Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.1 हसवाफसवी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

11th Marathi Digest Chapter 3.1 हसवाफसवी Textbook Questions and Answers

कृती

1.

प्रश्न अ.
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

प्रश्न आ.
कारणे लिहा.

1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण…
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्यकलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश, लाईट यांची सवय असतेच. पण आता त्यांचे वय झाले होते. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री. वाघमारे शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असताना तिथला फोटोग्राफर त्यांना न विचारता, न सांगता आगंतुकासारखे त्यांचे फोटो काढत असतो. तो सारखं त्यांना ‘इथे बघा’, ‘तिथे बघा’ अशा सूचना देत असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचा प्रखर प्रकाश हेरंबकरांच्या डोळ्यांवर पड्न त्यांना त्रास होत असतो. डॉक्टरांनी प्रखर प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केलेली असते. म्हणून ते फोटोग्राफरवर चिडतात आणि परत आलास तर थोबाडीत देईन अशी धमकी त्याला देतात.

2. कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण”
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे स्वत:च्या सत्कार समारंभासाठी कोकणातून थेट मुंबईला येत असतात. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासभत्ता मिळणार असतो. वाटेत ट्रेनमध्ये एक चाहता त्यांना भेटतो. या चाहत्याने अगदी लहानपणापासून हेरंबकर यांची नाटके पाहिलेली आहेत. तो त्यांना त्याच्या कर्जतच्या घरी चलण्यासाठी आग्रह करत असतो. त्याचा आग्रह कृष्णराव हेरंबकर यांना मोडवत नाही. कारण तो त्याच्या डॉज गाडीतून कृष्णरावांना मुंबईपर्यंत सोडेन असे आश्वासन देतो. प्रत्यक्षात गाडी एकदम खटारा असते. रस्त्यात तिचा एकेक टायर पंक्चर होत जातो. शेवटी चारही टायर सपाट झाल्यावर गाडी रस्त्यातच बसते. त्यावेळी कोंबड्यांच्या गाडीत त्यांना लिफ्ट मिळते. मुंबईच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्याने नाईलाजास्तव कृष्णराव हेरंबकर कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार होतात.

2. थोडक्यात वर्णन करा.

प्रश्न अ.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
उत्तरः
कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारभाचे आयोजन मुंबई येथे श्री. वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासखर्च देण्यात येईल अशी बोली झालेली असते. म्हणूनच कृष्णराव या सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीत कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यानंतर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही ते हलवून बघतात. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारून सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कारसमारंभात घडतो.

प्रश्न आ.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर या कोकणात वास्तव्य करणाऱ्या संगीत नाट्य कलाकाराचा मुंबई येथे सत्कार होणार असतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सपत्नीक कोकणातील अंबुर्डी या गावातून टांग्यातून प्रवास करत कुंदनपूरला पोहोचतात. तिथून मग ते एस.टी पकडतात आणि पुण्याला पोहोचतात. मग तिथून ट्रेनेन मुंबईला येत असताना एका चाहत्याच्या आग्रहाला बळी पडून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

3. थोडक्यात लिहा.

प्रश्न अ.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वत:च्या सत्कार समारभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एस.टी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांच्या नाटकाचा निस्सिम चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला आनंदाचे भरते येते. ते इतके की तो थेट ट्रेनमध्येच कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे ही त्याच्या ध्यानात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना, त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही हा चाहता स्वत:च्या आनंदात मश्गूल असतो. “माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबुल करत असाल तरच मी तुमचे पाय सोडेन.” अशी धमकीवजा सूचना तो कृष्णराव यांना करतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांचे पाय गदागदा हालवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार दयायला लावते.

प्रश्न आ.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा-एस.टी., ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकांवर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व “कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.” असा धमकीवजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या २१ जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो.

4. स्वमत.

प्रश्न अ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तरः
‘हसवाफसवी’ ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्यकलावंताचा सत्कार समारभ संयोजक श्री. वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्षे ८७ पण तरीही तल्लख मेंदू, बोलण्यात मिस्किलपणा. तर वागण्यात खट्याळपणा. प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद यांचे उत्कृष्ट बेअरिंग सांभाळत आपल्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडवतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून आता शहाणपण आले आहे.

त्यामुळेच सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ हे कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवासभत्ता व थैली मिळणार होती त्याचे काय झाले हे सारखे विचारून घेतात व स्वत:तील व्यवहार शहाणपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. आपल्यातील कलाकाराचा त्यांना अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात आपण काम केले आहे ही बाब त्यांच्यातील कलाकाराला सुखावते. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे हे ते अत्यंत मार्मिकतेने स्पष्ट करतात. आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो या भावनेने ते सुखावतात.

म्हणूनच ट्रेनमध्ये भेटलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. या चाहत्याने त्यांना घातलेला साष्टांग नमस्कार, त्याचे गुजराती बायकांना लागलेले पाय, त्या बायकांच्या हातातील खाली पडलेले फरसाण याचे ते साग्रसंगीत विनोदी ढंगाने वर्णन करतात आणि स्वत:मधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. ‘उतारवयात काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आत्मचरित्र लिहितो’ असे देतात व कलाकाराला म्हातारपणी असे उदयोग करून पैसा कमवावा लागतो हे सांगून या मायावी दुनियेची दुसरी वास्तव बाजू उघड करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

मुद्दामहून एखादयाच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करणे त्यांना आवडते. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना चाहत्याने दिलेली डॉज गाडी बंद पडल्यामुळे त्यांना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याही गाडीचा अपघात होतो. पण चाहत्यांच्या प्रेमाचे पुण्य पाठीशी असल्याने आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ या पत्रात त्यांना ‘कृष्णराव’ हे नाव दिले याचे त्यांना विशेष कौतुक वाटते. पूर्वी काळी दोन मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी शून्य मध्ये तरी गाऊ शकतील की नाही यविषयी खंत व्यक्त करतात.

असे अत्यंत मार्मिक, विनोदी, व्यवहारदक्ष तरीही आतून हळवे असणारे कृष्णराव रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहेत. वय झाले तरी त्यांचा उत्साह संपलेला नाही. माणसामाणसांतील आपुलकी जपावी. पडदयामागील साथीदारांशी देखील जिव्हाळ्याने बोलावे, त्यांना प्रोत्साहन दयावे हा त्यांचा स्वभावविशेष आहे. कारण शेवटी नाटक हे टीमवर्क आहे याची त्यांना जाण आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी ते दक्ष आहेत. त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य जगाला सांगून सगळ्यांना शहाणे करून सोडावे या प्रवृत्तीचे ते आहेत.

प्रश्न आ.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
उत्तरः
नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितके नाटकाचे यश खात्रीलायक असते. नाटकाचे कथानक, शब्द जितके सशक्त तितके नाटक अधिक उंचीवर जाते. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद! खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद असतील तर आशय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या तीन्ही गोष्टी मिळून नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात. संदर्भ अधिक स्पष्ट होतात. कथानकाचा प्रवाह वेगात पुढे जातो.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
प्रस्तुत उताऱ्यातील दोन शाब्दिक विनोदाच्या उदाहरणांतून दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. पहिला प्रसंग म्हणजे कार्यक्रम संयोजकांची साहाय्यक मोनिका ही आपले नाव सांगते त्यावेळी कृष्णराव ‘मनुका’ असा तिचा उल्लेख करतात. आणि दोन्हीचा अर्थ एकच असे स्पष्टीकरण देतात. मोनिका – मनुका अशी जोडी निर्माण करून त्यातून शब्दनिष्ठ विनादाची पेरणी करतात. मोनिका ही गोड स्त्री आणि मनुका हे गोड फळ. त्यामुळे मोनिका जेव्हा नावाची दुरुस्ती करते तेव्हा दोन्हीचा अर्थ एकच आहे असे सांगून कृष्णराव शब्दकोटी करतात.

दुसऱ्या प्रसंगात मोनिका त्यांना “सध्या काय करता ? असा प्रश्न विचारते तेव्हा ‘आत्मचरित्र लिहतोय’ आणि त्याचे नाव ‘एक झाड – दोन कावळे’ असे आहे हे स्पष्ट करतात. त्यावर मोनिकाचा पुढचा प्रश्न असतो. प्रकृती कशी आहे ? या प्रश्नाचा रोख खरंतर कृष्णरावांची प्रकृती कशी आहे याकडे असतो पण मुद्दाम आपल्याला प्रश्नाचा रोख कळला नाही असे दाखवून कृष्णराव कुणाची, कावळ्यांची? असे विचारून तिला निरुत्तर करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

शाब्दिक विनोदाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोनिका तिच्या भूमिकेनुसार त्यांना त्यांची नाटके, दौरे, गायन यांविषयी प्रश्न विचारत राहते आणि कृष्णराव हेकेखोरपणे त्यांना हवी ती भलत्याच विषयाची उत्तरे देत बसतात. म्हणजे प्रश्न एका विषयाचा तर उत्तर भलत्या विषयाचे अशी रचना लेखकाने केली आहे. त्यातून शाब्दिक विनोद तर कधी प्रासंगिक विनोद घडत राहतात. कोंबड्यांच्या गाडीतून त्यांनी केलेला प्रवास किंवा ट्रेनमध्ये एका चाहत्याने भर गर्दीत घातलेला साष्टांग नमस्कार हे प्रसंग बोलण्याच्या ओघात येतात आणि त्यातून प्रंसगनिष्ठ विनोद घडत जातो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न आ.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
संगीत नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संयोजक वाघमारे यांनी मुंबईला केलेले असते. या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह कोकणातून मुंबईपर्यंतचा प्रवास करत कृष्णराव येतात. कृष्णरावांच्या बऱ्यावाईट काळात पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली आहे याची कृष्णरावांना जाण आहे. आपल्या पत्नीला आपली खूप काळजी आहे याचे त्यांना विशेष कौतुक आहे. ट्रेन प्रवासात एक चाहता त्यांच्या पायात पडून पाय गदागदा हलवतो आणि माझ्या घरी येण्याचे कबुल केल्याशिवाय पाय सोडणार नाही अशी आदेशवजा धमकी देतो.

त्यावेळी गदागदा हलणाऱ्या पायांमुळे कृष्णराव पडतील अशी भीती वाटून पत्नी त्यांना चाहत्याचे आमंत्रण स्वीकारायला लावते. तिला प्रसिद्धीची अजिबात हौस नाही. त्यामुळे संयोजक रंगमंचावर तिने यावे याविषयी आग्रही असतानाही ती सामान्य रसिकांप्रमाणे प्रेक्षकांत बसणे पसंत करते. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने असेल कदाचित पण ती पशु – पक्षी – प्राणी यांच्यावर मनापासून प्रेम करते. म्हणूनच कर्जत ते मुंबई हा प्रवास करताना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो तरी ती कटकट करत नाही. उलट कोंबड्यांशी सवाद साधत तिचा प्रवास मजेत पार पडतो.

कृष्णराव खूप बडबड करतात, अनावश्यक गोष्टी लोकांना सांगत बसतात हे तिला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या संवादाची गाडी स्टेजवर घसरली तर ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांना ‘पुरे पुरे’ चे इशारे करते. तिला प्रखर दिव्यांची तसेच लोकांसमोर येण्याची भीती वाटते कारण गावाकडील घरात ती कंदिलाच्या प्रकाशात वावरते. अशी अत्यंत साधी भोळी, पतीला सर्व ठिकाणी मनापासून साथ देणारी पण पतीच्या प्रसिद्धी वलयापासून दूर राहणारी कृष्णरावांची पत्नी सामान्य प्रेमळ स्त्रीचे प्रतिनिधित्व करते.

प्रश्न इ.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लक्ष्यार्थ म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार समजून घेणे. म्हणजे शब्दश: अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ लक्षात घेणे. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला ‘लक्षणा’ असे म्हणतात आणि त्यातून सूचित झालेल्या दुसऱ्या अर्थाला ‘लक्ष्यार्थ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘लक्ष्यार्थ’ या भाषिक संपत्तीचा यथार्थ वापर केला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

‘पायधूळ झाडणे’ याचा सरळ शब्दश: अर्थ म्हणजे पायाला लागलेली धूळ झाडणे. हे वाक्य कृष्णराव यांच्या चाहत्याच्या तोंडी आहे. ट्रेनमध्ये कृष्णराव भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. अतिउत्साहाने तो भर ट्रेनमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो आणि वरील वाक्य उच्चारतो. त्याचा अर्थ ‘तुमच्या पायाची धूळ जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात झाडणार नाही म्हणजेच जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येणार नाहीत, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. असा इशारा तो देतो. म्हणजेच इथे शब्दांच्या मूळ अर्थापक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार सूचित होतो म्हणून हे ‘लक्ष्यार्थ’ भाषिक शक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

11th Marathi Book Answers Chapter 3.1 हसवाफसवी Additional Important Questions and Answers

कृती : २
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘कृष्णराव’ हे नाव ज्या भूमिकेवरून पडले ती भूमिका व नाटक
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी 4

प्रश्न 2.
आगरकरांनी प्रसिद्ध केलेले पत्रक – [ ]
उत्तरः
सुधारक

आम्हांला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही ……………………………….. पुरे, पुरे, किती गातोस. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७२)

प्रश्न 3.
नाटक करण्यामागे कृष्णरावांचा हेतू –
उत्तरः
लोकांचं रंजन करणे.

प्रश्न 4.
आगरकर आणि टिळक यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकणारे परिच्छेदातील वाक्य.
उत्तरः
आगरकर व टिळक या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

प्रश्न 5.
नाटकात उल्लेख झालेले थोर नाटककार
[ ] [ ] [ ]
उत्तरः
[गडकरी] [खाडिलकर] [देवल]

स्वमतः

प्रश्न 1.
कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढवणारा प्रसंग तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे संगीत नाटकांमध्ये काम करणारे हरहुन्नरी कलाकार आहेत. राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर इत्यादी नाटककारांनी निर्माण केलेल्या संगीत नाटकात कृष्णराव काम करत असत. त्यांच्या कामाची दखल साक्षात समाजसुधारक आगरकर यांनीही घेतलेली आहे. असे हे हेरंबकर रंगमंचावर उभे रहात तेव्हा लोकांचं मनोरजन करणे हा एकमेव हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असे. समोरचा प्रेक्षक जर दाद देणारा असेल तर त्यांच्यातील गायकाची कळी अगदी खुलून जायची.

शास्त्रीय संगीताच्या तानावर ताना घेत ते पहाटेपर्यंत गात बसत. लोक वन्समोअर म्हणत की यांचा उत्साह अधिक वाढत असे. सौभद्र नाटकात ते कृष्णाची भूमिका करत तर पांडू शिवलीकर रुक्मिणीची भूमिका करत असे. त्यासाठी त्याला एका पायावर भार देऊन उभे रहावे लागे. उभे राहून त्याचा पाय दुखला की तो दुसऱ्या पायावर उभा राही. पण प्रेक्षकांनी दाद दिली की कृष्णराव हेरंबकर थांबतच नसत.

एकच पद अनेक वेळेला आळवत बसत. पांडू बिचारा थकून जात असे. त्यामुळे तो गाणाऱ्या कृष्णरावांना मागून टोचायचा आणि ‘पुरे पुरे ‘ अशी सूचना दयायचा. जेवढे कृष्णराव फॉर्मात यायचे तेवढा त्याचा उभे राहण्याचा कालावधी वाढत असे. त्यामुळे बिचाऱ्याचे पाय खूप दुखत असत. पण कृष्णरावांना त्याचे काही वाटत नसे. प्रेक्षकांना आनंद देणे हे त्यांचे ध्येय असल्याने पांडूच्या सूचनेकडे ते सरळ दुर्लक्ष करून आपले गाणे पुढे रेटत राहायचे.

प्रश्न 2.
मराठी संगीत रंगभूमीविषयी तुम्हांला असलेली माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे. संगीत नाटक लिहिणारे नाटककार हे काव्य आणि नाट्य यांखेरीज संगीत कलेतही प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य जाण असणारे कलाकारच यात भूमिका करू शकतात कारण नाटकाचा बहुतांश भाग हा पदयात असतो. तो भाग कलाकार गाऊन सादर करतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

मराठीमध्ये ‘संगीत स्वयंवर,’ ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत देवबाभळी’, ‘संगीत मृच्छकटिक’ अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्या काळात सादर केली गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर असे थोर नाटककार मराठी नाट्यसृष्टीत होऊन गेले. या नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य पार पाडले गेले.

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रांरभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यांनतर ‘सौभद्र’, ‘रामराज्यवियोग’, ‘द्रौपदी’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, संशयकल्लोळ, ‘एकच प्याला’ अशा संगीत नाटकांची पंरपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा सुवर्ण काळ होता.

हसवाफसवी प्रास्ताविक :

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे दिलीप प्रभावळकर एक ख्यातनाम लेखकही आहेत. ‘झपाटलेला’ ‘एक डाव भुताचा’ ‘चौकट राजा’ इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘बोक्या सातबंडे’ ‘चूकभूल दयावी घ्यावी’. इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. ‘बालसाहित्य पुरस्कार’, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘हसवाफसवी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘वासूची सासू’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘जावई माझा भला’ इ. विविध नाटकांमधून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरून अनेक वर्षे लोकांची त्यांनी करमणूक केली आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारखी त्यांची मालिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

हसवाफसवी पाठाचा परिचय :

‘हसवाफसवी’ ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा निखळ आणि निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक एकीकडे लोकांना हसवते व त्याचबरोबर अंतर्मुखही करते. प्रस्तुत पाठात सुप्रसिद्ध गायक आणि नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. या नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी स्वत: वेगवेगळ्या भूमिका साकारून रंगमंचावर धमाल उडवून दिली.

या प्रसंगात कृष्णराव हेरंबकर यांच्या सरकार दरबारी होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झालेल्या एका घरगुती सत्कार समारंभाचे वर्णन येते. कोकणातून अंबुर्डी गाव, मग तिथून एस.टी. ने पुण्याला आणि पुण्याहून ट्रेनने मुंबईपर्यंतचा त्यांचा सपत्नीक प्रवास सुरू आहे. ‘येणार आहेत – यायला निघाले आहेत – आले आहेत’ असा टप्प्याटप्प्याने त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.

या सत्कार समारंभाचे आयोजक – संयोजक वाघमारे हे धांदरट आहेत. त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका त्यांचा धांदटपणा आणखीनच वाढवते. अफलातून कल्पना, प्रसंगनिष्ठ विनोद, शाब्दिक विनोद, संवादात्मकता यांमुळे या नाटकातील प्रंसग रंगतदार झाले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

येण्याजाण्याचा खर्च आणि मानधन म्हणून पैशाची थेली त्यांना देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितलेले असते. त्यामुळे आल्या आल्या ते पहिले आपल्या प्रवासाचा तपशील संयोजकांना पुरवतात. कधी ते पैसे आपल्या हातात पडतील याची त्यांना घाई झाली आहे. त्यांना सत्कार समारंभात पोहोचायला उशीर का झाला असा प्रश्न मोनिका विचारते. त्यावर एक चाहता गाडीत कसा भेटला. त्याने भर गाडीत लोटांगण कसे घातले. त्या प्रक्रियेत त्याचे पाय गुजराती बायकांना लागून त्यांचे फरसाण, पापडी कसे गाडीतच खाली सांडले याचे साग्रसंगीत वर्णन ते मोनिकापुढे करतात.

त्या चाहत्याबरोबर ते त्याच्या कर्जतच्या बंगल्यावर जातात. तिथे भेट म्हणून त्यांना २१ कोथिंबिरीच्या जुड्या दिल्या जातात. खरंतर तो चाहता त्यांना परतीच्या प्रवासाला स्वत:ची डॉज गाडी देणार असतो. पण ती मध्येच पंक्चर होते. मग पुढचा प्रवास ते आणि त्यांची पत्नी कोंबड्यांच्या गाडीत बसून पूर्ण करतात. कोंबड्यांच्या आवाजाने हेरंबकरांचे डोके उठते तरी पत्नी मात्र मजेत कोंबड्यांबरोबर संवाद साधत असते.

कृष्णराव त्यांनी केलेल्या अजरामर भूमिकांची माहिती मोनिकाला देतात. मध्ये मध्ये शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोद निर्माण करून गंमत उडवून देतात. मोनिका जो प्रश्न विचारते त्याला थेट उत्तर न देता स्वत:ला हवे तेच म्हणणे सतत पुढे दामटत राहतात. बोलण्याच्या ओघात स्वत:च्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगून टाकतात. इतकेच नव्हे तर आपल्या गायकीचे प्रदर्शन करून सर्वांना खुश करतात.

हसवाफसवी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

सत्कार – आतिथ्य, मानपान (honour), सोहळा – उत्सव (festive ceremony), तसदी – त्रास (trouble, pain), पांघरणे – अंगावर घेणे (to cast loosely around the body, to cover), प्रवासभत्ता – प्रवासखर्च (travelling allowance), चाहता – कलाकारावर, कलाकाराच्या कलेवर प्रेम करणारा (fan), कंदिल – दिवा (lantern), फाफलणे – बोलताना भलतेच शब्द मुखावाटे बाहेर येणे. भग्नावशेष – नष्ट झालेला, उरलेला भाग (broken, shattered remaining part) आहार – खाणे, पथ्य (food, diet), आत्मचरित्र – जीवनचरित्र (biography), कलकलाट – गोंधळयुक्त आवाज (a great confused noise), जबरदस्ती – बळजबरी (great force).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी

हसवाफसवी वाक्प्रचारः

आत सटकणे – आतल्या बाजूस निघून जाणे, थोतरीत लावून देणे – थोबाडीत देणे, हर्षवायू होणे – आनंद होणे, चमत्कारिक वाटणे – ओशाळवाणे वाटणे, लाजल्यासारखे होणे, पायधूळ झाडणे – प्रवेश करणे, कलकलाट करणे – गोंधळ करणे, डोकं उठणे – डोकं दुखणे, कानपटीत मारणे – थोबाडीत मारणे, पथ्य पाळणे – आहाराच्या संदर्भात विशिष्ट काळजी घेणे किंवा आहाराविषयी विशिष्ट नियम पाळणे, मश्गूल होणे – मग्न होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

11th Marathi Digest Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
(a) नाटक, कथा
(b) नाटक, एकांकिका
(c) नाटक, काव्य
(d) नाटक, ललित
उत्तरः
(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न आ.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .
(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.
(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
(c) नाटकाची जाहिरात होते.
(d) नाटकाची संहिता वाचता येते.
उत्तरः
(b) नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

प्रश्न इ.
नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण
(a) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(b) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(c) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(d) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
उत्तरः
(b) नाटक ही दृक-श्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

2. चुकीचे विधान शोधा.

प्रश्न अ.
(a) अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
(b) विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
(d) संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
उत्तरः
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

प्रश्न आ.
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
(b) नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
(c) नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
(d) नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
उत्तरः
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
(a) परस्परविरोधी स्वभावांतून संघर्ष निर्माण होतो.
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
(c) भूमिकांच्या नात्यात परस्पर संघर्ष दाखवता येतो.
(d) भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
उत्तरः
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

प्रश्न ई.
(a) नाटकात संहिता महत्त्वाची असते.
(b) नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
(c) नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
उत्तरः
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.

3. प्रश्न अ.
फरक स्पष्ट करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 1
उत्तर :

प्रायोगिक नाटक  व्यावसायिक नाटक
1. या नाटकातील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. व्यावसायिक नाटकात विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांवर आधारित संवाद असतात.
2. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले असते. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते.
3. प्रायोगिक नाटकांच्या आकृतिबंधात, विषयांत नाविन्यता असते. व्यावसायिक नाटकांचे विषय कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक यांवर आधारित असतात.
4. प्रायोगिक नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप प्रामुख्याने करमणूकप्रधान असते.
5. प्रायोगिक नाटकांमध्ये नेपथ्य, अभिनय, तंत्र यामध्ये जाणीवपूर्वक बदल केलेला असून व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळेपणा जाणवतो. व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांना महत्त्वाचे स्थान आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 2
उत्तर :

नाटक इतर साहित्य प्रकार
1. नाटक हा समूहाचा आविष्कार असून त्यात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश असतो. कथा, कादंबरी व कविता हे इतर साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत.
2. नाटकामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून असंख्य प्रेक्षक एकाच वेळी त्याचा दृश्य स्वरूपात अनुभव घेऊ शकतात. कथा व कादंबरी या साहित्यप्रकारात फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात.
3. नाटक सामूहिकरित्या रंगमंचावर, कलाकारांना सादर करता येते. कथा, कवितांचे वाचन रंगमंचावर करता आले तरी त्याचे सादरीकरण करता येत नाही.

प्रश्न आ.
खालील कृती करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 10

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 4
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 11

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(c)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 5
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 12

(d)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 6
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 13

(e)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 14
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 15

(f)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 16
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 17

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 7
उत्तर :

घटना/कृती परिणाम
1. एखादया प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो. नाट्य निर्माण होते.
2. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन नाटकाचे यश खात्रीलायक.
3. नाटकात संघर्ष असला तर कथानकातील आशयातरंगत येते किंवा नाटक परिणामकारक वठते.
4. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख सांगावेसे वाटते. साहित्याची निर्मिती होते.

4. स्वमत.

प्रश्न अ.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ते लिहिणारे, अभिनय करणारे कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्या सहकार्यावर नाटकाची यशस्विता अवलंबून असते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. नाटकाचा प्रयोग आशय व प्रयोग या दोन्ही दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेक जणांचा समन्वय व प्रयत्न महत्त्वाचे असतात. कलावंत, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, दिग्दर्शक यांचा समावेश त्यांत असतो. पडदयामागील कलाकारांचे श्रेयही यात तेवढेच आहे.

दिग्दर्शक : लेखकाच्या संहितेएवढेच दिग्दर्शकाचे महत्त्वही नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक बाजू या दोन्ही दृष्टीने दिग्दर्शक एकात्मिक विचार करतो. नृत्य, अभिनय, संगीत या कलांचीही जाण त्याला असणे महत्त्वाचे असते. संहितेवर नोंदी करून त्या कलाकार व तंत्रज्ञाला त्याची कल्पना त्याला दयावी लागते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नेपथ्यकार : नाटकातील स्थळ, काळ व कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दृश्यांना योग्य पडदे, वस्तू यांची मांडणी नेपथ्यकार करतो. कलाकारांचे कपडे, विग्ज, झालरी व त्याला अनुरूप संगीत, प्रकाशयोजना या सर्व घटकांचा अंतर्भाव नेपथ्यामध्ये असतो. कथानकाला साहाय्य होईल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती म्हणजे नेपथ्य.

प्रकाशयोजना : प्रकाशयोजनेसाठी रंगमंचावर विविध साधनांचा उपयोग केला जाते. फ्लडलाइट्स, स्पॉटलाइट्स, डीमर इ. रात्रीच्या प्रसंगात रंगभूमीवर अंधार दाखवण्यासाठी डीमरचा उपयोग करतात. एखादया मुख्य कलाकाराचा प्रवेश (एण्ट्री) स्पॉटलाइटच्या मदतीने तसेच प्रवेशबदलाची सूचनादेखील प्रकाशयोजनेतून दिली जाते. पार्श्वसंगीतः कथानकातील प्रसंगांना अनुकूल, पात्रांची मनस्थिती अधोरेखित करण्यासाठी, नाटक गतिमान करण्यासाठी आणि वातावरणनिर्मितीसाठी नाटकातील पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. यादृष्टीने ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांचा उल्लेख करावा लागेल.

रंगभूषा : नाटकात रंगभूषेला फार महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन कलावंतांचा चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. लांबच्या प्रेक्षकांनासुद्धा नटांचा चेहरा व्यवस्थित दिसावा या दृष्टीने रंगभूषाकार काम करत असतो. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात मेकअप, (रंगभूषा), वेशभूषा व केशभूषा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. नाटकात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा कलावंत आपल्या संवादफेकीतून, आवाजातील चढ-उतारांतून, हावभावातून आपल्या अभिनयाद्वारे सशक्तपणे लोकांसमोर जिवंत करतात.

