Big 5 Chya Sahavasat Question Answer Class 9 Marathi Chapter 15.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Question Answer Maharashtra Board

‘बिग 5’ च्या सहवासात Std 9 Marathi Chapter 15.1 Questions and Answers

1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
उत्तर:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

2. टिपा लिहा:

प्रश्न 1.
केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2.
‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1.
प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

‘बिग 5’ च्या सहवासात Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लेखकांनी आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची माहिती त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह मांडली आहे. तसेच केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयी अनोखा तपशील दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. जंगलांचा फेरफटका मारणे व त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे, हे ‘थ्रिल’ असते.

2. आफ्रिकेतील जंगलांचे स्वरूप दोन प्रकारचे आहे: (1) काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचे जंगल. (2) काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल. घनदाट झाडीपेक्षा झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणे सोपे असते. जंगलात फिरताना ‘चिकाटी’ व ‘नशीब’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

3. केनिया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ चार-पाच तासांचा ‘गेम ड्राइव्ह’ (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटडोर गाड्या व फोरव्हीलर्सची व्यवस्था असते. जंगलात फिरताना या मोटारीचे छप्पर उघडण्यात येते. त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. त्यामुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो; आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो व जनावरांच्या ठिकाणांच्या सूचना देता येतात.

4. वासोनैरो नदीच्या काठी वसलेले ‘सरोवा साभा लॉज’ची रचना आकर्षक आहे. जणू झाडांवर उभारलेली पंचतारांकित झोपडी. वासोनैरो नदीची वैशिष्ट्ये:

  1. तिच्यात जवळजवळ सहा फूट लांबीच्या अजस्र शेकडो मगरी आहेत.
  2. दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.
  3. आदिवासी मगरींच्या नजरा चुकवून धाडसाने नदी ओलांडतात.
  4. कधी कधी सुस्त पडलेली मगर चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते.

5. अंबरडट्स नॅशनल पार्क हे घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्क लॉजची वैशिष्ट्ये:

  1. संपूर्ण लाकडांच्या खोल्या व सभोवती पाण्याचे मोठे डबके.
  2. डबक्याजवळ प्रचंड दलदलीत खनिजयुक्त मीठ मिसळल्यामुळे जनावरे आकर्षित होतात व पाणी पिण्यासाठी येतात.
  3. लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरी असल्यामुळे तिथून जनावरांचे दर्शन होते व फोटो काढता येतात.
  4. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट.
  5. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो.
  6. दुर्मीळ जनावरे आली की प्रवाशांना उठवण्यासाठी बेलची व्यवस्था.

6. नकुरू तलाव व पार्क हा आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर आहे. नकुरू तलाव व पार्कची वैशिष्ट्ये:

  1. गुलाबी रंगाच्या दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचे वास्तव्य.
  2. दुर्बिणीतून फ्लेमिंगोंच्या हालचाली, तुरुतुरु पळणे, त्यांची परेड प्रेक्षणीय असते.
  3. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव खाऱ्या पाण्याचा आहे.
  4. फ्लेमिंगो मूळचे इथले. याच्या निळ्याशार पाण्यात फ्लेमिंगो अन्न शोधतात.
  5. पक्षिप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क मोठा खजिनाच आहे.
  6. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत.

7. ‘बिग 5’ म्हणजे आकाराने मोठे असलेले पाच प्राणी :

  1. सिंह
  2. लेपर्ड-चित्ता
  3. गेंडा
  4. हत्ती
  5. जंगली म्हैस.

या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते.

8.  नकुरू तलाव ते मसाईमारा हा प्रवास लेखकांनी मोटारीने केला; कारण गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक होती. सरिना लॉजमध्ये जायच्या आधी लेखक व त्यांच्या साथीदारांना वनराज सिंह व त्याचे कुटुंब यांचे दर्शन घडले.

9. सिंहाची वैशिष्ट्ये:

  1. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात.
  2. सिंहीण अडचणीत असली, तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो.
  3. सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो. पण त्याचा स्टॅमिना खूप कमी. म्हणून 200 मीच्या टप्प्यात असलेलेच सावज पकडतो.
  4. सुमारे 30 जणांचे कुटुंब असते.
  5. सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते.
  6. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. तरस त्याची पिल्ले पळवतात.
  7. नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही; कारण तरस त्यांना खातात.
  8. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे.

10. लेपर्डची वैशिष्ट्ये:

  1. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. मारलेले जनावर तो ओढत झाडावर चढवू शकतो.
  2. लेपर्डची शेपटी लांब असते. टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.
  3. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो.
  4. त्याची दृष्टी व श्रवणयंत्रे खूप तीक्ष्ण असतात.
  5. त्याचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
  6. लेपर्डच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.

11. चित्ता व त्याची वैशिष्ट्ये:

  1. जगातील सर्वांत चपळ प्राणी. ताशी 100 किमी वेगाने पळतो.
  2. त्याचे शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व पाय लांब असतात.
  3. शिकार करायची पद्धत वेगळी आहे. सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला चढवतो नि गुदमरून टाकून त्याला मारतो.
  4. शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो; कारण तरस आयती मिळालेली शिकार खाऊन टाकतात.

12. केनियाची अर्थव्यवस्था प्रमुख चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे:

  1. पर्यटन
  2. कॉफी
  3. चहा
  4. फुले (गुलाब). यात पर्यटन महत्त्वाचे आहे.

केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची भूमिका: पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना पाळावयाचे नियम:

  1. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदीच दुर्मीळ प्राणी दिसला, तर झुडपात शिरावे; पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.
  2. जनावरांच्या जवळ बोलू नये; टाळ्या वाजवू नयेत, खायला घालू नये.
  3. ‘बिग 5’च्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये.
  4. जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये.
  5. नियम मोडणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार सरकारने रेंजर्सना दिले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani Jaisa Vruksha Nene Question Answer Class 9 Marathi Chapter 2.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Question Answer Maharashtra Board

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Std 9 Marathi Chapter 2.1 Questions and Answers

1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 1

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

2. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 2

3. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:

प्रश्न 1.
पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष
2. सुख
3. सम

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

प्रश्न (आ)
‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.

उपक्रम:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे….’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

भाषा सौंदर्य:

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा बाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार.

अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, आता उपमेय आणि उपमानातील साधावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया.

1. रूपक अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखा :
1. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 3
2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5

2. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये-

1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य.
2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे.
3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इ. साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर.

उपमेय व उपमान (कमल व नयन) यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे ‘रूपक’ अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत (उपमा) किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे (उत्प्रेक्षा) असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

3. जेव्हा वाक्यांत उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक’ अलंकार होतो.

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
उपमेय – [ ]
उपमान – [ ]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.

वृक्ष संत
मान-अपमान जाणत नाहीत. निंदा-स्तुती समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5.1

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. सज्जनांची भेट होणे म्हणजे ……..”ची गाठ पडणे होय. (भक्ती-मुक्ती/जिवा-शिवा/सुख-दु:ख/निंदा-स्तुती)
2. कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला ——— नका असे म्हणत नाहीत. (मोडू/सोडू/तोडू/छेडू)
उत्तर:
1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
2. सज्जनांची भेट होणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे होय.
कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला तोडू नका असे म्हणत नाहीत.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 6
उत्तर:
[पूर्ण धैर्यवंत] [संत]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कृती 4 : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.

लक्षात ठेवा:

1. इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (आ) हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न 2 (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 7

2. वरील 8 कृतींपैकी कृतिपत्रिकेत 1-1 गुणाच्या पहिल्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती विचारली जाईल.
उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

3. ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा:

1. कवींचे/कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.
2. कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
3. कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.

महत्त्वाची नोंद: परीक्षेत आठपैकी कोणत्याही 3 कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृतींचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व 8 कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत. आशयावर आधारलेल्या प्रत्येकी 2 गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विदयार्थी स्वत:च्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिह शकतात.

उत्तर: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
  2. कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
  3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)
  4. वृक्ष = झाड
  5. चित्त = मन
  6. निंदा = नालस्ती
  7. सम = समान
  8. धैर्य = धीर
  9. जीव = प्राण.

4. कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

रसग्रहण:

इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

1. पठित पदयांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
2. काव्यसौंदर्य: यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
3. भाषिक वैशिष्ट्ये: यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: ‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:
नोंद : सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. निंदा करणे
2. स्तुती करणे.
उत्तर:
1. निंदा करणे – अर्थ : नालस्ती करणे.
वाक्य: कुणीही कुणाची कधीही निंदा करू नये.
2. स्तुती करणे – अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य: गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मोहितची सरांनी वर्गात स्तुती केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

  1. वृक्ष
  2. सुख
  3. सम.

उत्तर:

  1. वृक्ष = झाड, तरू
  2. सुख = आनंद, समाधान
  3. सम = समान, सारखेपणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मान
  2. निंदा
  3. सुख
  4. पूर्ण.

उत्तर:

  1. मान × अपमान
  2. निंदा × स्तुती
  3. सुख × दुःख
  4. पूर्ण × अपूर्ण.

प्रश्न 3.
पुढे दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा:
नोंद: सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद (रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे)
उत्तर:

  1. रेखणे – रेखीव – रेखीव आकृती
  2. कोरणे – कोरीव – कोरीव काम
  3. ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्ट
  4. घोटणे – घोटीव – घोटीव शिल्प
  5. राखणे – राखीव – राखीव जागा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. सतजन, सज्जन, सजन्न, साज्जन.
2. स्तुती, स्तूती, स्तुति, स्तूति.
उत्तर:
1. सज्जन
2. स्तुती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

उपक्रम:

प्रश्न 1.
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Summary in Marathi

कवितेचा आशय:

या अभंगात संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ:

  1. जैसा – जसा.
  2. वृक्ष – झाड.
  3. नेणे – जाणत नाही.
  4. मान – सन्मान, गौरव.
  5. अपमान – अवमान.
  6. तैसे – तसे.
  7. सज्जन – संत.
  8. वर्तताती – वागतात, वर्तन करतात.
  9. चित्ती – मनात.
  10. तया – त्यांना.
  11. अथवा – किंवा. छेदू
  12. नका – तोडू नका.
  13. निंदा – नालस्ती, अपमानकारक बोलणे.
  14. स्तुती – प्रशंसा.
  15. सम – समान, सारखे.
  16. धैर्यवंत – हिंमतवान, गंभीर, निश्चल.
  17. भेटी – गाठभेट.
  18. जीव – प्राण.
  19. शिव – परब्रह्म, परतत्त्व.
  20. गांठी – एकत्र येणे.
  21. जाय – होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात – ज्याप्रमाणे वृक्षाला (झाडाला) मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत; त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे (सज्जनांचे) वर्तन असते. ।।1।।

कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली, तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. ।।2।।
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना ‘तोडू नका’ असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।3।।

तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।4।।

संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।5।।

9th Std Marathi Questions And Answers:

Olympic Vartulancha Gof Question Answer Class 9 Marathi Chapter 17 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Question Answer Maharashtra Board

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Std 9 Marathi Chapter 17 Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न (आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 4

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
पहिले ऑलिंपिक व्हिलेज ……….. येथे वसले.
(अ) ग्रीस
(आ) मेलबोर्न
(इ) फ्रान्स
(ई) अमेरिका
उत्तर:
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
पहिले ऑलिंपिक सामने ……… साली झाले.
(अ) 1894
(आ) 1956
(इ) इ. स. पूर्व 776
(ई) इ. स. पूर्व 394
उत्तर:
पहिले ऑलिंपिक सामने इ. स. पूर्व 776 साली झाले.

3. पुढील वाक्य वाचा. त्यातील शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला पुढील मुद्दे लागू नसतील, तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ या शब्दासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.

प्रश्न 1.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 5.1

4. स्वमत:

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

उपक्रम:

प्रश्न 1.
सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून पुढील तक्त्यात लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 6

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

ब्रीदवाक्यातील शब्द अर्थ
1. सिटियस 1. ………………….
2. …………………….. 2. ………………….
3. …………………….. 3. तेजस्विता

उत्तर:

ब्रीदवाक्यातील शब्द अर्थ
1. सिटियस 1. गतिमानता
2. ऑल्टियस 2. उच्चता
3. फॉर्टियस 3. तेजस्विता

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
ऑलिंपिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग:

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. काळा.

उत्तर:

  1. लाल
  2. पिवळा
  3. निळा
  4. हिरवा
  5. काळा.

प्रश्न 2.
विधाने पूर्ण करा:
ऑलिंपिक ध्वजावरील पाच वर्तुळे म्हणजे जगातील

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. युरोप हे पाच खंड.

उत्तर:

  1. आफ्रिका
  2. अमेरिका
  3. आशिया
  4. ऑस्ट्रेलिया

प्रश्न 3.
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे
उत्तर:
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिकच्या खेळांचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा.
उत्तर:
माणूस हा मुळात प्राणीच आहे. त्याच्या मनात हिंसा ठासून भरलेली आहे. या ना त्या कारणाने मनातली हिंसा स्फोटासारखी बाहेर पडते आणि माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. आदिमानवाच्या काळापासून हे चालू आहे. परका एखादा माणूस दुसऱ्या माणसाला दिसला, तरी ते एकमेकाला ठार मारायला धावत. आतासुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढाया करतात हे थांबावे, आपापसात प्रेम वाढावे, जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिंपिकसारखे खेळ भरवले जातात. या खेळांमुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते. दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान मिळते. जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते, ऑलिंपिक खेळांचा हा फार मोठा फायदा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 8

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
……………. या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.
(अ) इ. स. पू. 1936
(आ) इ. स. पू. 18965
(इ) इ. स. पू. 394
(ई) इ. स. पू. 776
उत्तर:
(३) इ. स. पू. 394 या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 10

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 12

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
सूचनेनुसार कृती करा:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती लिहा.

