Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

11th Marathi Digest Chapter 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यांचे संयक्त, मिश्रव केवल वाक्य असे वर्गीकरण करा.

a. मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘पण’ न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

b. सोनाली चहा किंवा कॉफी घेते.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘किंवा’ विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

c. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘आणि’ समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

d. पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
उत्तरः
मिश्र वाक्य (‘तर’ या ठिकाणी ‘जर’ अध्याहृत धरावा) संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

e. मुले बागेत खेळली. ती खूप दमली.
उत्तरः
केवल वाक्य (दोन स्वतंत्र केवल वाक्ये – मुले उद्देश्य. खेळली – विधेय. ती उद्देश्य, दमली – विधेय

f. सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.
उत्तरः
मिश्र वाक्य (‘की’ स्वरूपबोधक गोणत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

प्रश्न 2.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

a. तो उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
उत्तरः
तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

b. श्याम घरी आला. वादळाला सुरुवात झाली. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः
श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली.

c. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले. आमच्या अडचणी दूर झाल्यात. (संयुक्त वाक्य करा.)
उत्तरः
आम्हांला शिकवायला नवीन शिक्षक आले आणि आमच्या अडचणी दूर झाल्या.

d. माझे वडील म्हणाले. मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः
माझे वडील म्हणाले, की तुझे यश बघून मला तुझा खूप अभिमान वाटला.

e. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे. जाहिरातीला महत्त्व आहे. समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. (केवल वाक्य करा.)
उत्तरः
आधुनिक लोकशाही युगात जाहिरातींना महत्त्व असल्यामुळे समाजाने जाहिरातींचा योग्य अर्थ समजून घ्यावा.

11th Marathi Book Answers Chapter 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

(a) प्रार्थना संपते, ‘जनगणमन’ ची इशारत मिळते. (केवल वाक्य करा)
(b) पुस्तकं आपल्याला घडवतात; काही वेळा उद्ध्वस्तही करतात. (संयुक्त वाक्य करा)
(c) वाक्य संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले. (केवल वाक्य करा)
(d) घरातली कामं मला दिसतात. त्यांना दिसत नाहीत. (मिश्र वाक्य करा)
(e) टॉलस्टायला वाचनाची आवड होती. त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता. (संयुक्त वाक्य करा)
उत्तर :
(a) केवल वाक्य प्रार्थना संपताच ‘जनगणमन’ ची इशारत मिळते.
(b) संयुक्त वाक्य पुस्तकं आपल्याला घडवतात; पण काही वेळा उद्ध्वस्तही करतात.
(c) केवल वाक्य वाक्य संपताच त्यांचे डोळे लकाकले.
(d) मिश्र वाक्य घरातील कामं जशी मला दिसतात, तशी त्यांना दिसत नाहीत.
(e) संयुक्त वाक्य टॉलस्टायला वाचनाची आवड होती आणि त्याचा वाचनाचा वेगही उत्तम होता.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

प्रश्न 2.
खालील वाक्यांचे संयुक्त , मिश्र, केवल वाक्य असे वर्गीकरण करा.
उत्तर :

  • शाळेत तो शिपाई आहे; शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. – संयुक्त वाक्य
  • जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. – मिश्र वाक्य
  • एक गोष्ट मात्र खरी की, उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. – मिश्र वाक्य
  • त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. – संयुक्त वाक्य
  • पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामे होणारच – मिश्र वाक्य

वाक्यसंश्लेषण प्रास्ताविक:

एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हटले की, त्यात कोणाविषयी तरी बोलणे असते आणि ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्याबद्दल काहीतरी सांगितलेले म्हणजे विधान केलेले असते. यामुळेच वाक्याचे दोन भाग पडतात.

उदा. सूर्य रोज पूर्वेला उगवतो.

वरील वाक्य सूर्याबद्दल आहे. ‘सूर्य’ हे वाक्याचे उद्देश्य आहे. सूर्याबद्दल ‘रोज पूर्वेला उगवतो’ हे विधान केलेले आहे.

व्याकरणाच्या भाषेत उद्देश्य म्हणजे कर्ता (सूर्य) व विधेय म्हणजे क्रियापद (उगवणे – उगवतो), वाक्यातील इतर शब्द हे उद्देश्य विस्तार आणि विधेय विस्तार आहेत.

एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्याचे पुढील प्रकार पडतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

वाक्यप्रकार:

वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे पुढील प्रकार पडतात.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 1
केवल, मिश्र व संयुक्त वाक्य प्रकारांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 2
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 3
लक्षात ठेवा :

मिश्र व संयुक्त वाक्यांत काही अव्यये समान असली तरी जोडली जाणारी वाक्ये आणि वाक्यांतील अव्ययांचे अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र वा संयुक्त आहे हे निश्चित करा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

वाक्यसंश्लेषण/वाक्यसंकलन :

एकमेकांशी संबंध असलेलली दोन वा अधिक केवल वाक्ये दिली असता त्यांचे एक वाक्य तयार करण्याच्या प्रक्रियेला वाक्यसंश्लेषण असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषणाचे महत्त्वः

  • वाक्यरचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी
  • आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी
  • सुटी – सुटी वाक्ये विस्कळीतपणे मांडण्याऐवजी ती एकत्रित करून मांडल्यामुळे आपल्या विचारात सुसूत्रता येते. वाक्य आटोपशीर, व्यवस्थित तयार करता येते.
  • उत्तम लेखनकौशल्य आत्मसात करण्यासाठी वाक्यसंकलनाची कला प्रत्येकास अवगत असणे आवश्यक आहे.

वाक्यसंश्लेषणाचे प्रकारः
वाक्य संकलनाच्या वेळी दोन वा अधिक वाक्ये एकत्र करून आपण एक जोडवाक्य तयार करतो. हे जोडवाक्य केवल, मिश्र वा संयुक्त यांपैकी एक असते. म्हणजेच वाक्यसंश्लेषण हे तीन प्रकारचे असते.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 4
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 5

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

11th Marathi Digest Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील तक् पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

प्रश्न 2.
खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 10
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 5

प्रश्न 3.
वाचा. चौकिती काव्गुण वलहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 7

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

11th Marathi Book Answers Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
खालील पदयपंक्तीतील काव्यगुण लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 8

काव्यगुण प्रास्ताविकः

मानवी जीवनात शब्दांचे, वाणीच्या व्यापाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी मनात कोमलतेपासून कठोरतेपर्यंत अनेकविध भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य शब्दांत असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

प्रत्येक व्यक्तीत काही समान तर काही विशेष गुण असतात. व्यक्तीप्रमाणेच सर्जनशील लेखनात काही गुण असतात. अशा या गुणांमुळेच ती वाङमयीन रचना उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. प्रसाद, माधुर्य व ओज या काव्यगुणांमुळेच अभिव्यक्ती परिणामकारक होते. पदय असो वा गदय वाचकांच्या अंत:करणाला भिडण्याची शक्ती काव्यगुणांमध्ये असते. काव्यात्मक गुणांमुळे साहित्यभाषेला सौंदर्याचा एक अनोखा साज चढतो.

काव्यगुण:

अभिव्यक्तीस पोषक असे योजलेले शब्द असतील तर काव्याची शोभा वाढते. काव्यरचनेतील अनेक काव्यगुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे तीन गुण महत्त्वाचे आहेत.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 1

काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये:

  • सोपे, सुटसुटीत व उच्चारण्यास सहजसुलभ असे शब्द
  • शब्दांमधील नादमधुरता – कोमल व मृदु वर्णांच्या योजनेत ते शब्द कानाला मधुर, सुखद व नादमाधुर्यामुळे ते गुणागुणावसे वाटतात.
  • शब्दांमधील गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा.
  • काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव.

काव्यगुण असणाऱ्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्यरचना श्रवणीय ठरते. रसिकांना त्या पंक्ती, विधाने सहजपणे मुखोद्गत होतात कवितेचे रसग्रहण करताना काव्यगुण सांगणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

काव्यगुण प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 2
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 3

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

11th Marathi Digest Chapter 5.1 व्याकरण शब्दशक्ती Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
सूचनेनुसार सोडवा.
‘मी वि. स. खांडेकर’ वाचले. या वाक्यातील लक्ष्यार्थ लिहा.
(अ) मी वि. स. खांडेकर यांना पाहिले.
(आ) मी वि. स. खांडेकर यांच्याशी बोललो.
(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.
उत्तरः
(इ) मी वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

प्रश्न 2.
मूळ शब्दशक्ती …………………………….. आहेत.
(अ) एक
(आ) चार
(इ) तीन
उत्तरः
(इ) तीन

प्रश्न 3.
“निवडणुका आल्या, की कावळ्यांची कावकाव सुरू होते.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) अभिधा
(आ) लक्षणा
(इ) व्यंजना
उत्तरः
(इ) व्यंजना

प्रश्न 4.
‘आपल्याभोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे.’ या वाक्यातील कोल्हा’ या शब्दातून व्यक्त होणारा लक्ष्यार्थ….
(अ) जंगलातील धूर्त प्राणी
(आ) मळ्यातील मका खाणारा
(इ) धूर्त माणसे
उत्तरः
(अ) जंगलातील धूर्त प्राणी

प्रश्न 5.
‘घरावरून मिरवणूक गेली.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) अभिधा
(आ) लक्षणा
(इ) व्यंजना
उत्तरः
(आ) लक्षणा

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

प्रश्न 6.
‘मी एक लांडगा पाहिला.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) व्यंजना
(आ) अभिधा
(इ) लक्षणा
उत्तरः
(आ) अभिधा

प्रश्न 7.
‘समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
(अ) लक्षणा
(आ) व्यंजना
(इ) अभिधा
उत्तरः
(आ) व्यंजना

प्रश्न 8.
खालील तक्ते पूर्ण करा.

(अ) शब्दशक्ती ओळखा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 5

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

(आ) शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 6

(इ) शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 7

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

11th Marathi Book Answers Chapter 5.1 व्याकरण शब्दशक्ती Additional Important Questions and Answers

सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘घड्याळाने पाचचे ठोके दिले.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

पर्याय :
(अ) अभिधा
(आ) व्यंजना
(इ) लक्षणा
उत्तर:
(अ) अभिधा

प्रश्न 2.
आम्ही बाजरी खातो’ या वाक्यातून शब्दशक्तीचा हा अर्थ समजतो.
पर्याय :
(अ) वाच्यार्थ
(आ) लक्ष्यार्थ
(इ) व्यंगार्थ
उत्तर:
(आ) लक्ष्यार्थ

प्रश्न 3.
समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीस म्हणतात.
पर्याय :
(अ) लक्षणा
(आ) व्यंजना
(इ) अभिधा
उत्तर:
(इ) अभिधा

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

प्रश्न 4.
‘आम्ही सगळे भारतीय आहोत.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
पर्याय :
(अ) व्यंजना
(आ) लक्षणा
(इ) अभिधा
उत्तर:
(इ) अभिधा

प्रश्न 5.
‘संप म्हणजे सामान्यांचे मरणच!’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
पर्याय :
(अ) अभिधा
(आ) लक्षणा
(इ) व्यंजना
उत्तर:
(आ) लक्षणा

शब्दशक्ती प्रास्ताविकः

आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना आपण भाषेतील शब्दांच्या माध्यमातून इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत असतो. समाज जीवनात वावरताना माणसांचे परस्परांमधील व्यवहार भाषेच्या माध्यमातून सुलभपणे चालत असतात. भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होत असते. प्रतिभावंत लेखक-लेखिका, कवी-कवयित्रींकडून वैशिष्ट्यपूर्ण असे भाषिक आविष्कार निर्माण होत असतात.

श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन ही महत्त्वाची भाषिक कौशल्ये आहेत. बोलण्याची तयारी ऐकण्यापासून होत असते. वाचनाने व्यक्तिमत्त्व बहुश्रुत होते. आपल्या बोलण्याला रंग, रूप, गुण, उंची, खोली असली की आपल्या मनातील आशय इतरांपर्यंत नेमकेपणाने आणि प्रभावीपणे पोहोचवता येतो. मनातील अमूर्त विचार शब्दांद्वारेच मूर्त होत असतात. म्हणूनच माऊली म्हणतात त्याप्रमाणे,

“बिंब जरी बचके एवढे। परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे।

शब्दांची व्याप्ती येणे पाडे। अनुभवावी।।” आपले शब्द हे आपल्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा हुंकार असतो. प्रसंगानुसार शब्दयोजना व आशयानुसार केलेली अभिव्यक्ती श्रोत्यांना व वाचकांना आपल्या कवेत घेते.

शब्दशक्ती

शब्दांच्या अंगी शब्दाच्या मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य असते. शब्दांच्या या सामर्थ्यालाच शब्दशक्ती असे म्हणतात.
उदा.

  • मी आज मोठा दगड पाहिला.
  • त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.
  • माझ्या मना बन दगड.

पहिल्या वाक्यात ‘दगड’चा अर्थ पाषाण/धोंडा असा आहे. दुसऱ्या वाक्यात काळा दगड चा अर्थ पक्का/कधीही न बदलणारा/ठाम असा आहे. तिसऱ्या वाक्यात दगड चा अर्थ कठोर अंत:करण करणे असा आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

शब्दांच्या अंगची ही शक्ती तीन प्रकारची आहे.

शब्दशक्ती :

  • अभिधा
  • लक्षणा
  • व्यंजना
अभिधा लक्षणा व्यंजना
(१) शब्द वाचल्याबरोबर त्याचा शब्दश: अर्थ समजतो. (१) शब्दाचा मूळ अर्थ उपयोगी पडत नाही म्हणून संदर्भानुसार दुसराच अर्थ घ्यावा लागतो. (१) शब्दाच्या मूळ अर्थाशी सुसंगत असा वेगळाच अर्थ सूचित होतो.
(२) अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला ‘वाच्यार्थ’ म्हणतात. (२) लक्षणा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थास ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात. (२) व्यंजना शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थास ‘व्यंगार्थ’ म्हणतात.
(३) रूढ, समाजमान्य व शब्दकोशात हा अर्थ दिलेला असतो. (३) संदर्भानुसार दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मूळ अर्थ दुसऱ्या अर्थाला लक्षितो. (३) मूळ अर्थाशी सुसंगत असा वेगळाच अर्थ घ्यावा लागतो.
(४) शब्दाचा मूळ अर्थ (४) शब्दाच्या मूळ अर्थास बहुतेक वेळा बाधा येते. (४) मूळ अर्थाला बाधा न येता दुसराच सुसंगत असा अर्थ.
उदा.
1. काल मला रानात साप दिसला. (साप सर्प / नाग)
2. नानां काल पर्वतीवर गेले. (काल म्हणजे कालच) अभिधा शक्तीत साधा, सरळ अर्थ समजतो.
उदा.
1. घरावरून साप गेला.(घरावरून घरासमोरून, घराजवळून)
2. नाना काल पर्वतीवर गेले. (पर्वतीवर मृत्यू पावले) लक्षणा शक्तीत हे कसे शक्य आहे? म्हणून दुसराच अर्थ घ्यावा लागतो.
उदा.
1. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. (साप दुष्ट/वाईट/लबाड व्यक्ती)
2. नाना काल पर्वतीवर गेले. (पर्वतीचा डोंगर चढून गेले) व्यंजना शक्तीचा वापर दुसऱ्याला नावे ठेवण्यासाठी केला जातो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 व्याकरण शब्दशक्ती

व्यंगार्थाची गंमत :

व्यंजना या शब्दशक्तीने व्यंगार्थ समजतो.
उदा. सूर्य उगवला – म्हणजेच सूर्योदय झाला. परंतु व्यक्तिगणिक याचा अर्थ वेगवेगळा सूचित होतो.

वाक्य व्यक्ती व्यक्तींच्या दृष्टीने अर्थ
सूर्योदय झाला. घरातील काही व्यक्ती झोपेतून उठण्याची वेळ झाली.
घरातील गृहिणी झाडलोट व सडापाणी करण्याची वेळ झाली.
घरातील आजी – आजोबा प्रातः प्रार्थनेची वेळ झाली.
शाळेत जाणारे विदयार्थी मुला – मुलींची आंघोळीची वेळ झाली.

शब्दशक्तींची गरज :

साहित्यिकांना ललित वाङ्मयात आपल्या जीवनानुभवांचे दर्शन इतरांना प्रभावीपणे घडविण्यासाठी, शब्दांच्या पलिकडचा भाव व्यक्त करण्यासाठी, मूळ भावार्थाशी संलग्न अर्थच्छटांना दर्शविण्यासाठी, काव्यात व्यंगामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता निर्माण करण्यासाठी शब्दशक्तीच्या माहितीची आवश्यकता आहे.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.1 शब्दशक्ती 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.5 रेडिओजॉकी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

11th Marathi Digest Chapter 4.5 रेडिओजॉकी Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला प्राप्त करावी लागणारी भाषिक कौशल्ये लिहा.
उत्तरः
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मूलभूत भाषिक कौशल्ये म्हणजे लेखन, वाचन, भाषण-संभाषण, श्रवण कौशल्ये आत्मसात करणे अपेक्षित आहे. रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वाचन चौफेर हवे तसेच रेडिओजॉकी व्यासंगी हवा.

भाषा, साहित्य व संस्कृती यांची त्याला चांगली जाण असावी. त्याची भाषा साधी, सोपी व ओघवती असावी. शब्दफेक, बोलण्यातील सहजता, माधुर्य त्याच्या निवेदनात असावे. उच्चार सुस्पष्ट व निसंदिग्ध असावेत. भाव-भावना यांची जाणीव असावी. मिंग्शिल (मराठी-इंग्लिश), हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) तसेच स्थानिक भाषांची सरमिसळ करून आरजे निवेदन करत असतो. भाषा सकारात्मक. श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी. मिस्किल अशी असावी.

रेडिओजॉकीला भाषेचे उत्तम ज्ञान असावे. बोलताना शब्दातील भाव भावना यांचे प्रकटीकरण व्हावे. त्याचा अर्थ भाषेतून श्रोत्यांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात भाषेची उत्तम जाण व सरावातून, चांगल्या प्रकारे रेडिओजाकीला निवेदन करता येऊ शकते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
‘आरजे-एक संवादी व्यक्तिमत्त्व’ हे स्पष्ट करा.
उत्तरः
आरजे ए.एम, एफ.एम. व विविध कार्यक्रमांतून श्रोत्यांशी संवाद साधत असतो. त्याला बोलण्याची व गप्पा मारण्याची आवड असते. उत्कृष्ट संवाद कौशल्य व विनोदाची जाण असणारे व्यक्तिमत्त्व असते. स्टुडिओत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीतून त्यांना बोलते करण्याचे कौशल्य आरजेकडे असते.

वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधत असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना तो अनेकदा अनौपचारिक असतो. ‘डायल इन’ या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात आटोपशीर आणि अधिकाधिक श्रोत्यांना सामावून घेणारा असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना मार्दवपणा व हजरजबाबीपणा असतो. आरजे समोरच्याला अधिकाधिक बोलण्याची संधी देत असतो. आरजेचे बोलणे संवादी, गतिमान व सहजस्फूर्त असते.

सलग दोन-तीन तासांच्या निवेदनात आरजे विविध गाणी, किस्से सादर करता-करता श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत असतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फोनवरून श्रोत्यांशी संभाषण व चर्चा करत असतो. विविध स्पर्धांचे आयोजन, कोड्यांची रचना व त्यांची उत्तरे, विशेष दिनाची चर्चा यातून आरजेचे संवादी व्यक्तिमत्त्व समोर येते. अनेकदा थेट प्रक्षेपित कार्यक्रमांतून प्रवाही संवाद होत असतो. थोडक्यात आरजे हे संवादी व्यक्तिमत्त्व आहे. श्रोते व मान्यवरांशी होणाऱ्या विविधांगी संवादातून त्याचे व्यक्तिमत्त्व आकारास येते.

प्रश्न 3.
रेडिओजॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढण्याची तुम्हाला जाणवणारी कारणे लिहा.
उत्तरः
आज प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडिओ स्टेशन्सच्या स्थापनेमुळे रेडिओ चॅनल हा उदयोग वाढत आहे. ऑल इंडिया रेडिओ, ए.एम., एफ.एम., जाहिरात एजन्सी, विशिष्ट प्रसंग, विशिष्ट कार्यक्रम, विविध मनोरंजन कंपन्या अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या अनेक संधी रेडिओजॉकीला उपलब्ध होत आहेत. रेडिओ स्टेशन्सच्या वाढलेल्या संख्येमुळे या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढत आहेत.

त्याचबरोबर विविध मनोरंजन कंपन्यांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वेगवेगळ्या जाहिरात एजन्सीत रेडिओजॉकीला नोकरीची संधी मिळते. आजकाल विविध प्रकारची उत्पादने, सेवा यांच्या जाहिरातीचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात जाहिरात होत असते. यातून रेडिओजॉकीला संधी मिळते.

विशिष्ट प्रसंगांत, आयोजित कार्यक्रमात तसेच ऑल इंडिया रेडिओत अनेक कार्यक्रमांतून रेडिओजॉकीला संधी उपलब्ध होत आहे. थोडक्यात आजच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे रेडिओजॉकीला अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 4.
रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तरः
रेडिओजॉकी अर्थात आरजेचे विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात. ए.एम., एफ.एम. या खाजगी रेडिओवरून श्रोत्यांची आवड, छंद ओळखून विविध स्वरूपाचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. विविध वयोगट, महिला, विविध क्षेत्र यांनुसार कार्यक्रमाचे स्वरूप व संहिता बदलत असते. एकाच प्रकारचे कार्यक्रम प्रसारीत झाले तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे व निरस वाटू लागतात. म्हणून त्यात वैविध्य आणून रंजकता वाढवली जाते.

रेडिओजॉकीचे कार्यक्रम महिलांची आवड-निवड, छंद यांचा विचार करून महिलांसाठी, तसेच युवकांची आवड, ध्येये, स्वप्न डोळ्यांसमोर ठेवन कार्यक्रम तयार केले जातात. शालेय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शेती व त्याच्याशी निगडित मलाखती. मार्गदर्शन. सल्ला यांचा कार्यक्रमात अंतर्भाव असतो.

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवाला खूप महत्त्व आहे. या सण-उत्सवाच्या निमित्ताने त्यांची माहिती, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आरजे सादर करत असतो. श्रोत्यांच्या आवडीचा आणि रंजनाचा विषय म्हणजे संगीत. त्याचे अनेक कार्यक्रम तो सादर करतो. विशेषतः सलग दोन-तीन तास बॉलीवुड हिट गाणी वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो. वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले जाते. त्यातून उद्बोधन होत असते.

श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे हा एक कार्यक्रम असतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात तसेच, श्रोत्यांची विविध कार्यक्रमांच्या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पत्राद्वारे व्यक्त होत असते. कधी कधी अचानक घडलेल्या घटनांवर कार्यक्रम असतो. उदा.

नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना इत्यादी. विज्ञानविषयक घडामोडी, त्यावर भाष्य करणाऱ्या बातम्या प्रसारित होतात. प्रासंगिक घडामोडी, चालू घडामोडी यांवर तसेच विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधणारे कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखतींद्वारे विविध विषयांवर प्रकाश टाकला जातो. थोडक्यात आरजेचे कार्यक्रम हे एकसूरी नसून त्यात विविधता असते.

प्रश्न 5.
‘उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
लेखन, वाचन, श्रवण, भाषण-संभाषण ही भाषेची कौशल्ये आहेत. कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. रेडिओजोंकी हा संवादी निवेदक, सत्रसंचालक असतो. उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावीच लागतात. भाषेची जाण असणे.

भाषाशैली, अरोह-अवरोह, उच्चारातील स्पष्टता, निसंदिग्धता असावी लागते. उत्तम भाषिक कौशल्य वाचन आणि व्यासंगाने प्राप्त होत असते. रेडिओजॉकीचे वाचन खूप असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजन अशा विविध विषयांची जाण व अभ्यास असावा. रेडिओजॉकीची भाषा साधी, सोपी, सरळ, ओघवती असावी तसेच त्यात मार्दव व माधुर्य असावे.

शब्दफेक, वाक्यांची रचना, सलगता, बोलण्याचा वेग, आत्मविश्वास, आवाजातील भारदस्तपणा या सर्व गोष्टी भाषेची कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच येऊ शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा अभ्यास, त्यातील बारकावे, भाव-भावना यांच्या अभ्यासाने भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत असते व त्यातूनच भाषिक कौशल्यांचा विकास होताना दिसतो. हे सर्व गुण रेडिओजॉकीत असावेत. त्यातूनच तो उत्तम रेडिओजॉकी होऊ शकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

रेडिओजॉकीला सलग दोन-तीन तास कार्यक्रमाचे सादरीकरण करावे लागते. वेगवेगळ्या विषयांची, प्रसंगांची, घडामोडींची माहिती देणे, श्रोत्यांशी अनौपचारिक-औपचारिक संवाद साधणे, मुलाखती, श्रोत्यांशी खेळ खेळणे या सर्व कार्यक्रमात रेडिओजॉकीची भाषा अतिशय ओघवती, प्रवाही, मिश्किल, सहजस्फूर्त अशी असावी. याचाच अर्थ असा की उत्तम भाषिक कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते या विधानात सत्यता आहे.

प्रश्न 6.
‘उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.’ स्पष्ट करा.
उत्तरः
ए.एम., एफ.एम. रेडिओवरून सलग दोन-तीन तास श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत विविध गाण्यांची मधून-मधून पेरणी करत श्रोत्यांच्या हृदयापर्यंत भिडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रेडिओजॉकी. रेडिओजॉकीकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. तो श्रोत्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतो.