प्रेक्षक : या नाटकाचे सादरीकरण पाहण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रेक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानेच हा खेळ रंगत असतो. म्हणूनच नाटक हे एकाचे काम नसून तो एक सांघिक आविष्कारच म्हणता येईल. त्या सर्वांवर नाटकाची सफलता असते.

प्रश्न आ.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
1. नाटकाचे नेपथ्य
2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
3. नाटकातील संवाद
4. नाटक अनेक कलांचा संगम
5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
उत्तरः
1. नाटकाचे नेपथ्य : नेपथ्य म्हणजे नाटकाच्या कथानकाला साहाय्यकारी ठरेल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती होय. हे नेपथ्य जो करतो तो नेपथ्यकार. कथानकातील स्थळ, काळ यांना सुसंगत ठरतील अशा वस्तू, नाटकातील नटांचे कपडे, त्यांना भूमिकेनुरूप लागणारे विग्ज, रंगमंचावर (स्टेजला) लागल्या जाणाऱ्या झालरी, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये असतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी मांडणी नेपथ्यकार करतो.

2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : प्रकाशयोजनेसाठी रंगभूमीवर विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रकाशयोजना हा नेपथ्याचाच भाग असतो. स्पॉट्स, फ्लडलाइट्स, फूटलाइट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विदयुत उपकरणाला ‘डीमर’ असे म्हटले जाते. नाटकात एखादा रात्रीचा प्रसंग दाखवायचा असेल तर या डीमरच्या साहाय्याने रंगभूमीवर संपूर्ण अंधार केला जातो. या प्रकाशयोजनेच्या माध्यमातून एखादया प्रवेशबदलाची सूचनादेखील देता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

3. नाटकातील संवाद : मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांमधील विविध भाव-भावनांचे, अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक. या चित्रणासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होत. लेखकाने लिहिलेले संवाद नाटकांतील पात्रांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येतो. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्याही घेतात. नाटकाच्या विषयाला साजेसे उत्तम संवाद नाट्यातील आशय अचूक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्रांच्या संवादफेकीच्या शैलीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना समजतो.

4. नाटक अनेक कलांचा संगम : महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. पूर्वी लळित, दशावतार, वगनाट्य, तमाशे असे मनोरंजनाचे प्रकार होते. यातूनच नंतर नाटक हा प्रकार उदयास आला जो समूहाचा आविष्कार असतो. नाटकाशी संगीत, नृत्य, वक्तृत्व, कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला, रंगभूषा अशा बहुतेक सर्व कला संबंधित आहेत. नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने कथेनुरूप आलेल्या संगीत, नृत्य, काव्यात्म व अर्थपूर्ण संवाद यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो आणि त्यामुळे कथेचा आशय उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

अशा तहेने अनेक कलांचा संगम नाटकामध्ये झाला असल्याने त्यामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. रंगमंचावरील सादरीकरणामुळे प्रेक्षकांना या कलांचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या अनुभूतीने प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांचे रोजचे धकाधकीचे जीवन आनंदी व अर्थपूर्ण, समृद्ध करण्यात या कलांचे फार मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा : नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धा, अनेक रूढी परंपरा, चालीरीती यांसारखे अनेक अडथळे होते. स्त्रीजीवन धर्मबंधनांमुळे जखडले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामाजिक वातावरणही पोषक नव्हते. स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेदेखील स्वातंत्र्य नव्हते. फक्त ‘चूल व मूल’ हेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे नाटकात काम करणे ही तर फारच चौकटीबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे स्त्रिया तयारही होत नसत. त्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणे तर फारच कठीण. त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रेच साकारत असत. त्याकाळी नाटकातील कलावंतांना आजच्यासारखी प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्व यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारल्या आणि आजही त्यांच्या नाटकांतील पदे लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या भूमिका त्यामुळेच अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. लेखकाला जो विषय सांगायचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. नाटकांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण विविध विषयांतून झालेले दिसते आणि ही परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळातील वास्तव चित्रण नाटकातून होते. सामाजिक समस्या मांडल्या जातात. मानवी भाव-भावना, स्वभाव यांमधील विविध छटांचे दर्शन नाटकांतून होते. माणसाच्या आयुष्यातील अवतीभवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेऊन नाटक साकार होते. पूर्वी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, हुंडा पद्धती, केशवपन इत्यादी सामाजिक ज्वलंत प्रश्न नाटकांच्या प्रयोगातून सादर केले जात. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकात जरठकुमारी विवाह या अनिष्ट प्रथेवर मार्मिक टीका केली आहे तर अनेक नाटकांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसारखे विषय निवडून चांगले विचार लोकांमध्ये रुजवून त्यांचा प्रसार करून जनजागृतीचे काम केले आहे. नाटक या दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनाच्या साथीने समाज जागृती घडवण्याचे काम खूप वर्षांपासून आजपर्यंत केले गेले आहे म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.

प्रश्न ई.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते.
  • संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन केलेली असते.
  • संगीत नाटकांत संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो.
  • संगीत नाटकातील संगीत व अभिनय यांमधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते.
  • शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो.
  • संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी.
  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग/गती देणारी असतात.
  • लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय.
  • संगीत नाटकामध्ये गायकाला साथ-संगत करणाऱ्या सर्व कलावंतांचाही मोठा सहभाग असतो.
  • आजदेखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे.

प्रश्न उ.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
नाटकात संहितेला महत्त्वाचे स्थान आहे. नाट्यसंहिता परिपूर्ण व दर्जेदार असेल तर नाटकाला हमखास यश मिळते. सशक्त कथानक नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो आणि कथानकात वैशिष्ट्यपूर्ण रचनेद्वारे नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक उत्तम असणे आवश्यक आहे. नाटककार आपल्या नाटकातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडतो. नाटकाचे ध्येय सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणे असून ते घडवताना माणसांच्या मनातील भाव-भावना, स्वभाव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

पात्रांच्या मनातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन होण्यासाठी स्वगताचा परिणामकारकरित्या वापर केलेला असतो. त्यासाठी नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकाचा तोल सांभाळला जाईल अशा पद्धतीने नाटकातील पात्रांच्या शाब्दिक चित्रणाची जबाबदारीसुद्धा नाटककाराला पार पाडणे आवश्यक असते. परस्परविरुद्ध स्वभाव, कृती व भाव-भावनांमधील तणाव यांमधून संघर्ष निर्माण होऊ शकतो.

कथानकातील आशयात संघर्ष येणे महत्त्वाचे. भूमिकांच्या परस्पर नात्यांमधील संघर्ष तसेच भूमिका व परिस्थिती यांमधील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक होऊन त्याची रंगत वाढते. त्यासाठी खटकेबाज, चुरचुरीत नर्मविनोदी संवादांची आवश्यकता असते. नाट्यातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातील संवाद करतात. कथानकामधील प्रसंग, दृश्य, काळ यांमधील बदलांसंबंधित सूचना कंसातील रंगसूचनांमधून नाटककार देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्यातील संदर्भ स्पष्ट झाल्यामुळे कथानकाचा प्रवाह सहजरित्या पुढे जातो.

आशयाला अनुरूप अशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देण्याचे काम करते. त्यातील भाषिक सौंदर्य संपूर्ण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तरः व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यावसायिक नाटकाच्या माध्यमाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात.
  • व्यावसायिक नाटकांचे स्वरूप हे प्रामुख्याने बोधपर व मनोरंजनात्मक असते.
  • एखादे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
  • नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचे नाते तयार होते. व्यावसायिक नाटके ही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर अधिक प्रमाणात असतात.
  • व्यावसायिक नाटकाची मांडणी प्रेक्षकांच्या आवडीनुसार केलेली असते.
  • व्यावसायिक नाटकातील संवाद हे विनोद, उपहास, श्लेष व शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होईल असे असतात.
  • व्यावसायिक नाटकाची निर्मिती बोध, मनोरंजन प्रेक्षकांना आवडणारी असून व्यावसायिक हेतूनेच झालेली असते.

प्रश्न ऊ.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमणे :

  • प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.
  • प्रायोगिक नाटकाच्या आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असते.
  • या नाटकांमध्ये आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.
  • स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात.
  • नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना त्याबरोबरच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा या नाटकात दिसून येतो.
  • प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता आणि परिचित नसलेली सूचकता यांचा कौशल्याने वापर केलेला दिसतो.
  • भाषिक प्रयोग केले जातात तसेच घटना सहज व नैसर्गिक करण्याकडे कल असतो.
  • या नाटकांमधील संवाद बरेचदा बोलीभाषेप्रमाणे असतात.
  • प्रायोगिक नाटकात आशयाला अनुरूप असणाऱ्या घटना, प्रसंगांवर भर दिलेला असतो.
  • या नाटकामध्ये आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हा कथा, कादंबरी, कविता यांप्रमाणे एक वाङ्मय / साहित्य प्रकार आहे. परंतु तो इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत परंतु नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा अंतर्भाव होतो. कथा कादंबऱ्यांमध्ये लेखक व वाचक हे दोनच घटक असतात पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून लेखकाचे शब्द नट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटक हे दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाटक रंगमंचावर दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते.

प्रश्न आ.
विदयार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विदयार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
उत्तरः
शिक्षक-पालक : कुणाल, शालांत परीक्षेत तू ९७.२०% मिळवून घवघवीत यश आज मिळवले आहेस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन! खूप आनंद झाला आहे ना.

11th Marathi Book Answers Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Additional Important Questions and Answers

कृती : १

स्वमत:

प्रश्न 1.
‘लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
नाटक ही आपल्या संस्कृतीमधील अगदी प्राचीन कला आहे. ज्याचे स्वतःचे शास्त्र आहे, अभ्यास आहे. एकाच वेळी अनेक विषयांना बांधून ठेवणारा हा साहित्य प्रकार आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद घडतो. यातन लोकांशी संवाद साधता साधता त्यांचे मनोरंजन करता येते. जेव्हा जेव्हा समाजात काही बदल, घडामोडी होत असतात तर त्याचे प्रतिसाद मनुष्य स्वभावावर, मानवी जीवनांवर होत असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

त्यातून भावनिक, मानसिक, सामाजिक राजकीय संघर्ष होतात. त्याची दखल नाटकाचा नाटककार घेत असतो. त्या नाटकातून समाजात बदल टिपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते प्रेक्षकांसमोर पोहोचवताना तो सुखात्मिका वा शोकात्मिकेच्या आधारे ते पोहोचवेल. त्याकरता नट रंगमंचावर सादरीकरण करताना अभिनय करतो. कृती, संवाद, स्वगत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांच्या आधारे नाटकातून लोकांशी संवाद साधल्याने केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनदेखील होते.

कृती : २.

प्रश्न 1.
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → [ ]
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे

कृती : ३.

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली → [ ]
उत्तर :
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली. → १९६०

उपयोजित कती

स्वमत:

प्रश्न 1.
‘आजच्या काळात करमणुकींचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आजच्या काळात करमणुकीची विविध माध्यमे लोकप्रिय आहेत. दृकश्राव्य माध्यमात चित्रपट, डी.व्ही.डी., दूरचित्रवाणी, नाटक यांचा समावेश होतो. परंतु नाटक पाहणाऱ्या लोकांची संख्या आजदेखील लक्षणीय असण्याचे कारण म्हणजे समाजातील चालीरीती काळानुसार बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या कायम राहिल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वाभावांतील विविध छटांचे दर्शन प्रेक्षकाला नाटकातून घडते. नाटकांची निर्मिती ही मुख्यत: मनोरंजनाच्या हेतूने केली जात असली तरी प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो.

त्यामुळे नाटक हे त्याला आपले वाटते. मानवी जीवनातील नाट्य प्रेक्षकांना नाटकातून पहायला मिळते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर होत असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रेक्षकांना आत्मिक समाधान मिळते. जे इतर करमणुकीच्या माध्यमांतून मिळत नाही. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न नाटकातून केला जातो. त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे आणि करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक हा कलाप्रकार जिवंत राहिला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नाटक- साहित्यप्रकार-परिचय प्रास्ताविक :

ललित साहित्यप्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेल्या सुख–दु:खाचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. त्यातूनच साहित्यनिर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मानवी भाव–भावना स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकांतून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृक–श्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असते. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

नाट्यसंहितेचे स्वरूप :

नाट्यसंहिता परिपूर्ण, दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेने तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यांतील संघर्ष, परिस्थिती व भूमिका यांमधील संघर्षामुळे नाटक परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते.

नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण :

कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार वेगळा आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे तर इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोन घटक असतात. विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील पहिले नाटक तर महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी लळित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरल्या.

संगीत नाटक :

अण्णसाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांनी भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतील एक मापदंड तयार केला. संगीताचा वापर हा त्यांतील महत्त्वाचा घटक होता.

संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. यात संवाद तुलनेने कमी असून अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवले जाते. या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप व कथानकाला पुढे नेणारी यातील पदे असतात. विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यांतील संगीतात असतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. १९०० सालच्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते.

यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’ व ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ यांनी संगीत नाटकाला समृद्धता प्राप्त करून दिली. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार नसत त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारत. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजदेखील अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रायोगिक नाटक :

नाटकाचा विषय व सादरीकरण यांत प्रयोग करणे हा या नाटकांचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, प्रसारमाध्यमांमध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झाले. तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली.

प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकाचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकांतील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगांचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे, आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते.

व्यावसायिक नाटक :

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोग केला जातो. समाजातील समस्या घेऊन अनेक व्यावसायिक नाटके निर्मिली गेली.

व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद या नाटकात असतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे.

नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषाकार आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकांचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्विता अवलंबून असते. पडदयामागच्या कलाकारांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्यप्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

प्रवृत्ती – स्वभाव (nature), परिचय – ओळख (introduction), संहिता – कथानक (script), आधुनिक – सध्याचे (modern), आस्वाद – चव, रुची (flavour, taste), खर्चिक – महागडा (expensive), प्राचीन – जुने (ancient, primitive).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 12 पैंजण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

11th Marathi Digest Chapter 12 पैंजण Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे
(१) आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची.
(२) रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची.
(३) जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.
उत्तरः
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची ! म्हणजे – जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

प्रश्न आ.
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे
(१) राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा.
(२) राजाच्या राणीचा तोरा मिरवायची.
(३) रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची.
उत्तर :
सारे दुर्लक्षून राजाराणीसारखी भिरभिरायची ! म्हणजे – रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची.

प्रश्न इ.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे
(१) घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक, सामाजिक बंधने सहन करते.
(२) स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दु:खं सहन करते.
(३) ऐच्छिक वेषभूषेसाठी सारे सहन करते.
उत्तर :
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे – घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक, सामाजिक बंधने सहन करते.

प्रश्न ई.
पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी पुढल्या का होईना शतकाआधी! म्हणजे
(१) पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे.
(२) पुढल्या शतकाआधी पाय जमिनीवर राहू दे.
(३) पुढल्या शतकाआधी काटे कमकुवत होऊ दे.
उत्तर :
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे – पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे.

2.
प्रश्न अ.
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
(१) नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे.
उत्तर :
संसाराचाही एक नाद असतो. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत संसाराचा नाद बाईलाच शिकवला जातो. त्याची रीतभात सांभाळण्यात बाईचा जन्म जातो. जे आपल्याला पढवलं गेलं त्याच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याची हिंमत बाईने दाखवली तर तिची अवहेलना केली जाते. शक्यतो अशी हिंमत करणाऱ्या स्त्रिया अभावानेच आढळतात. आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना आपलं पिचणं हा भूलभुलैय्या प्रमाण मानून बाई जगते. त्यात अडकते. त्यातून बाहेर पडत नाही.

(२) पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.
उत्तर:
प्राचीन काळापासून कौटुंबिक बंधनात अडकलेली स्त्री शिक्षणाचा परीस स्पर्श होता बदलली. पण तिच्यात झालेले परिवर्तन हे पुन्हा घरापुरतंच मर्यादित राहिलं. तिला स्वयंपाकघरातून गच्चीपर्यंत हिंडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. पण ते मिळाल्यामुळे आनंदित झालेली स्त्री अनेक ओझी, बंधनं स्वीकारतच राहिली. आमच्या घरी हे चालत नाही, ते चालत नाही म्हणून घराचं कौतुक सांगताना ती थकली नाही. पण एकीकडे आपल्याला दुसरे कोणतेच स्वातंत्र्य नाही याकडे दुर्लक्ष करून ती मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ लागली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

(३) मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
उत्तर :
कवयित्री ही आपल्या आजी, आईला घरात मिळणाऱ्या वागणुकीविषयी कवितेतून भाष्य करते तेव्हा त्या दोघींपेक्षा आपण जास्त सुखी आहोत असं तिला वाटतं. कवयित्री पैंजण, तोरड्या आपल्या पायात घालत नाही. काही बंधनं तिनं झुगारली पण तिनं चपला, बूट, सँडल जवळ केल्या. घर, अंगणाबाहेर पडली.

चपला, बूट, सँडल हे आधुनिकतेचे प्रतीक. आपल्या घराबाहेर पडताना कवयित्रीने या चपला, बूट, सँडल धारण केले. पण तेही तिच्या पायांना साथ देऊ शकले नाहीत. जगताना घराबाहेरची अनेक संकटे ती पेलू लागली. घरात राहताना घरातील संकटे, बंधने तर बाहेर पडली तरी घराबाहेरची संकटे होतीच. पण आर्थिक, निवड स्वातंत्र्यासाठी, स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी त्या सर्वच संकटांकडे ती दुर्लक्ष करू लागली. पण व्रण तर उमटत राहिले पायांवर, मनावर.

प्रश्न आ.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 3

प्रश्न इ.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री नीलम माणगावे यांच्या पैंजण कवितेत स्त्री स्वातंत्र्याचा विचार मांडला आहे. प्राचीन काळातील स्त्रीचे जगणे ते आधुनिक काळातील स्त्रीचे जगणे यांतील फरक कवयित्री स्पष्ट करते. यात चार पिढ्यांमधील स्त्रीमधील बदलत गेलेले स्वरूप कवयित्री कथन करते.

आजी, आई, मी, मुलगी या चार अवस्थांपैकी मी जी आहे तिचे वर्णन करताना कवयित्री सांगते की ही स्त्री चपला, पायात पैंजण, तोरड्या घालत नाही. तिच्या पायातील चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात हे सर्व त्रासदायक असते. या पायताणांचा त्रास होऊन पायाला या गोष्टी बोचत असतात.

कोणतीही एक चप्पल /सँडल कायमस्वरूपी नाही. त्या बदलत जातात पण त्या ज्या पायाला वेदना होतात ते पाय तेच असतात. कामाला ते पाय वणवण फिरतात. पण त्यामुळे तिला बाहेर पडता येतं. तिला काही निर्णय घेता येतात. तिला थोडं आर्थिक स्वातंत्र्य मिळतं पण त्यात ती पूर्णतः पिचूनही जाते.

प्रश्न आ.
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
पुरुषसत्ताक समाजरचनेमध्ये स्त्री आज स्वतःचे स्वतंत्र जग निर्माण करत आहे. आपल्या जीवनातील दुःख दूर करायची असतील तर पुरुषांनी हात दिला तर पुढे जाऊ असा विचार आजची स्त्री करत नाही. ती स्वसामर्थ्यावर विश्वास ठेऊन पुढे जाण्याचा विचार करत आहे. आताच्या काळातील स्त्रीने आपल्या केश, वेशभूषेत कमालीचा बदल केला आहे, इतकेच काय तर आजच्या स्त्रीने दागदागिन्यांचा अव्हेर करत मुक्तपणे जगायला सुरुवात केली आहे.

कवयित्रीच्या मुलीलाही पैंजण, तोरड्या नको आहेत. तिला पायाचे रक्षण करण्याकरता चपला, बूट वगैरेही नको आहेत. त्यांचं घसरणंसदधा तिला नकोय. तिच्या पायाखाली संस्कतीचे, बंधनाचे काटे येणार. ते बोचणारच. ते काटे मोडन काढण्यासाठी तिला तिचे पाय घट्ट, मजबूत, पोलादी करायचे आहेत. स्वत:ला इतकं मजबूत घडवायचंय की कोणाच्या आधाराशिवाय तिला पुढं जाता यायला हवं.

प्रश्न इ.
आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात झालेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे ते स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री नीलम माणगावे यांच्या पैंजण कवितेत स्त्रियांच्या चार पिढ्या आणि त्यांचे संघर्ष, त्यातून त्यांनी मिळवलेले स्वातंत्र्य याचा विचार मांडला आहे.

कवयित्री या कवितेत मी म्हणून अभिव्यक्त होताना आपल्या आजी आणि आईच्या वाट्याला आलेल्या भोगवट्याचे चित्रण करते. आजी आपल्या पायात दोन किलो वजनाचे पैंजण घालून सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. त्या ओझ्याने तिचे पाय ठणकून यायचे, जखमा व्हायच्या, रक्त वहायचं पण नादाच्या मोहापायी ते सर्व ती सहन करायची. आपल्या जखमांना ऊब देऊन ती राज करायची. निदान राज करत असलेलं भासवायची.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

संसाराचा गाडा हे पैंजणाचे प्रतीक मानले तर ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’, एकत्र कुटुंब, त्यांचे मान अपमान, जबाबदाऱ्या या सगळ्यांत तिचं आयुष्य पिचून गेलं, तिच्या पायांना सवयच झाली अनेक जखमा सोसायची. पण त्याच्या विरोधात कधी तक्रार नाही केली. जे आहे त्यात समाधान मानण्याची तयारी होती. कवयित्रीच्या आईने पैंजण घालणे सोडून दिले. नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. घरातील सर्वच ठिकाणी ती हिंडू फिरू शकायची.

मधून तोरड्या टोचल्या की साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे पण तरीही आपल्याला निदान मुक्तपणे फिरता येते याचा आनंद असायचा. या दोन्ही घरांतील फरक स्पष्ट करण्याकरता काही प्रतीकांचा वापर केला आहे. पैंजण – घरातील प्रचंड जबाबदाऱ्या, स्वयंपाक घरातून माजघरात – केवळ मर्यादित विश्व, सम्राज्ञी – एक प्रकारे गुलामच पण तरी स्वयंपाकघर, माजघरात हुकूमशाही, नादाचा भूलभुलैय्या – संसाराचा जीव, जखमांना ऊब – मनातील जखमा बाजूला, आईच्या पायातील तोरड्या – नाजूक, हलक्या-म्हणजे आजीपेक्षा कमी जबाबदारी, स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची या सर्व ठिकाणी हिंडंण्याची मुभा, राजा राणी – निदान आपल्याला घरातल्या सर्व ठिकाणी फिरता येतंय, त्यांच्यावर अधिकार गाजवता येतो त्याचा आनंद.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
उत्तर :
पूर्वीच्या काळी स्त्रीचा वावर तिच्या घरापुरता मर्यादित होता.अनेक अलंकार धारण करून, नऊवारी साडी नेसून पहाटे चारपासून ते रात्रीपर्यंत, एकत्र कुटुंबाच्या सर्वच जबाबदाऱ्या पेलाव्या लागायच्या. घरातल्या स्वयंपाकघरातच ती राणी असायची पण घरातील बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये तिला विचारात घेतलं जात नसे. अहोरात्र तिच्या कष्टाच्या बदल्यात तिला कोणत्याच प्रकारचे सुख मिळत नव्हते.

अर्थात स्त्रियांना अशाच पद्धतीने वाढवले जात असे. ती स्वतंत्र व्यक्ती आहे म्हणून तिला शिकवले जात नसे. पण आजची आजी मात्र बदलली आहे. ती कमवणारी असल्यामुळे तिची स्वत:ची मतं आहेत. ती आपल्या नातवंडांना शिक्षणात मदत करणारी आहे.

चूल-मूल या संकल्पनांना तिनं कालबाह्य ठरवलेलं आहे. सौभाग्य अलंकार, केशभूषा या बाबतीत तिनं कात टाकली आहे. आपल्या नातीला वाढवताना ती तिचा माणूस म्हणून विचार करते आहे. त्यामुळे आजची आजी प्रगल्भ आहे.

प्रश्न आ.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
आजची स्त्री स्वतंत्र आहे असं पूर्णार्थाने म्हणता येणार नाही पण ती मात्र सगळ्या पारंपरिक विचारांना बाजूला सारून पुढे जाताना दिसत आहे.

आजचे दहावी, बारावीचे निकाल पाहता मुलींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये पुढील काळात मुली शिक्षण, करिअर यात पुढेच जाणार आहेत. त्यांची सहनशीलता, कष्ट करण्याची वृत्ती, भविष्यकाळाचा विचार करण्याची वृत्ती, एकाच वेळी चार गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची पद्धत यामुळे पुढचा काळ मुलींच्या हाती असणार आहे. ती सर्वच बंधनांना झुगारून पुढे जाईल.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

आपल्यावर होणाऱ्या आणि त्याकरता न्यायालय धाव घेत न बसता योग्य ती शिक्षा दयायला ती स्वत: समर्थ असेल. पुरुषापेक्षा ती नक्कीच वरचढ असेल. शहरामध्ये बदलत असलेले चित्र हळूहळू ग्रामीण भागापर्यंत पोचेल आणि तिथेही हे बदल होतील. गरज आहे पुरुष आणि स्त्री यांच्या समानतेची.

दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेण्याची. पण त्याकरता संवाद होणं आवश्यक आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करताना स्त्रियांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. पण त्या या संघर्षातून पुढेच जातील कारण त्यांनी त्यांची मनं घट्ट केली आहेत.पुरुषाने स्त्रियांना समजून घेण्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत.

5. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तरः
कवयित्री नीलम माणगावे यांनी ‘पैंजण’ या कवितेत स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रवासात कशी आणि कोणती स्थित्यंतरे झाली याचे वर्णन केले आहे. प्राचीन काळातील स्त्री ते आताच्या काळातील स्त्री यांचे प्रगतीच्या वाटेवरचे टप्पे पाहता स्त्रीने स्वत:चे स्वातंत्र्य मिळवले. तिचा आत्मविकास तिने केलेला आहे. या कवितेची रचना मुक्तबंधात करताना काही प्रतिमांचा, उपमांचा वापर कवयित्रीने केलेला आहे.

कवयित्री अगदी पारंपरिक स्त्रीचा उल्लेख करताना आजी म्हणून करते: आजी तिच्या काळात दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून स्वयंपाकघरातून माजघरात, माजघरातून स्वयंपाकघरात एखादया सम्राज्ञीसारखी फिरायची. आजीला केवळ या दोन ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य होतं;

पण या दोन्ही ठिकाणी आपण आपला अधिकार गाजवू शकतो याची जाणीव तिला होती. अखंड कुटुंब, त्याच्या जबाबदाऱ्या पेलताना तिला मिळणारा मान तिला महत्त्वाचा वाटत होता. आपल्या घरात आपण सम्राज्ञी असल्यासारखी वावरायची. तिच्या पायातल्या पैंजणांमुळे तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे. घोटे काळे ठिक्कर पडायचे. या जबाबदाऱ्यांमुळे जास्तीची कामे पडायची, अखंड आयुष्य घरातील दोन खोल्यात जगायला लागायचं.

पण त्या संसाराचा, जबाबदाऱ्यांचा नादच इतका की त्यामुळे आपलं माणूसपण भरडलं जातं याचे भानच नसायचं, पैंजणाखाली फडके बांधून जखमांना बरं करत करत आजी जगायची, संसाराचा भार पेलताना थकून जायची, अपमान गिळायची, अत्याचार सहन करायची. पण संसारात या जखमा सहन कराव्या लागणारच याची जाणीव ठेवून ती आहे त्यात सुख मानायची.

यामध्ये पैंजण या अलंकाराचा वापर करून कवयित्रीने तिच्या पायातील बेड्यांचा उल्लेख केला आहे. या बंधनांनी त्रास झाला, जखमा झाल्या तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती.

कवयित्री आपल्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांवरील बंधने कथन करताना आईचा उल्लेख करते. आईने पैंजण सोडून नाजूक, हलक्या तोरड्या घातल्या. तिला आईचं दुखणं ठाऊक होतं, तोरड्या घातल्यामुळे आता आपल्या पायाला कमी जाच होईल असं तिला वाटलं. पाय दुखले, खुपले चिघळले नाहीत.