  1. …………………………….
  2. ……………………………
  3. ……………………………

उत्तर:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती:

  1. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येई.
  2. अनेक शहरे भेदभाव विसरून यशस्वी खेळाडूंचे प्रचंड स्वागत करीत असत.
  3. राष्ट्रीय सणांच्या वेळी या खेळाडूंना मानाचे स्थान देण्यात येई.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिक स्पर्धांचा तुम्हांला जाणवणारा महत्त्वाचा गुण सांगा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर:
विराटता हा ऑलिंपिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे, असे मला वाटते. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व देश यात सहभागी होतात. त्यामुळे ऑलिंपिकच्या स्पर्धा संपूर्ण जगाला व्यापून टाकतात. या स्पर्धांचे आयोजनही विराट असते. एक विशाल ऑलिंपिक गाव वसवले जाते. खेळांसाठी एक विशाल मैदान केले जाते. त्याभोवती एक प्रचंड प्रेक्षागार उभारले जाते. रहदारीसाठी खास सडका, लोहमार्ग बांधले जातात.

खेळाडूंसाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे उभारली जातात. त्याच्या जोडीने विशाल उपाहारगृहे बांधली जातात. संपूर्ण जगातून आलेले पाच-सहा हजार खेळाडू सहभागी होतात. लाखभर प्रेक्षक मैदानातील खेळ प्रत्यक्ष पाहतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप तिथे अवतरते. या विराटतेमुळे आपण कोणा एका देशाचे, धर्माचे राहत नाही. सर्व मानवजात एक बनते. संकुचितपणा कमी होतो. वैर नाहीसे होते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे कार्य ऑलिंपिक स्पर्धा करतात. हे ऑलिंपिक स्पर्धांचे सर्वांत मोठे कार्य आहे.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. आधुनिक ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा.
2. 1936 सालच्या ऑलिंपिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला.
उत्तर:
1. कुबर टीन
2. फ्रान्समध्ये

प्रश्न 2.
कुठे ते लिहा:
1. 1894 साली ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली.
2. 1936 साली ऑलिंपिक स्पर्धा भरल्या.
उत्तर:
1. जेसी ओवेन्स.
2. बर्लिनमध्ये.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. 1894 सालच्या ऑलिंपिक काँग्रेसमध्ये प्राचीन ऑलिंपिक सामन्यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
2. क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते.
उत्तर:
1. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि विविध देशांतील मैत्री वाढवण्यासाठी.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही म्हणून.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोणी ते लिहा:
1. ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवली.
2. अनवाणी पायाने मॅरेथॉन शर्यत जिंकली.
उत्तर:
1. एमिल झेटोपेक याने.
2. अबेबे बिकिला याने.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडणारी.
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू.
उत्तर:
1. फॅनी बँकर्स
2. ध्यानचंद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 14

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 15
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 16

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
खेळामुळे एकात्मतेचा संदेश देणारा तुमच्या आठवणीतील प्रसंग लिहा.
उत्तर:
सचिन तेंडुलकर हा माझा अत्यंत लाडका क्रिकेट खेळाडू अवस्था झाली होती. पाकिस्तानातील क्रीडारसिकही तन्मयतेने त्याचे आहे. माझा एकट्याचाच नव्हे, तर तो सर्वांचाच, सर्व क्रीडारसिकांचा भाषण ऐकत होते. ही खरी एकात्मता. ती सचिन या अलौकिक . लाडका खेळाडू आहे. त्याला भारतरत्न देण्याची सूचना जेव्हा पुढे का खळाडू आह. त्याला भारतरत्न चाचा सूचना जहा पुन , खेळाड़मळे निर्माण झाली होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:

सामासिक शब्द समास
1. त्रिभुवन द्विगू
2. छोटेमोठे वैकल्पिक द्ववंद्ववं
3. गंधफुले समाहार द्ववंद्ववं
4. गुणिजन कर्मधारय
5. अहिनकुल इतरेतर द्ववंद्ववं

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
तक्ता भरा: (सामाजिक, राष्ट्रीय, अनंत, विशेष)
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
अनंत सामाजिक
विशेष राष्ट्रीय

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:

  1. पर्वणी असणे
  2. हास होणे
  3. ख्याती मिळवणे
  4. प्रशंसा करणे.

उत्तर:
1. पर्वणी असणे- अर्थ: आनंदसोहळा असणे.
वाक्य: ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणी असते.

2. -हास होणे- अर्थ : नाश होणे.
वाक्य : पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

3. ख्याती मिळवणे- अर्थ : प्रसिद्धी मिळवणे.
वाक्य : ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली.

4. प्रशंसा करणे- अर्थ : स्तुती करणे.
वाक्य: ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रतिशब्द लिहा:

  1. ध्वज
  2. धवल
  3. श्रम
  4. देश.

उत्तर:

  1. ध्वज = झेंडा
  2. धवल = पांढरे
  3. श्रम = कष्ट
  4. देश = राष्ट्र.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. वर्तुळ
  2. गोफ
  3. क्रीडा
  4. खेळ.

उत्तर:

  1. नपुंसकलिंग
  2. पुल्लिग
  3. स्त्रीलिंग
  4. पुल्लिग.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील शब्द शुद्ध करून लिहा:

  1. वसतीगृहे
  2. तेजस्वीता
  3. अंतरराष्ट्रिय
  4. बलंसर्वधन
  5. ईतीहास
  6. वीश्वबंधूत्त्व

उत्तर:

  1. वसतिगृहे
  2. तेजस्विता
  3. आंतरराष्ट्रीय
  4. बलसंवर्धन
  5. इतिहास
  6. विश्वबंधुत्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1.  साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला केवढे कौतुक केले

2. रहदारीसाठी अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती वसतिगृहे बांधली.
उत्तर:
1. साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले!
2. रहदारीसाठी अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती, वसतिगृहे बांधली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
1. Government Letter
2. Medical Examination.
उत्तर:
1. शासकीय पत्र
2. वैदयकीय तपासणी.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Summary in Marathi

प्रस्तावना:

बाळ ज. पंडित हे ख्यातनाम क्रीडासमालोचक होते. विशेष म्हणजे ते मैदानावरही क्रिकेट प्रत्यक्ष खेळले होते. रणजी चषक सामन्यांत त्यांचा सहभाग होता. त्यांना महाराष्ट्र संघातही स्थान मिळाले होते. मात्र, समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले. खेळ व खेळाडूंवर त्यांनी भरपूर लेखन केले. साध्यासोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष होता.

प्रस्तुत पाठात लेखकांनी ऑलिंपिकचे स्वरूप मोजक्या शब्दांत कथन केले आहे. ऑलिंपिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिंपिकचे महत्त्व, ऑलिंपिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती त्यांनी प्रस्तुत पाठात दिली आहे. ऑलिंपिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

शब्दार्थ:

  1. अनन्यसाधारण – एकमेव, त्याच्यासारखे तेच.
  2. ब्रीदवाक्य – घोषवाक्य.
  3. शिकस्त – प्रयत्न.
  4. बलसंवर्धन – सामर्थ्याची जोपासना.
  5. बसवण्याची – स्थापन करण्याची, निर्माण करण्याची.
  6. पुनरुज्जीवन – नूतनीकरण, जीर्णोद्धार, मृतवत असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे.
  7. अनवाणी – पायात चपला वगैरे काहीही न घालता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. पुनरुज्जीवन करणे – बंद पडलेली, स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे.
2. ज्योत तेवत ठेवणे – चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Hasyachitratli Mula Question Answer Class 9 Marathi Chapter 5.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Question Answer Maharashtra Board

हास्यचित्रांतली मुलं Std 9 Marathi Chapter 5.1 Questions and Answers

1. खालील फरक लिहा:

प्रश्न 1.
खालील फरक लिहा:

व्यंगचित्र हास्यचित्र

उत्तर:

व्यंगचित्र हास्यचित्र
हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो. केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:

  1. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
  2. केवळ हसवणे हा हेतू नसतो.
  3. आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
  4. गमतीदार विचार मांडलेला असतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे.

या चित्रांतून-(1) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते; ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे व (2) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांची रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत.

भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सर्जनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मलाही वाटते.

उपक्रम:

प्रश्न 1.
5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.

प्रश्न 2.
खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा. सांगा:

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर… कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:
1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.

2. योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे; पाण्याचा गैरवापर करणे ; पाणी प्रदूषित करणे; उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली.

3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.

4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:

  1. पाण्याची बचत करणे.
  2. पाण्याचा गैरवापर टाळणे.
  3. पाण्याचा योग्य साठा करणे.
  4. जलप्रदूषण टाळणे.
  5. पाणी वाया न दवडणे.
  6. पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
  7. पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.

5. घोषवाक्ये:

  1. पाण्याचा गैरवापर करू नका
  2. जलप्रदूषण थांबवा
  3. पाणी साठवा, पाणी वाचवा
  4. पाणी वाया दवडू नका
  5. पाणी आहे, तर जीवन आहे पाणी नाही, तर मरण आहे
  6. पाण्याची बचत म्हणजे
  7. जीवनाची बचत
  8. जल-अभियान सुरू करा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

भाषाभ्यास:

1. चेतनगुणोक्ती अलंकार:

1. खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., “नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
…. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।” (कृ. ब. निकुम्ब)

1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या ? [ ] [ ]
2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? [ ] [ ]
3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? [ ] [ ]

चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये –

1. अचेतन वस्तूंना सचेतन मानले जाते.
2. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.

2. अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.

3. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट – [ ]
2. अचेतन गोष्टीने केलेली कृती – [ ]
3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? – [ ]

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लहान मुलांसाठी/मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे दिली आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र यांत फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो.
2. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद , करणे सोपे असते पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे.

काही हास्यचित्रांचे विश्लेषण:

1. शि. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे.

2. पहिल्या चित्रात उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. दुसऱ्या चित्रात एक बालक देवाला ‘बॅडमिंटनचे शटल’ (फूल) वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सदयः परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केले आहे. चित्र व हास्यचित्र यांत मूलभूत फरक – चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार है हुबेहूब नक्कल असते.

3. डेव्हिड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही दोन हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा ‘लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा’ फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव – बिचकणे, घाबरणे, कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शिताफी – हे सर्व पाहून हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा अहे. काहीतरी मिळावे म्हणून एरव्ही लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली ‘सेफ्टी पिन’ टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते.

4. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसवून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव, यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते.

5. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू, ‘नदीचे पाणी कुठे जाते?’ असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे. ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात ‘नदीत चावी पडली, म्हणून विचारतोय.’ या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे.

6. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते – हा विचार किती खुबीने सांगितला आहे!

7. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला देह (शरीर) हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे सिद्ध होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

अशा प्रकारे, लहान मुलांचे चित्र काढताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात:

  1. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते.
  2. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात.
  3. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात.
  4. लहान मुलांना दाढी-मिशी नसते.
  5. व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.

9th Std Marathi Questions And Answers:

Dupar Question Answer Class 9 Marathi Chapter 7 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 7 दुपार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 7 दुपार Question Answer Maharashtra Board

 दुपार Std 9 Marathi Chapter 7 Questions and Answers

1. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 1
उत्तर:

कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
1. कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. कार्यालयात खुर्चीत बसून काम  करतात.
2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात. सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात.
3. शारीरिक कष्ट अमाप. शारीरिक कष्ट कमी.
4. साधने कष्टाची असतात. संगणकासारखे आधुनिक उपकरण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

2. कोण ते लिहा:

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
(आ) दुपारला आनंद देणारा घटक – [ ]
(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी – [ ]
(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक – [ ]
(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार – [ ]
(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ – [ ]
उत्तर:
(अ) शेतकरी
(आ) मधल्या सुट्टीत खेळणारी मुले.
(इ) कार्यालयांतील लेखनिक व हिशोबतपासनीस.
(ई) दुपार
(उ) तारुण्य.
(ऊ) दुपार

3. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 3

4. डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.

प्रश्न 1.
डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.
उत्तर:
हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
स्पष्टीकरण: खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूंवर) मानवी भावनांचे आरोपण केले अहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

5. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:
उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती

  1. रस्ता – बाट, मार्ग, पादचारी, पथ
  2. पर्वत – नग, गिरी, शैल, डोगर
  3. ज्ञानी – मुश, सुकर, डोळस, जाणकार
  4. डौल – जोम, ऐट, दिमाख, स्वाब
  5. काळजी – चिंता, स्याबदारी, विवंचना, फिकीर.

उत्तर:

  1. पादचारी
  2. नग
  3. सुकर
  4. जोम
  5. जबाबदारी

6. स्वमत

प्रश्न (अ)
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
उत्तर:
आठवीनंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यांत आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठाच आधार असतो. क्वचित केव्हातरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले.

क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी! पिझ्झा पार्टी, आइस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हांला खूप आवडते. त्या वेळी आम्ही आमचे राजे असतो. त्या वेळी “पुरे झाले, आता चला घरी,’ असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन-तीन वेळा तरी मे महिना यायला हवा!

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न (आ)
‘दुपार’ या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
‘दुपार’ या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला तो. तो वाचताक्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झर्रकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिटसुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डबा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. सातवीपर्यंत मी शाळेत डबा नेत असे. आठवी-नववीत मात्र डबा बंद केला. शाळेच्या कँटीनमधला वडापाव आम्हां सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय.

तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनीसुद्धा हसतहसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता! या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दांत लिहिला आहे. पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दांत उभी राहते. म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे.

7. अभिव्यक्ती

प्रश्न (अ)
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवालेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

प्रश्न (आ)
पाठात आलेल्या ‘दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

भाषाभ्यास:

रसविचार

मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव समतेवर अवलंबून असते. ही अनुभवक्षमता शालेय वयापासून वृदपिंगत व्हावी, या दृष्टीने ‘रसास्वाद’ ही संकल्पना आपण समजून घेऊया. मानवाच्या अंत:करणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना ‘स्थाविभाव’ असे म्हणतात. उदा., राग, दुःख, आनंद इ. कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यांतून रसनिपती होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 4
साहित्यामध्ये गय-पदय घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गदा-पदय घटकांतून चपखलपणे व्यक्त होणारा आशय, दोन ओळींमधील गर्भितार्थ, रूपकात्मक भाषा, पदय घटकांतील अलंकार, सूचकता, प्रसाद, मापुर्व हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात शाली, की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषासमूदधीसाठी ‘रसास्वाद’ या घटकाकडे आवर्जून लश देऊया.

मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. मनातल्या दुःखाचा निचरा, विरेचन होऊन (कथार्सिसच्या सिद्धांतानुसार) कारण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो. आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दाखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदात्तीकरण होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा या पलिकडे जाऊन व्यक्तींच्या व समाजाच्या भावनांचा आदर कण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्तीव्यक्तींमधील भावसंबंधाचे दृढीकरण होते.

कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाफूती दिलगे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टणे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाष, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे याविषयी दोन ओळींमधील दडलेला मथितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णाशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठयपुस्तकातील प्रत्येक पात्र, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 7 दुपार Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 6

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा:
1. सूर्याची धमकी – [ ]
2. सूर्याचे प्रखर तेज – [ ]
उत्तर:
1. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस, तर डोळे जाकून टाकीन.
2. सर्व पृथ्वीला टिपवून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी – [ ]
उत्तर:
1. शेतकऱ्याची पत्नी

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य ही सूर्याची वेगवेगळी रूपे आहेत. या वेगवेगळ्या रूपांमुळेच सकाळ व दुपार या कालावधींना वेगवेगळी नावे मिळाली आहेत. सकाळ प्रसन्न असते. तिच्यात उल्हास ठासून भरलेला असतो; तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते. डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमतही होणार नाही. अशी ही तप्त, रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते. सकाळपासून केलेल्या कष्टाचा शीण घालवण्यासाठी तो वडा-पिंपळाच्या झाडाखाली विसावतो. पत्नीने आणलेला भाकरतुकडा तो समाधानाने खातो. त्याची पत्नी त्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहते. या दृश्याने दुपारला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकामी जागा भरा:
कष्टकऱ्यांच्या दुपारचे वर्णन: ………………………………………
उत्तर:
खेडोपाडी गावे सुस्तावतात. घरकाम सांभाळणाऱ्या स्त्रिया घरकामे आटपून घटकाभरासाठी डोळे मिटून विसावतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
पक्ष्यांची विश्रांती:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: …………………………………….
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: ……………………..
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: ……………………………………..
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: ………………………………………..

उत्तर:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: किलबिलाट थांबवून सावलीत छानशी डुलकी घेत विश्रांती घेतात.
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेतात.
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: कुठे कुठे विश्रांती घेण्याच्या प्रयत्नात असतात.
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: गुटगू थांबवून कुठे तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 8

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 10

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा:
…………………….. हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.
उत्तर:
पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी सर्वांना काही क्षण विश्रांती मिळावी, हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा.
उत्तर:
आमच्याकडे दुपार तशी शांत शांतच असते. मी शाळेतून येतो. बाबा शेतावरून येतात. हातपाय धुवून जेवायला बसतात. आम्ही सगळेच जण एकत्र जेवायला बसतो. जेवल्यानंतर बऱ्याच वेळा बाबा शेतीतल्या कामांसंबंधी बोलतात. बोलता बोलता आईबाबा काही निर्णय घेतात. आई स्वयंपाकघराची आवराआवर करते. आम्हीपण कधी कधी तिला मदत करतो. बाबा अंगणातल्या बाकड्यावर पहडतात. क्षणातच झोपी जातात. आई चटई पसरून पहुडते. आमचा कुत्रा बाबांच्या बाकड्याखाली मुटकुळे करून पहुडतो. तो झोपण्यासाठी डोळे मिटतो खरा, पण प्रत्यक्षात जागाच असतो.

मधून केव्हातरी चटकन कान टवकारून पाहतो आणि पुन्हा शांत होतो. आवारातल्या आम्हा मुलांची मात्र त्या वेळी मजा होते. सगळे विश्रांती घेत असतात, म्हणून टीव्ही बंद ठेवावा लागतो. आम्ही मित्रमंडळी घराच्या मागच्या बाजूला पडवीत जमतो. कधी पत्त्यांचा खेळ, कधी गोट्यांचा खेळ रंगतो. हे सर्व अर्थातच शांतपणे. पण केव्हातरी आवाज वाढतो. मग मोठी माणसे कुठून तरी ओरडून दम देतात. मग सगळे शांत. केव्हातरी मी नववीत असल्याची आठवण कोणीतरी करून देतोच. मग थोडा वेळ पुस्तक घेऊन बसावे लागते. अशी ही मजेची दुपार असते.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन.
2. सायकलरिक्षावाल्याची दुपार.
3. कारखान्यातील कामगारांची दुपार.
उत्तर:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन: हातगाडीवाला म्हणजे हातगाडीवरून लोकांचे सामान वाहून नेणारा हमाल. यात अमाप कष्ट असतात. दुपारपर्यंत बऱ्यापैकी कमाई झाली. उरलेल्या अवधीत चांगली कमाई होईल का, अशी चिंता करीत तो विश्रांती घेण्याच्या बेतात असतो. तेवढ्यात त्याला वर्दी मिळते. विश्रांतीची गरज असतानाही तो आळस झटकून गाडी ओढायला सिद्ध होतो.

2. सायकलरिक्षावाल्याची दुपार: सायकलरिक्षा तळपत्या उन्हात चालवून चालवून रिक्षावाला एखादी डुलकी घेण्याच्या विचारात असतो. पण तेवढ्यात त्याला लांबची वर्दी मिळते. म्हणजे जास्त पैसे मिळणार. म्हणून दमलेल्या शरीराची पर्वा न करता तो सायकलरिक्षा दामटतो. या रिक्षावाल्याची दुपार ही अशी असते.

3. कारखान्यातील कामगारांची दुपार: कारखान्यात पहिल्या पाळीचे कामगार कामावर हजर होण्यासाठी पहाटेच उठतात. दिवसभर यंत्राशी झगडत काम करतात. त्यामुळे दुपारी विश्रांतीची गरज असते. कामावरून सुटल्यावर डोळ्यांवरील झापड दूर सारत सारत धडपडत घरी पोहोचतात. त्याच वेळी त्यांचे दुसरे सहकारी विश्रांती हवी असताना कामावर हजर होण्यासाठी येतात. हे सुद्धा पोटासाठीच धावतपळत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
उत्तर:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [कष्टकरी]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते.
2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते.
3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते.
उत्तर:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते : हातगाडीवाला हा काबाडकष्ट करणारा असतो. त्याच्या कामाला काळवेळेची मर्यादा नसते. किती वजन ओढायचे यालाही मर्यादा नसते. पैसे बहुधा त्या मानाने कमीच मिळतात. त्यामुळे दुपारची विश्रांती पुरेशी झालेली नसतानाही तो कष्ट करायला सिद्ध होतो. जीवन चालू ठेवायला सिद्ध होतो. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते: सायकलरिक्षा जिथे आजही चालू आहे, तो परिसर प्रचंड उकाड्याचा आहे. तळपत्या उन्हात सायकलरिक्षा चालवणे हे कोणालाही थकवणारे असते. त्याला दुपारी विश्रांतीची नितांत गरज असते. तरीही वर्दी मिळताच पोटाची खळगी भरण्याकरिता तो भर दुपारी सायकल मारत निघतो. त्याची ही जीवनावरची निष्ठाच असते. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते: कारखान्यातील काम तीन पाळ्यांमध्ये चालते. सकाळीच कामावर हजर झालेला कामगार दुपारी घराकडे निघतो. त्याच्या डोळ्यांवर झोपेची झापड असते. विश्रांतीसाठी तो अधीर झालेला असतो. त्याच्यानंतर दुसरे कामगार येतात. त्यांनाही खरे तर दुपारची विश्रांती हवी असते. पण सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून दुपारला त्यांचे कौतुक वाटते.

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले कष्टकऱ्यांचे मोठेपण सांगा.
उत्तर:
हातगाडीवाले व सायकलरिक्षावाले हे कष्टकरी आहेत. किती ओझे वाहून न्यावे लागेल, किती अंतर जावे लागेल व त्यासाठी किती कष्ट पडतील, हे त्यांना ठाऊक नसते. पैसे बहुतेक वेळा कमीच मिळतात. तरी ते विश्रांतीची पर्वा करीत नाहीत. पोटाची खळगी भरण्याकरिता धावत असतात. एक प्रकारे ते जीवनचक्र चालू ठेवण्यासाठीच धडपडत असतात.

हेच कारखान्यातील कामगारांबाबतही घडते. त्यांचेही काम कष्टाचेच असते. मात्र या कामगारांच्या वेळा ठरलेल्या असतात. तरीही वेळा पाळण्यासाठी स्वत:च्या आरामाचा, स्वास्थ्याचा त्याग करतात. ही त्यांची स्वत:च्या कामावरची निष्ठा असते. कष्टकऱ्यांच्या त कामगारांच्या निष्ठेमुळेच हे जीवनाचे चक्र चालू असते. माझ्या मते, समाजाने त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड
2. पटापट डबा खातात व हात धुतात.

उत्तर:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड उल्हास
2. पटापट डबा खातात व हात धुतात. खेळाची ओढ

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. ……………………………………………………………………..
2. ……………………………………………………………………..
3. ……………………………………………………………………..

उत्तर:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. आरडाओरड करीत वर्गातून धूम ठोकतात.
2. पटापट डबा खाऊन हात धुतात.
3. राहिलेल्या थोड्या वेळात खेळ व मस्ती करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. समोर काम येऊ नये, असे वाटते ती वेळ:
उत्तर:
1. दुपार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
का ते लिहा:

  1. शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशोबतपासनिसांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते.
  2. समोर नवीन काम येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.
  3. जिवाभावाच्या गप्पा मारतात.
  4. एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात.

उत्तर:

  1. भूक लागलेली असते व डबा खायचा असतो म्हणून.
  2. निवांतपणे जेवता यावे म्हणून.
  3. ताजेतवाने होण्यासाठी.
  4. एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून आणि विविध चवींचा आस्वाद मिळावा म्हणून.

उतारा क्र. 4

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 12

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 14

प्रश्न 2.
गाळलेल्या जागा भरा:
वृद्ध माणसांचे चिंतन:
1. ………………………..
2. ……………………….
उत्तर:
1. आतापर्यंतच्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, याचा विचार करतात.
2. स्वत:च्या भविष्याची चिंता करीत बसतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हाला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
उत्तर:
निसर्गात ऋतूंचे चक्र असते, पाण्याचे चक्र असते. प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड वायू यांची चक्रे असतात. तसेच मानवी जीवनाचेही चक्र दिसून येते. बालपण व विदयार्थिदशा ही पहिली अवस्था आहे. तारुण्याची दुसरी अवस्था आणि वृद्धत्वाची तिसरी अवस्था असते. या अवस्था एकेका पिढीनुसार बदलत राहतात. आता बाल्यावस्थेत असलेली मुले पुढच्या पिढीत तरुण बनतात. त्याच व्यक्ती नंतरच्या पिढीत वृद्ध होतात. यांतील मधली पिढी ही तारुण्याची होय. या पिढीतील माणसे कर्ती-धर्ती असतात.

त्यांच्या कर्तबगारीवरच कुटुंबाचा व समाजाचाही गाडा चालू असतो. या टप्प्यात माणसे कामात गुंतलेली असतात, अपार कष्ट करतात. म्हणून संसाराचे रूप बदलते. दुपार हीसुद्धा दिवसाची मधली म्हणजे तारुण्यावस्था असते. म्हणूनच समाजाच्या विकासाची, पालनपोषणाची सर्व कार्ये या अवधीतच चालू असतात. दुपार ही तारुण्याचे प्रतीकच आहे.

उतारा क्र. 6

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. तेजाने न्हाऊन निघणारी – [ ]
2. दुपारच्या रौद्र रूपाने अचंबित होणारी – [ ]
उत्तर:
1. बर्फाच्छादित गिरिशिखरे
2. बर्फाच्छादित गिरिशिखरे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
उत्तर लिहा:
अचंबित करणारे दुपारचे कार्य – ………………………..
उत्तर:
समुद्राच्या पाण्याची वाफ करणे आणि डोंगरावरच्या बर्फाचे पाणी करणे, हे दुपारचे अचंबित करणारे कार्य आहे.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पाण्याचे चक्र काढा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 15

प्रश्न 2.
दुपारचे मोठेपण सांगणारे उताऱ्यातील शब्द लिहा.
उत्तर:
दुपारचे मोठेपण सांगणारे लेखकांचे शब्द : कर्तृत्ववान, कामाची प्रेरणा देणारी, सृष्टीला कार्यरत करणारी, कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी, हितकर्ती, रक्षणकर्ती, हवेतले कीटक व जंतू यांचा नाश करणारी, उदास नसून उल्हास आहे. अचेतन नसून सचेतन आहे. दीर्घकर्तृत्ववाहिनी, कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
लेखकांनी दुपारला उद्देशून केलेल्या दुपारच्या स्तुतीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
लेखकांनी दुपारला उद्देशून लिहिलेला मजकूर म्हणजे दुपारचे स्तोत्रच आहे. ते अत्यंत योग्य आहे. एरवी लोकांच्या मनात दुपार म्हणजे कंटाळवाणा, त्रासदायक, नकोसा काळ असतो. पण लेखकांनी दुपारचे खरे रूपच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे दुपारबद्दलचे आपले मत बदलण्यास मदत होते. दुपारचा लखलखीत सूर्य म्हणजे दुपारचे तेज होय. या काळात माणसाच्या हिताची सर्व कार्ये चालू असतात. कंटाळा आला, थकवा आला, तरी लोक ही कार्ये चालू ठेवतात.