वेगवेगळी कोडी, खेळ इ. माध्यमातून श्रोत्यांना बोलते करत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखतीतून विषय सविस्तरपणे श्रोत्यांसमोर मांडण्याचे कौशल्य रेडिओजॉकीत असते. प्रासंगिक घडामोडी, वाढदिवस, दिनविशेष अशा निमित्ताने मान्यवरांशी संवाद, मुलाखती, अनौपचारिक चर्चा यांतून त्याचे सुसंवादी व्यक्तिमत्त्व श्रोत्यांसमोर येत असते. समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा, विनोदीवृत्तीने कार्यक्रमाची रंजकता तो वाढवत असतो.

रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी असावे. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न, आत्मविश्वासू असते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान त्याला असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सांगीतिक, क्रीडा, अर्थ अशा विविध विषयांची सखोल माहिती रेडिओजॉकीला असावी. चालू घडामोडी, समाजाचा एखादया गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फॅशन, क्रीडा, बॉलीवुड, युवक-युवतींचा कल या सर्व बाबींचा सखोल अभ्यास असावा.

समाजात आजुबाजूला घडणाऱ्या बारीक-सारीक घटना, प्रसंग यांची माहिती असावी. सूक्ष्म निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता ही रेडिओजॉकीची खास वैशिष्ट्ये. थोडक्यात सुसंवाद, प्रवाही भाषा, शब्दफेक, कार्यक्रमाची सलगता टिकवणे, रंजन, सर्जनशीलता या गुणांच्या आधारे रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनत असते. हेच व्यक्तिमत्त्व यशस्वी व उत्तम रेडिओजॉकी म्हणून श्रोत्यांसमोर येते.

प्रकल्प.
रेडिओवरील आरजेचे काही कार्यक्रम ऐका. तुम्ही आरजे आहात, अशी कल्पना करून ‘युवकांसाठी करिअरच्या संधी’ या विषयावरील लाईव्ह कार्यक्रमासाठी संहिता तयार करा.

11th Marathi Book Answers Chapter 4.5 रेडिओजॉकी Additional Important Questions and Answers

कृती : १ आकलन कृती
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
अदययावतता’ हा शब्द उत्तर म्हणून येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
आकाशवाणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?

आधुनिक जीवनात संपर्क …………………………….. आपल्यासमोर आला आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११४)

प्रश्न 3.
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [ ]
उत्तरः
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [आकाशवाणी]

प्रश्न 4.
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [ ]
उत्तरः
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी]

उपयोजित कृती-१.

प्रश्न 1.
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 3
उत्तर :
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 5
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 6

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 7
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 8

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर :
आकाशवाणी हे अगदी सामान्यातल्या सामान्य घरात पोहोचलेले सुलभ माध्यम आहे. अतिशय शीघ्र गतीने घराघरात पोहोचलेले असे माध्यम शिवाय शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले माध्यम आहे. म्हणूनच आकाशवाणीच्या माध्यमातून दिलेली माहिती देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचते. आकाशवाणीचे हे गुण ओळखूनच भारत सरकारने १९२७ साली ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ या खाजगी कंपनीद्वारे भारतात मुंबई व कोलकाता येथे अधिकृत आकाशवाणी केंद्रे स्थापन केली.

अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा दूरदर्शन माध्यम घराघरात पोहचले नव्हते त्या काळात स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात पेटवत ठेवण्याचे मोठे कार्य आकाशवाणीच्या माध्यमातून झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींची भाषणे आकाशवाणीवरून प्रसारित होत असत. आज स्वातंत्र्यानंतरसुद्धा लोकोपयोगी सरकारी सामाजिक उपक्रमांची माहिती सातत्याने या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाते. आकाशवाणीवर विविध विषयांना वाहिलेले कार्यक्रम असतात.

त्यातून फक्त लोकांचे मनोरंजनच होते असे नाही तर अनेक उपयुक्त माहिती श्रोत्यांना पुरवली जाते. आज मोबाईलमध्ये आकाशवाणी व खाजगी रेडिओ वाहिन्या सहजपणे ऐकता येतात. अगदी ट्रेनच्या प्रवासात ते दूर शेतात डोंगरपाड्यावर रेडिओ ऐकता येतो. लोकांना सजग करण्याचे, त्यांना माहितीपूर्ण ज्ञान देण्याचे, सरकारी उपक्रम घराघरात पोचवण्याचे हे अत्यंत प्रभावी साधन आहे. सर्वांच्या हितासाठी व सर्वांच्या सुखासाठी वर्षानुवर्षे या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. म्हणूनच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

कृती : ३

प्रश्न 1.
खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

(अ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 10

(ब) चौकटीत योग्य माहिती भरा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 12

रेडिओजॉकीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू – व्यक्तिमत्त्व प्रसन्न ………………………………….. त्यांना हे क्षेत्र खुणावत आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११६)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 13
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 14

प्रश्न 3.
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी.
१. ……………………………..
२. ……………………………..
३. ……………………………..
उत्तरः
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी
१. भाषा
२. साहित्य
३. सांस्कृतिक घडामोडी

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 15
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी 16

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

स्वमत:

प्रश्न 1.
रेडिओजॉकी ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे अतिशय प्रभावी, प्रवाही शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्त्वाला रेडिओजॉकी (आरजे) असे म्हणतात. रेडिओजॉकीला मराठीत ‘उद्घोषक’ असे म्हणतात. रेडिओजॉकी संगीत शैलीचा परिचय करून देत टॉक रेडिओ शोचे आयोजन करत असतो. मुलाखती घेणे, श्रोत्यांशी संवाद साधणे, हवामान, खेळ, बातम्या इ. संबंधीची माहिती देत असतो. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधत असतो. स्थानिक भाषा हिंदी, इंग्लिश या भाषांची सरमिसळ करून तो निवेदन करत असतो. सलग दोन-तीन तास श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो.

प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता साधत कार्यक्रम सुसूत्रपणे मांडण्याचे कसब रेडिओजॉकीकडे असते. सलग दोन-तीन तासांतील कार्यक्रमात वैविध्य आणण्यासाठी व त्यातील एकसुरीपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यात कोडी, स्पर्धा, श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे, संवाद, संगीत, दिनचर्या, वाढदिवस यांद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता रेडिओजॉकीत असते.

बॉलीवुड क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, गाणी ऐकवणे हे रेडिओजॉकीचे काम असते. थोडक्यात भाषेवर प्रचंड प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वास, निवेदनातील सहजता, व्यासंग यातून रेडिओजॉकी बहारदार सादरीकरण करत असतो. आरजे संग्राम, आरजे अपूर्वा, आरजे प्रसन्ना, आरजे काव्या अशी ओळख करून देत खाजगी रेडिओशी श्रोत्यांना जोडण्याचे काम रेडिओजॉकी करतो. अनेक खाजगी रेडिओ आरजेच्या नावावर ओळखल्या जातात.

रेडिओजॉकी प्रास्ताविकः

आजच्या काळात संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. यामध्ये मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य या माध्यमांद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे सुलभ झाले आहे. लिखित माध्यमात वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, हस्तपुस्तिका येतात. श्राव्य माध्यमात आकाशवाणी, दूरध्वनी, ध्वनीफिती इत्यादींचा समावेश होतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

तर दृकश्राव्य माध्यमात दूरचित्रवाणी, चित्रपट, ध्वनिचित्रफिती, संगणक, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे संप्रेषण, समाजप्रबोधन, मार्गदर्शन, ज्ञान, माहिती व मनोरंजन समाजापर्यंत पोहोचवले जाते. १९२७ मध्ये भारतात इंडियन ब्राडकस्टिंग कंपनीने मुंबई व कोलकाता या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू केले. १९३५ मध्ये म्हैसूर संस्थानने स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले.

पुढे भारत सरकारने हेच नाव स्वीकारले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रक्षेपित करत आहे. आकाशवाणी व खाजगी एफ.एम. मध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. खाजगी एफ.एम.मधील रेडिओजॉकी नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे.

रेडिओजॉकीची पार्श्वभूमी आणि संकल्पना :

१९२०-३० ते १९९३ पर्यंत रेडिओचा प्रवास आहे. २००१ पासून भारतात खाजगी एफ.एम.ची सुरुवात झाली. ‘रेडिओ सिटी बेंगलोर’ हे भारतातील पहिले खाजगी एफ.एम. रेडिओ स्टेशन होय. तर ‘द टाईम्स ग्रुपने ‘रेडिओ मिर्ची’ हे स्टेशन इंदौर येथे सुरू केले, महाराष्ट्रात खाजगी एफ.एम. २००२ मध्ये सुरू झाले. एफ.एम. रेडिओत ‘बॉलिवुड हिट’ मधील तरुणाईला आवडतील अशी गाणी वारंवार ऐकवून मध्ये मध्ये सूत्रसंचालन करणारा रेडिओजॉकी तरुणाईला आर्कषित करतो. रेडिओजॉकीची (आर.जे.) निवेदन शैली ओघवती असावी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असावे.

सलग दोन-तीन तास निवेदन करून श्रोत्यांशी संवाद साधून त्यांचे मनोरंजन करण्याची क्षमता आर.जे. कडे असते. यात तो संभाषण, चर्चा, वाढदिवस, दिनविशेष, कोडी, स्पर्धा यांचे आयोजन करून श्रोत्यांचे मनोरंजन करतो. थेट प्रक्षेपणाच्या विविध कार्यक्रमाबरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रेटिंशी संवाद साधून श्रोत्यांना अनोखी मेजवानी देत असतो.

रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप :

आजच्या काळात रेडिओ जॉकीच्या कामाचे स्वरूप प्रचंड आहे. एफ.एम., ए.एम. रेडिओजॉकी सार्वजनिक रेडिओ स्टेशनद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो. उपग्रह रेडिओजॉकीद्वारे एफ.एम.ए.एम. स्पष्ट माहिती व संगीत ऐकवू शकतो. स्पोर्टस टॉकद्वारे क्रीडा, बातम्या, माजी खेळाडू, क्रीडालेखक, निवेदक यांची माहिती देऊन श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. तसेच सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. थोडक्यात वरील सर्व विषयांवर माहिती देणारा व श्रोत्यांशी संवाद साधणारा रेडिओजॉकी आपणास खाजगी एफ.एम.द्वारे श्रोत्यांची मने जिंकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

रेडिओजॉकीचा आवाज, निवेदन, अभ्यास व व्यक्तिमत्त्वः

रेडिओजॉकीचा आवाज सुस्पष्ट व उत्तम असावा. आरोह-अवरोहाचे उत्तम ज्ञान असावे. भाषा सोपी, साधी व प्रवाही असावी. निवडलेली गाणी, किस्से यात सुसंगतता असावी. निवेदनात आनंद उत्साहीपणा असावा. तर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आवाजात कारुण्य असावे. रेडिओ जॉकीला सर्वच क्षेत्राचे उत्तम ज्ञान असावे. व्यासंग व चौफेर वाचनातून ते भान येते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजीचे ज्ञान असावे. भाषेवर प्रभुत्व हवे.

कार्यक्रमाची संहिता लेखन करता येणे अपेक्षित असते. व्यक्तिमत्त्व प्रसन्न, हरहुन्नरी असावे. हजरजबाबीपणा, बोलण्याची आवड असावी. उत्कृष्ट संवादकौशल्य व विनोदाची जाण असावी. सूक्ष्म निरीक्षण कौशल्यातून आजुबाजूच्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याकडे असावी. थोडक्यात रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व, बहुआयामी असावे की जेणेकरून त्यातून उत्तम व प्रभावी सूत्रसंचालन त्याला करता येऊ शकेल.

रेडिओजॉकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप व क्षेत्रे:

रेडिओजॉकीचे कार्यक्रम विविध स्वरूपाचे असतात. समाजातील विविध क्षेत्रांतील सर्व घटकांसाठी ए.एम. व एफ.एम. वरून कार्यक्रम सादर होत असतात. त्यात प्रासंगिक घडामोडी, मुलाखती, वैज्ञानिक, युवक, महिला, शालेय, कृषी, सण-उत्सव, संगीत, परिसंवाद, श्रोत्यांची पत्रे व अचानक घडलेल्या घटना अशा विविध विषयांवर कार्यक्रमाचे प्रसारण होत असते. त्यामुळे रेडिओजॉकींना नोकरी व व्यवसायाची ही उत्तम संधी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.5 रेडिओजॉकी

विविध मनोरंजन कंपन्या, जाहिरात एजन्सी, विशेष कार्यक्रम, विशिष्ट प्रसंग, ऑल इंडिया रेडिओ, ए.एम, एफ.एम. चॅनल इत्यादी क्षेत्रांत करिअरची उत्तम संधी मिळू शकते. त्यासाठी त्याच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य, वाचन, व्यासंग, स्पष्ट उच्चार, सर्जनशीलता, बहुश्रुतता, समयसूचकता, निरीक्षणक्षमता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे असावे. आपल्यातील क्षमता आणि कौशल्याचा विकास साधल्यास उत्तम आरजे बनण्याची संधी आहे व त्यातून युवक-युवतींसाठी उत्तम करिअरचा मार्ग मिळू शकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

11th Marathi Digest Chapter 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा.
उत्तरः
अनुदिनी किंवा ब्लॉग हे एक सामाजिक माध्यम आहे. विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले ‘संकेतस्थळ’ म्हणजे ‘ब्लॉग’. आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून अनुदिनी लेखन करता येते. अनुदिनी लेखन हे सामाजिक संपर्कस्थळ असल्याने त्यावर प्रसिद्ध होणारी माहिती अनेक वाचकांना उपयुक्त ठरू शकते. ‘अनुदिनी’चा उदय होण्यापूर्वी ‘डायरी लेखन’ केले जात होते. व्यक्ती त्याच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडींची नोंद त्या डायरीत करून ठेवत असे. ही डायरी त्याची त्याच्यापुरती खाजगी होती.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

एक प्रकारे ती ‘स्व-अभिव्यक्ती’ होती. अशा लिहिलेल्या काही डायऱ्या नंतरच्या काळात सामाजिक-ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. उदा. अॅन फ्रँक हिची डायरी, लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली ‘स्मृतिचित्रे’ ही डायरी. त्यामुळे आज डायरी लेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वी हे लिखाण अनेकांपर्यंत जात नव्हते. परंतु आज ते अनेकांपर्यंत जावे, माहितीची विचारांची देवाण-घेवाण व्हावी, संवादाचे पूल बांधले जावेत, क्रिया-प्रतिक्रियांमधून विचारांचे कंगोरे समोर यावेत अशा अनेक कारणांमळे ‘अनदिनी’ची गरज निर्माण झाली आहे.

स्वविचार-स्वभावना यांना शिस्त आणि स्वातंत्र्याची जोड देऊन अभिव्यक्त होण्यासाठी ‘अनुदिनी’ हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे एखादया कार्यक्रमाची माहिती, एखादे छायाचित्र, चित्रफिती, पाककृती, प्रवासवर्णन, राजकीय मत मतांतरे अशा अनेक गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवता येतात. याचा लाभ ती अनुदिनी वाचणाऱ्यांना होतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विचारांची देवाण-घेवाण होते. म्हणूनच अनुदिनी वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रश्न 2.
अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तरः
अनुदिनी लेखनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक अनुदिनी लेखन आणि वाचन यांचा उपयोग स्वजाणिवा विकसित करण्यासाठी करतात. वैयक्तिक अनभवाच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेल्या ‘अनदिनी’ने आपले कार्यक्षेत्र हळहळ विस्तारले आहे. व्यक्तिगत भावनांपास थेट निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा व्यक्ती-व्यक्तीतील हितगुज सार्वत्रिक करण्यापासून ते वस्तूची जाहिरात व विक्री करण्यापर्यंत ब्लॉगला कोणतेही क्षेत्र वर्ण्य नाही. ब्लॉगची क्षेत्रे ही खालील प्रमाणे आहेत.

  1. वैयक्तिक : यात व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी, आपले आवडते संगीत, नृत्य, एखादी सहल अशा अनेक बाबींवर व्यक्तिगत पातळीवरील विचार व्यक्त करते.
  2. सामाजिक : यात व्यक्ती सभोवताली घडणाऱ्या सामाजिक घटनांबाबत संवेदनशील असते. त्यावर आपले बरे-वाईट, सकारात्मक नकारात्मक विचार तिला व्यक्त करावेसे वाटतात. त्यातून मग साद-प्रतिसादाची वैचारिक साखळी तयार होते. विषयाचे विविध कंगोरे समोर येतात.
  3. व्यावसायिक : व्यवसायवृद्धी हे देखील ‘ब्लॉग’ निर्माण करण्याचे महत्त्वाचे कारण आहे. यात एखादे उत्पादन, त्याची वैशिष्ट्ये, एखादी सेवा, त्याविषयीच्या आर्थिक बाबी इत्यादींची माहिती दिली जाते.
  4. वाङ्मयीन : यामध्ये साहित्य आणि साहित्यातील विविध प्रवाह यांच्यावर लेखन होते. समीक्षात्मक लेखन ते थेट एखादे ललित . वाङ्मय असा हा प्रवास असू शकतो. काही वाङ्मयीन ब्लॉग एखादया लेखकाला वाहिलेला असतो. त्या लेखकाच्या साहित्याची चर्चा, ओळख तिथे नियमित करून दिली जाते. उदा. पु.ल. देशपांडे यांच्या नावाचा उपलब्ध असलेला ब्लॉग.
  5. सामूहिक : यात दोन-तीन व्यक्ती एकत्रितपणे लेखन करतात.
  6. पर्यटन : पर्यटन विषयाला वाहिलेले लेखन-यावर माहिती, पर्यटनस्थळे, चित्र, तिथले अनुभव यांची माहिती दिली जाते.
  7. शैक्षणिक : अनेक शैक्षणिक संस्थांचे स्वत:चे ब्लॉग आहेत. त्यावर शिक्षण विषयक घडामोडींची माहिती दिली जाते.
  8. राजकीय : यात राजकीय व्यक्ती स्वत:चे ब्लॉग निर्माण करून स्वत:च्या राजकीय-सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात.
    उदा. I support Narendra Modi नावाचा ब्लॉग सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची माहिती देत असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 3.
चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
ब्लॉग / अनुदिनी लिहिणाऱ्यांची संख्या मुबलक आहे. त्याद्वारे मनात येणारे विचार मुक्तपणे मांडले जातात. या लेखनाचे क्षेत्र जरी व्यापक असले तरी प्रत्येकाच्या आवडीचे क्षेत्र, प्राविण्याचे क्षेत्र भिन्न असते. ब्लॉग सुरू करताना जे विषय आवडतात, ज्या विषयांवर प्रभुत्व आहे अशा विषयांना प्राधान्य देणे योग्य ठरेल. हे लेखन करताना खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • आकर्षक शीर्षक
  • आकर्षक विषय मांडणी
  • छोटी, सुटसुटीत, सोपी आणि आकलनसुलभ वाक्यरचना
  • परिच्छेदांची समर्पक मांडणी.
  • एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहजशैली
  • रिकाम्या जागेचा योग्य वापर.
  • वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली
  • संवादात्मकता
  • दृक-श्राव्य किंवा श्राव्य फीतींची लिंक
  • शब्द मर्यादेचे पालन, विषयातील अद्ययावतता / आधुनिकता

प्रश्न 4.
तुम्हांला उपलब्ध असलेली अनुदिनी वाचून त्यासंबंधीच्या तुमच्या प्रतिक्रिया स्पष्ट करा.
उत्तरः
सध्याच्या इंटरनेटच्या युगात ब्लॉगचे महत्त्व फारच वाढले आहे. असंख्य लोक आता मराठीतून ब्लॉग लिहू लागले आहेत. त्यातील काही ब्लॉग खरंच दर्जेदार असतात तर काही सुमार दर्जाचे. प्रत्येक वेळेला ब्लॉगचा URL टाकून त्या ब्लॉगवर जाणे, नवीन काही पोस्ट झाले आहे का हे पाहणे फारच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ब्लॉग लिस्ट नावाच्या संकेतस्थळाला भेट हे खूपच सोयीचे आहे. वेगवेगळे ब्लॉग यावर जोडलेले आहेत.

प्रत्येकाची ताजी पोस्ट त्या ब्लॉगच्या नावावरच झळकत राहते त्यामुळे काय वाचावे हे लगेच ठरवता येते. ‘अक्षरगंध मनातले काही तरंग’, ‘लेखन प्रपंच’, ‘आनंदयात्रीचा ब्लॉग’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘सहयाद्री बाणा’, ‘माझी वाङ्मय शेती’, ‘माझे ट्रेक अनुभव’ अशा अनेक ब्लॉगला एकाच ठिकाणी भेट देऊन सगळ्या ब्लॉगच्या ताज्या पोस्ट एकाच ठिकाणी वाचता येतात. यात गंगाधर मुटे हे ‘माझी वाङ्मय शेती’ या ब्लॉगमध्ये अभंगरचनेच्या आधारे शेतकरी जीवनावर काव्य रचना करतात ते वाचनीय असते. पु.ल. प्रेम नावाचा ब्लॉग मला खूप आवडतो.

याचा पत्ता आहे pulaprem.blogspot.com या ब्लॉगवर पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकांतील व्यक्तिरेखा आहेत. शिवाय पु.लं.ची इतर पुस्तके, त्यांची भाषणे, पत्रे हे सगळे वाचायला मिळते. याशिवाय पु.लं.च्या पत्नी सुनीताताई देशपांडे यांचे लेखन वाचण्यास उपलब्ध आहे. शिवाय इतरांनी पुलंवर लिहिलेले लेखन उपलब्ध आहे. पु.लं.च्या काही कविता, विनोदी किस्से वाचायला मिळतात. समग्र पु.लं. अनुभवण्यासाठी हा एक उत्तम ब्लॉग आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 5.
तुमची स्वत:ची अनुदिनी तयार करताना ती परिपूर्ण व आकर्षक होण्यासाठी पाळावयाची पथ्ये लिहा.
उत्तरः
ब्लॉग तयार करणे सोपं आहे. पण दर्जेदार ब्लॉग लेखन करणं ही कठीण बाब आहे. स्वत:ची अनुदिनी तयार करताना या अनुदिनीद्वारे आपण लोकांसमोर काय मांडणार आहोत याचा पक्का विचार प्रथम करणे गरजेचे आहे. अनुदिनीसाठी एखादे आकर्षक शीर्षक तयार करावे लागेल. जो विषय आपण अनुदिनीसाठी निवडला आहे त्या विषयाचे आपल्याला सखोल व्यवस्थित ज्ञान आहे का याची चाचपणी केली पाहिजे. एखादया विषयावर लेखन करताना भाषा आकर्षक-सुटसुटीत हवी. तशीच ती समजण्यास सोपी हवी. योग्य ठिकाणी परिच्छेदांची निर्मिती करणे गरजेचे आहे.

एका परिच्छेदाचा दुसऱ्या परिच्छेदाशी सहज संबंध जुळला जाईल असे लेखन हवे. जिथे रिकामी जागा आहे त्याचा समर्पक वापर करणे आवश्यक आहे. वाचकांना पुढेपुढे वाचत जावेसे वाटेल अशी लेखन शैली हवी. यात जर संवादात्मकता असेल तर अधिक उत्तम. आपण एका समूहाशी बोलतो आहोत असा भाषेचा बाज हवा. विविध चित्रे, दृक-श्राव्य फिती, श्राव्य फीती यांची लिंक दिली तर लेखन अधिक आशयघन होते. नवीन नवीन विषय सतत लोकांसमोर मांडता आले पाहिजेत. शब्दमर्यादेचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे ठरते. त्यामुळे या सगळ्या बाबी विचारात घेऊन ब्लॉग लेखन केले तर ते परिपूर्णतेकडे जाऊ शकते.

प्रश्न 6.
खालील विषयांवर ब्लॉग लिहा.

(अ) महाविद्यालयातील पहिला दिवस
उत्तरः
शाळा संपून महाविदयालयीन जीवनात प्रवेश करणे म्हणजे जणू एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाण्यासारखे असते. कानी कपाळी ‘आता तुम्ही मोठे झालात, जबाबदारीने वागा’ अशा सूचना मिळत असतात. बालपण संपल्याची हूरहूर तर तारुण्याची चाहूल लागण्याची उत्सुकता अशा संमिश्र भावनेने मन भरून गेलेले असते. माझ्याही मनाची अशीच अवस्था असताना मी महाविदयालयात प्रवेश केला.

सुदैवाने दहावीत गुण चांगले मिळाले असल्याने मनासारखे महाविदयालय मिळाले होते. गणवेशाची कटकट नसल्याने छानपैकी मॉर्डन स्टाईलची जीन्स आणि टी-शर्ट घालून महाविदयालयात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकाने अडवले. अजून ओळखपत्र नसल्याने रिसिट दाखवून प्रवेश केला. विस्तीर्ण पसरलेली महाविदयालयाची इमारत बघून मन दडपून गेलं. त्याभोवती छान हिरवळ असलेला बगीचा होता.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

फुलांचे ताटवे डोलत होते. फुलांसारखीच गोड मुले-मुली गप्पा मारत इकडे-तिकडे बागडत होते. मी कोणालाच ओळखत नव्हतो. त्यामुळे ते सर्व रमणीय दृश्य मनात साठवतच इमारतीच्या आत शिरलो. माझी रिसिट पाहून तिथल्या एका शिक्षिकेने मला माझा वर्ग दाखवला. मी मुकाट वर्गात जाऊन बसलो. वर्ग भरलेला होता. मग एकेक शिक्षक येत गेले. प्राचार्य आले. त्यांनी महाविदयालयाची माहिती दिली. नियम समजावून दिले आणि वर्ग सोडून दिला. दोनचार मुला-मुलींशी बोलून मैत्री केली. पण एकूणच पहिला दिवस प्रसन्न गेला. तीच प्रसन्नता घेऊन मी घरी गेलो.

(आ) फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक
उत्तरः
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ‘फेसबुक’चे मुख्यालय आहे. फेसबुकचा संस्थापक आहे मार्क झुकरबर्ग. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळ आहे. संपर्कक्रांती घडवून आणणाऱ्या या सोशल मिडियाने आज जगभरातील बहुतांश नागरिकांचे जीवन व्यापून टाकले आहे.

