Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.3 अहवाल Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

12th Marathi Guide Chapter 4.3 अहवाल Textbook Questions and Answers

कृती

1. अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर :
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम/सभांची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाललेखन होय. कार्यक्रम/ समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्व बाबींच्या नोंदी अहवालात केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाललेखन दस्तऐवज मानले जाते. संस्थेच्या भविष्यकालीन नोंदींसाठी अहवाललेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवाललेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाललेखनाचा आराखडा भिन्न असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहवालाची विश्वसनीयता होय. अनेक गुंतागुंतीच्या समस्येत अहवालाचा पुरावा म्हणूनही वापर करता येतो. अहवाल निःपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

2. अहवालाची आवश्यकता लिहा.
उत्तर :
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक गोष्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या/सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघुउदयोग ते मोठमोठे उदयोगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखादया क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल, तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

3. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. संस्थेच्या सभा/कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो. ‘जसे घडले तसे सांगितले’ असे अहवालाचे स्वरूप असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते. अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा सर्वांमध्ये एकसामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे, निःपक्षपातीपणा.

अहवाललेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. त्या त्या सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय अनुभवले, पाहिले, ऐकले यांविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात करणे आवश्यक असते. अहवालावर संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा निश्चित होत असतो. सदय:स्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

4. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा.

प्रश्न 1.
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता
उत्तर :
एखादया घटना/प्रसंगाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल होय. अहवाललेखनात संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटत असते. भविष्यातील निरनिराळ्या योजनांच्या नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतो. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा विषय, तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी मान्यवर, लोकांचा सहभाग, प्रतिसाद, निष्कर्ष, सांख्यिकीय माहिती इत्यादी अनेक बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. त्या नोंदी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. अहवालात नोंदवलेल्या माहितीच्या बाबतीत संदिग्धता असून चालत नाही. अहवालातील वाक्यरचना स्पष्ट असणे आवश्यक असते. सहज अर्थबोध होणे अभिप्रेत असते. माहितीचे स्वरूप सुस्पष्ट असावे. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचा परामर्श अहवालात घेता येत नाही. कार्यक्रम प्रसंगी जे जे घडले आणि जे जे पाहिले, ऐकले त्याचे खरे रूप अहवालात येणे प्रधान असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

प्रश्न 2.
शब्दमर्यादा
उत्तर :
अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. स्थानिक पातळीवरील अहवाल आकाराने लहान असतात, शब्दमर्यादा आटोपशीर असते. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा यांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवालाची शब्दमर्यादा कमी असते. कार्यक्रमाचा संपूर्ण गाभा अहवालात मांडायचा असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालात कार्यक्रमातील घटनांचे वर्णन पाल्हाळीक असू नये. एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती असू नये.

एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. अशा अहवालात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असू शकतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

प्रश्न 3.
नि:पक्षपातीपणा
उत्तर :
कोणत्याही अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नि:पक्षपातीपणा होय. अहवाललेखन कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नसते. अवास्तव व्यक्ती/घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नसते. अहवाल घडलेल्या कार्यक्रमाचा आरसा असतो. त्यामुळे अहवालात कुठल्याही अतार्किक, कल्पनारम्य गोष्टींना स्थान नसते. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचे रोपण अहवालात करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. निःपक्षपातीपणा अहवालात केंद्रस्थानी असतो.

5. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
अहवाललेखन ही एक कला आहे. अहवाललेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले, तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते. अहवाललेखनात दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

(१) अहवाललेखकाचे भाषेवरील प्रभुत्व : अहवाललेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाललेखकाकडे असणे आवश्यक असते. अहवाल सादर केला जातो; त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज, सोपी चटकन आशय लक्षात येईल अशी असावी. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे. अहवाललेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द, संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे.

उदा., अहवाललेखनात भाषेतील शब्दांचे संदर्भानुसार उपयोजन माहीत नसेल, तर मजकुराचा अर्थभेद होऊ शकतो. एखादया कार्यक्रमाच्या अहवालात ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली’ या वाक्यरचनेऐवजी ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा केली’ अशी वाक्यरचना जर लिहिली गेली, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

(२) सारांश रूप : अहवाल हा कार्यक्रमाचा गाभा असतो. कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संक्षिप्तपणे कागदावर अहवालाच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. सर्व घटना/प्रसंग शब्दांत मांडणे शक्य नसते. कार्यक्रम प्रसंगी घडलेल्या घटनांचा क्रमबद्धरीतीने सारांश रूपाने आढावा घेण्याचे काम अहवाल करीत असतो. अहवाललेखनात पाल्हाळ असता कामा नये. मोजक्या परंतु नेमक्या घटनांची समर्पक शब्दांत मांडणी करता येणे अपेक्षित असते.

उदा., महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाललेखनात पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे नावासहित उद्धृत करणे अपेक्षित असते. सर्व विदयार्थ्यांचे संपूर्ण भाषण नमूद करणे योग्य नाही. सारांश रूपाने विषय मांडणी करणे अभिप्रेत असते.

6. खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा.

प्रश्न अ.
तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील स्नेहसंमेलन.
उत्तर :
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविदयालय
नागपूर

वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ – २०२०
अहवाल

शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महाविदयालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विदयार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व अध्यापक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचा आरंभ ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविदयालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विदयार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविदयालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विदयार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी (अ) मधील विदयार्थांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविदयालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विदयार्थ्यांनी मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून चार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विदयार्थ्यांना दाखवले.

यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वांत अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विदयार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविदयालयीन स्पर्धांमध्ये महाविदयालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विदयार्थ्यांचे महाविदयालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कवितावाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरीत करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविदयालयाचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’. बारावी (अ) कला शाखेच्या कपिल बोरसे या विदयार्थ्याने २०१९ – २०२० या वर्षातील ‘आदर्श विदयार्थी पुरस्कार’ देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. गणेश दिघे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविदयालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विदयार्थ्यांप्रती असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विदयार्थ्यांना सदय सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विदयार्थांचे अभिनंदन केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विदयार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

प्रश्न आ.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
उत्तर :
नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय
नांदेड

जागतिक पर्यावरण दिन : वृक्षारोपण कार्यक्रम
अहवाल

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जागतिक पर्यावरण दिन’ बुधवार दि. ५ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविदयालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविदयालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

वृक्षारोपण कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अर्जुन नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

महाविदयालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘गुलाब’ फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविदयालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विदयार्थिनी मृण्मयी बडे हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन नवले यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. अर्जुन नवले यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली. औषधी वनस्पतींची महत्त्वाची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले.

यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपणात सहभागी झाले. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच यांचे रोपण करण्यात आले. प्राचार्यांच्या हस्ते निलगिरीच्या रोपाचे रोपण करण्यात आले. यावर्षीच्या वृक्षारोपण सोहळ्यात कनिष्ठ महाविदयालयातील वर्ग प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा, तुळस, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण चार वर्ग प्रतिनिधींनी अनुक्रमे केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोखले या बारावीतील विदयार्थ्याने केले होते. भूगोल विभागातील प्रा. गीता नाईक यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले.

दोन तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली.

डॉ. अनिल राऊत
जीवशास्त्र विभाग

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

अहवाल प्रस्तावना

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. या उपक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय/खाजगी संस्थेला समिती स्थापन करावी लागते. या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. हा आढावा म्हणजे अहवाल होय. कोणत्याही संस्था कार्यकारिणीतील सदस्यांसाठी अहवाल महत्त्वाचा घटक मानला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शाळामहाविदयालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने यांचे अहवाल आवर्जून लिहिले जातात. संस्थात्मक पातळीवर अहवाललेखन अपरिहार्य असते. कार्यक्रम/समारंभाची तपशील माहिती अहवालातून मिळत असते.

अहवाललेखनाचे स्वरूप :

  • एखादया कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभांची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे ‘अहवाललेखन’ होय.
  • अहवालाचे स्वरूप लेखी असते. अहवाललेखन संस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते.
  • संस्थेच्या कार्यक्रमाच्या आरंभापासून ते संपन्नतेपर्यंत कार्यक्रमाची सविस्तर परंतु मुद्देसूद नोंद अहवालात केली जाते.
  • संस्थात्मक कामांच्या निर्णय प्रक्रियेतील लहानात लहान घटकापासून ते संचालकांपर्यंत अहवालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
  • अहवाललेखनात सत्यता आणि वस्तुनिष्ठपणा फार महत्त्वाचा असतो.
  • अहवाल मुद्देसूद आणि नेमका असणे आवश्यक असते.
  • कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेच्या पुढील योजनांचे नियोजन करणे, प्रगती साधणे शक्य होते. प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल, वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल असतात.

अहवाललेखनाची उपयुक्तता :

  • कार्यक्रम/समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाललेखनाचा उपयोग होतो.
  • संस्थेचा विकास, गती, उणिवा अहवालाद्वारे संस्थाचालकांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य होते.
  • संस्थेच्या कामकाजातील, कार्यक्रमातील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जातो.
  • विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योग आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते.
  • संस्था, शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा दस्तऐवज म्हणून अहवाललेखनाकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे संस्था अहवालाचे जतन करीत असतात.
  • कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, मांडलेले विचार, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा अहवालात समावेश केलेला असतो.
  • अहवालात माहितीची सत्यता, सविस्तर परंतु नेमक्या नोंदी, वस्तुनिष्ठता इत्यादी बाबींचा अवलंब करताना लेखनकौशल्यावरील प्रभुत्व सिद्ध होत असते. सरावाने अहवाललेखनात मुद्देसूदपणा प्राप्त करता येतो.
  • अहवालाच्या साहाय्याने संस्थेला भविष्यकालीन योजनांचा कृतिआराखडा ठरवणे शक्य होते.

अहवालाचा आराखडा :

  • कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्र विषयानुसार अहवालाच्या आराखड्यांचे मुद्दे बदलत असतात.
  • एकाच महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि क्रीडास्पर्धा यांच्या अहवालाचे स्वरूप भिन्न असू शकते.
  • स्पर्धेचे, कार्यक्रमाचे स्वरूप बदलले की अहवाललेखनातील मुद्दे बदलतात.
  • विषयाच्या स्वरूपानुसार अहवाललेखन, त्यांची रचना, घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखनाची वैशिष्ट्ये :

  • कोणत्याही संस्थेच्या कार्यालयीन कामात अहवाललेखन अत्यंत विश्वासार्ह दस्तऐवज मानले जाते. कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अहवालातून मिळत असते. अहवाललेखनाची काही वैशिष्ट्ये समजून घेऊ.

वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता :

  • अहवाललेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, पदे, विवेचन, महत्त्वपूर्ण घटना, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद असते. यात वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असते.
  • अहवाललेखनात घटना-प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाललेखनातील नोंदी अचूक आणि सुस्पष्ट असाव्यात.
  • अहवाललेखनातील सर्व मुद्दे पारदर्शी असणे आवश्यक असते.
  • अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ तसेच शिफारसी जोडाव्यात.

विश्वसनीयता :

  • संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाललेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते.
  • अहवाललेखनातील घटक सत्य असावे.
  • अहवाललेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नये.
  • कार्यक्रमातील नोंदी, माहितीस्रोत, संदर्भ, शिफारसी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढते.
  • संस्थात्मक कामात कधी गुंतागुंतीची, संभ्रमाची परिस्थिती उद्भवली तर पुरावा म्हणूनही अहवालाचा वापर केला जाऊ शकतो.

भाषेचा सोपेपणा :

  • अहवालाची भाषा सहज, सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय कळेल असा सोपेपणा अहवालात असावा.
  • वस्तुनिष्ठता हे अहवालाचे एक वैशिष्ट्य असल्याने अहवालात अतिशयोक्ती, आलंकारिकता टाळली जाते.
  • तांत्रिकता, बोजड शब्दप्रयोग, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही, याची काळजी घेणे अपरिहार्य असते.
  • अहवालातील मजकूर सविस्तर मांडत असताना आशयाचा नेमकेपणा कायम ठेवणे हे आव्हानात्मक काम असते.
  • प्रत्येक क्षेत्राशी निगडित संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा यथोचित वापर करणे अहवाललेखनात गरजेचे असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शब्दमर्यादा :

  • संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या अवलंबून असते.
  • सर्वसाधारणपणे अहवाल संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते; परंतु यासाठी अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.
  • सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक यांसारखे अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा इत्यादींचे अहवाल विस्तृत असतात. अशा अहवालांचे स्वरूप निश्चित असते.
  • एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय, सार्वजनिक सेवा (बस वाहतूक) यांसारख्या विषयाशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. विस्तृतपणे लिहिले जातात.
  • निरीक्षणे, तपशील, आकडेवारी, संख्यात्मक आलेख, निष्कर्ष अशा माहितीचा समावेश अहवालात असल्याने संशोधनात्मक, चौकशी अहवालांची शब्दमर्यादा अधिक असल्याचे दिसते.
  • एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

नि:पक्षपातीपणा :

  • अहवाललेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने त्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शीपणा.
  • प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा नि:पक्षपातीपणा हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
  • अहवाललेखनात व्यक्तिसापेक्षता असू नये.
  • अहवाललेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात असू नये. उलट संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात उमटणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकाल्पित गोष्टी अहवाललेखनात असू नयेत.
  • वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो.
  • संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यांमधील सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा, वास्तव अनुभव शब्दरूपात अहवालात येणे अपेक्षित असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

लक्षात ठेवावे :

  • अहवाललेखनात शीर्षक, उपशीर्षक यांच्या अनुषंगाने सर्व मुद्दे असावेत. अहवालाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत सुसंगत मांडणी असावी.
  • अहवाल ‘सादर’ केला जातो; त्यामुळे अहवाललेखन करणारा आणि अहवाल वाचणारा हे दोन्ही घटक अहवाल निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात.

अहवाललेखनाची प्रमुख अंगे :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 1
अहवाललेखनाचा आराखडा समजून घेताना वरील चार अंगे विचारात घ्यावी लागतात.

  1. अहवालाचे प्रास्ताविक : अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू (कार्यक्रमाचा विषय) उदधृत केलेले असणे अपेक्षित असते. कार्यक्रम/समारंभ विषय, स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पदनाम, उपस्थित मान्यवरांची नावे, हुद्दे, अन्य उपस्थितांचा उल्लेख या बाबींचा समावेश असणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा आरंभ, स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करणे आवश्यक असते.
  2. अहवालाचा मध्य : संस्थात्मक सभा/कार्यक्रम/समारंभ यांसाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, उपक्रमांचे फलित, यासंदर्भातील भविष्यातील योजना, नियोजन यांबाबत क्रमवार, मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे नामोल्लेख तसेच त्यांचे वक्तव्य निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणे आवश्यक असते.
  3. अहवालाचा समारोप : कोणत्याही सभा/ कार्यक्रम/ समारंभ यांच्यातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे आवश्यक असते.
  4. अहवालाची भाषा : अहवाललेखनाची भाषा सोपी सहज आकलन होईल अशी असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली असते. अशा भाषेचा अवलंब अहवाललेखनात केला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

एक नमुना म्हणून महाविदयालयात साजरी केलेली ‘सावित्रीबाई फुले जयंती’ अहवाललेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते पुढील तक्त्याच्या साहाय्याने पाहू या –

विषय : ‘सावित्रीबाई फुले जयंती’ समारंभाचा अहवाल.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 2

शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अहवाललेखनात कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे जोडली जातात. अहवालाच्या विश्वसनीयतेत यामुळे निश्चितच भर पडते.

अहवाललेखनात महत्त्वाचे :

  • कोणत्याही अहवालाच्या पहिल्या पानावर अहवालाचे शीर्षक असावे. संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असावा.
  • अहवालाचा विषय लक्षात घेऊन अहवाललेखन करणे महत्त्वाचे असते.
  • शीर्षक, उपशीर्षक, संख्यात्मक माहिती, आलेख, संकलित माहिती, त्यावरून मांडलेले निष्कर्ष या सर्वांचा समावेश अहवालात मुद्देसूदपणे करणे अपेक्षित असते. अहवालात नमूद केलेले मुद्दे, उपमुद्दे, विविध प्रकरणे यांची अनुक्रमणिका जोडणे अपेक्षित असते.
  • अहवाल सादर करणाऱ्याचे नाव आणि हुद्दा नमूद करणे गरजेचे.

अहवाललेखन लालित्यपूर्ण लेखन प्रकारात येत नसले तरी अहवाललेखन ही कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य आहे – “The destiny of India is being shaped in her classrooms!” (भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे!) असे आहे. अशा लालित्यपूर्ण शैलीत विचार प्रकटीकरणामुळे अहवाललेखन लालित्यपूर्ण होऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी :

  • अहवाललेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी नेमकी जाण असली पाहिजे.
  • अहवाललेखन वास्तवदर्शी असायला हवे. जे घडले ते सुस्पष्टपणे लिहिणे अपेक्षित असते.
  • अहवाललेखनात विषयाला विसंगत असलेले स्वमत, विचार लिहू है नयेत. अहवाललेखनात अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असू नये.
  • अहवाल विषयाचे स्वरूप, वेगळेपण, विशिष्ट बारकावे टिपता आले पाहिजेत. यासाठी अहवाललेखकाकडे सूक्ष्म आकलन निरीक्षणशक्ती असली पाहिजे.
  • कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे.
  • अहवाललेखनात व्यक्तींची नावे, हुद्दा चुकीची लिहिली जाऊ नयेत. घटनाक्रम चुकवू नये.
  • न घडलेल्या घटनांचा उल्लेख करू नये.
  • अहवाललेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी (मथळा, तारीख, वेळ, स्थळ, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक/पुरस्कार प्राप्त व्यक्ती इत्यादी) नोंदवणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे. विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाललेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते.
  • अहवाललेखनाची भाषा सहज, सोपी स्वाभाविक असावी.
  • आलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारी असू नये.
  • अहवाललेखनात सुसूत्रता असावी. अहवाल मांडणीत विस्कळीतपणा असू नये.
  • अहवाललेखन आरंभापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकात्म स्वरूपाचा असावा. अर्धवट, अपुरा असू नये किंवा तसा वाटू नये.
  • अहवाल लिहून झाल्यावर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षऱ्या केलेल्या असाव्यात.

नोंद : अहवाललेखन नमुना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.१०३ वर दिलेला अहवाललेखनाचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला अहवाललेखनाचा नमुनाही अभ्यासा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 3
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविदयालयाच्या वतीने ‘मराठी भाषा E गौरव दिन’ अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी २०२० रोजी गुरुवारी सकाळी महाविदयालयाच्या के. पी. रेगे सभागृहात मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

अभिनव शिक्षण संस्थेचे संचालक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विदयार्थीप्रिय शिक्षक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित आणि विदयार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कनिष्ठ महाविदयालय कला शाखेच्या विदयार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा’ या गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे प्रास्ताविक महाविदयालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद राणे यांनी केले. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी प्रास्ताविकात नमूद केली. इतिहास विभागाच्या प्रा. देविका कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. महाविदयालयाच्या प्राचार्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे अशी विनंती केली. महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महाविदयालयाच्या वतीने स्वागत केले.

यानंतर कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ‘मी मराठी’ या शीर्षकाची १५ मिनिटांची नाटिका सादर केली. नीलम काणे, दुर्गेश कर्वे आणि देविका भिडे या बारावीच्या विदयार्थ्यांचा यात सहभाग होता.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी उपस्थित सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा दिल्या. प्राचार्यांच्या सदिच्छापर भाषणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. मराठीतील अक्षरांच्या गमतीजमती सांगितल्या. अक्षरांचे व्यक्तिमत्त्व विविध उदाहरणातून उलगडून सांगितले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेतील काही ओळींच्या सुलेखनाचे प्रात्यक्षिक विदयार्थ्यांना दाखवले. त्याक्षणी उपस्थित सर्वच भारावून गेले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर असणाऱ्या वर्गाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बारावी (ब) या वर्गाने हे पारितोषिक पटकावले. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. वर्गप्रतिनिधी कोमल जोंधळे या विदयार्थिनीने वर्गाच्या वतीने पारितोषिक स्वीकारले.

यानंतर संस्थेचे संचालक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी अध्यक्षीय भाषण केले. मराठी भाषेचा गोडवा सांगत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्वही सांगितले. विदयार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्गाचे विविध उपक्रमांतील सक्रियतेसाठी कौतुक केले. हिंदी विभागप्रमुख अर्चना गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित प्राध्यापक वर्ग, निमंत्रित आणि विदयार्थी या सर्वांचे ऋण व्यक्त केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

दोन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माउलींच्या – पसायदानाने झाली.

प्रा. डॉ. आनंद राणे
मराठी विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.2 माहितीपत्रक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक

12th Marathi Guide Chapter 4.2 माहितीपत्रक Textbook Questions and Answers

कृती

1. माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.
उत्तर :
बदलत्या काळात उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संस्था/उत्पादन/सेवा यांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा वेळी ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठी उत्पादकांकडून माहितीपत्रकाचा वापर वाढला आहे. माहितीपत्रक कुठल्याही संस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा वैशिष्ट्यपूर्णरीत्या परिचय करून देत असते. जनमत आकर्षित करण्यासाठी एकप्रकारचे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. कमी वेळात, कमी खर्चात विश्वासार्ह माहिती ग्राहकाकडे माहितीपत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते. सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते करोडोंची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासते.

पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खादयपदार्थ, रेडीमेड साड्या अशा सर्वच बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, पतपेढ्या, पर्यटनसंस्था इत्यादींमध्येही समुदाय आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. तसेच, कला, संगीत, विविध अभ्यासक्रम, विविध बांधकामे, गृहसंकुल इत्यादी क्षेत्रांतही माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका निभावत असते. ज्या ज्या क्षेत्रात लोकआकर्षणाची गरज असते तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्था/उत्पादन/सेवा यांचा चेहरा असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

2. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा.