मग तिला स्वयंपाकघर ते गच्चीपर्यंत हिंडण्याची मुभा मिळाली. आपल्या अगोदरच्या पिढीला हे स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे तिला आनंदच झाला. या तोरड्यांचा त्रास व्हायचाच. अधून मधून साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबकळायचे पण तरीही आपल्याला घरातील काहीजण विचारतात, काही हक्क आपल्याकरता आहेत याच्या जाणिवेने ती सारा जाच, दुखणं दुर्लक्षून ती स्वत:च्या घरात राणी असल्यासारखी भिरभिरायची. इथं भिरभिरणं या क्रियापदामधूनच ती स्थिर कुठेही नसायची याची जाणीव कवयित्री करून देते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

स्वत:च्या काळातील स्त्रीचा उल्लेख करताना ती म्हणते की अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजण, तोरड्यांना कवयित्रीने अगदी हद्दपार केलं.

हलक्या अशा चपळाईने सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून कवयित्रीने घराच्या बाहेर पाऊल टाकलं. पण कधीतरी चपला, बूट, सँडलही बोचतात. घराच्या बाहेर पडताना पायाच्या सुरक्षिततेसाठी या पायताणांचा वापर ती करते. परंतु या पायताणांचा त्रास ती सहन करते. आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी घरात असतानाही काही गोष्टींच्या वेदना होत्याच. ती बाहेर पडली तेव्हा वेदना सहन कराव्या लागत आहेत.

पण आपल्याला घराबाहेर मिळणारे सन्मान, स्वातंत्र्य याकरता तिने सारे दुःख सहन केले. आताच्या मुलींच्या स्वातंत्र्याबाबत भाष्य करताना कवयित्री म्हणते की माझी मुलगी पैंजण, तोरड्या तर घालणार नाही. चप्पल, बूट, सँडलही नको, कोणतीच बंधने, त्यातून होणारी घुसमट आताच्या मुलीला, स्त्रीला नकोय.

त्या सगळ्याच्या पलिकडे जाऊन केवळ आपल्या सामर्थ्याने तिला पुढे जायचे आहे. पाय पोलादी करायचे आहेत, कारण कोणत्याही वेदना पोचल्या तरी त्या सहन करण्याची तयारी आहे. पुढच्या शतकाआधी हे व्हावं असं तिला वाटतं.

प्रकल्प.
स्त्रियांच्या प्रगतीसंदर्भातील विविध घटनांचे अर्थपूर्ण कोलाज तयार करा.

प्रश्न 1.
म्हणींचा शोध घ्या. (तिरपा, आडवा, वरून खाली किंवा खालून वर)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 5
उत्तर :
(१) बळी तो कान पिळी
(२) पालथ्या घड्यावर पाणी
(३) शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
(४) दिव्याखाली अंधार
(५) अति तेथे माती

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

11th Marathi Book Answers Chapter 12 पैंजण Additional Important Questions and Answers

कृती : २ खालील पठित पदय पंक्तीच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

कृती-१. चौकट पूर्ण करा

प्रश्न 1.
पैंजणाचे वजन :
उत्तर :
दोन किलो

प्रश्न 2.
आजीचं ठुमकणं :
उत्तर :
सम्राज्ञीसारखे

कृती-२. आकृतीबंध पूर्ण करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 6
उत्तर :
a. जखम व्हायची
b. जखम चिघळायची
c. रक्त वाहायचे

प्रश्न ब.
सम्राज्ञीसारखं फिरण्याची जागा : –
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 7
उत्तर :
a. स्वयंपाकघर
b. माजघर

दोन दोन किलो वजनाचे ……………………………………………………………………………………………………………………… राज करायची ! (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५३)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

कृती-३.

प्रश्न 1.
स्वयंपाकघरातून माजघरात,

माजघरातून स्वयंपाकघरात
‘एखादया सम्राज्ञी
सारखी ठुमकत फिरायची!’
यातील तुम्हांला जाणवलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
जुन्या काळातील आजीचं अस्तित्व घरापुरतं मर्यादित होतं. घरामध्येही केवळ स्वयंपाकघर, माजघर या ठिकाणीच तिचं अस्तित्व होतं. जे आहे त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न त्या काळच्या स्त्रिया करत होत्या. आजीला घरातील स्वयंपाक स्वातंत्र्य होतं. ते सणासुदीला माजघरात वावरण्याचे स्वातंत्र्य होतं.

या दोन खोल्यांव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी तिला जाण्याचे स्वातंत्र्य नव्हतं. पण या ठिकाणी आपल्याला फिरता येतंय. तिथे आपले हक्क चालतायत याच्या अल्प आनंदात एखादया सम्राज्ञीसारखी ती ठुमकत फिरायची. त्या काळात कुटुंब मोठी असायची घरातील ज्येष्ठ स्त्रीला मान असायचा पण निर्णय स्वातंत्र्य नसायचे. त्याबद्दल तिला खेदही वाटत नसायचा.

प्रश्न 2.
आजीला घरात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर :
माझी आजी गावात राहते. पूर्वी आमच्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यावेळी आजी घरात मोठी सून होती. तिच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असायच्या. कधी तिला माहेरीसुद्धा जायला मिळायचे नाही. पै-पाहुणा घरात आला की सर्वांचे हवे-नको ते पाहण्यात ती मग्न असायची. बाबा-आत्याच्या लहानपणी तिने त्यांना खूप वेळही दिला नाही. पण घरातले सर्वच जण तिचा खूप आदर करत. आगोदर कोणत्याच कार्यात तिचा विचार विचारात घेतला जात नसायचा.

पण जसजसे तिचे वय वाढत गेले तसतसं तिच्या मायेची निर्णयक्षमतेची, समंजसपणाची ख्याती घरभर पसरली तेव्हा तिच्या मतांचा आदर केला जाऊ लागला. माझ्या सर्व काकुंना तिने फार प्रेमानं वागवलं आणि आईचा सासू म्हणून कधी जाच केला नाही.

सर्वांना समजून घेण्यात ती कधीच कमी पडली नाही. त्यामुळे घर दुभंगलं नाही. तिने खूप खस्ता खाल्ल्या घराच्या जबाबदाऱ्या पेलताना; पण आज मात्र ‘काका-काकू, आत्या-मामा, पणजीदेखील तिला फार जपतात. ती सर्वांसाठी प्रेम बरसणारी आहे. तिला खरोखर सन्मानाने वागवले जाते.

पैंजण Summary in Marathi

पैंजण प्रस्तावनाः

नीलम माणगावे कवयित्री लेखिका, संपादिका, बालसाहित्यकार म्हणून परिचित असलेल्या लेखिका. त्यांची आजवर ६० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणीवरून त्यांनी कौटुंबिक श्रुतिकालेखन केलं आहे. त्यांच्या कवितांचा गाभा स्त्री हा असतो. स्त्रीवादी जाणीवा त्यांच्या कवितेतून प्रकट झालेल्या दिसतात. बाईपणाची वेदना, कल्लोळ, असोशी कवितेच्या मूळ गाभा असलेल्या दिसतात. कवितेची भाषा सहज, सोपी आहे. अलंकारांचा, प्रतीक, प्रतिमांचा सोस नसलेली त्यांची कविता असल्यामुळे ती सहज उलगडत जाते. गुलदस्ता , ‘शतकाच्या उंबरठ्यावर ‘जाग’ हे कविता संग्रह ‘तीच माती तेच आकाश’, ‘शांते तू जिंकलीस’, ‘निर्भया लढते आहे’ हे कथासंग्रह, अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

पैंजण कवितेचा आशय :

कवयित्री नीलम माणगावे यांच्या पैंजण या कवितेत स्त्रीच्या प्रगतीचा आलेखच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवयित्री प्राचीन ते अर्वाचीन काळात स्त्रियांच्या जगण्यात जे बदल झाले आहेत त्याचे वर्णन करीत आहे.

प्राचीन काळातील स्त्री तिला कवयित्री आजी म्हणू पाहते. ही आजी दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून स्वयंपाकघरातून माजघरात आणि माजघरातून स्वयंपाकघरात सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. त्या पैंजणांनी तिचे पाय सुजायचे. ते ओझं सहन व्हायचं नाही . तिचे पायाचे घोटे काळे ठिक्कर पडायचे. कधी जखम झाली तरी तिने पैंजण काढले नाहीत. पैंजणाच्या नादात ती इतकी अडकली की त्या भूलभुलैय्यातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून ती सारे निभवायची. आनंद मानायची.

कवयित्री आपल्या अगोदरच्या स्त्रीच्या पिढीबाबत बोलताना आपल्या आईचा उल्लेख करते. आईने पैंजण घालणे सोडून दिले. नाजूक, हलक्या, तोरड्या घालायला सुरुवात केली. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघरापासून ते गच्चीपर्यंत मनमुराद फिरायची. आपल्या आईला जितकं स्वातंत्र्य मिळालं नाही तितकं आपल्याला मिळालं याचा आनंद तिच्या मनी होता. तोरड्या तिच्या पायाला टोचायच्या त्यामुळे साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे पण सर्व दुर्लक्षून ती राजाराणीसारखी भिरभिरायची. आनंदात जगायची. आपण या घरात राजाची राणी आहोत या भ्रमात ती असायची.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण 8

कवयित्री जेव्हा आपल्या पिढीबद्दल बोलते तेव्हा ती स्वत:चे उदाहरण देते. पैंजण, तोरड्या घालणं तिनं केव्हाच सोडलं. हलक्याशा सँडल, बूट, चपला घालता घालता घरच नाही तर अंगण ओलांडन तिनं घराबाहेर पाऊल टाकलं पण कधी कधी याच चप्पल. बट. सँडल. यांचा त्रास होतो. त्याच्याही जखमा पायाला सोसाव्या लागतात. पण आपण घराबाहेर जातो, पैसे कमवतो, चार लोकांमध्ये आपल्याला सन्मान मिळतो. काही गोष्टीत आपली मतं विचारली जातात, त्याची दखल घेतली जाते याचा आनंद इतका असतो की झालेल्या जखमांकडे ती दुर्लक्ष करते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12 पैंजण

कवयित्रीची मुलगी तर त्याही पुढचा विचार करते. पैंजण, तोरड्या तर नकोतच तिला. चप्पल, बूट, सँडलही नको. त्यांचं पकडणं, घसरणं नकोच.

पायाखालचे काटे मोडण्याइतपत पायच पोलादी, मजबूत, घट्ट व्हायला हवेत, पुढच्या शतका आधी हे झालं तर उत्तमच आहे.

पैंजण समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

पैंजण – पायातील दागिना (a silver ornament (for the ankles), माजघर – घराचा मध्यभाग, वापरायची खोली (the central portion of a house), सम्राज्ञी – राज्यावर हक्क असणारी राणी (queen), ठुमकत – नादाचा एक प्रकार, (लचकत, मुरडत) भूलभुलैय्या – चक्रव्यूह (circular, confusing military array), फडके – कपडा (cloth), तोरड्या – पायातील कडे(Ornaments for the nakles), पोलादी – पोलाद हा मजबूत धातू आहे. त्यापासून तयार झालेले विशेषण(firm, stern), ऊब – उष्णता (warmness) हद्दपार – सीमेच्या बाहेर(deported).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

11th Marathi Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती पूर्ण करा.

अ. टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 1
उत्तरः

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
डोळे दाईचे मोकळे हात दिसतात
कान पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो
नाक सुगंधी द्रव्याचा वास जाणवतो
त्वचा टबच्या आतील गुळगुळीत स्पर्श कळतो

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 6

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 7

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 4
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 8

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 5
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 9

इ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
अ. मन:पटलावरील प्रतिमा [ ]
आ. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी [ ]
उत्तरः
अ. शोभादर्शक
आ. न भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे कैलास लेणे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
‘कादंबरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ हे अवाढव्य लिखाण साहित्यातील कोणत्या प्रकारात मोडते?

2. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. मनाची कोरी पाटी.
आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती.
इ. तपशिलांचा महासागर.
उत्तरः
अ. मनाची कोरी पाटी : ज्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात किंवा जे मन निरागस असते. चांगले किंवा वाईट यांचा विचार न करणारे मन म्हणजेच निर्विकार मन होय. लहान मुलांचे मन असे असते. जे समोर असते तेच त्यांच्यासाठी वास्तव असते. समोरचे वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. त्यातल्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा विचार करण्याची त्यांची तयारी नसते किंवा त्यांचे मन तेवढे प्रगल्भ नसते. त्यामुळे त्या वयात त्यांच्याकडून झालेल्या चुकासुद्धा क्षम्य असतात. कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. जी गोष्ट त्यांच्यासमोर असते त्याच गोष्टीचा ते विचार करीत असतात. बालमन कधीही अमूर्तासंबंधी विचार करीत नसते. ज्या ठिकाणी बालमन जाईल त्या सर्व गोष्टींचा ते मनापासून आनंद घेते कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते.

आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती : लोकोत्तर कल्पनाशक्ती म्हणजे विलक्षण असामान्य, अलौकिक अशी कल्पनाशक्ती, सर्वसामान्य माणसांमध्ये अशी विचार करण्याची क्षमता नसते. तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ, लेखक इत्यादी असामान्य माणसेच वेगळा विचार करू शकतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची धाव असीम असते. जिथपर्यंत आपण साधारण माणसे पोहचू शकत नाही, अशी विलक्षण, असामान्य, अलौकिक अशा कल्पनाशक्तीची टॉलस्टॉयला जणू देणगीच लाभलेली होती. म्हणूनच या अजरामर, उदात्त, कितीतरी वेगळ्या, श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

इ. तपशिलांचा महासागर : महासागर म्हणजे मोठा समुद्र. समुद्राच्या पाण्याची खोली किंवा व्याप्ती आपण मोजू शकत नाही. लेखिकेने टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या ‘युद्ध आणि शांती’ या अवाढव्य कादंबरीच्या लिखाणासाठी त्यांनी जे तपशील, संदर्भ गोळा केले त्यांना तपशिलांचा महासागर अशी उपमा दिली आहे. त्यावरून त्याने जमवलेल्या तपशिलांच्या माहितीची कल्पना येते. त्याने विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ रशियाचा इतिहास, रशियातील लोकांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला मुलाखती घेतल्या. त्याने प्रवासातून, वाचनातून, लोकांच्या मनांतून, इतिहासातून इ. विविध माध्यमांतून तपशील गोळा केले व समुद्रमंथन करून एक अवाढव्य कलाकृती जगासमोर आणली.

3. व्याकरण.

अ. तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 10
उत्तरः

विशेषणे विशेष्ये
अर्थपूर्ण आठवण
अमर्याद शक्ती
वाङ्मयीन शिल्प
अजोड कलाकृती

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

आ. खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.

  1. न्यून असणे
  2. मातीशी मसलत करणे
  3. अवाक् होणे
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे

उत्तरः

  1. न्यून असणे : आई गेल्यावर रमेशच्या मनात काहीतरी न्यून असल्याची भावना निर्माण झाली.
  2. मातीशी मसलत करणे : पाऊस पडल्यानंतर शेतकरी विविध कामांच्या आधारे मातीशी मसलत करतात.
  3. अवाक होणे : गणेशला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळल्याचे ऐकून घरातले सगळेच अवाक झाले.
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे : डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यासाचे डोंगर पेलावे लागतात.

4. स्वमत.

प्रश्न अ.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टॉलस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. लहानपणापासूनच त्यांच्या तरल संवेदनांची जाणीव लेखनातून स्पष्ट होते. त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचा संभाळ केला, त्यांना कुठेही आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी त्यांच्या तान्हेपणाच्या दोन आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या संवेदनांची आठवण सांगताना ते सांगतात की त्यांना दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. त्यांना हतपाय हालवता येत नाहीत, त्यांना मोकळेपणा हवा आहे. म्हणून ते जोरजोरात रडत आहेत.

पण त्यांची व्यथा कोणीही समजू शकत नाही. दुसरी आठवण अशी की, पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवले. त्यांना दाईचे मोकळे हात दिसतात, त्यांना सगंधी द्रव्याचा वास येतो, पाण्याची उष्णता जाणवते, पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो, टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो इतक्या लहानपणी संवेदना कळून प्रत्यक्षात त्यांचे वर्णन करणारा टॉलस्टॉय हा कदाचित जगातील पहिला माणूस असेल. मऊ, काळाभोर लाकडाचा टब, बाहया मागे दुमडलेला दाईंचा हात, पाण्याच्या कढत वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज या सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंद देणारी आहे. त्यांच्या या तरल संवेदनांमुळेच मोठेपणी त्यांच्या हातून लिखाणाचे महान कार्य घडत गेले. प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या त्यांच्या संवेदना लहानपणापासून खूप तल्लख असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न आ.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉयने केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनेक वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अण्ड पिस’ हे जगातील साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. लग्नानंतरची 15 – 16 वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वळणे न घेता अनिरूद्धपणे वाहत राहिला. 1863 च्या अखेरीस ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लेखनास त्याने सुरुवात केली. ही कादंबरी लिहून पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा वर्षे लागली, या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड कष्ट घेतले. वास्तवाच्या चारही बाजूंचा अभ्यास करून त्यांनी लिखाण केले, त्यांच्या अभ्यासाचा आवाका फारच मोठा होता. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास त्यांनी लिखाण पूर्ण होईपर्यंत चालू ठेवला.

अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेला, त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षांचे लोक असा काय अर्थ काढतात त्याचे सबंध, अन्वयार्थ त्याने समजावून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण हे सारे काही त्याने अक्षरश: घुसळून काढले. जणू काही तो त्याच काळात जगत होता, इतका अभ्यास त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी केला.

या सगळ्या अभ्यासामुळेच कादंबरीतली पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी वार्तालाप करू लागली होती. कादंबरी लिखाणासाठी त्याने विविध तपशिलांचा अतिशय चिकित्सकपणे अभ्यास केला, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची त्याने खूप कसून नांगरणी केली, म्हणजेच शेतकरी ज्याप्रमाणे जमिनीची खूप मशागत करतो व त्यानंतर पीक घेतो, त्याचप्रमाणे टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर विविध संदर्भाचा व दाखल्यांचा प्रचंड अभ्यास केला.

प्रश्न इ.
स्वत:चे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
टॉलस्टॉयला स्वत:च्या सुप्तशक्तीवर विश्वास होता. लेखनवाचनाच्या बाबतीतही तो खूप चिकित्सक होता. त्याचे बालमनही त्या काळात प्रचंड व्यापक होते. विशेष म्हणजे त्याला दैनंदिनी लिहायची सवय लहानपणापासून होती. लहानपणापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याला जाणीव होती.

‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, अभ्यास केला ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. स्वतःचे लिखाण परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने कादंबरीचा मूळ आराखडाच तीन वेळा बदलला. कित्येक व्यक्तिरेखा मूळ आराखड्यात नव्हत्या. त्यांना नंतर प्रवेश मिळाला. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळेच हे शक्य झाले. त्याने विविध ऐतिहासिक घटनांचा तपशीलवार अभ्यास करून एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षाचे लोक कसा काय अर्थ काढतात त्याचे सर्व अन्वयार्थ त्याने समजावून घेतले.

युद्धाचे वर्णन प्रत्ययकारी होण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस भेट दिली. त्याने कादंबरी लिखाणाला सुरुवात केली आणि कमीत-कमी बारा – पंधरा वेळा लिखाण थांबवले. तो रोज दिवसभर लिखाण करायचा आणि संध्याकाळी तो पत्नीच्या टेबलवर आणून ठेवी, त्यातील तिने केलेल्या खाणाखुणांसह तो परत लिखाण करीत असे. त्यात खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात लिखाण करायचे होते त्यामुळेच त्याने ही दोन हजार पानांची कादंबरी 1869 साली पूर्ण केली. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी त्याने अपार कष्ट घेतले, जणू काही तो 1863 ते 1869 या काळात नेपोलियनच्या काळातच जगत होता. त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी अगणित संदर्भग्रंथांचे वाचन केले. कदाचित त्याच्याएवढे कष्ट कादंबरी लिखाणासाठी खूप कमी लोकांनी घेतले असतील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो, या विधानाची यथार्थता पटवून दया.
उत्तरः
लेखिका सुमती देवस्थळे यांनी प्रसिद्ध साहित्यिक टॉलस्टॉय यांच्या संबंधी मराठीत लिखाण केले आहे आणि हे लिखाण पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे. कोणताही साहित्विक हा आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणाच्या जोरावर साहित्यनिर्मिती करत असतो. साहित्यिकाला जर आपल्या लिखाणाबदद्ल समाधान वाटत नसेल तर अगदी मनाला समाधान मिळेपर्यंत वारंवार लिखाण करीत असतो. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या निर्मितीसाठी टॉलस्टॉय यांनी अपार कष्ट घेतले.

टॉलस्टॉयला मुळातच वाचनाची आवड होती. वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे लिखाणही उत्तम दर्जाचे झाले. त्याच्या लिखाणात मानवतावाद दिसून येतो. टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर असंख्य व्यक्तिरेखा अभ्यासल्या. अनेक लहान – मोठ्या घटनांचा भव्य विस्तार, नेपोनियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे आणि सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन, लष्करी कारवाया इ. बाबींचा त्याने चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. त्याने आपल्या मूळच्या आराखड्यातसुद्धा अनेक वेळा बदल केला.

सुरुवातीला जे चित्रित करायचे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ व उदात्त लिखाण होत गेले. त्याने अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. युद्ध प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाला तो वेड्याच्या इस्पितळात जाऊन भेटला. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनदर्शन हा त्याच्या कादंबरीचा खरा विषय होता.

या कादंबरीत त्याने 500 पेक्षा जास्त व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत, त्या व्यक्तिरेखांमध्ये प्रत्येकाला अगदी प्राण्यांनासुद्धा वेगवेगळे, स्वयंपूर्ण, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आपण व्यक्तिचित्रणांकडे जरी दृष्टिक्षेप टाकला तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केल्याचे आपणास दिसून येते. म्हणूनच टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न आ.
‘ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणापूर्वी टॉलस्टॉय या महान साहित्यकाराने जी अपार मेहनत घेतली त्यांचे वर्णन या पाठात लेखिका सुमती देवस्थळे यांनी अत्यंत मार्मिकपणे केल्याचे दिसून येते. मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी ही कादंबरी वाढत गेली. या कादंबरीतील निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात अशी काही एकरूप झालेली आहेत की जणू काही त्यां या कादंबरीतील प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे.

वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भात व्यक्तिमनाचा वेध घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल केली आहे. ती केवळ आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. कादंबरी लिखाणासाठी टॉलस्टॉयने अपार मेहनत घेतली. अभ्यासाचे डोंगर पेलले, अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने सतत अभ्यास केला. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले सर्व लिखाण त्याने अक्षरशः घुसळून काढले. 1863 ते 1869 या सहा वर्षांच्या काळा तो जणूकाही नेपोलियनच्या काळातच जगत होता असे वाटते.

ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेतात पीक घेण्याअगोदर अतिशय काळजीपूर्वक शेतीची मशागत करतो व त्यानंतर त्यात पेरणी करतो. व्यवस्थित मशागत केल्यानंतर येणारे पीकही चांगले येते, चांगले पीक आल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. त्याचप्रमाणे ‘युद्ध आणि शांती’ कादंबरी लिहिण्याअगोदर त्याने सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, असंख्य व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, रशियातील त्या काळातील जीवनपद्धतीचा त्याने अभ्यास केला, अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मुलाखती घेतल्या. त्याला जे जे जमते ते त्याने सर्वकाही केले. कोणतीही कमतरता त्याने ठेवली नाही म्हणूनच असे म्हणता येईल की, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती.

प्रकल्प.

संगणकावर उपलब्ध असणाऱ्या ‘गुगल अॅप’चा वापर करून लिओ टॉलस्टॉय यांच्याविषयी अधिक माहिती मिळवून संपादित करा.

11th Marathi Book Answers Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 12

खालील घटनेचे परिणाम लिहा.

प्रश्न 1.

घटना परिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले ………………………..

उत्तर:

घटना परिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले कित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रांरभी ठरवले होते, त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
1869 च्या अखेरीस’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणास कोणत्या वर्षी सुरुवात झाली?

प्रश्न 3.
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘बुद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – [ ]
उत्तरः
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – कादंबरीच्या शिफारशीचा एक ताम्रपटच

उपयोजित कृती

प्रश्न 1.
एखादे लिखाण वाचल्यानंतर स्वत:चे मत मांडणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द
उत्तरः
अभिप्राय

प्रश्न 2.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रत्यक्ष लेखनास पुरी सहा वर्षे लागली.
उत्तरः
सहा – संख्यावाचक विशेषण

प्रश्न 3.
खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.
(अ) प्रचंड
(ब) ठिकाण
उत्तरः
(अ) प्रचंड – भव्य
(ब) ठिकाण – स्थान

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

स्वमतः

प्रश्न 1.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, तुमचे मत लिहा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांची जोपासना करणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ टॉलस्टॉय लिखित ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी आहे. या कादंबरी लिखाणाअगोदर टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरीचा दर्जा जपण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. पूर्वीच्या काळी साम्राज्यवादाला महत्त्व असल्यामुळे जो बलवान असेल तो राज्य करीत असे, पण त्याच्यापुढेही साम्राज्य टिकवणे हे आव्हान होते. कारण त्या काळात वर्चस्वासाठी सैन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत असे. अनेक साम्राज्ये उभी राहिल्याचा व ती साम्राज्ये जगासमोर आहेत. याचा सखोल अभ्यास टॉयस्टॉय यांनी केला. त्यांनी कादंबरी लिखाणाअगोदर लोकांची मते विचारून घतला. लिखाणात आवश्यक बाबी कोणत्या आहेत? हे त्याने जाणून घेतले.

प्रत्यक्ष युद्धभूमीला त्याने भेट दिली. त्याने ऐतिहासिक माफत लिखाणाला परिपूर्ण अशी सर्व माहिती गोळा केली. जवळजवळ तीन वेळा मूळ लिखाणाचा ढाचा व नाव बदलले. लिखाणात अतिशयोक्ती होणार नाही याची त्याने काळजी घेतली. मानवी जीवनदर्शन अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. 1863 साली सुरू झालेले लिखाण 1869 साली पूर्ण झाले. या सहा वर्षांच्या काळात प्रत्यक्ष तो त्याच जगात वावरत होता. इतके परिपूर्ण लिखाण मानवी मनावर व्यापक परिणाम करते. यद्धाच्या माध्यमातून कोणतेही जगातील प्रश्न सुटत नाहीत हा कादंबरीचा मूळ विषय आहे. टॉलस्टॉयच्या लेखन शैलीमुळे वाचक कादंबरी वाचताना खिळून राहतो म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते असे आपल्याला म्हणता येईल.

आकलन कृती

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 14

प्रश्न 2.
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पाने त्याला अधिक जवळची वाटू लागली. कारण ।
उत्तरः
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली. कारण कादंबरीतील पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करत होती.

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 15
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 16

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 17
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 18

उपयोजित कृती

वाक्यरूपांतर ओळखा.

प्रश्न 1.
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला. (विधानार्थी वाक्य)
सूचना : प्रश्नार्थी रूप ओळखा.
पर्याय : 1. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?
2. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला तर !
3. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागेलच असेही नाही.
उत्तरः
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द ओळखा कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, संदर्भग्रंथ
उत्तरः
संदर्भग्रंथ

प्रश्न 3.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती ; पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जात होता.
स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह., अर्धविराम पूर्णविराम
उत्तरः
(अर्धविराम, पूर्णविराम)

स्वमतः

प्रश्न 1.
लेखकाच्या अतिचोखंदळ वृत्तीमुळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जातो, तुमचे मत लिहा.
उत्तरः
लिखाण परिपूर्ण होण्यासाठी बरेच साहित्यिक चोखंदळ मार्गाचा अवलंब करतात. एखादा विषय जर अर्थपूर्ण किंवा व्यापक असेल तर त्या विषयाच्या मांडणी संदर्भात अतिशय काळजी घेतली जाते. आपल्या लिखाणाचा विषय किंवा अर्थ वाचकांच्या मनाला भिडणारा असावा असा प्रयत्ल लेखकाचा असतो. आपल्यासारखे लिखाण संबंधित विषयावर अजूनपर्यंत कोणीही केलेले नसावे व आपल्याला यश मिळावे हा त्यामागील हेतू असतो. लिखाणाअगोदर विविध गोष्टींचा परामर्श घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यासाचे डोंगर पेलायची त्यांची ताकद असते.