भारतासारख्या देशात तर या नव समाजमाध्यमांचा पगडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र त्यामुळे व्यक्ती संकुचित बनत चालल्या आहेत का? माणूस माणसापासून दुरावतो आहे का? या आभासी दुनियेतील मैत्री खऱ्या जीवनात कितपत उपयुक्त ठरते या सर्वांचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे.

फेसबुक, वॉट्सअपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे. फेसबुकवर मित्र जमवणे, त्यांची संख्या वाढवत नेणे हे आता व्यसन बनले आहे. एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्याला किती लाईक्स मिळतात यावर बऱ्याच जणांच्या आनंदाचं गणित ठरत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार सोशल मिडीयाचा वापर केल्यामुळे नैराश्य येते असे पाचपैकी एक व्यक्ती सांगते.

३० वर्षांहून कमी वयोगटाच्या लोकांत तर सोशल मिडिया महत्त्वाचा घटक बनला आहे. फेसबुकवर भरमसाठ मित्र मैत्रिणी असणारे अनेकजण प्रत्यक्ष जीवनात एकटेच असतात हे सत्य आहे. इतकेच नव्हे तर इतरांशी संवाद साधण्यासही ते असमर्थ असल्याचे दिसून येते. स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सतत पाहात राहणे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे अपडेट सोशल मिडियावर टाकत राहणे या सवयींनी तरुण वर्ग ग्रासून गेला आहे.

इतके या सगळ्याच्या अधीन जाणे ही भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे चिंता, एकटेपणा, आत्मविश्वासाची कमतरता यांचे वास्तव जीवनात प्रमाण वाढताना दिसत आहे.

ऑनलाईन विश्वात मनुष्य आपल्या आयुष्याचे एक चित्र रंगवतो जे वास्तवात असतेच असे नाही. त्यामुळे स्वत:विषयी उगाच अपेक्षा वाढतात. त्यामुळे मग या दुनियेतील मित्र-मैत्रिणींनी आपल्या पोस्टला कमी लाईक्स दिले तर तरुण पिढीतील न्यूनगंड वाढीस लागताना दिसतो आहे. म्हणूनच खऱ्या जीवनातील जीवाला जीव देणारे सच्चे मित्र असणे हीच खरी श्रीमंती आहे. मग ते एक-दोन का असेनात. म्हणून फेसबुकवरील मैत्री अनावश्यक वाटते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

11th Marathi Book Answers Chapter 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Additional Important Questions and Answers

कृती : १
खालील कृती स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अनुदिनी लेखनासाठी पाळायची पथ्ये लिहा.
उत्तरः
अनुदिनी लेखन हे एक प्रभावी सामाजिक माध्यम आहे. याचे लेखन हे गंमत म्हणून नव्हे तर गांभीर्याने करायचे लेखन आहे. कारण याचे समाजमनात, जीवनात दूरगामी पडसाद उमटत असतात. अनुदिनी लेखन जेव्हा अभ्यासपूर्ण असते तेव्हा त्याला सामाजिक-सांस्कृतिक राजकीय-ऐतिहासिक मोल असते. या लेखनात मर्यादित शब्दांत ‘उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन’ अपेक्षित आहे. या लेखनाला विचार आणि संशोधनाची जोड दिली की हे लेखन उत्कृष्टतेकडे जाते. उत्तम ‘ब्लॉग’ लिहिणाऱ्या ‘ब्लॉगर्स’चे अनेक वाचक असतात. हे वाचक त्यांच्या संपर्क माध्यमातून ब्लॉगर्सशी चर्चा करतात.

मात्र अनुदिनी लेखन करताना काही पथ्ये पाळणे गरजेचे असते. ती पथ्ये खालीलप्रमाणे :

  • अनुदिनी लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे आवश्यक आहे.
  • अनुदिनी लेखन अविवेकी असता कामा नये. लेखनविषयक शिस्त, समाजभान याची जाणीव सतत डोक्यात ठेवणे गरजेचे असते.
  • अनुदिनी लेखन प्रसिद्ध झाल्यावर त्यावरील प्रतिक्रिया उलटसुलट असू शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
  • अनुदिनी लेखनात सामाजिक स्वास्थ्य, शांतता थोडक्यात येईल असे विचार मांडता कामा नयेत.
  • अनुदिनी लेखनात मिळालेले स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कृती : २ आकलन कृती

प्रश्न 1.
खालील परिच्छेद वाचून सुचनेनुसार कृती करा.
(अ) मायक्रोब्लॉगिंगचे फायदे – [ ]
(आ) कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग निर्माण करण्याचा उद्देश – [ ]
(इ) गट ब्लॉगची व्याख्या – [ ]
(ई) विषयानुसार ब्लॉगचे काही विषय – १. ………….. २. ………….. ३. ………….. ४. …………..
उत्तरः
(अ) मायक्रोब्लॉगिंगमुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते.
(आ) आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अदययावत माहिती पोहोचवण्यासाठी कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग निर्माण करतात.
(इ) जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला गट ब्लॉग म्हणतात.
(ई) विषयानुसार ब्लॉगचे विषय
(a) प्रवास
(b) आरोग्य
(c) बागकाम
(d) फोटोग्राफी

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

वैयक्तिक ब्लॉग- एखादी व्यक्ती स्वत:च्या ब्लॉगवर …………………………………. मजकूर प्रसिद्ध केला जातो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११०, १११)

प्रश्न 2.
अनुदिनीचे प्रकार –
a. ………………
b. ………………
c. ……………..
d. ………………
e. ………………
f. ………………
उत्तरः
a. वैयक्तिक ब्लॉग
b. सहयोगी/गट ब्लॉग
c. मायक्रोब्लॉगिंग
d. कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग
e. एकत्रित ब्लॉग
f. विषयानुसार ब्लॉग

प्रश्न 3.
ब्लॉग आकर्षक करण्यासाठी याचा वापर करता येतो.
(a) ……………………………..
(b) ……………………………..
(c) ……………………………..
उत्तरः
(a) चित्र
(b) ध्वनिफित
(c) चित्रफित

स्वाध्याय कृती :

प्रश्न 1.
‘अनुदिनीच्या माध्यमातून स्वतःची नाममुद्रा महाजालावर उमटविण्याची संधी प्रत्येकाला मिळते’ या मताची पुष्टी करा.
उत्तरः
अनुदिनीचा उदय होण्यापूर्वी डायरी लेखन केले जात होते. व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाचा तपशील डायरीत नोंदवून ठेवत असत. पण ही डायरी खाजगी लेखन होते. काही डायऱ्या मात्र इतिहासात-साहित्यात अजरामर झाल्या. उदा. अना फ्रँकची डायरी यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मरणयातना भोगणाऱ्या, नाझी नरसंहाराचा सामना करणाऱ्या ज्यू समाजाचे चित्रण येते. मराठीत लक्ष्मीबाई टिळक यांची डायरी ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्या काळातील समाजजीवन विशेषतः स्त्री-जीवनाचे सविस्तर वर्णन त्यात येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

आज डायरी लेखन ‘अनुदिनी’च्या माध्यमातून केले तर ती खाजगी बाब राहत नाही. महाजालावर आपली अनुदिनी अनेकांकडून वाचली जाते.

पण लिहिलेल्या लेखनावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतात. या सर्वांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या लेखणीत असणे गरजेचे आहे. तुमचे विचार जितके स्वच्छ, अभ्यासपूर्ण, रंजक असतील, तुमची शैली जितकी आकर्षक ओघवती असेल, तुमचे लेखन माहितीपर, ज्ञानवर्धक, समाजउपयोगी असेल तितका ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आपली बुद्धिमत्ता, व्यासंग, वैचारिक क्षमता यांचा कस लागला जातो.

या आव्हानांना जो पुरून उरतो त्याची नाममुद्रा महाजालावर उमटतो. मग ती व्यक्ती कुठल्याही प्रांताची, धर्माची का असेना. त्याच्या लेखनाची सुजाण वाचकांकडून दखल घेतली जाते.

सरावासाठी ब्लॉग लेखनाचे नमुने.

प्रश्न 2.
निसर्गरम्य परिसराला भेट दिल्याचा अनुभव.
उत्तरः
अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुका म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच! प्रत्येक ऋतूत इथला निसर्ग पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. पावसाळ्यापूर्वीचा काजवा महोत्सव, पावसाळ्यातील रानफुलांचे सौंदर्य, खळाळणारे लहान मोठे झरे व उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सारेच काही भुरळ पाडणारे. पर्यटकांना मोहिनी घालणारी गर्द हिरवाई, आसमंतात पसरलेले धुके, थंडगार शहारे आणणारा वारा व बरसणाऱ्या पावसाच्या रिमझिम वा जोरदार धारा याचा वेगळाच आनंद प्रत्येकाला होतो.

या परिसरात खूप काही बघण्यासारखे आहे. रंधा धबधबा, भंडारदरा धरण, कळसूबाईचे शिखर, हरिश्चंद्रगडचा परिसर, रतनगड, अमृतेश्वराचे मंदिर, साम्रद जवळील सांदणदरी व नेकलेस आकाराचा धबधबा सारं काही अपूर्व. रिमझिमणाऱ्या पावसात निसर्गाच्या सहवासातील आनंदी अनुभव देणारा हा परिसर.

इथले प्रत्येक ठिकाण एखादा स्वतंत्र दिवस राखून ठेवून पाहण्यासारखा आहे. मुक्काम व भोजनाची व्यवस्था अनेक ठिकाणी उपलब्ध आहे माहिती जालावर कोठून कसे जावयाचे याबाबतची सर्व माहिती आहे. एकदा येऊन अनुभवण्यासारखा इथला निसर्ग नक्कीच आहे. जवळचे रेल्वे स्टेशन-इगतपुरी, नाशिक आहे. महामंडळाची बससेवा अनेक ठिकाणाहून उपलब्ध आहे.

प्रश्न 3.
माझा आवडता महिना – श्रावण.
उत्तरः
श्रावण हा मराठी कालगणनेनुसार पाचवा महिना. इंग्रजी कॅलेंडर वर्षात साधारणत: जुलै – ऑगस्ट मध्ये हा महिना येतो. ज्येष्ठ – आषाढातील धुवांधार पावसाचा वर्षाव संपून श्रावण सरींना प्रारंभ होतो. बालकवी म्हणतात त्याप्रमाणे ‘श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते, सरसर हिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ चा साक्षात्कार घडविणारा असा हा महिना. श्रावणातील धरणी मातेचे रूप, आकाशातील इंद्रधनूचे सौंदर्य, मराठी संस्कृतीतील महत्त्वाचे सण, व्रतवैकल्यांचे पुण्य अशा अनेक दृष्टीने एक चैतन्य निर्माण होते. घरात व घराबाहेर सारेच काही भान हरपून टाकणारे.

श्रावणात धरणीमाता हिरवा शालू नेसून अन्नब्रम्हाच्या पुजेस बसल्यासारखी भासते. सूर्य व ढगांमधील लपाछपी रंगात येते. ऊन – पावसाचा अनोखा खेळ सुरू होतो. सप्तरंगी इंद्रधनुचे तोरण आकाशाला आगळी शोभा आणते.

श्रावणात मराठी संस्कृतीतले सर्वच महत्त्वाचे सण, व्रते येतात. श्रावणी सोमवार, बैलपोळा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, घराघरात चालणारे धार्मिक ग्रंथांचे पठण यातून भाव-भक्तीचा एक वेगळाच दरवळ सर्वत्र जाणवतो. आबाल-वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात आनंदाची अनुभूती निर्माण करणारा असा हा श्रावण, मला खूपच आवडतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

प्रश्न 4.
वसुंधरेचे हिरवेपण जपूया.
उत्तरः
आपली वसुंधरा, तिचे हिरवेपण टिकवणे हे केवळ आपल्याच हातात आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वच्छ, सुंदर पर्यावरण राखणे, पर्यावरणीय बांधिलकीची जाण सदैव मनात ठेवणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वात मोठी भूमिका ही जंगलांची आहे. जंगले, झाडे, झुडपे वाढली पाहिजेत. त्यासाठी वृक्ष / झाडे लावली पाहिजेत. ‘झाडे लावूया, झाडे जगवूया’ ची मोहीम त्यासाठी आवश्यक आहे. झाडांचे योग्यप्रकारे संवर्धन आज आपण केले नाही तर उदयाची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोडीमुळे हवामानात बदल होत आहेत. जागतिक तापमानात वाढ, पर्जन्याचे दिवसेंदिवस घटत चाललेले प्रमाण, दुष्काळाचे संकट, शुद्ध हवेची कमतरता या समस्या निर्माण झाल्या आहेत.

वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी उघड्या डोंगरांवर, ओसाड माळरानांवर देशी झाडांच्या बिया भरपूर उधळल्या पाहिजेत. घनदाट अशा झाडांसाठी कवयित्रीने सुचविलेला उपाय हिरवेपणासाठी खूपच आवश्यक असा आहे. वृक्षारोपणास चालना मिळावी म्हणून वाढदिवस, हळदीकुंकू समारंभ इत्यादींमध्ये रोपे वाटून वृक्षारोपण उपक्रम राबविता येईल.

प्रत्येक शाळेने ‘एक मूल एक झाड’ सारखी दत्तक योजना स्वीकारून त्याची अमंलबजावणी योग्य प्रकारे केल्यास प्रत्येक गाव, परिसरात निश्चितच झाडांची संख्या वाढे वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्वांनी केले पाहिजे. ‘वसुंधरा वाचवा, तगवा आणि टिकवा’ मोहिमेतूनच वसुंधरेचे हिरवेपण अबाधित राहिल.

प्रश्न 5.
संगणकाच्या युगात देखील तुमच्या रोजच्या जीवनात असलेले वृत्तपत्रांचे महत्त्व.
उत्तरः
वत्तपत्र हे जगातल्या. देशातल्या, आजबाजच्या परिसरातील महत्त्वपूर्ण बातम्या, घटना आपल्यापर्यंत पोहचवत असतात. वास्तविक ही जबाबदारी दूरदर्शनवरील इतर वृत्तवाहिन्याही तत्परतेने पार पाडतात. पण बातमीकडे, घटनेकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे याचा अत्यंत संयमित दृष्टिकोन हा वृत्तपत्रांच्या वाचनानेच आपल्याला मिळतो. वाहिन्यांवर फक्त माहिती मिळते. वृत्तपत्र माहितीबरोबर ज्ञानदानाचे कार्यही करतात.

वृत्तपत्र ही माहिती, ज्ञान, मनोरंजन, प्रबोधन अशा विविध विषयांना स्पर्श करतात. प्रत्येकाला आपल्या आवडीचा विषय त्यामुळे समजून घेण्यास मदत होते. वृत्तपत्रात जे संपादकीय लेख असतात ते अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले असतात. त्यासाठी संपादकाने खात्रीपूर्वक ज्ञानस्त्रोत वापरलेले असतात. या लेखांना वाचून आपले वैचारिक अधिष्ठान पक्के होते. सामाजिक घटनांकडे बघण्याची विश्लेषणात्मक दृष्टी विकसित होते. वृत्तपत्रात हलकेफुलके लेख असतात.

व्यक्तिचित्रणात्मक लेख असतात. प्रासंगिक लेख असतात. कधी दुःखद घटनांची माहिती असते. त्यामागची कारणमीमांसा दिलेली असते. हे सर्व वाचून आपली वैचारिकता संपन्न होते. म्हणूनच कितीही बातम्या दूरदर्शनवर बघितल्या तरी लिखित स्वरूपातल्या वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधित आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनी (ब्लॉग) लेखन प्रास्ताविक – संकल्पना व स्वरूप :

ट्विटर, इन्स्टाग्राम सारखेच ‘अनुदिनी’ हे सामाजिक माध्यम आहे. इंग्रजीत त्याला ‘ब्लॉग’ असे म्हणतात. आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले संकेतस्थळ म्हणजे ‘ब्लॉग’ होय.

अनुदिनी सारखाच प्रकार पूर्वी साहित्यात होता. त्याला ‘डायरी लेखन’ या नावाने ओळखले जायचे. आज अनुदिनीच्या माध्यमातून स्वत:चे विचार, एखादया कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र, छायाचित्र, चित्रफीत, श्राव्यफीत यांसारख्या गोष्टी अनुदिनीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतात.

अनुदिनी (ब्लॉग) लेखन अनुदिनीचा इतिहास :

जस्टीन हॉल याने १९९४ मध्ये links.net ही वेबडायरी सुरू केली. आज तिने जनसामान्यांच्या मनाची पकड घेतली आहे.

अनुदिनीची क्षेत्रे :
अनुदिनीचे क्षेत्र व्यापक आहे. वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, वाङ्मयीन, सामूहिक, पर्यटन, शैक्षणिक, राजकीय इ. विविध क्षेत्रांत ‘अनुदिनीचा वापर’ केला जातो.

अनुदिनी लिहिण्यामागची कारणे :
प्रत्येक माणसाला आपले विचार, कल्पना, आपली मानसिक-भावनिक आंदोलने अस्वस्थ करत असतात. हे विचार व्यक्त करण्यासाठी अनुदिनी हे प्रभावी साधन/माध्यम आहे. थोडक्यात स्वत:मधील सर्जनशीलता वाढविणे, अनेकांशी संवाद साधणे, व्यक्तिगत अनुभव सार्वत्रिक करणे, भाषिक कौशल्य सुधारणे, आपले लेखन-विचार-संशोधन यांची सांगड घालणे इत्यादी अनेक कारणांसाठी अनुदिनी लेखन केले जाते.

अनुदिनी विषय निवड :
प्रत्येकाचे आवडीचे विषय भिन्न असतात. ज्या विषयात स्वत:ला गती आहे. त्या विषयाला प्रथम प्राधान्य दयावे. हळूहळू विषयाचा आवाका वाढवत न्यावा. त्यात अधिक सखोलता निर्माण करावी. सरावाने हे हळूहळू जमू लागते.

चांगल्या अनुदिनीची लक्षणे :
आकर्षक विषय, छोटी वाक्ये, सुटसुटीत वाक्यरचना, परिच्छेदांची योग्य रचना, संवादात्मक आणि वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली. विविध दृक-श्राव्य, श्राव्य फिती, चित्रे यांचा वापर. योग्य शब्दमर्यादा, नवीन नवीन विषयांची मांडणी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनीचे प्रकार :

  • वैयक्तिक ब्लॉग : ज्यात व्यक्ती आवडीनुसार लेखन करते.
  • गट ब्लॉग/सहयोगी ब्लॉग : अनेक वेब ब्लॉगर्स एकाच वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात.
  • मायक्रोब्लॉगिंग : वेळ आणि श्रम यांची बचत करण्याकरता याचा वापर केला जातो.
  • कॉर्पोरेट आणि संख्यात्मक ब्लॉग : कर्मचाऱ्यांपर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • एकत्रित ब्लॉग : व्यक्ती किंवा संस्था विशिष्ट हेतूने एकत्र येऊन ब्लॉग निर्माण करतात.
  • विषयानुसार ब्लॉग : यात एखादा विषय धरून मजकूर प्रसिद्ध केला जातो. उदा. आरोग्य, फोटोग्राफी, पर्यटन, बागकाम इ.

अनुदिनी लेखनाचे महत्त्वाचे घटक :

  • ब्लॉग : महाजालावरील नोंद वही.
  • ब्लॉगर : मजकूर लिहिणारी व्यक्ती.
  • ब्लॉगिंग : मजकूर लिहिण्याची प्रक्रिया.
  • ब्लॉगोस्पिअर : ब्लॉग वाचणारा वाचक.
  • ब्लॉग टूल्स : ब्लॉग तयार करण्याची साधने.
  • ब्लॉग पोस्ट : ब्लॉगवरील लिखित नोंद.

अनुदिनी तयार करणे :
www.blogger.com या संकेतस्थळावर ब्लॉग उघडता येतो.

ब्लॉग लेखनाचे महत्त्वाचे घटक :
Post – मजकूर प्रसिद्ध करणे, Status – जगभरातून ब्लॉगला भेट दिलेल्यांची संख्या कळते, Comments – प्रतिक्रिया कळतात, Earning

जाहिराती प्रसिद्ध करून उत्पन्न मिळते, Pages – नवीन पेज जोडून प्रकाशित करण्याची सोय, Layout – रचना ठरवता येते. याशिवाय Theme, Setting, Google drive इ. घटकांचा वापर करून ब्लॉग अधिक आकर्षक करता येतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन

अनुदिनी लेखन करताना पाळायची पथ्येः

लेखन तारतम्याने लिहावे, भाषा सौम्य असावी, कोणाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक धोरणांवर टीका करणारा मजकूर नसावा. विध्वंसक विचार मांडू नयेत. लिहून झाल्यावर सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी. लेखनाची शिस्त पाळावी. आपले लेखन स्वैराचाराकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.3 अनुवाद Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

11th Marathi Digest Chapter 4.3 अनुवाद Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
फरक स्पष्ट करा. (प्रत्येक प्रकाराचे एक उदाहरण अपेक्षित)

(अ) अनुवाद-भाषांतर
उत्तरः
भाषांतर : म्हणजे एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे. उदा. विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित पुस्तकांचे भाषांतर हे जसेच्या तसे केले जाते किंवा सरकारी अधिनियम जसे आहेत तसेच भाषांतरीत केले जातात. पूर्वीच्या काळी ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी बायबलचे मराठीत भाषांतर झाले. दोन भिन्न भाषिक व्यक्ती, समाज एकत्र येतात तेव्हा भाषांतर अपरिहार्य ठरते. अनुवाद : अनुवाद या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमध्ये शोधता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

मूळ धातू ‘वद’ म्हणजे बोलणे ‘अनु’ हा त्याचा उपसर्ग याचा अर्थ ‘मागील’. थोडक्यात आधी कोणी सांगितल्या नंतर सांगणे म्हणजेच श्रीकृष्णाने आधी गीतेत तत्त्वज्ञान सांगितले. तेच तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत सांगितले. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद केला असे म्हटले जाते. थोडक्यात शब्द, संरचना, शैली यांपेक्षा एकूण आशयावर भर देऊन केलेले भाषांतर म्हणजे अनुवाद होय. उदा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या wings of Fire या आत्मचरित्राचा मराठीत ‘अग्निपंख’ या नावाने माधुरी शानबाग यांनी केलेला अनुवाद.

(आ) रूपांतर-स्वैर अनुवाद
उत्तरः
रूपांतर : एखादया वाङ्मयप्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मयप्रकारात नेणे म्हणजे रूपांतरण होय. उदा. नटसम्राट या वि. वा. शिरवाडकर लिखित नाटकावर आधारित मराठीत ‘नटसम्राट’ या नावाने सिनेमा निघाला. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘गमभन’ हे नाटक तसेच ‘शाळा’ हा मराठी चित्रपटही आला. स्वैर अनुवाद : स्वैर अनुवादात मूळ साहित्यकृतीमधील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्यकृतीत बदलले जाते. उदा. विसाव्या शतकातील श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट यांच्या ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं पु. ल. देशपांडे यांनी तीन पैशाचा तमाशा’ हे स्वैर रूपांतर केले आहे.

प्रश्न 2.
अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तर :
भारतात अनेक प्रांत, अनेक भाषा एकत्र नांदत असल्यामुळे इथे नेहमीच प्रांतिक अनुवाद होत असतात याशिवाय जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे महत्त्व वाढले आहे. विविध विषयांची अद्ययावत माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. इंग्रजीतील हे ज्ञान विविध भाषांमध्ये जाण्याची प्रक्रिया निरंतर घडत असते. म्हणूनच अनुवादकांना आजच्या युगात अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्रात अनुवादासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय निर्माण झालेले आहे. त्यासाठी भाषा सल्लागार मंडळ अस्तित्वात आहे. पूर्वी अनुवाद हे साहित्याचे केले जात. आज तंत्रज्ञान विज्ञान इ. वेगवेगळ्या विषयांचे अनुवाद होत आहेत.

रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट या माध्यमांत अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध ओत. अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्या आपले कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषांमध्ये घेऊन येण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना सातत्याने अनुवादकांची गरज लागते. बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर पसरलेल्या असतात. त्यांच्या उत्पादनांना, सेवांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना स्थानिक भाषेत जाहिराती दयाव्या लागतात. यासाठी अनुवादकांची गरज असते. शिक्षण क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यातील ज्ञान विविध लोकांपर्यंत विविध भाषांमध्ये पोहोचवण्याची गरज असते. यासाठीही अनुवादकांची गरज असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

प्रश्न 3.
अनुवाद क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दांत नमूद करा.
उत्तर :
अनुवादामुळे सामाजिक, वैचारिक जडण घडण होते. त्यामुळे लक्ष्य भाषा संपन्न होतेच शिवाय नवीन वाङ्मयीन प्रवाह निर्माण होतात. उदा. मराठी दलित साहित्याच्या प्रेरणेमुळे हे गुजराथी दलित साहित्य निर्माण झाले. म्हणूनच ज्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा येतात त्यांना अनुवादाच्या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे.

भारतातील संपूर्ण भाषांतर कार्यामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतेही साहित्य अखिल भारतीय पातळीवर न्यायचे असेल तर त्याचे हिंदी भाषांतर होणे गरजेचे असते. केंद्रशासनाने नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी अशी मंडळे त्यासाठी निर्माण केली आहेत. बिदागी, पुरस्कार अशा स्वरूपात अनुवाद कार्याला उत्तेजन दिले जाते. महाराष्ट्रात ‘आंतर-भारती’ या सानेगुरुजी प्रणीत संस्थेमार्फत अनुवाद भाषांतर कार्याला गती दिली जाते.

विविध सिनेमे, विविध भाषांत डब होऊन त्या त्या प्रांतांत दाखवले जातात. परदेशातील काटुन फिल्म इथल्या प्रादेशिक भाषेत डब करून दाखवल्या जातात. हे करण्यासाठी मूळ कलाकृती समजून घेऊन त्याचे अपेक्षित असणाऱ्या भाषेत अनुवाद करण्यासाठी तज्ज्ञ माणसांची गरज लागते. जाहिरातीच्या वेगवेगळ्या प्रांतांत दाखवताना जाहिरात तीच दाखवून भाषा बदलली जाते. हे करण्यासाठी उत्तम अनुवादकांची आवश्यकता असते. परदेशी भाषा तर येत असेल तर दुभाषक म्हणून काम करता येते. भारताचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटले तेव्हा त्यांच्या हिंदी भाषणाचे भाषांतर अनुवाद करून ते इंग्रजीत ऐकवले गेले. हे आपण पाहिले. दुतावासात अशा परदेशी भाषा येणाऱ्या लोकांना प्रचंड मागणी आहे.

प्रश्न 4.
‘अनुवाद करणे ही सर्जनशील कृती आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
मर्यादित अर्थाने का होईना अनुवाद ही एक प्रकारची नवनिर्मितीच असते. अनुवादक तिला एक आपलेपण देतो. मूळ कलाकृतीच्या अनुरोधाने तो वाचकाला जिवंत, समृद्ध सौंदर्यानुभवाचा प्रत्यय देतो. तो जर आंधळेपणाने मुळाशी जखडून राहिला तर अनुवाद जिवंत वाटणारच नाही. त्यात कोरडेपणा येईल. अनुवाद करताना अनुवादकाला भाषेचे बंधन पाळावे लागते. उदा. अरेबियन नाईटचे रूपांतर, भाषांतर करायचे किंवा अनुवाद करायचे तर आजची भाषा वापरणे योग्य ठरेल याचे भान अनुवादकाला सांभाळावे लागते. कवितेचा अनुवाद करताना तर फार काळजी घ्यावी लागते.

कारण कवितेतील शब्दांना नादांची लय असते. विनोदी साहित्य अनुवादित करताना मूळ भाषेतील गंमत निघून जाणार नाही हे पाहावे लागते. थोडक्यात अनुवादक दोन संस्कृतींना जोडतो. अनुवाद म्हणजे केवळ तांत्रिक रूपांतर नाही तर ती सर्जनशील कृती असते. हे कौशल्याचे काम आहे. हे कौशल्य अनुवादकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. कोणते साहित्य अनुवादासाठी निवडावे, त्याचे सामाजिक महत्त्व काय याचे भान अनुवादकाला बाळगावे लागते. विविध साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये त्याला माहीत असावी लागतात.

भाषिक संदर्भ, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ त्याला समजून घ्यावे लागतात. मूळ साहित्यांचे बारकाईने अवलोकन करावे लागते. थोडक्यात अनुवाद असा झाला पाहिजे की मूळ कलाकृती कोणती आणि अनुवादित कलाकृती कोणती याचा संभ्रम निर्माण झाला पाहिजे. हे सगळे भान सांभाळणे ही तारेवरची कसरतच आहे. म्हणूनच अनुवाद करणे म्हणजे सर्जनशील कृती करणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

प्रश्न 5.
अनुवाद करताना पाळायची पथ्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
अनुवादकाची वृत्ती ही संशोधकाप्रमाणे असावी. खोलात जाऊन शोध घेतला नाही तर अनुवादात चूक होण्याची शक्यता असते. अनुवादक एकाच वेळी चांगला वाचक तर हवाच पण तो अभ्यासकही असायला हवा. जागतिक घडामोडींचे त्याला भान हवे. अनवाद करणं हे नाटकात काम करण्यासारखे आहे. दसऱ्याचे शब्द नट जसा दकश्राव्य माध्यमातन इतरांपर्यंत पोहोचवतो तसंच अनवादात दसऱ्याचे विचार. त्याचे साहित्यिक विश्व आपल्यापर्यंत आपल्या भाषेत पोहोचवतो. त्याने खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अनुवादासाठी निवडलेली कलाकृती ही उत्कृष्ट व उपयुक्त असावी. मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद केला पाहिजे. वर्णन विवेचन यात अचूकता व स्पष्टता असावी. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता त्याने कलाकृतीला न्याय दिला पाहिजे. स्वत:चे विचार त्याने अनुवाद करताना घुसडता कामा नयेत. मूळ भाषा व अनुवाद होणारी भाषा याचे त्याला ज्ञान असावे. वाचकांना समृद्ध करणारा अनुभव त्याने दिले पाहिजे. अनुवाद करताना मूळ नावांमध्ये बदल करू नये. कलाकृतीचे स्वरूप पाहून स्वैर अनुवाद असावा की शब्दशः अनुवाद असावा हे त्याने ठरवून घेणे गरजेचे असते.

प्रश्न 6.
‘अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारते’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
एका भाषेतील कलाकृती ही दुसऱ्या भाषेत येते त्याला आपण अनुवाद म्हणतो. पण ही वाटते तेवढी सोपी-सरळ प्रक्रिया नाही. त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव होतो. विशेषतः भौगोलिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असतील तर अनुवाद करणे हे एक आव्हान ठरते. इतर प्रदेशातील संस्कृती, रूढी-परंपरा याची या निमित्ताने वाचकांना ओळख होते. त्याचे भावविश्व व सांस्कृतिक विश्व समृद्ध होते. निग्रो साहित्याची जेव्हा जगाला ओळख झाली. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन वंचित समाजाचे नवीन साहित्य उदयास आले. मराठीत निग्रो साहित्याच्या प्रभावातून दलित साहित्य जन्माला आले आणि भारतीय सांस्कृतिक, सामाजिक वास्तवाचे जगाला दर्शन झाले. त्यातूनच विषमतेच्या विरोधात लढे उभारले गेले. सामाजिक समतेच्या लढ्याला यश आले.

आपल्या भोवतालचा समाज, त्यातील मर्यादित विश्व आणि प्रथा, परंपरा यांच्या पगड्यातून अनुवादित साहित्य आपल्याला बाहेर काढते. ‘एक होता कार्व्हर’ हा वीणा गव्हाणकर यांनी केलेला अनुवाद वाचकालाही अंतर्मुख करतो तर अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’च्या ‘अग्निपंख’ या माधुरी शानबाग यांनी केलेल्या अनुवादामुळे आपल्यालाही भारतीय अवकाश संशोधनाची सखोल माहिती मिळते. आपल्याही ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या जातात. या प्रक्रियेमुळे जगभरातील माणसे, त्यांची संस्कृती, रूढी, परंपरा, विचार, साहित्य, तंत्रज्ञान, समाज व्यवस्था याचा एकमेकांना परिचय होतो.

महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी अनुवाद ग्रंथसूची’नुसार १९९८ पर्यंत एकूण ५९७४ पुस्तके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषेतून मराठीत अनुवादित झाली आहेत. हीच प्रक्रिया उलटही होते आहे. मराठीतून इंग्रजीत व इतर भाषेत साहित्य अनुवादित होत आहे. उदा. डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मचरित्राचे १५ भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यामुळे भारतीय जीवनाची ओळख परदेशी वाचकांना झाली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

प्रश्न 7.
बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याबाबतची अनुवादकाची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
अनुवाद करताना मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहणे गरजेचे असते. त्यात स्वत:चे काही घालायचे नाही, काही वगळायचे नाही, बदल करायचे नाहीत आणि तरीही ते शब्दश: भाषांतर असता कामा नये ही तारेवरची कसरत अनुवादकाला करायची असते. यासाठी त्याला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याचा तारतम्याने विचार करावा लागतो.

दैनंदिन जीवनव्यवहारात आपण प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेचाच अधिक प्रमाणात वापर करतो. प्रमाणभाषेचा वापर शिक्षण, ग्रंथलेखन, शासनव्यवहार यांसाठी होतो. प्रमाणभाषा औपचारिक असते तर बोलीभाषा अनौपचारिक असते. प्रमाणभाषा तांत्रिकतेकडे झुकते तर बोली भाषेला त्या त्या मातीचा गंध असतो. त्यात जिवंतपणा असतो. दोन्हीपैकी कोणती भाषा निवडायची याचा अनुवादकाला गांभीर्याने विचार करावा लागतो. उदा. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद असेल आणि प्रमाणभाषा वापरली तर त्यातील गंमत निघून जाते. म्हणूनच अनुवादकाला भिन्न भिन्न बोली, त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक संचित यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

प्रश्न 8.
(अ) खालील परिच्छेदाचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा.
मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखनसाहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला.
उत्तर :
मूळ लेख : मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला.

हिंदी : मोहन आज सुबह जल्दी उठा। उसने दाँत साफ किये, हाँथ, पैर, मुँह धोया और वह पढ़ाई करने बैठा। वह ‘आज’ खेलने नहीं गया। दस बजे उसने खाना खाया। लेखन साहित्य लेकर वह परीक्षा देने स्कूल पहुँच गया।

इंग्रजी : Mohan woke up early today. Brushed his teeth, had a bath, got ready and sat to study. Due to his exam, he did not go to play today. He had his lunch at 10.00 am. He then took his study material and went to school for the exam.

(आ) खालील वाक्यांचा मराठी व इंग्रजीत अनुवाद करा.

प्रश्न 1.
किसी नदी में एक भेड़िया ऊपर की तरफ पानी पी रहा था।
उत्तर :
मराठी : एका नदीवर एक लांडगा नदीच्या वरच्या बाजूला पाणी पीत होता.
इंग्रजी : Besides a river, on the upper edge a wolf was drinking water.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

प्रश्न 2.
मेरे मित्र की चिट्ठी कई दिनों बाद आयी।
उत्तर :
मराठी : खूप दिवसांनी माझ्या मित्राचे पत्र आले.
इंग्रजी : I received my friends letter after so many days.

प्रश्न 3.
राम के पिता मोहन यहाँ आएँ है।
उत्तर :
मराठी : रामचे वडील मोहन इथे आले आहेत.
इंग्रजी : Ram’s father, Mohan came here.

प्रकल्प.

प्रश्न 1.
मराठीमधून हिंदी भाषेत अथवा इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या दहा साहित्यकृतींची माहिती मिळवा आणि त्याबाबत एक टिपण तयार करा.
उत्तर :

मराठी इंग्रजी
आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव Untouchabile – डॉ. नरेंद्र जाधव
बलुतं – दया पवार BALUTA – जरी पिंटो
शांतता कोर्ट चालू आहे – विजय तेंडुलकर Silence! The court is in session – प्रिया आडारकर
मी वाय. सी. पवार – शब्दांकन – चंद्रकांत घाणेकर Y.C. Rela Time Cop – प्रशांत तळणीकर
हिंदी मराठी
निवडक कविता – गुलज़ार एक स्वप्न पुन्हा पुन्हा – विजय पाडळकर
अमृता प्रीतम की कहानियाँ रिकामा कॅनव्हास – डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

प्रश्न 2.
हिंदी आणि इंग्रजीतून मराठी भाषेत अनुवादित झालेल्या प्रत्येकी दहा साहित्यकृतींची माहिती मिळवा आणि त्याबाबत एक टिपण तयार करा.
उत्तर :

मराठी हिंदी
आमचा बाप अन् आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव असीम है आसमाँ – कमलाकर सोनटक्के
ययाती – वि. स. खांडेकर ययाती – मोरेश्वर तपस्वी
घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर घाशीराम कोतवाल – वसंत देव
क्रौंच वध – वि. स. खांडेकर क्रौंचवध – मोरेश्वर तपस्वी
महानायक – विश्वास पाटील महानायक – डॉ. रामजी तिवारी, रमेशचंद्र तिवारी
व्हायरस – जयंत नारळीकर वाईरस – जयंत नारळीकर
विंदांच्या कविता – विंदा करंदीकर यह जनता अमर हैं। – डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
इंग्रजी मराठी
वाईज आदरवाईज – सूधा मूर्ती वाईज आदरवाईज – लीना सोहोनी
सुटेबल बॉय – विक्रम सेठ शुभमंगल – अरुण साधू
इमॉर्टल ऑफ मेलुहा – अमिष त्रिपाठी मेलुहाचे मृत्यूंजय – डॉ. मीना शेटे
थ्री पेनी ऑपेरा – ब्रेश्ट तीन पैशांचा तमाशा – पु. ल. देशपांडे
ओल्ड मॅन अॅण्ड सी – हेमिंग्वे एका कोळीयाने – पु. ल. देशपांडे
द बुक थीफ – मार्कुस झुसँक पुस्तक चोर – विनता कुलकर्णी
फाई पॉईंट समवन – चेतन भगत फाई पॉईंट समवन – सुप्रिया वकील

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

साहित्याचे माध्यम भाषा आहे. साहित्यातून ती भाषा, तो समाज यांचे यथार्थ दर्शन घडत असते. म्हणूनच प्रत्येक भाषेत अन्य भाषेतील साहित्य येणे गरजेचे असते. परकीय शब्द भाषेतील अभिव्यक्ती क्षमता वाढवितात. त्यातून भाषा अधिक समृद्ध होते. परकीय भाषेतील साहित्य आपल्या भाषेला परिपुष्ट करते.

स्वत:चा देश, स्वत:ची भाषा, संस्कृती याचा प्रत्येकाला अभिमान असणे साहजिकच आहे. पण त्याचबरोबर स्वत:चा व संस्कृतीचा भाषिक विकास साधण्यासाठी विदेशी भाषेतील श्रीमंती नाकारून चालणार नाही. उलट इतर भाषेतील साहित्य स्वभाषेत येते तेव्हा आपली भाषा अधिक समृद्ध होते.

आशय, शैली, अनुभवांची विविधता अशा अंगाने भाषेत वेगळेपण येते. म्हणून अनुवाद प्रक्रिया गरजेची आहे. कारण अनुवादामुळे एखादया लेखकाचे लेखन, स्थल-काल-संस्कृती या सगळ्या मर्यादा ओलांडून जागतिक वाचकांपर्यंत पोहोचते.

11th Marathi Book Answers Chapter 4.3 अनुवाद Additional Important Questions and Answers

कृती : २ आकलन कृती
खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

कृती-१. कारण लिहा.

प्रश्न 1.
अनुवादासाठी गुगल ट्रान्सलेटर वापरणे नेहमीच हितकारक ठरत नाही.
कारण → [ ]
उत्तरः
कारण गुगल ट्रान्सलेटर शब्दश: भाषांतर करते. त्यात नेमकेपणा आणि अचूकता असेलच याची खात्री देता येत नाही. संगणकाद्वारे शब्दानुवाद यथायोग्य होत असला तरी भावानुवाद योग्य प्रकारे होऊ शकेलच असे नाही. कारण शेवटी माणूस व यंत्र यात मूलभूत भेद राहणारच.

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद 2

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद 4

स्वमत :

प्रश्न 1.
आधुनिक काळातील दुभाषकाचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तरः
‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीप्रमाणे आज सगळे जग जवळ आले आहे. घरी बसल्याबसल्यासुद्धा संगणकाच्या माध्यमातून, मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण जगभरात संपर्क साधू शकतो. परंतु हे खरे असले तरी जगाच्या पाठीवर जिथे आपण संपर्क साधणार आहोत त्या प्रदेशातील लोकांना आपली भाषा समजेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान असणारे दुभाषक यांना प्रचंड मागणी आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

जागतिकीकरणामुळे व्यापारानिमित्त वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देशात सतत प्रवास करत असतात. कधी कधी व्यापार मेळावे भरवले जातात. ज्यात जगभरातील लोक सहभागी होतात. यांमधील चर्चामध्ये दुभाषकांची गरज असते. काही वेळा अभ्याससत्रे, प्रशिक्षणसत्रे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा यांचे आयोजन केले जाते. यांमध्ये बुद्धीजीवी वर्ग, राजकारणी लोक विशेषत: मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी दुभाषकांची गरज असते. पर्यटन सेवा, जनसंपर्क स्थाने इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या भाषेतून सतत सूचना दयाव्या लागतात.

या सूचनांचे सुलभ भाषांतर वा अनुवाद करणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींची बैठक होते, त्यावेळी किंवा G २० सारख्या परिषदांचे आयोजन केले जाते तेव्हा वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा तेवढ्याच महत्त्वाच्या व्यक्तींचा त्यात सहभाग असतो. अशावेळी त्या त्या देशाची भाषा जाणून त्याचे शीघ्र इंग्रजी भाषांतर करणे वा अनुवाद करणे अत्यंत गरजेचे ठरते. सिनेमा, दूरदर्शन मालिका, वृत्तपत्र या सगळ्याच ठिकाणी भाषांतरकार व अनुवादक यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते.

अनुवादाच्या सरावासाठी काही उतारे :

उतारा क्र. (१)

A man with a small salary is very likely to get into difficulties unless he learns to “budget” for his monthly spending. A fixed amount should be set aside under each heading – rent, food, clothing, insurance, school-fees and so on. The ideal budget would also include a fixed sum, no matter how small to be set apart each month as “saving”. Indeed this better be paid into the ‘Post office or the Bank, and not kept at home. Until all this has been done, nothing should be spent on luxuries. Only by such a method can a man live within his income & make both the ends meet.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

मराठी अनुवाद –

कमी पगार असणारा माणूस मासिक खर्चाचे अंदाजपत्रक करायला शिकला नाही तर अडचणीत सापडण्याची फार शक्यता असते. घरभाडे, अन्नधान्य, कपडेलत्ते, आयुर्विमा, शाळेची फी याप्रमाणे प्रत्येक बाबीवर ठराविक रक्कम काढून ठेवायला हवी. आदर्श अंदाजपत्रकात दरमहा शिल्लक म्हणून बाजूला ठेवायच्या रकमेचा – मग ती अल्पस्वल्प असो – समावेश असायला हवा. खरे तर ती रक्कम घरी ठेवता कामा नये. पोस्टात किंवा बँकेतच टाकायला हवी. या सर्व गोष्टी होईपर्यंत चैनीवर त्याने काहीही खर्च करू नये. अशाच पद्धतीने माणूस आपल्या ऐपतीत राहू शकतो आणि खर्चाची तोंडमिळवणी करू शकतो.

उतारा क्र. (२)

We sometimes think it should be very nice to have no work to do. How we envy rich people who have not to work for their living? They can do just what the please all the year round! Yet, when we feel like this, we make a mistake. Sometimes rich people are not happy we think there are because they are tired of having nothing to do. Most of us are happy when we have regular work to do for our living; especially if the work is that we like to do.

मराठी अनुवाद –

आपण कधी कधी असा विचार करतो की, आपल्याला काहीच काम करायला लागलं नसतं तर फार बरं झालं असतं. जगण्यासाठी ज्यांना काम करावं लागत नाही अशा श्रीमंत लोकांचा आपण हेवा करतो? वर्षभरात जे करायचं आहे तेवढं ते काम करतातच तरी सुद्धा आपली त्यांच्याविषयी चुकीची समजूत असते. पुष्कळदा श्रीमंत लोक आपण समजतो तेवढे सुखी नसतात कारण काहीच करायचं नसल्याने ते बऱ्याचदा त्रासलेले असतात. आपल्यापैकी बरेच जण जगण्यासाठी नियमितपणे काम करतात, असे काम की जे मुख्यत्वे आपल्या आवडीचे असते म्हणूनच जीवनात ते सुखी असतात.

उतारा क्र. (३)

Many visitors come and admire me, and some of them take photographs of me. When I roar, how they start back in fear, even though iron bars are between! It is a lazy and idle life, in which I walk about a little and then dream the time away. At night I become restless when I feel the jungle smells come down on the wind. If the keeper would only leave the door unlocked one day, I would soon find my way back to the free jungle where I was born.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

मराठी अनुवाद –

खूप प्रेक्षक येतात व माझी स्तुती करतात आणि त्यांच्यापैकी काहीजण माझी छायाचित्रेही घेतात. मी डरकाळी फोडतो तेव्हा मध्ये लोखंडी गज असूनही ते भीतीने कसे मागे सरकतात. पिंजऱ्यामध्ये मला फारच थोडे हिंडायला मिळते आणि बराच वेळ मनोराज्यात घालवावा लागतो असे हे आळसावलेले व निरुपयोगी आयुष्य आहे. रात्री वाऱ्यावर वाहत येणाऱ्या जंगलाच्या गंधाने मी बेचैन होतो. पहारेकऱ्याने एखादे दिवशी पिंजऱ्याचे दार उघडे ठेवले तरी मला वाटते की, जिथे मी जन्मलो त्या मुक्त जंगलाचा मार्ग मी लगेच शोधेन.

उतारा क्र. (४)

कोई विदेशी जो भारत से बिलकुल अपरिचित हो, एक छोर से दूसरे छोर तक सफर करे तो उसको इस देश में इतनी विभिन्नताएँ देखने में आएँगी कि वह कह उठेगा कि यह एक देश नहीं, बल्कि कई देशों का एक समूह है, जो एक दूसरे से बहुत बातों में और विशेष करके ऐसी बातों में, जो आसानी से आँखों के सामने आती हैं बिलकुल भिन्न है। प्राकृतिक विभिन्नताएँ भी इतनी और इतने प्रकारों की और इतनी गहरी नजर आएँगी, जो किसी भी महाद्वीप के अंदर ही नजर आ सकती है। हिमालय की बर्फी से ढकी पहाड़ियाँ एक छोर मिलेंगी और जैसे-जैसे दक्खिन की ओर बढ़ेगा गंगा, यमुना, ब्रम्हपुत्र से प्लावित समतलोंको छोड़कर फिर विंध्य, अरवली, सतपुडा, सह्याद्रि, नीलगिरि की श्रेणियों के बीच समतल रंग-बिरंगे हिस्से देखने में आएँगे। पश्चिम से पूरब तक जाने में भी उसे इसी प्रकार की विभिन्नताएँ देखने को मिलेगी। (डॉ. राजेंद्रप्रसाद : साहित्य, शिक्षा और संस्कृति)

मराठी अनुवाद –

भारताबद्दल कसल्याही प्रकारची माहिती नसणारी, दुसऱ्या देशातील एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर त्या व्यक्तीने प्रवासाला सुरुवात केली तर या देशातील ठिकठिकाणाचे वेगळेपण पाहून तो नक्कीच उत्स्फूर्तपणे बोलेल की, भारत हा एकसंघ असा देश नाही. अनेक छोट्या छोट्या देशांचा तो एक विशाल असा समूहच आहे. भारतातील प्रत्येक भागात खूप सारे वेगळेपण आहे. विशेष म्हणजे प्रत्येक भागातील हा वेगळेपणा सहजपणे डोळ्यांना दिसून येतो. अनेक लहान-सहान गोष्टींमध्ये हा वेगळेपणा जाणवतो.

भारताच्या निरनिराळ्या भागातील प्राकृतिक वेगळेपण व त्याचे विविध प्रकार या महाद्वीपाच्या अंतर्गत भागात ठळकपणे दृष्टीस पडतात. उत्तरेकडील एका टोकास असणारी हिमालयीन पर्वतरांग बर्फाच्छादित अशी आहे. उत्तरेकडच्या या टोकाकडून दक्षिणेकडे जाताना प्रथम गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा नदयांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी भाग लागतो. यानंतर विंध्य, अरवली, सातपुडा, सहयाद्रि, निलगिरि पर्वतरांगांच्यामध्ये काही ठिकाणी सपाट तर काही ठिकाणी वेगवेगळ्या रंगढंगाचा भाग दृष्टीस पडतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाही अशाच प्रकारचा वेगळेपणा आपल्या दृष्टीस पडतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

उतारा क्र. (५)

यहाँ पर मुख्य-मुख्य भाषाएँ भी कई प्रचलित है और बोलियों की तो कोई गिनती ही नहीं क्योंकि यहाँ एक कहावत मशहूर है, “कोस-कोस पर बदले पानी, चार कोस पर बानी’। भिन्न-भिन्न धर्मों के माननेवाले भी जो सारी दुनिया के सभी देशों में बसे हुए हैं, यहाँ भी थोडी-बहुत संख्या में पाए जाते है। और जिस तरह यहाँ की बोलियों की गिनती नहीं, उसी तरह यहाँ भिन्न धर्मों के संप्रदाय की गिनती आसान नहीं। इन विभिन्नताओं को देखकर अगर अपरिचित आदमी घबराकर कह उठे कि यह एक देश नहीं, अनेक देशों का एक समूह है।

मराठी अनुवाद –

या ठिकाणी वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मुख्य भाषा अनेक आहेत आणि त्या भाषेच्या असंख्य बोलीभाषाही रूढ आहेत, कारण इथे एक म्हण प्रसिद्ध आहे, ती म्हणजे “कोसा-कोसांवर पाणी बदलते व चार कोसांवर वाणी (भाषा) बदलते.” जगाच्या निरनिराळ्या भागात राहणारे व आपआपल्या भिन्न-भिन्न धर्माला मानणारे अनेक लोक भारतातही थोड्या अधिक संख्येने प्रत्येक भागात आढळतात. या ठिकाणच्या असंख्य बोलीभाषांप्रमाणे नानाविध धर्मपंथांची मोजदाद करणे अशक्य असे आहे. भारतातील या वेगळेपणाला पाहून एखादा अनोळखी मनुष्य घाबरून म्हणेल की, भारत हा एक देश नाही तर अनेक छोट्या छोट्या देशांचा तो एक समूह आहे.

अनुवाद प्रास्ताविक :

एका भाषेतील मजकूर अगदी नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद या प्रक्रियेत ज्या भाषेतून मजकूर आणायचा असतो त्याला उगम भाषा किंवा ‘मूळ भाषा’ किंवा ‘स्रोत भाषा’ म्हणतात तर ज्या भाषेत मजकूर आणला जातो त्याला ‘लक्ष्य भाषा’ म्हणतात.