त्यामुळे मानवी समाजाची भरभराट होते. म्हणूनच लेखकांनी दुपारला मानवाची हितकर्ती, दीर्घ कर्तृत्ववाहिनी, कार्यप्रवण करणारी, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळातच कर्तबगारीला बहर येतो. म्हणून दुपार ही अचेतन नसून चेतना आहे, हे लेखकांचे विधान यथोचित आहे. एकंदरीत लेखकांनी दुपारला उद्देशून म्हटलेले सर्व काही मला पूर्णपणे पटते.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा:

2. समास:

प्रश्न 1.
सामासिक शब्दांवरून समास ओळखा:

  1. चौकोन →
  2. भारतमाता →
  3. बापलेक →
  4. धावपळ →
  5. खरेखोटे

उत्तर:

  1. विगू समास
  2. कर्मधारय समास
  3. इसमेतर वंद्व समास
  4. समाहार वंद्व समास
  5. वैकल्पिक वंदन समास.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘आळू’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. दयाळू
  2. ममतालू
  3. कृपाळू
  4. मायाळू.

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. कृतकृत्य होगे
2. ताव मारणे
3. धूम ठोकणे.
उत्तर:
1. कृतकृत्य होगे – अर्थ : धन्य होगे.
वाक्य: वंदा पास छान पडल्यामुळे शेतकरी कृतकृत्य झाले.
2. ताव मारणे – अर्थ : भरपूर जेबगे.
वाक्य: लानातील जेवणात जिलेबीवर बापूने ताव मारला.
3. धूम ठोकणे – अर्थ : पळून जाणे.
वाक्य: बापाची चाहूल लागताच हरणांनी धूम ठोकली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा:

  1. धरती
  2. पाणी
  3. समुद्र
  4. पक्षी.

उत्तर:

  1. धरती = (1) धरणी (2) भूमी
  2. पाणी = (1) जल (2) नीर
  3. समुद्र = (1) सागर (2) रत्नाकर
  4. पक्षी = (1) खग (2) विहग.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आनंद
  2. दिवस
  3. काळोख
  4. पुष्कळ.

उत्तर:

  1. आनंद × दुःख
  2. दिवस × रात्र
  3. काळोख × उजेड
  4. पुष्कळ × कमी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 3.
वचन बदला:

  1. चिमणी
  2. सागर
  3. पक्षी
  4. खेडी.

उत्तर:

  1. चिमणी – चिमण्या
  2. सागर – सागर
  3. पक्षी – पक्षी
  4. खेडी – खेडे.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. आशिर्वाद, आर्शीवाद, आर्शिवाद, आशीर्वाद.
  2. अवाढव्य, अवढव्य, अवाडव्य, अव्हाढव्य.
  3. विवचंना, वीवंचना, विवंचना, विहिवंचना.
  4. गिरीशिखरे, गिरिशिखरे, गीरिशीखरे, गीरीशीखरे.
  5. भूमीका, भूमिका, भुमिका, भुमीका.
  6. प्रतीनीधी, प्रतिनीधी, प्रतिनिधि, प्रतिनिधी.

उत्तर:

  1. आशीर्वाद
  2. अवाढव्य
  3. विवंचना
  4. गिरिशिखरे
  5. भूमिका
  6. प्रतिनिधी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशू पक्षी झाडे वेली
2. दुपार म्हणते उठा आराम बास
उत्तर:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली.
2. दुपार म्हणते, ‘उठा-आराम बास.’

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Calligraphy
  2. Secretary
  3. Action
  4. Comedy

उत्तर:

  1. सुलेखन
  2. सचिव
  3. कार्यवाही
  4. सुखात्मिका.

दुपार Summary in Marathi

पाठाचा परिचय:

राजीव बर्वे हे प्रसिद्ध लेखक आहेत. तसेच, त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांचाही त्यांना चांगलाच परिचय आहे. लोकांना साधारणपणे सकाळचा व संध्याकाळचा अवधी खूप आवडतो. त्यांची वर्णनेही खूप केली जातात. सकाळ-संध्याकाळवर कविताही लिहिल्या जातात. कथा-कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये सकाळ-संध्याकाळची वर्णने, प्रसंग खूप येतात. मात्र दुपारबद्दल अशी वर्णने जवळजवळ नसतात.

दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते. प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे. जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्मी दुपारमध्येच दिसते. जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य दुपार पार पाडते. दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात. म्हणून या पाठात दुपारचे लोभस वर्णन आले आहे. शहरात, गावात, जंगलात दुपार कशी वेगवेगळ्या | रूपांत अवतरते, त्यांचे सुंदर वर्णन या पाठात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

शब्दार्थ:

  1. उल्हास – आनंदाने भरलेला उत्साह.
  2. मध्यान्ह – दुपारची वेळ, दिवसाचा मध्य.
  3. रौद्र – प्रचंड क्रोध, संताप यांनी भरलेले अत्यंत भयंकर व भीतिदायक असे रूप.
  4. शिणवटा – थकवा.
  5. घरची लक्ष्मी – पत्नी.
  6. कृतकृत्य – धन्य.
  7. रपेट – फेरफटका.
  8. सांदीत – खाचेत, दोन बाजूंमधील अत्यंत चिंचोळ्या जागेत.
  9. सैलावलेली – सुस्तावलेली.
  10. घासाघीस – जास्तीत जास्त नफा मिळवू पाहणारा विक्रेता व कमीत कमी किमतीत वस्तू मिळवू पाहणारा ग्राहक यांच्यात
  11. किमतीवरून होणारी खेचाखेच.
  12. कार्यरत – कामात मग्न, कामात गुंतलेला.
  13. अव्याहत – सतत, न थांबता.
  14. अथांग – ज्याचा थांग (पत्ता) लागत नाही असा.
  15. मैलोगणती – कित्येक मैल.
  16. काहिलीने – प्रचंड उष्ण्याने.
  17. अचंबित – आश्चर्यचकित.

टीप:

मध्यान्ह:

मध्य+अन्ह, अहन् म्हणजे दिवस, ‘अन्ह:’ हे अहन्चे षष्ठीचे रूप, म्हणून अन्हः=दिवसाचा. ‘अन्हः’ हा शब्द मराठीत येताना त्यातील विसर्ग लोप पावला आहे. यावरून मध्यान्ह दिवसाचा मध्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. घाम गाळणे – खूप कष्ट करणे.
  2. कृतकृत्य होणे – धन्य होणे, धन्य धन्य वाटणे.
  3. चार पैसे गाठीला बांधणे – पैशांची बचत करणे.
  4. बेगमी करणे – भविष्यासाठी तरतूद करणे.
  5. भ्रांत असणे – विवंचना असणे.
  6. ताव मारणे – भरपूर खाणे, पोटभर खाणे.
  7. धूम ठोकणे – पळून जाणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Nirop Question Answer Class 9 Marathi Chapter 15 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15 निरोप Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 15 निरोप Question Answer Maharashtra Board

निरोप Std 9 Marathi Chapter 15 Questions and Answers

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न (अ)
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण
1. मुलाचा वाढदिवस आहे.
2. तो रणांगणावर जाणार आहे.
3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर:
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर जाणार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:
अशुभाची साउली.
उत्तर:
अशुभाची साउली: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण.
उत्तर:
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.

3. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची भाषा कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. ओजस्वी आई व मुलगा जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज विजयी होऊन आलास
की माझ्या हाताने दूधभात भरवीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी,’ या काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तशीच तुझ्या शस्त्रांना-अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.

प्रश्न (आ)
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन,’ या काव्यपंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

5. अभिव्यक्ति:

प्रश्न (अ)
कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते – तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न (आ)
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.

भाषा सौंदर्य:

मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाइल, ठंडा कोल्ड्रिंक, वटवृक्षाच्या झाडाखाली, शब्दाखाली अधोरेखित, हाय वे रोड, रायटिंगमध्ये लिहून दया, शेवटी एन्ड मस्त केलाय, पिवळा पितांबर.

शब्दांच्या या रचनेची ही गंमत पाहा. खरं म्हणजे भाषिकदृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची आहे; परंतु आपण बोलताना सहजगत्या अशा चुका वारंवार करतो. इतर भाषांच्या प्रभावामुळे हे असे घडत असले, तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात. आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक/साप्ताहिक रोज येते, असे म्हणते तेव्हा नक्कीच हशा पिकणार.

अशा विविध रचनांतील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 15 निरोप Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 7

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांदयावरी या विसावे
शांति उदयाच्या जगाची.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी
1. पाय
2. डोळे
3. हात
4. कान.
उत्तर:
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी हात.

प्रश्न 2.
बाळाच्या खांदयावर विसावणारी ………………………..
1. उदयाच्या जगाची क्रांती.
2. भविष्यातील जगाची शांती.
3. आजच्या जगाची शांती.
4. आजची क्रांती.
उत्तर:
बाळाच्या खांदयावर विसावणारी भविष्यातील जगाची शांती.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.

  1. शस्त्रांना शक्ती देणारी – [ ]
  2. आई स्वत:ला याची कन्या समजते – [ ]
  3. आईने धार लावून ठेवलेली – [ ]
  4. बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे – [ ]

उत्तर:

  1. भवानीमाता
  2. महाराष्ट्रकन्या
  3. तलवार
  4. शिवरायांचे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण
उत्तर:
सीमेवर लढावयास जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते-बाळा, तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या उजळलेल्या ज्योतींनी मी तुला ओवाळते आहे.

कृती 4 : (विचारसौंदर्य | भावसौंदर्य / अर्थसौंदर्य / रस)

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – निरोप.
उत्तर:
निरोप
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
2. कवितेचा विषय → रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. घर = सदन
  2. औक्षण = ओवाळणी
  3. बाहू = हात
  4. डोळा = नेत्र
  5. मुख = तोंड
  6. सावली = छाया
  7. शक्ती = बळ
  8. हात = हस्त.

4. कवितेतून मिळणारा संदेश → वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!
→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रिंनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
उत्तर:
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते – तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द अभ्यासा.

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा:

  1. पंचप्राण
  2. महाराष्ट्र
  3. रणांगण
  4. दूधभात.

उत्तर:

  1. पंचप्राण : पाच प्राणांचा समूह -द्विगू.
  2. महाराष्ट्र : महान असे राष्ट्र-कर्मधारय.
  3. रणांगण : रण हेच अंगण-कर्मधारय.
  4. दूधभात : दूध आणि भात -इतरेतर द्वंद्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. सावली
  2. दुःख
  3. स्वतंत्रता
  4. विजय.

उत्तर:

  1. सावली × ऊन
  2. दुःख × सुख
  3. स्वतंत्रता × परतंत्रता
  4. विजय × पराजय.

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिलेली आहेत.)
उत्तर:

एकवचन हुंदका ज्योत शस्त्र डोळा
अनेकवचन हुंदके ज्योती शस्त्रे डोळे

प्रश्न 3.
पुढील शब्दांपासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. चाललास
2. तलवारीला.
उत्तर:
1. चाललास – चाल, लस, सल, लाल.
2. तलवारीला – तरी, वारी, वाल, रीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमानुसार शुद्ध लिहा:

  1. ओक्षन
  2. वीक्रमि
  3. स्वरुप
  4. वीजयि.

उत्तर:

  1. औक्षण
  2. विक्रमी
  3. स्वरूप
  4. विजयी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Lyric
  2. Action
  3. Exchange
  4. Exhibition.

उत्तर:

  1. भावगीत
  2. कार्यवाही
  3. देवाण-घेवाण
  4. प्रदर्शन.

निरोप Summary in Marathi

कवितेचा आशय:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रींनी ओजस्वी शब्दांत घडवले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

शब्दार्थ:

  1. रणा – रणांगणात.
  2. तोरण – शुभपताकांची माळ.
  3. विक्रमी – पराक्रमी.
  4. बाहू – हात.
  5. राखायची – रक्षण करायची.
  6. विसावे – विश्रांती घेते, थांबते.
  7. जाणते – उमगते, समजते.
  8. हुंदका – गहिवर.
  9. मुखावाटे – तोंडातून.
  10. अशुभ – वाईट गोष्ट.
  11. साउली – सावली.
  12. माझिया – माझ्या.

टिपा:

  1. औक्षण – पंचारतीने ओवाळणे.
  2. महाराष्ट्रकन्या – महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता, पराक्रमी स्त्रिया.
  3. जिजा – शिवछत्रपतींची आई, जिजामाता.
  4. लक्षुमी – झाशीची राणी लक्ष्मीबाई.
  5. भवानी – श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत, भवानीमाता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. निरोप देणे – जाण्यासाठी परवानगी देणे.
  2. अशुभाची सावली पडणे – विपरीत घडणे, अमंगल घडणे.
  3. कूस धन्य करणे – जन्म सार्थकी लागणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कवितेचा भावार्थ:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते – बाळा, तू रणांगणावर चालला आहेस हा शुभशकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण लावते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे. तुझे शुभ चिंतते आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांदयांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उदयाच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. माझे डोळे आसवांनी ओथंबले नाहीत. मी सुद्धा महाराष्ट्रकन्या आहे. मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे.

तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला (शस्त्राला) धार मीच लावून ठेवली आहे. (संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे.)

अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही. वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवय्यी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. तुझ्या शस्त्रांना (बंदुकांना) अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल. भवानीमातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्रीछत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचे स्मरण कर. विजयी होऊन ये नि माझ्यापोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूधभात भरवीन.

9th Std Marathi Questions And Answers:

Apule Jagne Apuli Olakh Question Answer Class 9 Marathi Chapter 20 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Question Answer Maharashtra Board

आपुले जगणे…आपुली ओळख! Std 9 Marathi Chapter 20 Questions and Answers

1. खालील कोष्टक पूर्ण करा:

प्रश्न 1.
खालील कोष्टक पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 1
उत्तर:

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
1. दिवा होऊन जगाला उजळावे. 1. एक क्षणही कार्याविण दवडू नको.
2. पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. 2. कुणाबाबतीत मनात अढी नको.
3. नम्र रहावे, सौम्य पहावे. 3. उगाच कुणाला खिजवू नको.
4. दुसऱ्यासाठी करुणा असावी. 4. हांजी हांजी करू नको.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 3

3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:
(अ) पटकुर पसरू नको.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नको.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरूळ.
उत्तर:
(अ) पटकुर पसरू नको: अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत. मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी, असे वर्णन करू नये.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नको: स्वत:च्या दु:खाचे प्रदर्शन करीत रडत न राहता, हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दु:खांविषयी अंत:करणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये. म्हणजेच कोरडे राहू नये.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरूळ: पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादजवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यान्पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आजमितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे कवी म्हणत आहेत.