(अ) आकर्षक मांडणी
उत्तर :
माहितीपत्रक हे उत्पादनाचे परिचयपत्रक असते. संस्था/ उत्पादन/सेवा यांची सविस्तर माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. माहितीपत्रकातील छापील मजकूर जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढीच त्या मजकुराची पानावरची मांडणीही महत्त्वाची असते. माहितीपत्रक दिसताच क्षणी ते ‘वाचावे’से वाटले पाहिजे. पानांवर मजकुराची ठेवण, कागदाचा आकार, रंगीत छपाई, अक्षरांचा आकार, सुलेखन, समर्पक चित्रे इत्यादी गोष्टींचा बारकाईने विचार माहितीपत्रकात करणे आवश्यक असते. माहितीपत्रकावरील शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य यांचे स्थान नेमके असावे. तंत्रज्ञानाच्या युगात रंगीत छपाई अधिक पसंत केली जात आहे. कागदाचा आकार मजकूर मांडणीला उठाव देण्यास साहाय्य करीत असतो. माहितीपत्रकातील अक्षरे ठळक दिसतील अशी असावीत. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी चित्रकार, कौशल्यपूर्ण कलाकार, संगणक तज्ज्ञ मदतीला असल्यास माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक होण्यास दिशा मिळते.

(आ) भाषाशैली
उत्तर :
आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. माहितीपत्रकाच्या दृश्यमांडणीत मजकुराला विशेष महत्त्व आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी त्यातील भाषाशैली ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी. परंतु ती अवास्तव असणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते.

उदा., ‘आमच्या घरगुती पोळीभाजी केंद्रात पोटभर जेवण मिळेल, घरच्या जेवणाचा अनुभव येईल, कमी किमतीत चवदार अन्न मिळेल.’ एवढ्या माहितीसाठी ‘पोटभर जेवण; घरच्या चवीचा स्वाद, किंमतही कमी, दयाल तुम्हीही दाद’ अशा एकाच वाक्यात सांगताना मनाला स्पर्श करणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे साहाय्यक ठरते. वाचकमनावर ठसा उमटवणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे आवश्यक असते.

3. थोडक्यात माहिती लिहा.

(अ) माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.
उत्तर :
आज स्पर्धेच्या युगात व्यापाराच्या बाबतीत उत्पादक आणि ग्राहक फार चौकस झाले आहेत. उत्पादकांना आपले उत्पादन/सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे अगत्याचे असते; तर घरबसल्या सर्व उत्पादनांची सविस्तर माहिती मिळवणे हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे असते. अशा वेळी ‘माहितीपत्रक’ या दोहोंत समन्वय साधत असते. आज असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. फळे-भाजी विकणाऱ्या सर्वसाधारण विक्रेत्यापासून करोडोंचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था, व्यापारी सर्वांनाच माहितीपत्रक आवश्यक असते. शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, विविध अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्था, प्रवासी कंपन्या, शेती अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, संगीत, कला यांसारख्या क्षेत्रांत माहितीपत्रक महत्त्वाचे ठरते.

उदा., एखादया शैक्षणिक संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विदयार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक गरजेचे असते. कारखाने, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, बचतगट, तसेच, औषधे, विद्युत उपकरणे, वाहने, वगैरेंची निर्मिती करणारे उदयोग, यांसारख्या क्षेत्रांतही माहितीपत्रक महत्त्वाचे असते. उदा., विद्युत उपकरणे खरेदी केल्यावर त्यांच्या जोडणीपासून उपयुक्ततेपर्यंत सर्व बाबी सविस्तर माहितीपत्रकात नमूद केलेल्या असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

(आ) माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.
उत्तर :
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. वेगवेगळ्या संस्था/कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रके काढत असतात. माहितीपत्रकामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. माहितीपत्रकात ‘माहिती’ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते.

जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनाविषयी औत्सुक्य निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.

4. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. माहितीपत्रक नवनवीन योजना/सेवा/उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेते यांपासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणामाल, दिवाळीअंक, घरगुती वापराची उपकरणे, अलिशान गाड्या अशा सर्वच उत्पादनाची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रक योजना/सेवा/उत्पादन यांचा आरसा असते. माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात. उत्पादनाचे वैशिष्ट्य, वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील, तिथे माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते.

5. महाराष्ट्रीय पदधतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुददे आवश्यक राहतील ते लिहा.
उत्तर :

  • भोजनगृह चालवणाऱ्या संस्थेचे अथवा सदर भोजनगृहाचे नाव, बोधवाक्य, बोधचिन्ह.
  • भोजनगृहाचा पत्ता/ स्थापना वर्ष/ नोंदणीक्रमांक/ दूरध्वनी/मोबाइल क्रमांक/ ई-मेल/ वेबसाईट इत्यादी.
  • भोजनगृह चालवणाऱ्या व्यक्तीचे/सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव/ संपर्क क्रमांक/ ई-मेल इत्यादी.
  • भोजनगृहासंबंधी प्राथमिक माहिती. (महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास जेवण, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, खादयपदार्थांचे वैशिष्ट्य.)
  • भोजनगृहातील सुविधा. (बैठक व्यवस्था, बैठक संख्या, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणी इत्यादी.)
  • भोजनगृहाची वैशिष्ट्ये. (शाकाहारी आणि मांसाहारी स्वतंत्र शेगडी; मालवणी, वैदर्भीय, मराठवाडी, खानदेशी, कोल्हापुरी, पुणेरी खादयपदार्थ यांचे वैविध्य.)
  • भोजनगृहाची माहिती. (उदा., खादयपदार्थांची यादी, किंमत, भोजनगृहाची वेळ, सुट्टीचा दिवस, घरपोच सेवा.)
  • भोजनगृहाची अन्य वैशिष्ट्ये. (विविध मसाले, लोणची, पापड, सांडगे, कोकम, आवळा सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध.)
  • भोजनगृहाची पूरक छायाचित्रे.
  • भोजनगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती/जवळील नावाजलेले ठिकाण इत्यादी.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

6. एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 1

माहितीपत्रक प्रस्तावना

आजचे युग हे स्पर्धेचे आहे. रोज नवनव्या संस्था, उदयोग उदयाला येत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने नवनव्या योजना जागतिक बाजारात सर्रास वावरत आहेत. एखादया संस्थेची, योजनांची, उत्पादनाची तपशीलवार माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळे ग्राहकही दिवसेंदिवस जागरूक आणि चौकस होऊ लागला आहे. ग्राहकाला घरबसल्या लिखित स्वरूपात हे तपशील माहितीपत्रकाच्या माध्यमातून उत्पादक उपलब्ध करून देऊ लागले आहेत. माहितीपत्रक हे एकाअर्थी उत्पादनाचे, संस्थेचे प्रसिद्धीपत्रकच असते. माहितीपत्रकास उत्पादक आणि ग्राहक यांतील अप्रत्यक्ष दुवा म्हणता येऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

माहितीपत्रकाचे स्वरूप :

  • एखादी संस्था, उद्योग, गृहोदयोग यांत दिवसेंदिवस नवनवीन योजनांची भर पडत असते. जागतिकीकरणाच्या युगात नवनवीन संस्था, बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मिती व वाढ होत आहे.
  • माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळत असते.
  • माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे लिखित स्वरूपातील परिचयात्मक पत्रक होय.
  • माहितीपत्रक हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे.
  • माहितीपत्रकामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात संवाद निर्माण होतो.
  • उत्पादनाला नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक पहिली पायरी असते.
  • माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असते.
  • माहितीपत्रक उत्पादनाविषयी जनसामान्यांच्या मनात कुतूहल, उत्कंठा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.

माहितीपत्रकाची आवश्यकता :

  • माहितीपत्रक म्हणजे सर्वसाधारणपणे प्रसिद्धीपत्रक असते.
  • निरनिराळ्या संस्था, व्यापारी कंपन्या, उत्पादक आपल्या योजनांची तसेच उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकांची निर्मिती करीत असतात.
  • फळे, भाजीपाला विक्रेत्यांपासून ते लक्षावधींची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. उदा., पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खादयपदार्थ, रेडीमेड साड्या अशा बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्वच वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्था, पतपेढ्या, पर्यटनसंस्था इत्यादींमध्येही समुदायाला आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते.
  • आपली वैशिष्ट्ये, वेगळेपण आणि ग्राहकाला होणारे फायदे अधोरेखित करण्यासाठी माहितीपत्रक उत्तम साधन असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

माहितीपत्रकाचे वर्गीकरण :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 2

लक्षात घ्यावे असे :

बऱ्याचदा ‘माहितीपत्रक’ आणि ‘परिपत्रक’ यांतील भेद समजून घेण्यात चूक होऊ शकते. माहितीपत्रक आणि परिपत्रक यांत पुसटशी सीमारेषा आहे. माहितीपत्रक मोठ्या जनसमुदायासाठी असते, तर परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काढले जाते. परिपत्रकात कायदेशीर बाबींचा अवलंब केलेला असतो, माहितीपत्रकाचे स्वरूप मात्र सामान्यजनांना आकलन होण्याजोगे असते. माहितीपत्रकात विश्वासार्ह माहिती असणे अपेक्षित असते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्थेचा/ उत्पादनाचा/सेवेचा चेहरा असते.

माहितीपत्रकाची रचना :

1. ‘माहिती’ला प्राधान्य :

  • माहितीपत्रकाच्या शीर्षकावरूनच त्याची प्रकृती लक्षात येते.
  • माहितीपत्रकाचा ‘माहिती’ देणे हा मुख्य हेतू आहे.
  • ज्या विषयाचे माहितीपत्रक आहे, त्याची सुसंगत, सविस्तर आणि अचूक माहिती त्यात असणे आवश्यक असते.
  • संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. उदा., संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणीक्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ई-मेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी.
  • माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ व सत्य असावी. अतिशयोक्ती तसेच चुकीची माहिती माहितीपत्रकात असू नये. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी असावी. सामान्य लोकांना सहज आकलन होईल अशी भाषिकरचना असणे आवश्यक असते.
  • माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये.
  • परीक्षेत माहितीपत्रक तयार करताना त्यात चित्रे काढणे अपेक्षित नाही.
  • फक्त भाषिक मजकूर पुरेसा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

2. माहितीपत्रकाची उपयुक्तता :

  • माहितीपत्रक हे उपयुक्त असावे. वाचून झाल्यावर चुरगळून फेकून न देता लोकांनी संग्रही ठेवावे अशा स्वरूपाचे असावे.
  • माहितीपत्रकात ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची माहिती असल्यास माहितीपत्रकाची उपयुक्तता नक्कीच वाढते.
  • माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात.
  • माहितीपत्रकांची काही क्षेत्रे : ग्राहकाचे दैनंदिन प्रश्न, आरोग्य, शेती, तांत्रिक किंवा वैज्ञानिक स्वरूपाची माहिती देणारे माहितीपत्रक.
  • ग्राहक अशा माहितीपत्रकांकडे लगेच वळतात. उदा., ‘कोरोनावर मात करताना अशी वाढवावी प्रतिकार शक्ती’, ‘फळांची खरी ओळख पटवताना…’, ‘कशी असते अन्नधान्यातील भेसळ?’

3. माहितीपत्रकाचे वेगळेपण :

  • बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचेही वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने केली जाते.
  • अन्य माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादींद्वारे वेगळेपण आणले जाते.

4. आकर्षक मांडणी (ले-आऊट) :

  • माहितीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. यासाठी माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असायला हवी.
  • माहितीपत्रकाचा आकार योग्य असावा. खूप मोठा व लहान असता कामा नये.
  • मध्यम आकारात माहितीच्या मजकुराची मांडणी नीटनेटकी करणे शक्य असते.
  • माहितीपत्रकाचे पहिले पृष्ठ लक्षवेधी असावे. शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य ठसठशीत असावे.
  • माहितीपत्रकाच्या कागदाची निवडही महत्त्वाची असते.
  • कागद अगदी हलका तसेच अगदी जाड असणेही योग्य नाही.
  • बदलत्या काळात रंगीत माहितीपत्रक ग्राहकाला आकर्षित करीत असतात. त्यांमुळे छपाई रंगीत असल्यास साहाय्य होते.
  • माहितीपत्रकाची मांडणी दर्जेदार करण्यासाठी वेळोवेळी संगणक तज्ज्ञ, कुशल कलाकार, चित्रकार इत्यादींची मदत घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

भाषाशैली :

  • आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे.
  • वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे.
  • माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी.
  • माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. उदा., गाण्याच्या नव्या वर्गांची माहिती देताना; ‘सूरांची बैठक पक्की केली जाईल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाण्याच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले जाईल.’ एवढा आशय एका वाक्यातून सांगण्याऐवजी पुढील मुद्दयांत तो मांडता येईल :

ठळक वैशिष्ट्ये :

  • सुरांची पक्की बैठक.
  • तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
  • सरावावर खास भर.

व्यावसायिक संधी :

  1. आजच्या स्पर्धेच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे आणि ती. वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांसाठी आवश्यक बाब आहे.
  2. आज बहुतांश माहितीपत्रके इंग्रजीतून निर्माण होत असल्याचे दिसते. अशा वेळी मराठीतून परिणामकारक माहितीपत्रके निर्माण करणाऱ्यांचे महत्त्व विशेष वाढताना दिसत आहे.
  3. तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि भाषेचे प्रभुत्व असणाऱ्या युवावर्गाला हे क्षेत्र खुणावत आहे.
  4. माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे.
  5. माहितीपत्रक संस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा चेहरा असल्याने माहितीपत्रकावरून संबंधित विषयाच्या कामाचा दर्जा लक्षात येत असतो. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीतून दर्जेदार माहितीपत्रक निर्मात्याला प्रतिष्ठा आणि पैसा मिळू लागला आहे.

नोंद : माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्दे समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९६ वर दिलेला माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढील नमुनाही अभ्यासा.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना :
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुलेखनाचे वर्ग नव्याने सुरू करायचे आहेत. अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. त्यासाठी –

  • ज्या संस्थेमार्फत सुलेखनाचे वर्ग चालवले जाणार आहेत त्या संस्थेचे बोधचिन्ह/बोधवाक्य, तसेच संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पदनाम.
  • संस्थेचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/नोंदणीक्रमांक/दूरध्वनी/मोबाइल क्रमांक/ई-मेल/वेबसाईट इत्यादी.
  • संस्थेची थोडक्यात माहिती. (संस्थेची स्थापना, स्थापनेचा हेतू, संस्थापक, अन्य उपक्रम इत्यादी.)
  • सुलेखन वर्गाविषयी सविस्तर माहिती. (वर्ग सुरू करण्यामागचा हेतू, वयोगट, कालावधी इत्यादी.)
  • सुलेखन वर्गासाठी असणाऱ्या सुविधा. (पेन, पेन्सिल, कागद, शाई इत्यादी साधनांची उपलब्धी, आवश्यक पुस्तके.)
  • सुलेखन वर्गाची वैशिष्ट्ये. (मर्यादित विदयार्थी संख्या, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शक, सुलेखनाचे प्रदर्शन, सुलेखनाची संधी इत्यादी.)
  • सुलेखन वर्गाचे भविष्यातील महत्त्व. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत
  • आधीच्या सुलेखन वर्गाची पूरक छायाचित्रे. (निवडक माजी विदयार्थ्यांच्या सुलेखनाची छायाचित्रे.)
  • सुलेखन वर्गाच्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती.
  • प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, फी स्वरूप, फी भरण्याचे टप्पे, सुलेखन वर्गाचा एकूण कालावधी, वेळ, सुट्ट्यांचे नियोजन, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक, सुलेखन वर्ग सुरू होण्याची तारीख इत्यादी.

नोंद : माहितीपत्रक समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.९८ व ९९ वर दिलेला माहितीपत्रकाचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला माहितीपत्रकाचा नमुनाही अभ्यासा.

माहितीपत्रकाचा नमुना
दर्शनी पृष्ठ :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 3

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

मागील पृष्ठ :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 माहितीपत्रक 43

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.1 मुलाखत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

12th Marathi Guide Chapter 4.1 मुलाखत Textbook Questions and Answers

कृती

1. खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.

प्रश्न अ.
मुलाखतीची पूर्वतयारी.
उत्तर :
मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक-श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली. पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली करणे आवश्यक असते. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतीपूर्वीची भेट निश्चितच मुलाखत यशस्वी करण्यात साहाय्यभूत ठरते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न आ.
मुलाखतीचा समारोप.
उत्तर :
बदलत्या काळात व्याख्यानाऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचे विचार ऐकण्यास रसिकांची पसंती मिळू लागली आहे. मुलाखत क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलाखतकाराला मुलाखतदात्याचे संपूर्ण कार्यकर्तृत्व रसिकांसमोर प्रश्नांच्या आधारे उलगडून दाखवायचे असते. मुलाखतकारासमोर हे मोठे आव्हानच असते असे म्हणता येते. मुलाखतीच्या यशस्वितेसाठी मुलाखतकाराला तीन टप्प्यांवर मुलाखतीचे विभाजन करणे आवश्यक असते. ते असे : मुलाखतीचा आरंभ, मध्य आणि समारोप. हे टप्पे रसिकांना प्रत्यक्ष जाणवू न देणे हे मुलाखतकाराच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून असते. मुलाखतीचा आरंभ जेवढा आकर्षक अपेक्षित असतो, तेवढाच समारोप परिणामकारक असणे गरजेचे असते.

मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर प्रश्नांऐवजी ठळक वक्तव्य अपेक्षित असते. समारोपात मुलाखतकाराने मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडणे आवश्यक असते. हे करताना समारोपात मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन मुलाखतकाराने मुलाखत सकारात्मक सूत्रावर सादर करणे योग्य ठरते. या टप्प्यावर मुलाखत रेंगाळू न देण्याची खबरदारी मुलाखतकाराला घ्यावी लागते. मुलाखतीच्या उद्दिष्टाचे साफल्य या टप्प्यावर दिसून येते. मुलाखतकाराने या समारोपादरम्यान निवेदनासाठी थोडासा वेळ घेतला तरी चालू शकते. मुलाखतकाराचे रसिकांसोबत अविस्मरणीय संवाद या टप्प्यावर होणे आवश्यक असते. ‘गोडी अपूर्णतेची’ या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते. ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचले ना, हे तपासण्यासाठी मुलाखतीत समारोपाचा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण असतो.

2. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
आजचे युग संवादाचे आहे. संवादाची अनेक उद्दिष्टे बघायला मिळतात. मुलाखत हेदेखील असेच विचारविनिमयाचे एक संवादी रूप आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा परिचय सर्वांना व्हावा, या हेतूने मुख्यत्वे मुलाखत घेतली जाते. मुलाखतीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणे हे प्रधान असते. सामान्यांचा असामान्य प्रवास मुलाखतीतून उलगडणे शक्य असते. कितीतरी व्यक्तींचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपट असतो. हा पट जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते.

यासाठी मुलाखत महत्त्वाचा मंच असतो. विचारवंतांची विविध मते, तज्ज्ञांचे विषयज्ञान जाणून घेण्यासाठी विशेषतः मुलाखतीचे आयोजन केले जाते. मुलाखतीतून विशिष्ट व्यक्तीची जडणघडण जाणून घेता येते; यासोबतच काळ, परिसर यांवरही प्रकाश टाकणे शक्य असते. मुलाखतीच्या माध्यमातून कलास्वाद घेता येतो. समाजाचे प्रबोधन करणे, जनजागृती करणे, एखादी घटना सविस्तर समजून घेणे, विविध कलांविषयी जाणून घेणे अशा अनेक हेतुपूर्ततेसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न आ.
व्यक्तीमधील ‘माणूस’ समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
उत्तर :
मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखतदात्याचे अंतरंग रसिकश्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाचखळग्यांचा केलेला सामना, त्या त्या वेळी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणू स्मरणच मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो. मुलाखतीत आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरांतून घेत असतो. थोडक्यात, व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय. मुलाखतीतून हे शक्य होते.

प्रश्न इ.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा.
उत्तर :
मुलाखत म्हणजे संवाद. हा संवाद पूर्वनियोजित असतो. मुलाखतीतील संवाद हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखतकार, मुलाखतदाता आणि मुलाखत ऐकणारे, पाहणारे वा वाचणारे रसिकश्रोते यांच्या सहभागातून मुलाखत आकाराला येत असते. स्वतःच्या क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा कार्यप्रवास लोकांपर्यंत पोहोचावा हा मुलाखतीचा हेतू असतो. मुलाखतदात्याचा कार्यसंघर्ष आणि जीवनसंघर्ष उलगडून दाखवण्याचे कार्य मुलाखतीत होत असते. मुलाखतकाराला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवण्याचे कौशल्यपूर्ण काम करायचे असते.

मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोन व्यक्तींना ठरवून नियोजनपूर्वक वैचारिक, भावनिक संवाद साधावा लागतो. मुलाखतीसाठी विषय, व्यक्ती, व्यक्तींमधील संवादासाठी प्रश्नावली याचे पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. यासोबतच मुलाखतीचे औचित्य, दिवस, वेळ, स्थळ, कालावधी, उपस्थित असणारा रसिक वर्ग यांचाही विचार पूर्वनियोजनात महत्त्वाचा असतो. उत्तम पूर्वनियोजन हे मुलाखतीचे अर्धे यश असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न ई.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
उत्तर :
मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेता येतो. दोन व्यक्तींच्या संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मुलाखतीत रसिकांना गुंगवून ठेवण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे अपरिहार्य असते. मुलाखत घेताना काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते. मुलाखतदात्याला सहज, सोपे प्रश्न विचारणे गरजेचे असते. मुलाखतदात्याला अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. मुलाखतदात्याचा अवमान होईल, उत्तर देताना संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत.

मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही उचित ठरते. अपेक्षित उत्तर सूचित होईल असेच प्रश्नांचे स्वरूप असावे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मुलाखत घेताना प्रश्नांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. प्रश्नांची निवड करताना उपस्थित श्रोतृवर्ग लक्षात घेणे गरजेचे असते. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न टाळावे. ज्याद्वारे तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने संवाद साधत राहावे. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.

प्रश्न उ.
उमेदवार ‘आतून’ जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
आधुनिक काळात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. स्पर्धा जशी तंत्रज्ञानाची आहे, तशीच ती दोन व्यक्तींमध्येसुद्धा आहे. आज नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बदलत्या काळात मुलाखतीचे स्वरूप बदलू लागले आहे. उमेदवाराची पदवी, विषयज्ञान, भाषिक कौशल्ये यासोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आज केंद्रस्थानी आले आहे. उमेदवार बोलतो कसा, पोशाख कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते.

विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला जातो. कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट, कामाचे तास, सहकाऱ्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध, गटप्रमुख वा गटकार्याची क्षमता, कामाची विभागणी, वेळेचे बंधन, नियोजित बैठका, समूह सदस्यांचे प्रश्न, प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते.

मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसा, बोलतो कसा यापेक्षा ‘विचार कसा करतो’ याकडे अधिक लक्ष दिले जाते. उमेदवार भावनिक, वैचारिक, मानसिक पातळीवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवाराच्या ‘बाह्यरंगा’पेक्षा ‘अंतरंग’ जाणून घेणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न ऊ.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
उत्तर :
सामान्यांत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्त्वांना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखतकारावर असते. गृहिणी, विदयार्थ्यांपासून ते डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, संपादक, पत्रकार, कवी, लेखक, गिर्यारोहक, समुपदेशक, खेळाडू, तंत्रज्ञ, शेतमजूर, कामगार अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याचा प्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो. मुलाखतीत अशा कार्यसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकता येतो.

यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, संघर्ष, जिद्द, परिस्थितीशी झुंज, सोबतीचे स्नेहीजन अशा कितीतरी गोष्टींवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो. हे जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते. मुलाखतीतून असा खडतर जीवनप्रवास जाणून घेता येतो. जगावेगळी आव्हाने पेलून स्वतःच्या कार्याने ‘स्व’ सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात.

3. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा.

प्रश्न अ.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
उत्तर :
मुलाखतीत मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात संवाद होत असतो. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखतदात्याला बोलते करण्याचे कार्य मुलाखतकार करीत असतो. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, आवडीनिवडी, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, हुद्दा, लेखनकार्य, पुरस्कार, वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक भूमिका इत्यादींची सविस्तर माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक असते. या माहितीमुळे मुलाखतीतील संवाद सहज होऊ शकतो.

प्रश्न आ.
मुलाखतदात्याचे कार्य
उत्तर :
ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. ज्यांच्याजवळ काहीतरी ‘सांगण्यासारखे’ आहे आणि ज्यांच्याकडून ‘ऐकण्यासारखे’ काहीतरी आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे लोकांनाही आवडते. मुलाखतदात्याचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकाराला मुलाखतदात्याचे कार्यकर्तृत्व पूर्णपणे जाणून घ्यावे लागते. मुलाखतदात्याचे कार्यक्षेत्र, स्वरूप, संघर्ष, कार्यसिद्धीसाठी जिद्द अशा कितीतरी गोष्टींची सखोल माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. संदर्भ लक्षात घेऊन, चिंतन करणे गरजेचे असते. रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना किंवा वाचकांना मुलाखतदात्याचा कार्यप्रवास उलगडून दाखवणे हे मुलाखतीचे प्रमुख कार्य असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत ही महत्त्वाची बाब मानली जाते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न इ.
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन
उत्तर :
मुलाखत संवाद कौशल्य आहे. मुलाखतकाराचे संभाषण कौशल्यावर प्रभुत्व असणे आवश्यक असते. मुलाखतदात्याच्या लेखनकृती मुलाखतकाराने वाचणे गरजेचे असते. अशा वाचनातून मुलाखतदात्याची वैचारिक भूमिका स्पष्ट होते. मुलाखतकाराला या वाचनाधारे प्रश्नांची तयारी करता येणे सहज शक्य होते. केवळ मुलाखत विषयाच्या अनुषंगाने वाचन न करता मुलाखतकाराचे वाचन चौफेर असावे. साहित्यिक, सामाजिक घडामोडींचे वाचन मुलाखतकाराने सातत्याने करणे गरजेचे असते. मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराने वाचन करणे अपेक्षित असते. मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यकृतींचा परिचय मुलाखतकाराला असणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकारासाठी वाचन हा घटक अदृश्य परंतु महत्त्वाचा आहे.

प्रश्न ई.
प्रश्नांची निर्मिती
उत्तर :
मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप फार महत्त्वाचे असते. मुलाखतीची पूर्वतयारी हा एकप्रकारे मुलाखतीचा गृहपाठ असतो. त्यामुळे मुलाखतदात्याची सर्व आवश्यक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखतकाराकडून कार्यप्रवास अधिकाधिक जाणून घेता येईल, अशी प्रश्नांची तयारी करणे महत्त्वाचे असते. प्रश्नांची निर्मिती उपलब्ध माहितीच्या आधारे करणे गरजेचे असते. मुलाखतीत विचारायचे प्रश्न पूर्वतयारीत मुलाखतकाराला क्रमवार लिहून काढावे लागतात. प्रश्नांच्या ओघावर मुलाखतीतील संवादाचे प्रवाहीपण अवलंबून असते.

मुलाखतीचे हे प्रवाहीपण लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती करणे आवश्यक असते. प्रश्नांचे स्वरूप सहज आकलन होईल असे असावे. चुकीचे, अप्रस्तुत, भावना दुखावणारे, तणाव निर्माण करणारे, विषयाशी असंबद्ध, प्रभावहीन प्रश्न मुलाखतीत नसतील, याची काळजी पूर्वतयारीत घेणे गरजेचे असते. मुलाखतीत प्रश्नांची संख्या लक्षात घ्यावी लागते. प्रश्नांमध्ये वैविध्य असावे. कधीकधी एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मुलाखतदात्याकडून येऊ शकते. अशा प्रसंगी पर्यायी प्रश्नांची तयारी पूर्वतयारीत ठेवणे महत्त्वाचे असते. पूर्वतयारीत तयार केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची निवड मुलाखतीत महत्त्वाची असते.

4. खालील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

प्रश्न अ.
भाजीवाला
उत्तर :
प्रश्नावली :

  1. भाजीविक्रीचा व्यवसाय किती वर्षांपासून करता?
  2. नोकरीऐवजी भाजीविक्रीचा व्यवसाय करावा, असे तुम्हांला का वाटले?
  3. तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची विक्री करता?
  4. दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता?
  5. भाजीविक्रीच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचे कशा प्रकारे सहकार्य मिळते?
  6. लोकांची वर्तणूक कशी असते?
  7. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी (अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई इत्यादी) भाजीविक्रीवर काय परिणाम होतो?
  8. भाजीविक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात साधारण किती नफा मिळतो?
  9. तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते?
  10. भाजीविक्रीदरम्यान स्मरणात राहिलेला अनुभव कोणता?

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रश्न आ.
पोस्टमन
उत्तर :
प्रश्नावली :

  1. स्थिर जागेऐवजी सतत फिरत राहाव्या लागणाऱ्या नोकरीचा स्वीकार का केलात?
  2. लोकांच्या भावना, सुख-दुःखे बंदिस्त पाकिटातून घेऊन जाताना काय वाटते?
  3. लोक तुमची आतुरतेने वाट बघत असतात अशा वेळी तुमची काय प्रतिक्रिया असते?
  4. कामाचे स्वरूप म्हणून सतत फिरावे लागते तेव्हा शारीरिक, मानसिक थकवा जाणवतो का?
  5. आधुनिक काळात तंत्रज्ञानाने पत्राचे स्वरूप डिजिटल केले आहे, याबद्दल तुम्हांला काय वाटते?
  6. पत्र ही संकल्पना बदलत्या काळात कालबाह्य होऊ लागली आहे, तुम्हांला याचे वाईट वाटते का?
  7. तुम्ही स्वतः ई-मेल, एसएमएस यांसारख्या डिजिटल संवादाच्या साधनांचा वापर करता का?
  8. डिजिटल माध्यमाने तुमच्या कामाचा भार कमी केला असे तुम्हांला वाटते का?
  9. तुम्हांला कामाचे समाधान वाटते का?
  10. या व्यवसायातील तुमचे कटू व सुखावणारे अनुभव कोणते आहेत?

प्रश्न इ.
परिचारिका
उत्तर :
प्रश्नावली :

  1. व्यवसायाचे विविध पर्याय असताना परिचारिकेचा व्यवसाय का निवडला?
  2. परिचारिकेचा व्यवसाय केवळ नोकरी म्हणून स्वीकारला की सेवावृत्ती म्हणून?
  3. या व्यवसायात कार्यरत आहात त्याला किती वर्ष झाली? कामाप्रमाणे मोबदला मिळतो का?
  4. कामाच्या ठिकाणच्या सोयी कशा आहेत?
  5. काम केल्याचे समाधान मिळते का?
  6. लोकांचे सहकार्य मिळते का?
  7. लोक सन्मानाने वागवतात का?
  8. रुग्ण व नातेवाईक यांची वर्तणूक कशी असते?
  9. तुमच्या आयुष्यातील एखादा कटू तसेच आनंददायी प्रसंग कोणता?
  10. या व्यवसायात असलेल्यांना किंवा नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता?

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

मुलाखत प्रस्तावना

माणूस हा संवादप्रिय आहे. कुठेही बाहेर असताना अथवा प्रवास करीत असताना आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. विचारपूस करीतं असतो. नावापासून ते गावापर्यंत, आवडीनिवडीपासून ते व्यवसायापर्यंत कितीतरी विषयांवर आपण बोलत असतो. अशा संभाषणात कधी आपण सहप्रवाशाला प्रश्न विचारून माहिती जाणून घेत असतो, तर कधी आपण स्वतः माहिती देत असतो. म्हणजेच, दैनंदिन जीवनात नकळतपणे का होईना आपण संवादाच्या माध्यमातून मुलाखत या कौशल्याचा अवलंब करीत असतो. मुलाखत या संज्ञेचा हा पारंपरिक अर्थ असला, तरी बदलत्या काळात मुलाखत ही संज्ञा व्यापक अर्थ सांगणारी आहे.

आधुनिक काळात मानवी जीवनाची अनेक क्षेत्रे विकसित झाली आहेत. काही नव्याने निर्माण झाली आहेत. मानवी जीवन अधिक गुंतागुंतीचे बनू लागले आहे. जीवनाचे प्रत्येक क्षेत्र विशेषज्ञाचे बनून गेले आहे. प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार माणसे होऊ लागली. आजच्या काळात केवळ स्वतःच्या क्षेत्रापुरते मर्यादित राहून विचार करता येत नाही. स्वतःचे क्षेत्र धुंडाळत असताना अन्य क्षेत्रांमध्ये संचार करणेही अपरिहार्य बनले आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्या क्षेत्राच्या तज्ज्ञांकडून विविक्षित क्षेत्र जाणून घेणे, परिचित करून घेणे अपरिहार्य ठरते. या क्षेत्र माहितीसाठी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधणे म्हणजेच मुलाखत होय.

मुलाखतीचे स्वरूप :

  • मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. या संवादात संवाद साधणारी व्यक्ती, संवादाला उत्तर देणारी व्यक्ती आणि संवाद ऐकणारे, पाहणारे वा वाचणारे लोक अशा तीन पातळ्यांवर ‘मुलाखत’ हे भाषिक कौशल्य साकार होत असते.
  • एखादी व्यक्ती, संस्था यांच्या महत्त्वपूर्ण कामाचा आढावा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून घेतला जातो. थोडक्यात, दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक, हेतुपुरस्सर केलेला भावनिक, वैचारिक संवाद म्हणजे मुलाखत होय.
  • मुलाखत अनेकांगी असू शकते. एकावेळी एक व्यक्ती एका व्यक्तीची वा अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते.
  • मुलाखतीसाठी व्यक्ती, विषय, दिवस, वेळ, ठिकाण, कालावधी, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, पाहणारा रसिक वर्ग इत्यादी गोष्टी पूर्वनियोजनात विचारात घेतल्या जातात. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत
  • लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपात मुलाखत घेतली जाऊ शकते.
  • सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे ज्या व्यक्तींजवळ काहीतरी आहे, अशा व्यक्तींना बोलते करण्याचे काम मुलाखतीत असते. लोकप्रतिनिधी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, शास्त्रज्ञ, गायक, वकील, उदयोजक, शिक्षक, डॉक्टर, संपादक, गिर्यारोहक, कामगार, शेतकरी, सैनिक, पुरस्कार विजेते, अगदी गृहिणी, विदयार्थी असे कोणीही आपल्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणारे असामान्य लोक मुलाखतीच्या केंद्रभागी येऊ शकतात.

मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी शब्दावरून मराठीत आलेला शब्द आहे.

भेट, गाठ, बोलचाली, विचारपूस हे ‘मुलाखत’ या शब्दाचे अर्थ आहेत.

मुलाखतीचे तीन प्रमुख घटक पुढीलप्रमाणे :

  • मुलाखतदाता (Interviewer) असामान्य कर्तृत्वाने ठसा उमटवणारी, प्रश्नांना उत्तरे देणारी म्हणजेच मुलाखत देणारी व्यक्ती
  • मुलाखतकार (Interviewee) प्रश्न विचारणारी म्हणजेच मुलाखत घेणारी व्यक्ती
  • मुलाखतीचे वाचक, श्रोते व प्रेक्षक (Audience)

मुलाखत प्रक्रियेत मुलाखतदाता हे शिखर वाचक, प्रेक्षक पाया तर मुलाखतकार हा या प्रक्रियेचा सुवर्णमध्य मानला जातो.

मुलाखतीचा हेतू :

  • सामान्यांचा असामान्यपर्यंतचा प्रवास जाणून घेणे, हे मुलाखतीचे मुख्य कार्य असते.
  • मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता येतात.
  • एखादी व्यक्ती अनेक व्यक्तींसाठी किंवा समूहासाठी आदर्श असते. अशा व्यक्तींचा कार्यप्रवास उलगडण्यासाठी मुलाखत साहाय्यभूत ठरते.
  • ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो.
  • तो जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते. त्यांचा असा खडतर जीवनप्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो. मुलाखतीच्या माध्यमातून जनसामान्यांची ही जिज्ञासा पूर्ण होते.
  • एखादया घटनेवरील विचारवंतांची मते, अनुभव, दिशा जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींशी मुलाखतीच्या माध्यमातून केलेला संवाद , निश्चितच समाज प्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी उपयुक्त ठरू शकतो.
  • कोणताही विषय, घटना, त्याची सांगोपांग उकल करून समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते.

मुलाखतीचे प्रकार :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत 1

मुलाखतीची पूर्वतयारी :

  • मुलाखत प्रभावी होण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. अभ्यासपूर्ण पूर्वतयारी हा यशस्वी मुलाखतीचा पाया असतो.
  • ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती मुलाखतकाराकडे असावी लागते.
  • मुलाखतदात्याचे नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, शिक्षण, कौटुंबिक माहिती इत्यादी प्राथमिक माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतदात्याचा हुद्दा, कर्तृत्व, मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची विस्तृत माहितीही मुलाखतकाराकडे असणे महत्त्वाचे असते.
  • मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत
  • मुलाखतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीच्या विषयाच्या अनुषंगाने बनवलेली प्रश्नावली. मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराला अपेक्षित आणि समर्पक प्रश्नावली बनवावी लागते.
  • मुलाखतीचा अवधी लक्षात घेऊन प्रश्नांची निवड व क्रम यांचेही नियोजन पूर्वतयारीत गरजेचे असते.
  • मुलाखतकाराचे वाचन चौफेर असावे. केवळ मुलाखतीच्या विषयानुरूप केलेले वाचन पुरेसे नसते, तर व्यापक वाचनाचा व्यासंग असला पाहिजे.
  • मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही विचार मुलाखतकाराने करणे अगत्याचे ठरते. उदा., मुलाखत वर्तमानपत्रासाठी, नियतकालिकासाठी
  • म्हणजेच लिखित स्वरूपाची आहे की आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या दृक-श्राव्य माध्यमांसाठी याची माहिती घेणे आवश्यक असते.
  • लिखित मुलाखतीसाठी मुलाखतकाराला लेखनकौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रकट मुलाखतींसाठी मुलाखतकाराला भाषण-संभाषण कौशल्याचा अभ्यास असावा लागतो.
  • मुलाखतीसाठी असलेली बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, संदर्भ ग्रंथ, चित्रे, वादये इत्यादी गोष्टीही मुलाखतीच्या पूर्वनियोजनात तपासून घेणे योग्य असते.
  • मुलाखतदाता आणि मुलाखतकार यांची मुलाखतीपूर्वी भेट झाल्यास मुलाखत अतिशय मनमोकळी, सुकर व सुलभ होण्यास मदत होते.

मुलाखतीची विविध माध्यमे :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत 2

प्रत्यक्ष मुलाखत घेताना :

अलीकडच्या काळात ‘मुलाखत’ हे क्षेत्र वलयांकित क्षेत्र मानले जाते. प्रथितयश व्यक्तीचा कार्यप्रवास व्याख्यान रूपाऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून संवादरूपाने ऐकायला अधिक पसंती मिळू लागली आहे. आयोजकही बऱ्याचदा अशाच प्रयत्नात असतात. मुलाखतकाराला योग्य मानधन, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ‘मुलाखत घेणे’ या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त होत आहे. मुलाखतकाराला मुलाखतीदरम्यान मुलाखतदात्याच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यासोबतच लोकांच्या मनातील प्रश्नांची, कुतूहलाची पूर्तता करणे गरजेचे असते. अशा कौशल्यपूर्ण कामाचे तीन टप्पे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

प्रत्यक्ष मुलाखतीतील तीन टप्पे पुढीलप्रमाणे :
प्रत्यक्ष मुलाखतMaharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत 4

मुलाखतीसाठी महत्त्वाचे :

  • मुलाखतकाराने मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करावी. प्रश्नावलीचे स्वरूप लिखित असावे.
  • मुलाखतकाराने मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत.
  • प्रश्नांबाबत मुलाखतदात्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी मुलाखतकाराने घ्यावी.
  • मुलाखतीतील प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी.
  • मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे.
  • मुलाखतीदरम्यान सकारात्मक वातावरण निर्माण करावे.
  • ‘हो’, ‘नाही’, ‘माहीत नाही’ अशी उत्तरे येणारे प्रश्न विचारू नयेत.
  • प्रत्येक मुलाखतदाता भरभरून बोलेलच असे नाही. अशा वेळी मुलाखतकाराला उत्स्फूर्तपणे काही किस्से, आठवणी सांगून विषय रंगवता यावा, यासाठी संधी निर्माण करणे.
  • कधी कधी मुलाखतकार प्रश्नाच्या अनुषंगाने बराच वेळ अनुभवकथन करीत असतात. अशा वेळी मुलाखतदात्याला योग्य वेळी नव्या मुद्द्यावर वळवणे हे कौशल्याचे काम मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. प्रसंगावधान मुलाखतकाराकडे असावे.
  • संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरावेत.

मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी :

  • प्रश्नावली मुलाखतीच्या विषयाला अनुसरून असावी.
  • अप्रस्तुत, विषयबाह्य प्रश्न टाळावेत.
  • मुलाखतदात्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत.
  • ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न मुलाखतीत विचारू नयेत.
  • भावना दुखावतील असे प्रश्न मुलाखतीत नसावेत.
  • मुलाखत घेताना पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास आवश्यक आहे.
  • मुलाखतकाराचा आत्मविश्वास मुलाखतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
  • मुलाखतीदरम्यान असणारे मुलाखतकाराचे निवेदन प्रभावी आणि प्रवाही असावे.
  • मुलाखतीदरम्यान अनावश्यक हालचाल, हातवारे टाळावेत.
  • मुलाखतदात्यापेक्षा मुलाखतकाराने अनावश्यक बोलणे टाळावे.
  • मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी.
  • मुलाखतीदरम्यान रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुलाखतीची दिशा मुलाखतकाराने ठरवणे आवश्यक असते.
  • प्रश्नांतून प्रश्न निर्माण करीत जास्तीतजास्त मुद्द्यांना स्पर्श करावा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

नोकरी, प्रवेशासाठीची मुलाखत :

  • आज स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी तसेच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा घटक अनिवार्य मानला जातो.
  • उमेदवाराची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, ज्ञानपातळी, कौशल्ये, कल यांचे मापन या मुलाखतीत केले जाते.
  • उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्व मूल्यमापनावर अशा मुलाखतीत अधिक भर दिला जातो.
  • नोकरीसाठी मुलाखत घेताना उमेदवाराचे विषयज्ञान, पदवी, सामान्यज्ञान, आकलन क्षमता, तांत्रिक हशारी, भाषेवरील प्रभूत्व हे आजपर्यंत प्राधान्याने विचारात घेतले जात असे. बदलत्या काळात याचे स्वरूप बदलू लागले आहे.
  • उमेदवार बोलतो कसा, पोशाख कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते.
  • आज विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे, गटप्रमुख म्हणून गटकार्य करून घेणे, कमी वेळेत कामांची विभागणी करून पूर्तता करणे, अडचणींना तोंड देणे, कामाचे श्रेय वाटून घेणे, नियोजित वेळेत गटबैठकांचे आयोजन करून कामाचा आढावा घेणे, गटसदस्यांच्या समस्यांचे निवारण करून मार्गदर्शन करणे, प्रसंगी समुपदेशन करणे अशा प्रकारच्या कामांचे स्वरूप नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते.
  • सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या यांबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते.
  • माहिती आणि ज्ञान यांतील भेद उमेदवार जाणू शकतो का, याचे मूल्यमापन आज मुलाखतीत सर्वप्रथम केले जाते. त्यामुळे केवळ पदवी हा निकष आज मागे पडला असून, यासोबत जीवनकौशल्ये मुलाखतीत तपासली जातात.
  • मुलाखतीत पाल्हाळ, थापा, भपकेबाजपणा टाळावा.
  • उमेदवाराचे ‘बाह्यरंग’ कसे आहेत, यापेक्षा ‘अंतरंग’ कितपत विकसित झाले आहेत, हे जाणून घेणे अशा मुलाखतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य झाले आहे.