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची जाण असणे गरजेचे असते. केवळ साहित्याचे नव्हे तर व्याकरणाचे ज्ञानदेखील त्याला असावे लागते. तरच ती भाषा बोलणाऱ्याच्या संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा त्याला समजू शकतात. या सर्वांबरोबर त्याच्याकडे सृजनात्मकता असायला हवी तरच अनुवादित साहित्य रसपूर्ण होईल.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

अनुवाद म्हणजे केवळ ललित साहित्यकृतीचा अनुवाद नाही. हे क्षेत्र विस्तृत आहे. भारतात अनेक प्रांत, अनेक भाषा एकत्र नांदत असल्यामुळे इथे नेहमीच प्रांतिक अनुवाद होत असतात. जागतिकीकरणामुळे इंग्रजीचेही महत्त्व वाढले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील ज्ञान वेगवेगळ्या भाषेत जाण्याची प्रक्रिया निरंतर घडत असते. म्हणूनच अनुवादकांना आजच्या युगात अत्यंत महत्त्व आहे.

अनुवाद या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेत शोधता येते. मूळ धातू ‘वद’ म्हणजे बोलणे व ‘अनु’ हा उपसर्ग म्हणजे ‘मागील’ किंवा ‘मागाहून सांगितलेले’.

इंग्रजीत याला translation म्हणत असले तरी प्रत्यक्षात ही क्रिया खूप विस्तृत आहे. सुदैवाने मराठीत भाषांतर, रूपांतर, अनुवाद, स्वैर अनुवाद अशा विविध संज्ञा उपलब्ध आहेत त्यात सूक्ष्म भेद आहेत.

आज विज्ञान-तंत्रज्ञान, उदयोग विश्व, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट, जाहिरातक्षेत्र या माध्यमांत अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

  1. भाषांतर : मूळ मजकुरातील शब्द, वाक्यरचना जशीच्या तशी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात नेमकेपणा, काटेकोरपणा असतो. भाषांतरकार मूळ मजकुराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. उदा. विविध प्रकारची सामाजिक शास्त्रे, विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित साहित्य, सरकारी अधिनियम इ.
  2. अनुवाद : यामध्ये शब्द, शैली, संरचना यांपेक्षा आशयाला महत्त्व दिले जाते हे एक प्रकारचे मुक्त भाषांतरच असते. यात अनुवादकाच्या स्वत:च्या शैलीची छाप दिसून येते. उदा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या Wings of fire चा माधुरी शानबाग यांनी ‘अग्निपंख’ या नावाने केलेला अनुवाद.
  3. रूपांतर : यात मूळ कलाकृतीचे फक्त बीज घेतले जाते आणि नवीन कलाकृती निर्माण केली जाते. मूळ पुस्तकातील सांस्कृतिक वातावरण, शैली यात आमूलाग्र बदल केला जातो. रूपांतरकार शैलीचे पूर्ण स्वातंत्र्य घेतो. या इंग्रजी जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मेलियन’ या इंग्रजी नाट्याचा भावानुवाद पु. ल. देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’ या नावाने केला आहे.
  4. स्वैर अनुवाद : मूळ कथा वस्तूला धक्का न लावता स्वातंत्र्य घेऊन स्वैर अनुवाद केला जातो. वाचकांना पचेल-रुचेल अशा शैलीत बदल केला जातो. उदा. रविंद्रनाथ टागोर यांच्या मूळ बंगाली कवितेचा शामला कुलकर्णी यांनी केलेला ‘जाता अस्ताला’ हा स्वैर अनुवाद आहे.

अनुवादाचा व्यासंग : अनुवादक, भाषांतरकार, रूपांतरकार यांना सर्वसाधारपणे ‘अनुवादक’ याच नावाने संबोधले जाते. अनुवाद करणे हे कौशल्याचे काम आहे. अनुवादासाठी निवडलेली साहित्यकृती जितकी लोकप्रिय व उत्कृष्ट तेवढी अनुवादकाची जबाबदारी वाढते. त्याला प्रमाणभाषा, बोली भाषा या दोन्हींचे ज्ञान असावे लागते. परभाषेतील शब्द त्या शब्दांमागचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ, शब्दाच्या अर्थच्छटा वगैरे गोष्टींचे ज्ञान अनुवादकाला असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीला पर्यायी शब्द मिळतोच असे नाही. मग त्या शब्दाच्या जवळ जाऊ शकतील अशा अर्थ छटेचे शब्द वापरणे योग्य ठरते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद

अनुवादकाचे स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा या दोन्हीवर प्रभुत्व असायला हवे. त्याचे वाचन उत्तम असावे, विविध शब्दकोष, विश्वकोष, व्युत्पत्ती कोष वापरण्याचे त्याला ज्ञान असावे. विविध बोली, प्रमाण भाषा त्या त्या भाषेतील सांस्कृतिक संचित, त्या प्रदेशाचा इतिहास इत्यादीची जाण असणे गरजेचे आहे.

अनुवाद करताना पाळावयाची पथ्ये : अनुवादामागे निवडलेली कलाकृती उत्कृष्ट आणि उपयुक्त असावी. त्याने मूळ कलाकृतीला न्याय दयावा. स्वत:चे विचार कलाकृतीवर लादू नयेत. अनुवाद वाचकांना समृद्ध करणारा असावा. पूर्वग्रह डोक्यात ठेऊन अनुवाद करू नये.

अनुवादात भाषेचे महत्त्व : अनुवादासाठी भाषा वापरताना प्रमाणभाषा वापरायची की बोलीभाषा याचा निर्णय घ्यावा लागतो. उदा. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करताना प्रमाणभाषेचा वापर करणे अनुचित ठरेल.

मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्रे : वृत्तपत्रे, अल्प प्रसारमाध्यमे, न्यायालये, इतर सरकारी संस्था तसेच रेडिओ, चित्रपट, जाहिरात क्षेत्र या ठिकाणी अनुवादकांची गरज असते. त्याचबरोबर वैदयकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, कायदयाचे क्षेत्र, पर्यटन सेवा इ. अनेक ठिकाणी अनुवादकांना प्रचंड मागणी आहे.

मौखिक अनुवादाची कार्यक्षेत्रे : आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे वा परिषद किंवा राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तींची भेट इत्यादी ठिकाणी दुभाषक गरजेचा ठरतो. त्याचबरोबर जनसंपर्क स्थाने, पर्यटन सेवा, समूह दूरभाष, समूह संबोधन, अनुवाद या सर्वच ठिकाणी अनुवादकांची गरज असते. गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून केलेले अनुवाद अचूक असतीलच याची खात्री देता येत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.2 मुद्रितशोधन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

11th Marathi Digest Chapter 4.2 मुद्रितशोधन Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
मुद्रितशोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रितशोधक. कोणतेही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे आवश्यक असते. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लेखकाबरोबरच ते लेखन निर्दोष करण्यासाठी मुद्रिकशोधक हा घटक महत्त्वाचा असतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. आज वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थाचे अहवाल, स्मरणिका, शुभेच्छा पत्रे, इत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात काळानुसार वाढच होणार आहे. ही वाढ समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.

कोणत्याही प्रकारच्या लेखनाचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन वाचनीय व निर्दोष होणे, यासाठी मुद्रितशोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रितशोधक व्यावसायिक दृष्टीने प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगातदेखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

मुद्रितशोधन ही एक कला असून ते एक शास्त्रही आहे तसेच तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रितशोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो.

प्रश्न 2.
मुद्रितशोधनासाठी लागणारी कौशल्ये सविस्तर विशद करा.
उत्तर :
मुद्रितशोधन म्हणजे लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखनातील दोष काढणे. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी दूर करण्याचे मुद्रितशोधकाचे काम असते. त्यासाठी लागणारी कौशल्ये पुढीलप्रमाणे होत.

  • मुद्रितशोधकाला भाषेची उत्तम जाण हवी.
  • केवळ प्रमाणभाषेनुरूप व्याकरणाची शुद्धता तपासणे एवढेच काम मुद्रितशोधकाचे नसून लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण तसेच बिनचूक आहे का? त्यातील संदर्भ अचूक व योग्य आहेत का? हे तपासणे सुद्धा आहे.
  • मुद्रितशोधकाला मुद्रणविषयातील तंत्र, दृष्टी व परिपूर्ण ज्ञान असावयास हवे.
  • आपले ज्ञान अदययावत ठेवण्याची आवश्यकता असते.
  • कामावरील निष्ठा, अनेक विषयांसहित मजकुरामधील रुची व जाण असण्याची गरज असते.
  • कामाचा अनुभव हा मुद्रितशोधकाला परिपूर्ण व प्रगल्भ करत असतो.
  • सक्षम मुद्रितशोधकासाठी चिकाटी, अभ्यासातील सातत्य व सराव या गोष्टींची आवश्यकता असते.
  • प्रतिभासंपन्न लेखक व जागरुक प्रकाशक यांच्याप्रमाणे तज्ज्ञ मुद्रितशोधक हा तपश्चर्येने आपली ओळख बनवू शकतो.
  • मुद्रितशोधनासाठी ग्रंथाच्या विषयानुरूप त्या, त्या विषयांचे ज्ञान व भाषेची जाण असणे आवश्यक असते.
  • अनेक विषयांची रुची व समज असण्याचीसुद्धा आवश्यकता असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

प्रश्न 3.
‘मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते’, या विधानाची सत्यता स्पष्ट करा.
उत्तर :
लेखकांकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रितशोधन. वृत्तपत्रे, सप्ताहिके, ग्रंथ, पुस्तके, शुभेच्छपत्रे, दिवाळी अंक अशा विविध साहित्याची वाचक संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्यामध्ये लिहिलेला मजकूर आशयदृष्ट्या व्याकरणदृष्ट्या तसेच वाक्यरचना, त्यांतील संदर्भ, लेखननियमानुसार लेखन अचूक आहे की नाही हे पाहणे फार महत्त्वाचे ठरते.

त्यामुळे मुद्रितशोधकाची जबाबदारीही वाढते कारण मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करू शकते. उदा. ‘सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ या शीर्षकाऐवजी जर ‘कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ असे प्रसिद्ध झाले तर किती गोंधळ होऊ शकतो हे सांगण्याची गरज नाही. एखादया वाक्याची पुनरावृत्ती झाली किंवा एखादे वाक्य किंवा परिच्छेद गाळला गेला तरी वाचकाला त्या वाक्यांचे अर्थ लागत नाहीत.

वाचनातील सलगता निघून जाते. ‘दिन’ या शब्दाचा अर्थ दिवस व ‘दीन’ या शब्दाचा अर्थ गरीब. मग कोणताही दिन असेल जसे वर्धापनदिन किंवा पर्यावरण दिन तो ‘दीन’ असा लिहिला गेला तर एका हस्व वेलांटीमुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलून जातो. असे प्रत्येक भाषेत विविध शब्द आहेत ज्यांच्यामधील एका अक्षरामध्ये जरी व्याकरणदृष्ट्या चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊन गंभीर परिस्थितीतही विनोदनिर्मिती होते आणि हे टाळण्यासाठी मुद्रितशोधनात खूप बारकाईने अचूक दुरुस्त्या करून त्यातील त्रुटी दूर करून लेखन आशयदृष्ट्या शुद्ध करणे गरजेचे ठरते.

प्रश्न 4.
थोडक्यात वर्णन करा.

(a) मुद्रितशोधनाची गरज
उत्तरः
मराठी भाषेत लेखन करतेवेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजकुराच्या लेखनातील शुद्धता तपासणे. लेखनातील व्याकरणाच्या शुद्धतेबरोबरच अचूक संपादन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्याही मजकुरातील आशयाची शुद्धता व ते अचूक असण्याची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरणाच्या दृष्टीने ते लेखन निर्दोष असणे आवश्यक असते. त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते. तसेच लेखनाचे सखोल ज्ञान लेखकाला असतेच असे नाही. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही त्रुटी राहून जातात व लेखनात पुनरुक्तीही होऊ शकते त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

(b) मुद्रितशोधन प्रक्रिया
उत्तरः

  • मूळ लेखन व टंकलिखित मजकुराचे साहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे.
  • पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या असतील तर त्याचे निराकरण दुसऱ्या वाचनात करून किंवा नवीन आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे व आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी अपेक्षित असते.
  • तिसऱ्या वाचनात दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासून मजकूर अंतिम छपाईला जाण्याआधी लेखक व मुद्रितशोधकाने कटाक्षाने वाचन करणे.
  • मुद्रितशोधकाने मजकूर. तपासताना मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा उपयोग करून बाजूला प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष करावी.
    मूळ प्रतीतील वाचन मुद्रितात शोधावे. प्रत्येक विरामचिन्हाचा लक्षपूर्वक विचार करायचा असतो.
  • नंतर लेखक सॉफ्ट कॉपी मुद्रकाकडे पाठवतो. ती योग्य आहे की नाही हे तपासून पुन्हा ती मुद्रक लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित निर्दोष करण्यासाठी पुन्हा ते मुद्रितशोधकाकडे येते. त्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होऊन पुन्हा मुद्रणासाठी पाठविण्यात येते.

प्रश्न 5.
खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 3

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

प्रश्न 6.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 4

प्रश्न 7.
खालील गद्य उताऱ्याचे मुद्रितशोधन करून उतारा पुन्हा लिहा.
रामण अतीषय उत्कृष्ट व्याख्याते होते त्याच व्याख्यान एकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमतत त्यांच भाषण ज्ञान वर्धक असायचच पण अनेक विनोदी आणी किस्से यांनी ते व्याख्यान आपल रंगऊन टाकत ते बोलायला लागले की लोकाला वेळेचं भान च राहत नसे लोकांचे चेरे आनंदं आणि हास्य यांनी फूलुन जा असत असे हे रामन
उत्तरः
मुद्रितशोधन करून उतारा :
रामन अतिशय उत्कृष्ट व्याख्याते होते. त्यांचे व्याख्यान ऐकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमत. त्यांचे भाषण ज्ञानवर्धक असायचेच; पण अनेक विनोदी किस्से यांनी ते आपलं व्याख्यान रंगवून टाकत. ते बोलायला लागले की लोकांना वेळेचं भानच राहत नसे. लोकांचे चेहरे आनंद आणि हास्य यांनी फुलून जात असत, असे हे रामन.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

11th Marathi Book Answers Chapter 4.2 मुद्रितशोधन Additional Important Questions and Answers

खालील कृती करा.

प्रश्न 1.
मुद्रितशोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर लिहा.
उत्तर :
लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे मजकुराची शुद्धता सांभाळणे. त्या मजकुराची आशयशुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाएवढीच मुद्रितशोधकाचीही असते. कोणताही मजकूर वाचताना व्याकरण, वाक्यरचना आणि लेखनानियानुसार लेखन या घटकांचा विचार करून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन निर्दोष करणे म्हणजेच मुद्रितशोधन. भाषेचा दर्जा उत्तम असेल तर एखादा ग्रंथ किंवा पुस्तक परिपूर्ण वाचनीय होते.

त्यासाठी मुद्रितशोधनात व्याकरणाचे महत्त्व अधिक आहे. वाक्यरचना, शब्दांची पुनरावृत्ती होत नाही ना, तसेच त्यातील संदर्भ योग्य व अर्थपूर्ण आहेत का याचबरोबरच नाम, कर्म, कर्ता, विशेषण, क्रियापद यांचा अभ्यासही मुद्रितशोधनासाठी महत्वाचा असतो. छापून आलेला मजकूर हा लेखननियमानुसारच असणार अशी वाचकाची अपेक्षा असते. त्यातील संदर्भ तो प्रमाण मानत असतो. त्यासाठी शब्दांच्या जातीचा योग्य क्रम, योग्य विरामचिन्हांचा वापर ते लेखन निर्दोष करते. त्यासाठी मुद्रितशोधकाचा व्याकरणाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.

कारण मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत की ज्यांना भिन्न अर्थ आहेत. त्याचा वापर वाक्यात कुठे व कसा वापरायचा त्यावर त्याचे अर्थ अवलंबून असतात. उदाहरण दयायचे झाले तर – हार – फुलांचा हार किंवा हार – पराभव, नाद – आवाज किंवा नाद – छंद मग वाक्यात कोणता शब्द अचूक बसतो हे मुद्रितशोधनात पाहण्याची गरज आहे. कारण वाक्यातील त्या शब्दांच्या उपाययोजनावर त्या वाक्याचा अर्थ अवलंबून असतो. त्यासाठी मुद्रितशोधन आणि व्याकरण यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे. त्याचा अभ्यास हा मुद्रितशोधन या शास्त्रात खूप परिणामकारक ठरतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

प्रश्न 2.
संगणकाबरोबर स्पेलचेकर असताना मुद्रितशोधनाची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर :
आजच्या नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रितशोधनाचे काम खूप सोपे झाले असले तरी ते निर्दोष झाले आहे असे म्हणता येणार नाही.

संगणकीय शब्दलेखन तपासण्याचे काम करणारा (स्पेलचेकर) शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे एवढेच तपासतो. उदा. ball हा शब्द boll असा मुद्रितामध्ये type झाला असेल तर ‘0’ च्या जागी तो a ही दुरुस्ती करू शकतो. तसेच एखादया शब्दाला पर्यायी शब्द देखील वापरू शकतो. परंतु तो शब्द त्या वाक्यात योग्य आहे की नाही, त्या शब्दाचा वाक्याच्या अर्थाशी संबंध अचूक आहे का? हे त्याला समजत नाही. ते काम मुद्रितशोधकाचे असते.

एखादया शब्दाला योग्य विशेषण किंवा वाक्याच्या अर्थाला योग्य क्रियापद वापरणे हे मुद्रितशोधकच पाहू शकतो. मजकुरातील एखादा परिच्छेद गाळला गेला, चुकीचे संदर्भ दिले गेले, वाक्याचा क्रम चुकीचा असला तर या गोष्टी स्पेलचेकरच्या लक्षात येत नाहीत. मूळ मजकुरानुसार तपासला जाणारा मजकूर पाहण्याचे काम मुद्रितशोधकाचे असते. स्पेलचेकर हा मुद्रितशोधकाला पर्याय नसून तो मुद्रितशोधकाचा साहाय्यक म्हणून काम करत असतो.

त्यामुळे स्पेलचेकरवर संपूर्णतः अवलंबून राहता येत नाही. त्या मजकुरातील त्रुटी दूर करण्याचे आणि शुद्धतेचे काम मुद्रितशोधकालाच करावे लागते. त्यामुळे संगणकाबरोबर स्पेलचेकर असतानादेखील मुद्रितशोधनाची आवश्यकता असते.

कृती : खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
घटनांचे परिणाम लिहा.
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – …………………………………
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – …………………………………
उत्तर :
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – की राष्ट्र विकसित होते
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते.

प्रश्न 2.
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [ ……………… ]
(२) [ ……………… ]
(३) [ ……………… ]
(४) [ ……………… ]
उत्तर :
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [त्यांची तज्ज्ञता]
(२) [त्या क्षेत्रातील अधिकार]
(३) [सौंदर्यदृष्टी]
(४) [निष्ठा]

भाषा आणि समाज यांचे ………………………………………… अधिक महत्त्वाचे मानतो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९४)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 5
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 6

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 7
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 8

प्रश्न 5.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 9
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 10

प्रश्न 6.
चूक की बरोबर ते लिहा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

(a) भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते नसते.
(b) लेखकांनंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रितशोधक असतो.
(c) मुद्रितशोधन ही कला असून ते एक शास्त्र आहे.
उत्तर :
(a) चूक
(b) बरोबर
(c) बरोबर

प्रश्न 7.
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) [ ]
(b) [ ]
उत्तर :
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) मॅजेस्टिक प्रकाशन
(b) ग्रंथाली प्रकाशन

प्रश्न 8.
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) …………………
(b) …………………
उत्तर :
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) पु. ल. देशपांडे
(b) कुसुमाग्रज / वि. वा. शिरवाडकर

प्रश्न 9.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 11
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन 12

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

कृती : खालील वाक्ये मुद्रितशोधन करून पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
पिंपळावर मोरपिसाप्रमाणे मऊ मुलायम पाणे उमलली आहेत.
उत्तर :
पिंपळावर मोरपिसाप्रमाणे मऊ मुलायम पाने उमलली आहेत.

प्रश्न 2.
तेथील हवामानाचा परिणाम शेतीवर होते.
उत्तर :
तेथील हवामानाचा परिणाम शेतीवर होतो.

प्रश्न 3.
मी अनेक प्रक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत.
उत्तर :
मी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत.

स्वमत :

प्रश्न 1.
भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते असते.
उत्तर :
भाषा आणि समाज यांचा परस्परसंबंध आहे म्हणून त्यांचे अनन्यासाधारण नाते आहे. आपल्या मनातील भावना, विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचे भाषा हे एक महत्त्वाचे संवादमाध्यम आहे. मानव जेव्हा आदिमानवाच्या काळात रहात होता तेव्हापासून त्याची भाषा त्याच्यासोबत होती. मात्र तेव्हा त्या भाषेचे वेगळे स्वरूप होते. हळूहळू तो समाज करून राहू लागला तेव्हा हावभाव, चित्र, खाणाखुणा या चिन्ह भाषेच्या स्वरूपातून आपल्या भावभावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवत होता. मग त्याने चिन्हव्यवस्था निर्माण केली. निसर्ग, परिसर, दृश्य-अदृश्य गोष्टी यांना त्याने शब्द दिले.

ध्वनीच्या मार्फत आपण बोलू शकतो याची त्याला जाणीव झाली. मग मानवाचा हळूहळ भाषिक विकास होऊ लागला. भाषेचा विकास होता होता त्याचा सामाजिक विकास होऊ लागला. राजकीय स्थित्यंतरे, आक्रमणे होत जातात तेव्हा समाज बिथरतो, मिसळतो त्यामुळे भाषेचीसुद्धा सरमिसळ होते. महाराष्ट्रावर पोर्तुगीज, यवन, फ्रेंच यांची आक्रमणं झाली त्यावेळी त्या लोकांनी आपल्या बोलीभाषेतले बरेचसे शब्द आपल्याला दिले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

आपल्या भाषेने ते शब्द स्वीकारले म्हणून तर आपल्या भाषेत उर्दू, अरबी, फारसी, इंग्रजी अशा शब्दांचा मिलाप झालेला दिसतो. भाषा ही सतत परिवर्तनशील, प्रवाही असते. काळाप्रमाणे आपले आजी-आजोबा, आई-बाबा आपली भावंडे, आपल्या मित्रांची भाषा, व्हॉटस् अॅपची भाषा यातही बदल होत गेलेले दिसून येतात.

मुद्रितशोधन प्रास्ताविक

कोणत्याही प्रकारच्या लेखनात त्या लेखनातील व्याकरण शुद्धतेबरोबर आशयाचे संपादन हे महत्त्वाचे असते. त्याची जबाबदारी लेखकाबरोबरच लेखन निर्दोष करणाऱ्या मुद्रितशोधकाचीही तेवढीच असते. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाई केलेल्या मजकुराचा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. हे मुद्रण कलेचा जन्म होण्यापूर्वी मानवाने या संदर्भात अनेक प्रयोग केले होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुद्रितशोधनाचे महत्त्व अधिक आहे.

मुद्रितशोधन स्वरूप :

मुद्रितशोधन – लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे ‘मुद्रितशोधन’ (Proof Reading) होय.

मुद्रितशोधक – व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे ‘मुद्रितशोधक’ (Proof Reader) होय.

लेखकाला प्रत्येक वेळी लेखनाचे सखोल ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही लिहावयाचे राहून जाते व त्यात पुनरावृत्ती होऊ शकते. व्याकरण व लेखननियमानुसार लेखन अचूक व निर्दोष होण्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते. स्थानिक ते जागतिक स्तरावर लिखित मजकुराची आवश्यकता असल्याने मुद्रितशोधनाची व्याप्ती मोठी आहे.

मुद्रितशोधकाचे महत्त्व : भाषा व समाज यांच्यात अनन्यसाधारण नाते आहे. एखादया राष्ट्राच्या भाषेचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होत असतो.त्याची सर्वांगीण प्रगती होते. भाषा लिहिणारे, वाचणारे, बोलणारे यांचे प्रमाणही वाढते. या भाषेचा दर्जा जेवढा उत्तम असेल तेवढी समाजाची प्रगती अधिक.

त्या भाषेचे जतन संवर्धन योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी मुद्रितशोधकाची असते. साहित्य निर्मितीमध्ये लेखक, टंकलेखक, मुद्रितशोधक, मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून त्यांचे सखोल ज्ञान, भाषाप्रभुत्व, सौंदर्यदृष्टी, साहित्य निष्ठा या गोष्टी ग्रंथाच्या उच्चनिर्मितीसाठी कारणीभूत असतात. लेखकांनंतर तो ग्रंथ परिपूर्ण व वाचनीय करण्याचे काम मुद्रितशोधक करतो.

लेखक व मुद्रक यांमधील तो दुवा तर असतोच शिवाय भाषेचा संवर्धक, रक्षणकर्ता, प्रकाशकांचा मित्र व वाचकांचा प्रतिनिधी अशा विविध भूमिका तो पार पाडत असतो. उत्तम मुद्रिकशोधक मुद्रितशोधन या व्यवसायाला उत्तम दर्जाचे स्थान देऊ शकतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

मुद्रितशोधकाची भूमिका : मुद्रिकशोधकाला भाषेची उत्तम जाण येण्यासाठी भाषेच्या अभ्यासासोबत, स्वयंअध्ययन, विविध वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन या गोष्टींची गरज असते. मुद्रितशोधनाची भूमिका ही केवळ प्रमाणभाषेतील लेखन तपासणे इतकी मर्यादित नसून वाक्ये अर्थपूर्ण आहेत का? त्यातील संदर्भ योग्य आहेत का? शब्दांची पुनरावृत्ती होत नाही ना? याचीही काळजी त्याला घ्यावी लागते.

पुस्तकांचे पृष्ठ क्रमांक, अनुक्रमाणिका, मजकुराची सलगता याकडेही त्याचे दुर्लक्ष होता कामा नये. त्याला मजकुरासंदर्भात काही शंका निर्माण झाल्या तर त्या निदर्शनास आणून देणेही गरजेचे असते. लेखकाचा मजकूर निर्दोष व सुंदर करून तो वाचकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मुद्रितशोधकाची असते.

पुस्तकाचे संपादन, सूची, शब्दांकन, लेखन, भाषांतर, अनुवाद अशा कामे करून जाणकार, मुद्रितशोधक आपली क्षमता विकसित करू शकतो. कारण चांगला मुद्रितशोधक होणे ही एक तपश्चर्याच आहे.

मुद्रितशोधनासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये : मुद्रितशोधकाला भाषेची उत्तम जाण हवी. प्रमाणभाषेनुरूप व्याकरण शुद्धतेबरोबरच लिहिलेला मजकूर अर्थपूर्ण व बिनचूक आहे का? हे तपासणे व याची जाण असणे मुद्रितशोधकासाठी आवश्यक असते.

मुद्रितशोधकाला मुद्रणविषयक तंत्र व दृष्टी हवी. आपले ज्ञान अदययावत ठेवणेही महत्त्वाचे असते. अनेक विषयांतील रुची, कामावरील निष्ठा या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. उत्तम मुद्रितशोधक होण्याच्या दृष्टीने चिकाटी, अभ्यासातील सातत्य, सराव या गोष्टींना महत्त्व असून या गोष्टी मुद्रितशोधकाला परिपूर्ण व प्रगत करतात. या गोष्टींमुळे तो स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. मुद्रितशोधकाची साधनसामग्री – ज्या भाषेतील मुद्रिते तपासयाची त्या भाषेतील शब्दकोश उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, व्याकरणविषयक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता.

शैली पुस्तिका, प्रमाणभाषेची नियमावली पुस्तिका या साधनांचा उपयोग केल्याने मुद्रितशोधकाचे काम निर्दोष व सुलभ होते.

मुद्रितशोधनाचे तंत्र – कोणत्याही मुद्रिताची किमान तीन वाचने होतात. पहिले वाचन – मूळ मजकूर, टंकलिखित मजकूर यांचे वाचन साहायकाच्या मदतीने करून पहिल्या वाचनातील असंख्य दुरुस्त्यांचे निराकरण करणे.

दुसरे वाचन – पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकांची तपासणी करून नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठमांडणी, पृष्ठक्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी करून त्याचे पुन्हा वाचन होणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन

तिसरे वाचन – दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे. अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रितशोधक जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्त्या तिसऱ्या वाचनात करतात. कारण छापल्यानंतर दुरुस्ती होणे शक्य नसते. मजकूर तपासताना मुद्रितशोधकाने मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा उपयोग करून बाजूच्या मोकळ्या जागेत करून प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष मारावी. मुद्रितशोधकाचे काम मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधणे होय.

मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवणे. शब्दकोश व संदर्भग्रंथ यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय हवी. प्रत्येक विरामचिन्ह व व्याकरणाचा विचार करण्याची गरज असते. नंतर लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी पाठवतो. मुद्रकाकडून ती निर्दोषित झाल्यावर ती मुद्रितशोधकाकडे येते. मुद्रित मजकुराची योग्य मांडणी करून मुद्रितशोधक ती पुन्हा लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित परिपूर्ण व निर्दोष करण्याचे मुद्रितशोधकाचे काम पूर्ण झाल्यावर ते मुद्रणासाठी पाठवण्यात येते.

संगणकावर स्पेलचेक असताना मुद्रितशोधकाची गरज काय?

आजच्या संगणक युगात तंत्रज्ञानामुळे मुद्रितशोधकाचे काम सोपे झाले आहे. परंतु ते निर्दोष झाले आहे असे म्हणता येणार नाही. स्पेलचेकर शब्द बरोबर आहे म्हणजे एखादया शब्दाचे (Spelling) बरोबर आहे की नाही ते तपासतो. परंतु तो शब्द त्या जागी योग्य आहे का हे त्याला समजणे कठीण आहे. म्हणून स्पेलचेकरला कायम सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

कारण अनेक विशेषणांपैकी एखादया शब्दाला कोणते विशेषण अनुरूप आहे हे बघणे त्याचे काम असते. एखादा परिच्छेद गाळला गेला, वाक्यांचे अर्थ लागले नाही हे स्पेलचेकरला समजत नाही. ते काम मुद्रितशोधक करू शकतो. कारण नाम-विशेषण, कर्ता, कर्म, क्रियापद यांचा अभ्यास व ज्ञान मुद्रितशोधकाकडे असते. स्पेलचेकरची भूमिका ही मदतनीसाची असते त्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही.

मुद्रण व्यवसायाशी संबंधित काही संज्ञा, घटक आणि प्रक्रिया यांची माहिती खाली दिली आहे.

मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती

मुद्रक Printer मजकुराची छपाई करणारा
मुद्रण प्रत Press Copy छपाईसाठी मजकुराची तयार प्रत
मुद्रित Proof तपासणीसाठी काढलेली प्रत
मुद्रण Printing मजकुराची छपाई
मुद्रितशोधक Proof Reader मुद्रितातील त्रुटी सुधारणारा
मुद्रितशोधनाच्या खुणा Proof Marks मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे
मुद्रितशोधन Proof Reading मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया
मुद्रित प्रत Print Out छपाईनंतरची प्रत Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.2 मुद्रितशोधन
मुद्रणालय Press छापखाना

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 4.1 सूत्रसंचालन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

11th Marathi Digest Chapter 4.1 सूत्रसंचालन Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
उत्तरः
सूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो बोलताना कुठेही अडखळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची भाषा साधी, सोपी व श्रोत्यांना समजणारी असावी.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

अतिशय बोजड किंवा फार आलंकारिक भाषेचा वापर करू नये. सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असावे. त्याचा व्यासपीठावरील वावर आत्माविश्वासपूर्ण असावा. कार्यक्रमात निवेदन करताना व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मानपूर्वक परिचय करून देण्याचे व त्यांचा यथोचित नामोल्लेख व त्यांना अभिवादन करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असणे गरजेचे आहे. कार्यक्रमात समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिस्किलपणा असावा.

कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करताना तो लीलया आणि सहजपणे करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असावे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार असल्याने वक्ते, कलावंत यांना प्रोत्साहित करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. समोरचा वयोगट लक्षात घेऊन भाषाशैली, उदाहरणे, काव्यपंक्ती यांचा सुव्यवस्थित वापर करावा लागतो. आवाजाबरोबरच ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव असणे अपेक्षित आहे.

कार्यक्रम हा बंदिस्त सभागृहात आहे की खुल्या मैदानावर यावर सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून त्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. उत्तम सूत्रसंचालक हा चांगला निवेदक, वक्ता असावा. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालकाला तो-तो विषय समजला पाहिजे. उदा. सांगितिक कार्यक्रमात संगीताची जाण त्याला असणे गरजेचे आहे. सूत्रसंचालकाचे भाषेवर प्रभुत्व असावे.

सूत्रसंचालकाचा उदंड आत्मविश्वास हा त्याच्या सूत्रसंचालनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सूत्रसंचालकाकडे प्रवाही भाषा, आत्मविश्वास, समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यासंग, देहबोली ही गुणवैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे आणि याच कौशल्यांतून तो उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतो.

प्रश्न 2.
‘वसुंधरा दिनानिमित्त’ होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका तयार करा.
उत्तरः

जागतिक वसुंधरादिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम पत्रिका

दि. २२ एप्रिल

  • पूर्वकथन :
  • दीपप्रज्वलन :
  • वसुंधरा गीत :
  • पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत :
  • प्रास्ताविक :
  • ‘चला वसुंधरा वाचवू या’ शपथः
  • मा. उद्घाटक मनोगत :
  • स्पर्धकांचे सादरीकरण :
  • परीक्षकांचे मनोगत :
  • स्पर्धेचा अंतिम निकाल :
  • पारितोषिक वितरण :
  • मा. अतिथी मनोगत :
  • अध्यक्षीय मनोगत :
  • आभारप्रदर्शन :

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

प्रश्न 3.
‘सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
कोणत्याही कार्यक्रमाचा मुख्य आधार ही त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका असते. कार्यक्रम पत्रिका ही संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणारी असते. कार्यक्रम पत्रिका ही कार्यक्रमाची खरी ओळख व त्याचे स्वरूप मांडणारी असते. कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढे-पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेची अस्सल ओळख असणे गरजेचे असते. सूत्रसंचालकाला कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी कार्यक्रम पत्रिका समजून घेणे गरजेचे असते.

प्रत्येक कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका वेगळी असते. त्याची संहिता वेगळी असते. कार्यक्रम पत्रिकेतील घटकांनुसार कार्यक्रम पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेमुळे कार्यक्रमाची मांडणी, गुंफण करणे सोपे जाते.

कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकाला त्याचे निवेदन करताना मार्गदर्शक ठरते. कोणता भाग झाल्यावर पुढे काय करायचे याची दिशा देण्याचे काम सोपे होते. दोन भाग, कार्यक्रम जोडण्याची संधी सूत्रसंचालकाला मिळते. कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार कार्यक्रम पुढे-पुढे नेता येत असल्याने सूत्रसंचालकाला फार मेहनत घ्यावी लागत नाही. थोडक्यात कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असते.

कार्यक्रम पत्रिका नसेल तर सूत्रसंचालकाला सूत्रसंचालन करणे अवघड होईल. कार्यक्रम पत्रिकेशिवाय कार्यक्रम पुढे कसा न्यायचा? कशानंतर काय? अशी संदिग्धता सूत्रसंचालकाच्या मनात निर्माण होऊन ऐनवेळी कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो हे टाळण्यासाठी सूत्रसंचालकाच्या हाती कार्यक्रम पत्रिका असणे गरजेचे आहे. म्हणून कार्यक्रम पत्रिका ही कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते.

विशेष म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या सूत्रसंचालकाने संबंधित कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करणे अभिप्रेत असते. त्यामुळे तो संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालकाला समजणे सापे जोते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

प्रश्न 4.
‘सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते’, या विधानाची सत्यता
पटवून दया.
उत्तरः
कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता ही त्याच्या पूर्वतयारीवर अवलंबून असते. सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तर उत्तम सूत्रसंचालन होऊ शकते. सूत्रसंचालकाला पूर्वतयारी करताना चौफेर वाचन करायला हवे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत सर्वच क्षेत्रांची माहिती असली तर चांगली तयारी करून सूत्रसंचालनात आपली छाप पाडता येते. पूर्वतयारी नसेल, त्या त्या क्षेत्राची माहिती नसेल तर सूत्रसंचालन प्रभावी होणार नाही. पूर्वतयारी करताना कवितेच्या ओळी, अवतरणे, विनोद यांचा संग्रह सूत्रसंचालकाकडे असेल तर कार्यक्रमाच्या वेळी उपयोगी पडतो.

शब्दफेक, भाषेवर प्रचंड प्रभुत्व या सूत्रसंचालकाच्या जमेच्या बाजू आहेत. त्याची तयारी असेल, सराव असेल तर सूत्रसंचालन उत्तम होते. तयारी करताना देहबोली, सभाधीटपणा, आवाजाची लय, श्वासावर नियंत्रण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमातील सूत्रसंचालन बघून सराव करता येतो. आपल्यातील त्रुटी, उणीवा दूर करता येतात. या सर्व गोष्टी एका दिवसात आत्मसात करता येत नाहीत. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सूत्रसंचालनात ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव करावा लागतो. ध्वनिवर्धक किती अंतरावर असावा.

आवाजातील चढ उतार, लय यांचा अभ्यास करून तयारी केली तर एकूण चांगला परिणाम साधता येतो. थोडक्यात कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी कार्यक्रमाचे स्वरूप, विषय, श्रोता, ठिकाण या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून पूर्वतयारी केली तर कार्यक्रमात अतिशय प्रभावी व उठावदार सूत्रसंचालन करता येते.

प्रकल्प.

प्रश्न 1.
कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या कविकट्ट्यासाठी सूत्रसंचालनाची संहिता तयार करून सादरीकरण करा.
उत्तरः
प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करा.

11th Marathi Book Answers Chapter 4.1 सूत्रसंचालन Additional Important Questions and Answers

कृती : २ आकलन कृती

1. खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
पुढील आकृतिबंध तयार करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 2

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

सूत्रसंचालन : एक वलयांकित ………………………………….. सामान्यज्ञान अदययावत राहते. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८९)

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 4.

प्रश्न इ.
कारण लिहा.
अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण ….
उत्तरः
अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत.

प्रश्न ई.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 5
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 6

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

स्वमत :

प्रश्न  1.
“सूत्रसंचालन – एक वलयांकित व्यवसाय’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
आज युवक-युवती यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. बदलत्या काळाची पाऊले ओळखून अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मळलेल्या वाटा सोडून नवनवीन क्षेत्रे आज युवक-युवतींना खुणावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रत्येक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. या कार्यक्रमांतून सूत्रसंचालकाला चांगले मानधन तर मिळतेच पण त्याचबरोबर स्वत:ची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होते.

सार्वजनिक कार्यक्रमाबरोबरच आज दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रम सादर होतात. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम, रिअॅलिटी शो, पुरस्कार प्रदान सोहळे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या सादरीकरणात सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. किंबहुना काही कार्यक्रम सूत्रसंचालकाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले आहेत. पूर्वीच्या काळी सूत्रसंचालन केवळ छंद, हौस, आवड म्हणून केले जाई.

पण आज सूत्रसंचालन केवळ छंद न राहता तो एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. पूर्ण वेळ सूत्रसंचालन करणाऱ्या अनेक सूत्रसंचालकांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवित आहेत. थोडक्यात सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. या व्यवसायातून अनेकांना प्रतिष्ठा, सन्मान व उत्तम करिअरचा मार्ग खुला झाला आहे.

स्वाध्यायासाठी कृती खालील कृती करा.

(१) खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण व श्रवण कौशल्ये कशी विकसित करता येतील ते लिहा.

  • व्याख्याने, मुलाखती आस्वाद
  • शक्तीस्थळे, त्रुटी, अभ्यास
  • दूरचित्रवाणी
  • आकाशवाणी कार्यक्रम
  • नामवंत सूत्रसंचालक शैली
  • यु ट्यूब
  • स्वत:ची निवेदन शैली

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

(२) उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक बाबी तुमच्या शब्दात लिहा.
(३) ‘राष्ट्रीय साक्षरता दिन” निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा.
(४) प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाने कोणती पथ्ये पाळावीत स्पष्ट करा.

कृती-१. सरावासाठी काही कार्यक्रम पत्रिका नमुने.

शिक्षकदिन समारंभ

  • पूर्वकथन
  • दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यान
  • मान्यवरांचे मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ

  • पूर्वकथन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • गुणवंत विदयार्थी सत्कार
  • मनोगत
    • गुणवंत विदयार्थी
      १ ……………….., २ ………………..
    • मान्यवर मनोगत
      १ ……………….., २ ………………..
  • प्रमुख अतिथी मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

कृती-२.

प्रश्न 1.
‘गुरुपौर्णिमा’ या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचा नमुना तयार करा.
उत्तरः
महाविदयालयात संपन्न झालेल्या ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालन नमुना पुढीलप्रमाणे –

कार्यक्रमपत्रिका सूत्रसंचालकाचे निवेदन
मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन सुस्वागतम्! सुस्वागतम् !
………….. एज्युकेशन संस्थेचे, नूतन कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालयात आज गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व आपल्याला शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांचे मी, (स्वतःचे नाव ………………………..) मन:पूर्वक स्वागत करतो/करते.
विदयार्थी मित्र, मैत्रिणींनो आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवसालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
महर्षी वेदव्यास यांना आदयगुरु म्हणून संबोधले जाते. वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे व महाभारत ग्रंथाचे लेखन महर्षी व्यासांनी केले. महान, ज्ञानी व्यासमुनींना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा एक महत्त्वपूर्ण दिवस.
आपले आई-वडील हे आपले आयगुरु. बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. शालेय जीवनापासून आपले शिक्षक आपल्याला ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवतुल्य मानले आहे. ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘आचार्य देवो भव’ चा संस्कार आपल्या मनावर आहे. म्हणूनच कार्यक्रमाच्या प्रारंभी देवरूपातल्या गुरुंची सर्वजण मिळून प्रार्थना करूया.
गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन करून पुन:श्च एकवार उपस्थित सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
अध्यक्षीय सूचना कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी (GS) ………………………..
अनुमोदन अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन देत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाची विदयार्थिनी प्रतिनिधी (LR) कु. ………………………..
गुरुंना मानवंदना आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सन्माननीय जगदीश खेबुडकरांच्या लेखणीतून साकारलेले, प्रभाकर जोग यांनी संगीत साज चढविलेले, अनुराधा पौडवाल व सुधीर फडके यांनी गायलेले ‘कैवारी’ चित्रपटातील एक अजरामर गीत.
“गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” आपल्या गुरुजनांना गीतरूपात मानवंदना देत आहेत इ. ११वी विज्ञान वर्गातील विदयार्थीनी, कु. …………., कु. …………., कु. …………., कु.
ज्ञानरूपातला हा वारसा समर्थपणे मला, तुम्हाला नव्हे आपल्या सर्वांना पुढे चालवायचा आहे. ज्ञानसंपन्न होऊन राष्ट्राच्या प्रगतीत आपल्यालाही खारीचा वाटा उचलायचा आहे.
प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन आजच्या कार्यक्रमाचे तथा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे, कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्मा. संजयजी थोरात सर व व्यासपीठावरील इतर मान्यवर यांना विनंती आहे की, विदयेची देवता सरस्वती व महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून, दीपप्रज्ज्वलन करावे.
धन्यवाद सर! Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. ‘गुरु बिन कौन बताये बाट, बड़ा विकट यमघाट’ अशा परिस्थितीत योग्य रस्ता दाखवण्याचे काम आपले गुरुजन, प्राध्यापक करीत असतात.
स्वागत व प्रास्ताविक व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्माननीय संजयजी थोरात सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर.
भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा आपण आम्हास ज्ञात करून दिली. एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
मान्यवरांचा व गुरुजनांचा सत्कार ….संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांचा सत्कार महाविदयालयाचे प्राचार्य संजयजी थोरात सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय अशोकराव कडलग यांचा सत्कार उपप्राचार्य शिंदे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
महाविदयालयाचे प्राचार्य माननीय संजयजी थोरात सरांचा सत्कार कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी संदीप पाटील याने करावा अशी मी त्यास विनंती करतो.
विदयार्थी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व्यासपीठावर व विदयार्थ्यांमध्ये बसलेल्या गुरुवर्यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन जागेवर जाऊन करावा अशी सर्वांना विनंती आहे.
मनोगत कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. शिंदे सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर!
पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा प्रकाश. गुरु वा शिक्षक आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश दाखवून परिपूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न करतात हेच खरे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांना विनंती आहे की, त्यांनी आम्हांस मार्गदर्शन करावे. धन्यवाद अध्यक्ष साहेब! Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन
जीवनातील गुरुंचे, शिक्षकांचे महत्त्व आपण अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. माऊली ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सद्गुरु सारीखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी’ संसारसागरातून तरून जाण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात तर आपले शिक्षक, प्राध्यापक ज्ञानसागर तरून जाण्याचा, योग्य ज्ञानाचा मार्ग दाखवतात हेच खरे!
आभार प्रदर्शन आभाराचे भार कशाला
सत्काराचे हार कशाला
हृदयामध्ये घर बांधूया
त्या घराला दार कशाला
मनात राहू परस्परांच्या
तिसऱ्याचा आधार कशाला :-
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. वाकचौरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
पसायदान कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने होत आहे. पसायदानासाठी सर्वांनी हात जोडून बसावे.
सूचना : यानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे कोणतेही तास होणार नाहीत. उदया नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार वर्गांचे तास होतील.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!!!

सूत्रसंचालन प्रास्ताविक:

जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम सादर केला जातो तेथे तेथे सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका असते. आजच्या युगात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांची नेटकेपणाने व सुव्यवस्थितपणे मांडणी करणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची उंची वाढून तो श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. कोणत्याही कार्यक्रमाचा आलेख चढता ठेवण्यासाठी सूत्रसंचालक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. ‘नियोजित कार्यक्रमात प्रेक्षकांपुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी मधूनमधून क्रमश: केलेले निवेदन म्हणजे सूत्रसंचालन होय.’ एखादा नियोजित कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने व कुठेही तुटकपणा न जाणवता सलगपणे शिस्तबद्धतेने पूर्ण करणे हे खरे सूत्रसंचालकाचे कौशल्य असते.

प्रत्येक कार्यक्रमात खर तर सूत्रसंचालक हा दुवा असतो दोन घटकांना जोडणारा. कार्यक्रमाचे स्वरूप, वक्ते, व्याख्याने, कलावंत या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचे काम सूत्रसंचालक करत असतो. पण अनेकदा एखादा कार्यक्रम यशस्वी होतो तो मुख्य कार्यक्रमाबरोबरच सूत्रसंचालकाच्या अप्रतिम निवेदनाने आणि सादरीकरणाने. कधी कधी कार्यक्रमापेक्षा सूत्रसंचालकच त्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरत असतो तो त्याच्या प्रतिभेने.

  • सूत्रसंचालन ही कला आहे तसेच शास्त्रही आहे. कार्यक्रमाचे स्वरूप, क्रम, औपचारिकता, श्रोत्यांचा वयोगट, कार्यक्रमाचे रसग्रहण या दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे.
  • सूत्रसंचालकाच्या शब्दोच्चारात स्पष्टता अधिकाधिक हवी. आवाजातील आरोह – अवरोहाने शब्दांतील भाव – भावनांचा अचूक परिणाम साधला जातो. कार्यक्रमात स्वत: न गुंतता श्रोत्यांना कार्यक्रमात रंगवून कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य सूत्रसंचालकात असावे.
  • केवळ कार्यक्रमाचे स्वरूप, व्यक्तींचा उल्लेख करून कार्यक्रम पुढे न नेता अतिशय प्रभावी, अल्प प्रस्तावनेतून वक्ता, कलावंत यांना सादरीकरणासाठी प्रेरणा देणे. त्यांना प्रोत्साहित करून कार्यक्रम खुलविणे हे सूत्रसंचालकाचे खरे कौशल्य असते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : वेगवेगळ्या क्षेत्रांत श्रोत्यांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. सभा, संमेलनांपुरते मर्यादित असणारे सूत्रसंचालनाचे क्षेत्र आज व्यापक स्वरूपात, विविध कार्यक्रमांत दिसून येते. स्नेहसंमेलने, परिसंवाद, मेळावे, बैठका, पारितोषिक वितरण, नाट्यसंमेलन, ग्रंथप्रकाशन, वाढदिवस इ. कार्यक्रमात सूत्रसंचालन आवश्यक झालेले दिसून येते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, शासकीय, कौटुंबिक, व्यवसाय, धार्मिक, आरोग्य, क्रीडा, कला संगीतविषयक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी. सूत्रसंचालनाचे कार्यक्रम : चर्चासत्रे, संमेलने, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, निरोप समारंभ, वाढदिवस, वर्धापनदिन, विवाह सोहळे, परिसंवाद, कार्यशाळा, उद्घाटन समारंभ, गौरव समारंभ, मेळावे, जयंती, स्मृतिदिन, स्पर्धा, काव्यमैफील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

‘सूत्रसंचालन : एक वलयांकित व्यवसाय’ : छंद किंवा हौस म्हणून सूत्रसंचालन करता करता अनेक निवेदक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. उत्तम सूत्रसंचालन करता करता त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. अनेक कलावंत उत्कृष्ट निवेदन करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अनेकांसाठी उत्तम व्यवसाय व रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झाले आहे.

सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी : उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी श्रवण, वाचन, चिंतनशीलता, सराव यांची आवश्यकता असते.

वाचन : सूत्रसंचालकाचे वाचन चौफेर हवे. वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी, काव्य, नाटक ललित, नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे यांच्या वाचनातून शब्दसंग्रह व वाक्याची जुळणी सहजपणे करता येते. वाचन करताना महत्त्वाचे प्रसंग, सुवचने, किस्से यांची टिपणे काढावीत. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू भाषेतील काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचा संग्रह करून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. त्यांच्या वापराने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुलविता येते.

श्रवण आणि निरीक्षण : सूत्रसंचालन करण्यापूर्वी सूत्रसंचालकाने विविध क्षेत्रांतील सूत्रसंचालनाचे कार्यक्रम पहावेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करावा. आकाशवाणी, दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांतील सूत्रसंचालन मार्गदर्शक ठरत असते, त्यांचा अभ्यास करावा. प्रभावी निवेदक, सूत्रसंचालक यांच्या कार्यक्रमाच्या निरीक्षणातून त्यांची शैली, आत्मविश्वास, सहजता, शब्दफेक, प्रसांगावधान, सभाधीटपणा ही कौशल्ये सूत्रसंचालकाला शिकता येतात.

आवाजाची जोपासना : सूत्रसंचालकाचा आवाज हा भारदस्त असावा. प्रकट वाचन, पठन, अभिवाचन, कविता वाचन यांमधून उच्चारातील स्पष्टता, आवाजातील आरोह-अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची ताकद हीच सूत्रसंचालकाची जमेची बाजू असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम यांचा उपयोग होतो.

ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव : सूत्रसंचालन करताना ध्वनिवर्धकाचा सराव असावा. कार्यक्रम सभागृह किंवा खुले मैदान यांत असेल तर आवाजाचे स्वरूप बदलावे लागते. त्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्यात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यास सूत्रसंचालक म्हणून प्रभुत्व मिळविता येते.

