करणे.
वाक्य – भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
आग ओकणे.
उत्तर :
अर्थ – भीतीने अंगावर शहारा येणे.
वाक्य – जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

प्रश्न 4.
मनातील मळभ दूर होणे.
उत्तर :
अर्थ – गैरसमज दूर होणे.
वाक्य – मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 6
उत्तर :

वाक्य वाक्यप्रकार बदलासाठी सूचना
जमेल का हे सारं आपल्याला? प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.
तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. विधानार्थी वाक्य उद्गारार्थी – किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!
यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक – यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?
पुढील सगळे मार्ग बंदच होते. होकारार्थी वाक्य नकारार्थी – पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 7
उत्तर :

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
बावीसतेवीस बावीस किंवा तेवीस वैकल्पिक द्वंद्व
ठायीठायी प्रत्येक ठिकाणी अव्ययीभाव
शब्दकोश शब्दांचा कोश विभक्ती तत्पुरुष
यथोचित उचित (योग्यते) प्रमाणे अव्ययीभाव

ई. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
अ. भावे प्रयोग
आ. कर्तरी प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग – कर्तरी प्रयोग.

प्रश्न 2.
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-
अ. कर्तरी प्रयोग
आ. भावे प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग – भावे प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
अ. त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले
आ. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच
इ. आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता
उत्तर :
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य – आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

3. स्वमत.

प्रश्न अ.
‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून ‘भारतमाता की जय’ असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.

वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.

देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना – काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते.

दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर 150 200 रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?

सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर :
सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.

सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.

मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, ‘मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,’ असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.

कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले 12 – 12, 15 – 15 तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते.

किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न इ.
‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.

सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही.

पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.

नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,’ असे विधान केले आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते.

तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो.

कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते – देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर :
सिर्फ दिमाग में डालना है!’ हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले.

सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

उपक्रम :

अ. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखादया सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
आ. पाठात आलेले ‘आर्मी’शी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घेऊन ते गटासमोर सांगा.

तोंडी परीक्षा.

अ. ‘विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ’ हा प्रसंग तुमच्या शब्दांत थोडक्यात सांगा.
आ. ‘मी सैनिक होणार’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 11

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 12
उत्तर :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 13

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 14
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 16 Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 17

चौकटींत उत्तरे लिहा :

प्रश्न 1.

  1. कारगील युद्धाचे वर्ष [ ]
  2. कारगील युद्धाच्या स्मारकाचे नाव [ ]
  3. 14 कोअरच्या कर्नलांचे नाव [ ]
  4. ‘मिशन लडाख ‘चा चमू आणि सैनिक यांना बांधणारा [ ]
  5. ‘मिशन लडाख ‘चा शेवटचा टप्पा [ ]

उत्तर :

  1. 1999
  2. ऑपरेशन विजय
  3. कर्नल झा
  4. राखीचा धागा
  5. द्रास-कारगील

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.

  1. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश [ ]
  2. लेहमधील लष्करी अधिकारी [ ]
  3. खल्सेचा पूल कोसळल्यामुळे प्रवाशांना आसरा मिळालेले ठिकाण [ ]
  4. कार्यतत्परतेमुळे लेखिकांनी सैनिकांना दिलेली उपमा [ ]
  5. वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी देणारा विभाग [ ]
  6. समाजातील बदलांमुळे व्यथित झालेले [ ]
  7. “या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे,” असे म्हणणारी [ ]
  8. रक्षाबंधनासाठी लडाखला नियमितपणे ग्रुप घेऊन येणाऱ्या [ ]
  9. ‘शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांची आम्हांला गरज आहे,’ असे म्हणणारे [ ]

उत्तर :

  1. लडाख
  2. कर्नल राणा
  3. ट्रॅफिक चेक पोस्ट
  4. कामकरी मुंग्या
  5. 14 कोअर
  6. कर्नल राणा
  7. भाग्यश्री
  8. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई
  9. ब्रिगेडियर ठाकूर