नोंद : मुलाखत समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.९२ व ९३ वर दिलेला मुलाखत नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला मुलाखत नमुनाही अभ्यासा.

मुलाखत नमुना

कोरोना या भीषण आजारात रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांची मुलाखत घ्या.
मुलाखतकार : नमस्कार डॉक्टर साहेब.
मुलाखतदाता : नमस्कार.

मुलाखतकार : कोरोना या जागतिक पातळीवरील भीषण आजारात तुम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली, याबद्दल सर्वप्रथम सर्वांच्या वतीने, डॉक्टर, तुम्हांला खूप खूप धन्यवाद!
मुलाखतदाता : धन्यवाद.

मुलाखतकार : कोरोना हा आजार ओळखायचा कसा?
मुलाखतदाता : कोरोना या आजाराची लक्षणे साधारण सर्दी खोकल्याची असल्याने आजाराचे गांभीर्य प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु दवाखान्यात चाचणी केल्यावर या आजाराचे निदान करता येते. रोगप्रतिकारकशक्ती आणि औषधे यांच्या साहाय्याने रुग्ण बरा होऊ शकतो.

मुलाखतकार : कोरोना या आजारादरम्यान लोकांनी कोणती सतर्कता बाळगली पाहिजे, असे आपणास वाटते?
मुलाखतदाता : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. शिंकणे, खोकणे याद्वारे कोरोनाबाधित रुग्णाच्या नाकातून-तोंडातून बाहेर पडणाऱ्या शितोंड्यांमार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर केला पाहिजे. तसेच कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यास हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. बाधित रुग्णांनी लोकांशी संपर्क टाळणे हे अत्यंत गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 मुलाखत

मुलाखतकार : कोरोना या आजारात उपचार करताना तुम्हांला ठळकपणे कोणत्या बाबी जाणवल्या?
मुलाखतदाता : या आजाराचे गांभीर्य सुरुवातीला लोकांमध्ये दिसले नाही; परंतु जसजशी बाधितांची संख्या वाढू लागली तसतसे लोक सतर्क होऊ लागले. दवाखान्यात येणारे कोरोनाबाधित रुग्ण डॉक्टरांच्या आणि नर्सच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास निश्चितच मदत झाली.

मुलाखतकार : मानवी जीवनावर ओढवलेल्या या भीषण आरोग्य समस्येत दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काय करता येऊ शकते?
मुलाखतदाता : फार चांगला प्रश्न आहे. दवाखान्यात येणाऱ्या लोकांना औषधे, योग्य आहार दिला पाहिजे. तसेच, मानसिक दृष्टीने सबळ करणे फार आवश्यक असते. आजारात रुग्ण शारीरिकदृष्ट्या खचलेला असतो. अशा वेळी मानसिक आधार देऊन रुग्णांना आजाराशी लढण्याचे बळ नक्कीच देता येते.

मुलाखतकार : दवाखान्यात दिवसरात्र मेहनत करीत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले का?
मुलाखतदाता : दवाखान्यात मेहनत करीत होतो; परंतु थकवा कधी जाणवला नाही. याचे कारण असे की, लोकांना आम्हां डॉक्टरांची नितांत आवश्यकता होती. रुग्ण फार आशेने डॉक्टरांकडे येत असतात. आमच्या व्यवसायात सेवावृत्ती फार महत्त्वाची आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. अशा कठीण प्रसंगी जमेल तसे स्वतःची काळजी घेत होतो.

मुलाखतकार : या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला काय मार्गदर्शन कराल?
मुलाखतदाता : आरोग्यक्षेत्र हे फार आव्हानात्मक क्षेत्र आहे. रोज नवनवीन संकटे समोर असतात. परंतु लोक अंतिमतः विश्वास डॉक्टरांवर ठेवतात. या एका विश्वासाने संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. उपचार करीत असताना आम्ही प्राण वाचवत असतो, यापेक्षा मोठे मानवतेचे कार्य कुठले असेल! सेवाभावीवृत्ती आणि सकारात्मक विचार घेऊन नव्या पिढीने या क्षेत्रात पदार्पण करावे.

मुलाखतकार : मुलाखतीच्या समारोपात आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. नमस्कार.
मुलाखतदाता : नमस्कार.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 3.2 गढी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

12th Marathi Guide Chapter 3.2 गढी Textbook Questions and Answers

कृती 

1. (अ) चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
गावाचं भरभरून कौतुक पाहणारी
उत्तर :
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी : वाननदी

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न 2.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत
उत्तर :
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत : सातपुडा पर्वत

प्रश्न 3.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे
उत्तर :
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे : पाटील

प्रश्न 4.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे
उत्तर :
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे : उचापती माणसे

(आ) खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा.

(a) बापू गुरुजी आणि परबतराव
(b) बापू गुरुजी आणि संपती
(c) लक्ष्मी आणि बापू गुरुजी
(d) बापू गुरुजी आणि पाटील
उत्तर :
(a) बापू गुरुजी आणि परबतराव – बापू गुरुजी हे परबतरावांचे सुपुत्र.
(b) बापू गुरुजी आणि संपती – संपती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा.
(c) लक्ष्मी आणि बापू गुरुजी – लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी.
(d) बापू गुरुजी आणि पाटील – पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे.

2. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 19
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 20
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 10

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

3. (अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

(a) दान्याचा पूर.
(b) मानसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं.
(c) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं.
(d) मले पा आन् फुलं वहा.
उत्तर :
(a) दान्याचा पूर : खूप धान्य पिकत असे.
(b) माणसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं : परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घ्यावा आणि कामाला हात घालावा.
(c) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं : स्वत:ची कुवत पाहून कार्य करायला पुढे व्हावे.
(d) मले पा आन् फुलं वहा : फक्त मलाच चांगले म्हणा.

(आ) वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा.

(a) मन तिळतिळ दुखने
(b) ठान मांडून उबी रायने
उत्तर :
(a) मन तिळतिळ दुखने : (i) मन तिळतिळ तुटणे., (ii) दुःखाने व्याकूळ होणे.
(b) ठान मांडून उबी रायने : (i) ठाण मांडून बसणे, पाय रोवून उभे राहणे., (ii) कृतीत ठामपणा असणे.

(इ) खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.
उत्तर :
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.
अर्थ : क्षुद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तींचे काहीही वाईट करू शकत नाही.

प्रश्न 2.
गायीचे शिंगं गायीले भारी नसतात.
उत्तर :
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.
अर्थ : आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कोणालाही त्रास होत नाही.

प्रश्न 3.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
उत्तर :
चाल व्हय रे पोरा आन् वय रे ढोरा.
अर्थ : पोरा, चल, पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा.

4. कारणे लिहा.

प्रश्न अ.
गावातला जो तो आनंदात होता, कारण…
उत्तर :
गावतला जो तो आनंदात होता; कारण त्या दिवशी गावाला ‘साजरे गाव’ हे पारितोषिक मिळाले होते.

प्रश्न आ.
शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली, कारण…
उत्तर :
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण त्यांना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते.

प्रश्न इ.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते, कारण…
उत्तर :
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण गढी खचल्यावर गाववाल्यांना पांढरी माती मिळणार होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

5. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
‘पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं’, असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
उत्तर :
आकाशात भरारी मारायची असेल, तर पंख मजबूत असावे लागतात. पंख मजबूत नसतील, तर अर्ध्यावरच पक्षी खाली पडेल, त्या दमलेल्या अवस्थेत त्याला पळताही येणार नाही. उडताही येणार नाही. मग कोणीही त्याला मारतील, खातील. म्हणजेच त्याला स्वत:चे रक्षण करता येणार नाही. स्वत:चे अन्न आणण्यासाठी दूरपर्यंत जाता येणार नाही. हा एक दाखला झाला. हाच सर्वत्र लागू पडतो.

आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी करू पाहतो. अशा वेळी आपण कोणती कृती करायची ठरवली आहे; त्या कृतीसाठी कोणते गुण, कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, ते प्रथम समजून घेतले पाहिजेच. ते गुण, ती कौशल्ये आपल्याजवळ आहेत का, ते तपासून पाहिले पाहिजे. ते गुण कौशल्ये नसतील, तर आपण यशस्वी होणार नाही आणि आपल्याला नैराश्य येण्याचा धोका असतो. म्हणून गुरुजींनी दिलेला दाखला नीट समजून घेतला पाहिजे.

प्रश्न आ.
बोडींगमधला ‘संपती’ नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
बोर्डिंगमधल्या संपतीला गुरुजींनी आपला मुलगाच मानले होते. त्याला वडील नव्हते. त्याचे वडील तो लहान असतानाच हे जग सोडून गेले होते. गुरुजींनी त्याला आईबापाची माया दिली होती. पण एक प्रसंग आभाळ कोसळल्यासारखा आला. तालुक्याला शिक्षण समितीची बैठक होती. गुरुजींना बैठकीसाठी जाणे भागच होते. गुरुजी तालुक्याला गेले आणि इकडे संपती पटकीच्या रोगाने त्याच रात्री मरण पावला. या घटनेने गुरुजी व्याकुळले, विव्हळले. याला आपण मुलगा मानला; पण आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही. गावात दवाखाना असता, तर तो वाचला असता. ते धाय मोकलून रडले. गावात दवाखाना नाही याला जणू आपणच जबाबदार, असे त्यांना वाटू लागले. म्हणून गावातली एक एक उणीव दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला.

प्रश्न इ.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.
उत्तर :
गुरुजी शाळेमध्ये पूर्ण गुंतून पडले होते. त्यांचे त्यांच्या घराकडे, पत्नीकडे, मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. तापाने फणफणला. पत्नी येऊन रागावून गेली, तेव्हा ते मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे गेले. आपल्या कनवाळू गुरुजींवर फार मोठे संकट आल्याचे मुलांना जाणवले. हे संकट दूर झाले नाही, तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील, या भीतीने संपूर्ण बोर्डिंग भकास झाले होते. त्यातले चैतन्यच नष्ट झाले होते. बोर्डिंगातल्या मुलांची जेवणावरची वासना उडाली. कोणीही जेवले नाहीत. सर्वजण निपचीत पडून राहिले होते. तिकडे अकोल्याला डॉक्टरांच्या उपचारांचा काही उपयोग झाला नाही. गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला. गुरुजी पुरते हादरून गेले. मुले तर त्यांच्यापेक्षाही भेदरून गेले. एकमेकांच्या गळ्यात पडून रडले, गढीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी खचत चाललेले मुलांना पाहवत नव्हते. मुले हादरून गेली होती. अगतिकता, असहायता यांचे दर्शन घडत होते.

6. स्वमत.

प्रश्न अ.
बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विदयार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विदयार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत; पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला, तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले.

सातवी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली, तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पड़त, त्यांचा आशीर्वाद घेत. आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे, असा ते आग्रहही करीत. अशा प्रकारे आजीमाजी सर्व विदयार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता.

प्रश्न आ.
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
उचापती करणारे लोक सर्वत्र असतात, असे आता माझे मत झालेले आहे. ‘गढी’ या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे. शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरांतसुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला, तर त्यांची किंमत नाहीशी होईल, अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की, उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वत:चा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते. फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे. तरच आपला देश सुधारेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न इ.
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजून घेऊ, वान नदीला पूर्वी भरपूर पाणी असे. पूर्वी ती भरभरून वाहत होती. अधूनमधून पूरही येई. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई, तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होऊ लागली होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती, त्या गावात आता शाळा आली. इतकेच नव्हे, तर चौथीपर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे सातवीपर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे; म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई, तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. हे मात्र एक सुचिन्ह होते.

7. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
उत्तर :
‘गढी’ हे गुरुजींचे प्रतीक आहे. गढी पूर्वी भक्कम होती. गावाला आधार होती. माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गढीची वृत्ती होती. म्हणून गढीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. तेच गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच गावाला अर्पण केले. काही काळ गावाला प्रगतीची फळे मिळालीच. ‘साजरे गाव’ हे पारितोषिकही मिळाले. पण कालांतराने गावावर अवकळा आली. प्रगती खुंटली. गढी खचत गेली. बापू गुरुजीही खचत गेले.

‘वाननदी’ हे गावातील जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती, पण गावात निर्मळपणा होता, गावाच्या विकासाची स्वप्नेच जणू काही वाननदी वाहून आणत होती. हळूहळू वाननदीचा प्रवाह आटत गेला, पाणी कमी झाले. शेवटी शेवटी तर नदीने पात्रच बदलले. गावानेही आपला जीवनप्रवाहच बदलून टाकला.

‘वटवृक्ष’ म्हणजे गावच होय. वाननदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला, हळूहळू वाढत गेला. मुलांना, वाटसरूंना तो आधार बनला. पण हळूहळू तोही सुकत गेला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नांमुळे अंकुरला, त्याने विकासाची स्वप्ने पाहिली. चांगले दिवस आलेही, पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला. वटवृक्ष सुकत गेला. तसा गावही सुकत गेला.

एकंदरीत, गावाची पडझड झाली. हळूहळू निराशामय गर्तेत गाव अडकत चालला. याचे दर्शन या तिन्ही प्रतीकांमधून घडते.

प्रश्न आ.
पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून दया.
उत्तर :
‘गढी’ हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गढीच्या गावावर प्रभाव असायचा. त्याचबरोबर गावाला गढीचा आधारही असायचा, ती गढी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली. तरीही तिचा आधार होता. उन्हापावसाला तोंड देत, त्यांच्याशी झगडत गढी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गढी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गढी कोसळली तर हवीच होती. गढीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होतेच, गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते. पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गढीचे झाले तेच गावाचे झाले. गढी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली, तशी गढीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव, बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गढी होय. म्हणून ‘गढी’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

प्रश्न इ.
या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा.
उत्तर :
वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न होते. कथेतील वर्णने कोरड्या तपशिलाने केली जात नाहीत. हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषा वाचकांच्या मनाची पकड , घेते. कथेत वाक्प्रचार व म्हणींचा मुबलक उपयोग केलेला आहे. किंबहुना बोलीभाषेचे हे वैशिष्ट्यच असते. यामुळे भाषा रसाळ झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

भाषा रसाळ होण्याला आणखी एक कारण आहे. ते म्हणजे ध्वनिमाधुर्य हे होय. नामांना, क्रियापदांना लागलेले प्रत्यय पाहा. उदा., गावाले, त्याइच्या, त्याइने, त्याइले हे उदाहरणादाखल दिलेले प्रत्यय लक्षणीय आहेत. त्यांचा उच्चार मृदू, मुलायम आहे. या प्रत्ययांचे प्राबल्य आहे. भाषा वाचताना, ऐकताना मन मृदूमुलायम होऊन जाते.

भाषेची आणखी वैशिष्ट्ये पाहा. ‘वाडा’ हा शब्द वैदर्भीमध्ये ‘वाळा’ होतो. ‘पडल्याने’ या प्रमाण मराठीतील शब्दाचे वैदर्भातील – रूप आहे पळल्याने, याच पाठातील असे खूप शब्द दाखवता येतील. मुद्दा असा की या भाषेची प्रकृतीच मुळी मृदूमुलायम असावी. वैदर्भी भाषेकडून प्रमाण मराठीकडे होणारा प्रवास रसाळतेकडून कोरडेपणाकडे जास्त होतो. प्रमाण भाषेत आखीव-रेखीवपणा जास्त असतो. त्यामुळे औपचारिकपणा जास्त येतो. थोडक्यात, हे आहे वैदर्भी भाषेचे मला जाणवलेले वेगळेपण.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3.2 गढी Additional Important Questions and Answers

कृति

1. चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.
काळीशार, लोण्याहूनही मऊ असलेली
उत्तर :
काळीशार, लोण्याहूनही मऊ असलेली : गावची जमीन

प्रश्न 2.
नदीच्या काठी वाढत गेलेले झाड
उत्तर :
नदीच्या काठी वाढत गेलेले झाड : वडाचे झाड

प्रश्न 3.
वाडा पडल्याने उघडी – पडलेली
उत्तर :
वाडा पडल्याने उघडी पडलेली : गढी

प्रश्न 4.
गावाला मिळालेला मान :
उत्तर :
गावाला मिळालेला मान : साजरे गाव

प्रश्न 5.
उभा जन्म गाववाल्यांची सेवा करणारे
उत्तर :
उभा जन्म गाववाल्यांची सेवा करणारे : बापू गुरुजी

प्रश्न 6.
गावात काही सोयी नाहीत म्हणत शहरात जाणारी :
उत्तर :
गावात काही सोयी नाहीत म्हणत शहरात जाणारी : नवी पिढी

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न 7.
कार्यक्रमापासून दूर जाऊ पाहणारे
उत्तर :
कार्यक्रमापासून दूर जाऊ पाहणारे : बापू गुरुजी

2. कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 11

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 12

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 13

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 4
उत्तर :

प्रश्न 5.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 15

प्रश्न 6.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 16

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न 7.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 7
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 17

प्रश्न 8.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी 21

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

3. वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :

(a) रगत आटवने : ……………………..
(b) ऊर भरभरून येते : ……………………..
(c) लाळ करने : ……………………..
(d) चटनीवर तेल न सापळणे : ……………………..
(e) सपन डोयात फुलने : ……………………..
(f) जीव वतने : ……………………..
(g) शाननं उबं व्हने : ……………………..
(h) मायेची वाकय घालने : ……………………..
(i) हिंमत बांदून उटने : ……………………..
(j) लोये तोळने : ……………………..
(k) पोटापान्याला लागने : ……………………..
(l) पदरात पळने : ……………………..
उत्तर :
(a) रगत आटवने : (i) रक्त आटवणे., (ii) खूप कष्ट घेणे.
(b) ऊर भरभरून येणे : (i) ऊर भरून येणे., (ii) मनात अभिमान किंवा कौतुक किंवा आनंद दाटणे.
(c) लाळ करने : (i) लाड करणे., (ii) खूप प्रेमाने वागवणे.
(d) चटनीवर तेल न सापळणे : (i) नेहमी कमतरता असणे., (ii) खूप गरिबी असणे.
(e) सपन डोयात फुलने : (i) मनात स्वप्न फुलणे., (ii) भविष्याविषयी खूप आशावादी चित्र निर्माण होणे.
(f) जीव वतने : (i) जीव ओतणे., (ii) खूप मन:पूर्वक, कष्टपूर्वक काम करणे.
(g) शाननं उबं व्हने : (i) डौलात उभे राहणे., (ii) आनंदाने व आत्मविश्वासाने वागणे.
(h) मायेची वाकय घालने : (i) मायेचे पांघरूण घालणे., मायेची पाखर घालणे.
(i) खूप माया करणे. (११) हिंमत बांदून उटने : (i) धीर एकवटून उठणे., (ii) हिमतीने तोंड देणे. हिमतीने लढायला सिद्ध होणे,
(j) लोये तोळने : (i) लचके तोडणे., (ii) एक एक तुकडा तोडावा तशा वेदना देणे.
(k) पोटापान्याला लागने : (i) पोटापाण्याला लागणे., (ii) कामधंदा मिळणे.
(l) पदरात पळने : (i) पदरात पडणे., (ii) न मागता, फार हवीशी नसताना मिळणे.

4. पुढील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :

प्रश्न 1.
घरी तेल हाये तं मीठ नायी; आन् मीठ हाये त चटनी नायी.
उत्तर :
घरी तेल हाये तं मीठ नायी; आन मीठ हाये त चटणी नायी.
अर्थ : अत्यंत गरिबी असणे.

प्रश्न 2.
नासकुला हळयाई पिंडाला झोम्बते.
उत्तर :
नासकुला हळयाई पिंडाला झोम्बते.
अर्थ : क्षुद्र जीवसुद्धा पोटासाठी धडपडतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

प्रश्न 3.
खुटे गाळ खुटे उपळ.
उत्तर :
खुटे गाळ खुटे उपळ.
अर्थ : खुंट जमिनीत गाडायचा आणि उपटायचा, अशी निरर्थक रिकामपणची कामे करीत बसणे.

गढी लेखिकांचा परिचय

लेखिकांचे नाव :
डॉ. प्रतिमा इंगोले

साहित्यिक व्यक्तिमत्त्व :
सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कवयित्री, कथाकथनकार म्हणूनही चांगली ओळख. ललित, विनोदी व वैचारिक स्वरूपाचे लेखनही प्रसिद्ध आहे. बालसाहित्य लेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषय आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. लोकसाहित्याच्या प्रख्यात अभ्यासक आहेत. ८० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध. आपल्या काव्यांमधून ग्रामीण जीवनातील जीवघेणा संघर्ष प्राधान्याने चित्रित केला आहे. सामाजिक विषयांवर प्रत्यक्ष संशोधन करून विपुल लेखन केले आहे.

ग्रंथसंपदा :
अकसिदीचे दाने’, ‘अंधारपर्व’, ‘अन् मृगधारा बरसल्या’, ‘अमंगल युग’ वगैरे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध. ‘आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच’, ‘आत्मघाताचे दशक’ वगैरे वैचारिक स्वरूपाची पुस्तके. ‘करारी आजी’, ‘उजळ आजोबा’ वगैरे बालसाहित्य क्षेत्रातील पुस्तके प्रसिद्ध. ‘बोडखी’, ‘पार्ट टाईम’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध

पुरस्कार पारितोषिके :
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, संत गोरोबा सामाजिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, जनसंवाद पुरस्कार, करवीर साहित्य परिषदेतर्फे ‘दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार प्राप्त.

गढी  कथेचा गोषवारा

  1. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावाची ही कथा आहे. गाव तसे खाऊनपिऊन सुखी होते. गावाला निसर्गाची साथ होती.
  2. फ्लॅशबॅक पद्धतीने ही कथा आकार घेते. आज त्या गावात धामधुम होती. गावाला शासनाचा ‘साजरे गाव’ हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. बापू गुरुजी या आदर्श शिक्षकाचाही त्या समारंभात सत्कार होणार आहे. साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोठा वाटा आहे. मात्र बापू खूप उदासवाणे झालेले आहेत. त्यांना समारंभात व त्यांच्या सत्कारात गोडी वाटत नाही.
  3. गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मुले तालुक्याला शिकायला जात. गुरुजींची घरची गरिबी होती. पण गढीवरच्या पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. गुरुजी शिकले आणि त्यांनी गावाच्या विकासाला वाहून घेतले. गुरुजींच्या बरोबर शिकलेल्यांनी शहरांची वाट धरली.
  4. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नव्या प्रेरणांचे वारे सर्वत्र वाहत होते. गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्ने पडू लागली. गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता. गुरुजींनी गावाच्या विकासाला वाहून घेतले. पण स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केले.
  5. गुरुजी सकाळ–संध्याकाळ, रात्री–बेरात्री शाळेतच दिसू लागले. त्यांनी शाळा नावारूपाला आणली. चौथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत झाली. गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला.
  6. गावातल्या उचापती लोकांना हे सर्व पाहावले नाही. त्यांनी गुरुजींच्या कार्यात खोडे घालायला सुरुवात केली. दरम्यान गुरुजींना ‘आदर्श शिक्षका’चे पारितोषिक मिळाले. त्यांनी पारितोषिकाच्या रकमेतून वाचनालय सुरू केले. लहानसे बोर्डिंग चालू केले.
  7. बोर्डिंगातील मुलांचे ते लाडके गुरुजी झाले. बोर्डिंगाची पूर्ण काळजी गुरुजी घेत होते. मुलांना ते स्वतःची लेकरेच समजत. बोर्डिंगातला संपती तर त्यांचा मानलेला मुलगा बनला. गावात दवाखाना नव्हता. संपती पटकीच्या रोगाला बळी पडला.
  8. गुरुजींना गावात दवाखाना आणण्याची स्वप्ने पडू लागली. त्यांनी गावात पोस्ट आणले. पण उचापत्या लोकांमुळे पोस्ट गावातून गेले. सडक येऊ घातली, पण त्याच लोकांनी सडक होऊ दिली नाही. या गोष्टीचे गुरुजींना खूप दुःख झाले, त्यांची उमेद खचू लागली. दरम्यान वाननदी सुकत गेली. तिने पात्र बदलले.
  9. गुरुजींचा मुलगा आजारी पडला. तापाने फणफणला, पण गुरुजींनी तिकडे लक्ष दिले नाही. मुलगा आजाराला बळी पडला. गुरुजी गळून गेले. पण बोर्डिंगचे, शाळेतले आजीमाजी विदयार्थी गुरुजींचा खूप आदर करीत.
  10. गाव खचत गेला. गुरुजीसुद्धा खचत गेले. आजच्या कार्यक्रमाचे म्हणूनच त्यांना कौतुक नव्हते. त्यांच्या अंगातले त्राण संपत चालले. पाय लटलट कापत होते. पाय उचलला की भोवळ येई. आपण काय करू पाहत होतो आणि काय घडले? गुरुजींना याचा विषाद वाटला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

गढी शब्दार्थ :

  • दुपटा – दोन रस्ते मिळतात ती जागा; जेथे पारावर गावकरी जमतात,
  • वसेल – वसलेले. व्हतं – होते.
  • गावासेजून – गावाजवळून.
  • झुममूय – झुळुझुळु,
  • वायता वायता – वाहता वाहता.
  • वान नाही – वानवा नाही, कमतरता नाही.
  • कायीशार – काळीशार,
  • लोन्यावानी – लोण्याप्रमाणे,
  • भरूभरू – भरभरून.
  • कवतीक – कौतुक.
  • कराळी – काठावर,
  • झाळ – झाड.
  • पायत – पाहत.
  • उनाये-पावसाये – उन्हाळेपावसाळे,
  • वाळा पळल्यानं – वाडा पडल्यानं.
  • पांढ्ढी पांढ्ढी – पांढरी पांढरी.
  • उघळी पळली – उघडी पडली.
  • कारुन – का म्हणून.
  • गावाले – गावाला,
  • गोठ – गोष्ट.
  • बयठकीतल्या – बैठकीतल्या.
  • त्याइच्या – त्यांच्या.
  • आवतन – आमंत्रण.
  • गाववाल्याइनं – गाववाल्यांनी.
  • कऱ्याचं – करायचे.
  • ठरोल – ठरवले.
  • काइच – काहीच.
  • नोतं – नव्हतं.
  • रावूरावू – राहून राहून.
  • रगत आटोलं – रक्त आटवले.
  • मातर – मात्र.
  • लानपनी – लहानपणी.
  • शाया – शाळा.
  • गळीवरला – गढीवरील.
  • शेजीच – शेजारीच.
  • लाळ – लाड.
  • सापळत – सापडत,
  • गरिबाले – गरिबाला,
  • कोळलंच – कोरडेच.
  • फकत – फक्त. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी
  • इतले – इतके.
  • शिकेल – शिकलेला.
  • गळी – गढी.
  • शयरात – शहरात.
  • नवकरीले – नोकरीला.
  • नासकुल्या – क्षुल्लक, सामान्य.
  • पायनं – पाहणे, हू
  • लागलं – होऊ लागले.
  • डोयात – डोळ्यात.
  • पोयता पोयता – पोहता पोहता.
  • वान देल्लं – वाण दिले.
  • वावटयीत – वावटळीत.
  • सवतंतर – स्वतंत्र.
  • झकास – विकास.
  • पेरमानं – प्रेमाने.
  • व्हयेल गळी – झालेला गडी.
  • पानी पावावं – पाणी पाहावे (किती खोल सुरक्षित आहे, वगैरे).
  • पख पारखावं – पंख पारखावेत,
  • उळावं – उडावं.
  • हे बी तं – हीसुद्धा तर.
  • आंदी – आधी.
  • वतून – ओतून.
  • कई पा – कधीही बघा.
  • लकषुमीच – लक्ष्मीच.
  • पावू पावू – पाहून पाहून,
  • सेल्यासेवटी – सरतेशेवटी.
  • धाळून – धाडून, पाठवून,
  • जियाले – जेवायला.
  • आकळ्याइले – आकड्याला (आकड्याइतका).
  • तसीई – तशीही.
  • पोट्याइची – मुलांची.
  • नोती – नव्हती,
  • जीतून – जिंकून. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी
  • उचापती मानसाइले – उपद्व्यापी.
  • नायी कोई सादलं – काही साधले नाही, जमले नाही.
  • जयताळेपना – जळफळाट.
  • हळ्याच्या सरपानं – गवताच्या सापानं,
  • पयस्याचं – पैशाचे.
  • लानसक – लहानसे.
  • खळकूई – कवडीही.
  • लळले – रडले.
  • धुवारी – धार (पाण्याची).
  • पयलमसुट्ट्या – पहिल्या फटक्यात.
  • गढीलोग – गढीपर्यंत.
  • तपेल फफूटातून – तापलेल्या फुफाटातून.
  • सईन व्हईन – सहन होईल?
  • मऱ्याच्या – मरणाच्या.
  • आताई – आताही, आतासुद्धा.
  • लेकराची गुळी – लेकराचा गोडवा, बाळ जन्मल्याची गोड बातमी.
  • लोये तोळत – गोळे तोडत.
  • काऊन कयत नसीन – का बरे कळत नसेल?
  • इरल्यावानी – विरून गेल्यासारखे.
  • उजिळात – उजेडात.
  • झाकुल्यात – पहाटेला.
  • आखीन – आणखी.
  • इस्त्यावानी – विस्तवासारखा.
  • पालट पळना नाही – फरक पडला नाही.
  • अवकानी – अवकाळी,
  • गढीलेई झोळलं – गढीलाही झोडले.
  • चवूभवताल – चारही बाजूंनी.
  • अखाळीला – आषाढीला (आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा),
  • सळक – सडक.
  • पळीत – पडीत, पडीक,
  • कायले – कशाला,
  • अथी – इथे.
  • दुकळीत – गंजिफाच्या खेळातील दुक्कलीत.
  • भळकोनारा – भडकवणारा,
  • सवतंतरानई – स्वातंत्र्याने, स्वातंत्र्यात.
  • गाटापान्याचं – चिखल–पाण्याचे.
  • जीव सोळत होते – जीव सोडत होते, मरण पावत होते.
  • इव्यानं – विळ्याने.
  • सारोयाले – सारवायला.
  • पातरच – पात्रच.
  • कोळली पळत – कोरडी पडत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 गढी

गढी  वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • मन तिळतिळ दुखने – दु:खाने व्याकूळ होणे.
  • ठान मांडून उबी रायने – पाय रोवून उभे राहणे.
  • रगत आखणे – खूप कष्ट घेणे.
  • ऊर भरभरून येणे – अभिमान/कौतुक/आनंद मनात दाटणे.
  • लाळ करने – खूप प्रेमाने वागवणे.
  • चटणीवर तेल न सापळणे – खूप गरिबी असणे.
  • सपन डोळ्यात फुलने – भविष्याविषयी मनात आशावादी चित्र निर्माण होणे.
  • जीव वतने – खूप मनापासून कष्टपूर्वक काम करणे.
  • शाननं उबं व्हने – आनंदाने व आत्मविश्वासाने वागणे.
  • मायेची वाकय घालने – खूप माया करणे.
  • हिंमत बांदून उटने – हिमतीने लढायला सिद्ध होणे.
  • लोये तोळणे – एक एक तुकडा तोडावा तशा वेदना देणे.
  • पोटापान्याला लागणे – कामधंदा मिळणे.
  • पदरात पळने – (एखादी गोष्ट) न मागता, फार हवीशी नसताना मिळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 3.1 शोध Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

12th Marathi Guide Chapter 3.1 शोध Textbook Questions and Answers

कृती 

1. (अ) कारणे लिहा.

प्रश्न 1.
अनुनं घर सोडलं, कारण…
उत्तर :
अनूने घर सोडले; कारण पाच वर्षे तरी तिला स्वत:ची म्हणून जगायची होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

प्रश्न 2.
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अन् म्हणाली. कारण…
उत्तर :
“जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा,” असे अनू म्हणाली; कारण प्रत्येक वस्तूचे, घटनेचे, व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर तयार करायची होती.

प्रश्न 3.
अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते, कारण…
उत्तर :
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण तिची कॅलिबर डॉक्टर होण्याची होती.

(आ) खालील नातेसंबंध लिहा.

(a) अनु आणि आबा ………………………….
(b) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ………………………….
(c) अनु आणि सुनीता ………………………….
उत्तर :
(a) अनू आणि आबा – मुलगी व वडील.
(b) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर – प्रवासी व टॅक्सीवाला.
(c) अनू आणि सुनीता – नर्स व रुग्ण,

2. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 7

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 8

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

3. अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 12
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 13

4. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
अनूच्या मते, माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो. पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात. यामुळे माणसे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अनूला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते, प्रत्येकाला जगाकडे स्वत:च्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे. स्वत:च्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वत:ची स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमावण्यासाठी तिला पाच वर्षे स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता.

प्रश्न आ.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर :
अनूला स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती स्वत:च समाजाच्या व्यवहारांत उतरू पाहत होती. हे तिला स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती. आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते. तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता. नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दु:ख खऱ्या स्वरूपात भेटतात; जीवनाचे खरेखुरे दर्शन तिथे घडते, माणूस कळतो, असे तिचे मत होते. नर्स रुग्णांच्या भावजीवनापर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते, समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

प्रश्न इ.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर :
या कथेतील सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंग उत्सुकता ताणत ताणत वाचकाला पुढे घेऊन जातो. त्यांतल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा शिगोशीग भरलेली आहे. पहिलेच वाक्य मुळी वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वत:च्या व पत्नीच्या वतीने अनूची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था त्यातून दिसून येते. येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. काय केले असेल या दोघांनी? इतकी मिनतवारी करून माफी मागावी, असे काय घडले असेल? या तिघांचे एकमेकांशी नाते तरी कोणते असावे? सुरुवातीला अनू त्या दोघांची मुलगी तर नाही ना, अशी शंका वाचकाला वाटू लागते. तिचे जेवण आटपले होते. पण ती पानावर दिङ्मूढ, स्तंभित अवस्थेत बसली होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल? तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात. पुढे थोडे वाचल्यावर अनू त्यांची मुलगी नाहीच, हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही, अशा प्रकारे वाचकाची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य दिसून येते.

प्रश्न ई.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तर :
या कथेत पावलापावलावर कलाटणी मिळत जाते. त्या प्रसंगांमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो, तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथानिवेदक, मुक्ता व अनू भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल, तर मिळेलच, मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल, तर शोधच खुंटेल, मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते, टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनू त्या मुलीच्या कुटुंबीयांशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते.

5. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

प्रश्न अ.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
उत्तर :
भिडे दाम्पत्य हे सरळ, साध्या वृत्तीचे. पूर्णपणे चांगुलपणा असलेले. लपवाछपवी, लबाड्या न करणारे. हातचे राखून न वागणारे. निष्कपट, सच्छील वृत्तीचे. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री १२–१२.३० वाजण्याची वेळ, दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती, तो आयुष्यातूनच उठला असता. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता, तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीचीही चूक नव्हती. साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती. टॅक्सीवाल्यांकडे तुच्छतेनेच पाहिले जाते. त्यांना क्षुद्र समजले जाते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते. मध्यरात्र उलटून गेलेली होती, मृत्यूसंबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाहीत. भिडे स्वत:हून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते. आपण अकारण अडचणीत येण्याचीही शक्यता असते. तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची भिड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते.

प्रश्न आ.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
उत्तर :
टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे. प्रसंगी रात्रीही चालवीत असे. तो नुकताच या पेशात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला. अशा त–हेने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, मानमरातब नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती; म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष दयायला ५ आल्याबद्दल त्याला भिड्यांविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते. जर भिडे साक्ष दयायला गेले नसते, तर तो आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्याचा सालसपणा, प्रामाणिकपणा भावला, म्हणून ते स्वत:हून त्याला मदत करायला गेले. अनू स्वत:ची हकिगत सांगत होती. ती ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला. अनू त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्याला भरून येते, तो अप्रत्यक्ष रितीने तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो. पण स्वत: पार गलबलून जातो. कारण ती मुलगी त्याची स्वत:ची मुलगी होती. अनूशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व. भावनिक प्रगल्भता दिसून येते. गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

6. स्वमत.

प्रश्न अ.
कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर :
अनू ही कथेची नायिका आहे. ती चारचौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती त–हेवाईक, विक्षिप्त वाटेल. पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वत:चे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो, तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वत:च्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे, म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो. म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वत:ला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अनू स्वत:साठी घडवत होती.

प्रश्न आ.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
उत्तर :
अनूच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता, स्वतः स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखादयाचा दृष्टिकोन असू शकतो, अनू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही; तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते, हे अनूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार.

प्रश्न इ.
कथेच्या ‘शोध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत पटवून दया.
उत्तर :
या कथेतील एक रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्तीगाहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे एक रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री साडेबारा–एक नंतर कथानिवेदक, मुक्ता व अनू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडेदांपत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या एक रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनूने सर्व हकिगत सांगितल्यावर एका नऊ–दहा वर्षांच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती, हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनू टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते, म्हणून ‘शोध’ हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे.

प्रश्न ई.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने ‘जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध’, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती. त्या दु:खात तो बुडालेला होता, अनूला नोट मिळाली. त्या टॅक्सीवाल्याच्या मुलीनेच दिलेली ती नोट होती. ती नोट निर्जीव होती म्हणून सापडू शकली, नोटेचा शोध संपला; पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे केवळ अशक्य आहे. हातातून निसटलेल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत, हे वास्तव टॅक्सीवाल्याला जाणवते आणि है तो ते बोलूनही दाखवतो. यातून सुचवायचे आहे की माणसे एका अतयं गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात. सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काहीजणांच्या हाती काहीतरी कधीतरी लागते. तर काहीजणांचे हात कायम रिकामेच राहतात. बहुधा सामान्य, निर्जीव, जड वस्तू आपल्या हाती लागते. पण त्या टॅक्सीवाल्याने मुलगी गमावली होती. त्यात टॅक्सीवाल्याचा दोष नव्हता. त्या मुलीचा दोष नव्हता की तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही दोष नव्हता. ती मुलगी कधीच भेटणार नव्हती, आयुष्य हे असेच आहे. अत्युच्च, चिरंतन असे आपल्या हाती कधीच लागत नाही. माणसाला हा शापच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

7. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वत:चं अस्तित्व, निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे. त्याबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे. आपल्या मनात दोन पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की, आपला मेंदू कामाला लागतो. तो पायांना आज्ञा देतो. पाय दोन पावले पुढे सरकतात. याचा साधा अर्थ असा की, आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे वागतो. मेंदू आपल्या ताब्यात आहे. आपण सांगू तसे तो काम करणार, पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो, तो विचार आपला स्वत:चा असतो काय? आपण काय करतो? आपला मित्र ‘अमूक एका पद्धतीने वागतो, म्हणून आपण वागतो. शेजारी जे काही करतात, तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी रूढीप्रमाणे वागतो, परंपरेप्रमाणे वागतो. म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करीत नाही. स्वतंत्र मेंदूबरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो, स्वत:हून दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.

प्रश्न आ.
कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ हे पात्र तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
उत्तर :
‘शोध’ या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा, सरळ मनाचा, सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायिभाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला, तरी समजून घेता येईल. पण तो स्वभावाने सालस आहे. हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही, हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे.

अनूची हकिगत ऐकल्यानंतर तो ज्या त–हेने व्यक्त झाला, त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही. अनू तशी नाही. अनूचे हे मोठेपण तो ओळखतो.

या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3.1 शोध Additional Important Questions and Answers

कृति

1. कारणे लिहा :

प्रश्न 1.
मुंबईत कुठे उतरायचे, हा कथानिवेदकाचा प्रश्न सुटला होता; कारण –
उत्तर :
मुंबईत कुणाकडे उतरायचे, हा कथानिवेदकाचा प्रश्न सुटला होता; कारण अनूने मुंबईत स्वत:चे बि–हाड थाटले होते.

प्रश्न 2.
दिवसभराच्या हकिगतींविषयी गप्पा मारता मारता अनूचा नूर बदलला; कारण –
उत्तर :
दिवसभराच्या हकिगर्तीविषयी गप्पा मारता मारता अनूचा नूर बदलला; कारण काचेखालची तिची नोट भिड्यांना दिल्याचे मुक्ताने तिला सांगितले.

प्रश्न 3.
अपरात्री भिड्यांकडे जाण्याच्या अनूच्या वेडात कथा निवेदकाला सामील होणे भाग होते; कारण –
उत्तर :
अपरात्री भिड्यांकडे जाण्याच्या अनूच्या वेडात कथानिवेदकाला सामील होणे भागच होते; कारण त्यानेच अनूची नोट भिड्यांना देण्याचा गुन्हा केला होता.

प्रश्न 4.
लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच कथानिवेदकाने टॅक्सी थांबवली; कारण –
उत्तर :
लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच कथानिवेदकाने टॅक्सी थांबवली; कारण त्याला पोलीस स्टेशनसमोरच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर जायचे होते.

प्रश्न 5.
अपरात्री भिड्यांच्या दाराची कडी वाजवताना कथानिवेदकाला संकोच कमी वाटला; कारण –
उत्तर :
अपरात्री भिड्यांच्या दाराची कडी वाजवताना कथानिवेदकाला संकोच कमी वाटला; कारण दाराच्या वरच्या व्हेंटिलेटरमधून दिव्याचा प्रकाश त्याला दिसला.

प्रश्न 6.
टॅक्सीवाल्याच्या बाजूने भिडे पतिपत्नी पोलीस स्टेशनला गेली; कारण –
उत्तर :
टॅक्सीवाल्याच्या बाजूने जबानी दयायला भिडे पतिपत्नी पोलीस स्टेशनला गेली; कारण टॅक्सीवाल्याची एक टक्काही चूक नसल्याने त्याला वाचवणे आवश्यक आहे, असे भिड्यांना वाटले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

2. कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 10

3. टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलेले पुढील पेशांतील साम्य लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 11

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

शोध लेखकांचा परिचय

लेखकांचे नाव :
व. पु. काळे

साहित्यिक व्यक्तिमत्त्व :
खूप लोकप्रिय कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथा–पटकथा लेखक, कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम. कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी, उत्कंठावर्धक कथालेखनाचे कौशल्य, ओघवती निवेदनशैली. ‘व. पु.चे विचार’ या शीर्षकाखाली त्यांच्या वाक्यांच्या संकलनांची निर्मिती. त्यांच्या कथेवरून चित्रपटाची निर्मिती.

ग्रंथसंपदा :
“ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रह्मदेवाचा बाप’ वगैरे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध, ६० पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध. कादंबऱ्या, नभोनाटये प्रसिद्ध,

पुरस्कार–पारितोषिके :
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार.

शोध कथेचा गोषवारा

(१) पहिल्याच दृश्यात तीन पात्रे आहेत. ‘मी’ हा निवेदक, त्याची पत्नी मुक्ता आणि अनू. ‘मी’ हाच कथानिवेदक आहे. तोच कथा सांगत आहे, तो नायक आहे. पण केंद्रस्थानी अनू आहे. कथा तिच्याभोवती फिरते.

पहिलेच वाक्य उत्कंठावर्धक आहे, रहस्यमय आहे. पहिल्या वाक्यातच वाचक कथेत ओढला जातो आणि कथानकासोबत पुढे पुढे चालत राहतो. ही पात्रे कोण, त्यांचा एकमेकांशी संबंध काय? त्या तिघांमध्ये कोणता ताण निर्माण झाला? प्रसंग तरी कोणता? यांचा उलगडा होत नाही. त्यामुळे वाचकाच्या मनात उत्कंठा निर्माण होते.

(२) पुढच्या भागात अनू या पात्राची अधिक ओळख होते. मी हा निवेदक आबासाहेबांना भेटला. अन आबासाहेबांची मुलगी. त्या वेळी अनूची अधिक माहिती मिळाली. अनू ही स्वातंत्र्यप्रेमी. तिला स्वतंत्रपणे जगून पाहायचे होते. तिने आबासाहेबांकडून पाच वर्षे मागून घेतली. त्या पाच वर्षांत कोणीही तिला कशाहीबद्दल कोणताही जाब विचारायचा नाही. ती मुक्तपणे पाच वर्षे जगायला घराबाहेर पडली. तिने नर्सची नोकरी स्वीकारली. हॉस्पिटलच्या जवळच्या एका इमारतीत तिने भाड्याने घर घेतले.

(३) कथानिवेदक अनूला भेटण्यासाठी पत्नी मुक्तासोबत पुण्याहून मुंबईला आला, अनूच्या घरात उतरला तिथे त्याचे मित्र भिडे व भिडेवहिनी त्याला भेटायला आले. गप्पांत वेळ कसा गेला समजलेच नाही. रात्र झाली. भिडे टॅक्सीने घरी जाण्यासाठी उठले. निवेदकाने टॅक्सीवाल्याला देण्यासाठी पुरेसे सुटे पैसे देऊ केले. एक रुपया कमी पडला. टेबलावरच्या काचेखाली अनूने ठेवलेली एक रुपयाची नोट काढून ती भिड्यांना दिली. भिडे निघून गेले. इथेच खरा घोटाळा झाला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

(४) अनू घरी आल्यावर तिला हा प्रकार कळला. ती प्रचंड नाराज झाली, तिला संताप आला. एक रुपयाची नोट देऊन टाकल्यामुळे काहीएक नुकसान झाले, असे निवेदकाला मुळीच वाटत नव्हते. अनूला राग आला, हे त्याला मुळीच योग्य वाटत नव्हते. पण अनू हट्टाला पेटली होती. तिने खूप रात्र झाली होती तरी भिड्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना याचा धक्काच बसला.

(५) भिड्यांकडे गेल्यावर समजले की भिड्यांनी ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली. नंतर आढळले की टॅक्सी ड्रायव्हरने ती नोट हॉटेलवाल्याला दिली. अखेरीस ती नोट मिळाली, तेव्हा अनूने त्या नोटेमागचे रहस्य सांगितले.

(६) एके दिवशी अनूची ड्युटी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये होती. त्या दिवशी आठनऊ वर्षांची मुलगी दाखल झाली. सगळ्यांनी तिची आशा सोडली होती. ब्लड ट्रॅन्स्फ्यूजनसाठी व सलायनसाठी तिच्या हातापायाला नळ्या लावल्या. ऑक्सिजनच्याही नळ्या लावल्या. तिला वाचवण्याची सगळ्यांची प्रचंड धडपड चालू होती. पण तिला मात्र सर्वत्र सुया टोचल्यामुळे वेदना होत होत्या. ती दिवसभर त्या नळ्या काढा असे विनवत होती. शेवटी अनूने पुढाकार घेतला. डॉक्टरांच्या परवानगीने तिने नळ्या काढल्या. त्या मुलीच्या वेदना थांबल्या. ती आनंदाने विसावली. थोड्याच अवधीत तिने अखेरचा श्वास घेतला. ती सुखाने मृत्यूच्या कुशीत शिरली. जाण्यापूर्वी तिने स्वत:च्या खाऊच्या पैशातला एक रुपया नर्सताईला – अनूला – भेट म्हणून दिला. त्याच रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी धडपड चालू होती.

(७) इकडे टॅक्सी ड्रायव्हरचे उपकथानक चालू झाले होते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा मनुष्य आला. टॅक्सी ड्रायव्हरची काहीही चूक नव्हती. त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून भिडे स्वतः हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या ठिकाणी साक्षीसाठी धावले. शेवटी तो रुपया परत मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरने मदत केली. अनू आपली हकिगत सांगत होती, तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर तिथे होताच. ती हकिगत ऐकून तो व्याकूळ झाला. अनूला नोट मिळाली. तिची समस्या संपली. तिचा शोध संपला, पण ड्रायव्हरचा शोध कधीच संपणार नव्हता. कारण त्याची मुलगी मरण पावली होती. अनूच्या वॉर्डमध्ये आलेली मुलगी तीच त्या ड्रायव्हरची मुलगी होती!

शोध शब्दार्थ

  • विक्षिप्त – त–हेवाईक, विचित्र, लहरी.
  • व्हेंटिलेटर – घरात हवा येण्याजाण्यासाठी दाराच्या वर तिरप्या पातळ पट्ट्या बसवलेली चौकट,
  • अपरात्र – रात्रीचा खूप उशिराचा वेळ, रात्रीचा शेवट, उत्तररात्र.

शोध वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • पळ काढणे – पळून जाणे.
  • जिव्हारी लागणे – खूप दुःख होणे, मन खूप व्यथित होणे.
  • पगडा असणे – प्रभाव असणे.
  • छाया पडलेली असणे – प्रतिबिंब भासणे, प्रभाव जाणवणे.
  • निवारण करणे – (अडचणी, शंका इत्यादी) दूर करणे.
  • चोरट्यासारखे होणे – अपराधी वाटणे.
  • गळ घालणे – खूप विनवणी करणे.
  • पाचारण करणे – बोलावून घेणे, हजर राहण्यास सांगणे.
  • आवाज भरून येणे – दु:खाने किंवा खूप आनंदाने व्याकूळ होणे.
  • बाराच्या भावात जाणे – नुकसान होणे, खूप अडचणी निर्माण होणे.
  • (एखादयासाठी) प्रार्थना करणे/चालू असणे – (एखादयाचे) भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे/भले व्हावे अशी विनवणी चालू असणे.
  • धावाधाव करणे – चपळाईने प्रयत्न करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

12th Marathi Guide Chapter 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती 

1. कृती करा.

प्रश्न अ.
करेचे घटक
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 7

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न आ.
करेचर वैविषट
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 8

2. उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर :
कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरणही असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.

प्रश्न आ.
कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय.

उदा., पुढील कथाबीज पाहा : “हा आपलाच मुलगा आहे’, असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात.

(२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच रंगवतो. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.

प्रश्न इ.
कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
(१) कथा मनोरंजन करते : कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो. या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला ५ मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजनच होते. कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून, चांगल्या-वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष-दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते; . स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वत:च्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न ई.
‘कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत, हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयातील कर्मचारी, महाविदयालयीन अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील, हे आधी पाहावे लागते, कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तर वेगवेगळा असतो. तसेच, कथाकथनाचा कालावधी किती, हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधानकाळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही, तर कथाकथनाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो.

प्रश्न उ.
कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 9

प्रश्न ऊ.
कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय 10

3. कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते. ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करणे. शीर्षक निश्चित करणे हे खूप जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक हे कथेचा चेहेरा असते. चेहेऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खूण पटते, तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटत असते.

शीर्षक आकर्षक हवे, त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्प्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्दप्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकांमुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षिक व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे. हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले, तर ते फारच उत्तम. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी गोष्ट आहे. पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे.

4. ‘कथा आजही लोकप्रिय आहे’, या विधानाबाबतचे तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे. मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या दोन कारणांसाठी कथावाङ्मय खूप वापरले गेले आहे. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे हे दोन पिढ्यांमागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत, या उलथापालथीमध्ये आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाजमाध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथावाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे.

सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथाच प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत पडू लागले आहे. म्हणून कथा लोकप्रिय झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

5. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
उत्तर :
कथाकथन करणाऱ्याने प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारांतील चढ-उतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असावेच लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो; त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे,

6. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.

कथा-साहित्यप्रकार-परिचय प्रस्तावना

कथा म्हणजे गोष्ट, कहाणी, हकिगत, प्रसंग इत्यादी. गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड माणसाला पूर्वीपासूनच आहे. ‘कथ् ‘ या धातूपासून ‘कथा’ हा शब्द तयार झाला आहे. कथ् म्हणजे कथन करणे, सांगणे, वर्णन करणे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, आपले अनुभव इतरांना सांगावेत व इतरांचे आपण ऐकावेत, अशी त्याला तीव्र इच्छा असते. त्यातूनच ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराचा जन्म झाला.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथा म्हणजे काय?

कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच, या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण होतो. हे सर्व घटक कथेचे अंगभूत घटक असतात. तसेच, कथेला एक शीर्षकही असते.

कथेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल :

“एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.’

कथेचे वर सांगितलेले अंगभूत घटक सर्व कथांमध्ये सारख्याच प्रमाणात असतात असे नाही. लेखकाच्या हेतूनुसार ठरावीक घटकांना जास्त महत्त्व मिळते.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेची पूर्वपीठिका

१८०६ साली छापलेले ‘बालबोधमुक्तावलि’ हे मराठीतील गोष्टीचे पहिले पुस्तक होय. त्यानंतर पंचतंत्र (१८१५), हितोपदेश (१८१५), सिंहासनबत्तिशी (१८२४), इसपनीतिकथा (१८२८), वेताळपंचविशी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘मराठी ज्ञानप्रसारक’ या १८५० साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या. यांतील बहुतेक सर्व गोष्टी रचनेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आजच्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात १८९० साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्या वर्षी ‘करमणूक ‘ साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्यांनी दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहिल्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

पुढे अनेक कथाकारांनी अनेक अंगांनी मराठी कथा समृद्ध करीत नेली. ग्रामीण कथा, दलित कथा असे नवनवीन प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला. विविध जातिधर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. या सगळ्या समाजघटकांमधून कथालेखक निर्माण झाले. त्यामुळे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या कथा मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेचे घटक

(१) कथाबीज : कथा म्हणजे अनेक घटनांची मालिका असते. ही घटनांची मालिका आपण आत्यंतिक संक्षिप्त रूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. ही कथेची मूळ घटना होय, या घटनेलाच ‘कथाबीज’ म्हणतात.

(२) कथानक : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेतून पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, भोवतालचे सामाजिक वातावरण, परस्परसंबंधांतून निर्माण होणारे संघर्ष हे सर्व घटक उलगडत जातात. कथेच्या भावाशयासहित पात्रांच्या कृतींतून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक.

(३) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील शब्दरूप व्यक्तीच होत. या व्यक्तीची वृत्ती, प्रवृत्ती, तिच्या भावभावना, विचार, कल्पना, तिच्या कृती, अन्य व्यक्तींशी असलेले परस्परसंबंध हे सर्व लेखक वास्तवातील माणसासारखे रेखाटतो. यातून जे. शब्दरूप चित्रण निर्माण होते, ते ‘पात्रचित्रण’ होय.

(४) वातावरण निर्मिती : आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी एक विशिष्ट वातावरण निर्माण होते. ते स्थळकाळाप्रमाणे बदलते. असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक या वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू शकतो. शब्दांतून व्यक्त झालेली कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. वातावरण निर्मितीतून हे कार्य घडत असते.

(५) नाट्यमयता/संघर्ष : कथेतील भावभावना एका क्षणाला उत्कट, तीव्र होतात. पात्रांमधील संघर्षही तीव्र होत जातो. आता पुढे काय होईल, पुढे काय होईल अशी वाचकाला उत्कंठा वाटत राहते. वाचकाच्या कल्पनेप्रमाणे पुढे घडले नाही की त्याची उत्कंठा आणखी वाढते. भावभावनांचा हा जो खेळ लेखकाने मांडलेला असतो, ती नाट्यमयता होय,

(६) संवाद : कथेतील संवाद पाल्हाळीक असता कामा नयेत. तर ते चटपटीत, आकर्षक व भाववाही असावेत. पात्रांचे व्यक्तिमत्त्व त्या संवादांतून व्यक्त व्हायला हवे. कथानक नाट्यमयतेने पुढे पुढे सरकायला हवे. कथेची भावनात्मकता त्यांतून व्यक्त झाली पाहिजे. असे संवाद कथेची उंची वाढवतात.

(७) भाषाशैली : कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा व कथेच्या उर्वरित भागातील भाषा हे कथेतील भाषेचे दोन ढोबळ भाग पडतात, पात्रांच्या तोंडची भाषा ही पात्राचे वय, शिक्षण, सामाजिक दर्जा, आर्थिक स्तर, त्याची मनोवृत्ती इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. पात्राच्या स्वरूपानुसार त्याच्या तोंडची भाषा लेखकाला लिहिता आली पाहिजे. पात्रांच्या तोंडच्या भाषेखेरीज उरलेली भाषासुद्धा कथेचे व्यक्तिमत्त्व घडवत असते. ती भाषा पात्रांचे चित्रण करते. वातावरण उभे करते. कथानकाला पुढे नेते. ती वाचकाशी संवाद साधत असते. या भाषेत वापरलेले शब्द, प्रतिमा – प्रतीके – अलंकार हे महत्त्वाचे असतातच; पण लेखकाचा दृष्टिकोन, त्याचे विचार, त्याची मानसिकता इत्यादींचाही त्या भाषेवर परिणाम होत असतो. हे सर्व म्हणजे लेखकाची ‘भाषाशैली’ होय.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेची वैशिष्ट्ये

(१) कथा मनोरंजन करते : कथा वाचताना आपण कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते, याचा आनंद होतो. काही वेळा असेही घडते – माणसाला मनुष्यस्वभावाविषयी अमाप कुतूहल असते. कथेमार्फत मनुष्यस्वभावाच्या अनेक तहांशी परिचय होतो, त्यामुळे आपल्याला आपले कुतूहल शमवण्याचा आनंद मिळतो. काही कथाच मुळात विनोदनिर्मितीसाठी लिहिलेल्या असतात. अशा विविध कारणांनी कथेमुळे आनंद मिळतो. मनोरंजन होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच दाखवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून चांगल्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. चांगली मूल्ये व वाईट मूल्ये यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय होताना दाखवलेला असतो. कथा वाचकाला प्रेरणा, स्फूर्ती व बोध देते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार वाचकांवर होतो. आपण कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा, याचा बोध माणसाला होतो. हे सर्व सुसंस्कार होत.

(३) कथा वाचकांची उत्कंठा वाढवते : कथेत सतत ‘पुढे काय होणार?’ अशी वाचकाला उत्सुकता वाटत राहते, वाचक स्वत:चे काही अंदाज बांधतो. लेखक घटनांची गुंफण इतक्या कौशल्याने करतो की वाचकाचे अंदाजही कोलमडून पडतात. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढते. मनुष्यस्वभावाचे अकल्पित नमुने वाचकासमोर येतात. त्यांच्या ज्ञानामुळे वाचक अधिक प्रगल्भ होतो. प्रगल्भ होत जाण्याचा एक उदात्त आनंद वाचकाला मिळतो. या उत्कंठावर्धक रचनेमुळे वाचकावर नकळत संस्कार होत जातात.

(४) कथा एककेंद्री असते : कमीत कमी पात्रे कमीत कमी घटना – प्रसंग, कमीत कमी परिसर, कमीत कमी मूल्यांचा संघर्ष यांमुळे कथेचा एकच परिणाम साधला जातो.

(५) कथा भूतकाळात लिहिली जाते : आपण वर्तमानकाळात जगतो, तेव्हा सर्वजण एकाच पातळीवर असतो. प्रत्येकजण आपापली कृती करीत असतो. प्रत्येकाच्या कृतीचे परिणाम काय होतील, हे कोणालाही माहीत नसतात. ते भविष्यकाळात दिसणार असतात. साहजिकच कोणत्या कृतीचे, मूल्याचे कोणते परिणाम होतील, ते अंधारातच राहते. खरे तर, घटना पूर्ण झाली, कथानक पूर्ण झाले की ते सर्व भूतकाळात जमा होते. तसेच, वाचकाची उत्कंठा शमण्याच्या दृष्टीने, त्याच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने वर्तमानकाळातील रचना उपयुक्त नसते. म्हणून साधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते.

(६) कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो : जीवनातील घटना, भावभावना, वैचारिक उलथापालथी यांचे दर्शन कथांतून घडत असते. मानवी जीवनाची अगणित रूपे कथांतून दिसतात. आपण स्वतःच्या जीवनात अनुभवतो, त्यापेक्षा कितीतरी व्यापक, विराट जीवनदर्शन कथांमधून घडते.

(७) श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते : समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर कथा कथन करता येते, म्हणजे सांगता येते, कथा श्रवणीय असल्यामुळे हे शक्य होते. कथा श्रवणीय का होते? कारण ती उत्कंठावर्धक असते. वाचकाच्या मनाला ती गुंतवून ठेवते. तसेच, कमी पात्रे, कमी प्रसंग, कमी संघर्ष, कथेतील जीवनाचा मर्यादित परीघ यांमुळे कथा एककेंद्री होते. कधी कधी कथेतील विनोदामुळे आकर्षकता वाढते. हे सगळे घटक श्रवणीयता वाढवायला मदत करतात.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेचे सादरीकरण

सादरीकरणाचे अभिवाचन व कथाकथन हे दोन भाग आहेत :
(२) अभिवाचन लिहिलेली किंवा छापलेली कथा आहे तशीच वाचणे म्हणजे अभिवाचन होय. अभिवाचनात विरामचिन्हे लक्षात घेऊन वाचन करावे लागते. कथेतील भावनांचे चढउतार लक्षात घ्यावे लागतात. वाचनाची द्रुत लय व संथ लय यांचा गरजेप्रमाणे उपयोग करून घ्यावा लागतो. ऐकून समजून घेता येईल, असा वेग ठेवावा लागतो. थोडक्यात, कथेचे भावपूर्णतेने वाचन केले जाते. येथे वाचिक अभिनय महत्त्वाचा असतो.

(२) कथाकथन कथाकथनासाठी कथा प्रथम पूर्णपणे पाठ केली जाते. गप्पांच्या जवळ जाणाऱ्या शैलीत कथा सादर केली जाते. वाचिक अभिनयाची गरज असतेच; शिवाय काही प्रमाणात हावभाव, क्वचित हालचाली यांचाही उपयोग केला जातो. शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता, गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे फार मोठे कौशल्य असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 कथा-साहित्यप्रकार-परिचय

कथा-साहित्यप्रकार-परिचय समारोप

छपाईचे तंत्रज्ञान निर्माण होण्यापूर्वी कथा मौखिक रितीने एकमेकांना सांगितली जात होती. आजची कथाकथनाची पद्धत टिकून आहे. निबंध, लेख, वैचारिक वाङ्मय, कादंबरी हे प्रकार कथनाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण असते. पण कथा मात्र अजूनही कथन पद्धतीने वाचकांपर्यंत नेता येते.

कथा-साहित्यप्रकार-परिचय शब्दार्थ

  • लक्षवेधी – लक्ष, मन वेधून घेणारी.
  • मौखिक – मुखावाटे चालत आलेली.
  • उत्तरोत्तर – क्रमाक्रमाने, अधिकाधिक.
  • चित्ताकर्षक – चित्ताला, मनाला आकषून घेणारी.
  • उत्कर्षबिंदू – नाट्यमयता, संघर्ष शिगेला पोहोचण्याची स्थिती.
  • बहुआयामी – खूप बाजू असलेला/ली.
  • कथात्म – कथा हा आत्मा असलेले.
  • चटपटीत – तल्लख, चलाख, हुशार.
  • रसपरिपोष – रसाचा उत्कट व सर्वांगांनी परिपूर्ण आविष्कार झालेला असण्याची स्थिती.
  • श्रवणीय – ऐकताना उच्च आनंद देणारे.
  • संहिता – मूळ लेखन.

कथा-साहित्यप्रकार-परिचय वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • वृद्धिंगत होत जाणे – वाढ होत जाणे,
  • भंडावून सोडणे – अतिशय त्रास देणे,

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

12th Marathi Guide Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Textbook Questions and Answers

नमुना कृती

1. परिणाम लिहा :

प्रश्न 1.

घटना परिणाम
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. …………………..
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. ………………….

उत्तर :

घटना परिणाम
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते.
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. पंडितजींच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

2. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे. आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसवून घेतला आहे. ही मुलेमाणसे आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. यांच्या कथा प्रेरणादायक आहेत.

एक कथा आहे नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची. तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहे. नायरा जन्मतः च कमकुवत होती. तीन वर्षांपर्यंत तिला उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते. हा जयपूर फूट बसवल्यावर मात्र नायरा सोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली; बागडू लागली; धावू लागली.

कॉर्पोरेट जगताने आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक आहे – लेमन ट्री हॉटेल. एक २३ वर्षांचा तरुण पायाने अधू होता. त्याला एक दानशूर व्यक्तीने जयपूर फूट बसवून दिला. तो आता सहायक म्हणून या हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्याचे काम तो करतो. तो आता हॉटेलचा मॅनेजर होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या कंपनीत आतापर्यंत ४०० विकलांगांची भरती केली गेली आहे.
एकंदरीत, विकलांगत्वावर मात करून सर्वसाधारण माणसाचे आयुष्य नक्की जगता येऊ शकते, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेले आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Additional Important Questions and Answers

कारणे लिहा :

प्रश्न 1.
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण –
उत्तर :
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण उपलब्ध कृत्रिम पाय खूप महागडे होते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांची चाल सुलभ होताना दिसत नव्हती.