सूत्रसंचालन करण्यापूर्वीची तयारी :

  • कार्यक्रमाचा विषय, वेळ, स्थळ, स्वरूप, अध्यक्ष, अतिथी, श्रोता, कलावंत इत्यादींबाबत सविस्तर माहिती मिळवावी.
  • कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.
  • कार्यक्रमाचा श्रोतृवर्ग, त्यांची आवड, वयोगट यांचा अभ्यास करावा
  • निवेदनाची तयारी करावी. काव्यपंक्ती, संदर्भ, अवतरणे सुभाषिते, चुटके यांचा वापर करावा पण त्यांचा अतिरेक नको.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन

सूत्रसंचालन करताना घ्यावयाची काळजी :

  • कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांना अभिवादन करून श्रोत्यांना कार्यक्रमाकडे आकर्षित करावे.
  • व्यासपीठावर सर्व अतिथींचा योग्य पदानुसार आदरपूर्वक नामोल्लेख करावा.
  • निवेदनात सहजता, स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ-उतार, आत्मविश्वास, प्रभावी निवेदन शैली असावी.
  • समयसूचकता, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान असावे.
  • भाषा साधी, सोपी, प्रवाही असावी.
  • निवेदनात पाल्हाळ नसावे तसेच त्यात अनावश्यक हालचाली नसाव्यात.
  • आत्मप्रौढी टाळावी, वाक्ये, शब्दांची पुनरुक्ती नको.
  • एखादया त्रुटीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी.
  • वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये.

उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी वाचन, चिंतन, निरीक्षण, सराव, आत्मविश्वास यांची आवश्यकता असते. चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, आवड यांतून सूत्रसंचालन फुलविता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.3 सुंदर मी होणार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

11th Marathi Digest Chapter 3.3 सुंदर मी होणार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 1
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 5

प्रश्न इ.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार 3
उत्तर:

पात्र प्रतिक्रिया
1. राजेंद्र पपांच्या निर्णयाला होकार देण्याच्या स्थितीत आणि बेबीवर डाफरणारा
2. बेबी पत्र वाचून संताप येतो आणि महाराजांनी ठरवलेल्या निर्णयाचे पालन न करण्याचा निर्णय घेते.

प्रश्न इ.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

a. पपांचा पांगुळगाडा.
उत्तर :
पपांचा पांगुळगाडा – पपांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा मुकाटपणे स्वीकार करणं, त्यात अयोग्य–योग्य काय याचा विचार न करणं.

b. मुलांचे चिमणे विश्व.
उत्तर :
मुलांचे चिमणे विश्व – मुलांचे विश्व हे निरागस असते, लहानसे असते त्यात त्यांचा भोळा भाव सदैव अनुभवायला मिळतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

c. ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
उत्तर :
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य – अर्धमुर्ध आयुष्य जगणं. ब्रेक तुटलेली गाडी ज्याप्रमाणे पूर्णतः टाकून देता येत नाही. तसंच आयुष्यही जगत असतो आणि नसतोही अशी अवस्था.

2. थोडक्यात स्पष्ट करा.

प्रश्न अ.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
उत्तर :
आतापर्यंत दिदीने अपंगावस्थेत बरंच दुखणं सहन केलं. ती वडिलांवर प्रेमछाया अंथरत असायची. महाराजही तिच्याजवळ मन मोकळं करायचे. तिचा कवितेचा छंद महाराजांना पसंत नव्हता. कविता करणारा संजय तिला आवडू लागला होता. पण पपांच्या आग्रहाखातर तिने त्याला काही कळवलं नव्हतं, पपांकडून जेव्हा तिला समजतं की पपांनी आईवर कधी प्रेमच नाही केलंय. त्यावेळेस ती व्याकूळ झाली. प्रेम नसताना चार मुलं झाली. ती मोठी झाली.

ममीने महाराजांच्या भीतीपायी घर सांभाळलं. ती मुलांना जन्म देऊन गेली. पण डॉक्टरांना मुलांची आई व्हायला सांगितलं. डॉक्टरांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि मुलांना सांभाळलं पण त्या डॉक्टरांनाही महाराजांनी निघून जायला सांगितलं. आपले पपा इतके कसे कठोर वागू शकतात? इतके निष्ठूर कसे होऊ शकतात. या विचारांनी व्याकूळ झालेली दिदी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिलाही जीवन समरसतेने जगायचंय.

ते जगण्यासाठी ती आसुसली आहे. आजवर तिनं घराबाहेरही पाऊल टाकलेलं नाही त्यामुळे तिला आता जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे. त्या प्रकाशात न्हाऊन तिचं जीवन सुंदर करायचं आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
उत्तर:
खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांना आपल्या संस्थानिक असल्याचा प्रचंड अभिमान होता. सत्ताधीश म्हणून वावरल्याने त्यांचा अहंकार पराकोटीला पोहोचला होता. पिता म्हणून वागताना आपल्याला आपल्या मुलांचे सुख पहायला हवं हे कधी त्यांच्या लक्षातच आले नाही.

नेहमी हुकमी एक्का आपल्या हातात असल्यासारखे आपल्या आप्तजन, प्रजाजनांवर आसूड ओढणं अशी वृत्ती असल्यामुळे ही प्रेम, माया, जिव्हाळा या भावनांपासून पार दूर गेलेली असते. बेबीचा नेमका या गोष्टीबद्दलच राग आपल्या पित्यावर होता. तिला मुक्तपणे जगायचं होतं.

जीवनाचा आनंद घेत घेत प्रकाशाकडे जायचं होतं. पित्याची जाचक बंधनं तिची घुसमट करत होती.त्याला हरक्षणी ती विरोध करत होती. तिच्या वडिलांविरुद्ध बंड करण्याचे बळ तिच्यात होते कारण ती त्यांच्या विचारांची गुलाम नव्हती.

प्रश्न इ.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
उत्तर :
डॉक्टर हे एक समंजस मातृहृदयी असं पात्र आहे. आपल्या प्रेमाचा त्याग करून महाराजांनी केलेल्या अनेक अपमानांना सहन करून डॉक्टर महाराजांजवळ राहिले. महाराणींनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी अगदी निष्ठेने सांभाळली. आपल्या या अपत्यांचा सांभाळ करता करता त्यांनी स्वत:च्या अनेक इच्छांचा त्याग केला. त्याबद्दल कोणतीही तक्रारही त्यांच्या मनात नाही. त्यांना महाराजांनी प्रचंड त्रास दिला आहे. पण तरी हसतमुखाने मुलांना प्रेम देण्यात त्यांनी कसूर केली नाही.

मुले मोठी झाली, संस्थान बरखास्तच झालेलं आहे. अशा अवस्थेत महाराज त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करतात. खरं तर त्यांना या वयात मुलांचा आधार हवा असतो त्याच काळात मुलांपासून, राज्यापासून ते त्यांना दूर करतात. सहनशील, प्रेमळ, त्यागी असं हे व्यक्तिमत्त्व आहे.

3. स्वमत.

प्रश्न अ.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ हे नाटक जीवनाचा सुंदरतेने विचार करायला लावणारी कलाकृती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थाने होती. ती काळाच्या ओघात संपुष्टात आली तरी तिथल्या संस्थानिकांच्या मनात असलेली राजेशाही, हुकुमशाही संपुष्टात आली नाही. त्यातील एका सत्ताधीशाची कहाणी ‘सुंदर मी होणार’ मध्ये येते. यातील महाराजही शिस्तीचे भोक्ते असलेले.राणी त्यांच्या प्रेमाला आतुर असलेली. पण राजाचे तिच्यावर प्रेमच नसते.

दिदीचा जन्म झाल्यावर तर ती केवळ त्यांच्या सुखाकरता महालात रहात असते. आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असावं इतकीच माफक मागणी असताना महाराज मात्र तिच्यावर प्रेम करू शकत नाहीत याचं वैषम्य तिला वाटत असतं. याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होतो आणि ती कायमची आजारी पडते. नवऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली स्त्री आणि मुलांना मायेची ऊब देऊ न शकणारी स्त्रीची अगतिकता या नाटकातील ममी या पात्राद्वारे दिसून येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

प्रश्न आ.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
उत्तर :
नाटकामध्ये रंगसूचनेला संवाद, प्रसंग घटना यांच्याइतकेच महत्त्व आहे. रंगसूचनेमुळे त्या त्या संवादामागील हावभाव वाचणाऱ्याला कळतो.

नाटककाराने या अशा रंगसूचना पात्राने कोणत्या गोष्टी वा कृती त्यावेळेस कराव्यात त्याकरता सांगितलेल्या असतात. उदाहरणार्थ – (पत्र वाच लागते – तिचा चेहरा एकदम उतरतो. थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८०) इथे दिदीने कसे वागावे, भाव दाखवावे हे सांगितले आहे.

या अशा रंगसूचना पात्रांच्या आविर्भावासाठी जशा महत्त्वाच्या तशा कथानकातील दुवे साधण्याकरताही महत्त्वाच्या असतात. त्या त्या वेळेची पात्राच्या मनातील भावना अधोरेखित होते त्यामुळे त्या प्रसंगाचा, घटनांचा भाव आपल्याला वाचून समजतो उदा. (आवेगानं – मागल्या बाजूचा पडदा बाजूला करतात – तिथे महाराज उभे असतात. सर्वांना आश्चर्य वाटतं)(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (मागाहून नोकर फळे घेऊन येतो) – त्याला नुसत्या इशाऱ्याने ती टेबलावर ठेव असे सांगतात, तो ठेवून जातो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२) (तिला कडकडून भेटते – अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते) (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८३) या अशा प्रकारच्या रंगसूचनांमुळे ते पात्र, घटना, कथानक समजायला मदत होते.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
उत्तर :
महाराज हे सत्ताधीशाप्रमाणे वागत होते. त्यामुळे सर्वच जण त्यांच्या पदाचा, प्रतिष्ठेचा मान राखून बोलत असत. राजांना विरोध करण्याची कोणाची तयारी नसायची. पण हे झालं राजवाड्यात. राजाने राजवाड्यात त्यांचा मान–सन्मान याला शोभेल असंच वागावं पण घरी मात्र पित्यासारखं वागायला हवं.

नंदनवाडीचं नावच किती सुंदर आहे. जिथे नंदनवनच असायला हवं. पण महाराजांच्या शिस्तबद्ध, हेकेखोर स्वभावामुळे घर, घरातील माणसं सुंदर असूनही तिथं नंदनवन फुललं नाही. याकरता जर महाराणीने पुढाकार घेऊन राजांना विरोध केला असता तर वातावरण बदलले असते. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यांचा वापर राणींनी केला असता तर राजामध्ये थोडातरी बदल झाला असता.

प्रश्न आ.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ या नाट्यउताऱ्यातून एका राजाच्या शिस्तप्रिय, अहंकारामुळे एक घर कसे तुटते अशा आशयाचे कथानक आले आहे. राजाच्या अशा वर्तनाने त्याची राणी आजारी पडते. ती राजाकडून प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही. राजालाही तिच्याबद्दल फक्त काळजी असते. प्रेम, माया नाही त्यामुळे दोघांचे नाते रुक्ष झालेले आहे. त्या रुक्ष नात्याचे पडसाद मुलांवरही होतात. दिदीच्या पायात अशक्तपणा हा याचाच परिणाम आहे. डॉक्टर ममत्वाने मुलांना वाढवतात पण तरीही त्यांच्यावर महाराजांची बंधने असतात. जीवन हे सुंदर असले पाहिजे. जीवन एकदाच मिळतं.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

ते सार्थकी लावणं, त्यात आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद मिळवणं हे आपल्या हातात आहे. पण या नंदनवाडीतील कोणीतीही व्यक्ती मुक्तपणे, आनंदाने जगत नाही. जगणं सुंदर असू शकतं हे तिथल्या कोणालाही ठाऊक नाही. एका दबावाखाली, ताणाखाली सर्वच जण जगत आहेत. त्यामुळेच या सर्व ताणातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जगण्याचा मार्ग निवडायला लागतो. दिदी आपलं पायाचं दुखणं घेऊन जगत असते.

तर बेबी वडिलांविरुद्ध बंड करायला पुढे सरसावते. घर सोडायचीदेखील तिची तयारी असते. वडिलांच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यात धन्यता मानणारे प्रताप, राजेद्र हे ही नंतरच्या काळात आवाज करतील. वडिलांच्या जाचाला शिस्तीला कंटाळून दिदीसुद्धा घर सोडायचा निर्धार करते. आजवर महालाबाहेर ती पडलेली नाही त्यामुळे ती बाहेरचं जग अनुभवण्याकरता उत्सुक आहे. वडिलांचे आपल्या आईवर प्रेम नसताना त्यांनी संसार केला, मुले झाली हे ऐकल्यावर तिला प्रचंड त्रास होतो. आपल्या आईवडीलांमध्ये प्रेमच नव्हतं तरी ते जगले? याचा विस्मय तिला वाटतो.

जगणं प्रकाशमय असावं, सुंदर असावं असं तिलाही वाटतं. तिच्या काव्यावर, तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे याचा आनंद घेऊन तिचं जगणं सुंदर करायचं आहे.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
‘सुंदर मी होणार’ या नाटकातील नाट्यउताऱ्याचा अभ्यास करताना पु. ल. देशपांडे यांनी खूप सहजतेने हे नाट्य संवाद लिहिलेत असं जाणवतं.

त्यात माणसाच्या नेहमीच्या वापरातले शब्दही आले आहेत. तसंच या संवादात एक काव्यात्म भावही आढळतो. ‘प्रकाशांच्या लेकरांना या अंधारकोठडीत त्यानं जन्माला घातलं’ अशा प्रकारच्या संवादातून त्यातील काव्य जाणवतं.

11th Marathi Book Answers Chapter 3.3 सुंदर मी होणार Additional Important Questions and Answers

कृती : १ आकलन कती

खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती – १.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
(अ) दिदीला राजवाडा असा वाटतो – [अमंगल]
(आ) दिदीला कलावंत म्हणून आदरणीय असलेली व्यक्ती – [संजय]
(इ) दिदी महाराजांसोबत काय म्हणून राहणार होती – [आई]

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

कृती – २.

प्रश्न अ.

(a) गटात न बसणारा शब्द ओळखा.
उत्तर :
घर सोडून जाणाऱ्या व्यक्ती (बेबी, प्रताप, राजू, दिदी) – [बेबी]

(b) योग्य पर्याय निवडा :
उत्तर :
थेंबभर पाण्यालादेखील याची ओढ असते.

पर्याय :

  • विशाल समुद्राची
  • अथांग नदीची
  • आकाशातील मेघांची [विशाल समुद्राची]
काय ऐकायचं तुमचं ……………………………………….. दिदी : संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८५)

प्रश्न आ.
महाराज संजयकडे या दृष्टीने पाहतात.
पर्यायः
(a) उनाड इसम
(b) कलावंत
(c) दिदीचा प्रियकर
उत्तर :
(a) उनाड इसम

(a) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उत्तर :
अंधारकोठडी – अंधार, अंडी, कोठडी, कोडी, कोर, धार
वातावरण – वर, वण, वाव, वाण, वार, रण, रव, रवा, तार, ताव, ताण, तारण, वरण, वावर

(b) खालील वाक्यातील काळ ओळखा.
मग तुम्ही एकटे एकटे राहाल.
उत्तरः
भविष्यकाळ.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

(c) खालील वाक्यातील अव्यय ओळखा.
माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे.
उत्तरः
कडे – शब्दयोगी अव्यय.

स्वमत:
प्रश्न 1.
‘थेंबभर, पाण्यालादेखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते’ या वाक्याचा तुम्हांला जाणवलेला अर्थ लिहा.
उत्तर :
सुंदर होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनाची तयारी पाहिजे. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळाला की जीवनाचा सागर सुंदररित्या जगता येतो. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनाही समुद्राकडे जाण्याची ओढ असते. ते झरा, नदी, नाले या सर्वांमार्फत समुद्रापर्यंत प्रवास करतात. कोणतीही व्यक्ती आहे त्या ठिकाणी राहिली तर तिचा विकास अशक्य असतो.

म्हणून जे उदात्त आहे उत्तम आहे याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मनानं, शरीरानं कमकुवत असलेल्या दिदीला असलेला कवितेचा छंद तिच्या मनाला उभारी देतो. तिच्या कविता ज्यांना आवडतात तो संजयही कलावंत आहे. तो तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक आहे. पण पपांच्या काळजीखातर दिदीने त्याला उत्तर दिलेलं नाही. पपांचे आपल्या ममीवर प्रेम नव्हते हे ऐकल्यावर दिदीला प्रचंड वाईट वाटते.

आपल्या पपांचा तिला तिरस्कार वाटू लागतो आणि ती संजयला होकार दयायचा निर्णय घेते हा विचार मला फार सकारात्मक वाटतो. यामुळे तिच्या जीवनात उभारी येईल आणि तिचं जीवन सुंदरही होईल.

प्रश्न 2.
महाराजांविषयी दिदीला वाटणाऱ्या घृणेबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
महाराजांची सर्वात जवळची मुलगी दिदी आहे. दिदीजवळ ते आपल्या मनातलं दुःख सांगत असतात. पण एकाक्षणी जेव्हा ते दिदीजवळ कबूल करतात की त्यांचे दिदीशिवाय दुसऱ्या कोणावरच प्रेम नाही. दिदीच्या जन्मदात्या ममीवरही त्यांचं प्रेम नाही हे ऐकताच दिदीला आपल्या आईविषयी प्रचंड वाईट वाटतं. आपली आई भीतीखातर आपल्या पपांसोबत राहिली. पपांचे प्रेम तिच्या वाट्याला, भावाबहिणींच्या वाट्याला आलं नाही हे वास्तव दिदीला पचवणं कठीण होतं. आपल्या पपांनी आपल्या ममीवर प्रेमही करू नये? मुलांची जबाबदारी तिहाईत डॉक्टरवर देण्याइतमत पपा आईपासून दूर गेलेले होते.

मग प्रेमसंबंध नसतानाही पपा–ममी केवळ पती–पत्नी या नात्यात केवळ सोय म्हणून एकत्र बांधले गेले? हा विचार दिदीला त्रासदायक वाटू लागला. त्यामुळे तो राजवाडा, त्यातील मालकी हक्क या सर्वांविषयी दिदीला तिरस्कार वाटला तर ते चुकीचं नाही. कोणतंही नातं प्रेमाने जास्त काळ टिकू शकतं. पण तिथे भीती, दहशत असेल तर ते नातं घृणेकडे वळतं त्यामुळे मनात कोणतीही प्रिती नसेल तर तिरस्कार, अलिप्तता या नकारात्मक गोष्टींची वाढ होते. दिदीच्या मनात नेमकं हेच द्वंद्व चालू होतं. प्रेमाचा अंकुर नसलेल्या व्यक्तीवर ती प्रेम कशी करू शकते?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

सुंदर मी होणार प्रस्तावनाः

लेखक पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याविश्वातील चतु:रस्त्र व्यक्तिमत्त्व होय. विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार म्हणून प्रसिद्ध. मार्मिक आणि निर्मळ विनोद, सूक्ष्म निरीक्षण, भाषेचा कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण वापर करण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची बलस्थाने होत. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘ती फुलराणी’, ‘अंमलदार’ ही नाटके’, ‘सदू आणि दादू’ ‘असा मी असामी’ यांसारख्या एकांकिका, ‘हसवणूक’, ‘बटाट्याची चाळ’, इत्यादी विनोदी लेखसंग्रह तर ‘अपूर्वाई आणि पूर्वरंग’ इत्यादी ‘प्रवासवर्णने’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’ यांसारखी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार, भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित.

सुंदर मी होणार पाठाचा परिचयः

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाल्यानंतरचा काळ. नंदनवाडीच्या संस्थानिकांचा भव्य राजवाडा अजूनही जुन्या काळाची अदब अन् मुजरे सांभाळत बसलाय. महाराजांची थोरली मुलगी दीदीराजे गेली १० वर्षे खुर्चीला खिळून बसलीय. संस्थानाचे खास डॉक्टर तिच्यावर औषधोपचार करत आहेत. राजेंद्र, प्रसाद आणि बेबीराजे ही तिची भावंडं.

१०वर्षांच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाही. २६–२७ वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करील, असं खात्रीनं वाटू लागलंय. कवी गोविंदांच्या ‘मृत्यू म्हणजे वसंत माझा’ यांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ती स्वतः संदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य बेबी स्वत:च्या कल्पनेनं अनुभवू लागते.

दिदी तर अधू; पण त्या वाड्यातल्या कुणालाच त्या चार अवाढव्य भिंतींच्या बाहेर जाता येत नाही. संस्थानाची अमर्याद सत्ता गमावलेल्या महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्या राज्यात घोड्यांचा लगाम धरून अदबीनं उभं राहणाऱ्या मोतदाराचा मुलगा बंडा सांवत निवडणूक लढवून असेम्ब्लीचा सदस्य बनलाय, हे महाराजांना सहन होत नाही. लोकशाहीच्या नावानं सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी, हे त्यांना मंजूर होत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

योगायोग असा, की याच बंडा सावंतवर धाकट्या मुलीचं–बेबीचं प्रेम आहे; पण महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला एक कवी – संजय देशमुख – एकदा तिला भेटायला वाड्यात येतो. तिच्या नकळत तिच्या कविता बेबीनं कवीला पाठवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं, तर उत्कटतेनं करावं. असं कवीचं तत्त्व. खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो; पण तो तिथं आलाय हे कळताच महाराज येतात आणि त्याला हाकलून लावतात. त्यांचा हुकूम ऐकताच एकाएकी अवसान येऊन दिदी खुर्चीतून उठते, उभी राहते. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, सुंदर मी होणार’ असं काव्य तिला स्फुरतं.

दिदी आता चालण्याचा सराव करते; पण बरी होत आहे, हे महाराजांना मान्य होत नाही. दरम्यान, त्यांची पुतणी – एका लक्षाधीशाबरोबर लग्न केलेली – भेटीला येते. तिचा नवरा सुरेश हा सुरांच्या आनंदात डुंबणारा; पण बाथटबमध्ये बसल्यासारखं घराच्या उंच भिंतींच्या आत गीतांचा आनंद घेण्याची त्याला आवड. निरनिराळे राग आळवीत तो ‘आसावरी’ रागाशी दीदीची तुलना करतो.

महाराजांचा कठोरपणा वाढत जातोय. ते मुंबईला गेलेले असतात. तिथून पत्र पाठवून इंग्लंडला जाऊन दीदीवर उपचार करण्याचा बेत प्रकट करतात. त्या वेळी मुलांची आई – संस्थानची राणी मृत्युपंथाला लागलेली असताना तिच्या काळजीपोटी स्वत:चं ठरलेलं लग्न रद्द करून आयुष्यभर मुलांची आई होऊन राहण्याचं व्रत घेतलेले डॉक्टर आत्मकहाणी सांगतात.

इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दीदीला आश्चर्य वाटत असतं; पण एकेक करून भावंडं आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात आणि आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिला ही मुलं झाली, हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची चीड येते.

दिदीला पाहिल्यावर सुरांच्या मागून जाण्यासाठी घराच्या भिंतीबाहेर पडणारा सुरेश पुन्हा एकदा सपत्नीक भेटायला येतो. आता सुरेशरूपी सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं. तो मुक्तपणे गाऊ लागतो. ते स्वर कानी पडल्यानं संतापलेले महाराज येऊन त्याला हाकलून लावतात.

आता मात्र महाराजांच्या या हुकूमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दिदी वाड्याबाहेर पडते. तिच्या पावलांत बळ आलेलं असतं. तिला नवे पंख फुटलेले असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.3 सुंदर मी होणार

सुंदर मी होणार समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

पांगुळगाडा – पांगळ्या मुलाला चालायला शिकवण्यासाठी तयार केलेली तीन चाकी गाडी (a young child’s go-cart) आजन्म – जन्मापासून, जन्मभर (throughout the life) विटंबना – अप्रतिष्ठा (ridicule, mockery) आपत्ती – संकट (bad times, distress) तिटकारा – तिरस्कार, कंटाळा (dislike, disgust), गुच्छ – फुलांची एकत्र केलेली जुडी (a cluster, a bouquet of flowers), स्तब्ध – स्थिर, शांत (silent, quiet) प्रयोजन – हेतू, कारण (motive, purpose) पाठिंबा – आधार (support) अपराध – गुन्हा (crime) संगोपन – जोपासना (careful preservation) मातेदार – घोडा सांभाळणारा (groom), उनाड – निरुदयोगी (truant, vagabond).

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.2 ध्यानीमनी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

11th Marathi Digest Chapter 3.2 ध्यानीमनी Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती करा.

(अ) शालूवहिनीची स्वभाववैशिष्ट्ये

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 1
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी 6

2. स्पष्ट करा.

प्रश्न अ.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
उत्तर :
शालूवहिनाला स्वत:चे मूल नाही. त्यामुळे सामाजिक उपेक्षांचा तिला सामना करावा लागतो. या सामाजिक अवहेलनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. यावर उपाय म्हणून ती ‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरू पाहते. त्याच्या जन्मापासूनच त्या मुलासाठी खूप त्रास ती सहन करायची. नऊ महिने त्याचे ओझे तिने पोटात वाहिले आहे. त्याची शी-शू पुसायची. त्याला अंघोळ घालायची आहे.