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात-श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे घालावीत. स्वत:चे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वत:च्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.

प्रश्न (आ)
‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको,’ या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे,’ असे सुवचन आहे. ‘शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे,’ या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

5. स्वमत:

प्रश्न (अ)
स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
स्वत:चे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वत:ची ओळख आहे, हे , सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकूसारखी धार आपल्या है वागण्यात नसावी. नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा. एकही , क्षण कामाशिवाय वाया दवडू नये. मन पवित्र असावे. शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा.

नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये. उदात्त विचार बाळगावेत. लाचारी पत्करू नये. कुणाला छळू नये, वाद घालू नये. स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा. दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी. नवनवीन विचारांचे मार्ग अंगिकारावेत. चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी. भेदरून न जाता, धैर्याने वागावे. मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ (शिल्प) उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत.

प्रश्न (आ)
आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर:
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण कार्याशिवाय वाया दवडू नये, कार्यरत असावे, पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे. नम्रतेचे वर्णन असावे, दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत.

शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, हे मनी ठसवावे. वाद, भांडण करू नये. उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळसारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावेत.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 5

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

प्रश्न 2.
सहसंबंध जोडा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 7

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढीलपैकी असत्य विधान ओळखा:
1. नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.
2. उगाचच वाद घालू नये.
3. ज्यावर श्रद्धा ते काम करावे.
4. भेकड होऊन मुळूमुळू रडू नये.
उत्तर:
असत्य विधान : नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 8
उत्तर:

  1. [शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे]
  2. [जे उदात्त असते तेथे]
  3. [वेरूळ]
  4. [मातृभूमी] व [माती]

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
नित्य घडावे वाचन, लेखन… क्षण कार्याविण दवडु नको
नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!
उत्तर:
माणसाने आयुष्यात वर्तन कसे करावे याविषयी उपदेश करताना कवी संदीप खरे म्हणतात की मन सुसंस्कृत करण्यासाठी नेहमी वाचन व लेखन करावे. एक क्षणही कार्य केल्याशिवाय राहू नये. नित्य नेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे यांना डावलून झोपा काढू नयेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – आपुले जगणे… आपुली ओळख!
उत्तर:
आपुले जगणे… आपुली ओळख!
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संदीप खरे.
2. कवितेचा विषय → तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. दिवा = दीप
  2. कार्य = काम
  3. झोप = निद्रा
  4. पावित्र्य = मांगल्य
  5. नयन = डोळे
  6. अश्रू = आसू
  7. करुणा = दया
  8. पथ = मार्ग
  9. काटा = कंटक
  10. हिंमत = धैर्य.

4. कवितेतून मिळणारा संदेश → आपले जगणे सत्यम्, शिवम्, सुंदरम् करावे. लेखन-वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुत्सित बोलू नये, मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → या कवितेत ‘फटका’ हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, याचा परिपाठ दिला आहे.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ: ‘तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!
→ माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात -नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत. नवीन मार्गाने चालण्यास म्हणजे नवीन विचार अंगिकारण्यास भीती बाळगू नये. ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ती कार्ये केल्याशिवाय राहू नये.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे, याचा नेमक्या शब्दांत व थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जिणे नको; तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे, याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला भावली.

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको!’
उत्तर:
आशयसौंदर्य : तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी ‘आपुले जगणे… आपुली ओळख!’ या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.

काव्यसौंदर्य: कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात-आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘फटका’ या पूर्वापर चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
विग्रहावरून समास लिहा:
उत्तर:

  1. ऊन आणि पाऊस → इतरेतर द्वंद्व
  2. सात स्वर्गांचा समूह → द्विगू
  3. गुरे, वासरे वगैरे → समाहार वंद्व
  4. महान असे ऋषी → कर्मधारय
  5. न्याय किंवा अन्याय → वैकल्पिक वंद्व

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे आपुली ओळख 9
उत्तर:

  1. दिवा = दीप
  2. नयन = डोळे
  3. भेकड = भित्रा
  4. करुणा = दया.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. भेकड
  2. व्यर्थ
  3. नम्र
  4. श्रेष्ठ.

उत्तर:

  1. भेकड × धीट
  2. व्यर्थ × सार्थ
  3. नम्र × उद्धट
  4. श्रेष्ठ × कनिष्ठ.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

प्रश्न 3.
शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा:

  1. दररोज प्रसिद्ध होणारे
  2. आठवड्याने प्रसिद्ध होणारे
  3. महिन्याने प्रसिद्ध होणारे
  4. वर्षाने प्रसिद्ध होणारे

उत्तर:

  1. दैनिक
  2. साप्ताहिक
  3. मासिक
  4. वार्षिक

प्रश्न 4.
एकवचन लिहा:

  1. वस्त्रे
  2. वाटा
  3. मंत्र
  4. राने.

उत्तर:

  1. वस्त्र
  2. वाट
  3. मंत्र
  4. रान.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
उत्तर:
1. कर्तृत्व, कर्तृत्त्व, करुत्व, कतृत्व. – कर्तृत्व
2. गोर्वधन, गेवर्धन, गोवधर्न, गोवर्धन. – गोवर्धन

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी अर्थ लिहा:
1. General Meeting
2. Bonafide Certificate.
उत्तर:
1. सर्वसाधारण सभा
2. वास्तविकता प्रमाणपत्र.

आपुले जगणे…आपुली ओळख! Summary in Marathi

कवितेचा आशय:

जीवनामध्ये कसे वागावे व कसे वागू नये, याचा आदर्शपाठ या कवितेत कवीने सोप्या शब्दांत मांडला आहे. उत्तुंग कर्तृत्व करावे व मातीचे ऋण फेडावे, हा संदेश दिला आहे.

शब्दार्थ:

  1. उपरे – परके, खोटे, लटके.
  2. नित्य – नेहमी, सतत.
  3. कार्याविण – कामाशिवाय.
  4. दवडू नको – वाया घालवू नको.
  5. पावित्र्य – मांगल्य, पवित्रता.
  6. वस्त्रे-कपडे.
  7. पटकूर – चिंध्या झालेले कापड.
  8. आदिमंत्र – मूलतत्त्व.
  9. नम्र – शालीन, लीन.
  10. सौम्य – फिकट, साधे.
  11. उगा – उगाच, बळेच, मुद्दाम.
  12. अढी – डंख, हेवा, मत्सर, अटकळ.
  13. खिजवणे – चिडवणे, त्रास देणे.
  14. तयावर – त्याच्यावर.
  15. फुकाची – फुकटची, उगीच.
  16. लोचट – हावरेपणा.
  17. बुळचट – बावळट, मिळमिळीत.
  18. उदात्त – भव्य, दिव्य.
  19. ताठर – ताठ, गर्विष्ठ.
  20. माथा – मस्तक, शीर, डोके.
  21. पेल – उचलून धर, धरून ठेव, झेल.
  22. वाद – भांडण.
  23. नयनी – डोळ्यांत.
  24. दुसऱ्यास्तव – इतरांसाठी.
  25. करुणा – दया.
  26. व्यर्थ – निरर्थक, फुकट.
  27. पथाला – रस्त्याला, मार्गाला.
  28. श्रद्धा – निष्ठा, विश्वास.
  29. भेकड – भित्रा.
  30. गुळमुळ – गुळमुळीत.
  31. मातेसह – आईसकट (मातृभूमी).
  32. देणे – ऋण, कर्ज.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

टिपा:

1. परवचा – पाढे पाठ करणे.
2. गोवर्धन – गोकुळातील एक पर्वत. अतिवृष्टीपासून लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी हा पर्वत एका करंगळीवर उचलून धरला, अशी आख्यायिका आहे.
3. कंस – श्रीकृष्णाचा मामा. याने श्रीकृष्णाच्या आईवडिलांना (देवकी-वसुदेव) कैदेत ठेवले होते.
4. वेरूळ – डोंगरात खोदलेली लेणी. (औरंगाबाद)

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. अढी नसणे – (कुणाबद्दल मनात) डंख नसणे.
  2. कडी करणे – वरचढ ठरणे.
  3. हांजी हांजी करणे – लाचारी पत्करणे.
  4. धमकावणे – धमकी देणे.
  5. भेदरणे – घाबरणे.
  6. मातीचे देणे फेडणे – मातृभूमीचे उपकार फेडणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे...आपुली ओळख!

कवितेचा भावार्थ:

माणसाने आयुष्यात कसे वागावे, हे सांगताना कवी म्हणतात – आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नको. (दुष्टपणा करू नये, क्रूर होऊ नये.) नेहमी वाचन-लेखन करावे. त्याने मन सुसंस्कृत होते. कामाशिवाय एकही क्षण वाया दवडू नको. आळशीपणा करू नको. नित्यनेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे, यांशिवाय उगाच झोप काढू नको.

पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस. स्वत:चे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको. मनात मांगल्य असावे, उथळ बडेजावापेक्षा, कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते, हा मूलमंत्र कधीही विसरू नको. (साधी राहणी, पवित्र विचार अंगिकारावा, उगाच बेगडी फुशारकी करू नये.) नम्रपणा असावा. शांत वृत्तीने पाहावे. उगाचच मनात दुसऱ्याबद्दल अढी ठेवू नये. दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच वरचढपणा करू नये.

हांजी हांजी करून फुकटची लाचारी करू नये. असा लोचटपणा व बुळचटपणा घातक असतो. पण जर एखादे भव्य-दिव्य काही कार्य दिसले, तर त्याबाबत ताठरता, दुरभिमान मुळीच बाळगू नको. तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल. संकटे झेल. कंसासारखे इतरांना छळू नको. उगाचच वाद, भांडणे करू नयेत, परंतु कुणी धमकी दिली तर पळू नये. निडरपणे बोलावे. स्वार्थीपणे स्वत:च्या दु:खाने डोळ्यांत आसवे आणू नको. दुसऱ्यासाठी मनात करुणा, दया असावी. परोपकार करावा. मनात E मायेचा ओलावा असावा. मन उगाचच कोरडे, भावनाशून्य ठेवू नकोस.

आनंदाने नवनवीन क्षेत्रांतील ज्ञान मिळवावे. राने तुडवावीत. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगिकारण्यास घाबरू नये. अंतर्मनातून ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ते कार्य केल्याशिवाय राहू नये. (जिथे इच्छा तिथे मार्ग) मार्गात काटेही (संकटे) असतात पण त्यांना भिऊन राहू नको, डगमगू नको. जो धैर्य दाखवतो, त्याची जगात किंमत राहते. जग त्याला नावाजते. भेकडपणा, गुळमुळीतपणा, पळपुटेपणा धरून मुळूमुळू रडत बसू नये. आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरुळाची लेणी घडव. उत्तुंग अकल्पित कर्तृत्व कर. कर्तव्याला नाकारू नको. या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहे. या मातीचे उपकार फेडायला चुकू नको.

9th Std Marathi Questions And Answers:

Matichi Savli Question Answer Class 9 Marathi Chapter 11 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 11 मातीची सावली Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 11 मातीची सावली Question Answer Maharashtra Board

मातीची सावली Std 9 Marathi Chapter 11 Questions and Answers

1. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:
(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
उत्तर:
(अ) उन्हाळा जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
(आ) आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
(इ) चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

2. खालील तकता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तकता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 1
उत्तर:

घटना परिणाम / प्रतिक्रिया
1. फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. 1. सून येऊन डाफरली.
2. मनूला फरसूने शिकवले. 2. मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले.
3. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. 3. आठवड्याभरातच कोसू मरण पावली.
4. मनूने जमीन विकायला काढली. 4. फरसूने बैलासारखी मान डोलावली.

3. आकृती पूर्ण करा:

प्रश्न (अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 3

प्रश्न (आ)
पाठाच्या आधारे फरसूचे पुढील मुद्दयांना अनुसरून वर्णन करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 4
उत्तर:
1. छंद: फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे.

2. मेहनत: फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पानन् पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची, झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निर्धार होता.

3. दुःख: फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती.

4. माणूसपण: फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

4. ओघतक्ता तयार करा:

प्रश्न 1.
ओघतक्ता तयार करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 6

5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा:

प्रश्न (अ)
“आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते.”
उत्तर:
“आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते.”

प्रश्न (आ)
“त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.”
उत्तर:
“त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.”

6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा:

प्रश्न (अ)
टकळी चालवणे –
1. सूत कातणे
2. सतत बोलणे
3. वस्त्र विणणे.
उत्तर:
सतत बोलणे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न (आ)
नाळ तुटणे –
1. मैत्री जमणे
2. संबंध न राहणे
3. संबंध जुळणे.
उत्तर:
संबंध न राहणे

7. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.

(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले –
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –

8. स्वमत.

प्रश्न (अ)
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा..
उत्तर:
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वत:च्या इच्छाआकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला, तर माणूसपण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत.

शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच, आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न (आ)
पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो.

अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नदयांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.

प्रश्न (इ)

‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

उपक्रम:

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठाचे नाट्यरूपांतर करून वर्गात सादर करा.

प्रश्न 2.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे ‘उदयाच्या सुंदर दिवसासाठी’ – हे पुस्तक वाचा.

भाषा सौंदर्य:

प्रश्न 1.
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचारांची उदाहरणे लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 7उत्तर:

शरीर अवयवावर आधारित चेहरा काळवंडणे
उत्तरे: (1) डोळे मिटणे (2) पोटात दुखणे (3) डोके फिरणे (4) बुडत्याचा पाय खोलात.
प्राणी व पक्षी यांवर आधारित पोटात कावळे ओरडणे.
उत्तरे: (1) चिमणीच्या चोचीने खाणे (2) कोल्याला द्राक्षे आंबट (3) गाढवाला गुळाची चव काय? (4) माकडाला चढली भांग.
मानवी भावभावना जिवाची उलघाल होणे.
उत्तरे: (1) हृदयात कालवाकालव होणे (2) मन चिंती ते वैरी न चिंती (3) भित्यापाठी ब्रह्मराक्षस (4) प्राणपणाने लढणे.
अन्नघटक खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
उत्तरे: (1) वड्याचे तेल वांग्यावर (2) खाई त्याला खवखवे (3) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले
(4) दुधाची तहान ताकावर.
इतर घटक दगडापेक्षा वीट मऊ.
उत्तरे: (1) एक ना धड भाराभर चिंध्या (2) इकडे आड, तिकडे विहीर (3) पळसाला पाने तीनच (4) तळे राखी तो पाणी चाखी.’