दंबरीचा विषय समजून घेताना लिखाणाचा मूळ ढाचा बदलण्याची त्यांची तयारी असते. प्रवास, मुलाखती, चर्चा, भेटीगाठी, विविध संदर्भ ग्रंथ इ. प्रकारच्या मार्गाचा अवलंब ते करतात. त्यामळे लिखाणाला सरुवात होण्यास वेळ ला पात्रे विषयाला अनुसरून असतील याची काळजी घेतली जाते. कल्पनेतले लिखाण वास्तववादी वाले परिणामकारक होण्यासाठी अनेक वेळा लिखाण केले जाते. या चोखंदळ वत्तीमळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध खरोखरच विस्कटन गेलेला दिसून येतो कारण मूळ लिखाणामध्ये अनेक बदल झालेले असतात, पण लिखाण मात्र परिणामकारक व वास्तववादाला स्पर्श करते.

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Summary in Marathi

प्रास्ताविकः

सुप्रसिद्ध लेखिका, चरित्रकार, ‘टॉलस्टॉय एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्को’, ‘डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर’, ‘एक विचारवंत’ (कार्ल मार्क्ससंबंधी) ‘छाया आणि ज्योती’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्रलेखनाला आवश्यक असणारी मेहनत, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्झर यांच्यासंबंधी एवढे मार्मिक लेखन मराठीत पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे.

पाठ परिचयः

सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टालस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. सत्याग्रह, असहकार या शांततामय प्रतिकाराचे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून बडणीचे आणि ‘वॉर अॅण्ड पिस’ या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रत्ययकारी चित्रण ‘टॉलस्टॉय एक माणूस’ या पुस्तकातून आले आहे. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास करून कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनके वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अॅण्ड पिस’ हे जागतिक साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. मानवी जीवनातील गुंतागुतीचे प्रश्न युद्धाने सुटत नसून ते शांती आणि प्रेमाने सुटतात हे टॉलस्टॉय यांनी या कादंबरीत सांगितले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

समानार्थी शब्द / पर्यायी शब्दः

  1. मातृविहीन – ज्याला माता नाही तो.
  2. न्यून – काहीतरी कमी असल्याचे जाणवणे.
  3. उणीव – (less, deficient).
  4. उत्तेजित – प्रोत्साहित,
  5. चिमुकले – छोटेसे – (very small, tiny).
  6. संकलित – एकत्रित – (collected).
  7. बालपण – लहानपण – (childhood).
  8. छंद – आवड – (liking, hobby).
  9. पिंजण – चक्र – (मनातले विचार).
  10. दैनंदिनी – रोजनिशी – (diary).
  11. सुप्त शक्ती – अंतर्गत शक्ती – (दडलेले ज्ञान).
  12. चिकित्सा – संशोधन – (minute examination).
  13. अभिप्राय – स्वत:चे मत (एखादया लिखाणावरचे) – (opinion).
  14. यातना – त्रास, दुःख – (great pains)
  15. बांडगुळ – झाडावरील वाढलेला अतिरिक्त भाग जो झाडाच्या वाढीवर परिणाम करतो – (a parasitical (living an another).
  16. मेहनत – कष्ट – (hard work)

वाक्यप्रचारः

  1. न्यून असणे – कमी असणे.
  2. मातीशी मसलत करणे – मातीची मशागत करणे.
  3. अवाक होणे – चकित होणे.
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे – खूप अभ्यास करणे.
  5. कृतकृत्य होणे – समाधानी होणे.
  6. अभिप्राय देणे – स्वत:चे एखादया लिखाणाविषयी किंवा कलाकृतीविषयी मत मांडणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 10 शब्द Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

11th Marathi Digest Chapter 10 शब्द Textbook Questions and Answers

कृती

1. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 1

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
बिकट संकटांना कवीने म्हटले –
1. पोटाशी घेणारे शब्द.
2. निरुत्तर निखारे.
3. धावून आलेले शब्द.
उत्तरः
2. निरुत्तर निखारे.

प्रश्न आ.
शब्दांचा उजेड म्हणजे
1. शब्दांचे मार्गदर्शन.
2. शब्दांची मदत.
3. शब्दांचा हल्ला.
उत्तरः
1. शब्दांचे मार्गदर्शन.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

प्रश्न इ.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे
1. कठीण प्रसंग.
2. झाडाची सावली
3. तापदायक प्रसंग.
उत्तरः
3. तापदायक प्रसंग.

3. अ. खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
उत्तरः
कवींच्या जीवनात असेही प्रसंग आले जे झेलणे कठीण होते. त्यांना काहीच मार्ग या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सापडत नव्हता. समस्यांनी गांजून गेलेल्या कवींच्या डोळ्यांसमोर अंधारून येत होते तेव्हा शब्दांनीच मार्गदर्शन केले. समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी जणू या शब्दांनीच अंधारात वीज दाखवण्याचे कार्य केले.

प्रश्न 2.
‘मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.’
उत्तरः
आयुष्यातील काही क्षण मन त्रस्त करणारे, जगूच नये अशी भावना निर्माण करणारे, निराशेच्या गर्तेत खोलवर नेणारे होते तेव्हा मृत्यूला जबळ करावे असे वाटू लागले. त्याही वेळी शब्दांनीच आयुष्याच्या या मार्ग भरकटलेल्या गलबताला किनारा दिला असे कवी म्हणतात.

आ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न अ.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
वाऱ्याने व निवाऱ्याने टाळले तेव्हा शब्दांनी कवीला केलेली मदत कोणती?

प्रश्न आ.
‘शब्द’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
आकान्ताने हाका घातल्या तेव्हा कोण धावून आले?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

प्रश्न इ.
‘शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहुना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही’, या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
उत्तरः
मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ?

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला….’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
उत्तरः
माणसाच्या आयुष्यात अशा काही आठवणी असतात ज्यांनी खोलवर मनावर जखम केलेली असते. त्या आठवणी कायम मनात आग ओकत असतात. तेव्हा या आठवणींना, भावनांना शब्दांतून मोकळे करण्याचा मार्ग असतो. शब्दांमधूनही मनातील आग व्यक्त करता येते. ज्यामुळे काही प्रमाणात तरी आठवणींचा दाह कमी होण्यास मदत होते. आपले दुःख, मनातील तडफड कोणाशी तरी व्यक्त केल्यावर मनाला शांती मिळते हीच भावना वरील ओळीतून व्यक्त होते.

प्रश्न आ
‘मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः
कवींसाठी ‘शब्द’ हे सर्वस्व आहे. शब्दांशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यांनी शब्दांना आपलेसे केले; म्हणजेच ते शब्दांत शिरले. त्यांनी त्यामळेच जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना, अडथळ्यांना दर्लक्षित करून ते आपले लिखाण करीत ष्टिीमधन मनाने बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला. त्यांनी स्वत:ला वाचवले. जेव्हा त्यांना जळजळीत मनातील भाव व्यक्त करावे असे वाटले तेव्हाही त्यांनी ते व्यक्त केले. आयुष्यातील अन्यायाची चीड मी व्यक्त केली. शब्दांद्वारे माझे सर्व भाव हे शाब्दिक होते म्हणून शब्दांनी जहर पचवले.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत. ते लिहा.
उत्तरः
आयुष्य हे सुखदुःखाने भरलेले आहे. जीवनात चम-उतार हे असतातच, जीवनातील समस्या, वाटेला आलेले दुःख म्हणजेच जीवनातील नकार होत. कवी भोवतालच्या जगातील विषमता, संधिसाधुपणा इत्यादी गोष्टींनी त्रासलेले आहेत. आयुष्यात वाट्याला आलेले आकान्त, अंधारनिष्ठ आयुष्य, चीड यावी असे प्रसंग, काही वाईट आठवणी, आप्तेष्टांनी, समाजाने फिरवलेली पाठ या सर्व जीवनातील वाईट अणांना कवीने आयुष्यातील नकार म्हणून उल्लेखले आहे. कवीने या सर्व नकारांना आपल्या लेखणीतून उत्तर दिले आहे. प्रत्येक वेळी सुचलेले शब्द हेच त्यांचे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत.

प्रश्न आ.
‘शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
कवीला आयुष्यातील सगळ्यात महत्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे शब्द. शब्द हे त्यांचे जीवन आहे. कवींची लेखणी हे सर्वस्व व शस्त्र आहे. कवीने आपले सर्व आयुष्य हे साहित्याला वाहिलेले आहे. त्यामुळे ते शब्दांचीच पूजा करतात. आजच्या या स्वार्थी, संधीसाधू, मूल्यविरहित जगात कवीला अनेक गोष्टी खटकतात. अनेक गोष्टींची चीड येते. लेखकाची लेखणी हे त्याचे शस्त्र असते व लेखक त्यांचा योग्य वापर करून समाजपरिवर्तन करू शकतात, चांगले विचार पिढीमध्ये रुजवू शकतात. कवीनाही वेळोवेळी शब्दांनीच दिलासा दिला, मार्गदर्शन केले, उमेद दिली म्हणूनच शब्द हे कवीचे सामर्थ्य आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

प्रश्न इ.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
शब्दाशिवाय मानव ही कल्पनाच करता येणार नाही. मानवाच्या विचार प्रकटीकरणाचे, संवादाचे प्रमुख माध्यम शब्द आहेत. शब्दांशिवाय भावना प्रकट करणाऱ्याला आपले मत व्यक्त करण्यासाठी खाणाखुणांचा वापर करावा लागतो. पण त्यातूनही जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे मांडण्यासाठी शब्दच हवेत, शब्दांमुळे स्पष्टता येते, भाषा तयार होते, गैरसमज, गोंधळ होण्याची शक्यता कमी होते.

शब्द वळवावे तसे वळतात, काही शब्दांचे अनेक अर्थ असतात ज्यातून चमत्कृती, विनोद साधता येतो. शब्द हे मानवाचे सामर्थ्य आहे. शब्द फुलांसारखे वापरता येतात, शब्द धारदार शस्त्रासारखेही वापरता येतात. शब्दांनी एखादयाचे मन जिंकता येते तर शब्दांनी एखादयाला घायाळ करता येते. एकूणच मानवी व्यवहार, विचारांचे आदान-प्रदान योग्य रितीने होण्यासाठी मानवी जीवनात शब्दांचे अनन्यसाधारण महत्व आहे.

6. ‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तरः
माणूस शब्दाविना जगाला पारखा आहे. हेच शब्द एका लेखकाचे/कवीचे जीवन सर्वस्व असतात. कवी यशवंत मनोहर एक विचारवंत, समीक्षक आहेत. त्यांच्या ‘शब्द’ या कवितेतून प्रत्ययकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी लेखनशैली व्यक्त होते. त्यांची कविता शोषणाचा, जगातल्या विषमतांचा निषेध करते. कवींच्या जगलेल्या, भोगलेल्या जीवनाचा जीवनानुभव यातून व्यक्त होतो. कवींनी आपल्या मनातील त्वेष व्यक्त करण्यासाठी ‘शब्दांचा आधार घेतला आहे.

कवींना जेव्हा जेव्हा समाजातील मूल्यव्यवस्थेची चीड आली किंवा एखादया प्रसंगाने मन उदविग्न झाले तेव्हा मनाच्या आकांताला वाट फोडण्यासाठी शब्दांचाच आधार मिळाला. कवींनी मांडलेल्या मनातील उद्वेगाला उत्तर मिळाले नाही. तेव्हा मनातील राग शांत करण्यासाठी माऊलीने आपल्या लेकरास पोटाशी घेऊन समजवावे तसेच मनातील निखाऱ्यांना शब्दांनी मायेची कुंकर घातली. लोकांच्या वागण्यातला संधिसाधपणा, समाजात पसलेले विषमतांचे जाळे, समाजातला वाढत जाणारा असंतोष यामळे कवींच्या आले.

तेव्हा शब्दांनीच त्यातून बाहेर येण्यासाठी उजेडाचा मार्ग दाखवला. आयुष्यात घडून गेलेली जिव्हारी लागलेली आग ओक लागली तेव्हा शब्दांनीच मनातील विचारांचा हल्ला झेलला. शब्दांनीच त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखविला. समाजातील कवीला सहन न होणाऱ्या विषमतांमुळे मनातील ऊन, चीड बाहेर पडून बघत होती. तेव्हा शब्दांनीच व्यक्त होण्यास मनाची समजूत घालण्यास मदत केली, सायली धरली. मनातील चीडचिडीमुळे दिवसाही अंधारल्यासारखे व्हायचे.

आपण हतबद्ध आहोत असे वाटायचे तेव्हा शब्दांनीच यातून बाहेर पडण्यासाठी प्रकाशाचा मार्ग दाखविला. कवींच्या आयुष्यात काही क्षण हे मन प्रसन्न करणारे आले. त्यांना ते क्षण आयुष्यातून दूर घालवायचे होते, विसरायचे होते, शब्द हे वेळोवेळी मार्गदर्शक ठरले. वाहणाऱ्या नदीच्या जोरावर प्रवाहात अडकलेला माणूस मरणाच्या धारेत वाहत असतो, तशा परिस्थितीत काही वेळा कवी अडकले तेव्हासुद्धा शब्दांनीच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले.

जेव्हा कवी आयुष्यात कोणीच नव्हते, प्रसिद्ध नव्हते तेव्हा स्वतःविषयी त्यांच्या मनात भीती होती. तेव्हा शब्दांनी एखादया मित्रासारखा आधाराचा पाठीवर हात ठेवला, कधी जगाच्या वाऱ्याबरोबर ते टिकू शकले नाहीत. कोणी आप्तांनी निवारा दिला नाही, आधार दिला नाही तेव्हा कवीला आपलेसे वाटणारे शब्दच होते. या शब्दांनीच त्यांना आधार दिला.

कवींच्या आयुष्यातील शब्दांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण ते त्यांचं शस्त्र आहे. शब्दांमुळेच कवी आज प्रसिद्ध आहेत. ‘ आयुष्यातील प्रत्येक वळणावर साथ देणारे शब्द यांनी मला सर्व काही दिले आहे असे कवी म्हणतात. या श्रीमंत शब्दांना मी काय देक? मी त्यांचा कसा उतराई होऊ? असे कवीला वाटते. मी शब्दांना आपले शस्त्र बनवून त्यावर माझ्या मनातील जहर, चीड उतरवली व शब्दांनी तीही पचवली, या शब्दांना काही देण्याची ताकद माझ्यात नाही, असे त्यांना वाटते. आपण या शब्दांचे कर्जदार आहोत. या शब्दसंपत्तीपुढे आपण भिकारी आहोत असे त्यांना वाटते.

एका कवीच्या मनातील शब्दांविषयीची भावना अतिशय योग्य प्रकारे कवी यशवंत मनोहरांनी ‘शब्द’ या कवितेत व्यक्त केली आहे. शब्दबद्ध केली आहे.

11th Marathi Book Answers Chapter 10 शब्द Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित पदध पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. शब्दांनी पोटाशी घेतले → [ ]
  2. डोळ्यांपुढे अंधारून आल्यावर शब्दांचे कार्य → [ ]
  3. चिडून सांडत होते → [ ]
  4. दिवसाचा अंधार दूर करण्यासाठी शब्दांनी केलेली मदत → [ ]

उत्तर:

  1. निरुत्तर निखाऱ्यांना
  2. उजेडाचा हात दिला
  3. ऊन
  4. शब्दांनी बिजली दिली

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

स्वमत :

प्रश्न 1.
‘शब्दांचे सामर्थ्य अफाट असते’ या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः
मी नववीत असतानाची गोष्ट. आठवीत पहिला क्रमांक आल्याने सर्वच मित्र माझ्या अवती-भवती फिरायचे. त्यामुळे मीही जरा हवेतच तरंगत होतो, परिणाम व्हायचा तोच झाला, मी अभ्यासात मागे पडलो आणि पहिल्या घटक चाचणीत नापास झालो. मला स्वत:चीच लाज वाटू लागली. आता घरी काय सांगू? आई-बाबांना तोंड कसे दाखवू? असे मला झाले. माझी ही अवस्था गोरे सरांनी पाहिली.

माझ्या मनातले विचारही कसे कोण जाणे पण त्यांनी जाणले. त्यांनी मला जवळ बोलावले. माझे काय चुकले, ते मला सांगितले. इतकेच नाही तर मला धीरही दिला, प्रत्येकाच्या आयुष्यात चुका होतात, परंतु त्या सुधारून पुढे जाणारा यशस्वी होतो, ते त्यांनी समजावले. पुन्हा नव्याने उभं राहायला ते मदत करतील, असं आश्वासन दिलं. त्यांच्या शब्दांनी मलाही उभारी आली आणि मी जोमाने अभ्यास करून नववीला पुन्हा यश संपादन केलं व पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. गोरे सरांच्या शब्दांनी त्यावेळी माझ्या विद्यार्थी दशेत योग्य दिशा दिली म्हणून मी आज आयुष्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकलो.

आकलन कृती

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. कविला विसरायचे होते
  2. कवी सापडले होते
  3. शब्दांनी कविला आश्रय दिलेली जागा
  4. शब्दांनी हल्ला झेलण्याचे कारण

उत्तरः

  1. कविला विसरायचे होते – जगून देणाऱ्या गोष्टी
  2. कवी सापडले होते – मरणाच्या धारत
  3. शब्दांनी कविला आश्रय दिलेली जागा – उरात
  4. शब्दांनी हल्ला झेलण्याचे कारण – एखादी आठवण आग घेऊन धावला

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 4

शब्दांचे कार्य :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 5
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द 6

स्वमत :

प्रश्न 1.
‘शब्दाला शस्त्राची धार असते’ असे म्हणतात याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर :
‘शब्द, शब्द जपून बोल’ ही ओळ आपल्याला खूप काही सांगते. शब्द माणसाच्या भावना व्यक्त करण्याचे साधन असले तरी बोलताना प्रत्येकाने आपण काय बोलतो आहोत याचे भान ठेवणे जरूरी आहे. अनेक वेळा शब्दांचे गैर अर्थ निघतात. तर कधी आपला एखादा शब्द दुसऱ्याच्या भावना दुखावतो, त्याच्या जिव्हारी लागतो. एक वेळ शरीरावर झालेली जखम भरून निघेल पण शब्दांनी एखादयाच्या मनाला झालेली जखम, कधीही भरून निघत नाही. एखादयाला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी, एखादया गोष्टींवर टिका करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग होतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

स्वाध्यायासाठी कृती

1. ‘शब्द’ हे विचार परिवर्तन करण्याचे काम करतात सोदाहरण स्पष्ट करा.
2. ‘कविता’ हा कविमनाचा आरसा असतो तुमचे विचार लिहा.

शब्द Summary in Marathi

प्रस्तावना :

परिवर्तनवादी जीवनमूल्ये जपणारे कवी यशवंत मनोहर यांनी आपल्या आक्रमक शब्द शैलीतून आजच्या जगातील विषमता, मूल्यांची होणारी पायमल्ली, संधिसाधुपणा, समाजातील वाईट गोष्टींवर ताशेरे ओढले आहेत.

‘शब्द’ या कवितेत त्यांनी आपल्या जीवनातील शब्दांचे स्थान सांगितले आहे. शब्द हेच त्यांचे सर्वस्व आहे ही भावना या कवितेतून व्यक्त होते.

कवितेचा आशय :

कवी म्हणतात समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींविरोधात माझे मन आक्रोश करू पाहत होते तेव्हा तो आक्रोश मी शब्दांद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनातील चीड निरुत्तर होती कारण बजबजलेल्या समाजाकडे त्याची उत्तरे नव्हती तेव्हा माझ्या मनातील आग शांत करण्यासाठी शब्दांनीच आसरा दिला, एक माता जशी आपल्या मुलाला पोटाशी घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते तसेच शब्द माझ्याबरोबर उभे राहिले. जेव्हा कधी आयुष्यात असे क्षण आले की पुढचा मार्गच शोधता येईना, अंधारून आले तेव्हासदधा शब्दांनीच मार्ग दाखवून उजेडाचा हात, दिला.

रू लागली तेव्हाही शब्दांनीच मन मोकळे करण्याची, मनाला समजावून हल्ला झेलण्याची शक्ती दिली. मनातील हतबलतेची चीड उन्हाचा दाह देत होती तेव्हाही शब्द सावली बनून आले. भरदिवसाही जेव्हा असहाय्यतेने डोळे भरून यायचे, डोळ्यापुढे अंधार दाटायचा, तेव्हा पुन्हा प्रकाशाचा किरण दाखवणारे शब्दच होते.

आयुष्यातील काही क्षण मन त्रस्त करणारे, जगू नये अशी भावना निर्माण करणारे होते. तेव्हा स्वत:चा तोल सावरण्यासाठी शब्दच मार्गदर्शक | ठरले. मरणाच्या दारात उभे राहून मरणाला जवळ करावे असे वाटू लागले. आयुष्याची नाव डुबत आहे असे वाटू लागले तेव्हा या मरणाच्या दारातून बाहेर पडण्यासाठी उमेदीचा, आशेच्या किरणांचा किनारा शब्दांनीच दिला.

काहीही हातात शिल्लक नव्हते, आपण काय करावे हे सुचत नव्हते, जेव्हा मी आयुष्यात अपयशाने ग्रासलो होतो. स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसलो होतो. स्वत:चीच भिती वाटू लागली होती. कोणाच्या तरी आधाराची अपेक्षा होती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर धीराचा हात ठेवला. कधी आप्तस्वकियांनी तर कधी समाजाने झिडकारले तेव्हाही शब्दच आश्रयास उभे राहिले.

हे शब्द जे माझे सर्वस्व आहेत. या शब्दांनी कधी मला लेखणीतून मनाला आधार दिला तर कधी चांगल्या वाचनातील विचारातून. या शब्दांमुळेच मी आज जगण्यास लायक आहे अशी कवीची भावना आहे म्हणून ते म्हणतात. शब्दांनी मला भरभरून दिले पण मी या शब्दांचा उतराई कसा होऊ? मी शब्दांना आपलेसे केले व त्यांनी मला वाचविले. मी माझ्या मनातील जळजळ, जहर शब्दांतून उतरविले म्हणजेच समाजातील अन्यायाची, विषमतेची चीड मी शब्दांतून मांडली. पण शब्दांनी माझ्या रागाचे त्यांवर होणारे प्रहारही पचविले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 शब्द

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. आकान्त – आक्रोश, अनर्थ, कोलाहल – (loud wailing).
  2. निखारा – धगधगता कोळसा – (blaxing coal).
  3. बिजली – वीज – (lightning).
  4. किनारा – काठ, तट – (shore).
  5. निवारा – आश्रय – (shelter).
  6. कर्जदार – ऋणको, कर्ज घेणारा – (borrower)
  7. जहर – विष – (poison).

वाक्प्रचार:

  1. पोटाशी धरणे – मायेने जवळ घेणे.
  2. निरुत्तर होणे – शब्दच न सुचणे.
  3. धावून येणे – मदतीस येणे.
  4. अंधारून येणे – काळोखी येणे.
  5. हात देणे – साथ देणे.
  6. सावली धरणे – आश्रय देणे.
  7. पाठीवर हात ठेवणे – धीर देणे.
  8. उतराई होणे – कर्जातून मुक्त होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

11th Marathi Digest Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 2

आ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण …………
उत्तर :
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण उषाताईंची वयाची अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती. सरकारी नियमाप्रमाणे अठ्ठावन्न वर्षे वय हे सेवा निवृत्तीचे वय समजले जाते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 2.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ………….
उत्तर :
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण दोघींच्या वयात पाच वर्षांचे अंतर होते. उषावहिनी या वयाने निशापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचीच भूमिका त्यांच्याच नावाने करायची होती म्हणून निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न 3.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ………..
उत्तर :
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभांगाची एक जोरकस लाट आली, कारण आज त्यांनी उलटाच प्रकार अनुभवला होता. मागील वीस वर्षांमधल्या कार्यक्रमात उषावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या. पण आज मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.

प्रश्न 4.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण …………..
उत्तर :
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते, कारण मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया नोकरी करतात, त्यामुळे मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाइत होते.

इ. वैशिष्ट्येलिहा.

प्रश्न 1.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
उत्तर :
मुंबईला दूरदर्शन सुरू झालं, त्यानंतर आजतागायत चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना संसाराच्या बाबतीत ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ असे सल्ले देत असत. थोडक्यात ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना सबुरीचा सल्ला देत असत. तसेच दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिका अशा त-हेच्या सूचना त्या महिला प्रेक्षकवर्गाला देत असत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 2.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
उत्तर :
‘बहिनींचा सल्ला’ हा लोकप्रिय कार्यक्रम होता या कार्यक्रमाने विशी गाठली होती. वयोमानाप्रमाणे निवृत्त व्हावे लागते याच नियमानुसार उपवहिनींना अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती त्यामुळे या कार्यक्रमाला समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार होत्या, तसेच उषावहिनींचा सत्कारही होणार होता. ह्या कार्यक्रमाची शेवटची दहा मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येणार होता. हा कार्यक्रम प्रथमच दूरदर्शन केंद्राच्या बाहेर होणार होता. तसेच शेवटचा म्हणूनच खास महत्त्वाचा होता.

ई. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 3
उत्तर :

उषावहिनींचा सल्ला निशावहिनींचा सल्ला
जोडा, जुळवा व समजून घ्या. थोडी भीड, थोडा संकोच, थोडी परंपरा गुंडाळून ठेवायची.
संसाराची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको, एक चाक थोडसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा. संसाराच्या दोन्ही चाकांनी समसमान भार घ्यावा.
लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या दिल्या याचा अर्थ तडजोड व संयम यांचा सल्ला. लोकांना कडू क्विनाईचा डोस दिला म्हणजेच स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याचा सल्ला.
भारतीय रूढी परंपरेला आव्हान न देणारे, शांत, सौम्य व्यक्तिमत्त्व व तसेच सल्ले, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिकायचा सल्ला. भारतीय रूडी-परंपरेला आव्हान देणारे सल्ले, स्वत:च्या मनाचा कौल घ्या, स्वतःला स्वत:च महत्त्व दिलं पाहिजे, आत्मसन्मान जपा असा सल्ला.

2. पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
उत्तर :
मागील वीस वर्षे उषावहिनींचा वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित होत होता. उषावहिनींच्या जोडा, जुळवा व जमवून घ्या या सल्ल्यामुळे हा कार्यक्रम त्यावेळी यशाच्या शिखरावर होता पण या सल्ल्याचा उपयोग खरोखरच कोणी संसारात किंवा जीवनात करून घेत का? असा प्रश्न उपस्थित रहात होता. प्रेक्षकवर्ग कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद देत होता. सलग वीस वर्षे कार्यक्रम यशस्वी होत होता. वहिनी सगळ्यांना कार्यक्रमात सबुरीचा सल्ला देत असत पण खरोखरच्या जीवनात त्याचा अवलंब किती होत होता याचे उत्तर अनुत्तरीत होतं म्हणून रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस होता हे स्पष्ट होतं.