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. शपथेनंतरची अवस्था : ……………………
2. मिशन लडाखचा हेतू : …………………….
उत्तर :
1. शपथेनंतरची अवस्था : शपथेनंतर भावनिक आवेग ओसरल्यावर मनात शंका आली की, आपल्याला हे जमेल का? मन अस्वस्थ झाले. पण काही क्षणातच लेखिकांनी निर्धार केला.
2. मिशन लडाखचा हेतू : सर्वस्वाचा त्याग करून आपले सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणून बहीण या नात्याने त्यांना राखी बांधून त्यांच्या असीम त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, हा मिशन लडाखचा हेतू होता.

पुढील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिग होती ती!
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. पण त्यांची देशनिष्ठा देदीप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे कोणत्याही क्षणी आपला घास घेतील, हे उघड दिसत होते; पण त्याला ते घाबरले नाहीत. त्यांची निष्ठा ढळली नाही. ते मृत्यूला आव्हान देत पुढे सरकत होते. त्या वेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच वाटत होत्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.
ज्यांना आशीवाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली.
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. हे त्यांचे वय त्यांना आशीर्वाद प्यावे, असे होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे होते. त्या वयात त्यांना मृत्यू आला होता, ही जाणीवच वेदनादायक होती.

प्रश्न 3.
सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता.
उत्तर :
सैनिक म्हणजे भावभावना बाजूला सारून कर्तव्य कठोरतेने कृती करणारी माणसे. ही माणसे भेटल्यावर प्रतिसाद कसा देतील, आपल्याला समजून घेतील का, अशा अनेक शंका लेखिकांच्या मनात होत्या. त्यामुळे सिंहाची भीती वाटावी, तशी त्यांना सैनिकांची भीती वाटत होती.

प्रश्न 4.
सिर्फ दिमाग में डाल देना है।
उत्तर :
सैनिक दिलेली आज्ञा पाळतात. सांगितलेली कृती जमेल का, त्रास होईल का, काही नुकसान होईल का, यश मिळेल का, वगैरे कोणतेही प्रश्न विचारण्याची, मनात आणण्याचीही त्यांना सवय नसते. फक्त ‘हे हे करायचे आहे’ एवढेच ते मनाला बजावतात.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही. मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले… निबंध लिहायचाच, आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोनतीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय.

मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले, प्रत्येक मुद्दयाबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो, निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला, सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल ? किती वेळ लागेल? हात दुखत्तील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र – ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूंगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

लेखिकांना जाणवलेले कर्नल झा यांचे व्यक्तित्व गुण :

प्रश्न 1.

  1. ………………………….
  2. ………………………….
  3. ………………………….

उत्तर :

  1. प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
  2. लेखिकांच्या कार्याचे मोल जाणणे.
  3. लेखिका आणि त्यांचे कार्य यांची आठवण वर्षानुवर्षे जपणे.

एका तरुण सैनिकाला लेखिकांमध्ये त्याची मावशी दिसली, तेव्हाची लेखिकांची प्रतिक्रिया :

प्रश्न 1.

  1. ………………..
  2. ……………….
  3. ……………….

उत्तर :

  1. “खरं की काय? बरं ती मंगल मावशी, तर मी अनु मावशी!” असे उद्गार लेखिकांनी काढले.
  2. त्याला गळाभेटीची अनुमती दिली. .
  3. अन्य सोबत्यांचीही गळाभेट घडवून आणली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

कारणे लिहा :

प्रश्न 1.
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण –
उत्तर :
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण सेनाधिकाऱ्याला भेटण्याचे खूप दडपण मनावर होते.

प्रश्न 2.
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण –
उत्तर :
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण त्याच्या मंगल मावशीच्या मुलीच्या म्हणजेच मावस बहिणीच्या लग्नाला त्याला हजर राहता आले नव्हते. लेखिका व त्यांच्या सोबत्यांमध्ये तो मंगल मावशी व नातेवाईक यांना शोधीत होता.