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

भाषाभ्यास:

तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही धडे वाचता, कविता वाचता. धडे आणि कविता म्हणजेच गय आणि पदध यांच्या रचनेत फरक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. पदध गाता येते किंवा लयीत वाचता येते. गदयाचे तसे नसते. कवितेमध्ये लय निर्माण कशी होते? कुठल्या गोष्टीमुळे होते? हे आज आपण बघणार आहोत. वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय मिळते. कवितेची लय समजण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.

वृत्त किंवा छंद म्हणजे काय ? लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते. व्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला ‘वृत्त’ म्हणतात. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितात जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशा वृत्तविचारामध्ये काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेऊया.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 8

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 11 मातीची सावली Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
फरक लिहा:

तरुणपणाचा काळ म्हातारपणाचा काळ

उत्तर:

तरुणपणाचा काळ म्हातारपणाचा काळ
सुखी, समाधानी खिन्न, शोकाकुल

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आशय स्पष्ट करा:
1. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला.
2. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली.
उत्तर:
1. आपण आनंदाने चालतो, तेव्हा आपले पाय सहज, भरभर पडतात. फरसूचे पाय असे आनंदाने पडत नाहीत. पाय उचलण्यासाठी त्याला कष्ट पडतात. पाय ओढावे लागतात. म्हणजे फरसू दुःखीकष्टी मनाने पायरीवर येऊन बसतो.
2. खरबरीत बोटे म्हणजे भरपूर कष्ट केलेल्या हातांची बोटे. या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायऱ्या सुखाच्या वाटत नाहीत. पायऱ्यांचा गुळगुळीतपणा दूरचा, परका वाटतो.

प्रश्न 2.
माहिती लिहा:

पूर्वीच्या गोष्टी आताच्या गोष्टी
1. 1.
2. 2.

उत्तर:

पूर्वीच्या गोष्टी आताच्या गोष्टी
1. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, भिरभिरत येणारी चिंचेची पाने. 1.  गुळगुळीत पायऱ्या,  गुबगुबीत खुर्च्या.
2. चिंचेच्या मुळावर बसून मित्रांसोबत केलेल्या गप्पागोष्टी. 2. आता गप्पा मारायला कोणीही नाही. आता फक्त एकट्याने आभाळाकडे बघत राहणे

प्रश्न 3.
उताऱ्यातील सासरे-सून यांच्यातील नाते स्पष्ट करा.
उत्तर:
सुनेला वाटते की, सासऱ्यांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागावे. सासरे ।
त्यांच्या जीवनातील सर्व जुन्या गोष्टी नष्ट झाल्याने दुःखी आहेत. सासऱ्यांच्या मनातील भावना सून लक्षात घेत नाही
आणि त्यांच्यावर डाफरत राहते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा:

घटना परिणाम
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे.

उत्तर:

घटना परिणाम
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. फरसू व आबू यांना नवल वाटायचे.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारी फरसूची मन:स्थिती लिहा.
उत्तर:
दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायांची हाडे कडकडतात. यावरून तो उतारवयात आहे, हे लक्षात येते. त्याला आताचे वातावरण प्रिय नाही. चकचकीत, ऐषारामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. तो उदास, विमनस्क स्थितीत वावरतो. त्याच्या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायरीचा स्पर्श सुखद वाटत नाही.

गुबगुबीत खुर्चीतही त्याला अवघडल्यासारखे होते. त्याला हवेहवेसे वाटणारे दृश्य त्याच्या मनात जागे होते. ते असते पूर्वीचे, त्याच्या तरुणपणातील. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, इकडून तिकडे बागडणाऱ्या खारी यांनी बनलेले वातावरण त्याला समाधान दयायचे. आता ते सर्व नाहीसे झाले आहे. त्याच्या फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. या आठवणींनी फरसू उदास होतो आणि आभाळाकडे बघत राहतो.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 10

प्रश्न 2.
का ते लिहा:
1. गावकरी फरसूवर मनोमन जळायचे.
2. पाठीचा कणा दुखेपर्यंत फरसू पत्नीसहित राबणे चालू ठेवायचा.
उत्तर:
1. पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसे. त्यामानाने इतरांचे शेत पिकत नसे.
2. भाताचे पीक झाल्यावर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांचीही पिके घ्यायचा. तो दुबार पिके घ्यायचा. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागायचे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 3.
पुढील वाक्य प्रमाणभाषेत लिहा:
त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.
उत्तर:
त्यांचीच पुण्याई, ही विहीर नाही, नदी आहे नदी.

प्रश्न 4.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले.
उत्तर:
बापजादयांची कमायी रे पोरांनो!

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधान पूर्ण करा:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे …………………..
उत्तर:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे –
(अ) फरसूच्या विहिरीला वैशाखातही भरपूर पाणी असे.
(आ) फरसूने तीन मुलींची लग्ने करून त्यांना सासरी पाठवले. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. इतकी सुबत्ता त्याला लाभली होती.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 12

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
फरसूच्या यशा मागील तुम्हांला जाणवलेले रहस्य सांगा.
उत्तर:
फरसूच्या यशामागे दोन गोष्टी आहेत. एक आहे त्याची श्रद्धा आणि दुसरी आहे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याची चांगल्या, उदात्त मूल्यांवर श्रद्धा आहे. त्याच्या मते, कोणाच्याही कामात खोडा घालू नये. म्हणजे कोणाचेही वाईट करू नये. इतरांचे वाईट केल्यास आपले अकल्याण होते, असा त्याचा ठाम विश्वास आहे. आपल्या बापजादयांनी कोणाचीही फसवणूक केली नाही; कोणाला नाडले नाही; म्हणून आपली भरभराट झाली, असे त्याला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याने नैसर्गिक खतावरच पूर्णपणे भर दिला. रासायनिक खताचा वापर केला नाही. रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे जमिनीचे नुकसान झाले नाही. त्याने चिंचेचा पाला शेतात पसरून त्याचेच खत होऊ दिले. तसेच, मुख्य भातपिकानंतर त्याने वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांची पिके घेतली. या प्रकारच्या दुबार पिकांमुळेही जमिनीचा कस वाढण्यास मदत झाली. एकंदरीत, श्रद्धा व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांमुळे फरसू यशस्वी झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील कोष्टक पूर्ण करा:

घटना. परिणाम
तिघेही मुकाट जेवत होते.

उत्तर:

घटना. परिणाम
तिघेही मुकाट जेवत होते. मुलांशी प्रेमाचे नाते न राहिल्यामुळे डोळ्यांत आसवे येत होती.

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

सुनेचे उद्गार सुनेच्या मनातला अर्थ
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे!
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी?

उत्तर:

सुनेचे उद्गार सुनेच्या मनातला अर्थ
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! निरर्थक व निष्क्रिय आयुष्य जगत आहेत.
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? मला कष्ट करावे लागतात आणि यांचा काडीचाही उपयोग नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 3.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम.
उत्तर:
पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
1. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत.
2. आपला आधार तर कधीच तुटून पडला.
उत्तर:
1. झाडापानांवर प्रेम असल्यामुळे कष्ट कधी जाणवलेच नाहीत.
2. फरसूची पत्नी मरण पावली. त्यामुळे त्याचा आधार तुटून पडला.

प्रश्न 2.
फरक लिहा:

फरसू मनू
1. 1.
2. 2.
3. 3.

उत्तर:

फरसू मनू
1. तिसरी-चौथीच्या पुढे गेला नव्हता. 1. फरसूने मनूला शिकवले.
2. जमिनीचीच चाकरी करायची हे ठरवलं होतं. 2. इंग्रजी नावाच्या कुठल्याशा कंपनीतील नोकरीच श्रेष्ठ मानीत होता.
3. पोटच्या मुलाच्या प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना शेवटपर्यंत आधार देण्याचा निश्चय केला होता. 3. मातीत हात घालायलाच नाखूश होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
मनू आणि फरसू यांच्यातील नाते भावनाहीन, कोरडे होण्यामागील तुम्हांला जाणवलेले कारण स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू कष्ट करीत करीत व निसर्गाशी खेळत खेळतच जगला. त्यामुळे त्याचा जमिनीवर, झाडापानांवर जीव आहे. त्यांच्या आधारानेच आपले जीवन उभे राहते. म्हणून जीव असेस्तोवर जमिनीची चाकरी करायची, झाडापानांना आधार दयायचा, हा त्याचा निर्धार होता. तसेच, फरसू खेडेगावात राहत असल्यामुळे खेडेगावातील माणसे एकमेकांना धरून राहतात. तिथे व्यक्तीच्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा संपूर्ण समाजाचे सुखदुःख महत्त्वाचे मानले जाते.

मनूने शिक्षण घेतले. आपल्याकडील बहुतांश शिक्षण पुस्तकी असते. ते कष्टापासून दूर असते. यामुळे मनूला शेतीतले कष्ट कमी दर्जाचे वाटतात. चकचकीत, गुळगुळीत स्वरूपाचा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळतनकळत फक्त स्वत:चाच विचार करू लागतो. मनूचे तेच झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. त्या दोघांमध्ये भावनिक नाते राहिलेच नाही. दोघांमध्ये संवाद राहिला नाही. समाधान राहिले नाही.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. पूर्वीच्या जुन्या घरातील जेवणाच्या वेळचे वातावरण.
2. पूर्वीच्या जेवणाचे स्वरूप.
3. कोसूचा मृत्यू.
उत्तर:
1. पूर्वी जुन्या घराच्या अंधाऱ्या पडवीत जेवणे होत असत. कोसू प्रार्थना करी. प्रार्थना संपल्यावर जेवण चालू होई. त्या वेळी कोसूची टकळी चालू असे. मनू तर जेवता जेवता बहिणींशी मस्ती करायचा. वातावरण मोकळे, प्रेमळ असे.. जेवताना आनंद मिळे.
2. पूर्वीचे जेवण साधे असे. जेवणात एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या भाकऱ्या असत. जेवणात कोणताही उंची थाट नव्हता. तरी जेवणाचे समाधान मिळे.
3. वाडीत काम चालू होते. हे काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा, असे काहीतरी लागले. म्हटले तर साधी इजा झाली होती. तीच महागात पडली. आठवड्याभरातच कोसूची प्राणज्योत मालवली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला.
उत्तर:
तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
संकल्पना स्पष्ट करा:
1. केळीचे बन जमिनीवर झोपावे, तसे.
2. कारली-वांग्यासारखा जमिनीचा बाजार मांडला.
3. बैलासारखी मान डोलावली.
उत्तर:
1. केळ पडली की ती पूर्ण उन्मळून पडते. तिची जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात. म्हणजे ती समूळ नष्ट होते. केळीचे अखंड बन जर असेच आडवे झाले, तर सगळी बाग उजाड झालेली दिसते. अशाच प्रकारे एकाएकी कोसू मरण पावल्यामुळे फरसूचा संसार उद्ध्वस्त झाला.

2. कारली-वांग्याचा बाजार मांडला जातो, तेव्हा त्या कारल्या वांग्यांबद्दल कोणालाही आपुलकी वाटत नसते. किंबहुना त्यांची विक्री झाली, तर सगळ्यांना आनंदच होतो. म्हणून बाजारात सर्व विक्रेते ओरडून लोकांना खरेदी करण्याचा आग्रह करीत असतात. वेळप्रसंगी कमी किमतीतही विकत असतात. यालाच बाजार मांडणे म्हणतात. जमिनीची बाब तशी नसते. आपण जमीन विकून तिला कारली-वांग्याच्या पातळीवर आणले असे फरसूला वाटत असते.

3. नंदीबैलाचा मालक सांगतो, त्याप्रमाणे बैल मान डोलावतो. बैलाला स्वत:चे मत वा भावना नसतात. तो मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणेच आपणही मनूच्या म्हणण्याला मान डोलावली. आपले मनातले खरेखुरे म्हणणे सांगितलेच नाही, असे फरसूला वाटते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे.
उत्तर:
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे:
1. ज्या मातीने संसार फुलवला, त्या मातीलाच उजाड केल्यामुळे कोसू मरण पावली असावी.
2. मनूने जमीन विकायचा विचार मांडला, तेव्हा नंदीबैलाप्रमाणे आपण मान डोलावली, असे फरसूला वाटले.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
फरसू व मनू यांची जीवनदृष्टी समजावून सांगा.
उत्तर:
फरसूच्या जुन्या घरात पूर्वी जेवतानाचे वातावरण लोभसवाणे होते. सगळेजण गप्पाटप्पा करीत, थट्टामस्करी करीत जेवत असत. त्यात माया होती. भावनेचा ओलावा होता. त्यात सहज, साध्या निर्मळ भावनांना वाव होता. म्हणून ते वातावरण सुंदर होते, सुखद होते. या वातावरणात शेती, गाईगुरे, झाडेपाने यांनाही स्थान होते. गावातल्या लोकांनाही स्थान होते. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत जगणे हवे असते.

मनूला व त्याच्या पत्नीला, म्हणजे फरसूच्या सुनेला ही जगण्याची रीत मान्य नव्हती. त्यांना उच्च दर्जाच्या गुळगुळीत फरश्या बसवलेली, मोठ्या, उंच इमारतीमधील महागडी घरे अधिक आकर्षक वाटतात. मनू जुन्या घराला गोठा म्हणतो. त्याला शेतीपेक्षा नोकरी अधिक चांगली वाटते. या दोन वेगवेगळ्या जीवनरिती आहेत. दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध आहेत. मनूला फरसूचे मन कळत नाही. त्यामुळेच मनू कायम फरसूविरुद्ध उभा ठाकतो.