प्रश्न 2.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
उत्तर :
संसारामध्ये प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही जणांच्या आयुष्यात संकटांमागुन यातना किंवा दुःख सहन करावे लागते. यातून त्यांना बाहेर काढावे लागते. दुःखातून बाहेर काढण्यासाठी विविध मागांचा अवलंब करावा लागतो. सर्वसामान्य लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात. तसेच कार्य निशावहिनी करत आहेत. त्या कामगार क्षेत्रात काम करतात. समस्यांच्या मुळापर्यंत जातात व त्या समस्येतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य दुःखातून मुक्त होण्याचा योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणारी व्यक्ती होय, मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 3.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
उत्तर :
मुंबईसारख्या शहरात जर राहायचे असेल तर घरातील पुरुष व स्त्रिया यांनी नोकरी करणे आवश्यक असते नाहीतर खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात असा अनेकांचा अनुभव आहे. जर घरातील महिला नोकरी करीत असेल तर मुंबईत जे पाहुणे येतात ते त्यांच्या घरी जात नाहीत कारण त्यांची पंचाईत होते. त्यांची ऊठ-बस किंवा सरबराई करायला यजमानाच्या घरात हक्काची बाई नसते. याचाच अर्थ जर घर व्यवस्थित वॉटरप्रूफ केलं असेल तर पावसात गळायची भीती नसते. त्याचप्रमाणे घरातील महिला जर कामावर जात असेल तर पाहुणेरूपी पावसाची अजिबात भीती नसते.

प्रश्न 4.
‘कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल’
उत्तर :
कोणत्याही समस्येवर जर उपाय शोधायचा असेल तर त्या समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाय शोधला पाहिजे तरच ती समस्या कायमची संपुष्टात येईल, ज्याप्रमाणे एखादया झाडाला जर कीड लागली आणि त्याकडे जर दुर्लक्ष केले गेले तर कीड ते झाड पूर्णपणे खाऊन टाकते. त्यामुळे जर कीड मुळापासून औषधमागांनी उपटून काढली तरच झाड जगेल. अन्यथा ते मरेल. त्याचप्रमाणे औषधरूपी सल्ल्याचा उपयोग जर संसारात केला किंवा रोजच्या जगण्यात केला तर त्याच त्याच समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत व आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल.

3. व्याकरण

अ. विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 4
उत्तर :

विशेष्य विशेषणे
आठवणी कडूगोड
कळ जीवघेणी
वेळ फावला
पुळका पोकळ
असहकार अंजन

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

आ. केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.

प्रश्न 1.
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
उत्तर :
1. केवल वाक्ये :
(अ) उषावहिनी पर्स घ्यायला आत गेल्या.
(ब) शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली.

2. मिन वाक्ये
(अ) जर या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असली तर हे अंजन वापरण्यावाचून तुम्हांला पर्याय नाही.
(ब) म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेलं आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिले होते.

3. संयुक्त वाक्ये:
(अ) पाहुण्यांचा पाऊस पडायला लागला, की डोक्यावर उलटी छत्री धरायची.
(ब) माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल, अशी माझी खात्री आहे. कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा.

इ. खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.

(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 5
उत्तर :

विरामचिन्हे नावे
; अर्धविराम
………… लोपचिन्ह
अपसरण चिन्ह
: अपूर्ण विराम
संयोगचिन्ह

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

ई. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
अ. काजवे चमकणे – ………………….
आ. डोळे लकाकणे – ………………..
इ. कायापालट होणे – ………………..
ई. कडेलोट होणे – …………………..
उत्तर :
अ. काजवे चमकणे- अंधारी येणे किंवा अतिशय घाबरणे.
वाक्य : अचानकपणे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामुळे माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.

आ. डोळे लकाकणे – आशेचा किरण दिसणे,
वाक्य : अर्जुनाची भूमिका करणारा अभिनेता मिळाल्यावर दिग्दर्शकाचे डोळे लकाकले.

इ. कायापालट होणे – अनपेक्षित बदल होणे.
वाक्य: बऱ्याच वर्षांनतर गावी गेल्यावर गावचा कायापालट झालेला मला दिसला.

ई. कडेलोट होणे – गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे.
वाक्य : काहीही चूक नसताना पोलिस चौकशीला येत आहेत हे समजल्यावर श्यामची अवस्था कडेलोट झाल्यासारखी झाली.

उ. खालील शब्दांचे वर्गीकरण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 6
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 7

4. स्वमत

प्रश्न अ.
वहिनींचा सल्ला ‘सुसाट’ वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर :
कथेचा अभ्यास केला असता वहिनींचा सल्ला सुसाट आहे. उघावहिनी निशावहिनी यांच्या सल्ल्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. उषावहिनी या ‘जोडा’, ‘जुळवा’ व ‘जमवून घ्या’ असा सल्ला देत असत. पण निशावहिनींचे सल्ले मात्र अगदी त्यांच्या विरुद्ध असल्याचे जाणवते. भीड, संकोच व परंपरा गुंडाळून ठेवायच्या, पाहुण्यांना येणारा प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचा. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या स्त्रीला ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ यांऐवजी ‘असहकार’ पुकारायला सांगणे व त्याच मार्गाने म्हणजे जशास तसे उत्तर देऊन वठणीवर आणायचे असे सल्ले वहिनींनी दिले.

एका बाजूला उषावहिनींचा सामोपचाराचा सल्ला व दुसऱ्या बाजूला निशावहिनींचा अगदी त्यांच्या विरोधातला म्हणजे जशास तसे उत्तर देण्याचा सल्ला, कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल असा साधारणपणे समाजाच्या रूढी परंपरेशी विसंगत असा निर्णय घेण्याची हिंमत म्हणूनच वहिनींचा सल्ला आम्हांला ‘सुसाट’ वाटतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न आ.
‘पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
निलंजना बॅनर्जी यांनी पावसाप्रमाणे येणाऱ्या पाहुण्याविषयीच्या समस्येचा प्रश्न विचारला पण तो त्यांनी सांगताना किंवा मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडला. त्यामुळे येथे विनोदाची निर्मिती झालेली दिसून येते. निलंजना बॅनर्जी या गृहिणी आहेत. त्या एका सेवाभावी संस्थेत घरची जबाबदारी सांभाळून काम करतात. त्यांची कुटुंबियांच्या संदर्भात कोणतीच समस्या नव्हती, त्या गृहिणी असल्यामुळे त्यांच्याकडे सतत पाहुण्यांचा राबता असायचा, पाऊस जसा धो धो कोसळतो व तो अनियमित असतो त्याचप्रमाणे त्यांच्याकडे भरपूर पाहुणे यायचे. हे सांगताना त्यांनी पाहण्यासाठी पावसाची उपमा वापरली.

त्यावरून त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते म्हणून त्यांनी अशी समस्या मांडली. त्यावर निशा बहिनींनी उत्तर दिले, माझा वॉटरप्रूफिंगशी काहीही संबंध नाही यामुळे प्रश्नाचा अर्थ समजण्यात किंवा समजावण्यात थोडीशी गफलत झालेली दिसून येते. त्यामुळे विनोदाची निर्मिती होते म्हणजेच शब्द फिरवल्यानंतर हलका फुलका विनोद निर्माण होतो. त्यामुळे मला हा विनोद आवडला.

प्रश्न इ.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर :
प्रत्येकाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्यावर जर त्यांना उपाय सापडला नाही तर मात्र इतरत्र सल्ले मागितले जातात. कथेमध्ये ज्या काही समस्या मांडल्या आहेत. त्या सर्वसामान्य गृहिणींच्या आहेत. बऱ्याच घरात नवरा व बायको दोघेही नोकरी करतात पण घरातल्या कामात मात्र बराचसा पुरुषवर्ग हात आखडता घेत असतो. त्यामुळे बऱ्याच नोकरदारांच्या घरी घरातल्या कामांसंबंधी समस्या निर्माण होते. दुसरी समस्या म्हणजे मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांची समस्या. शक्यतो ज्या घरातील स्त्री नोकरी करत नाही त्याच घरात पाहुण्यांचा राबता असतो.

काही वेळा पाहुण्यांना प्रेमाचा पोकळ पुळका येतो. तसेच घराघरात सासू आणि सुनेची एकत्र नांदण्याची समस्या, अनेक महिलांना पुरुष सहकाऱ्यांचे, हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचे कामावर येणारे धक्कादायक अनुभव आहेत, मुलींची रस्त्यावरील छेडाछाड समस्या खरोखरच समाजाला एका वेगळ्याच मार्गावर नेत आहेत. त्यामुळे या सर्व समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत.

मुलींची रस्त्यावर होणारी छेडछाड यामुळे तिला बाहेर पडणे कठीण होते. कार्यालयात आलेल्या अनेक वाईट अनुभवांमुळे ती सुरक्षित नसते. दारूच्या व्यसनामुळे संसाराची झालेली वाताहात, दारूच्या आहारी गेलेल्या नवऱ्याबरोबर सतत होणारी भांडणे, त्यांचे कुटुंबावर होणारे परिणाम, खालावलेली आर्थिक परिस्थिती त्यामुळे या समस्या योग्य आहेत. असे माझे मत आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न ई.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी’ तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
उत्तर :
उषावहिनी व निशावहिनी दोघीही सारख्या बहिणी होत्या. पण त्या दोघींच्या स्वभावात मात्र खूपच फरक होता. उषावहिनींचा स्वभाव जोडा, जुळवून घ्या असा होता म्हणजेच सबुरीच्या सल्ल्याप्रमाणे होता. पण अगदी त्यांच्या उलट निशावहिनींचा स्वभाव होता. समाजात जीवन जगत असताना सरळ मार्गी जाणाऱ्या माणसाशी सरळ मार्गाने वागावे पण जर तो वाकड्या मार्गाचा अवलंब करीत असेल तर आपणसुद्धा तशाच मार्गाचा अवलंब केला तर मात्र आपण यशस्वी होतो.

असे निशाबहिनींच्या स्वभावाचे पैलू होते. त्यामुळे शेवटच्या ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात निशावहिनी यांनी आपला ठसा उमटवला. उषावहिनींनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की “मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस केलंस.” माझ्या मते दिलेली पसंती ही योग्य आहे कारण सध्याच्या काळात जर असे वागले तरच निभाव लागणे शक्य आहे. मग ती समस्या घरात असो किंवा घराच्या बाहेर असो मुंबईसारख्या शहरात तर असे वागणे हीच काळाची गरज आहे. त्यामुळे निशावहिनींनी महिलांना विविध समस्यांबाबत दिलेला सल्ला मला योग्य वाटतो.

5. अभिव्यक्ती :

प्रश्न अ.
वहिनींचा ‘सुसाट ‘ सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
उत्तर :
उत्तरासाठी कृती : 3 मधील स्वमत पहा.

प्रश्न आ.
‘स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,’ याविषयीचे तुमचे विचार लिहा.
उत्तर :
सध्याच्या काळात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांदयाला खांदा लावून काम करीत असतात. त्या कुठेही कमी पडत नाहीत. क्तिक पातळीवरसुद्धा स्त्रियांनी आपले अस्तित्व विविध क्षेत्रांत सिद्ध करून दाखवले आहे. अजूनही काही ठिकाणी तिचे अस्तित्व नाकारले जाते किंवा तिने केलेल्या कामाला फारसे महत्त्व दिले जात नाही. पण माझ्या मते स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळायला हवे तसेच प्रत्येक ठिकाणी समान हक्क मिळायला हवा.

जर तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले तर तिचे महत्त्व समाजाला पटेल, खासकरून ज्या ठिकाणी पितृसत्ताक पुरुषप्रधान संस्कृती पद्धत आहे त्या ठिकाणी स्त्रियांचा आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण होताना आपणास दिसतो. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतच्या विविध दाखल्यांतून आपणास हे समजते. संतांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाबद्दल प्रथम वाचा फोडली. संत जनाबाईना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटावे लागले. पण संत नामदेवांनी तिला ते प्राप्त करून दिले.

‘नामयाची दासी’ म्हणविण्यात जीवनाचे सार्थक मानणाऱ्या संत जनाबाईचे सुमारे 350 अभंग आज उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यानंतर विविध प्रकारच्या लिखाणातून हे वारंवार सिद्ध झाले आहे. आज अनेक सामाजिक क्षेत्रात, वैयक्तिक क्षेत्रात स्त्रिया मानाच्या पदावर आहेत. भारतासारख्या विशाल देशात तर पंतप्रधानपदी (स्व. इंदिरा गांधी) व राष्ट्रपतीपदी (प्रतिभाताई पाटिल) देखील महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

याचाच अर्थ स्त्रियांनी आपल्या मनातील न्यूनगंडाची भावना जर दूर सारली तर तिला समाजात मानाचे स्थान मिळेल. याचाच अर्थ स्त्रियांनी परंपरेच्या जोखडात न राहता गृहिणींनीसुद्धा आपला आत्मसन्मान जपला पाहिजे तसेच तिच्या घरातील आणि समाजातील लोकांनीसुद्धा तिचा आदर करणे/ जपणे फार महत्त्वाचे आहे.

प्रकल्प.

प्रश्न 1.
प्रसारमाध्यमांतून सतत दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती व मालिका यांविषयी समवयस्कांशी चर्चा करा व त्यासंबंधी अहवाल तयार करा.

11th Marathi Book Answers Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Additional Important Questions and Answers

कारणे लिहा.

प्रश्न 1.
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण ……
उत्तरः
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण सौम्य व्यक्तिमत्त्व आणि समतोल सल्ले देणाऱ्या उषाबहिनींच्या स्वभावात अचानक बदल झाला होता. त्यांचे स्वत:च्या मनाचा कौल घ्या, स्वत:ला स्वत:च महत्त्व दया, आत्मसन्मान जपा, असे भारतीय रूढी-परंपरेला आव्हान देणारे सडेतोड विचार ऐकन सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 2.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
उत्तर :
1. किंकाळी फोडणे – अतिशय जोराने ओरडणे.
वाक्य : आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यादेखत झालेला अपघात पाहून त्या मातेने किंकाळी फोडली.

2. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे – खूप प्रयत्न करणे.
वाक्य : छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

3. गैरसमज होणे – चुकीचा समज होणे.
वाक्य : राम हा स्वार्थी आहे असा श्यामचा गैरसमज झाला.

4. आस्वाद घेणे- आनंद घेणे.
वाक्य : बऱ्याच प्रतिक्षेनंतर पडलेल्या पावसात मुलांनी कांदाभजीचा आस्वाद घेतला.

5. आसनाला खिळणे – मग्न होणे.
वाक्य : एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा प्रयोग पाहताना प्रेक्षकवर्ग आसनाला खिळला होता.

6. मान डोलावणे- होकार दाखविणे.
वाक्य : रमेशच्या लग्नाला पालीला जायचे आहे असे कबीरने सांगितल्यानंतर मी मान डोलावली.

शब्दसंपत्ती :

प्रश्न 1.
खालील वाक्यांचा अभ्यास करा. ‘कर’ या शब्दाची योग्य अर्थच्छटा कंसातील पर्यायातून निवडा. ती वाक्यांसमोर कंसांत लिहा.
टॅक्स. कृत्य, हात करणे (क्रयापद)
उत्तर :
अ. दाम करी काम वेड्या – (करणे) (क्रियापद)
आ. कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे – (टॅक्स)
इ. कर हा करी धरिला शुभांगी – हात
ई. कर नाही त्याला डर कशाला ? – कृत्या

आकलन कृती :

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 8
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 9

‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाची शिवाजी मंदिरातील वर्षसंख्या व उषावहिनींचे त्यावेळेचे वय.

प्रश्न 1.
1. वर्षसंख्या – [ ]
2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय – [ ]
उत्तर :
1. वर्षसंख्या – 20
2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय – 58

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
उषावहिनींच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय – [ ]
उत्तर :
उषावहिर्नीच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य – हा कार्यक्रम स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. त्यासाठी समाजातल्या मान्यवर व्यक्ती निमंत्रित केल्या होत्या. उघावहिनींचा सत्कार होणार होता.

प्रश्न 2.
मागील वीस वर्षांत उषावहिनींनी कार्यक्रमादरम्यान सुखी संसारासाठी वापरलेली आयुधे.
1. ……… 2. ……… 3. ……… 4. ………
उत्तर :
1. हंडाभर फेविकॉल.
2. दोन-चार मैल लांबीच्या चिकटपटट्या.
3. शंभर एक किलो डिंक.
4. पाच सात बरण्या च्युइंग गम

प्रश्न 3.
‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टा
परिणाम – …………….
उत्तर:
कृती – ‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टी
परिणाम – कार्यक्रम यशस्वी

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 10
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 11

प्रश्न 5.
मुंबईला दूरदर्शन सुरू झाल्यानंतरचा एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम – [ ]
उत्तर :
बहिनींचा सल्ला

उपयोजित कृती

प्रश्न 6.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
दूरदर्शन, गाडी, कार्यक्रम, स्टुडिओ.
उत्तर :
गाडी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 7.
घटनाक्रम योग्य क्रमानुसार लावा.
समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.
चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं.
उत्तर :
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पढे येऊन स्वत:ला पाहिलं.
समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.
उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.

प्रश्न 8.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम.
पर्याय :
(अ) एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम
(ब) स्वल्पविराम, पूर्णविराम
(क) स्वल्पविराम, उदगारवाचक चिन्ह
(ड) पूर्णविराम, अपसारण चिन्ह.
उत्तर :
एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, विरामचिन्हे घालून वाक्य – ‘वहिनींच्या सल्ल्या’चा शेवटचा कार्यक्रम.

आकलन कृती :

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 12
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला 13

खालील घटनेचा परिणाम लिहा.

  • घटन – वीस वर्षामधल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर उपावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची.
  • परिणाम – अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

सूचननुसार कृता करा.

प्रश्न 1.
‘निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
निशाने चेहऱ्यावर काय आणण्याचा प्रयत्न केला?

प्रश्न 2.
‘वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम दरवेळी आवर्जून पाहिला जायचा कारण …. [ ]
उत्तर :
‘वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम दरवेळी आवर्जून पाहिला जायचा कारण – उषावहिनींनी नेसलेली साडी

खालील शब्दसमूहासाठी उताऱ्यात योजलेले शब्द.

प्रश्न 1.
नाट्यप्रयोग सादर करतात ते ठिकाण – [ ]
उत्तर :
नाट्यप्रयोग सादर करतात ते ठिकाण – नाट्यगृह

प्रश्न 2.
कार्यक्रमाचं निवेदन करणारा – [ ]
उत्तर :
कार्यक्रमाचं निवेदन करणारा – निवेदक

उपयोजित कृती

कोण ते लिहा.

प्रश्न 1.
उषावहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून देणारी व्यक्ती – [ ]
उत्तर :
उषावहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून देणारी व्यक्ती – निशावहिनी

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

प्रश्न 2.
अपेक्षाभंगाची लाट पसरवणारा प्रेक्षकवर्ग – [ ]
उत्तर :
अपेक्षाभंगाची लाट पसरवणारा प्रेक्षकवर्ग – महिला

प्रश्न 3.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
उत्तर :
1. प्रौढ, वयस्कर, थोराड, तारुण्य – तारुण्य
2. लोकप्रिय, नावाजलेला, प्रसिद्ध, चर्चेतला – चर्चेतला

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.
उत्तर :
प्रयोग – खेळ, नाटय, लोकरंग, नाट्यरंग –
खेळ सराईत – हुषार, तरबेज, अडाणी, डळमळीत – तरबेज

चूक की बरोबर ते लिहा.

प्रश्न 1.

  1. निशावहिनींची उषावहिनींच्या सहकाऱ्यांशी चांगली ओळख नव्हती.
  2. ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाचा शिवाजी मंदिरातील प्रयोग हा पहिलाच प्रयोग होता.
  3. उषावहिनींचा ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम आवर्जून पाहिला जायचा याचे प्रमुख कारण म्हणजे उपावहिनींनी नेसलेली साडी होय,

उत्तर :

  1. चूक
  2. चूक
  3. बरोबर

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

स्वमतः

प्रश्न 1.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा.
उत्तर :
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा ‘एका फांदीवरची पाखरं’ या पुस्तकातून घेतली आहे. ही कथा शोभा बोंद्रे यांनी लिहिली आहे. ही कथा विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकी-फुलकी कथा आहे. काही उलट-सुलट घटना, माणसाच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रणे यांमुळे कथा गंमतदार झाली आहे.

वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा महिला वर्गाच्या विविध प्रश्नांवर पैलू टाकणारी कथा आहे. उषावहिनी ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम मागील वीस वर्षांपासून सादर करीत होत्या. दूरदर्शनवरील हा सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम होता. पण काही कारणांमुळे उषावहिनींना त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही त्यामुळे त्या कार्यक्रमाची पूर्ण सूत्रे निशावहिनी यांच्याकडे आली. दोधी बहिणी जरी असल्या तरी दोर्षीच्या स्वभावात प्रचंड तफावत. उषावहिनी ‘जोडा’ ‘जुळवा’ व ‘जुळवून’ घ्या अशा स्वभावाच्या तर निशा वहिनी जशास तसे उत्तर देणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांचे सल्लेही अनेपेक्षित होते.

नवऱ्याशी असहकार पुकारणे, पाहुण्यांना आपल्या कामाचे महत्त्व पटवून देण्याकरीता थोड्याफार प्रमाणात परंपरा गुंडाळून टाकावी लागली तरी चालेल, कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन ती समस्या मुळापासूनच उखडून टाकली पाहिजे असे सल्ले निशावहिनी यांनी या कार्यक्रमात दिले. याचा अर्थ दुःख व सुख, निराशा व आशा, बंधन व मोकळीक या भावनांचा अनुभव या कथेतून झालेला दिसतो आणि हा सगळा अनुभव घेत असताना सुखाची जाणीव आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे ही कथा आम्हाला आवडते.

वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Summary in Marathi

प्रस्तावनाः

शोभा बोंद्रे कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले आहे. माहेर, जत्रा, स्त्री, किर्लोस्कर इ. नामवंत मासिकांमधून विपुल लेखन.

‘मुंबईचा अन्नदाता’, ‘नॉट ओन्ली पोटेल्स’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘सहावं महाभूत आणि मी’, ‘एका फांदीवरची पाखर’ ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांच्या यशोगाथा वेधकपणे उलगडून दाखाविल्या आहेत. माणसातल्या ‘माणुसपणाची’ उत्तुंग झेप, त्या मागची तपश्चर्या यांचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून होते.

‘आभाळमाया’, ‘ऊनपाऊस’, ‘अर्धागिनी’, ‘मानसी’, इ मालिकांसाठी त्यांनी संवादलेखन केले आहे. सातासमुद्रापार या त्यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

पाठाचा परिचय:

‘एका फांदीवरची पाखरं’ या त्यांच्या पुस्तकातील ही एक हलकीफुलकी विनोदी कथा आहे. काही उलट-सुलट घटना, माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्याक्तिचित्रणे यांमुळे कथा रंगतदार झाली आहे. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आणि समान हक्क मिळायला हवा; तसेच तिने स्वत:ला सिद्ध करून स्वतःचे महत्व समाजास पटवून दयायला हवे, हा संदेश या कथेतून अधोरेखित झाला आहे.

उपावहिनींचा कार्यक्रम निशावहिनींकडे गेल्यानंतर जी काही गंमत झाली आहे त्याचे दिलखुलास व मार्मिक वर्णन या कथेत आले आहे. मुंबईला दूरदर्शन सुरू झाल्यानंतर जे काही कार्यक्रम प्रसारित झाले त्यातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘वहिनींचा सल्ला’. उषा वहिनींना अट्ठावन्न वर्ष पूर्ण होत होती त्यामुळे पाठात आलेली विनोदी कथा हा त्याचाच एक भाग आहे.

शेवटचा प्रयोग असल्यामुळे हा कार्यक्रम स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेले आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना बहिनींनी दिलेले त्यामुळेच हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर होता. शेवटच्या कार्यक्रमासाठी त्यांची तयारी पूर्ण झाली होती पण दांडीवर वाळत असलेला रूमाल काढायला त्या स्टूलावर चहल्या. रूमाल हातात आला पण तोल जाऊन त्या खाली पडल्या.

त्याही अवस्थेत त्या कार्यक्रमासाठी जायला तयार होत्या पण डावा पाय गुडघ्यापासून वाकडा झाल्यामुळे नामवंत अस्थिव्यंगतज्ञ डॉ. बडव्यांकडे त्यांना नेण्यात आलं. त्यामुळे कार्यक्रम त्यांना स्वत:ला सादर करता आला नाही. त्यानंतर ही भूमिका करण्याची जबाबदारी निशावहिनींकडे आली, जरी आपण जळ्या बहिणी नसलो. दोघींमध्ये पाच वर्षांचे अंतर जरी असले तरी आपण सारख्याच दिसतो असे उषाबहिनींनी निशाबहिनींना समजावून सांगितले. मेकअपमध्ये सर्व काही व्यवस्थित करण्यात आले. निशावहिनींनी चेहऱ्यावर प्रौढपणा आणायचा प्रयत्न केला.

सेटवर थोड्याफार प्रमाणात ओळख असल्यामुळे काही वाटलं नाही. पण कार्यक्रम शिवाजी मंदिरात व थेट असल्यामुळे थोडासा ताण निशावहिनींना जाणवत होता. निशावहिनींचं खर कामाचं क्षेत्र एक युनियनची कार्यकर्ता म्हणून होतं. याचाच अर्थ ज्या गोष्टी मालकांकडून कामगारांना मागून मिळत नाहीत त्या गोष्टी भांडून किंवा संघर्ष करून मिळवणं हे होतं. पण आज मात्र त्यांच्या बहिणीसाठी स्टेजवर व विशेष करून त्यांच्याच रूपात उभं रहायचं होतं. हे काम एक आव्हानात्मक होतं.

एका नोकरी करणाऱ्या नवरेबाईना त्यांनी दिलेला सल्ला खरोखरच ‘सुसाट होता. नवरा घरात कोणत्याही कामाला हात लावत नाही या त्यांच्या प्रश्नावर त्यांनी असहकार नावाचं अंजन डोळ्यात घालायला सांगितलं. जेणेकरून नवरा बरोबर ठिकाणावर येईल, असा त्यामागचा हेत होता. मुला बाळांचा विचार करायचा व नवऱ्याचा मात्र जाणीवपूर्वक विचार करायचा नाही हा सुसाट सल्ला त्यांनी दिला. या सल्ल्यामुळे प्रेक्षकांत क्षणभर अवघडलेली शांतता पसरली, एका बाईने टाळी वाजवली व त्यानंतर उरलेल्या सर्वच स्त्रियांनी आणि शेवटी पुरुषांनीही नाइलाजाने टाळ्यांचा कडकडाट केला.

निलंजना बॅनर्जी या गृहिणीला दिलेला सल्लासुद्धा सुसाटच होता. त्यांच्या घरात त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा तसेच त्यांनी एका सामाजिक संस्थेबरोबर केलेल्या कामाचा आदर होता. त्यांची समस्या पावसाच्या रूपात येणाऱ्या पाहुण्यांची होती. या प्रश्नाला निशावहिनींनी उत्तर दिलं. पाहण्यांना येणाऱ्या प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचं, तुमची सोय-गैरसोय न पाहता पाहणे आले आहेत. तुम्ही त्यांची सोय-गैरसोय बघायचं कारण नाही. तुमचं वेळापत्रक तुम्हीच सांभाळायचं. तुमच्या कामाचं महत्त्व घरातल्यांना पटलं आहे ना ? तसच पाहुण्यांनाही पटवून दयायचं.

या त्यांच्या उत्तराने सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली. आज काहीतरी वेगळंच घडत आहे याची जाणीव प्रेक्षकांना होत होती. कारण संयमाने उत्तर देणाऱ्या, समजुतीच्या चार गोष्टी सांगणाऱ्या उषावहिनींचा स्वभाव कसा काय बदलला? हे प्रेक्षकांना पटणारे नव्हते.

अशाच अनेक समस्यांना त्यांनी उत्तरे दिली. त्यांची उत्तरे म्हणजे ‘कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल’ हे तत्वज्ञान पाळणारी होती. याचाच अर्थ कोणताही प्रश्न वरवर विचार करून सोडविण्याऐवजी तो सखोल अभ्यास करून त्याचा बिमोड करणे हा आहे. त्यानंतर पोलिस इन्सपेक्टर मांडले यांचा आलेला फोन व त्यांच्या पश्चात घडलेले नाट्य आपल्यासमोर आहेच. त्यांनी दिलेली कबुली व त्यानंतर पडलेल्या टाळ्या हे सर्वकाही सांगून जाते. त्यांच्या या कार्यक्रमानंतर उषावहिनींची प्रतिक्रियासुद्धा दाद देऊन गेली.