प्रश्न 2.
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण –
उत्तर :
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित झाला होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव – [ ]
  2. जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव – [ ]
  3. विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव – [ ]
  4. कृत्रिम पाय तयार करणारे – [ ]
  5. सुरुवातीला पंडितर्जीनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ – [ ]

उत्तर :

  1. सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव : नाचे मयूरी
  2. जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव : जयपूर फूट
  3. विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव : डॉ. प्रमोद किरण सेठी
  4. कृत्रिम पाय तयार करणारे : पंडित रामचरण शर्मा
  5. सुरुवातीला पंडितजींनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ : बांबू

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

जयपूर फूटचे जनक Summary in Marathi

जयपूर फूटचे जनक

‘नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला, नृत्याची कारकीर्द तिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’, जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.

जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करीत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडित ना सणालयात येण्याचं आमंत्रण दिलं.

पंडितींनी सणालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं, ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला.

डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली, त्या रुपणाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं. आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थाचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.

आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अदययावत प्लास्टिक व अॅल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितर्जीचीच राहिली आहे.
– डॉ. बाळ फोंडके

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

12th Marathi Guide Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 1
उत्तर :

पाठातीलगोष्टी प्रतीके
1. चिमुरड्या मुलीचं डोकं – नारळ
2. आई हे नातं – ईश्वराचा अंश
3. भरपावसातली छत्री – बाबा

आ. वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 5

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 6

इ. योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट
लेखकाचीव्यंगचित्रे
‘ब’ गट
व्यंगचित्रांचीकार्ये
1. लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर अ. भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.
2. लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही आ. स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केल
3. शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना इ. लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते.

उत्तर :

‘अ’ गट
लेखकाचीव्यंगचित्रे
‘ब’ गट
व्यंगचित्रांचीकार्ये
1. लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर इ. लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते.
2. लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही अ. भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.
3. शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना आ. स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केल

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

ई. लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✓) अशीखूणकरा.

प्रश्न 1.

  1. लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.
  2. लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.
  3. लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.
  4. अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.
  5. प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.
  6. नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.
  7. इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती.

उत्तर :

  1. लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.(✓)
  2. लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. (✗)
  3. लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. (✓)
  4. अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. (✓)
  5. प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. (✓)
  6. नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता. (✓)
  7. इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. (✓)

2. वर्णनकरा.

प्रश्न अ.
वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
उत्तर :
चित्रकलेच्या प्रदर्शनाला साधारणपणे सुशिक्षित व उच्चभ्रू वर्गातील लोक जास्त असतात. ग्रामीण भागातील लोक तर अशा प्रदर्शनांकडे सहसा फिरकत नाहीत. मात्र वाई येथे लेखकांनी भरवलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला शेतकरी कुटुंबातील थोडीथोडकी नव्हेत, तर चक्क वीस-बावीस माणसे भेट देण्यासाठी आली होती. त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आला होता.

त्या शेतकरी कुटुंबप्रमुखाचे वय सत्तरीच्या आसपास होते. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला खूप मोठे बांधलेले मुंडासे असा नखशिखान्त शेतकरी पण अंगावर वागवीत होता. असा हा कुटुंबप्रमुख सर्वांना व्यंगचित्र समजावून सांगत होता. तो एकेका चित्रासमोर उभा राही आणि त्याला समजलेला चित्राचा अर्थ स्वत:च्या माणसांना समजावून सांगे. मुलानातवंडापासून लहानथोर सोबत आलेले ते कुटुंबीय आपल्या प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली चित्रांचा आस्वाद घेत होती. हे दृश्यच विलक्षण व दुर्मीळ होते. लेखकांच्या मनातली चित्र काढण्यामागील कल्पना आणि त्या कुटुंबप्रमुखाला जाणवलेला अर्थ यांतली तफावत लेखक समजावून घेत होते. फार मोठे अनौपचारिक शिक्षण लेखकांना या प्रसंगातून मिळत होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

प्रश्न आ.
स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर
उत्तर :
लेखक एका कार्यक्रमाला गेले होते. पाहुणे म्हणून त्यांना पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो नारळ टेबलावर ठेवला. लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसले. त्या नारळात त्यांना चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्यांना नारळावरून, देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. हा प्रसंग आठवला. एवढ्या तपशिलाच्या आधारे त्यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले. एक पुरुषी हात. त्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. तो हात वरून खाली या दिशेने येत दगडावर नारळ फोडणार होता. तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलींची, भ्रूणाची हत्या होऊ न देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला.

प्रश्न इ.
लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.
उत्तर :
लेखकांनी आईचे, आईच्या प्रेममय हृदयाचे अत्यंत हृदय चित्र रेखाटले आहे. चित्रातल्या परिसरात वैशाखातला वणवा पेटला आहे. त्यात एक सुकलेले झाड आहे. त्या झाडावर एकही पान नाही. अत्यंत भकास वातावरण आहे. तरीही त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे बांधले आहे. त्या घरट्यात चोच वासून आकाशाकडे व्याकुळपणे बघणारी तीनचार पिल्ले आहेत. अत्यंत हृदयद्रावक असे हे दृश्य आहे. त्या चित्रात वर दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षीण पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जिवाच्या आकांताने ओढीत घरट्याकडे नेत आहे. एवढ्या या एका कृतीतून त्या पक्षिणीची आपल्या पिल्लांना वाचवण्याची चाललेली जिवापाड धडपड प्रभावीपणे व्यक्त होते. आईची अपार माया या चित्रातून दिसून येते.

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

प्रश्न 1.
या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
उत्तर :
कर्तरी प्रयोग.

प्रश्न 2.
हा संदेश मला पोहोचवता आला.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

प्रश्न 3.
त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.

प्रश्न 4.
मार्गदर्शन संपवून चहा मागवला.
उत्तर :
कर्मणी प्रयोग.

आ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 7
उत्तर :

वाक्य वाक्यप्रकार बदलासाठी सूचना
1. अशी माणसं क्वचितच सापडतात. विधानार्थी – होकारार्थी वाक्य नकारार्थी → अशी माणसे बहुतेक सापडत नाहीत.
2. ती जुनी कौलारू वास्तू होती. विधानार्थी वाक्य उद्गारार्थी → किती जुनी कौलारू वास्तू होती ती!
3. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी → तुम्ही मला बोलू दया.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

इ. समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 8
उत्तर :

समासाचे नाव सामासिक शब्द
1. तत्पुरुष समास आ. महात्मा, पंचधातू
2. अव्ययीभाव समास इ. प्रतिवर्ष, आजन्म
3. बहुव्रीही समास ई. लक्ष्मीकांत, निर्धन
4. द्वंद्व समास अ. स्त्रीपुरुष, गुण दोष.

ई. कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
(विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्‌विगू समास, इतरेतर द्वंद्‌व समास, वैकल्पिक द्वंद्‌व समा, समाहार द्‌वंद्‌व समास)

प्रश्न 1.

  1. चहापाणी – …………………. .
  2. सद्गुर – …………………. .
  3. सुईदोरा – …………………. .
  4. चौघडी – …………………. .
  5. कमीअधिक – …………………. .
  6. जलदुर्ग – …………………. .

उत्तर :

  1. चहापाणी – समाहार द्वंद्व समास
  2. सद्गुरू – कर्मधारय समास
  3. सुईदोरा – इतरेतर द्वंद्व समास
  4. चौघडी – द्विगु समास
  5. कमीअधिक – वैकल्पिक द्वंद्व समास
  6. जलदुर्ग – विभक्ती तत्पुरुष समास.

4. स्वमत.

प्रश्न अ.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न असते आणि त्यांचे परिणामही भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो, तेव्हा घर या शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी ऐकून घराचा बोध होऊ शकणार नाही. फक्त मराठी भाषा समजणाऱ्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वस्तू जोडलेली आहे.

ज्याला हा संकेत माहीत आहे आणि ज्याने तो संकेत लक्षात ठेवला आहे, त्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. याउलट, घराचे चित्र दाखवल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा बोध होतो. तिथे भाषेची आडकाठी येत नाही. देशाच्या सीमा आड येत नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून आशयाचे थेट आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते.

चित्र व व्यंगचित्र यांत काहीएक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. व्यंगचित्रकार कधीही विषयवस्तूचे फक्त वर्णन करीत नाही. त्याला माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर काहीएक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे लक्षात याव्यात म्हणून माणसांचे चेहेरे, त्यांवरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यांतील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारतो. त्यामुळे चित्र हे व्यंगचित्र बनते. व्यंगचित्रातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर केलेली टीका कोणालाही पटकन कळू शकते. तोच भाव समजावून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतोच असे नाही. व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो.

व्यंगचित्रात चालू घडामोडींवर भाष्य असते. व्यंगचित्र पाहणारा प्रेक्षक चालू घडामोडींचा साक्षीदारही असतो. म्हणून त्याला व्यंगचित्र पटकन कळू शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

प्रश्न आ.
‘वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते,’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर :
कलावंतांविषयी, कलेविषयी सर्वच समाजात विलक्षण कुतूहल असते. व्यंगचित्रकार हाही एक कलावंतच असतो. व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र दररोज प्राधान्याने वर्तमानपत्रांतून लोकांसमोर येत असतात. दररोज त्याची लोकांशी गाठभेट होत असते. वर्तमानपत्र वाचणारा प्रत्येक वाचक व्यंगचित्र पाहतोच पाहतो. व्यंगचित्र पाहताच त्या वाचकाला त्याचे मर्म खाडकन जाणवते. ते मर्म क्षणार्धात त्याच्या मनात शिरते. चेहेऱ्यावर स्मित तरळते. त्याच क्षणी तो वाचक व्यंगचित्रकाराला मनोमन दाद देतो. किती सुंदर कल्पना आहे ही! कशी सुचली असेल या व्यंगचित्रकाराला? आपल्यासारखाच हा माणूस. हातपाय, नाक, कान, डोळे हे सर्व अवयव आपल्यासारखेच. यांना कशी काय सुचते हे व्यंगचित्र?

लोकांच्या मनातील या प्रश्नालाच मंगेश तेंडुलकर यांनी प्रस्तुत पाठात दोन वाक्यात उत्तर दिले आहे. ‘वाहत्या आयुष्यात सावधगिरीने उभे राहिले, तर व्यंगचित्राची कल्पना आपल्या जवळूनच जाताना नजरेस पडेल. तिथून ती उचलायची आणि कागदावर उतरवायची.’ त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे. व्यंगचित्रकार कमीत कमी रेषांमध्ये आपला आशय व्यक्त करतो. तसेच इथे लेखकांनी कमीत कमी शब्दांत आशय व्यक्त केला आहे. वाहत्या आयुष्यात म्हणजे दैनंदिन जीवन जगत असतानाच. त्याच जीवनाचे निरीक्षण केले असता, आपण जगत असलेल्या प्रसंगातच व्यंगचित्राची कल्पना सापडते. या कल्पनेसाठी रानावनात जाऊन वेगळी तपश्चर्या करावी लागत नाही.

मग काय करावे लागते? तर आपल्या जगण्याचेच तटस्थपणाने, त्रयस्थासारखे निरीक्षण करावे लागते. लेखकांनी यासाठीच ‘सावधगिरीने’ हा शब्द वापरला आहे. सावधगिरीने याचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात साधारणपणे आपल्या अनुभवांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांत पूर्णपणे बुडून जातो. त्यामुळे आपल्या अनुभवाचे मर्म आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून काही क्षण तरी आपल्या अनुभवांकडे रेंगाळून पाहिले पाहिजे.

जो विचार आपल्याला उत्कटपणे सांगावासा वाटतो, त्याला साजेसा प्रसंग आपल्याला दिसतो, असे लेखकांना सुचवायचे आहे. एकदा कल्पना सुचली की चित्र काढणे सोपे असते. खरे सर्वच कलांच्या बाबतीत हे पूर्णपणे खरे आहे. लेखकांनी खूप गूढ अशा प्रश्नाला साध्या, सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे.

प्रश्न इ.
लेखकांनी व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
लेखक मंगेश तेंडुलकर हे अत्यंत मनस्वी वृत्तीचे होते. ते जे काही करायला घेत त्यावर ते उत्कटपणे प्रेम करीत. ते अत्यंत करारी होते. ते ऐहिक सुखसमृद्धीच्या मागे धावले नाहीत. कोणासमोर हात पसरले नाहीत. या सगळ्या गुणांची देणगी लेखकांना मिळाली. आयुष्यात अनेक संकटे आली, वावटळी आल्या. पण त्यांना तोंड देऊन लेखक भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभे राहिले. हे ते करू शकले कारण त्यांना वडिलांकडून मिळालेला नैतिक वारसा. त्या बळावर आयुष्यात तग धरून राहिले. कोलमडले नाहीत. आपल्याला मिळालेल्या या वारशाबद्दल स्वत:च्या मनात लेखकांना अपार कृतज्ञता वाटत होती. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वडिलांना व्यंगचित्र मधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली.

ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी दोन चित्रे काढली. एका चित्रात लेखकांचे बालरूप आहे. बालरूपातले लेखक भर पावसात उभे आहेत. त्यांच्या डोक्यावर ‘बाबा’ ही दोन अक्षरे आहेत. ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पाऊस पडत आहे. खाली इवलासा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. बाबा या शब्दांनी, म्हणजे बाबांनी त्यांचे रक्षण केले.

दुसऱ्या चित्रात लेखक सरत्या वयातले, वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षातले, उभे आहेत. भर पावसात उभे आहेत. डोक्यावर बाबा हा शब्द नाही. तरीही पाऊस लेखकांना न भिजवता त्यांच्या बाजूने पडत आहे. ते आता पंच्याहत्तराव्या वर्षीही सुरक्षित आहेत. बाबांकडून मिळालेला नैतिक वारसा त्यांच्या मृत्यूनंतर लेखकांना खूप मोठा आधार, आश्रय देत आला आहे. वडिलांबद्दलची ही कृतज्ञता लेखक या व्यंगचित्रातून व्यक्त करू पाहतात. स्वत:च्या पित्याला इतकी उत्कट श्रद्धांजली क्वचितच कोणीतरी वाहिली असेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध’ याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
आपला देश अंधश्रद्धेच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकलेला आहे. मागासलेल्या विचारांच्या दलदलीत बुडालेला आहे. यामुळे समाजात सामाजिक – सांस्कृतिक दुर्गुण निर्माण झाले आहेत. अत्यंत दुष्ट, अन्यायकारक रूढी-परंपरा निर्माण झाल्या आहेत. या रूढींच्या बरोबरीने समाजाच्या मनात घातक व अन्यायकारक विचार रुजत चालले आहे. त्यांपैकी एक आहे – स्त्री पुरुष समानता. समाजमनात स्त्री ही कनिष्ठ व पुरुष हा श्रेष्ठ अशी धारणा निर्माण झाली आहे.

मुलगा हा कुलदीपक व मुलगी परक्याची धनसंपदा, अशी समजूत. मुलगी घरात जन्मणे हे अशुभ. आपल्या हातून पाप घडले असेल तरच आपल्या पोटी मुलगी जन्माला येते, यामुळे घरात मुलगा जन्माला यावा यासाठी लोक धडपड करतात. उपासतापास करतात. लोक मुलगी होणार असेल, तर तिला जन्म होण्याच्या आधीच मारतात. हे सर्रास होत होते. अनेक डॉक्टर यात सामील होते. याविरुद्ध आता कडक कायदे झालेले आहेत. तरीही अधूनमधून हे कृत्य घडताना दिसते.

खरे तर मुलगी जन्मण्याच्या आधीच तिला मारणे, हा खूनच होय. हा एका व्यक्तीचा खून या अर्थाने ही भीषणच घटना आहे. पण हे व्यक्तीच्या मृत्यूपुरते थांबत नाही. यामुळे संपूर्ण मानव जातच धोक्यात येऊ शकते. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण जास्त आणि स्त्रियांचे प्रमाण कमी या वास्तवामुळे फार मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाज होरपळून जाण्याची शक्यता आहे.

या वस्तुस्थितीकडे जरा नीट पाहिले, तिच्यातली विपरीतता स्पष्ट होईल. स्त्रियांची संख्या समाजात सामान्यत: निम्मी असते. आपला अर्धा समाज अन्यायग्रस्त राहिला तर त्याची प्रगती होणार तरी कशी?

स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येवर ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा?’ या नावाचे नाटकही येऊन गेले आहे. समाजाचा एक भाग या समस्येची भीषणता ओळखून आहे. पण ज्याला कळलेच नाही, असा समाजाचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. हा समाजगट कितीही मोठा असला, तरी सुज्ञ लोकांनी याविरुद्ध लढले पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या हा खूनच होय. आणि अशी कृत्ये करणारी माणसे खुनी होत, असेच समाजाने मानले पाहिजे. तरच या भीषण रूढीला आळा बसेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

प्रश्न आ.
‘आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे,’ या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून दाखवा.
उत्तर :
रवींद्रनाथांची एक कथा आहे. एका आईचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होते. तिने त्याला कष्टपूर्वक वाढवले. एकदा त्याला देवाचा साक्षात्कार झाला. देवाने त्याला वर दिला, “बाळा काय हवे ते माग.” त्याने देवाकडे अमरत्व मागितले. देवाने ही मागणी मान्य केली, पण त्याने एक अट घातली. “मला तू तुझ्या आईचे हृदय आणून दे.”

बाळाला खात्री होती की आई आपल्याला तिचे हृदय देणारच. तिचे त्याच्यावर अपार प्रेम होते. मुलाने आईकडे येऊन हृदयाची मागणी केली. आईचे हृदय घेतले. आई मरून पडली. मुलगा धावत धावत देवाकडे निघाला. वाटेत त्याला ठेच लागली. त्याच्या हातातले हृदय जमिनीवर पडले. मुलगा हृदय उचलायला धावला तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, “बाळा, तुला काही लागलं नाही ना?”

ही कथा काल्पनिक आहे, यात शंका नाही. पण या कथेतून आईचे अपार ममत्व, त्यातील उदात्तता, त्यातील शुद्धता, मुलाबाबतची ओढ हे सारे विलक्षण नजाकतीने व्यक्त झाले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या कुशीत सांभाळते. तो निव्वळ गोळा असतो, तेव्हा ती स्वत:चे रक्त देऊन त्याचे पालनपोषण करते. खरे तर आपल्याला जसे हात, पाय इत्यादी आपले अवयव असतात, तसाच कोणताही बाळ त्याच्या आईला स्वत:च्या देहाचाच भाग वाटत असतो.

त्यामुळे तिच्या आयुष्यातली सगळी शुद्धता, सगळे पावित्र्य त्या नात्यात एकवटलेले असते. बाळाची भूक प्रथम आईला लागते. बाळाला जरा कुठे काही लागले, तर त्याची कळ आईच्या हृदयात प्रथम उमटते. नीट बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, बाळाच्या वाटचालीकडे, त्याच्या शिक्षणाकडे, त्याच्या प्रकृतीकडे आईचे पूर्ण लक्ष असते. त्याच्या विकासाबाबत ती आत्यंतिक संवेदनशील असते. आईचे प्रेम शुद्ध, पवित्र असते, याचे कारण ती आपल्या बाळासाठी जे काही करते, त्याबदल्यात बाळाकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. म्हणून जगभरात, सर्व मानवी समाजात आई-मूल हे नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे.

उपक्रम :

अ. तुमच्या शाळेतील/महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात ‘व्यंगचित्रांतून सामाजिक प्रबोधन’ या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन करा.

आ. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ।’ यासारखी स्त्री शिक्षणाशी संबंधित पाच घोषवाक्ये तयार करा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

खाली दिलेल्या मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्राचे निरीक्षण करा. या चित्रातून व्यंगचित्रकाराला काय सुचवायचे असेल असे तुम्हांला वाटते. ते तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 9
उत्तर :
कुल्हाड हे दहशत, दडपशाही, हिंसा यांचे प्रतीक आहे. मुलगी हे शांतताप्रेमींचे प्रतीक आहे. पाणी शिंपणे हे शांततेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. कु-हाडीवरील रोपटे हे शांततेचे, प्रेमाचे प्रतीक आहे. हिंसेला हिंसेने उत्तर देऊन हिंसा कधीच संपत नाही. हिंसाचारी माणसांचे मन प्रेमानेच बदलता येते. शांतता, प्रेम निर्माण करण्याचा तोच एक मार्ग आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा Additional Important Questions and Answers

लेखकांनी पुढील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा :

प्रश्न 1.
पाठातील गोष्टी – प्रतीके
1. नारळ घेतलेला हात – [ ]
2. जवळून जाणारी व्यंगचित्राची कल्पना – [ ]
उत्तर :
1. नारळ घेतलेला हात : रूढीग्रस्त पुरुष
2. जवळून जाणारी व्यंगचित्राची कल्पना : जवळून जाणारे मासे

जोड्या लावा :

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचे डोके आहे, हे सूचित व्हावे म्हणून 1. आणि ती सतत परत यायची.
2. मासिके, नियतकालिके यांना मी सतत चित्र पाठवायचो 2. म्हणून ते दीनानाथांशी खोटे बोलले.
3. लेखकांना स्वत:च्या बळावर स्वत:ची पात्रता सिद्ध करायची होती 3. त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला.

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचे डोके आहे, हे सूचित व्हावे म्हणून 3. त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला.
2. मासिके, नियतकालिके यांना मी सतत चित्र पाठवायचो 1. आणि ती सतत परत यायची.
3. लेखकांना स्वत:च्या बळावर स्वत:ची पात्रता सिद्ध करायची होती 2. म्हणून ते दीनानाथांशी खोटे बोलले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा 11

लेखकांनी नोंदवलेल्या व्यंगचित्र सुचण्याच्या दोन प्रक्रिया सांगा.

प्रश्न 1.
लेखकांनी नोंदवलेल्या व्यंगचित्र सुचण्याच्या दोन प्रक्रिया सांगा.
उत्तर :
1. जवळून जात असलेली एखादी व्यंगचित्राची कल्पना तिथून उचलली जाते आणि कागदावर उतरवली जाते.
2. आधी एखादी कल्पना मनात निश्चित करून चित्र रेखाटता रेखाटता कधीतरी अचानकपणे आपली मनातील सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन येते.

लेखकांना लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✓) अशी खूण करा आणि लागू न पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✗) अशी खूण करा :

प्रश्न 1.
वाईच्या व्यंगचित्र प्रदर्शनात लेखकांना मोलाचे शिक्षण मिळाले. ( )
उत्तर :
वाईच्या व्यंगचित्र प्रदर्शनात लेखकांना मोलाचे शिक्षण मिळाले. (✓)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

कारणे लिहा :

प्रश्न 1.

  1. ‘दीपावली’त स्वत:ची चित्रे प्रसिद्ध व्हावीत असे लेखकांना वाटत होते; कारण –
  2. लेखक खोटे बोलले, हे दीनानाथांना कळले होते, पण ते त्या वेळी काहीही बोलले नाहीत; कारण –
  3. दीनानाथांना लेखकांचे स्पष्टीकरण आवडले; कारण –

उत्तर :

  1. ‘दीपावली त स्वत:ची चित्रे प्रसिद्ध व्हावीत असे लेखकांना वाटत होते; कारण दीपावली हे मासिक दर्जेदार असल्याने त्यात आपली चित्रे प्रसिद्ध झाली; तर आपल्याला मान्यता मिळेल, असे लेखकांना वाटत होते.
  2. लेखक खोटे बोलले, हे दीनानाथांना कळले होते, पण ते त्या वेळी काहीही बोलले नाहीत; कारण लेखक कधी कबूल करतात, हे त्यांना पाहायचे होते.
  3. दीनानाथांना लेखकांचे स्पष्टीकरण आवडले; कारण लेखकांसारखी माणसे क्वचितच आढळतात.

रंगरेषा व्यंगरेषा Summary in Marathi

पाठ परिचय :

  • व्यंगचित्रांसाठी विषय मिळण्यात लेखकांना कधीही अडचण आली नाही. त्यांना खोलवर विचार करण्याची सवय होती. या विचार करण्याच्या वाटेवर त्यांना व्यंगचित्रांचे विषय मिळत असत.
  • लेखक अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत. अशा कार्यक्रमांतील घडामोडींमधून व्यंगचित्रांसाठी त्यांना विषय मिळत. उदा., स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे पोस्टर.
  • व्यंगचित्रांचे विषय आपल्या अवतीभवतीच असतात. जवळून जात-येत असतात. त्यांनाच अलगद उचलायचे आणि कागदावर चितारायचे.
  • व्यंगचित्र ही नि:शब्द भाषा असते. अंत:करणातील खोलवरचे भाव व्यंगचित्रातून उत्तम रितीने व्यक्त होऊ शकतात, ही त्यांची ठाम धारणा होती, आपले हे मत त्यांनी आपल्या चित्रांतून समर्थपणे व्यक्त केले. उदा., आईवरील चित्र आणि बाबांना श्रद्धांजली वाहणारे चित्र.
  • देशविदेशात 80 हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शने भरवली.
  • व्यंगचित्र म्हणजे एक छान भाषाच होय, हा संदेश देण्यासाठी त्यांनी प्रदर्शने भरवली.
  • वाईच्या प्रदर्शनात एक प्रेक्षक शेतकरी आपल्या कुटुंबीयांना चित्रे समजावून देत होता. चित्र निर्माण करण्याचा आपला हेतू आणि
  • चित्राचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम यातून आपल्या चित्रांचे यशापयश समजून घेण्यातून चित्रकलेचे फार मोठे शिक्षण लेखकांना मिळाले.
  • प्रारंभीच्या काळात प्रसिद्धीसाठी धडपड करावी लागली. दीनानाथ दलालांनी संधी दिली. त्यांनी लेखकांची मुलाखत घेतली. लेखकांना व्यंगचित्रांचा नवीन ट्रेंड समजावून सांगितला. या भेटीतून खूप मोठा लाभ लेखकांना झाला. त्यांची चित्रेही दलालांनी स्वीकारली.
  • दलालांनी चित्र काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. व्यंगचित्र कलेतील नवा प्रवाह समजावून सांगितला. चित्राचा ‘परस्पेक्टिव्ह’ समजावून सांगितला.
  • दलालांशी झालेल्या बोलण्यात लेखकांनी विजय तेंडुलकर हे आपले बंधू आहेत, हे प्रथम नाकारले, नंतर स्वीकारले. विजय तेंडुलकरांच्या ओळखीमुळे आपली चित्रे स्वीकारली गेली, असे होऊ नये; आपल्या चित्रांच्या दर्जामुळे ती स्वीकारली जावीत, असा लेखकांचा आग्रह होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 रंगरेषा व्यंगरेषा

शब्दार्थ :

  1. स्रोत – उगमस्थान.
  2. प्रत्यंतर – अनुभव, पुरावा, खात्री.
  3. स्वारस्य – मनापासून असलेली, उत्कट इच्छा, नैसर्गिक आवड.
  4. कणसदृश्य – कणाएवढी.
  5. अपार – अमर्याद (पार = काठ, बांध. बांध नसलेला, अमर्याद पसरलेला.)
  6. इझेल – लिहिण्याचा फळा अडकवण्याचे साधन, घोडा.
  7. परस्पेक्टिव्ह – विशिष्ट कोनातून पाहिल्यास नजरेस पडणारे दृश्यरूप.

वाक्प्रचार व त्याचा अर्थ

हात देणे – मदत करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

12th Marathi Guide Chapter 11 आरशातली स्त्री Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 2

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 4

आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्रश्न 1.
घनगर्द संसार – ……………..
उत्तर :
घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
प्रेयस चांदणे – ……………..
उत्तर :
प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

प्रश्न 3.
प्राण हरवलेली पुतळी – ……………..
उत्तर :
प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

प्रश्न 4.
फाटलेले हृदय – ……………..
उत्तर :
फाटलेले हृदय – विस्कटलेले वेदनामय मन.

2. अ. वर्णन करा.

प्रश्न 1.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल –
उत्तर :
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

प्रश्न 2.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
उत्तर :
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

प्रश्न 1.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर :
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
उत्तर :
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

इ. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंग अ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
2. आभाळ झुल्यावर झुलणारी आ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
3. देह तोडलेले फूल इ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
4. पारंपरिकतेचे वरदान ई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा उ. मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंग उ. मनातले सुंदर भाव
2. आभाळ झुल्यावर झुलणारी इ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
3. देह तोडलेले फूल ई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
4. पारंपरिकतेचे वरदान आ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा अ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न अ.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

प्रश्न आ.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली –
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते – तू रडू नकोस.

ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

6. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले.

तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

उपक्रम :

‘स्त्री’विषयक पाच कवितांचे संकलन करा. त्यांचे वर्गात लयीत वाचन करा.

तोंडी परीक्षा.

‘आरशातली स्त्री’ या कवितेचे प्रकट वाचन करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Additional Important Questions and Answers

(काव्यसौंदर्य / अभिव्यक्ती)

पुढील ओळींचा अर्थ लिहा :

प्रश्न 1.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य…!
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते -त् नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते – पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येये उराशी बाळगलीस. तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाहय बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा
स्वतःशी केलेला सार्थ संवाद आहे,’ हे विधान स्पष्ट करा. –
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला, परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली.

म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वत: केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

व्याकरण

वाक्यप्रकार :

आशयावरून पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती बदललीस तू अंतर्बाय! → [ ]
  2. आरशात पाहून डोळे भरून आले. → [ ]
  3. तू बोलत का नाहीस? → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. → [ ]
  2. तू रडू नकोस. → [ ]
  3. जर आत्मविश्वास असेल, तर जीवन समृद्ध होईल. → [ ]
  4. डोळ्यांतले आसू तळ्यात सोडून दे. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आशार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. तू रडू नकोस. (होकारार्थी करा.)
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घे, (विधानार्थी करा.)
  3. अंगणात दिवे लावावेत. (आज्ञार्थी करा.)
  4. शुभ्र कमळाची फुले आण. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. तू हसत राहा.
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घेतले पाहिजेत.
  3. अंगणात दिवे लाव.
  4. शुभ्र कमळाची फुले आणशील का?

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा व समास ओळखा :

सामासिक शब्द विग्रह समास
1. नवयौवना
2. ध्येयगंगा
3. पूर्वरंग
4. अस्तित्वहीन

उत्तर:

सामासिक शब्द विग्रह समास
1. नवयौवना नवीन अशी तरुणी कर्मधारय समास
2. ध्येयगंगा ध्येयाची गंगा विभक्ती तत्पुरुष समास
3. पूर्वरंग पूर्वीचा रंग विभक्ती तत्पुरुष समास
4. अस्तित्वहीन अस्तित्वाने हीन विभक्ती तत्पुरुष समास

प्रयोग :

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. → [ ]
  2. तळ्यात कमळे फुलली. → [ ]
  3. स्त्रीने आरसा पाहिला. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात.
2. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते.
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

आरशातली स्त्री Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्या वेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे.

संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अब्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले – ‘तूच तीच आहेस, जिला माझेच रूप लाभले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून-बाहेरून पूर्णत: बदलली आहेत. तू पूर्वीची ‘ती’ राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक. मी तुला सांगते तू कशी होतीस ते, तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते.

तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस, स्वप्नांचे पंख . लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आजमितीला, या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे.

आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासनू फूल तोडून घ्यावे, तसे तुझे ओठ म्लान, निपचित, पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुढत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवसरात्र तू आतल्याआत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे, अशी तू स्वत:ची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस.

तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहे. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवले आहे.

असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्त्व पाहून माझे काळीज वेदनेने आक्रंदते. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस, तनामनाला सहन न होणाऱ्या वेदना तु पदराने झाकतेस. नि बळेबळेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस.’

आरशातल्या स्त्रीचे (बाईच्या दुसऱ्या मनाचे) बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले. स्वत:च्या अस्तित्वाचे भान येऊ लागले; तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत, मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली – ‘अशी उन्मळून रडू नकोस. सावर स्वत:ला. ऊठ. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडू दे. दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीसत्वाने जग. जा त्या तळयात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम, ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड झुगारून टाक.’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

शब्दार्थ :

  1. ल्यालेली – अंगिकारलेली, घेतलेली.
  2. अंतर्बाहय – आतूनबाहेरून.
  3. अंतर – मन.
  4. पूर्वरंग – गतस्मृती.
  5. तरंग – लाटा.
  6. बहर – फुलोरा.
  7. नवयौवना – नवतरुणी.
  8. ध्येयगंधा – ध्येयाने प्रेरित व गंधित झालेली.
  9. नखशिखान्त – पावलांपासून डोक्याच्या केसापर्यंत.
  10. स्थितप्रज्ञा – स्थिर बुद्धीची.
  11. देह – अंग, शरीर.
  12. घनगर्द – घनदाट.
  13. अहोरात्र – रात्रंदिवस.
  14. पारंपरिकता – पूर्वीपासून आचरणात आलेली जीवनमूल्ये.
  15. वरदान – कृपा, आशीर्वाद
  16. प्रेयस – अतिशय प्रिय.
  17. भान – जाणीव.
  18. अल्लड – खेळकर.
  19. पेंगुळणे – झोपेची झापड असणे.
  20. अस्तित्वहीन – अस्तित्व नसलेली.
  21. पुतळी – स्थिर, शिल्प.
  22. हंबरणे – गहिवरणे.
  23. कंठ – गळा.
  24. हुंदका – रडण्याचा आवाज.
  25. असहय – सहन न होणाऱ्या (कळा).
  26. हिंदकळणे – पाणी हलणे.
  27. अधिकारवाणी – हक्काने बोलणे.
  28. खुळे – वेडे.
  29. आसू – अश्रू.
  30. शुभ्र – पांढरीस्वच्छ.
  31. प्रसन्न – टवटवीत.
  32. गोंजारणे – कुरवाळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. डोळे भरून येणे – गलबलून डोळयांत अश्रू येणे.
  2. मन उलगडणे – मनातील भावना मोकळ्या करणे.
  3. भान नसणे – जाणीव नसणे, गुंग होणे.
  4. काळीज हंबरणे – मन गलबलणे.
  5. फाटलेले हृदय शिवणे – विखुरलेल्या भावना एकत्र करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

12th Marathi Guide Chapter 10 दंतकथा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ………
उत्तर :
लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही; कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 2.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण ………
उत्तर :
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये, असे लेखकांना वाटते; कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 7

इ. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 9
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 11

2. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. [ ]
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. [ ]
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. [ ]
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. [ ]
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. [ ]
उत्तर :
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. दात
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. राक्षस
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. वनराज
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कमनशिबी
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. कुंदकळ्यांची

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
उत्तर :
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो – कर्तरी प्रयोग

प्रश्न 2.
सगळे खूष होतात-
उत्तर :
सगळे खूष होतात – कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
उत्तर :
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले – कर्मणी प्रयोग

प्रश्न 4.
डॉक्टरांनी लीलया दात उपटला-
उत्तर :
डॉक्टरांनी लीलया दात उपटला – कर्मणी प्रयोग

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 12
उत्तर :

सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
1. पंचमहाभूते पाच महाभुतांचा समूह द्विगू
2. परमेश्वर परम असा ईश्वर कर्मधारय
3. शब्दप्रयोग शब्दाचा प्रयोग विभक्ती तत्पुरुष
4. शेजारीपाजारी शेजारी, पाजारी वगैरे समाहार द्वंद्व
5. विजयोन्माद विजयाचा उन्माद विभक्ती तत्पुरुष

इ. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

प्रश्न 1.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
उत्तर :
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

ई. खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

प्रश्न 1.

  1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
  2. शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
  3. तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

उत्तर :

  1. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.
  2. शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.
  3. किती हाडं हैत तुझ्या अंगात!

4. स्वमत.

प्रश्न अ.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
उत्तर :
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.

मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.

डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.

दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, “एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो.” हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न आ.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.

दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.

दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल.

प्रश्न इ.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
उत्तर :
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.

प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.

माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत. आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

5. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर :
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी ‘दंतकथा’ हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.

वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे.

प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.

भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. ‘दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर’ अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

उपक्रम :

डोळे व नाक या अवयवांशी संबंधित वाक्प्रचारांची यादी करा.

तोंडी परीक्षा.

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. नक्षा उतरणे
  2. शंख करणे
  3. दात घशात घालणे
  4. खल करणे
  5. चारीमुंड्या चीत होणे
  6. सिंहाचा बकरा होणे
  7. मेख मारणे

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Additional Important Questions and Answers

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण –
लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण –
आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण –
परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण –
उत्तर :
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण माणसाला जन्मत:च सर्व अवयव फुटतात; पण फक्त दातच जन्मानंतर सहा-सात महिन्यांनी येतात.

लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार आढळत नाही.

आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण परशा स्वतःला लेखकांपेक्षा प्रचंड ताकदवान समजायचा आणि येताजाता लेखकांची मानहानी करायचा.

परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण परशाला दात घासायचा कंटाळा यायचा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 13
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 14

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा [ ]
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा [ ]
  3. परशाची सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी अवस्था करणारा [ ]

उत्तर :

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा – दगडाची
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा – शिव्ह (सिंह)
  3. लेखकांच्या मते, जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो – कमनशिबी

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण –
उत्तर :
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण त्यांचे सर्व दात दुखत असल्याचा त्यांना भास होत होता.

प्रश्न 2.
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण –
उत्तर :
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण हजर असलेले सगळेच जण इतके मोठमोठ्याने बोलत की लेखकांचे विव्हळणे ऐकूही येत नसे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण –
उत्तर :
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण लेखक कोणालाही दुखवू इच्छित नव्हते.

वैशिष्ट्ये लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 16

पुढील कोष्टक पूर्ण करा :

प्रश्न 1.

दिवसा सभ्य दिसणारा माणूस दुखरा दात
दिवसा
रात्री

उत्तर :

दिवसा सभ्य दिसणारा माणूस दुखरा दात
दिवसा सभ्यपणे वागतो. सभ्यपणे हळूहळू दुखत राहतो.
रात्री रात्री खरा (म्हणजे वाईट) वागतो. रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते [ ]
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे [ ]
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे [ ]

उत्तर :

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते – ब्रह्मांड
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे – चोर आणि दुखरा दात
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे – दाते व दातार

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयावरून वाक्याचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात हे एखादया सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत? → [ ]
  2. बापरे! दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चात्ताप! → [ ]
  3. मानवी देह पंचमहाभूतांचा बनला आहे. → [ ]

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य

क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात दुखणे सरळ असावे → [ ]
  2. जेव्हा माझा दात दुखायला लागला, तेव्हा माझी खात्री झाली. → [ ]
  3. सहाव्या महाभूताला ‘दात’ म्हणतात. → [ ]
  4. दाताचे दुखणे तू सहन कर. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. संकेतार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

अलंकार :
पुढील ओळीतील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजाताचे। → ………
2. होई जरी सतत दुष्टसंग
न पावती सज्जन सत्त्वभंग
असोनिया सर्प सदा शरीरी
झाला नसे चंदन तो विषारी → ………
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अर्थातरन्यास अलंकार.

दंतकथा Summary in Marathi

पाठ परिचय :

‘दंतकथा’ हा एक विनोदी लेख आहे. दातदुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर, गमतीदार नजरेने पाहतात. त्या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे हा लेख होय. हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडेही बोट दाखवले आहे.

दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव. या अनुभवाच्या वेदनामय भागाकडे लेखकांचे लक्ष नाही, त्यांचा रोख मानवी स्वभावातील विसंग:कडे आहे.

सुरुवातीला लेखक दातांचे महत्त्व सांगण्याचा पवित्रा घेतात. दात हा अवयव पंचमहाभूतासारखेच एक सहावे महाभूत आहे असे सांगतात, पंचमहाभूते म्हणजे विश्वरचनेची पाच मूलतत्त्वे होत. दात तसेच एक मूलतत्त्व असूनही लेखक त्याला महत्त्व देत नाहीत. मराठी भाषेतही दाताला महत्त्व नाही. कारण दाताविषयी मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, गालावरची खळी यात त्याचा जीव अडकतो. पण प्रेयसीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर आढळत नाही.

मात्र, दात त्रासदायक ठरू शकतो. शक्तिमान अशा परशा पहिलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरम केले. मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही, हे नवीन भान लेखकांना आले.

एके दिवशी लेखकांचा एक दात दुखू लागला. प्रचंड वेदना होऊ लागल्या, एखादा लाकूडतोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा, तसा लेखकांना अनुभव आला.

दातदुखीने लेखकांना हैराण केले. त्यांना रात्रभर विव्हळत राहावे लागले, पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरड करणे लेखकांच्या पत्नीला पसंत नव्हते.

दातदुखीच्या बातमीने लेखकांचे शेजारी एकएक करून सगळे तब्येतीच्या चौकशीसाठी जमले. दातदुखीबद्दल चर्चा झाली.’ प्रत्येकाने आपापला उपाय सुचवला. लेखकांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:चे उपाय करून पाहिले.

अखेरीस लेखकांनी दंतवैदयाकडून दुखरा दात काढून घेतला. त्या वेळी लेखकांची दातदुखीपासून मुक्तता झाली.

शब्दार्थ :

  1. मेख – खोच, रहस्य, गूढ गोष्ट.
  2. नकटे (नाक) – कापलेले, आखूड, चपटे, बसके (असे नाक).
  3. प्रेमविव्हल – प्रेमासाठी व्याकूळ झालेला.
  4. कुंदकळ्या – कुंदा नावाच्या फुलझाडाच्या कळया.
  5. (त्या. शुभ्र व सुंदर असतात. सुंदर दातांना त्यांची उपमा देतात.)
  6. विकट – भयानक, हिडीस, कुरूप.
  7. अल्याड – अलीकडे.
  8. ब्रह्मांड – अवकाशातील संपूर्ण विश्व.
  9. असार – निःसत्त्व, खोटे, निकामी.
  10. मिथ्या – खोटे, नश्वर, भ्रामक.
  11. लोकापवाद – अकारण पसरवलेले गैरसमज, आळ.
  12. आळी – गल्ली, गल्लीच्या आधाराने उभा राहिलेला घरांचा समूह.
  13. थैमान – रडण्या-ओरडण्याचा प्रचंड कल्लोळ, आदळआपट.
  14. मतैक्य – एकमत.
  15. खलदंत – दुष्ट दात.
  16. नतद्रष्ट – दुष्ट, वाईट (अत्यंत कंजूष.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. मेख मारणे – एखादया कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे.
  2. दाती तृण धरणे – शरण येणे.
  3. स्वत:चीच मनगटे चावणे – शत्रूविरुद्ध काहीही करता येत नसल्याने चडफडत बसणे.
  4. दातांत धरता येणे – सामान्य, क्षुल्लक, किरकोळ वस्तू बाळगणे.
  5. बोलणी खाणे – दोषारोप, निंदा, ठपका ऐकून घ्यावा लागणे.
  6. चारीमुंड्या चीत होणे – पुरता पराभव होणे.
  7. मागमूस नसणे – ठावठिकाणा न आवळणे, चिन्हहीन आढळणे.
  8. नक्षा उतरणे – ताठा, घमेंड, अभिमान उतरणे.
  9. साक्षात्कार होणे – ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडणे, (यावरून एखादया गोष्टीचे मर्म अचानक कळणे.)
  10. थैमान घालणे – आदळआपट, प्रचंड गोंधळ करणे.
  11. दात उपटून हातात देणे – घमेंड घालवणारा पराभव करणे.
  12. दात घशात घालणे – पुरता पराभव करणे.
  13. शक्तीचे प्रदर्शन करणे – शक्तिमान असल्याचा देखावा करणे.
  14. हसे करणे – हास्यास्पद करणे.
  15. दातओठ खाणे – मनात मोठा राग, त्वेष असणे.
  16. शंख करणे – बोंबाबोंब करणे, आरडाओरड करणे.
  17. खल करणे – (बहुतेकदा गुप्तपणे) चर्चा करणे.
  18. सिंहाचा बकरा होणे – सर्व अवसान गळून पडणे.