प्रश्न 3.
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण –
उत्तर :
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण तेथे कधीच पाऊस पडत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण
उत्तर :
थंडीमुळे चेहेरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण पुढे खल्सेचा पूल कोसळला होता.

पाठाच्या आधारे पुढील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा :

प्रश्न 1.
या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे.
उत्तर :
कारगील परिसराच्या वातावरणात भारतीयत्वाची भावना भरून राहिलेली आहे. जात-पात, धर्म-पंथ, भाषा-प्रांत असल्या कोणत्याही भेदभावाचे दर्शन घडत नाही.

प्रश्न 2.
‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येतो.
उत्तर :
दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र आणि जरासुद्धा हिरवळ नसलेल्या प्रदेशात आपले सैनिक राहतात. तरीही ममत्व, बंधुभाव जपतात, नाती जोडतात. म्हणून सैनिक ‘आपलीच माणसे’ वाटतात.

वीरांना सलामी Summary in Marathi

पाठ परिचय :

लेखिका 2004 साली पर्यटक म्हणून लेह-लडाखला गेल्या होत्या. त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले. लेखिका भारावून गेल्या, सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी मांडला आहे.

एक वेगळी सहल म्हणून द्रास-कारगीलचा प्रवास सुरू झाला. लेह ते कारगील प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगील युद्धाची थरारक हकिगत सांगत होता. ती हकिगत ऐकत ऐकत मुक्काम गाठला.

प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगील युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाडत होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वत:हून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो! बावीस-तेवीस वर्षांचे कोवळे जीव स्फुल्लिंगाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या.

दृक्श्राव्य केंद्रात कारगील युद्धाची फिल्म दाखवण्यात आली. सैनिकांच्या त्यागाची कल्पना लेखिकांना आली. संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा परिचय देशवासीयांना घडवण्यासाठी त्यांना इथे आणण्याची प्रतिज्ञा लेखिकांनी केली.

जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम अनेक वर्षे सलग केला. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकिगती ऐकायला मिळाल्या.

लेह-लडाखच्या भेर्टीमुळे लेखिकांच्या स्वत:च्या मनातील अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठितपणाच्या कल्पना गळून पडल्या. सैनिकांच्या उदात्त भावनांचे दर्शन घडले. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी सेनादलाशी निर्माण झालेली जवळिकता कमी होऊ देऊ नका, अशी लेखिकांना विनंती केली. तसेच, निदान पाच वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलात दाखल व्हावे, असा निरोप तरुणांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी लेखिकांना केली, ती विनंती परिपूर्ण करण्याचा निश्चय करून लेखिका परतल्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

शब्दार्थ :

  1. उत्पात – ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट.
  2. स्फुल्लिग – ठिणगी.
  3. विव्हळ – यातना, पिडा यांनी व्याकूळ.
  4. सपक – बेचव, निसत्त्व.
  5. भाट – स्तुती करण्यासाठी नेमलेला पगारी नोकर.
  6. भेंडोळी – लांबलचक कागदाच्या गुंडाळया.
  7. कॉम्बॅट वर्दी – वंद्व युद्धाचा गणवेश.
  8. पुनरागमनायच – पुन्हा येण्यासाठीच.
  9. नीरव – आवाजविरहित.
  10. समर्पण – संपूर्णपणे अर्पण.
  11. याच्यापरता – याच्यापेक्षा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

12th Marathi Guide Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा.

प्रश्न 1.
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण …………….
उत्तर :
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात; कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पाहायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रश्न 2.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ……………..
उत्तर :
कवींनी आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले; कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

आ. खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. शेतातील हिरवीगार पिके [ ]
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती [ ]
  3. वेळूच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द [ ]
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द [ ]

उत्तर :

  1. शेतातील हिरवीगार पिके – कोमल पाचूंची शेते
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती – प्रवाळ माती
  3. वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द – इंद्रनीळ
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द – रत्नकळा

इ. एका शब्दात उत्तर लिहा.

प्रश्न 1.

  1. रोमांचित होणारी
  2. नव्याने फुलणारी
  3. लाजणाऱ्या

उत्तर :

  1. रोमांचित होणारी – थरारक
  2. नव्याने फुलणारी – नवे फुलले
  3. लाजणाऱ्या – लाजिरवाणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

ई. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 2

2. जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवें अ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत
2. पालवींत उमलतां काजवे आ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवें इ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
4. निरखीत जळांतिल विधुवदना ई. मला गुजगोष्टी करू दे

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवें आ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
2. पालवींत उमलतां काजवे इ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवें ई. मला गुजगोष्टी करू दे
4. निरखीत जळांतिल विधुवदना अ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णा
उत्तर :
पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येईल, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल – स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
आश्लेषांच्या तुषारस्नानी
भिउन पिसोळी थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.

आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत.

फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी’ या ग्रामीण शब्दांने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रे थांब जरा आषाढघना
बघु दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंची ही शेतें
प्रवाळमातीमधली औतें
इंद्रनीळ वेळूची बेटे
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुली ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उत्तर :
आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.

काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात – हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.

भाषा वैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे ‘आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले’ यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी

अंत : करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. ‘लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी’ यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू ‘कालिदास जयंतीला’ मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. ‘शिवानी टेकडी’ ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.

आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते.

पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.

प्रश्न आ.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर…’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर :
आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?
मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा 40° ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर?आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल. सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजकता माजेल. याची भाषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

उपक्रम :

अ. पाच निसर्गकवितांचे संकलन करा आणि त्याचे वर्गात प्रकट वाचन करा.
आ. पावसाशी संबंधित पाठ्यपुस्तकाबाहेरील पाच कवितांचे सादरीकरण करा.

तोंडी परीक्षा.

रे थांब जरा आषाढघना’ या कवितेचे प्रकट वाचन लयीत करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Additional Important Questions and Answers

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
क्रियापदाच्या रूपानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

  1. मुले शाळेत गेली. → [ ]
  2. ती खिडकी लावून घे. → [ ]
  3. विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. → [ ]
  4. मला जर सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन. → [ ]

उत्तर :

  1. स्वार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. संकेतार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (विधानार्थी करा.)
2. तू नियमित अभ्यास करावास. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
1. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला.
2. तू नियमित अभ्यास कर.

समास :

प्रश्न 1.
‘विग्रहावरून सामासिक शब्द लिहा :

  1. ज्ञानरूपी अमृत/ज्ञान हेच अमृत. → [ ]
  2. जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. → [ ]
  3. तीन कोनांचा समूह. → [ ]
  4. क्रमाप्रमाणे. → [ ]

उत्तर :

  1. ज्ञानामृत
  2. जितेंद्रिय
  3. त्रिकोण
  4. यथाक्रम

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रयोग :

पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. शेतकऱ्याने कणसाला मातीतून उपटले. → [ ]
  2. कवी पावसाचे वर्णन करतो. → [ ]
  3. केशवने गाणे गायिले. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी → [ ]
2. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. → [ ]
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

रे थांब जरा आषाढघना Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

आषाढ महिन्यातील पावसामुळे चोहीकडे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद खुद्द आषाढमेघाने घ्यावा, अशी विनवणी करताना कवी म्हणतात – हे आषाढ मेघा, जरासा थांब. तुझ्या करुणेमुळे निर्माण केलेले सृष्टिसौंदर्य तुझ्यासह मला डोळे भरून पाहू दे. कोवळ्या नाजूक पाचूसारखी दिसणारी ही हिरवीगार शेते, पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये चालणारी नांगरणी, इंद्रनील रत्नासारखी ही बांबूची बने, हे सर्व सौंदर्य म्हणजे धरतीवर उमटलेल्या तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने ही सुवासिक केतकी रोमांचित झाली आहे. नव्याने फुललेली सोनचाफ्याची कळी झुलते आहे. तुला पुन्हा पुन्हा चोरून बघताना या जाईच्या मुली लाजून चूर झाल्या आहेत.

थोडीशी (न बरसता) उघडीप करून हे सूर्याचे घर उघडून खुले कर, हे आकाश स्वच्छ दिसू दे. तुझ्या जादूने नवीन कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन धरतीवर येऊ दे. ताटावर झुलणारे कणसाचे दाणे तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत आणि फुलांच्या देठात अलवार कोवळा मध साठू दे. आनंदाच्या गोड गाण्याचे बोल पक्ष्यांच्या गळ्यात येऊ देत. पक्ष्यांच्या किलबिल स्वरांनी गवत पात्यांवर आनंदाचा शहारा फुलू दे.

आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या अमाप थेबांची अंघोळ करणारी फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत राहू देत. भर दुपारी रत्नांची किरणे उधळीत ही एकत्र भिरभिरणारी फुलपाखरे या वनराईला निळ्या रंगात बुडवू दे.

काळोखाचे अश्रू पिऊन, ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत झाडांच्या कोवळ्या पानांतून उमललेल्या काजव्यांशी मला गुजगोष्टी करू दे. पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचे सौंदर्य न्याहाळीत मला काजव्यांशी हितगूज करू दे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

शब्दार्थ :

  1. घन – ढग, मेघ.
  2. दिठी – दृष्टी, नजर.
  3. करुणा – दया.
  4. प्रवाळ – पोवळे; (एक लाल रत्न).
  5. औत – नांगर.
  6. वेळूची बेटे – बांबूचे वन, पदविन्यास
  7. खुणा – पाऊलखुणा.
  8. रोमांचित – शहारलेली, सुखद शहारा आलेली.
  9. गंध – सुवास.
  10. सोनचंपक – सोनचाफा.
  11. लेकी – मुली.
  12. तुज – तुला.
  13. गगन – आकाश.
  14. घडिभर – थोडा वेळ.
  15. आसर – उघडीप, पाऊस थोडा वेळ थांबणे.
  16. वासरमणी – सूर्य.
  17. तव – तुझ्या.
  18. किमया – जादू.
  19. हळव्या – हळदीच्या पिवळ्या रंगांचे.
  20. कणस – कणीस.
  21. जिवस – पौष्टिक.
  22. अरळ – अलवार, कोमल.
  23. कंठ – गळा.
  24. खग – पक्षी.
  25. मधुगान – गोड, सुरेल गीत.
  26. तृणपर्ण – गवताचे पाते.
  27. तुषार – शिंतोडे.
  28. स्नान – अंघोळ.
  29. पिसोळी – फुलपाखरू.
  30. रत्नकळा – रत्नाचे तेज.
  31. माध्यान्ह – भर दुपार.
  32. न्हाणोत – भिजवत.
  33. इंद्रवर्ण – निळा रंग.
  34. वन – बन, रान.
  35. पीत – पिऊन.
  36. आसवे – अश्रू.
  37. हितगुज – मनातील गोष्ट, मनोगत.
  38. त्यांसवे – त्यांच्याबरोबर.
  39. निरखीत – न्याहाळत, पाहत.
  40. जळ – पाणी.
  41. विधुवदन – चंद्रबिंब.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

टिपा :

  1. आषाढ-चौथा मराठी महिना.
  2. पाचू-हिरवे रत्न.
  3. प्रवाळ-(लाल रंगाचे) पोवळे (रत्न).
  4. इंद्रनीळ – निळ्या रंगाचे रत्न.
  5. केतकी-केवड्याचे झाड (फुले).
  6. चंपक, जाई-फुलांची नावे.
  7. आश्लेषा-एक पावसाळी नक्षत्र.
  8. पालवी-कोवळी पाने.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव

12th Marathi Guide Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न अ.
कृती करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 4

आ. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

प्रश्न 1.

  1. यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
  2. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
  3. शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
  4. यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
  5. ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. अयोग्य
  4. योग्य
  5. योग्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

इ. हे केव्हा घडेल ते लिहा.

प्रश्न 1.

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा …….
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा …….
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा ……..
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा ……

उत्तर :

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो.
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दुःखाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हांला पडते.
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येते, जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो.

2. अ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1.
मनाची कवाडं-
उत्तर :
मनाची कवाडं : मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते. ते संकुचित असते. बाहेरचे जग अफाट असते. दार आपल्याला अफाट जगात नेते. मनाची दारे उघडली, तर म्हणजे मन मोकळे ठेवले, तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
आनंदाचा पाऊस-
उत्तर :
आनंदाचा पाऊस : मनात दुःख, चिंता असेल, तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. आनंदाला आकर्षित करणारा – [ ]
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – [ ]
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – [ ]
  4. आनंदाला प्रसवणारा – [ ]
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – [ ] [ ]

उत्तर :

  1. आनंदाला आकर्षित करणारा – आनंद
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – श्वास
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – आनंद
  4. आनंदाला प्रसवणारा – आनंद
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – यश वैभव

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

प्रश्न 1.

  1. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? …………………….
  2. ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! …………………….
  3. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. …………………….

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य.

आ. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
(आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
(ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
उत्तर :
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य
(अ) हा आनंद कुठे नसतो?
(आ) हा आनंद कुठे असतो?
(इ) हा आनंद सर्वत्र नसतो का?
(ई) हा आनंद सर्वत्र असतो का?
उत्तर :
(अ) हा आनंद कुठे नसतो?

प्रश्न 3.
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) ती आतून हसतात.
(आ) ती फार हसतात आतून.
(इ) ती आतून हसत राहतात.
(ई) ती खूप आतून हसतात.
उत्तर :
(ई) ती खूप आतून हसतात.

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 5
उत्तर :

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
झुणका भाकर झुणका, भाकर वगैरे समाहार द्वंद्व
सूर्यास्त सूर्याचा अस्त विभक्ती तत्पुरुष
अक्षरानंद अक्षर असा आनंद कर्मधारय
प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव

ई. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा ………..
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं ………..
  3. कष्टाची भाकर गोड लागते ………..

उत्तर :

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा. कर्तरी प्रयोग
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं. भावे प्रयोग
  3. कष्टाची भाकर गोड लागते. कर्तरी प्रयोग

उ. ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
…………. ………… ………….. ………… …………
उत्तर :

  1. खरा (आनंद)
  2. आत्मिक (आनंद)
  3. अनोखा (आनंद)
  4. वेगळा (आनंद)
  5. टिकाऊ (आनंद).

4. स्वमत.

प्रश्न अ
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.

शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.

मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?

अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति – व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता.

एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.

प्रश्न इ.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
एखादया दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो. “कशाला भेटली ही ब्याद सकाळी सकाळी!” असे आपण मनातल्या मनात म्हणतो. तरीही आपण तोंड भरून हसत स्वागत करतो. आपल्या बोलण्यात, हसण्यात खोटेपणा भरलेला असतो. हे असे बऱ्याच वेळा होते. आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही; कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही. मन ढगाळलेले असले की तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. कुत्सितपणा, द्वेष, मत्सर, हेवा असल्या कुभावनांपासून मन मुक्त हवे. जेथे कुभावनांची वस्ती असते, तेथे निर्मळपणा अशक्य असतो. निर्मळपणा असला की मन मोकळे होते. स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल, तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे; कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे.

आमच्या शेजारी सिद्धा नावाची बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी दाट किल्मिषे भरलेली आहेत. अमिताविषयी बोलताना ती सर्व किल्मिषे जळमटांसारखी सिद्धाच्या तोंडून बाहेर पडतात. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या सहवासाचा सिद्धाचा अनुभव कधीही सुखकारक, आनंददायक नसतो.

ज्या ज्या वेळी अमिताविषयी बोलणे निघते, त्या त्या वेळी सिद्धाचे मन कडवट होते. मनात कुभावनांचे ढग घेऊन वावरण्यामुळे सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही. लेखकांनी ‘आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं,’ असे म्हटले आहे, ते खरेच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न ई.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
उत्तर :
प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो.

त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. ‘चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. ‘हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,’ ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.

खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो.

अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वत:च्या शरीरावर प्रेम करणे. आपण स्वत: असे प्रेम करायचेच; पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा.

स्वत:च्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे. त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्यायचा, व्यसने करायची नाहीत, दरोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन-चार किमी चालणे. कामासाठी चालणे यात मोजायचे नाही. काहीही करण्यासाठी नव्हे, तर चालण्यासाठी चालायचे. चालणे हेच काम समजायचे.

मनात ईर्षा, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत. आपले मन या भावनांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वत: कोणत्या तरी एका क्षेत्रात, एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे अन्य कोणाहीबद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही.

यश, वैभव मिळवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. मात्र यश, वैभव या गोष्टी बाह्य असतात. आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश, वैभव मिळाल्यावरही मन अशांत, अस्वस्थ होऊ शकते. अशा वेळी आणखी यश, आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे. याचा शोध घेतला पाहिजे.

मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. पैशाने खरा, टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. आवडेल त्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय पत्करावा. अर्थात, प्रत्येकाला स्वत:च्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे.

एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
उत्तर :
जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत. तर काही मानसिक पातळीवरील आहेत.

शारीरिक पातळीवरील कृतींपैकी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटके, देखणे राखायचे, इतके की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित, प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्यतः सजवून ते देखणे होणार नाही. ते सतेज, सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्त्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. व्यसनांपासून चार हात दूरच राहीन.

शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. शक्यतो एखादी कला आत्मसात करीन. माझी स्वत:ची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष्य निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही. म्हणून कला क्रीडा-ज्ञान या क्षेत्रांत उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन.

नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा प्रयत्न करीन. तसे नाही मिळाले, तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी-व्यवसायात वापरीन.

मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला, तर मला सुखीसमाधानी आयुष्य मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

उपक्रम :

प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

तोंडी परीक्षा.

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

1. आभाळाकडे डोळे लावणे.
2. विसर्ग देणे.

आ. ‘माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 7

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 9

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 11

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 12
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 13

पुढील चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. एक अद्भुत सत्य [ ]
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण : [ ]
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे [ ]
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे [ ]

उत्तर :

  1. एक अद्भुत सत्य – आपले अस्तित्व
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण – आपले मन
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे – आयुष्याचे चक्र
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे – माणसाचे जगणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा [ ]
  2. निरागस, आनंदी वृत्तीची [ ]
  3. आनंदाची इस्टेट [ ]
  4. आयुष्यभर न संपणारा [ ]
  5. शहाणंसुरतं करणारा [ ]
  6. कलेच्या मस्तीत जगणारे [ ]

उत्तर :

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा : – दुःखी माणूस
  2. निरागस, आनंदी वृत्तीची : – लहान मुले
  3. आनंदाची इस्टेट – शास्त्रीय संगीत
  4. आयुष्यभर न संपणारा – शिकण्यातला आनंद
  5. शहाणंसुरतं करणारा – वाचनाचा छंद
  6. कलेच्या मस्तीत जगणारे – कलावंत

योग्य की अयोग्य ते लिहा :

प्रश्न 1.

  1. मनावरचे ताण नाहीसे होणे हे आनंदाचे लक्षण [ ]
  2. आपल्याला दृष्टी लाभली आहे, हे आपण विसरतो [ ]
  3. आत्म्याच्या भाषेत गाता आले नाही तरी ऐकता येऊ शकते. [ ]
  4. वाचन माणसाला शहाणे करते. [ ]