‘हॅलो’, मी उषावहिनी बोलते आहे. निशा, मनःपूर्वक अभिनंदन! मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस केलंस. हे कोणीतरी करायलाच हवं होतं, अशी प्रतिक्रिया उषा वहिनींनी दिली. त्यानंतर मात्र ‘वहिनींच्या सल्ल्या ‘ चं नाटक संपलं होतं. कायमचं!

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. भराभरा – जलद – (hurry up).
  2. निमंत्रण – आमंत्रण – (invitation).
  3. मान्यवर – प्रतिष्ठित – (eminent).
  4. पर्स – बटवा – (purse).
  5. ममता – माया – (affection).
  6. पेशंट – आजारी व्यक्ती – (patient).
  7. अनेस्थेशिया – गुंगीचे औषध.
  8. बॅक स्टेज माणसे – रंगमंचाची व्यवस्था पाहणारे.
  9. कधीही समोर न येणारे कर्मचारी – (back stage artist).
  10. युनियन – संघटना – (union).
  11. रसिक – चाहता – (amateur).
  12. प्रयोग – खेळ – (act).
  13. असहकार – सहकार्य न करण्याची भावना – (non-cooperation).
  14. डीग – रास – (heap).
  15. अंजन – काजळ – (collyrium).
  16. विनावेतन – बिनपगारी – (without pay).
  17. प्रेमाचा प्रेमळ फुगा – वरवरचे दाखवलेले प्रेम – (apparent love).
  18. कायापालट – बदल – (transformation).
  19. सरबराई – आदरातिथ्य – (warm welcome).
  20. व्रत – वसा – (a rite ).
  21. लाभ – नफा – (profit).
  22. संधी – वाव – (an opportunity).
  23. सल्ला – उपदेश – (advice).
  24. गृहिणी – घरातील स्त्री, पत्नी – (a housewife).

वाक्प्रचार:

  1. काजवे चमकणे – अंधारी येणे, घाबरणे.
  2. डोळे लकाकणे – आशेचा किरण दिसणे.
  3. एखादी कल्पना सुचणे, कायापालट होणे – पूर्णपणे बदल होणे.
  4. कडेलोट होणे – एखादया गोष्टीचा अतिरेक होणे.
  5. असहकाराचे अंजन घालणे – सहकार्य न करण्याचा उपाय योजणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

11th Marathi Digest Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके 4

आ. रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके 5

इ. ‘रसाळ बोल’ आणि ‘सूर्य’ यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके 3
उत्तर :

रसाळ बोलांचे कार्य सूर्याचे कार्य
1. नादमाधुर्य 1. जगाला चेतना देणे
2. शब्दांचे आकर्षण 2. प्रकाश देणे

2. अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
उत्तर :
संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रेम होते आणि त्यांना अभिमानही होता. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दासामर्थ्यावर असणार सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात रसपूर्णता आहे. पण प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म ‘माधुर्य’ (गोडवा) आहे. “मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा अमृताशीही पैज जिंकणारी रसाळ व गोडवा असणारी अक्षरे निर्माण करीन. ती इतकी रसयुक्त, माधुर्य अनुभवणारी, जीवनदायी असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वत:चा कमीपणा जाणवेल इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करीन जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा आस्वाद घेताना माधुर्याची कमतरता कधीही जाणवणार नाही.”

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

प्रश्न आ.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
उत्तर :
मराठी भाषेतून निर्माण केलेल्या शब्दांची ‘कोमल’ या गुणाशी तुलना केली आहे. कोमल म्हणजेच मृदुता. सा रे ग म प ध नी सा हे सप्तस्वर आहेत. सूर हे कोमल असतात पण माझे हे शब्द इतके कोमल आहेत की या सप्तसुरांची कोमलता त्यांच्या पुढे कमी ठरेल. सुगंधाचा गुणधर्म ‘मोहक’ आहे व मी निर्माण केलेले शब्द इतके मोहक आहेत की सुगंधाचा मोहकपणा शब्दांपुढे कमी ठरेल. इतके हे शब्द मनाला मृदुता आणि मोहकतेचा स्पर्श करणारे आहेत.

3. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा ………..
आ. रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम ……….
इ. सर्व जगाला जागवणारा ……….
उत्तर :
अ. अमृत
आ. कलह सुरू करणे
इ. सूर्य

4. काव्यसौंदर्य :

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न अ.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।3।।
उत्तर :
मराठी भाषा ही अत्यंत रसपूर्ण भाषा आहे. तिच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की, मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले तर कानांनाही जिभा फुटतील म्हणजेच कानांचा गुणधर्म ‘श्रवण’ असा आहे. पण कान जेव्हा हे शब्द ऐकतील तेव्हा ते आपला मूळ गुणधर्म सोडून त्या प्रत्येक शब्दातील रस चाखण्यासाठी तयार होतील.

कानांनाच जिभा फुटतील, कानांना ही रसकला अनुभवायला मिळाली पण इतर इंद्रियांनादेखील ती रसपूर्णता अनुभवण्याची लालसा आहे. त्यामुळे या रसाळपणाचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक इंद्रिय पुढे सरसावेल आणि इंद्रिया-इंद्रियांमध्ये कलह माजून राहिल म्हणजेच प्रत्येक इंद्रिय त्या रसवत्तेसाठी आसुसलेले असेल. इतकी ही अत्यंत रसपूर्ण भाषा असून त्यातील शब्द रसाळ आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

प्रश्न आ.
“तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ 2 ॥
उत्तर :
माझ्या मराठी भाषेतील शब्दांचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. म्हणजे त्यातील शब्दांचे जे अर्थ अतिशय सविस्तर स्वरूपात मी दिले आहेत. त्यामुळे या मराठी भाषेतून मी निर्माण केलेला प्रत्येक शब्द अलौकिक आहे. म्हणजेच या शब्दांसारखे दुसरे शब्द सापडणार नाहीत. प्रत्येक शब्द हा स्वतःचे वेगळे अस्तित्व दर्शविणारा आहे आणि अशा अलौकिक, स्वतःचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या शब्दांचा अर्थ जो जाणणारा आहे. तोच खरा चिंतामणी ठरेल म्हणजेच तोच खरा तत्त्वज्ञ आहे की त्याला या मराठी भाषेत निर्माण झालेल्या शब्दांचा विस्तृतपणा जाणवेल किंवा ज्या व्यक्तीला या शब्दांचे ज्ञान होईल त्याच्याकडे चिंतामणीसारखे म्हणजेच एखादया तत्त्ववेत्यासारखे गुण आढळतील.

5. अभिव्यक्ती :

प्रश्न 1.
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
भारतवर्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा, भाषा आपापल्या ठिकाणी समदध आहेत. प्रत्येक भाषा स्वयंपूर्ण पावे, वाढवावे याच उदात्त हेतूने स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना स्वीकारण्यात आली. पूर्वी ईग्रज, पोर्तुगीज अशा अनेक सत्ता आपल्या देशावर राज्य करत होत्या, त्यांचे अनेक शब्द आपल्या भाषेत आले.

काळानुसार भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते त्याच प्रमाणे मराठीने संस्कृत, हिंदी, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधील शब्द आपले मानले ओहत. अनेक शब्दांना आपलेसे करून घेतल्याने मराठीची मधुरता, समृद्धता वाढली आहे. मराठीतले अनेक शब्दही इतर भाषांमध्ये वापरले जातात. मराठी भाषेत समृद्ध शब्दसंपत्ती आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे.

एकच क्रियापद, शब्द, वाक्प्रचार वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात उदा. गप्पा, थापा, माशा, उड्या, टिचक्या, टोमणा, पाकीट, शिट्टी इत्यादी शब्दांना ‘मारणे’ हे एकच क्रियापद लागते आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ बदलतो. मराठी भाषेत साहित्य, नाट्य, काव्य यांची संपन्नता आहे. मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे. काळाबरोबर, नवीन सुधारणांबरोबर अनेक नवीन शब्द मराठीत निर्माण झाले आहेत. अनेक वैशिष्ट्ये, सौंदर्यस्थळे, शक्तिस्थळे या भाषेत आहेत. मराठीला कोकणी, मालवणी, अहिराणी इ. मधुर बोलीभाषा आहेत.

जागतिकीकरण, स्मार्ट फोनमुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र मराठी बोलले, ऐकले जाते. मराठी साहित्य, चित्रपट, नाटक या माध्यमांतून या भाषेला सातासमुद्रापलीकडे जाण्याचा बहुमान मिळाला आहे. 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जातो. अलंकाराने सजलेली, चैतन्यमय मराठी भाषा श्रीमंत आहे आणि काळाच्या ओघातही ती टिकून राहिली आहे. शब्दांची मांदियाळी असलेली मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. म्हणूनच महणावेसे वाटते की ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….’

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

6. ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
‘ऐसी अक्षरे रसिकें’ या ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात माझे शब्द इतके रसपूर्ण आणि मधुर आहेत की ते सहज अमृतालाही जिंकतील, गोड शब्दांनी मी सांगेन. या मराठी भाषेतील शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता, सुरांची कोमलता कमी ठरेल व यांच्या मोहक गुणापुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल.

शब्दांच्या रसाळपणाचे महत्त्व असे आहे की, त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने कानांना जिभा फुटतील व इंद्रिये एकमेकांमध्ये भांडण करू लागतील. आश्चर्याची गोष्ट ही की उच्चारलेल्या ओवीची धाटणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल हे केवळ शब्द नसून ही तर रूपाची खाण आहे. जेव्हा सर्व शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर येऊन आपले बाहू पसरून आलिंगन घेण्यासाठी धावेल याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या गुणधर्माप्रमाणे त्या बोलाला (शब्दाला) झोंबतील आणि शब्दही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील, जसा एकटा सूर्य आपल्या हजार हातांनी सर्व जगाला चेतना देतो आणि निसर्गातील सर्व व्यवहार सुरू होतात.

त्याचप्रमाणे शब्दांची व्यापकता अफाट आहे. या शब्दांचा भाव जे जाणून घेतील त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले असे वाटेल. मराठी बोलाची मोठी ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्काम साधुजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे. ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे व जे इंद्रियांना समजू न देताच जेवू शकतात त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. येथे श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचाही (कानांचा) आश्रय सोडून मनानेच उपभोग घ्यावा.

11th Marathi Book Answers Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके Additional Important Questions and Answers

आकलन कृती :

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘डोळे तृप्त होतील’ स्पष्ट करणारी ओळ खालील चौकटीत लिहा.
उत्तरः
‘डोळे तृप्त होतील’ या अर्थाची ओळ खालील चौकटीत लिहा.
देखता डोळ्यांही पुरों लागे धणी

प्रश्न 2.
खालील शब्दांना ओव्यांमध्ये आलेले समानार्थी शब्द लिहा.
1. बळ –
2. वास –
उत्तरः
1. बळ – बीक
2. वास – परिमळ

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

स्वमतः

प्रश्न 1.
‘जैसा एकला जग चेववी। सहस्त्रकरु’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
उत्तर :
जसा सूर्य आपल्या सहस्त्र हातांनी (किरणांनी) पहाटे समयी सर्व जगाला जागे करतो. सूर्याच्या या कृतीमुळे सर्व जग जागे होऊन आपल्या कामाला प्रवृत्त होते. पहाट झाल्यानंतरच सर्वजण कामाला लागतात. हा एकटा संपूर्ण जगाला चेतना देतो. त्याच्या येण्याने सगळीकडे प्रकाश पसरतो आणि चेतनामयी वातावरण तयार होते. सूर्य हा आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जागाला प्रेरणा देतो. सूर्याची उपासना ही प्रकाश आणि ऊर्जा मिळविण्यासाठी केली जाते. हा पृथ्वीच्या वातावरणामध्येही बदल घडवून आणतो.

हिंदू धर्मामध्ये सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा तेजस्वी अंधाराचा शत्रू आणि पापनाशक आहे. पृथ्वीवरील सर्व जीवांचा हा एकमेव आधार आहे. सर्वांनीच सूर्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. सूर्य हा सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, बुद्धिवान, सर्वज्ञ, सृष्टीचा जगत्सचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. त्याच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी आपोआपच जागृत होऊन पिवळ्या चैतन्याने न्हाऊन निघते.

पृथ्वीवरील हवा, पाणी, अग्नी, तेज, उष्णता, शुद्धता, स्वच्छता आणि पवित्रता यांचा उगमस्रोत सूर्यच आहे. हा आत्मशक्तीचा प्रेरक आहे. तो शरीराला अंतर्यामी प्रेरणा देत असल्याने सर्वांनाच जागे होण्याचा संदेश देतो. सूर्यापासून प्राणिमात्रांची निर्मिती म्हणजेच त्याच्या कृपेमुळेच सर्वांचे पालनपोषण होते. हा सर्व चराचरांत सामावलेला व व्यापक आहे. तोच व्यापकपणा, तेवढीच शक्ती माझ्या मराठी भाषेतून निर्माण झालेल्या शब्दांमध्ये आहे.

स्वाध्यायासाठी कृती

1. ‘संत ज्ञानेश्वर – एक असामान्य व्यक्तिमत्त्व’ याविषयी 12 ते 15 ओळीत माहिती लिहा.
2. ‘महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय’ याविषयी 12 ते 15 ओळीत माहिती लिहा.

ऐसीं अक्षरें रसिके Summary in Marathi

प्रस्तावना :

संत ज्ञानेश्वर हे एक श्रेष्ठ संतपुरुष, संत कवी, तत्त्वज्ञानी, प्रतिभावंत. तत्त्वज्ञान, कल्पनावैभव, साक्षात्कार, रसतत्व यांच्या दृष्टीने लिहिलेला मौल्यवान ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘अभंगगाथा’ या त्यांच्या इतर रचना सुप्रसिद्ध आहेत. तत्त्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या रचनांमध्ये झाला आहे. विनयशीलता, सद्गुरुभक्ती, अमर्याद करुणा इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या रचनांमध्ये आढळतात.

या ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर त्याला नवे रूप दिले. मराठी भाषेची प्रतिष्ठा, शक्ती आणि सुंदरता यांचे दर्शन त्यांनी आत्मविश्वासाने घडविले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

कवितेचा / ओव्यांचा परिचय :

माझे बोल (शब्द) शुद्ध प्राकृत आहेत खरे पण त्यांची अशी रसपूर्ण योजना करीन ते सहज अमृतालाही जिंकतील. गोड शब्दांनी मी सांगेन, या शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता सप्तसुरांतील सुरांची कोमलता कमी भासेल आणि या शब्दांच्या मोहक गुणांपुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल.

शब्दांच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की, त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने कानांना जिव्हा फुटतील व इंद्रिये एकमेकांमध्ये भांडण करु लागतील. भांडण का करतील ….. तर …… श्रवण हा स्वभावतः कानाचा विषय आहे. जीभ म्हणेल ‘रस’ हा विषय माझा आहे. गंध हा विषय नाकाचा आहे. प्रत्येक शब्द हा ज्ञानेंद्रसंवेदध आहे.

आणखी एक नवलाची गोष्ट ही की उच्चारलेल्या ओवीची धाटणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल हे केवळ बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाण आहे. जेव्हा सर्व शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर निघेल आणि आपले वाहू पसरून आलिंगन घ्यायला धावेल याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला (शब्दाला) झोंबतील आणि शब्दही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील.

जसा एकटा सूर्य आपल्या सहस्त्र हातांनी सर्व जगाला चेतना देतो आणि सर्व चराचरातील व्यवहारांना सुरुवात होते. त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही विलक्षण आहे. या शब्दांचा भाव जे जाणतील किंवा त्या भावांचा विचार करतील त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले असे वाटेल.

पण असो, मराठी बोलाची मोठाली (मोठी) ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्काम साधुजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे.
ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे व जे इंद्रियांना नकळत किंवा त्यांना समजू न देताच जेवू शकतात | त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

येथे श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचाही (कानांचा) आश्रय सोडून मनानेच उपभोग घ्यावा. भाषा, शब्दरचना, नाद आणि लय यांचे सौंदर्य, ओबीरचनेतला सहजपणा, प्रसन्नता यांमधून संत ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना, श्रोत्यांना दिला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. कोवळिक – कोमलता.
  2. पाडे – तुलनेने.
  3. परिमळ – मोहकतेने – (with fragrance).
  4. बीक – बळ – (strongth, power).
  5. कळंभा – कलह – (a quarrel, conflict).
  6. विषो – विषय.
  7. सरिसेपणे – समता.
  8. सारखेपणा – (equal).
  9. अविष्करें – पसरून.
  10. भावजां – (भाव) जाणणाऱ्यांना.
  11. फावती – सापडती – (found).
  12. प्रतिपत्ति – ग्रंथरूपी भोजनसमारंभ, मेजवानी – (a feast, banquet).
  13. नीच – नित्य, नित्यनूतन – (always new).
  14. ठाणदिवी – दिव्याचे स्थिरासन – (wooden lampstand).
  15. फावे – लाभणे – (to obtain, to get).
  16. पांगे – आश्रयावाचून – (unsheltered, helpless).
  17. निजांगे – अंतरंग – (the heart, mind).
  18. निष्काम – विरक्त, फळाची इच्छा न धरणारे – (free from any expectations)
  19. सहस्त्रकरु – सूर्य – (the sun).
  20. धणी – तृप्ती – (satisfaction, content).
  21. इंद्रिये – अवयव (an organ of sense).
  22. रसना – जीभ (tongue).
  23. बुझावी – समाधान करतो – (satisfaction).
  24. वोगरिलीं – वाढलेली आहेत.
  25. आत्मप्रभा – आत्मप्रकाश – (one’s own light).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

11th Marathi Digest Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 6

आ. परिणाम लिहा.

प्रश्न 1.
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला.
उत्तर :
परिणाम : आई-वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं ऊबदार घर नष्ट झाले आणि खोट्या नात्याचा काचमहाल उभारला गेला. जिथे प्रेम नव्हते.

प्रश्न 2.
माणसा-माणसांतील संवाद हरवला.
उत्तरः
परिणाम : माणसं माणसासारखी वागत नाहीत. माणसांना अधिक अधिक हव्यासाचा, कुठ थांबायचा हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ म्हणून स्वीकारला गेला, माणूस एकाकी पडला. माणूसपणाचं पोषण होणे थांबले. स्वार्थीपणा वाढला. माणसे संवेदनाहीन झाली.

प्रश्न 3.
माणसं बिनचेहऱ्यानं बडबडत राहिली.
उत्तरः
परिणाम : माणसं अगतिक झाली. एकाकी आयुष्य जगू लागली. केवळ यंत्रसंवाद चालू राहिल्याने विनाश याच विकासाच्या मार्गाकडे वळली. केवळ भरकटत राहिली. मनोरुग्णता वाढली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न 4.
नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली.
उत्तर :
परिणाम : पैशानेही न सोडवता येणारे मनाचे, मनाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले. मनोरुग्णता वाढण्याची शक्यता निर्माण झाली,

इ. पाठाच्या आधारे कारणे लिहा.

प्रश्न 1.
सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण
उत्तर :
सभोवतालच्या परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. काय घडत आहे? माणसं अशी का वागत आहेत? शिक्षणाचं काय होत आहे? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? अजून किती पडझड होणार आहे. या प्रश्नांनी त्यांना त्रस्त केले त्यामुळे मन कातर झाली.

प्रश्न 2.
‘यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण
उत्तर :
विज्ञानाचे कौतुक करताना अलौकिक आनंद देणाऱ्या मातीच्या वारशाचे तेज नष्ट होत आहे. खरं सुख कोणतं हे कळत नसल्याने विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे चिंतन करण्याची गरज आहे. आपण कुठे भरकटत निघालो आहोत हे . कळण्यासाठी, संवादशून्य एकाकीपण टाळण्यासाठी संवाद-चिंतनाची गरज आहे. त्यामुळे यंत्रसंवाद करून चालणर नाही.

2. पाठातील आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. आंतरिक दारिद्रय
आ. वात्सल्याचं ऊबदार घर.
इ. धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय.
ई. संवेदनांचे निरोप समारंभ.
उत्तर:
अ. मनाचे दारिद्रय.
आ. प्रेमभावनेने भरलेले घर.
इ. गतिशील जीवन जगणारी चैतन्यमय तरुण पिढी, वृद्धत्वामुळे हातापायांतील शक्ती गेलेले वृद्ध.
ई. एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता नष्ट होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

3. व्याकरण:

प्रश्न अ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
उत्तरः
1. मन कातर होणे – मनात दुःखी भावना जागृत होणे.
वाक्यः आई-वडिलांच्या आठवणीमुळे शहरात एकाकी जीवन जगणाऱ्या सुहासचे मन अगदी कातर झाले.

2. काळजात क्रंदन होणे – दुःख होणे, दु:खाने रडणे
वाक्यः

  • स्वाभिमानी माणसं काळजात क्रंदन झाले तरी आपल्या गरीबीचा बाजार कधी मांडत नाहीत.
  • भावाभावांमध्ये होणारी भांडणे पाहून आईच्या काळजात क्रंदन होते परंतु ती गप्प राहते.

प्रश्न आ.
‘संवेदनशून्य’ शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक शब्द लिहा.
उत्तरः
संवेदनाहीन, निर्विकार, अबोल, अजाण, भावनाहीन, (अमानुष, निर्दोष) भावनाशून्य, पाषाणहृदयी

इ. अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
उत्तरः
परंपरागत जीवन जगणाऱ्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते. किंवा जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न 2.
माणसा-माणसांत संवाद हवा.
उत्तर :
माणसा-माणसांत विसंवाद नको.

प्रश्न 3.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
उत्तरः
मनुष्य तिरस्कार भावनेच्या आधारे जगू शकत नाही. किंवा मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.

4. स्वमत:

प्रश्न अ.
‘पैसा हे साधन आहे. साध्य नव्हे,’ हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘पैसा मिळवला की माणूस सुखी होतो’ अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते. त्यासाठी जो तो पैसा त्वरित कसा कमवायचा याचाच विचार करताना दिसतो. मग भौतिक सुखासाठी पैशाच्या मागे पळणारा माणूस गैरमार्गाचाही वापर करतो. परंतु हे खरे नाही कारण सुख हे केवळ पैसा कमविण्यात नसते, पैशाने वस्तू विकत घेता येतील. कारण पैसा हे साधन आहे परंतु विकत घेतलेल्या सर्वच वस्तू सुख देतील असे नाही. वस्तूंमधून भौतिक सुख मिळेल.

परंतु मानसिक समाधान, सुख हे पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने घर विकत घेता येते. परंतु घराला घरपण येण्यासाठी माणसा-माणसांत आवश्यक असणारा संवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे विकत घेता येत नाही. त्यासाठी सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी, एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आई… वडील काम करतात. पैसा कमावतात, त्यांच्या अवास्तव गरजा पूर्ण करतात. परंतु जर मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्या पैशाने सुख प्राप्त होत नाही त्यांमुळे सर्वजण एकाकी होतात.

त्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे. पैसा हेच जीवन नव्हे. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करून पैसा मिळवता येतो परंतु सुख मिळवण्यासाठी एकमेकांसोबत राहणे, वेळ देणे आवश्यक असते. त्यामुळे पैसा हे साधन आहे, साध्य नाही. म्हणूनच सर्वात श्रीमंत देश अमेरिका असला तरी ‘जगारील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश’ हा मान भूतानसारख्या छोट्या राष्ट्राला मिळाला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न आ.
मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहताना त्याला सगळ्यांशी संवाद साधावाच लागतो. कारण आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरताना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो. अशा वेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते. अन्यथा एकाकीपणाला सामोरे जावे लागते. कुटुंबात राहूनही जर तो दुसऱ्याशी संवाद साधू शकला नाही. तर तो एकाकीपणाच्या वाटेवर चालू लागल्याचे दिसून येते. कामामध्ये व्यस्त असणारे आई-वडील मुलांसाठी संपत्तीचा साठा करतात. परंतु प्रत्यक्षात मुलांच्या मनापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे मूल आपल्या भावना व्यक्त करू न शकल्याने वाईट सवयींना बळी पडते. तर आपल्या मुलांशी, नातवंडांशी संवाद साधू न शकल्याने वृद्ध मंडळी निराश होतात. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये दरी निर्माण होते.

कार्यालये विविध संस्था, क्षेत्रे या सर्वच ठिकाणी संवाद साधता न आल्यास व्यक्ती कार्यरत होऊ शकत नाही. एकमेकांच्या समस्या समजू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या भावना, विचार, व्यक्त करण्यासाठी एक दुसन्याशी संवाद साधणे आवश्यक असते. जर आपली सुख दुःखे समजून घेणारे कोणी नसेल तर जीवन जगण्याला अर्थच राहणार नाही. त्यासाठी संवाद आवश्यक आहे. संवादशून्य एकाकीपणामुळे माणूस
मनोरुग्ण होण्याची शक्यता वाढते.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
‘नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’ लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
विज्ञानाने जग जवळ आले असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात असे झाले आहे का असा प्रश्न पडतो. कारण नवीन नवीन शोध लागून लोकांचे जीवन सुखकर झाले असले तरी एकमेकांसाठी त्यांच्याकडे वेळ असलेला दिसून येत नाही. यंत्रयुगात माणूस इतका यांत्रिक झाला आहे की त्याला एकमेकांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नाही. केवळ फोनवरच तो एकमेकांची खुशाली समजून घेतो. विचारपूस करतो. आजच्या गतिमान जीवनात माणूस इतका गुंतला आहे की पैसा हेच जीवन समजून रस्त्यात कुठे अपघात वैगरे झालेला असला तरी त्याच्याकडे तिथे थांबायलाही वेळ नसतो.

अडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तो आपली कामाची वेळ चुकेल, आपण पोलीस कारवाईत अडकू म्हणून घटना स्थळापासून दूर पळतो, माणुसकीशी त्याचा संबंधच नसल्यासारखे तो वागतो. त्यामुळेच एखादया संकटात सापडलेल्या, पूर, भूकंपामध्ये बळी गेलेल्या माणसाबद्दल दु:ख वाटून न घेता तो तेथेही स्वतःचा फायदा कसा होईल ते पाहतो. दुसऱ्याचे दुःख, जाणीव याबद्दल त्याला काहीही वाटत नाही.

पैसा कमावण्याच्या नादात स्वतःच्या वृद्ध माता-पित्याला वृद्धाश्रमात ठेवणारा, मुलांच्या एकाकीपणाकडे दुर्लक्ष करणारा, समाजापासून तुटल्यासारखा वागणारा नव्या जगातील हा माणूस माणूसपणालाच विसरून गेला आहे असे वाटते. त्यामुळे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही या लेखकाच्या मताशी मी सहमत आहे परंतु त्याचवेळी याला काही अपवाद म्हणून काही संस्था, माणसे आपतकालीन स्थितीत, भूकंप, पूर इ. परिस्थितीत मदतीचा हात देताना दिसतात. परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

प्रश्न आ.
‘इथे माणूस दिसत होता, पण जाणवत नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती, या विधानांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. आधुनिक जगात मात्र पैसा’ हेच सुख मानले जात आहे. त्यामुळे पैशानेच जगता येतं. पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाल्याने सर्व काही पैशातच गणलं जात आहे. जग व्यवहारी बनलं आहे. शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी नव्हे तर पैशासाठी होत गेले आहे. प्रेम, भक्ती या भावनांची मोजणीही पैशानेच होऊ लागली आहे आणि प्रेम, नाते यांच्याऐवजी खरेदीविक्रीचा व्यवहार सुरू झाला आहे.

या नोकरीमुळे घराबाहेर राहणारे पालक मुलांना प्रेम देण्यास कमी पडत आहेत त्यामुळे घराऐवजी केवळ चमकणारा महाल बांधला गेला, जेथे आई-वडिलांच्या वात्सल्याला, प्रेमाला काहीच किंमत उरली नाही. त्यांचे सुख दुःख मुलांना कळले नाही. एकमेकांच्या जाणीवा, भावना समजायला व्यक्त करायला कोणालाच वेळ मिळत नाही आहे. त्यामळे महालात चकाकी येते परंतु माणसकीच्या नात्याला मात्र हे घर पारखे होते. त्यामुळे माणूस त्या घरात रहातो शरीराने परंतु तो जाणवत नाही. त्याची सुख दःख समजत नाहीत आणि पादच होत नसल्याने फक्त ओठ हलत रहातात. परंतु हृदयाची साद दसऱ्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीत असे लेखक म्हणतात आणि हीच आजच्या जीवनाची खंत आहे.