टाळूवर तेल टाकून ती त्याला लहानपणी शांतपणे झोपवायची त्याच्या वस्तूंचा घरभर पसरलेला पसारा पाहून ती आनंदित व्हायची. त्याच्या कपड्यांचा, घामाचा गंध तिला आवडायचा. खेळून घरी आला की त्याचे चिकचिकित अंग बघून तिला त्याच्या खेळण्याचे कौतुक वाटायचे. त्याचे अक्षर चांगले नाही त्याबाबतीत तो बापाच्या वळणावर गेलाय याचेही ती कौतुक करायची. त्याच्यासाठी साजूक तुपाचा शिरा आणि चपातीचे लाडू बनवायची. त्याचे कपडे धुवायची. थोडक्यात वात्सल्य भावना तिच्यात ओतप्रोत भरलेली होती. आपल्या मुलावर त्याच्या बाललीलांवर तिचे अतोनात प्रेम होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उत्तर :
सदा आणि शालन या जोडप्याला स्वत:चे मूल नाही. सामाजिक उपेक्षांना सामना करण्याची ताकद नसलेली शालू कल्पनेच्या विश्वात ‘मोहित’ या मुलाला जन्म देते. तिच्या रंगहीन जीवनात त्यामुळे आनंद फुलतो. हा आनंद तिच्याकडून हिरावून घेतला तर ती मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल हे लक्षात घेऊन सदानंद तिला या आभासी विश्वात तसाच जगू देतो. हळूहळू तोही या विश्वात रमायला लागतो. तो म्हणतो संसारात एकमेकांच्या इच्छेसाठीच तर जगायचं असतं आणि इच्छेला शरीर असायलाच हवं असा काही नियम नाही. काल्पनिक मोहित दोघांच्या रुक्ष जीवनात प्राण ओततो.

त्याचं खेळणं-पडणं, चिखलात लोळणं, त्याचे कपडे-लत्ते, त्याच्या वस्तूंचा पसारा हा त्या दोघांच्या भावविश्वाचा एक भाग बनतो. मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सर्वांपासून दूर त्यांनी स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आहे. या विश्वात चैतन्य निर्माण करणारा जीवनरस म्हणजे मोहित. रडत, भेकत, कण्हत, कुंथत, कोरडं आयुष्य जगण्यापेक्षा जे ‘नाही’ ते ‘आहे’ हे समजून जीवन जगण्याचा सोपा मार्ग त्या दोघांनी निवडला आहे. मोहित त्यांच्या जगण्याचे जीवनसत्त्व आहे. तो नसेल तर त्यांचे अस्तित्व बर्फाच्या ठिसूळ पांढऱ्या गोळ्यांप्रमाणे होईल.

3. उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उत्तर :
अपत्यहीन जोडप्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतेचाच असतो. सदानंद आणि शालन या जोडप्यामध्येसुद्धा मूल नसल्यामुळे नात्यात कोरडेपणा आला होता. यावर उपाय म्हणून शालन मोहित नावाच्या काल्पनिक मुलाला जन्म देते आणि मातृत्वाचे रंग आपल्या जीवनात भरते. वास्तविक तिचा हा प्रवास मनोरुग्ण या दिशेने चाललेला असतो. पण तरीही तिला त्यातून आनंद मिळतोच हे जाणवून सदानंद या मुलाला स्वीकारतो.

त्यांच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टीत तो शालनला साथ देतो. पूर्वी दुःखी असणारी, मनाने उद्ध्वस्त झालेली शालन परत जीवन समरसून जगतेय हे बघून तो तिला या नात्यात साथ देतो. ही नवीन जबाबदारी त्याच्यावर येते. ही जबाबदारी दुहेरी आहे. एक म्हणजे शालनला तिच्यात आभासी विश्वात रमायला देणे. दुसरे आभासी दुनियेतील काल्पनिक मुलाबरोबर स्वत:चे भावविश्व निर्माण करणे. त्यामुळे या दुहेरी जबाबदारीने मी वाकलो आहे असे तो म्हणतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
उत्तर :
मूल नसल्यामुळे सतत सामाजिक अवहेलना-अपमान, तिरस्कार या भावनांना सामोरी जाणारी शालू हळूहळू मनोरुग्ण होत जाते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला दुंभगलेले व्यक्तिमत्त्व असे म्हणतात. आपल्या जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी शालूचे मन काल्पनिक विश्वात रमू लागते. या विश्वात तिचा स्वत:चा मुलगा आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जन्माला आला तेव्हापासून ती वात्सल्य भावनेचा अनुभव घेत आहे. त्याचे मोठे होते जाणे, शाळेत जाणे या सगळ्याच गोष्टी वास्तव जीवनातील मुलांच्या जीवनात ज्या प्रमाणे घडतात. त्याचप्रमाणे त्या मोहितच्या जीवनात घडतात.

इथे शालन वास्तव आणि आभास यांतील सीमारेषा पुसून टाकते. मोहितचं कल्पनेतील विश्व वास्तवात डोकावायला लागते. त्याचे सामान, त्याची खेळणी, कपडे घरभर पसरायला लागतात. त्याच्या घामाचा-शरीराचा गंध तिला वास्तवात जाणवायला लागतो. त्याच्यासाठी खादयपदार्थ घरात तयार व्हायला लागतात. तिचा पती सदानंद तिच्यात होणारे सर्व बदल पाहत असतो. आधी दुःखी, एकाकी असणारी शालन आता खूप आनंदात जीवन जगते.

हाच त्याच्याही जगण्याचा आधार आहे. त्याचा डॉक्टर मित्र समीर करंदीकर जेव्हा त्याला शालनला ‘या जगण्यातून बाहेर काढ, तिला वास्तवाची जाणीव करून दे’ असा सल्ला देतो तेव्हा सदानंद उद्विग्नतेने म्हणतो, “तिचा जीवनरस संपवून तिला मारून टाकण्यात काय अर्थ आहे?” तो समीरला सांगतो की स्वत:चे मूल हवे ही तिची इच्छा होती. ती तिने काल्पनिक विश्वात पूर्ण केली आहे. आता ती आनंदी आहे. मग त्या इच्छेला वास्तव शरीर नसेल तरी चालेल. तिचा आनंद हाच महत्त्वाचा आहे.

4. स्वमत,

प्रश्न अ.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
शालूचे वागणे हे अयोग्य आहे. वात्सल्य भावना ही ‘स्त्री’ ची नैसर्गिक भावना आहे, हे जरी खरे असले तरी स्त्री जीवनाचे सार्थक ‘माता होणे’ एवढेच नाही. आज स्त्रियांनी डॉक्टर, इंजिनिअर ते थेट वैमानिक, अंतराळ संशोधन, अवकाश यात्री इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. शिक्षणाने तिला पारंपरिक जोखडातून मुक्त केलं आहे. ज्ञानाची नवीन कवाडं तिच्यासाठी उघडी झाली आहेत. असे असताना उच्च शिक्षित असणारी शालन कल्पनेच्या दुनियेत आभासी मूल निर्माण करून एक खोटे जीवन जगते हे योग्य वाटत नाही. जीवनातला आनंद अनेक गोष्टीमध्ये शोधता येतो. कोणी झाडांना-फुलांना आपली मूलं मानून निसर्गात रमतात तर सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या स्त्रिया शेकडो मुलांच्या आयुष्यात रंग भरताना दिसतात.

लोकसंख्या वाढ ही भारताची प्रमुख समस्या असताना स्वत:चे मूल नाही म्हणून खंत करत बसण्यापेक्षा गरीब मूल दत्तक घेऊन त्याच्या जीवनाला आकार देणे हे केवढे तरी मोठे समाज कार्य ठरू शकते. त्यात शालन ही उच्चशिक्षित आहे. तिच्या ज्ञानाचा उपयोग इतर मुलांना करून देण्याऐवजी ते ज्ञान ती फुकट घालवते आहे. मातृत्वाचा इतका ध्यास घ्यायला हवा की विश्वातील सगळ्या अनाथ मुलांमध्ये आपले मूल शोधता आले पाहिजे. दुर्दैवाने शालन मात्र पारंपरिक मूल्य, संकल्पनांना बळी पडलेली दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न आ.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
पुत्रप्रेम हे सजीव प्राण्यांचं फार मोठं स्वभाव-वैशिष्ट्य आहे. पशु-पक्षी-प्राणी हे देखील त्याला अपवाद नाहीत. मानवी समूहात स्त्री-पुरुष आणि त्यांची कर्तव्ये ही परंपरेतून निर्माण झाली आहेत. त्यामुळे संसार करणे, मूल जन्माला घालणे, त्यावर मातृत्वाचा वर्षाव करणे, त्याचे संगोपन करणे, त्याला वाढविणे या सगळ्या गोष्टी स्त्रियांची आदयकर्तव्ये ठरवली गेली आहेत. मुलगा-मुलगी मोठे होत असतानाच त्यांना त्यांच्या कर्तव्याची, भूमिकेची जाणीव करून दिली जाते. पुरुषाने अर्थार्जन करणे आणि ‘स्त्री’ ने ‘चूल-मूल’ सांभाळणे या भूमिका परंपरेने लादल्या आहेत.

‘वात्सल्य-पुत्रप्रेम’ हे पुरुषांतही तितकेच तीव्र असते ही गोष्ट आधुनिक विज्ञानाने स्पष्ट केली आहे. म्हणूनच पाश्चात्य देशात बाल संगोपन रजा ही स्त्रियांबरोबर पुरुषांनाही मिळते. म्हणजेच ही भावना निसर्गनिर्मित आहे. पण त्याचा आविष्कार स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जास्त आढळतो कारण सामाजिक रचना-व्यवस्था तशी आहे. थोडक्यात स्त्रियांच्या बाबतीत पुत्रप्रेम ही भावना नैसर्गिकआणि मानवनिर्मित दोन्ही आहे.

प्रश्न इ.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
उत्तर :
शालन मोहितच्या कपड्यांचे वर्णन करताना म्हणते मोहित आता मोठा होतोय. वाढणाऱ्या वयामुळे तो आता उंच होत आहे. त्यामुळे त्याचे कपडे आखूड होत आहेत. त्याचे बरेचसे कपडे, त्याचे शर्ट,पँट, टॉवेल, बनियन, बूट हे त्याच्या आजोबांनी म्हणजे शालन वहिनीच्या बाबांनी त्याला दिले आहेत. त्याचे मोजे रोज व्यवस्थित धुवावे लागतात. त्याच्या कपड्यांना त्याच्या घामाचा शरीराचा गंध येतो. तो सतत चिखलात-मातीत खेळायला जातो. त्यामुळे त्याचे कपडे खूप खराब होतात. कधी खेळताना पडून एखादी जखम होते. तेव्हा कपड्यांना रक्ताचे डागही लागलेले असतात. थोडक्यात त्याच्या कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा सगळीकडे घरभर पसरलेला असतो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
शालूला सदाने साथ का दिली असावी ते स्पष्ट करा.
उत्तर :
वात्सल्य भावना ही शालीनीमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मूल हवे आहे. तिची बुद्धी तोकडी नाही. ती उच्चशिक्षित आहे. पण प्रत्येक क्षणाला ती खळखळ हसऱ्या बाळाचे स्वप्न पाहतेय. यामुळे स्वप्न हेच सत्य समजून ती जीवन जगू लागते. या स्वप्नात तिचे मूल जन्माला आले आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जसा जसा मोठा होतोय शालन त्याच्या बाललीलांनी हरखून जाते. तिच्या निराशेने भरलेल्या जीवनात नवीन आशेचा किरण निर्माण झालाय. तो किरण खोटा आहे. सदानंदाला कळत आहे. पण बायकोला या स्वप्नातून बाहेर काढणे म्हणजे तिला जिवंतपणी मरणयातना देणे हे त्याला माहीत आहे. इच्छा नसूनही तो आधी या खोट्या जगात तिची साथ देत राहतो. हळूहळू तोही या कल्पनेच्या दुनियेत रमू लागतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

अस्तित्वात नसलेला मोहित त्या दोघांचे जीवनसत्त्व होते. त्यांच्या रुक्ष जीवनात भावनेचा ओलावा निर्माण होतो. शालन यामुळे आनंदी होते. सामाजिक अवहेलनेने, वांझपणाच्या भावनेने आतून तुटलेली शालन परत एकदा नवीन स्वप्नात रममाण होऊन आनंदाने जीवन जगते आहे. तिचा आनंद हिरावून कशाला घ्या? तिला परत दुःखात लोटण्याला काय अर्थ आहे? या विचाराने शालूला सदाने साथ दिली असावी.

प्रश्न आ.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर :
वरील विधान हे अर्धसत्य आहे. कारण हे विधान सत्य मानलं तर ‘शिना वोरा’ सारखे प्रकरण या देशात घडलेच नसते. सख्ख्या आईने पैशासाठी मुलीचा जीव घेतला ही मातृत्वाला काळीमा फासणारी घटना याच देशातील आहे. जिथे ‘श्यामच्या आई’ सारखी कालातीत पुस्तके जन्माला येतात, तिथे पुत्रप्रेम-वात्सल्य या स्त्रियांमधील सार्वत्रिक भावना असल्या तरी स्वत:चे करियर घडविण्यासाठी अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे अविवाहित राहून मूल दत्तक घेऊन आपली मातृत्वाची तहान भागविणाऱ्या स्त्रिया सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत नवा पायंडा निर्माण करताहेत.

म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढणाऱ्या पुत्रांमुळे, “किती आंधळेपणाने मुलांवर प्रेम करायचे?” हा ही प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. आताच्या काळातील स्त्रिया या पुढारलेल्या आहेत. पुत्रप्रेमाच्या पलीकडे जाऊन व्यवहाराचा विचार करून सगळ्याच गोष्टी त्या मुलांवर उधळून टाकत नाहीत हेही सत्य या आधुनिक जगात पाहायला मिळते. म्हणजेच पुत्रप्रेमाची नैसार्गिक भूक जरी प्रत्येक स्त्रीकडे असली तरी आधुनिक काळात त्याला व्यवहार ज्ञानाने मोजण्याची रीतही रूढ झालेली आहे.

प्रश्न इ.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरणारी शालू आणि काल्पनिक जग कोणते व वास्तव कोणते या विचाराने गोंधळलेला सदा या दोघांच्या मनातील घालमेल या नाटकात नाट्यरूपाने प्रकट होते. एका बाजूला मूल नसल्यामुळे नात्यात आलेला कोरडेपणा तर दुसऱ्या बाजूला कल्पनाविश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे मनाची पकड घेत नाटकाचे कथानक गतिमान होते. मूल असल्याशिवाय आयुष्याची परिपूर्ती नाही अशा खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालन मनोरुग्ण होते. काल्पनिक विश्वात जगायला लागते. त्या विश्वात स्वत:चे खोटे मूल आकाराला आणते आणि त्या मुलाच्या संगोपनात गुंतून जाते. त्यात ती आनंद शोधते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

पण हा आभासी फुगा जेव्हा फुटेल तेव्हा शालन ठार वेडी होईल हे सत्य डॉक्टर समीर करंदीकर सदानंदला सांगू पाहतात. पण सदानंद त्यांना निरुत्तर करतो. मला शालनचे सुख हिरावून घ्यायचे नाही. तिला पुन्हा दु:खाच्या गर्तेत मला लोटायचे नाही असे तो निक्षून सांगतो. शेवटी मीही आता या आभासी काल्पनिक दुनियेत रमलो आहे हे कबुल करतो. अस्तित्वात नसलेल्या या दोघांचा मुलगा त्यांचा जीवनरस आहे हे तो समीरला सांगतो. हा रस गेला तर आम्ही दोघे संपून जाऊ अशी भीती तो व्यक्त करतो. या शेवटामध्ये एक प्रकारची हतबलता आहे. परिस्थितीला शरण जाणारी नाउमेद मानसिकता आहे.

सत्याला सामोरे जाण्याऐवजी त्यापासून पयालन करायचा पलायनवाद यात दिसून येतो. त्यापेक्षा अपत्यहीनतेवर मात करून एखादया मानवतावादी ध्येयाला या जोडप्याने वाहून घ्यायला हवे होते. स्वप्नातून बाहेर येऊन नवीन जीवनाची सकारात्मक सुरुवात करायला हवी होती. शिक्षणाने आलेलं शहाणपण वास्तव जीवनात वापरता आले नाही तर त्या शिक्षणाला अर्थ नाही असे वाटत राहते. म्हणून शेवट विषष्ण करणारा आहे असे वाटते.

11th Marathi Book Answers Chapter 3.2 ध्यानीमनी Additional Important Questions and Answers

कृती : १

प्रश्न 1.
वरील परिच्छेदात व्यक्त झालेल्या विषमता.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) [सामाजिक विषमता,]
(b) [नैसर्गिक विषमता,]
(c) [आर्थिक विषमता आर्थिक]

कृती – २.

प्रश्न 2.
प्रत्येक विषमतेचं वैशिष्ट्य
उत्तर :
(a) नैसर्गिक विषमता [ ]
(b) सामाजिक विषमता। [ ]
(c) आर्थिक विषमता [ ]
उत्तर :
(a) सर्वच नैसर्गिक विषमता वैदयकीय मार्गाने दूर होऊ शकत नाही.
(b) सामाजिक विषमतेचं रस्त्यावर प्रदर्शन मांडता येतं.
(c) आर्थिक विषमता सरकारी धोरणांमुळे अस्तित्वात येते.

समीर : एक माणूस म्हणून मला तुमच्या ………………………………………………………………………………………….. निघा तुम्ही आता. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७८-७९)

कृती-३.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

प्रश्न 1.
रडत-थकत किंवा कण्हत-कुंथत या शब्दांच्या जोड्यांमधील दोन्ही शब्दांचे अर्थ जवळजवळ सारखेच आहेत अशा तुम्हाला माहीत असलेल्या शब्दांच्या जोड्या.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) रमत गमत
(b) इमाने इतबारे
(c) धावत पळत

स्वमत :

प्रश्न 1.
विषमतेच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या उल्लेखातून सदानंद याला काय सांगायचे आहे ते स्पष्ट करा.
उत्तर :
या परिच्छेदात तीन प्रकारच्या विषमतेचा सदानंद उल्लेख करतो आहे. या तिन्ही विषमता वेगवेगळ्या आहेत व त्यामागे असणारी कारणेही भिन्न आहेत.

समाजामध्ये श्रीमंत-गरीब ही दरी असणे म्हणजे आर्थिक विषमता होय. प्राचीन भारतात विकासाची संधी सर्वांना समान उपलब्ध नव्हती. शिक्षणाची संधीही काही मूठभर लोकांना उपलब्ध होती. त्यातून एक वर्ग प्रगती करत गेला तर दुसरा वर्ग अज्ञानाच्या अंधकारात लोटला गेला त्यातून समाजात आर्थिक विषमता निर्माण झाली. जाती-व्यवस्थेमुळे उच्च जाती-नीच जाती असे भेदभाव निर्माण झाले. त्यातून मग सामाजिक भेद निर्माण झाले. नैसर्गिक भेद हे निसर्गामधूनच येतात. कोणी प्रचंड बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतो तर कोणी मंदबुद्धी म्हणून जन्माला येतो. तसेच काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते तर काही अपत्यप्राप्तीसाठी तळमळत राहतात. सदानंद म्हणतो सामाजिक-आर्थिक विषमता दूर होऊ शकते पण शालन आणि मला मिळालेली

अपत्यहीनतेची देणगी वैदयकीय मार्गानेही दूर होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील कमतरता तो या वाक्यातून अधोरेखित करतो.

स्वाध्यायासाठी कृती

  • ‘मोहित हे आमचं जीवनसत्त्व आहे’ या वाक्यातून प्रकट होणाऱ्या सदानंदाच्या मनातील भावना स्पष्ट करा.

ध्यानीमनी प्रस्तावनाः

वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर अर्थपूर्ण लेखन करणारे मराठी नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी नाटककार म्हणजे अर्थातच प्रशांत दळवी. केवळ नाटकच नव्हे तर चित्रपट-लेखन या सर्वच प्रांतात आपल्या आगळ्या-वेगळ्या लेखन शैलीने त्यांनी आपला वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. ‘खिडक्या’ हा त्यांचा कथासंग्रह तर ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘गेट वेल सून’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ या सगळ्याच नाटकांमधून त्यांनी मानवी भावभावनांचा, मनातील मानसिक आंदोलनांचा आशयपूर्ण पट चितारला आहे. विशेषतः माणसांच्या जगण्याचा, त्यांच्या कृती-उक्ती मागे असलेल्या कारणांचा त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेत एकूणच मानवी मनाची गुढता उलगडून दाखवलेली आहे. ‘बालगंधर्व पुरस्कार’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार’, ‘जयवंत दळवी पुरस्कार’ इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवांकित करण्यात आले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

ध्यानीमनी पाठाचा/नाटकाचा परिचय :

प्रस्तुत नाटकाचा वेचा हा ‘ध्यानीमनी’ या नाटकातून घेतला आहे. या नाटकात दोन जोडपी आहेत. सदानंद-शालन आणि समीर-अपर्णा. प्रस्तुत वेचामध्ये मात्र तीन पात्रांचे अस्तित्व आपल्या समोर येते. ते म्हणजे डॉक्टर असणारा समीर आणि मूल-बाळ नसलेले जोडपे सदानंद आणि शालन!

आज समाज कितीही पुढे गेला तरी समाज स्त्रीकडे पाहताना पारंपरिक दृष्टिकोनातूनच पाहतो हे सत्य आहे. ‘चूल-मूल’ या चौकटीतच स्त्रीचे कर्तृत्व शोधले जाते. त्यामुळे निपुत्रिक शालूला वेगवेगळ्या सामाजिक उपेक्षांना सामोरे जावे लागते. जणू मूल नसलेली स्त्री म्हणजे अपशकुनी स्त्री या नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. या सर्वांचा शालनच्या मनावर प्रचंड मानसिक आघात होतो. ती आपले मानसिक संतुलन हरवून बसते.

अपत्यहीनतेची ही जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी ती काल्पनिक विश्वाचा आधार घेते. जन्माला न आलेल्या मुलाला तो जन्माला आलाच आहे असे समजून वाढवू लागते. तिचे हे असे कल्पनेत रमणे, वास्तवापासून दूर जाणे तिचा पती हतबल होऊन पाहत राहतो. तिला सत्याची जाणीव करून दिली तर ती कदाचित ठार वेडी होईल आणि तिचे जगणेच संपून जाईल या भीतीने सदानंद तिच्या वागण्याचा स्वीकार करतो.

हळूहळू अस्तित्वात नसलेल्या या दोघांच्या मुलाने म्हणजे मोहितच्या अस्तित्वाने घर भरून जाते. त्याचे कपडे, त्याची शाळा, त्याचे खेळणे, त्याच्या घामाचा वास, त्याचे बूट, त्याचे टॉवेल या सर्व गोष्टींनी घर भरून जाते. जणू एक आभासी मूल त्या घरात जन्म घेते. या मुलाला वाढविताना पती-पत्नी जीवनाचा आनंद शोधू पाहतात.

समीर डॉक्टर आहे. होमसायन्समध्ये बाल मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या शालनचं असं तीळ तीळ तुटत जाणं, वास्तव जीवनापासून भरकटत जाणं हे सगळं त्याला भयानक वाटत राहतं. मनोरुग्ण झालेल्या शालनला तो यातून बाहेर काढू इच्छितो कारण डॉक्टर म्हणून त्याचे ते कर्तव्य आहे. पण शालन समीरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्याच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करते. त्यामुळे समीर सदानंदकडे आशेने बघतो की निदान तो तरी आपल्या पत्नीला वास्तवाची जाणीव करून देईल. पण सदानंद मात्र शांतपणे त्याला स्पष्टीकरण देतो, “सत्य सांगून शालूला अस्तित्वहीन करून तिचं एका हाडामासाच्या जिवंत पुतळ्यात रूपांतर करण्यापेक्षा आभासी दुनियेत आनंदाने रमणारी स्वप्नाळू शालू मला हवी आहे.”

एकीकडे मूल नसल्यामुळे आलेला नात्यातील कोरडेपणा तर दुसरीकडे कल्पना विश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे नाटक मनाची पकड घेते. मानवी मनातील अगम्य गुंते या निमित्ताने नाटककार उलगडून दाखवतो आणि सबोध मन-अबोध मन यातील वंद्व स्पष्ट करतो. सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने केलेली मानवी मनाची उकल या नाटकाच्या निमित्ताने लेखक स्पष्ट करतो आणि नाटक उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.2 ध्यानीमनी

ध्यानीमनी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

सायकॉलॉजी- मनाचा अभ्यास करणारे शास्त्र/मानसशास्त्र (psychology), वस्तुस्थिती – सत्य परिस्थिती (reality), जोजवणे – झोपवणे, भामटा – लबाड मनुष्य (deceitful person), आखूड – लहान, छोटे (short), कणीक – गव्हाचे पीठ (weat flour), तवंग – थर (a thin layer), मेडिकल टेस्ट – वैदयकीय तपासणी, वैदयकीय चिकित्सा, ओशाळणे – लाजणे (to shrink), तोळामासा – साधारण गोष्ट, सामान्य गोष्ट (very delicate, easily affected), पिसाळणे – वेडे होणे. (madden), जावळ – लहान मुलाच्या डोक्यावरील केस (hair of a child), स्वयंभू – स्वत:हून निर्माण झालेले (self born, self existent), तुकतुकीत – चकचकीत (smooth and shining), कण्हणे – रडणे (to groom), कुंथणे – वेदनेने कळवळणे (to moan).

ध्यानीमनी वाक्प्रचार :

चपापून पाहणे – दचकून पाहणे, ध्यास घेणे – एकाच गोष्टीचा सतत विचार करणे, कळा सोसणे – त्रास सहन करणे, पाठीला कळ लागणे – पाठ खूप दुखणे, चेहरा तांबूस पडणे – चेहरा लाल होणे, अस्ताव्यस्त पसरणे – इकडे तिकडे पसरणे, बेचिराख होणे – नष्ट होणे, घोटून घेणे – एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करून त्यात तरबेज होणे, धुगधुगती आशा असणे – थोडीफार आशा असणे, दत्तक घेणे – दुसऱ्याचे मूल आपले मूल म्हणून स्वीकारणे, अंतर न पडू देणे – दुरावा निर्माण न होऊ देणे, घालून पाडून बोलणे – अपमानकारक बोलणे, घुमा होणे – मनातल्या मनात कुढत राहाणे.