उतारा क्र. 5

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 14

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

कृती कृतीमागील भावना
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला.
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले.

उत्तर:

कृती कृतीमागील भावना
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. आपण काहीच करू शकत नाही, ही असहायता, खोल दुःख.
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. अभिमान व आनंद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार:

  1. ………………………………………
  2. ………………………………………
  3. ………………………………………
  4. ………………………………………

उत्तर:

  1. जमिनीवर ट्रॅक्टर फिरला.
  2. बागायत मातीला मिळाली.
  3. मोठाले खड्डे खणले गेले.
  4. भलेमोठे दगडविटांचे धूड उभारले गेले.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 15
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 16

उतारा क्र. 6

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:
1. फरसू मध्यरात्री घराबाहेर बसला आहे.
2. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
उत्तर:
1. प्रथम फरसूची बायको गेली. मग जमीन गेली. घर गेले. सर्व झाडे गेली. जिवाभावाच्या सर्वच गोष्टी नष्ट झाल्या. म्हणून तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. दु:खामुळे त्याला चैन पडेना आणि तो मध्यरात्र असतानाही घराबाहेर येऊन बसला.
2. पूर्वजांनी जमीन मिळवली होती. त्यांनीच घर बांधले होते. त्यांनीच झाडेझुडपे लावली. पैशाच्या हव्यासाने पूर्वजांची सर्व कमाई आपण घालवली. हा एक प्रकारे गुन्हाच केला, अशी फरसूची भावना होती. या गुन्हयाबद्दल येशूकडे माफी मागावी, म्हणून त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
पुढील घटनांचे परिणाम लिहा:
1. जमीन विकली, पैसा आला – …………………….
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – …………………..
उत्तर:
1. जमीन विकली, पैसा आला – ते बापाला विसरले.
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – फरसूला वाटले, त्याने बेइमानी केली. आपल्या आईला फसवले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
अर्थ स्पष्ट करा:
आमशा आजा, पणजाअं रगत हय्!
उत्तर:
जमीन, घर, झाडेपेडे हे फरसूच्या पूर्वजांनी, त्याच्या आजा पणजाने मिळवले होते. तेवढे सगळे उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची आयुष्ये ओतली होती. रक्त आटवले होते. ते सगळे आपण पैशांसाठी विकले, याचे प्रचंड दु:ख व पश्चात्ताप फरसूला होतो. हा पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी फरसू हे उद्गार काढतो.

प्रश्न 2.
आबूने फरसूची काढलेली समजूत तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मध्यरात्री दुःखावेगाने अस्वस्थ होऊन फरसू घराबाहेर पडला. त्याला पाहून आबूने आश्चर्य व्यक्त केले. त्यावर, पूर्वजांनी रक्त आटवून उभारलेली संपत्ती आपण विकली, याबद्दलचा पश्चात्ताप त्याने आबूकडे व्यक्त केला. आबूने त्याची समजूत काढली. अशी जमीन अनेकांनी विकली आहे. त्यात गैर काहीच नाही. मिळालेल्या भरघोस पैशांनी मनूचे जीवन पूर्ण समृद्ध होणार आहे. ही सुद्धा चांगलीच घटना आहे. म्हणून फरसूने त्याचे दु:ख वाटून घेऊ नये, असे आबूने समजावले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फरसूच्या घरातील यातनादायक वातावरणाला फरसू व मनू हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत.’ विधान स्पष्ट करा.
उत्तर:
काळानुसार परिस्थिती बदलते. प्रत्येक पिढीचे विचार बदलतात. नवीन पिढी नवीन विचारांना अनुसरून चालते. नव्या पिढीची जगण्यावागण्याची रीत वेगळी असते. ही रीत म्हणजे जीवनशैली. मन् हा नव्या युगातला युवक आहे. त्याची जीवनशैली आधुनिक काळातली. तो या नव्या जीवनशैलीला अनुसरूनच वागणार. हा बदल फरसूला कळलेला नाही. म्हणून त्याला दु:ख होते. तो वेदनेने विव्हळतो. त्याच वेळी मनूलाही वडिलांची मन:स्थिती कळत नाही. वडील है ज्या विचारांच्या वातावरणात वाढले, त्याच विचारांना धरून ते वागणार. त्यांना स्वत:च्या विचारांत झटकन बदल करता येणार नाही.

नवीन विचार ते त्वरेने आत्मसात करू शकणार नाहीत. हे सर्व मनूनेही लक्षात घ्यायला हवे होते. वडिलांना हळूहळू आपल्या विचारांकडे आणायचा प्रयत्न त्याने करायला हवा होता. पण त्याने तो तसा केला नाही. बापलेक दोघेही आपापल्या जागी घट्ट राहिले. त्यांच्या दुःखाचे मूळ तिथे आहे. म्हणून दोघेही सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत.

उतारा क्र. 7

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आशय स्पष्ट करा:
1. जलमभर ढोरहारकं खपाला पाये.
2. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे………
3. त्यांशे पाय जमिनीवर नाय.
उत्तर:
1. फरसू जमीन विकल्याबद्दल दु:खी होतो. आबूला वाटते की, फरसूला दारिद्र्यात राहणेच पसंत आहे. पैसे हातात आले की, अनेक सुखे मिळवता येतात. पण फरसू या सुखांची आस बाळगतच नाही. तो स्वत:ला यातनांमधून मुक्त करण्याचा प्रयत्नच करीत नाही. म्हणून आबूचे मत असे बनत चालले आहे की, फरसूला ढोरासारखे राबणे आवडते.

2. फरसूच्या मते, आपल्या मालकीची जमीन असेल, तरच आपण स्थिर असतो, आपल्या जीवनाला अर्थ असतो. आपल्या मालकीची जमीन नसेल, तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपली नातवंडे-पतवंडे यांचा आधारच आपण काढून घेतला, असा अर्थ होऊ शकतो.

3. आबूच्या मते, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत, कर्तबगार आहेत. त्यांचा पाय जमिनीवर ठरत नाही. ते बोटीने, विमानाने जगभर हिंडतात. अरबस्तान, इंग्लंड, अमेरिका वगैरे अनेक देशांमध्ये जातात. म्हणून आबू म्हणतो की, हल्लीच्या मुलांचा पाय जमिनीवर ठरतच नाही. ही मुले सतत फिरतीवर असतात. त्यांची प्रगती होत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 17
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली 18

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने …………………………..
2. फरसूच्या मते, जमीन नसेल तर ………………………….
उत्तर:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने अमाप पैसा मिळाला. आता मरेपर्यंत सुखात राहता येईल.
2. फरसूच्या मते, जमीन नसेल, तर ढोरासारखे जीवन उपयोगाचे नाही. आपले आयुष्य संपले. आता पुढच्या मुलाबाळांना पायाखाली जमीनच राहणार नाही.

प्रश्न 2.
कसे/कशी ते लिहा:

  1. इमारत वर येत होती – …………………………………………….
  2. चांदण्या प्रकाशात धूड भासत होते – …………………………
  3. इमारतीची सावली – ………………………………………………..
  4. शेताला कवटाळत अस्ताव्यस्त पसरली होती – ……………………………

उत्तर:

  1. कोंबासारखी
  2. अक्राळविक्राळ
  3. काळी ठिप्पूस
  4. सुस्तावल्यासारखी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे,’ या विधानाचा आशय तुमच्या शब्दांत सांगा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. 1 ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल, असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमीन विकली, तर आपल्या

आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात; माणूस मनाने उद्ध्वस्त होतो; हे त्यांच्या लक्षात येत नाही. दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळविक्राळ राक्षसच आहे, असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे, असे त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकूळ होतो; विकल होतो. हा सर्व भाव ‘मातीची सावली’ या दोन शब्दांतून व्यक्त होतो.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:

समासाचे नाव सामासिक शब्द विग्रह
1. समाहार वंद्व केरकचरा केर, कचरा वगैरे
2. द्विगू षण्मास सहा महिन्यांचा समूह
3. कर्मधारय सुविचार चांगला असा विचार
4. इतरेतर द्वंद्व इंद्रादी इंद्र आणि इत्यादी देव

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘ता’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. ममता
  2. नम्रता
  3. उदारता
  4. सुंदरता.

3. वाक्प्रचार/म्हणी:

प्रश्न 1.
डोळे भरून येणे –
1. खूप रडणे
2. दुःख होणे
3. डोळ्यांत पाणी येणे.
उत्तर:
दु:ख होणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. सावली
  2. जन्म
  3. पाप
  4. शाप.

उत्तर:

  1. सावली × ऊन
  2. जन्म × मृत्यू
  3. पाप × पुण्य
  4. शाप × आशीर्वाद.

प्रश्न 2.
पुढील नामांआधी कंसातील योग्य विशेषणे जोडा: (चकचकीत, गुबगुबीत, गुळगुळीत, खरबरीत)

  1. ………… पायरी
  2. ………….. बोटं
  3. …………… घर
  4. …………… केळी

उत्तर:

  1. गुळगुळीत पायरी
  2. खरबरीत बोटं
  3. चकचकीत घर
  4. गुबगुबीत केळी.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द निवडून लिहा:

  1. विहिर, वीहिर, विहीर, वीहीर.
  2. निच्शय, नीश्चय, निश्चय, नीच्शय.
  3. ऐसपैस, एसपैस, ऐसपैस, ऐसपेस.
  4. पूण्याई, पुण्याई, पूण्याइ, पुन्याइ

उत्तर:

  1. विहीर
  2. निश्चय
  3. ऐसपैस
  4. पुण्याई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1. बाबा चला जेवून घ्या मनू म्हणाला
2. आबा म्हणाले अरे अया रडते काय फरसू
उत्तर:
1. “बाबा, चला, जेवून घ्या,’ मनू म्हणाला.
2. आबा म्हणाले, “अरे, अया रडते काय फरसू?”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Corporation
  2. Handbill
  3. Index
  4. Refreshment.

उत्तर:

  1. महामंडळ, निगम
  2. हस्तपत्रक.
  3. अनुक्रमणिका
  4. अल्पोपाहार.

मातीची सावली Summary in Marathi

प्रस्तावना:

प्रसिद्ध लेखक. कथा, बालकथा, व्यक्तिचित्रण, ललित लेखन, अनुवादित लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांची एक कथा आहे. आधुनिक जीवनाचा, शहरी जीवनाचा प्रभाव वाढत जाऊन शेती व शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हळूहळू लोप पावत आहे. अशा वेळी नामशेष होत असलेल्या संस्कृतीच्या परंपरेच्या वारसदारांची होणारी उलघाल या कथेत सांगितली आहे. ही कथा प्रमाण भाषेतच आहे.

पण तिच्यातील संवाद हे बोलीभाषेतील आहेत. उत्तर कोकणाच्या वसईपर्यंतच्या किनारपट्टीतील परिसरात बोलली जाणारी ही एक बोली आहे. फरसू हा एक गरीब शेतकरी. तो पारंपरिक समाजजीवनाला अनुसरून जगणारा. जमीन, शेती, झाडेपाने यांच्यावर मनापासून, जिवापाड प्रेम करणारा. या सर्वांशी त्याचे रक्ताचेच नाते निर्माण झाले आहे. पूर्वजांनी जी वाट मळून ठेवली आहे, त्या वाटेने जाण्यात त्याला धन्यता वाटते. मनू त्याचा मुलगा. त्याला फरसूने वाढवले, शिकवले.

शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी लागली. त्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. चकचकीत, गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याने बिल्डरला जमीन विकली. फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खाणाखुणा पुसून टाकणाऱ्या एकेक घटना घडू लागल्या. त्यामुळे फरसू विकल झाला. असहायतेने तो परिस्थितीला शरण गेला. त्याच्या वेदनांचे चित्रण या कथेत आलेले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली

शब्दार्थ:

  1. खरबरीत – खरखरीत.
  2. डाफरायची – रागाने खेकसून बोलायची.
  3. दुसऱ्या वितापर्यंत – (एक वासरू जन्मल्यापासून) दुसऱ्या वासराचा जन्म होईपर्यंत.
  4. कोरड्याठाक – पूर्ण कोरड्या.
  5. खोडा – हातपाय अडकवून शिक्षा करण्याचे उपकरण, उनाड गुराच्या गळ्यातील लोढणे.
  6. तुमश्या – तुमच्या.
  7. नशिबाई – नशिबाची.
  8. रेल – राहील.
  9. रेतात – राहतात.
  10. मेणवात – (शब्दश: अर्थ : मेणबत्तीची वात.) इथे अर्थ : प्राण.
  11. लागलोआ – लागला असता.
  12. माणसाहारकं – माणसासारखं.
  13. घालाशी – घालायची.
  14. ढोरहारकं – ढोरांसारखे, गुरांसारखे.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. खोडा घालणे – संकटे निर्माण करणे.
  2. उघड्यावर टाकणे – जबाबदारी झटकणे, जबाबदारी घेण्यास नकार देणे. जबाबदारी नाकारून असहाय स्थितीत ढकलणे.
  3. टकळी चालणे – बडबड करणे, सतत बोलत राहणे.
  4. मेणवात विझून जाणे – मरण पावणे.
  5. नजर लागणे – (एखादया व्यक्तीमुळे) काहीतरी वाईट घडणे.
  6. पापांचा घडा भरणे – सर्वनाशाचा क्षण येणे.
  7. संसार फुलणे – संसारात सुखसमृद्धी येणे.
  8. मातीला मिळणे – उद्ध्वस्त होणे, विनाश होणे.
  9. नाळ तुटणे – संबंध न राहणे.
  10. डोळे भरून येणे – डोळ्यांत पाणी येणे.

बोलीभाषेतील वाक्यांचा अनुवाद

1. वाक्ये: यी बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का?
भाषांतर: ही विहीर नाही. नदी आहे नदी. एखादयाच्या कार्यात अडथळे आणले, तर तुमच्या नशिबाची वाळू झाल्याशिवाय राहील का?

2. वाक्ये: काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे ! अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी?
भाषांतर: कसली स्वप्ने पाहत उभे राहतात, कोण जाणे ! अख्खा दिवस आम्ही काय रांधतच (स्वयंपाक करीतच) बसायचे काय?