प्रश्न इ.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर :
विज्ञानाने जग जवळ आणले असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मोबाईल फोन, कॉम्प्युटर इ. केवळ यंत्रे ठरली कारण गतिशील जीवनशैली स्वीकारणारा माणूस या यंत्रांचा वापर करू लागला परंतु मनाने मात्र एकमेकांपासून दूर झाला, प्रत्यक्ष भेटून किंवा पत्र पाठवून मिळणारे मानसिक सख, चेहऱ्यावरचा आनंद सर्वाना पारखे झाले. वेळेचे, कामात व्यस्त असण्याचे कारण दाखवून संवाद टाळला जाताना दिसून येते. यामुळे मानवी जीवन धोक्यात येईल असे वाटते.

कारण संवाद न साधल्याने, एकमेकांपासून दूर गेल्याने मानव एकाकी होईल. एकटेपणा वाट्याला आल्याने निराश, चिंताग्रस्त होईल. एकमेकांच्या भावना समजू न शकल्याने, सुख, दुःख जाणून न घेतल्यामुळे एकटेपणाची जाणीव माणसाला मनोरुग्ण बनवेल, स्वत:चे विचार, भावना व्यक्त न करता आल्याने दुःखी जीवनाला सामोरा जाईल. नैराश्यग्रस्त झाल्याने कदाचित व्यसनांच्या आहारी जाईल, यामुळे स्वतःबरोबरच समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा विकासही होणार नाही. उलट अधोगतीकडे मार्गक्रमण करू लागेल आणि संवेदनाहीन बनलेला माणूस संपूर्ण माणूसजातच नष्ट करण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द शोधा.
अ. तो, मी, पी, हा …………..
आ. खाणे, पिणे, शहाणे, जाणे ………….
इ. तापी, कृष्णा, नदी, यमुना ………….
ई. त्याला, तुला, मला, माणसाला ………..
उ. आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी ………….
उत्तर :
अ. पी
आ. शहाणे
इ. नदी
ई. माणसाला
उ. सौंदर्य

11th Marathi Book Answers Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! Additional Important Questions and Answers

आकलन कृती

प्रश्न 1.
खालील पठित गदा उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
चौकटी पूर्ण करा.
1. आजच्या समाजात बिंबवलेले तत्त्वज्ञान – [ ]
2. मार्केटिंग करताना न घेतलेली दक्षता – [ ]
उत्तर :
1. ‘माणूस मिथ्या सोनं सत्य’
2. एक गरीबी दूर करताना दुसरे आंतरिक दारिद्र्य निर्माण होईल याची दक्षता घेतली नाही.

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 7
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 8

उपयोजित कृती

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. धन, संपत्ती, पैसा कार्य
  2. प्रेम, माया, वात्सल्य, वस्तू
  3. इमारत, पथ, मार्ग, रस्ता
  4. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, नेहमी

उत्तर :

  1. कार्य
  2. वस्तू
  3. इमारत
  4. नेहमी

खालील शब्दासाठी परिच्छेदात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.

प्रश्न 1.
भावनाशून्य मन – ………………….
अ. आशा
ब. ऑतिरक दारिद्रय
क. मुकं मन
ड. सुसंवाद
उत्तरः
मुकं मन

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
आजच्या जगाचे ‘माणूस मिध्या’ सोनं सत्य’ या तत्त्वज्ञानाचा भावार्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :
आजचे जग म्हणजे विज्ञानाचे जग, विज्ञानाने संपूर्ण जगावर एक प्रकारची जादू केली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती पथावर वाटचाल करताना माणसाने सुखी जीवनाची स्वप्न बघितली. पण हे सुख शोधताना मानव हळहळ पैशाच्या आहारी जाऊ लागला आणि पैशाच्या मागे मागे धावताना मानवाचे जीवन यंत्रवत बनले. निष्क्रिय झाले, एकमेकांपासून माणूस दूर गेला, केवळ पैसा कमावणे एवढेच जीवन बनले. एकमेकांशी संवाद साधणे कठीण झाले, कारण तो पैशातच सुख मानू लागला. पैसा कमावण्याच्या स्पर्धेत तो सतत पळतच राहिला. इतके की पळता पळता तो इतरांपासून कधी दूर गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्यामुळे दुसऱ्याची सुख-दुःखे, भाव भावना त्याला कळेनाशा झाल्या.

असा हा माणूस एकमेकांपासून दूर जाताना कुटुंबापासूनही दूर झाला. कारण पैसा, हे जीवनाचे अंतिम सत्य बनले तर माणूस माणसाच्याच जगात खोटा ठरला आणि पैसा हेच सर्वस्व बनले. संवादामुळे वाढणारा जिव्हाळा, आपुलकी संवाद तुटल्याने नाहीशी झाली आणि धन, संपत्ती, पैसा यालाच सर्वश्रेष्ठ ठरवताना माणूसच खोटा ठरला आणि हळूहळू विनाश म्हणजेच विकास या दिशेने माणसाची वाटचाल होऊ लागली. यासाठीच मानवाने संवाद साधून माणसांतील माणूसपण जपावे असे वाटते.

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 12

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले विरुद्धार्थी शब्द

प्रश्न 1.
विसंवाद × ……….
उत्तर :
विसंवाद × संवाद

प्रश्न 2.
नैसर्गिक × ………..
उत्तर :
नैसर्गिक × कृत्रिम

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

खालील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
साद घालणे –
पर्याय :
अ. संभ्रमात पडणे.
ब. आठवण काढणे
क. गुंग होणे.
ड. बोलावणे
उत्तर :
बोलावणे

प्रश्न 2.
अगतिक होणे –
पर्याय :
अ. असहाय होणे.
ब. आनंदी होणे
क. मरण येणे
ड. सावध होणे
उत्तर :
असहाय होणे.

स्वमत:

प्रश्न 1.
संवाद नसल्याने माणूस माणसापासून दूर गेला आहे याविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तरः
आज-चंगळवादी दृष्टिकोन सगळीकडे दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याच विश्वात धुंद असल्याचे लक्षात येते. त्यामुळे एकाच घरात राहूनही एकमेकांना भेटेनासे होतात. संवाद साधला जात नाही. त्यामुळे सुखदुःखात्मक अनुभवांची देवाण-घेवाण होत नाही. आपले कोणीतरी आहे हीच भावना नष्ट झाल्याचे दिसून येते. कारण संवादच नसतो.

संवादच नसल्याने वृद्ध आई, वडील मुलासाठी तळमळत राहतात. एका घरात राहूनही कोणी मलिका पाहण्यात व्यस्त, तर कोणी हॉटेलात फिरण्यात मग्न यामुळे हळूहळू माणूस कुटुंबापासून तुटू लागतो व एकटे राहतो. कार्यालय, नोकरी, याठिकाणी संवाद साधला न गेल्याने कार्य फलश्रुती मिळत नाही. माणसा-माणसांतील अंतर वाढत जाते आणि एकमेकांना कायमचे दुरावले जातो.

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
आधुनिक काळातील घराचे उरलेले स्थान : …………
उत्तर :
चार घटकांचा निवारा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 13
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया! 14

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले शब्द

प्रश्न 1.

  1. संपत्ती
  2. उर्जेचे मूळ
  3. प्रगती

उत्तर:

  1. धन
  2. प्रेरणा
  3. विकास

प्रश्न 2.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा.
पर्याय :
अ. प्रश्नचिन्ह, पूर्णविराम
ब. उदगारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह
क. उदगारवाचक चिन्ह, पूर्णविराम
ड. स्वल्पविराम, पूर्णविराम
उत्तर :
स्वल्पविराम, पूर्णविराम.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
चला ‘माणूस’ बांधूया!
अंतरीच्या उमाळ्याने
संवादातील जिव्हाळ्याने।
यातील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर :
आज मानव प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. परंतु ही प्रगती करताना कुठेतरी तो दुसन्यांपासून दुरावला गेल्याचे जावणते कारण पैसा म्हणजेच जीवन असे त्याला वाटत असल्याने पैशासाठी तो सतत धावत असतो. परंतु त्याचवेळी कोणालातरी त्याच्या सहवासाची, सोबतीची गरज आहे हेच तो विसरला आहे. केवळ पैसा-पैसा केल्याने आपल्याच माणसांपासून तो दूर गेला आणि पैशाच्या चक्रव्यूहात अडकला गेला.

पैशासाठीच जगायचं हा त्याचा उद्देश बनला त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमाच्या-वात्सल्याच्या स्पर्शापासून दूर गेला. आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधायलाही त्याला वेळ मिळत नाही. घरातील प्रत्येक जण आपल्याच विश्वात मग्न राहिल्याने एकाच घरात राहूनही कितीतरी काळ त्यांचे एकमेकांशी भेटणे होत नाही आणि यातूनच तो एकाकीपणाच्या दिशेने चालला जातो. परिणामी विविध आजारांनाही बळी पडतो. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.

यासाठीच लेखकाच्या मते एकमेकांना समजून घेणे, सुख-दुःखांची देवाणघेवाण होणे- म्हणजेच जीवन असते असे असताना माणसाने एकमेकांशी संवादच साधला नाही तर या जगात प्रत्येकजण एकटा पडेल. गर्दीतही एकटा होईल आणि म्हणूनच एकमेकांशी प्रेमाने जिव्हाळ्याने संवाद साधणे आवश्यक आहे. जर माणसे एकत्र आली, विचारांची देवाण-घेवाण झाली तरच संवाद साधला जाईल आणि माणूस घडत जाईल, त्यामुळे माणसांना माणसांशी जोडणे आवश्यक आहे. केवळ मोठ्या इमारती बांधून उपयोगाचे नाही तर माणुसकीची इमारत उभारणे आवश्यक आहे. यासाठी प्रेमाने, जिव्हाळ्याने संवाद साधून माणूस घडवूया असे लेखक म्हणतात.

‘माणूस’ बांधूया! Summary in Marathi

प्रस्तावना:

प्रविण दवणे यांनी कविता, ललित लेख, वैचारिक लेख अशा मराठी साहित्य विश्वातील अनेकविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पाच वेळा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘चैत्रबन’ पुरस्कार, ‘शांता शेळके सरस्वती पुरस्कार’ असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

‘रंगमेध’ ‘गंधखुणा’ ‘आर्ताचे लेणे’ ‘ध्यानस्थ’ ‘भूमीचे मार्दव’ हे काव्य संग्रह ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘अत्तराचे दिवस’ ‘सावर रे’ ‘गाणारे क्षण’ ‘मनातल्या घरात’ ‘रे जीवना’ हे ललित लेख संग्रह, ‘प्रश्नपर्व’ हा वैचारिक लेखसंग्रह इ. साहित्य प्रसिद्ध आहे. तसेच ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘लेखनाची आनंद यात्रा’ ‘वय वादळ विजांचं’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजलेले आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

पाठ परिचय:

प्रस्तुत पाठ हा प्रवीण दवणे यांच्या प्रश्नपर्व’ या वैचारिक लेखसंग्रहातून घेण्यात आला आहे. आजचे युग हे विज्ञानयुग समजले जाते. मानव प्रगती पथावर वाटचाल करीत चंद्रावर जाऊन पोहोचला पण त्याचवेळी तो दुसऱ्या मानवी मनापर्यंत पोहोचला आहे का? हीच लेखकाची खंत आहे. इंटरनेट, व्हॉट्स अँपने जग जवळ आले असे आपण म्हणतो परंतु हृदय हृदयाशी जोडले गेले का? असा प्रश्न लेखकाला त्रस्त करतो आणि म्हणूनच केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा हृदयाने हृदय बांधले जाणे आवश्यक असल्याचे लेखकाला वाटते. यासाठी मनाचा मनाशी संवाद होऊन माणूस माणसाशी बांधला जाणे, जोडला जाणे महत्त्वाचे आहे हेच लेखक पाठाद्वारे सांगू इच्छितात.

आधुनिक काळात पैशाला अवास्तव महत्त्व देऊन त्यातूनच सुखाची प्राप्ती होते असे मानले गेले, प्रेम, वात्सल्य बाजूला करून पैसाच बोलू लागला. यांतूनच जग व्यवहारी बनले. पैशाच्या मोहात अडकलेला माणूस माणूसपण हरवून बसला आणि स्वत:च्याच घरात राहणाऱ्या माणसांसाठी अनोळखी ठरला. माणसा-माणसांतील अंतर वयाने नाहीतर पैशामुळे वाढत गेले व प्रत्येक जण एकमेकांना कधीतरी भेटू याच आशेवर जगू लागला. आत्म्याची आत्म्याला दिलेली साद म्हणजे संवाद हेच माणूस विसरला. एकमेकांसाठी वेळच कोणाकडे शिल्लक राहिला नाही. आजी-आजोबा, आई-वडील मुले ही नाती दुरावली गेली . प्रत्येकजण आपल्या जगात मग्न झाला. मौज-मजा, चंगळ यातच ‘जगणे’ आहे, अशी वृत्ती बळावली आणि माणसं एकमेकांपासून दूर गेली.

ई-मेल, चेंटिंग, हे मार्ग संवाद साधण्यासाठी निवडले गेले. यंत्राच्या मदतीने हदये मात्र जोडता आली नाहीत. दिवसभर पैशासाठी जीवन प्रवास करणारी माणसं, मानवी सहवासाच्या खया सुखापासून वंचित राहिली. एकाकीपण वाढत गेले. परंतु जसजसे एकाकीपण वाढत गेले. निराशा येत गेली तसतशी परत एकदा संवादाची आवश्यकता भासू लागली. कारण मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देणारे मन पैशाच्या मागे धावू लागले. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी नातं जोडू शकली नाही. अशावेळी लेखकाच्या मते केशवसुतांच्या काव्य रचनेने सत्वाचा केलेला जयजयकार लक्षात घेतला पाहिजे. केवळ माती-विटांच्या इमारती बांधण्यापेक्षा अंत:करणातील प्रेमाने माणूस माणसांशी बांधला जावा हेच लेखक यातून सांगू इच्छितात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. मिथ्या – खोटे, अवास्तविक (unreal, false).
  2. तत्त्वज्ञान – तत्त्वासंबंधी तत्त्वांना अनुसरून असणारे ज्ञान – (philosophy).
  3. निष्कर्ष – सार, ताप्तयं, सारांश – (conclusion)
  4. दक्षता – खबरदारी – (carefulness, attention)
  5. सूत्रधार – कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात ज्याच्या हातात बाहुल्यांच्या दोन्या असतात तो मुख्य चालक, ज्याच्या हातात कार्यक्रमाची सर्व
  6. सूत्रे असतात तो – (anchor, program conductor)
  7. उद्देश – हेतू (intention, purpose).
  8. अबोल – न बोलणारी – (talking little, tactiturn).
  9. लागण – रोगाची बाधा होणे (infection).
  10. हव्यास – तीव्र इच्छा, लोभ (a great desire).
  11. दुथडी – नदीचे दोन किनारे (on both the banks).
  12. खिन्न – दुःखी, निराश (sad, distressed).
  13. क्रंदन-रडणे, आक्रंदन – (to cry).
  14. पडझड-जीर्णावस्थेतील, पडायला आलेले – (downfall).
  15. मूल्य-किंमत – (cost, price)
  16. निवारा – आश्रय – (shelter).
  17. अगतिक – असहाय – (helpless)
  18. लौकिक – लोकप्रसिद्ध लोकांमध्ये रूढ असलेले, या लोकांतील.
  19. अलौकिक – चमत्कारिक, लोकोत्तर.
  20. चिंरतन – जना, सतत, प्राचीन (eternal).
  21. तेज – प्रकाश, त्रिवार तीन वेळा – (three times).
  22. कंपन – कापरे. थरथरणे – (shivering).
  23. पायाभूत – मूलभूत, मूळ – (basic).
  24. मनोरुग्ण – मानसिक आजार असलेला – (psychic).
  25. झडझडून – जलदीने.
  26. त्वरेने झिडकारून, सुवर्णमध्य – दोन परस्परविरुद्ध गोष्टींतून काढलेला मध्यम मार्ग – (golden medium).
  27. तडजोड, आवाहन – कळकळीची विनवणी, विनंती – (call, roquest).
  28. उमाळा – हुंदका, आवेग – (can outburst).
  29. जिव्हाळा – प्रेम – (affection).
  30. गोंगाट – आवाज – (great noise).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

वाक्प्रचार:

  • साद घालणे – बोलावणे, हाक होणे.
  • मनं कातर करणे – दुःख होणे, अडचणीची स्थिती.
  • जीवाचा आटापिटा करणे – खूप प्रयत्न करणे, खूप कष्ट करणे.
  • काळजात क्रंदन होणे – खूप दुःख होणे, आक्रंदत खूप रडणे.
  • अगतिक होणे – असहाय होणे.
  • पाय पाठीला लावणे – खूप कष्ट करणे.
  • झडाडून जागे होणे – त्वरेने जागृत होणे, परिस्थितीची जाणीव होणे.
  • उदयोस्तु करणे – जयजयकार करणे.
  • माणूस बांधणे – एकमेकांशी नाते जोडणे.
  • लोप पावणे- नाहिसे होणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

11th Marathi Digest Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न अ.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –
1. शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
2. शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
3. शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
4. शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
उत्तर :
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.

प्रश्न आ.
हिरवे धागे म्हणजे –
1. हिरव्या रंगाचे सूत.
2. हिरव्या रंगाचे कापड.
3. हिरव्या रंगाचे गवत.
4. ताजा प्रेमभाव.
उत्तर :
हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न इ.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे –
1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
2. हातातून निसटणारा पारा.
3. पाऱ्यासारखा चकाकणारा.
4. पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.
उत्तर :
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.

प्रश्न ई.
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे –
1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
2. काळ्या मेघांप्रमाणे.
3. आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे.
4. आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे.
उत्तर :
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.

2. अ. प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.

प्रश्न 1.
1. प्रेयसीचे नाव काय?
2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
4. ती कुठे राहते?
5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
उत्तर :
1. ती वळून पाहणे का विसरली असावी?
2. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
3. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
4. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
5. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

आ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी दयावी?
उत्तर :
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची दयावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

प्रश्न 2.
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्याकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
उत्तर :
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणि गोंदाव्या

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न 3.
विरल, सुंदर अभे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
उत्तर :
दवांत आलिस भल्या पहार्टी
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा

3. अ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
कवीची प्रेयसी केव्हा आली?

2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
उत्तर :
कवीची प्रेयसी भल्या पहाटे आली.

प्रश्न आ.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
उत्तर :
डोळ्यांना कवीने डाळिंबांची उपमा दिली आहे.

प्रश्न इ.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
उत्तर :
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न ई.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
उत्तर :
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत ‘कोमल’ आणि ‘ओल्या’ अशी दोन विशेषणे आली आहेत.

प्रश्न उ.
‘अनोळख्याने’ हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
उत्तर :
‘अनोळख्याने’ हा शब्द प्रियकर / कवीसाठी वापरला आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह कवितेतील छंद
प्रेम कविता प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणी शुक्राच्या तोऱ्यांत, हिरवे धागे, शुभ्र चांदण्या, अभ्रांची शोभा, तळहाताच्या नाजूक रेषा मुक्त छंद

4. काव्यसौंदर्य :

प्रश्न अ.
‘डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! ‘ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा,
उत्तर :
प्रेयसीच्या मनातील स्नेहाची, प्रेमाची भावना कवीला आपल्या नजरेतून टिपता येतेय. तिच्या मनातील प्रेमसुलभ गुलाबी डाळिवी भावना तिच्या नजरेतूनही स्पष्ट दिसत आहेत. पण त्या भावना व्यक्त होत नाहीत, त्या केवळ डोळ्यातूनच जाणता येत आहेत. डाळिंबाचे दाणे जसे पारदर्शी असतात तसंच तिच्या मनातील भावनाही पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत, त्या प्रियकराला (कवीला) तिच्या डोळ्यांच्या पायाला पकडताही येत नाहीत. पारा जसा अस्थिर असतो तसंच तिच्या डोळ्यातील त्या प्रेमभावना कवीला पकडता येत नाही आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

प्रश्न आ.
‘जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा,’ या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
प्रेयसी पहाटेच्या प्रहराला कवीच्या मनात प्रकट झाली. तिचे लावण्य शुक्राच्या ताऱ्यासारखे होते. ती लावण्यवती असल्यामुळे तिच्याकडे साहजिकच कवीचे लक्ष गेले, तिच्यावर खिळून राहिले. तिच्या सौंदर्याचा वेध घेत घेत तिच्या डोळ्यांमधील भावही कवी जाणून घेतो. त्या डोळ्यांमधील उत्सुकता, अधीर भाव, ओढ कवी मनातच ठेवतो. ती येते ओळख घेऊन आणि जाताना अनोळखी असल्यासारखं भासवते. पण जाताना ती त्या दोघांच्या आत्मीयतेमध्ये एक मंद गंध पेरून जाते. तो गंध प्रेमाचा असावा.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर :
बा.सी, मकर लिखित ‘दवांत आलिस भल्या पहार्टी’ या कवितेत प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे स्वप्नरंजक वर्णन आहे. पहाटेच्या प्रहराला अभ्रांच्या कोषातून जशी शुक्राची चांदणी बाहेर पडते. त्याप्रमाणे कवीच्याही मनी असलेली ती शुक्राची चांदणी आहे. या कवितेतील प्रेयसी प्रत्यक्षात साकार झालेली असेल वा नसेल पण तिची ओढ मात्र कवीला आहे. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? या गीतासारखाच भाव या कवितेत आवळतो. तिची आणि त्याची भेट काल्पनिक असावी. ही काल्पनिक भेटही मात्र कवीच्या मनावर राहण्याजोगी आहे.

तिचे सौंदर्य न्याहाळताना कवी तिच्या नजरेतील भाव शोधतो पण तिने ओळख असूनही अनोळखी असल्यासारखे भासवले आहे. ही मनात साकार केलेल्या प्रेयसीबद्दलची भावना कवी प्रत्यक्षात कवितेतून प्रकट करतो. त्या शुक्राच्या चांदणीचे अस्तित्वच नाही पण ती स्वप्नपातळीवर दिसते. तिचे सौंदर्य लोभसवाणे आहे. तिच्या डोळ्यांमधील छटा पाऱ्यासारख्या आहेत. मुळातच न भेटलेल्या प्रेयसीबद्दलचे कल्पनामय चित्रण अनुभव आल्यासारखे कवीने दृश्य चित्रण उभे केले आहे. हेच या कवितेचे अनोखेपण आहे.

6. रसग्रहण.

प्रश्न 1.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर :
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही बा.सी. मर्डेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. पण हे प्रेम भासआभासाच्या रेषेवर असणारे आहे. बा.सी.मर्डेकर यांनी कवितेत नवीनता आणताना अनेक प्रयोग केले. कवितेचे शीर्षकच पाहता ते समजून येते. ‘पहाटे’ असं न म्हणता ‘पहाटी’ असा शब्द उपयोजून एक नवीन शब्द साहित्यात रूढ केला असे म्हणावे लागेल.

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत. बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल. तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते.

ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदर्याने उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावन गेले. चालता चालता तिच्या पावलांच्या खणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या, त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती.

प्रेयसीच्या चालण्यातच तोरा असं म्हटल्यामुळे ती सौंदर्यवती असल्याचं स्पष्ट होतं, तिच्या मनातील प्रेमभाव कवीच्या मनात पेरताना त्याला जाणवलेली तरलता तो ‘पेरत गेलीस तरल पावलांमधली शोभा’ असे म्हणतो. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. या कडव्यात कवीने दोन ओळी नंतर एकाच शब्दाची एक ओळ घेऊन त्याच्या मनातील ओढ व्यक्त करण्याचा यत्न केला आहे. तसंच हिरवे धागे या शब्दातून नात्यातील हिरवेपणा स्पष्ट केला आहे. हिरवे हे विशेषण वापरून त्या नात्यातील कोवळीकता, ताजेपणा स्पष्ट केला आहे.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर थेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हदयापर्यंत पोहोचत होता. या कडव्यात कवी प्रेयसीच्या डोळ्यातील प्रेमभावना खट्याळपणा दाखवताना त्याला डाळिंबाच्या दाण्यांची उपमा देतो. डाळिंबाचा रंग जसा बी असतो.

हा गुलाबी रंग तिच्या डोळ्यातही दिसतो. तिच्या नजरेतील प्रेमसूचकता पाऱ्यासारखी असल्यामुळे ती त्याला टिपता येत नाही आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं बरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावना याच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

आपल्या मनातील भावभावना स्पष्ट करताना कवी त्या आठवणींना कोमल ओल्या आठवणी म्हणतो. त्यातील ओलाया, जिव्हाळा हा कोमल ओल्या या शब्दातन प्रकट होतो. एथल्याच हा बोलीभाषेचा शब्द वापरून कवी आणखी एक नवा प्रयोग करू पाहतोय…कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे, त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लज्जेमुळे आलेला असावा, प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत, ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

प्रेयसीच्या मनातील नाजूक भाव अधोरेखित करताना तिच्या नखांवरही ते गुलाबी भाव उमटल्याचे स्पष्ट करतो. आकाशात तर चांदण्या असतातच पण तिच्या हातावरही त्या चांदण्यांचा स्पर्श झालेला आहे. असा भाव व्यक्त करताना शुभ्र चांदण्या (स्नेहाच्या) कुणी गोंदाव्या असे म्हणतो. त्यातून प्रियकराची तरल संवेदना प्रकट होते.

पहाटेच्या दांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

जो अनुभव घेता आला नाही पण त्याची अनुभूती अप्रत्यक्ष स्वरूपात मिळाली ते प्रकट करताना कवी ती पहाटे आल्याचं म्हणतो. अभ्रांची शोभा ही सुद्धा नवीन कल्पना कवीने मांडलेली आहे. प्रेमाचा रंग, गंध असतो तो तरल संवेदनांच्या लोकांनाच जाणवतो. कवीला तो जाणवतो.’ ते व्यक्त करण्यासाठी कवी ‘मंद पावलांमधल्या गंधा’ असं म्हणतोय. त्या पावलांनांही गंध प्राप्त झाला, त्या वाटेला आणि मनातील प्रीतीलाही ‘गंध’ या शब्दाचे गंधा हे सामान्य रूप वापरून ‘एकदा’ या शब्दाशी लय साधण्याचा यत्न केलेला आढळतो.

विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

11th Marathi Book Answers Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित पदव पंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा

आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवयित्री पेरित गेली. → [ ]
उत्तर :
कवयित्री पेरित गेली. → तरल पावलांमधील शोभा

खाली दिलेल्या शब्दाला कवितेत आलेले विशेषण लिहा.

प्रश्न 1.
धागे : [ ]
उत्तर :
हिरवे

उपयोजित कृती

खालील अर्थांसाठी कवितेते वापरलेले शब्दः

प्रश्न 1.
1. ध्येय –
2. तहान –
उत्तर :
1. लक्ष्य
2. पिपासा

प्रश्न 2.
सुंदरतेचा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
प्रेयसीने कसला इशारा दिला?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
“वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे ?” या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर :
कवी बा.सी मेढेकर यांच्या ‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही कविता प्रेमानुभव व्यक्त करणारी कविता आहे. प्रियकराच्या मनात रेखलेली एखादी सुंदर स्त्री त्याने कवितेच्या माध्यमातून साकार केली आहे. चित्रकार जसं एखादया सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटतो तसं कवीने शब्दांच्या माध्यमातून त्याची प्रेयसी रेखाटली आहे. ती आहे-नाही च्या सीमारेषेवर आहे. शुक्राच्या ताऱ्यासारखं तिचं लखलखीत सौंदर्य आहे. ती जाताना तिच्या तोऱ्यांनी प्रियकराचे काळीज वेधून घेते. जाता जाता ती हसते.

त्या हसण्यातूनच तिलाही प्रियकराला साद दयायचीय असा अर्थ सूचित होतो. पण पुन्हा तिचा नखरा, हावभाव बदलतात, ती त्याला दुर्लक्षून पुढेच जाते. तिच्या या वागणुकीवरून त्याचा गोंधळ होतो. त्यामुळे तो गोंधळून विचारतो की तू मागे वळून पहायचे विसरलीस की काय ? आपले एकमेकांशी जे सुंदर नात्याचे धागे जुळलेले आहेत ते कसे काय विसरून गेलीस. त्या धाग्यांना कवी हिरवे धागे म्हणतो. हिरवा रंग उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, सुंदरता जपणारा आनंद देणारा तसंच तुझ्या माझ्यातील हिरवं नातं आहे. या नात्याला सुंदर करण्यासाठी कवी आतुर आहे.

दवांत आलिस भल्या पहाटीं Summary in Marathi

प्रस्तावना:

विसाव्या शतकातील भारतीय साहित्यविश्वातील एक सिद्धहस्त कवी म्हणून बा.सी. मर्डेकर प्रसिद्ध आहेत. कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, असलेल्या मर्नेकरांची कविता भावोत्कट तरीही चिंतनशील, मानवी जीवनातील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी तसेच प्रयोगशील होती, त्यांचे ‘शिशिरागम’ ‘कांही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे कवितासंग्रह ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’ व ‘पाणी’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, काव्यविषयक त्यांच्या प्रगल्भ जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप पूर्णतः पालटून टाकले, काव्यक्षेत्रात केशवसुतांनंतर मेढेकरांनी महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले.

कवितेचा आशय :

‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत.

बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल, तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट ही प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते. ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदयनि उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावून गेले.

खुणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या. त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते.

तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाचवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर घेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हृदयापर्यंत पोहोचत होता.

तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर | गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं वरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावनाच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.

कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे. त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लग्नेमुळे आलेला असावा. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत. ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.

पहाटेच्या दवांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली, प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  • पहाट – सकाळ, प्रभात – (morning, dawn).
  • लक्ष्य – ध्येय – (target, aim).
  • पिपासा – तहान – (thirst).
  • तरल – चंचल – (tremulous, quivering).
  • निर्मल – स्वच्छ – (clean, pure).
  • अभ्र – आभाळ, मेघपटल – (cloud, cloudy sky).
  • पारा – एक पातळ खनिज पदार्थ – (mercury).
  • शुभ्र – सफेद – (white, clean).
  • धागा – दोरा – (thread)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 5 परिमळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

11th Marathi Digest Chapter 5 परिमळ Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 1
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 2
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 6

आ. खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 7
उत्तर :

घटना परिणाम
1. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे संगीत वाहू लागणे
2. प्राजक्ताची कळी उमलणे सुगंध दरवळणे
3. जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. शब्द जीभेवर लीलया येणे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

इ. तुलना करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 8
उत्तर :

मुद्दे माणूस प्राणी
1. वर्तणूक कृतघ्न कृतज्ञ
2. इमानिपणा स्वार्थी निःस्वार्थी

ई. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

प्रश्न 1.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे
उत्तर :
1. ‘पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन’

2. ‘आधी हाताला चटके,
तव्हा मियते भाकर’ ‘नही ऊन, वारा थंडी,
आली पंढरीची दिंडी’

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न 2.
बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता
उत्तर :

  • गाय न् म्हैस चारा खाऊन दूध देतात – दूध देणे
  • कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हालवतो – इमानी

2. व्याकरण.

प्रश्न अ.
प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा…
उत्तर :
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या :

  • पीठी – व्होटी
  • जीव – हीव
  • थंडी – दिंडी
  • घाई – पुन्याई
  • नक्कल – अक्कल

प्रश्न आ.
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

  1. बावनकशी सोने
  2. करमाची रेखा
  3. सोन्याची खाण
  4. चतकोर चोपडी

उत्तर :

  1. बावनकशी सोने – अस्सल, खरे
  2. करमाची रेखा – नशीबाचा फेरा, नियतीचा खेळ
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात
  4. चतकोर चोपड़ी – पुस्तक किंवा वहीचा काही भाग

प्रश्न इ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
1. तोंडात बोटे घालणे.
2. तोंडात मूग धरून बसणे.
उत्तर :
1. तोंडात बोटे घालणे – अर्थ : आश्चर्यचकित होणे, विस्मय वाटणे.
वाक्य : अपंग मुलाने धावण्याची शर्यत जिंकल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली.

2. तोंडात मूग धरून बसणे – अर्थ : काहीही न बोलणे, गप्प बसणे.
वाक्य : सरांनी अवघड प्रश्न विचारताच सर्व मुले तोंडात मूग धरून बसली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न ई
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ – ……………
(आ) कृपा – ……………
(इ) धर्म – …………….
(ई) बोध – …………….
(उ) गुण – ……………..
उत्तर :
(अ) अनर्थ, अर्थहीन, अर्थपूर्ण
(आ) अवकृपा, कृपाळू
(इ) अधर्म, स्वधर्म, धार्मिक, धर्मवीर
(ई) अबोध, बोधामृत
(उ) अवगुण, सगुण, निर्गुण, गुणी, गुणवान

3. स्वमत.

प्रश्न अ
‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे’, हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाई या एक अशिक्षित शेतकरी स्त्री असूनही त्यांची रचना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा झिरपते. त्यांचे काव्य सरस व सोज्वळ आहे. बहिणाबाई यांची कविता इंग्रजी वळणाच्या सौंदर्यवादी भावकवितेच्या परंपरेला छेद देणारी अस्सल मराठी वळणाची ग्रामीण कविता आहे.

जुन्यात चमकणारी ही कविता आहे, बहिणाबाई यांनी आपली कविता थेट संत कवितेच्या आणि तत्त्वकवितेच्या परंपरेला जोडली आहे, त्यांच्या कवितेत या परंपरेतला भक्तिभाव, तत्त्वचिंतन आणि हितोपदेश आपल्याला दिसतो. ही लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता आहे. नवकवितेच्या जवळ जाणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग, ग्रामीण जीवन व कृषिसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते. शेतकरी हा कर्मयोगी आहे आणि त्याच्या कामात उदात्तता आहे असे सांगणाऱ्या या कविता आहेत.

क्तिकविता आहे. त्यात पारंपरिक तत्वकवितेच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. ‘उदा. देव अजब गारोडी’ तसेच ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस!’ यांसारख्या आधुनिक कवितेतून मानवतेचा संदेश देणारी त्यांची कविता आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर :
बहिणाबाईंची कविता ही अर्वाचीन मराठीतील पहिली ग्रामीण कविता होय. ती या अर्थाने की, ती ग्रामीण जीवनातूनच मोहोरून आली आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन अंतर्बाहय रसरसलेले आहे. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत पेरणीनंतर धरित्रीच्या कुशीतून जे चैतन्य ओसंडते त्याचे अतिशय प्रभावी दर्शन घडते. ‘येहेरीत दोन मोटा’ यातून कृषिजीवनाचे दर्शन तर घडतेच पण त्यातील दोन्हीमध्ये पाणी एक यातून कणा आणि चाक वेगळे असले तरी त्याची गती एकच आहे हे दिसून येते.

त्यांची कविता निसर्गाशी समरस होणारी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी आहे. तान्या सोपानाला झोपवून बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटू लागत आणि त्यातून ग्रामीण, कृषिजीवनाचे दर्शन घडविणारी कविता जन्माला येई. वाटेत दिसलेल्या वडाच्या झाडावर ‘हिरवे हिरवे पानं’ सारखी रचना सहज आकाराला येते. शेतातील कापणी, मळणी या शेतातील कामांबरोबरच मोठ्या, भाविक व कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबीत होताना दिसते. थोडक्यात बहिणाबाईंची कविता ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी कविता आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कृषिसंस्कृती यांचं अनोखं असणार नातं त्यांच्या कवितेत दिसून येते.

प्रश्न इ.
“मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
बहिणाबाईनी कवितेतून माणसाचा मतलबीपणा आणि त्याच्या स्वार्थी वृत्तीचे वास्तव दर्शन घडविले आहे. बहिणाबाई आणि स्वार्थी वृत्तीची सर्वाधिक चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ ‘माणसा तुला नियत नाही रे’, माणसापेक्षा गोठ्यातील जनावर बरे, गाय न म्हैस चारा खाऊन दूध देतात. पण माणसाचे एकदा पोट भरले की माणस उपकार विसरून जातो. कुत्र्यामध्ये इमानीपणा आहे पण माणूस फक्त मतलबासाठी मान डोलावतो.

माणूस केवळ लोभामुळे माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला आहे. त्याची स्वार्थी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. माणस स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. मानवता आज संपुष्टात आली आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बहिणाबाई ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’? अशी आर्त हाक देतात, संत महात्म्यांनीही मानवतेच्या कल्याणासाठी तळमळ व्यक्त केली आहे. आज माणूस पशूसारखे वागतोय. माणसातला माणूस कधी जागा होतोय? हीच खरी आजची समस्या आहे. स्वार्थासाठी माणूस माणूसपण विसरत आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हे त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लेणं आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
एखादया शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. प्र. के. अत्रे यांच्यासारख्या मर्मज्ञ, प्रतिभावंताची बहिणाबाई चौधरी यांच्या गीतकाव्यासंबंधीची ही प्रतिक्रिया होय. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे प्र. के. अत्रे केवळ प्रस्तावनाकारच नव्हते तर ते प्रकाशकही होते.

प्र. के. अत्रे यांची लिहिलेली प्रस्तावना ही बहिणाबाईंच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख करून देणारी आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांची काव्यप्रतिभा आपल्या प्रस्तावनेतून उलगडून दाखवली आहे. बहिणाबाईंची ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेली समरसता, कृषिजीवनाचे संदर्भ हा त्यांच्या काव्याचा विषय. प्र. के. अत्रे यांनी बहिणाबाईंचे हे सूक्ष्म व अचूक निरीक्षण यांतील आत्मियता लीलया वर्णिली आहे. माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे वर्णन करणाऱ्या कवितेवर अत्रे यांनी प्रकाश टाकला आहे. अत्रे यांनी आपल्या प्रस्तावनेतून बहिणाबाईच्या अनेक कवितांचा अर्थ उलगडून दाखविला आहे.

बहिणाबाईंची कविता हे बावनकशी सोने आहे. ते महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी अत्रे यांनी स्वतः त्या कवितांचे प्रकाशन केले. अत्रे यांनी बहिणाबाईची काव्यप्रतिभा जाणून आपल्या प्रस्तावनेत बहिणाबाईंचे निसर्गप्रेम, कृषी, शेतकरी त्यांचे अपार कष्ट यांचे वर्णन केले आहे. बहिणाबाईच्या ‘संसार’, ‘स्त्रियांची दुःखे’, ‘माणसातला स्वार्थ’ या कवितांवर अतिशय मार्मिक असे भाष्य केले आहे. प्राणिमात्रांचा प्रामाणिकपणा आणि माणसांचा कृतघ्नपणा या बहिणाबाईंच्या कवितेतून अत्रे यांनी नेमकेपणाने त्यांतील भाव उलगडून दाखविला आहे.

अत्रे यांची प्रस्तावना ही अतिशय प्रतिभावंत साहित्यिकाची प्रस्तावना आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील तळमळ, माणसाच्या कल्याणाची आस शेतकरी व त्याचे अपार कष्ट या काव्य आशयाचा सुरेल परामर्श अत्रे यांनी घेतला आहे. थोडक्यात अत्रे यांच्या प्रस्तावनेने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला एक आगळी वेगळी झळाळी लाभली आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रश्न आ.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता ह्या निसर्ग, कृषिसंस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, मानवता, प्राणिमात्रांची कृतज्ञता या विषयांशी संबंधित आहेत, बहिणाबाई या अशिक्षित खेड्यातील स्त्री असूनही त्यांच्या काव्यातला जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. त्यांचे काव्य सरळ आणि सोज्वळ आहे.

बहिणाबाईंनी वहाडी, खानदेशी ग्रामीण, बोली भाषेत लिहिलेल्या कवितांना वेगळाच गोडवा आहे. बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. गावातील मंदिरे याच त्यांच्या शाळा असे असतानाही त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. बोली भाषेच्या जिव्हाळ्याने त्यांची कविता आपलीशी वाटते, वहाडी खानदेशी भाषेचे काव्याभिव्यक्तीचे सामर्थ्य फार उंचीचे आहे.

बहिणाबाईंच्या भाषेत जिव्हाळा आहे, तळमळ आहे. माणसाच्या उत्कर्षाची आस त्यांना लागली आहे. ग्रामीण भाषेमुळे, बोलीमुळे शेतकरी, निसर्ग, मानवता या आशयाशी एकरूप होणारी त्यांची कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते. बहिणाबाई काव्य करताना कुठेही अडखळत असलेल्या, शब्दांसाठी थांबलेल्या अशा दिसत नाहीत. ओघवते असे त्यांचे काव्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे म्हणून जे एक अनुभवविश्व होते. त्या अनुभवाची म्हणून जी भाषा होती ती त्यांना पूर्णत: परिचित होती, नव्हे त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांच्या कवितेच्या हातात भाषा हवी तशी वाकते, आकार घेते व अर्थाभिव्यक्ती साधते. या अर्थाने बहिणाबाई या भाषाप्रभूत्व ठरतात.

प्रश्न इ.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
अलिकडच्या काळात माणसातील माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस आज पशू होऊन एकमेकांशी झगडत आहे. पण पशू मात्र आपला इमानीपणा दाखवत आहे. माणूस हा स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला असताना आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील. पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते.

कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण मी अनुभवलेल्या एका प्रसंगातून आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे याचे दर्शन घडते. आमच्या कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग, एका गरीब विद्यायनि शैक्षणिक फी, वहया, पुस्तकांसाठी आणलेले पैसे त्याच्याकडून हरवले. तो विदयार्थी ढसाढसा रडत होता. कारण ते पैसे त्याच्या आई वडिलांनी मजुरी करून मिळवलेले होते. हे पैसे मिळाले नाहीत तर आपले शिक्षण थांबणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एका सेवकाला हे पैसे सापडले व त्याने ते त्या गरीब मलाला परत केले.

त्या गरीब मुलाला पैसे परत मिळण्याचा खूप आनंद झाला. खरं तर त्या सेवकाला सापडलेल्या पैशाच्या पाकीटाचा मोह झाला नाही. तीन महिन्यांच्या पगाराइतकी ती रक्कम असूनही तो मोह टाळून त्याने ते पैशाचे पाकीट परत केले. ही घटना माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचे दयोतक आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

प्रकल्प.

प्रश्न 1.
‘बहिणाबाईंची गाणी’ मिळवून निवेदनासह काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करा.

प्रश्न 2.
तुमच्या परिसरातील ओव्या/लोकगीते मिळवून संग्रह करा.

11th Marathi Book Answers Chapter 5 परिमळ Additional Important Questions and Answers

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
बहिणाईच्या काव्याचा आविष्कार – [ ]
उत्तर :
बहिणाबाईंच्या काव्याचा आविष्कार – सुभाषितांचा

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 11
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 12

खालील कृती सोडवा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 9
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 10

प्रश्न 2.
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा
……………………….
उत्तर :
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा एखादया बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

कोष्टक पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. शेतकरी जीवन ……….
  2. …………. तिला रात म्हणू नये
  3. इमानाला जो विसरला …………
  4. ……………. शेवटी रिकामेच होणार

उत्तर:

  1. शेतकरी जीवन → कष्टाचे
  2. भुकेल्या पोटी जी → तिला रात म्हणू नये माणसाला निजवते
  3. इमानाला जो विसरला → त्याला नेक म्हणू नये
  4. पोट कितीही भरले तरी → शेवटी रिकामेच होणार

स्वमत :

प्रश्न 1.
शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :
‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकात बहिणाबाई चौधरी यांनी कृषी, ग्रामीण जीवन, शेती आणि शेतकरी यांचे चित्रण केले आहे. बहिणाबाईंची कविता अस्सल शेती आणि शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारी आहे. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे. ऊन, वारा व पाऊस यांची तमा न बागळता शेतकरी रात्रंदिवस राबत असतो. सर्वसामान्य माणसे शेतकऱ्याच्या जीवावर दोन वेळा पोटभर जेवतात. शेतकरी शेतातच राबतो आणि त्याची माती शेतातच होते. शेतात पेरणी, कापणी व उफणणी या काळात शेतकरी राबराब राबतो.

त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते. पण जगाचा पोशिंदा असणारा हा भोळा, भाविक व कष्टाळू शेतकरी आयुष्यभर काळ्या आईची सेवा करतो. शेतकऱ्यांच्या संसाराची करुण कहाणी अनेक काव्यात दिसून येते. शेतकरी खळं करत असताना त्याला एक आस लागलेली असते ती म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला मोडलेला संसार पुन्हा उभा राहील पण तसे घडतेच असे नाही. निसर्गाचा लहरीपणा, कर्ज, हमीभाव पिकांवर पडणारी कीड या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे आणि त्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही ते आत्महत्या करतात. असे कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
‘कशाला काय म्हणू नाही’ या काव्यातील सुभाषितांचा अर्थ लिहा.
उत्तर :
बहिणाबाई चौधरी यांच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकात अनेक विषयांवरील काव्य आहे. मराठी वाड़मयात अमर होतील अशी अनेकात अनेक सुभाषिते आली आहेत. सुभाषितांचे एक शेतच पिकलेले आहे असे वाटते. ज्यातून कापूस येत नाही त्याला बॉड म्हणू नये, बोंडाची मुख्य अशी ओळख म्हणजे त्यातील कापूस नसेल तर त्या बोंडाला काय अर्थ उरणार? भुकेच्या पोटी माणसाला निजवते तिला रात कशी म्हणणार ? माणसाच्या पोटात अन्न नसेल तर त्याला झोप येणारच नाही, माणसाचा हात हा दानधर्मासाठी असतो असे म्हटले जाते.

इतरांना मदत, दान करताना तुमचा हात आखडत असेल, तुमचा स्वार्थ आडवा येत असेल तर त्या हाताचा काय उपयोग? इमानीपणा जर एखादा विसरत असेल तर त्याला नेक, प्रामाणिक कसे म्हणणार? तुम्ही नेक प्रामाणिक असाल तर तुमच्यात इमान असणारच, जन्मदात्या आई वडिलांची सेवा करणे हे मलाचे कर्तव्य आहे.

जर एखादा लेक जन्मदात्या आई वडिलांची सेवा न करता त्यांना त्रास देत असेल तर त्याला लेक म्हणता येणार नाही. भाव असेल तर भक्ती येईल. (मनी नाही भाव देवा मला पाव) या उक्तीप्रमाणे भावहीन भक्ती फळाला येत नाही. तुमच्यात उत्साह नसेल तर तुमची शक्ती निरर्थक आहे. कारण जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अशाप्रकारे वेगवेगळ्या सुभाषितांमधून बहिणाबाईंनी जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून दाखविले आहे. जे आजच्या काळातही लागू आहे.

स्वाध्यायासाठी कृती ‘चालू दे रे रगडनं तुझ्या पायाची पुन्याई’ या बहिणाबाईंच्या काव्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. वृक्षांची कृतज्ञता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बहिणाबाईचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. बहिणाबाईनी सांगितलेले मानवी जीवनाचे रहस्य शब्दबद्ध करा. शेतातील खळ्याचे बहिणाबाईंनी केलेले वर्णन स्पष्ट करा. ‘मन पाखरू पाखरू’ या ओळीतील भावसौंदर्य उलगडून दाखवा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

परिमळ Summary in Marathi

प्रस्तावनाः

नामवंत लेखक, कवी, नाटककार, चित्रपट कथालेखक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असणारे प्र.के.अत्रे यांनी ‘बहिणाबाईची गाणी’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेतून प्र.के.अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख करून देताना त्यांच्या कवितेतील ग्रामीण जीवन, कृषिजीवन यांचे संदर्भ उलगडून दाखविले आहेत. बहिणाबाईच्या कवितेतून माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवनाचे दर्शन घडते. त्यांच्या कवितेत खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवतो.

पाठाचा परिचय :

शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. एखादया शेतात मोहरांचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रा’सारखाच बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. बहिणाबाईंचे काव्य सरस आणि सोज्वळ आहे. असे काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि त्यातील मौज म्हणजे एका निरक्षर स्त्रीने रचलेले हे काव्य तोंडात बोट घालायला लावणारे, ‘जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे’ असे आहे.

सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. माजघरात सोन्याची खाण दडावी तसे यहिणाबाईंचे काव्य, खानदेशी वहाडी भाषेमधील अडाणी आईच्या ओव्यांचे महाराष्ट्र कौतुक करील की नाही म्हणून सोपानदेव चौधरी गप्प होते.

सोपानदेव चौधरी यांनी चतकोर चोपडीतून एक कविता प्र.के.अत्रे यांना वाचून दाखविली. या कवितेतून शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन केले आहे, त्या कविता म्हणजे बावनकशी सोने असून ते महाराष्ट्रासमोर यायला हवे या उद्देशाने प्र. के. अत्रे यांनी हे काव्य प्रसिद्ध करण्याचे ठरविले.

प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे, ते उपजतच असते. कोकिळ पक्ष्याच्या तोंडून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी सुगंध घेऊन येते तसे जातिवंत कवीचे आहे. सृष्टीतील सौंदर्य आणि जीवनातील संगीताशी ती कविता एकरूप होते. डोंगराच्या कपारीतून जसा झरा उचंबळतो तसे काव्य एकसारखे हदयातून उसळ्या घेते. यातूनच जगातील अमरकाव्ये जन्मास येतात.

बहिणाबाईची प्रतिभा वेगळीच, त्यात धरित्रीच्या कुशीत झोपलेले बियाणे कसे प्रकट होते याचे वर्णन येते. तारुण्यात सौभाग्य गमावलेल्या स्त्रीचे हृदयभेदक करुण काव्य हे असामान्य काव्याचे वैशिष्ट्य होय. सकाळी उठून बहिणाबाई जात्यावर बसल्या की ओठातून काव्य सांडू लागते. घरोट्यातून पाठ जसे बाहर पडत तसे बहिणाबाईच गाण पोटातून आठावर यत. स्वयपाकघरात चूल प म्हणत माझा जीव घेवू नकोस. संसाराची रहस्य उलगडताना त्यातील कष्टमय जीवनाचे चित्रण त्यांच्या काव्यात दिसून येते. तान्हुल्या सोपानाला शेतावर घेऊन जाताना वडाच्या झाडाचे आणि त्याच्या लाल फळाचे सुंदर चित्रण काव्यातून येते. वारा आणि थंडीची पर्वा न करणाऱ्या वारकऱ्याचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते.

ठणी व सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याची लगबग, कष्टमय जीवन हा त्यांच्या काव्याचा विषय. पण एवढाच त्यांच्या काव्याचा विषय नसून जीवनाकडे बघण्याचे स्पष्ट तत्त्वज्ञान हे त्यांच्यातील बुद्धिमान, तत्त्वज्ञानी, महाकवीची प्रतिभा असण्याची जाणीव होते.

त्यांच्या काव्यांचा आविष्कार सुभाषितांचा आणि आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. ‘कशाला काय म्हणू नाही’ या सुभाषितातून ‘ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंडू म्हणू नये’, ‘भुकेल्या पोटास निजवणारी रात्र नसते’. ‘दानासाठी आखडणारे ते हात नाहीत’, ‘इमानाला विसरणारा नेक नसतो’. ‘जन्मदात्यास भोवणारा लेक कसा’ ? ‘जिच्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये’. यातून त्यांची भाषा आणि विचारांची श्रीमंती दिसते.

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात ? मन हे पाखरासारखे आहे. एका क्षणात जमिनीवरून आभाळात जाणार असा भाषा आणि विचारांचा सुरेख मेळ त्यांच्या काव्यात दिसून येतो.

जीवनाचे खरे रहस्य शुद्ध प्रेमात आहे. स्वार्थात नाही. माणसाने मतलबी होऊ नये. भुकेल्या पोटाला अन्न मिळावे म्हणून पिके ऊन, वारा, पाऊस सहन करत शेतात उभी असतात. माणूस स्वार्थी असून खोटेनाटे व्यवहार करतो. बोरीबाभळी उपकाराच्या भावनेतून शेताला काटेरी कुंपण करतात. पोट कितीही खाल्ले तरी शेवटी रिकामे राहणार आणि शरीरसुद्धा एक दिवस निघून जाणार, जे शिल्लक राहते ते हदयाचं नातं, शुद्ध आणि निःस्वार्थी प्रेम यापेक्षा वेगळं काय असणार?
बहिणाबाईंना सर्वाधिक चीड कशाची असेल तर ती माणसाच्या कृतघ्नपणाची, माणसांना संतापून त्या म्हणतात, माणसाला नियत नाही.

माणसापेक्षा गोठ्यातील जनावरे बरी, ती चारा खाऊन दूध देतात. माणसे उपकार विसरून जातात. कुत्रा इमानीपणाने वागतो, लोभामुळे माणूस काणूस म्हणजे पशू झाला आहे. स्वार्थाचा वणवा आज सर्वत्र पसरला आहे. माणूसे पशू होऊन एकमेकांशी भांडत आहेत. मानवता नष्ट होत चालली आहे. ‘मानसा, मानसा कधी व्हशीन मानस!’ मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संतमहात्म्याच्या अंत:करणातन हीच सल बाहेर पडत आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हा प्रश्न मानवजातीपुढे आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईना होतो ही त्यांच्या प्रतिभा सामर्थ्याची खरी ओळख आहे.

बहिणाबाईची चुलत सासू ‘भिवराई’ या विनोदी व नकलाकार होत्या. नाव ठेवून नक्कल करता करता सर्वांना हसविण्याची त्यांची पद्धत म्हणजे हसवून शहाणे करणे हा हेतू. यातून बहिणाबाईंच्या विनोदात उपरोध, सहानुभूती आणि मायेचा ओलावा दिसतो, बहिणाबाईंचे काव्य रचना व भाषेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक असून प्रत्येक काव्यात एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. थोडक्यात एखादी भावना जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेले आहे. बहिणाबाईचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व केवळ अद्भुतच आहे.

बहिणाबाईंनी आपल्या काव्यात रस आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस होणार नाही अशा कौशल्याने सोपे व सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वहाडी भाषेने काव्याची लज्जत वाढविली आहे. ‘अशी कशी वेडी ग माये’, अशी कशी येळी माये, किंवा ‘पानी लौकीचं नित्तय त्याले अनीताची गोडी’. या भाषेत लडिवाळपणा भासतो.

मराठी मनास भुरळ घालील आणि स्तब्ध करून टाकील असे भाषेचे, विचारांचे आणि कल्पनेचे विलक्षण माधुर्य त्यांच्या काव्यात शिगोशीग भरलेले आहे. मानवतेला त्यांनी दिलेल्या ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’ ! हया अमर संदेशाने तर मराठी साहित्यामध्ये त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. परिमळ – सुगंध – (fragrance).
  2. प्रतिभा – काव्य निर्माण करण्याची असलेली उपजत क्षमता – (intelligence, imaginative power).
  3. सोन्याची खाण – भरभराट, विपुल प्रमाणात, येहेर – विहिर – (well).
  4. चतकोर चोपड़ी – वही किंवा पुस्तकाचा काही भाग – (notebook).
  5. मोट – जुन्या काळी विहिरीतून पाणी काढण्याचे चामड्याचे एक साधन.
  6. अधाशी – हावरटपणा, एखादी गोष्ट आपल्यालाच मिळावी हा हेतू – (greedy).
  7. बावनकशी सोने – अत्युत्तम खरे सोने.
  8. कृतघ्न – उपकाराची जाणीव नसलेला – (ungrateful).
  9. काणूस – पशू – (animal)
  10. लपे – लपणे – (hide).
  11. अहिराणी भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘य’ वापरतात.
  12. खेयता – खेळता.
  13. घरोटा – जातं.
  14. व्होट – ओठ – (lip).
  15. चुल्हया – चूल.
  16. फयं – फळ – (fruits).
  17. आभाय – आभाळ – (sky).