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. योग्य
  4. योग्य

पुढील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं.
उत्तर :
आपला श्वास, आपला दिवस-रात्र, सूर्योदय-सूर्यास्त वगैरेंकडे आपण लक्षपूर्वक कधी बघतच नाही. म्हणजे आपले अनुभव आपण लक्षपूर्वक घेत नाही. आपण ते सर्व गृहीतच धरतो. आपल्याला दृष्टी आहे, याचेही आपल्याला भान नसते. त्यामुळे आपल्याभोवती पसरलेल्या सुंदर सृष्टीचे आपल्याला कौतुक वाटत नाही. ही सृष्टी जिच्यामुळे आपल्याला दिसते, त्या आपल्या दृष्टीचेही आपल्याला कौतुक वाटत नाही. साहजिक आपले अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद हे दोन्ही दुर्लक्षित राहतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

चूक की बरोबर लिहा :

प्रश्न 1.
1. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोसला जात नाही. [ ]
2. खऱ्या आनंदात असलेल्या व्यक्तीला जग सुंदर दिसतं. [ ]
उत्तर :
1. बरोबर
2. बरोबर

हे केव्हा घडेल ते लिहा

प्रश्न 1.
दु:खासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा …………..
उत्तर :
दुःखासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा आपल्याला आनंद दयायला वेळच नसतो.

प्रश्न 2.

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा …………
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा ……….
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा ………….

उत्तर :

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा त्याचा उद्देश केवळ आनंद मिळवणे हाच असतो.
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा तुम्ही एकटे असता.
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा भूतकाळाची स्मृती व भविष्यकाळाची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होते.

वाक्ये पूर्ण करा :

प्रश्न 1.
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण ……………..
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ………….
उत्तर :
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण त्याला मोकळी जागा हवी असते.
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ती निरागस व आनंदी वृत्तीची असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

विधाने पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच ……..
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात …………
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला ………..
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो …………….

उत्तर :

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच आपण आनंदी का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधणे होय.
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल.
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला कितीही मोठ्या यशाने किंवा पैशाने गुणले तरी गुणाकार शून्यच.
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो ‘मिळवण्याचा’ प्रयत्न कशाला करायचा?

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले → [ ]
2. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर → [ ]
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

आयुष्य… आनंदाचा उत्सव Summary in Marathi

पाठ परिचय :

प्रस्तुत पाठ म्हणजे ‘मजेत जगावं कसं?’ या गाजलेल्या पुस्तकातील एक लेख आहे. जीवन आनंदात कसे जगावे, हे सांगण्याचा या लेखात लेखकांनी प्रयत्न केला आहे.

आनंद हा यांत्रिकपणे, खूप प्रयत्न करून किंवा पैसे देऊन मिळत नाही. स्वतःचे मन, अंत:करण आनंदी ठेवले पाहिजे. तरच आनंद मिळतो. स्वत:च्या मनातील सर्व किल्मिषे, सर्व नकारात्मक भाव काढून टाकले, तर मन शुद्ध होते. शुद्ध मन हाच आनंदाचा स्रोत असतो.

कला, साहित्य व निसर्गसहवास यांच्या माध्यमातून आपण स्वत:चे मन शुद्ध करू शकतो. ही क्षेत्रे आनंदाला पूरक अशी मनोवृत्ती निर्माण करतात.

शब्दार्थ :

  1. शाश्वत – चिरकालिक, चिरंतन, अविनाशी.
  2. कळसा – नळ लावलेली मातीची घागर.
  3. निखळ – पवित्र, शुद्ध, निर्भेळ.
  4. ईर्षा – चुरस, चढाओढ, हेवा.
  5. असूया – द्वेष, मत्सर.
  6. वैषम्य – खेद, दुःख, विषमता.
  7. कवाडे – घराची किंवा खिडक्यांची दारे.
  8. जडणे – सांधणे, कोंदणात बसवणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. आटापिटा करणे – खटाटोप करणे, खूप कष्टाने प्रयत्न करणे.
  2. मनाची कवाडे बंद करणे – मन मोकळे न ठेवणे, पूर्वग्रहदूषित वृत्ती बाळगणे.
  3. (एखाद्या गोष्टीत) रंगून जाणे – विलीन होण, पूर्णपणे मिसळून जाणे.