3. वाक्ये: नय् ते उबा जलम त्या गोठ्यात काडाला लागलोआ. आज माणसाहारकं घर मिळालंय.
भाषांतर: नाही तर उभा जन्म त्या गोठ्यात काढावा लागला असता. आज माणसासारखे घर मिळाले.

4. वाक्य: जेजूस आथं मानासुदं नेलं ते बरं होईल.
भाषांतर: हे येशू, आता मलासुद्धा नेलेस तर बरे होईल.

5. वाक्य: आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं.
भाषांतर: आमचा फरसू खरेच म्हातारा झाला आता.

6. वाक्य: तू आपला नुसता रडत बसलाय.
भाषांतर: तू आपला नुसता रडत बसला आहेस.

7. वाक्य: ते शाप मीस भोगीन.
भाषांतर: ते शाप मीच भोगीन.

8. वाक्य: माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ?
भाषांतर: माती (जमीन) नसेल तर ते ढोराचे जीवन तरी काय कामाचे?

9. वाक्य: पण आमशी नातंपण… त्यांना कायच नय् येणार रे…
भाषांतर: पण आमची नातवंडे… त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही रे…

9th Std Marathi Questions And Answers:

Englandcha Hivala Question Answer Class 9 Marathi Chapter 10.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Question Answer Maharashtra Board

इंग्लंडचा हिवाळा Std 9 Marathi Chapter 10.1 Questions and Answers

1. कारण लिहा:

प्रश्न 1.
कारण लिहा:
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे –
उत्तर:
लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही. वातावरणात मजेदार गारवा असतो. चार-पाच मैल चालूनही थकवा येत नाही. परिसर हिरवागार राहतो; म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

2. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 1
उत्तर:

भारतामधील धुके लंडनमधील धुके
1. मनाला सुखद संवेदना देते. 1. लंडनचे धुके औरच आहे.
2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. 2. वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते.
3. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. 3. काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.
4. धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. 4. वर्षातून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते.

3. इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.

प्रश्न 1.
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात. घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात. झाडाला हात लावला की हात काळे होतात.

अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

4. स्वमत:

प्रश्न (अ)
‘हिवाळ्यातील एक क्षण,’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
उत्तर:
गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय चारधामच्या यात्रेला ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो. गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती. रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना नव्हती. पहाटेच मला जाग आली. बाहेर थंडी होती. उबदार शाल लपेटून मी बाहेर आलो. गच्च धुक्याची चादर लपेटलेली झाडे नि गंगेच्या धारेवर बर्फाची ओढणी अंथरली होती. ऑक्टोबर महिना असल्यामुळे पर्वतावरील बर्फ वितळले होते. पण शिखराशिखरांवर बर्फाचे भलेमोठे पुंजके होते. मी त्यांच्याकडे भान हरखून पाहत होतो. इतक्यात एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने तळपला. हे दृश्य केवळ विलोभनीय होते. एक क्षणभरच हे अलौकिक सौंदर्य उमटले नि लुप्त झाले. हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

प्रश्न (आ)
तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर:
वर्षाऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. तापलेल्या मातीवर पावसाचा शिडकावा झाला की मातीचा है सुगंध येतो. सारी सृष्टी न्हाऊन निघते. डोंगरदऱ्यांत पाणी खळाळते. झाडे अंघोळ करून स्वच्छ होतात. नदीनाले भरभरून वाहू लागतात. गुरेढोर, पशुपक्षी यांना पाणी मिळते. शेतकरी आनंदित होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात. मुले आनंदाने बागडतात. सर्वत्र हिरवेगार होते. सृष्टी आपले रूप पालटते. चराचरावर आनंदाची लकेर घुमते. कवी लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात. खरेच! पाऊस हा नवसृजनाचा ऋतू आहे!

प्रश्न (इ)
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
ऐन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो. आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हाला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही. सर्व परिसराला धुक्याने जणू बाहूत कवटाळले होते. डोंगरदरी धुक्याच्या आइसक्रीमने ओतप्रोत भरली होती. झाडे धुक्याचे पांघरूण घेऊन पेंगत होती. रस्त्यावर दहा फुटांच्या पुढचे दिसत नव्हते. तोंडातून कुंकर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली.

अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांदयांची खूप झाडे होती. अचानक क्षणभर ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या पायथ्याशी उन्हाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. मला अशोक बागवे याच्या कवितेची एक ओळ आठवली – ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिवळे दर्वळे’ धुक्यातील दिवसांतील हा क्षण माझ्यासाठी केवळ मोलाचा ठरला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

5. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

प्रश्न 1.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 2

अपठित गद्य आकलन:

आपण पाठ्यपुस्तकात गदय व पदय पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विद्यार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्यउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गदय उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.

1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्रश्न 1.
दुष्परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा 3

2. अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत, ते लिहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

भाषा सौंदर्य :

एकच भाव वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त करणे-
एखादे रिकामे घर पाहिल्यावर तुमच्या मनात येणारे विचार.

  1. घर उदास वाटते.
  2. घर कुणाची तरी आठवण काढते.
  3. घर स्वत:चे एकेकाळचे वैभव आठवून उदास झाले आहे.
  4. घराला गाव सोडून गेलेल्या माणसांची आठवण येते.
  5. एकेकाळी माणसांनी भरलेले घर आज एकाकी वाटते.

विद्यार्थ्यांनो, ही यादी कितीही वाढवता येईल. भाषेच्या अशा अर्थपूर्ण आणि सृजनशील रचनांचा अभ्यास कराव आपले लेखन अधिक परिणामकारक करा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
इंग्लंडमधील हिवाळा आणि भारतातील हिवाळा यांची तुलना करा.
उत्तर:
इंग्लंडमध्ये हिवाळ्यात कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. भारतात मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. भारतातील काही भागांत तर अत्यंत प्रखर, तीव्र उजेड असतो; तर काही भागांत उजेड भरपूर प्रमाणात असतो, पण तापमान कमी असते. इंग्लंडमध्ये अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव आढळतो. भारतात मात्र, माणसे, प्राणी व वाहने सावलीसोबतच चालत, धावत असतात. इंग्लंडमध्ये पर्णहीन वृक्षांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही.

भारतामध्ये झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकत असतात. सावली पडावी इतका प्रकाश इंग्लंडमध्ये महिनोन् महिने पडत नाही. त्यामुळे वस्तूंवर छायाप्रकाशाचे खेळ दिसत नाहीत. पण भारतात प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची असते. असा इंग्लंडमधील हिवाळा व भारतातील हिवाळा यांत फरक दिसून येतो.

इंग्लंडचा हिवाळा Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात इरावती कर्वे यांनी इंग्लंडमधील पावसाळी धुके व हिवाळ्याचे वर्णन केले आहे. तसेच या ऋतूंमधील आपल्याकडील वातावरणाशी तुलना केली आहे. अतिशय विलोभनीय शब्दांत ऋतूंमधील साम्य व भेद यांचे दृश्य चितारले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर इंग्लंडमध्ये रोज पाऊस पडायचा. लंडनवासी या पावसावर वैतागत असायचे, पण कायम पडणाऱ्या पावसाची लेखिकेला खूप मौज वाटायची.

2. आपल्याकडचे धुके मनाला सुखद संवेदना देते. पावसानंतरचे प्रसन्न आकाश, सकाळ-संध्याकाळची थंडी, लांबवर दिसणारे स्वच्छ वातावरण, त्यात थोडा वेळ राहणारा धुक्याचा पडदा, अशी आपल्याकडील धुक्याची वैशिष्ट्ये! महाबळेश्वरावर किंवा सिंहगडावर खालची दरी धुक्याने भरलेली दिसते. सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्ये उमटतात. सूर्य आणखी थोडा वर आला की धुके निघून जाते व गवताच्या पात्यांवर असंख्य दवबिंदू चकाकतात. संध्याकाळचे धुके रात्र निवळली की नाहीसे होते व रात्री आकाश तारकांनी चमकत असते.

3. लंडनचे धुके औरच आहे. काळसर पांढुरके धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते. लंडनमधील कारखाने व लक्षावधी चुली वातावरणात धूर ओकत असतात. अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसतात. काळोख डोळ्यांना दिसतो. हाताने धरता येतो. असे काळे धुके वर्षातून एक-दोनदा लंडनवर पसरते. या धुक्याने हाहाकार माजतो.

4. हिवाळ्यात लंडनमध्ये कित्येक आठवडे संधिप्रकाशाइतकाच उजेड असतो. या अर्धवट उजेडात प्रकाश व सावली यांचा अभाव असतो. निरनिराळ्या बगिच्यांत पर्णहीन वृक्ष उभे असतात. त्यांची सावली खालच्या हिरवळीवर पडत नाही. येथे सावली पडेल इतका स्वच्छ उजेड महिनेच्या महिने पडत नाही.

5. आपल्याकडील हिवाळ्यात रखरखीत ऊन व त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने चकाकतो. माणसे व वाहने सावलीनिशी धावत असतात. प्रत्येक वस्तूची एक बाजू प्रकाशमय व दुसरी बाजू सावलीची ! खांबाला चिकटून असलेल्या सावलीत पक्षी टेलिग्राफच्या तारावर बसलेले दिसतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली धरून चालतात. झाडाखालच्या दाट सावलीत प्रकाशाचे गोल कवडसे चमकतात.

6. एकदा लेखिका हिवाळ्यातच सेंट जेम्स बगिच्यात गेल्या. तेथील तळ्यावरचा प्रकाश खालून वर फाकला होता; कारण वर सूर्य नसलेले अभ्राच्छादित आकाश होते. तळ्याच्या पाण्यावर बर्फाचा पातळ थर साचला होता. त्यावर प्रकाश परावर्तित होऊन सगळीकडे फाकला होता. या विशेष प्रकाशात सर्व रंग आंधळे वाटतात. वसंतऋतूत एखादया दिवशी इथे सूर्यप्रकाश पडला की सृष्टी रंगाने नटते. येथील रंग जरा मंद व सौम्य वाटतात. आपल्याकडे दाट सावल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक भासतात.

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani Dharila Pandharicha Chor Question Answer Class 9 Marathi Chapter 2.2 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Question Answer Maharashtra Board

संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Std 9 Marathi Chapter 2.2 Questions and Answers

1. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 1

2. जोड्या लावा:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
उत्तर:

                   ‘अ’ गट ‘ब’ गट
1. विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
2. विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
3. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.

प्रश्न (आ)
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा.
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *

प्रश्न (इ)
प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्रीविठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा.
उत्तर:
श्रीविठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा, असे संत जनाबाई यांना वाटते आहे. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्याच्यावर सोहं शब्दाचा मारा केला. इतकेच नव्हे; तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

4. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल, तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे.

उपक्रम:
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई 2

उत्तर:

  1. पंढरीचा चोर
  2. बंदिखाना
  3. हृदयाचा
    1. शब्दांची
    2. सोहं शब्दाचा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा:
1. पंढरीचा चोर म्हणजे (श्रीकृष्ण/श्रीविष्णू /महादेव/श्रीविठ्ठल) .
2. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण
(अ) त्याच्या पायात बेडी घातली.
(आ) त्याला हृदयात कोंडला होता.
(इ) त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.
(ई) त्याच्या गळ्यात दोर बांधला.

उत्तर:

  1. विठ्ठलाला धरले – भक्तीच्या दोराने
    1. विठ्ठल काकुलती आला – ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
    2. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी – शब्दरचनेच्या जुळणीने.
  2. पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल.
    1. श्रीविठ्ठल काकुलती आला; कारण त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर.
उत्तर: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर

1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत जनाबाई.
2. कवितेचा विषय → विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. बेडी = साखळी
  2. जीव = प्राण
  3. पाय = पद
  4. हृदय = जिव्हार.

4. कवितेतून मिळणारा संदेश → भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:

‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।
→ संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला।।’
उत्तर:
आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

भाषाभ्यास:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आत
  2. चोर
  3. सोडणे.

उत्तर:

  1. आत × बाहेर
  2. चोर × साव
  3. सोडणे × धरणे.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. जुड्या
  2. दोर
  3. हृदय
  4. बंदिखाने.

उत्तर:

  1. अनेकवचन
  2. एकवचन
  3. एकवचन
  4. अनेकवचन.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बंदीखाना, बंदिखाना, बंधिखाना, बंदिकाना.
2. पंन्ढरी, पंढरी, पंढरि, पंडरी.
उत्तर:
1. बंदिखाना
2. पंढरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

उपक्रम:

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील स्त्री-संत कवयित्रींची माहिती मिळवा.

संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई Summary in Marathi

कवितेचा आशय:

पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा; म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे. त्यासाठी चोर-शिपायाचे रूपक कवितेत वापरले आहे.

शब्दार्थ:

  1. गळां – गळ्यामध्ये.
  2. बंदिखाना – तुरुंग, कैदखाना.
  3. कोंडिला – डांबून ठेवला.
  4. शब्दें – शब्दांनी.
  5. जवाजुडी – कड्यांची साखळी.
  6. पायीं – पायात.
  7. बेडी – जखडून ठेवण्याची साखळी, साखळदंड.
  8. सोहं – अहंकार, मीपणा, व्यर्थ अभिमान.
  9. काकुलती – विनवणी करणे.
  10. बा – अरे.
  11. जीवें न सोडी – जिवंत सोडणार नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

श्रीविठ्ठलाबरोबर सुखसंवादरूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतात:

गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला (श्रीविठ्ठलाला) पकडले आहे. ।।1।।
माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे. ।।2।।
या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आहे. (भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.) ।।3।।
विठ्ठलावर मी (अहंकारी) अहंपणाचा भडिमार केला. ‘तू म्हणजे मीच’ असे सांगितले. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला. विनवणी करू लागला. ।।4।।
संत जनाबाई म्हणतात – अरे, विठ्ठला, मी तुला जिवंत सोडणार नाही. (माझ्या मनात कायम तुझा वास राहील, अशी तजवीज करणार आहे.) ।।5।।

9th Std Marathi Questions And Answers: