Pritam Question Answer Class 9 Marathi Chapter 19 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 19 प्रीतम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 19 प्रीतम Question Answer Maharashtra Board

प्रीतम Std 9 Marathi Chapter 19 Questions and Answers

1. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम 1
उत्तर:

शालेय वर्गातील प्रीतम सेकंड लेफ्टनंट प्रीतम
1. किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. 1. खूप देखणा, भरदार, स्वतः बाई त्याच्या खांदयाच्या खाली येत होत्या.
2. एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. 2. आत्मविश्वासाने वावरणारा; स्वत:ला काय वाटते, याचे स्पष्ट भान असणारा; एनडीएसारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

2. कारणे लिहा:

प्रश्न 1.
कारणे लिहा:
(अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे.
(आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकांना प्रीतमकडे खेचत होते.
उत्तर:
(अ) जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता.
(आ) प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता.

3. प्रतिक्रिया लिहा:

प्रश्न 1.
प्रतिक्रिया लिहा:
(अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया.
(आ) अबोल प्रीतम भडाभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया –
उत्तर:
(अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आईवडिलांना घेऊन यायला सांगितले.
(आ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला.

4. लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:

प्रश्न 1.
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:

उदाहरण गुण
1. प्रीतमला बाईंनी जवळ घेतले 1. कार्यनिष्ठा
2. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले 2. संवेदनशीलता
3. प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातांत चढवल्या. 3. निरीक्षण
4. एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. 4. ममत्व

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

5. प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.

प्रश्न 1.
प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उत्तर:
पाठातील वाक्ये अशी:
1. प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता.
2. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.
3. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.
4. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, “बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर मी तुम्हांला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वत:च्या वस्तू आहेत त्या.”
5. “या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.”

6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
रया जाणे.
1. शोभा जाणे.
2. शोभा करणे.
3. शोभा देणे.
उत्तर:
2. शोभा जाणे

प्रश्न (आ)
संजीवनी मिळणे.
1. जीव घेणे.
2. जीवदान देणे.
3. जीव देणे.
उत्तर:
2. जीवदान देणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

7. कंसांत दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा:

प्रश्न 1.
कंसांत दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा:

  1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
  2. आईने माझ्याकडे निराशेने पाहिले. (नकारार्थी करा.)
  3. बापरे ! रस्त्यावर केवढी ही गर्दी ! (विधानार्थी करा.)
  4. नेहमी खरे बोलावे. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर:

  1. मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा.
  2. आईने माझ्याकडे आशेने पाहिले नाही.
  3. रस्त्यावर खूपच गर्दी आहे.
  4. नेहमी खरे बोलावे का?

8. स्वमत.

प्रश्न (अ)
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर:
प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्याजवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या.

त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च, उदात्त भाव बाईंच्या अंत:करणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगांतून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच, असे मनोमन वाटते. बाईंना त्याच्यातील सद्गुणी, होतकरू मुलगा दिसतो. त्या त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा, परिपूर्तीचा आनंद देतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

प्रश्न (आ)
तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
उत्तर:
आतापर्यंतच्या शिक्षकांपैकी दोन शिक्षक माझ्या लक्षात राहिले आहेत. त्या दोनपैकी एक होते माझे मराठीचे शिक्षक शार्दुल सर. ते नेहमी सांगत — वाक्यातले सर्व शब्द एकमेकांचे नातेवाईक असतात. काही दूरचे, काही जवळचे. त्यांच्या नात्यांप्रमाणे त्यांचा अर्थ ठरतो. ही नाती लक्षात घेत घेत वाचन करायचे असते, हेही त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. आता वाचन करताना मला कधीही अडखळायला होत नाही.

पाचवीत भेटले इंग्रजीचे श्रीरंग सर. त्यांनी शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे गुपितच सांगितले. त्यानुसार उच्चार कसे होतात, हेही समजावून सांगितले. इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य उच्चारण्याची गोडी इतकी वाढू लागली की मला हळूहळू इंग्रजी बोलता येऊ लागले आहे. या शिक्षकांमुळे माझा अभ्यास चांगला होऊ लागला. माझा आत्मविश्वास वाढला. माझे आईबाबाही खूश आहेत. हे सर्व माझ्या या शिक्षकांमुळे घडले आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
‘प्रीतम’ या कथेचे नाट्यरूपांतर करा. वर्गात सादरीकरण करा.

प्रश्न 2.
कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 19 प्रीतम Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:
1. बाईंना प्रीतम लुथरा हे नाव वेगळे वाटले.
उत्तर:
1. सर्व मराठी मुलांमध्ये प्रीतम लुथरा हे अमराठी नाव असल्याने बाईंना ते वेगळे वाटले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. बाईंचे प्रीतमविषयी झालेले मत.
2. लहानपणापासूनच प्रीतमला आईवडिलांचे छत्र न लाभण्याचे कारण.
उत्तर:
1. प्रीतम दिवसेंदिवस आळशी व बेजबाबदार होत चालला होता.
2. लहानपणी म्हणजे प्रीतम साधारणपणे तीन वर्षांचा असताना त्याची आई वारली होती. वडील सैन्यात जवान असल्याने ते नेहमी सरहद्दीवर असत. तो सतत आईवडिलांपासून दूर राहत होता.

प्रश्न 2.
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:

उदाहरण गुण
तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. सौजन्यशीलता निरीक्षणशक्ती वक्तशीरपणा

उत्तर:
1. कर्तव्यनिष्ठा.

प्रश्न 3.
कोष्टक पूर्ण करा:

प्रीतमचे दर्शनी रूप प्रीतमच्या वृत्ती

उत्तर:

प्रीतमचे दर्शनी रूप प्रीतमच्या वृत्ती
किरकोळ मुलगा, किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म, खांदे पाडून मान खाली घालून उभा, चेहऱ्यावर दीनवाणे भाव. एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा, रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहणारा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या भोवतालावर अवलंबून असते,’ हे विधान प्रीतम लुथरा यांच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
प्रीतम लुथरा हा सात वर्षांचा मुलगा. चार वर्षांपूर्वी त्याची आई वारली होती. म्हणजे त्या वेळी तो केवळ तीन वर्षांचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात होते. ते नेहमी सरहद्दीवर असत. त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आईवडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत त्याला वावरायलाच मिळालेले नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला होता.

अशा परिस्थितीमुळे तो सतत बुजरा राहिला. तो कोणात मिसळत नसे. कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पाहत राही. तो एकलकोंडा, घुमा, अबोल बनला होता. मुक्तपणे खेळणारा-बागडणारा बालक न राहता, तो चारही बाजूंनी दबलेला, मनातून खचलेला बालक बनला होता. हे केवळ त्याच्या बाह्य परिस्थितीमुळे घडले होते. याचा अर्थ, माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवते.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
प्रतिक्रिया लिहा:
प्रीतमला कुणी नातेवाईक नाहीत, हे कळल्यावर बाईंची प्रतिक्रिया –
उत्तर:
बाईंचा आवाज एकदम खाली आला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

प्रश्न 2.
लेखिकांची कृती आणि त्यांच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:

कृती गुण
1. बाईंचा आवाज एकदम खाली आला. कनवाळूपणा
2. बाईंनी प्रीतमला पालकांना आणायला सांगितले. ममत्व
3. बाईंना प्रीतमचा देह सुकल्यासारखा जाणवला. चुकीची जाणीव

उत्तर:

कृती गुण
1. बाईंचा आवाज एकदम खाली आला. चुकीची जाणीव
2. बाईंनी प्रीतमला पालकांना आणायला सांगितले. कर्तव्यनिष्ठा
3. बाईंना प्रीतमचा देह सुकल्यासारखा जाणवला. कनवाळूपणा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. प्रीतमला मराठीखेरीज अन्य विषयसुद्धा येत नसत.
2. मामांनी प्रीतमला स्वत:कडे ठेवून घेतले.
उत्तर:
1. सर्व विषय मराठीतून शिकवले जात. प्रीतमला मराठी नीट येत नसे. त्यामुळे अन्य विषयसुद्धा येत नसत.
2. प्रीतमच्या बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी प्रीतमला स्वत:कडे ठेवून घेतले.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:

  1. प्रीतमला टाकून बोलणाऱ्या
  2. प्रीतमला मार देणारे
  3. प्रीतमला घरी ठेवून घ्यावे, अशी मामांना विनंती करणारे
  4. प्रीतमला मधल्या सुट्टीत मराठी शिकायला बोलावणाऱ्या

उत्तर:

  1. प्रीतमला टाकून बोलणाऱ्या – मामी
  2. प्रीतमला मार देणारे – मामा
  3. प्रीतमला घरी ठेवून घ्यावे, अशी मामांना विनंती करणारे – बाबा
  4. प्रीतमला मधल्या सुट्टीत मराठी शिकायला बोलावणाऱ्या – बाई

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावले, याबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
प्रीतमचे बाबा हे त्याचे एकुलते एक नातेवाईक. पण ते सैन्यात असल्यामुळे नेहमी देशाच्या सीमेवर असतात. मामा-मामी त्याला प्रेमाने वागवत नाहीत. परक्या भाषिकांमध्ये, परक्या वातावरणात तो राहतो. त्याला कोणाचाच आधार नाही. सगळीकडून तो दूर लोटला गेला होता. त्याला मायेची गरज होती. मायेला पारखा झाल्यामुळे त्याला कशातच गोडी वाटत नव्हती. त्यामुळे शिकण्यातही रस नव्हता. बाईंनी त्याला माया दिली. मराठी शिकवले. त्याला इतर विषयही कळू लागले. एकंदरीत कोणालाही प्रेमाने वागवल्यास तो आनंदाने जीवन जगतो. जगण्याची त्याची ताकद वाढते. म्हणून बाईंनी प्रीतमला मराठी शिकायला बोलावून त्याच्यात उमेद निर्माण केली, असे मला वाटते.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:
1. प्रीतमला इतर विषय समजू लागले.
2. आपुलकी वाटत नसतानाही मामा-मामी प्रीतमला खाऊ घालत.
उत्तर:
1. सर्व विषय मराठीतून शिकवले जात. त्याला मराठी येऊ लागले, तेव्हापासून त्याला इतर विषय समजू लागले.
2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत.

प्रश्न 2.
विविध व्यक्तींच्या कृती व त्यांतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा:

कृती गुण
1. प्रीतमने बाईंना भेटवस्तू दिली. व्यवहारी वृत्ती
2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. आपुलकी
3. शाळेतल्या मुलांनी बाईंच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी छोटासा समारंभ केला. कार्यनिष्ठा

उत्तर:

कृती गुण
1. प्रीतमने बाईंना भेटवस्तू दिली. आपुलकी
2. प्रीतमचे बाबा पैसे पाठवत, म्हणून मामा-मामी त्याला खायला घालत. व्यवहारी वृत्ती
3. शाळेतल्या मुलांनी बाईंच्या लग्नाचा आनंद व्यक्त करण्यासाठी छोटासा समारंभ केला. कृतज्ञता

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील घटनांचे परिणाम लिहा:

घटना परिणाम
1. बाई प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलल्या.
2. बाईंनी प्रीतमला वाढदिवशी भेट दिली.
3. प्रीतमने बाईंना दिलेल्या बांगड्या पाहून सगळेजण हसले.
4. बाई प्रीतमला मधल्या सुट्टीत शिकवू लागल्या.

उत्तर:

घटना परिणाम
1. बाई प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलल्या. प्रीतमला संजीवनी मिळाली. त्याची प्रकृती सुधारली.
2. बाईंनी प्रीतमला वाढदिवशी भेट दिली. प्रीतमला खूप आनंद झाला.
3. प्रीतमने बाईंना दिलेल्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. प्रीतम ओशाळला.
4. बाई प्रीतमला मधल्या सुट्टीत शिकवू लागल्या. प्रीतम मनापासून शिकू लागला.

प्रश्न 2.
फरक लिहा:

मामा-मामी बाई
1. ………………………………………….. …………………………………………..
2. ………………………………………….. …………………………………………..
3. ………………………………………….. ……………………………………………

उत्तर:

मामा-मामी बाई
1. प्रीतमबद्दल आपुलकी नव्हती. प्रीतमबद्दल खूप आपुलकी वाटे.
2. कधीही प्रेमाचा शब्द व स्पर्श नव्हता. प्रीतमशी चार शब्द प्रेमाने बोलत. आईच्या ममतेने कुरवाळत.
3. मामा-मामींकडे परकेपणा वाटे. बाईंकडे आईची माया मिळे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
प्रीतमच्या वर्तनातील बदल सांगून त्याबद्दलचे तुमचे मत लिहा.
उत्तर:
मधल्या सुट्टीत बाई शिकवू लागल्यापासून प्रीतम मन लावून शिकू लागला. त्याचे मराठीचे कौशल्य वाढले. त्यामुळे त्याला इतर विषयही समजू लागले. बाईंच्या प्रेमळ वागण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृती सुधारली. तो आनंदाने वावरू लागला.

बाईंच्या लग्नानिमित्त शाळेतल्या मुलांनी एक छोटासा समारंभ केला. बाईंना एक छोटीशी भेटही दिली. त्यासाठी मुलांनी वर्गणीही काढली होती. त्यात प्रीतम सहभागी होऊ शकला नाही. मात्र, प्रत्यक्ष समारंभात प्रीतम आत्मविश्वासाने बाईंजवळ गेला. त्याने स्वत:च्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट म्हणून दिल्या. या कृतीमागे त्याच्या मनात उदात्त भावना आहेत. तो आता दबलेला, खचलेला मुलगा राहिलेला नाही. तो आता समंजस, शहाणा, जाणता मुलगा बनला आहे. प्रीतममध्ये झालेला हा बदल बाईंच्या मायेमुळे झाला आहे. मुलांना धाकाने, दहशतीने न वागवता प्रेमाने वागवले, तर मुलांमध्ये चांगला बदल होतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढे दिलेली विधाने आणि त्यांतून अभिव्यक्त होणारे गुण यांच्या जोड्या लावा:

विधाने गुण
1. माझ्या बोलण्यावर त्यांना ‘हो’ म्हणावेच लागले. दिलासा
2. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस. सौजन्यशीलता
3. पुढे तो चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. संवेदनशीलता

उत्तर:

विधाने गुण
1. माझ्या बोलण्यावर त्यांना ‘हो’ म्हणावेच लागले. सौजन्यशीलता
2. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस. दिलासा
3. पुढे तो चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. कर्तव्यदक्षता

प्रश्न 2.
पुढे दिलेल्या घटनेचा परिणाम लिहा:

घटना परिणाम
1. त्या जुन्या बांगड्या पाहून सगळेजण हसले.
2. प्रीतमला जवळ घेऊन बाईंनी त्याच्या केसांतून हात फिरवला आणि त्याची समजूत काढली.

उत्तर:

घटना परिणाम
1. त्या जुन्या बांगड्या पाहून सगळेजण हसले. प्रीतम ओशाळवाणा झाला.
2. प्रीतमला जवळ घेऊन बाईंनी त्याच्या केसांतून हात फिरवला आणि त्याची समजूत काढली. प्रीतम व बाई यांच्यातील भावनेचा धागा अधिक चिवट होत गेला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते सांगा:
1. प्रीतम ओशाळवाणा झाला.
2. प्रीतमने आईच्या वापरलेल्या बांगड्या बाईंना भेट दिल्या.
उत्तर:
1. प्रीतम ओशाळवाणा झाला, कारण जुन्या बांगड्या बघून सगळेजण हसू लागले.
2. प्रीतमने आईच्या वापरलेल्या जुन्या बांगड्या बाईंना भेट दिल्या, कारण त्याच्याकडे वर्गणी देण्यासाठी पैसे नव्हते.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. बाईंना दरवर्षी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारा – ……………………..
2. प्रीतमला आईसारख्या वाटणाऱ्या – ……………………….
उत्तर:
1. प्रीतम
2. बाई.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले,’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर:
प्रीतमकडे पैसे नव्हते. पण बाईंविषयीची आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याची इच्छा तीव्र होती. म्हणून त्याने त्याच्याजवळची एकुलती एक खास वस्तू बाईंना भेट म्हणून दिली. बाईंनी तिचा प्रेमाने स्वीकार केला. दोघांच्याही मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. असे प्रत्येक वेळेला होत गेले. प्रीतम चांगल्या रितीने मॅट्रिक झाला. त्याने एन. डी. ए. मध्ये प्रवेश घेतला. त्याची ही प्रगती बाईंना कळत होती आणि त्यांना आनंद होत होता. तो दरवर्षी शुभेच्छापत्र न चुकता पाठवायचा. त्याच्या भावना त्यांना कळत होत्या. अशा प्रकारे दोघांमधील आपुलकीची भावना घट्ट होत होती, वाढत होती. हा संपूर्ण भाव वर दिलेल्या विधानातून व्यक्त होतो.

उतारा क्र. 5

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट झाला.
2. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला जातो, तेव्हा जोराने टाळ्या वाजवतात.
उत्तर:
1. प्रीतम लुथरा.
2. बाई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

प्रश्न 2.
कोणाला ते लिहा:
1. पासिंग आऊट परेडच्या वेळी विशेष जागी बसवतात.
2. प्रीतमने पुण्याला येण्याचे विशेष निमंत्रण दिले होते.
उत्तर:
1. यशस्वी कॅडेटच्या आईवडिलांना.
2. बाईंना.

प्रश्न 3.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम 3

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम 5

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

प्रश्न 2.
पुढील प्रसंगांतील भाव लिहा:

प्रसंग भाव
1. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला, तेव्हा बाईंनी टाळ्या वाजवल्या.
2. प्रीतम म्हणाला, “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो.”

उत्तर:

प्रसंग भाव
1. प्रीतमच्या छातीवर बिल्ला लावला, तेव्हा बाईंनी टाळ्या वाजवल्या. उत्कट आनंद
2. प्रीतम म्हणाला, “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो.” आई लाभल्याचा आनंद

प्रश्न 3.
का ते सांगा:

  1. प्रीतमच्या सासुरवाडीच्या लोकांनी आईसाठी दिलेली साडी त्याने बाईंना दिली.
  2. प्रीतम म्हणाला, “या बाई माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय.”
  3. प्रीतम म्हणाला, “केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, धावत येईन.”

उत्तर:

  1. प्रीतम बाईंना आईच मानत होता.
  2. प्रीतमचे एकही नातेवाईक नव्हते, पण बाई परक्या असूनही त्यांनी आईची माया दिली होती.
  3. प्रीतमला मुलगा मानून त्यांनी त्याला भावनिक आधार दिला होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
या उताऱ्यातून जाणवणारा, तुमच्या मते, महत्त्वाचा असलेला भाव स्पष्ट करा.
उत्तर:
स्टेशनवर बाईंना प्रीतमचे देखणे भरदार रूप जाणवते. आपण त्याच्या खांदयाखाली आहोत, हेही त्यांना जाणवते. कोणत्याही आईला आपला मुलगा देखणा, रुबाबदार व्हावा, आपल्यापेक्षा उंच व्हावा, असे वाटते. म्हणूनच प्रीतमला पाहताच बाई आनंदी होतात. आपल्या सर्व अडचणी दूर सारून त्या प्रीतमच्या लग्नाला हजर राहतात. बाई आता त्याच्या शाळेतल्या शिक्षिका राहत नाहीत. त्या मनोमन त्याची आई बनतात.

दुसऱ्या बाजूने पाहिले, तर प्रीतम बाईंचा मुलगा असल्याचे सुख अनुभवत असतो. तो त्यांना आई-बाबांच्या आसनावर बसवतो. “गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो,” असे म्हणतो. त्या आपल्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत, असे पत्नीला सांगतो. एखादया आईने आपल्या मुलाला घडवावे, तसे बाईंनी आपल्याला घडवले असे तो मानतो. आपल्याला मुलगा मिळाला, असे बाईंना वाटते; तर, आपल्याला आई मिळाली, असे प्रीतमला वाटते. दोघांनाही साफल्याचा आनंद मिळतो. आपण कृतार्थ झालो, असे दोघांनाही वाटते. हा भाव दोघांमधील नात्यातून संपूर्ण उताऱ्यात भरून राहिला आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता पू+
उत्तर:

सामासिक शब्द विग्रह समास
1. दाणापाणी दाणा, पाणी वगैरे समाहार द्ववंद्ववं
2. सत्यासत्य सत्य किंवा असत्य वैकल्पिक द्ववंद्ववं
3. महोत्सव महान असा उत्सव कर्मधारय
4. दशदिशा दहा दिशांचा समूह द्विगू

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
चार अभ्यस्त शब्द लिहा.
उत्तर:

  1. कामधंदा
  2. पाऊसपाणी
  3. वारंवार
  4. मधेमधे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
एकवचन लिहा:

  1. बांगड्या
  2. साड्या
  3. धागे
  4. टाळ्या.

उत्तर:

  1. बांगड्या – बांगडी
  2. साड्या – साडी
  3. धागे – धागा
  4. टाळ्या – टाळी.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. खाली
  2. सुगंध
  3. सावकाश
  4. नापास.

उत्तर:

  1. खाली × वर
  2. सुगंध × दुर्गंध
  3. सावकाश × जलद
  4. नापास × पास.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द निवडा:
उत्तर:
1. दृष्टीक्षेप, दृष्टिक्षेप, द्रुष्टीक्षेप, दृश्टिक्षेप. – दृष्टिक्षेप
2. सरहद्द, सराहद्द, सरहद, सारहद्द. – सरहद्द

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा:
तो म्हणाला बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती
उत्तर:
तो म्हणाला, “बाई, तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती.”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा:
Honorable.
(अ) आदरणीय
(आ) माननीय
(इ) वंदनीय
(ई) प्रार्थनीय.
उत्तर:
माननीय.

प्रीतम Summary in Marathi

प्रस्तावना:

माधुरी शानभाग यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात विज्ञानकथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुलांमध्ये, तरुणांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी विज्ञानकथा लिहिल्या. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कथा आली आहे. त्या मुलाला आईवडिलांचे प्रेमळ छत्र लाभले नाही.

त्यातच, त्याला सतत बदलत्या वातावरणात राहावे लागले. याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. मनाचा कोंडमारा झालेल्या स्थितीत तो जगत राहिला. दरम्यान त्याला शाळेतल्या बाई भेटल्या. त्यांनी त्याला वात्सल्याची ऊब दिली. त्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो एक कर्तबगार माणूस बनला. समाधानी आयुष्य जगू लागला. या संपूर्ण जीवनप्रवासाचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेत आले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 19 प्रीतम

शब्दार्थ:

  1. रया – तेज.
  2. केळवण – लग्न होण्यापूर्वी नियोजित वधूवरांना त्यांचे नातेवाईक देतात ती मेजवानी.
  3. दटावणे – दरडावणे, भीती घालणे.
  4. टेलिपथी – जिव्हाळ्याच्या दोन व्यक्तींना एकाच वेळी मध्ये कोणतीही संपर्क व्यवस्था नसूनही एकच विचार सुचणे.
  5. एकलकोंडा – कोणाशीही न मिसळणारा.
  6. घुमा – बाहेरून शांत वाटणारा पण आतून धुसफुसणारा.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. रया जाणे – तेज जाणे, मूळ रुबाब जाणे.
  2. खांदे पाडणे – निराश, दीनवाणा होणे.
  3. टाकून बोलणे – मनाला दुःख होईल असे अपमानकारक बोलणे.
  4. भडाभडा बोलणे – मनात साचलेले संधी मिळताच भराभर बोलून टाकणे.
  5. अंग चोरून घेणे – अंग आक्रसून घेणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Maharashtra Varuni Tak Ovalun Kaya Question Answer Class 9 Marathi Chapter 12 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Question Answer Maharashtra Board

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Std 9 Marathi Chapter 12 Questions and Answers

1. वैशिष्टचे लिहा.

प्रश्न (अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 2
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

प्रश्न (आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 4.1

2. असत्य विधान ओळखा:

प्रश्न 1.
असत्य विधान ओळखा:
1. धुरंधर शिवरायांना स्मरावे.
2. असत्यास्तव शिंग फुकावे.
3. स्वातंत्र्याची आण घ्यावी.
4. जन्मभूमीचे उपकार फेडावे.
उत्तर:
2. असत्यास्तव शिंग फुकावे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

3. कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.

प्रश्न 1.
कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
उत्तर:
महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे नि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात.

रथीमहारथींनी तिला भूषवले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.

4. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महारथी, शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संतमहंत व शाहिरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्रीछत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
उत्तर:
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली. परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये; म्हणून शाहीर म्हणतात, की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊ या.

प्रश्न (आ)
कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
उत्तर:
या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. ‘कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया’ या पहिल्या दोन ओळींत शाहिरांनी मर्दमराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. ‘करी कंकण बांधून साचे,’ ‘सत्यास्तव शिंग फुकाया,’ ‘पर्वत उलथून यत्नाचे,’ ‘धर ध्वजा करी ऐक्याची,’ ‘पाऊले टाक हिंमतीची,’ ‘घे आण स्वातंत्र्याची’ अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
उत्तर:
महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्रभूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नदयांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य है हातात हात घालून नांदतात. विदयेचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला.

भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औदयोगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यत्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे.

भाषाभ्यास:

वृत्तांतील लघुगुरूक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत.

1. ‘पुस्तक’ या शब्दांतील लघुक्रम (-∪∪) असा आहे, कारण ‘पु’ हे अक्षर लघू असले, तरी पुढच्या ‘स्त’ या जोडाक्षराचा आघात मागील लघु स्वरावर येतो. त्यामुळे त्याच्या 2 मात्रा धराव्या लागतात. जर असा आघात येत नसेल, तर जे अक्षर म्हस्व आहे ते न्हस्वच राहते.
2. जोडाक्षरातील शेवटचा वर्णन्हस्व असेल, तर ते जोडाक्षर व्हस्व मानावे.
उदा., भास्कर (-∪∪) दीर्घ असेल, तर दीर्घ उदा., इच्छा (-∪∪).
3. लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते गुरू मानावे.
उदा., नंतर (-∪∪) दुःखी (-∪∪).
4. कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघू असले तरी दीर्घ उच्चारले जाते. त्यामुळे ते गुरू किंवा दोन मात्रांचे मानतात.

मराठी पदयरचनेत अक्षरवृत्ते, छंदवृत्ते, मात्रावृत्ते किंवा जातिवृत्ते असे तीन प्रकार आढळतात.

अक्षरवृत्ते छंदवृत्ते मात्रावृत्ते
प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी, लघुगुरूक्रमसुद्धा सारखा असतो.  चरणातील अक्षरांची संख्या समान असते; पण लघुगरूक्रम नसतो. अक्षरांची संख्या सारखी, नसते; पण मात्रांची संख्या मात्र सारखी असते.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया 6

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. हातात ……………….. ध्वजा धर.
(सामंजस्याची/वीरांची/एकजुटीची/ धुरंधराची)
2. मैदानात शिंग ……………. साठी फुकायचे आहे.
(हत्या /सत्या /विदया / असत्या)
3. महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची ……………… घे.
(शपथ / तलवार/कंकण / स्वप्ने)
उत्तर:
1. हातात एकजुटीची ध्वजा धर.
2. मैदानात शिंग सत्यासाठी फुकायचे आहे.
3. महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची शपथ घे.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:

  1. शिवरायांना म्हटले आहे – [ ]
  2. पर्व आले आहे – [ ]
  3. शेतकऱ्यांची दोन अवजारे – [ ] व [ ]
  4. पर्वत उलथायचे आहेत – [ ]
  5. तलवार आहे ती – [ ]

उत्तर:

  1. धुरंधर
  2. संयुक्त महाराष्ट्राचे
  3. खुरपे व दोरी
  4. प्रयत्नांचे
  5. त्यागाची

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
उत्तर:
महाराष्ट्राची महती गाताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात – या महाराष्ट्राच्या चरणांना अरबी समुद्र वंदन करतो. त्या प्रिय महाराष्ट्रावर स्वत:चा जीव ओवाळून टाक. समर्पित हो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता-महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.
उत्तर:
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.

2. कवितेचा विषय → या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दांत ओळख करून दिली आहे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. काया = शरीर
  2. धरा = धरणी
  3. अंबर = आकाश
  4. साचे = खरे
  5. मनीषा = इच्छा
  6. आण = शपथ.

4. कवितेतून मिळणारा संदेश → शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्रभूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे, हे कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेत दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी, ही शिकवण दिली आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. ‘या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया’ अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. ‘महाराष्ट्रास्तव लढण्याचे’ आवाहन काळजाला भिडते.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → कर्तृत्ववान इतिहासाची आठवण ठेवून एकजुटीने महाराष्ट्रभूमीचे पांग फेडण्यासाठी जीव कुर्बान करावा हा विचार मांडला आहे.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती ।।
सुवर्णधरा खालती। निल अंबर भरले वरती ।।
→ महाराष्ट्रभूमीचा गौरव करताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात की, महाराष्ट्र हे पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी बलिदान केलेल्या प्राणांची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची अशी धरती आहे की त्या धरतीवर निळ्या आकाशाचे छत आहे.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, श्रीशिवरायांची धुरंधर राजनीती, कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही अशी टप्प्याटप्याने उलगडणारी ही कविता आस्वादताना अंगात वीरश्री संचारते. तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावा, अशी महाराष्ट्रभूमीचे नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दांत आवाहक भावना रुजवणारी ही कविता मला आवडली.

कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (इ) साठी…

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्णधरा खालती । निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी’
उत्तर:
आशयसौंदर्य: महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दांत केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट . हा आशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे.

काव्यसौंदर्य: संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात – महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. म्हणजे ही नररत्नांची खाण आहे व त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे (स्तुतिगीते) गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. ‘या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया’ अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. ‘महाराष्ट्रास्तव लढण्याचे’ आवाहन काळजाला भिडते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

• वाक्प्रचार / म्हणी:

प्रश्न 1.
पुढील म्हणी पूर्ण करा:
1. थेंबे थेंबे ………………..
2. …………… झोपा केला.
उत्तर:
1. थेंबे थेंबे तळे साचे.
2. बैल गेला नि झोपा केला.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:

  1. अंबर
  2. ध्वज
  3. मंदिर
  4. तलवार.

उत्तर:

  1. अंबर = आकाश
  2. ध्वज = झेंडा
  3. मंदिर = देऊळ
  4. तलवार = समशेर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

प्रश्न 2.
शब्दांत लपलेले चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. महाराष्ट्र
2. शासनकर्ता.
उत्तर:
1. महाराष्ट्र – महा, हारा, राष्ट्र, राम.
2. शासनकर्ता – शान, सन, कर्ता, नस.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द निवडा:
1. संयूक्त, सयुंक्त, संयुक्त, संयुत्क.
2. जन्मभूमि, जम्नभूमी, जन्मभूमी, जन्मभुमी.
उत्तर:
1. संयुक्त
2. जन्मभूमी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द दया:

  1. Bio-data
  2. Event
  3. Registered Letter
  4. Dismiss.

उत्तर:

  1. स्व-परिचय
  2. घटना
  3. नोंदणीकृत पत्र
  4. बडतर्फ.

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया Summary in Marathi

कवितेचा आशय:

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत (कवन) लिहिले. त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

शब्दार्थ:

  1. काया – शरीर.
  2. घाव – प्रहार.
  3. मंदिर – देऊळ.
  4. पुढती – पुढे.
  5. पाजळे – जळते, तेवते.
  6. याशीची – यशाची किंवा यज्ञाची.
  7. सुवर्ण – सोने.
  8. धरा – धरणी, धरती, जमीन.
  9. निल – निळे.
  10. अंबर – आकाश.
  11. गड – किल्ले.
  12. भूषवी – भूषवतात, मढवतात, सजवतात.
  13. महारथी – थोर देशभक्त.
  14. सागर – समुद्र.
  15. जयाचे – ज्याच्या.
  16. पाया – पायाला, चरणांना.
  17. मायभूमि – मातृभूमी.
  18. धीरांची – शूर धैर्यवंतांची.
  19. शासनकर्ते – राज्यकर्ते.
  20. श्रमाची – कष्टाची.
  21. त्याग – नि:स्वार्थीपणे सर्व सोडून देणे.
  22. स्मरून – आठवण करून.
  23. धुरंधर – कुशल, तरबेज, प्रमुख.
  24. पातले – आले.
  25. कंकण – कडे, बांगडी.
  26. साचे – खरे.
  27. पर्वत – मोठे डोंगर.
  28. उलथून – उचलून टाकणे.
  29. यत्न – प्रयत्न.
  30. सांधू – जोडू.
  31. खंड – तुकडे.
  32. सत्यास्तव – खरेपणासाठी.
  33. ध्वजा – झेंड्याला.
  34. करी – हातात.
  35. ऐक्याची – एकजुटीची.
  36. मनीषा – इच्छा.
  37. हिंमत – धैर्य, जिद्द.
  38. कणखर – मजबूत.
  39. पोलाद – लोखंड.
  40. आण – शपथ.
  41. जाया – जाण्यासाठी.

टिपा:

  1. पोवाडा – वीररसयुक्त शाहिरी कवन (काव्य).
  2. अरबी सागर – भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या समुद्राचे नाव.
  3. खुरपे – तण उपटण्यासाठीचे शेतकऱ्यांचे अवजार.
  4. दोरी – (1) पेरणी-लावणीच्या वेळी शेतकरी कमरेला दोरी बांधतात. (2) मोटेचे पाणी काढण्यासाठी मोटेला बांधलेला दोरखंड.
  5. शाहीर – वीररसयुक्त पोवाडे व शृंगाररसात्मक लावणी लिहिणारे व सादर करणारे कवी – गायक.
  6. पर्व – विशिष्ट कालखंड.
  7. संयुक्त महाराष्ट्र – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी मराठी माणसांनी घडवलेली चळवळ.
  8. शिंग – रानरेड्याच्या (गवा) शिंगापासून बनवलेले वायुवादय – रणशिंग (तुतारी).

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. काया ओवाळून टाकणे – जीव कुर्बान करणे.
  2. स्वप्न साकार करणे – स्वप्न प्रत्यक्षात आणणे, मनात असलेले कार्य तडीस नेणे.
  3. कंबर बांधणे (कसणे) – दृढ निश्चय करणे.
  4. करी कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे.
  5. शिंग फुकणे – लढा देण्यास सुरुवात करणे.
  6. आण घेणे – शपथ घेणे.
  7. उपकार फेडणे – कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया

कवितेचा भावार्थ:

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर म्हणतात –
कंबर कसून तयार हो, दृढ निश्चय करून घाव झेलायला ऊठ. या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर. ।।

या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यज्ञाची (यशाची) ज्योत जळत आहे. सोन्याची (नररत्नांची खाण व कसदार) धरणी खाली नि वर निळे आकाश भरले आहे. सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे. या महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे, त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण
ओवाळून टाक.।।

ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे. वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे.।।

संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून (घोर प्रतिज्ञा करून) खरोखर सज्ज झालो आहोत. प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध, अखंड राखूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुकले आहे. या महाराष्ट्रावर कुरवंडी ओवाळून टाकू.।।

महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे. हिमतीने, जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो. या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक. बलिदान दे.

9th Std Marathi Questions And Answers:

Vanvasi Question Answer Class 9 Marathi Chapter 16 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 16 वनवासी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 16 वनवासी Question Answer Maharashtra Board

वनवासी Std 9 Marathi Chapter 16 Questions and Answers

1. खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा:

  1. पांघरू आभाळ – [ ]
  2. वांदार नळीचे – [ ]
  3. आभाळ पेलीत – [ ]

उत्तर:

  1. उघड्यावर संसार आहे
  2. डोंगराच्या घळीत वानरे असतात, तिथे वास्तव्य
  3. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

2. शोध घ्या:

प्रश्न 1.
शोध घ्या:
(अ) ‘हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन’ या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण – [ ]
(आ) कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण – [ ]
उत्तर:
(अ) अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती
(आ) प्रत्येक कडव्यातील चार पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तींचे यमक जुळते.
उदा., भाकर – भोकर – ढेकर / वेगानं – यंगून – घेऊन

3. काव्यसौंदर्य:

प्रश्न 1.
‘बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राकं हसून, ‘ या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
दुपारी सूर्य तापतो. माळरानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्याबोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो; म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते; म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळींतून प्रकट झाले आहे.

प्रश्न 2.
‘डोई आभाळ पेलीत, चालू शिंव्हाच्या चालीत,’ या पंक्तींत कवीला अभिप्रेत असलेला अर्थ लिहा.
उत्तर:
आदिवासी मुले उघड्याबोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्याकड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते. परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ती मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानावर असलो; म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवींनी केले आहे.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते,’ याविषयी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतो. झाडांच्या वाळलेल्या फांदया, काटक्या घेऊन त्यांची खोपटी (झोपडी) तयार होते. रानातली फळे, कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात. ओढ्यानाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धरतीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्याखुपण्याला ते झाडपाल्यांचेच औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते; म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे नाते अतूट असते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

भाषा सौंदर्य:

लिखित मजकुरासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. विरामचिन्हांच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो व भाषेचा बाजही बिघडू शकतो. भाषा योग्य स्वरूपात अर्थवाही होण्यासाठी विरामचिन्हांच्या योग्य वापराचा अभ्यास व सराव होणे आवश्यक आहे.

प्रश्न 1.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा :

  1. ते बांधकाम कसलं आहे
  2. आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
  3. गुलाब जास्वंद मोगरा ही माझी आवडती फुले आहेत
  4. अरेरे त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले
  5. आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे

उत्तर:

  1. ते बांधकाम कसलं आहे?
  2. आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला.
  3. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत.
  4. अरेरे! त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले!
  5. आई म्हणाली, “सोनम, चल लवकर. उशीर होत आहे.”

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 16 वनवासी Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

प्रश्न 2.
पुढीलपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
1. आदिवासी मुलांचे गाव कळसूबाईच्या पलीकडे आहे.
2. आदिवासी मुलांचे गाव आभाळाच्या पलीकडे आहे.
3. आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे.
4. आदिवासी मुलांचे गाव प्रवरा नदीच्या पलीकडे आहे.
उत्तर:
सत्य विधान : आदिवासी मुलांचे गाव ओढ्याच्या पलीकडे आहे.

प्रश्न 3.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 4

आम्ही डोंगरराजाची
पोन्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.
बसू सूर्याचं रुसून
पहू चंद्राकं हसून
बोलू बाज तिकिड्याशी
नाचू घोंगडी नेसून.
घेऊ हातावं भाकर
वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून
देऊ खुशीत ढेकर.
डोई आभाळ पेलीत
चालू शिंव्हाच्या चालीत
हिंडू झाडा-कड्यांवरी
बोलू पक्ष्यांच्या बोलीत.
खेळू टेकडी भवती
पळू वाऱ्याच्या संगती
वर पांघरू आभाळ
लोळू पृथ्वीवरती.
आम्ही सस्याच्या वेगानं
जाऊ डोंगर यंगून
हात लाऊन गंगना
येऊ चांदण्या घेऊन.
आम्ही वाघाच्या लवणाचे
आम्ही वांदार नळीचे
गाव वहाळापल्याड
आम्ही उंबर माळीचे.

कृती 2 : (आकलन)

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न 1.
आदिवासी मुले खडकावर बसून खातात व आनंदाने ……………………
(य) भोकर देतात
(र) ढेकर देतात
(ल) उड्या मारतात
(व) नदीत डुंबतात
उत्तर:
1. आदिवासी मुले खडकावर बसून खातात व आनंदाने ढेकर देतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

प्रश्न 2.
आदिवासी मुले हिंडतात ती …………………
(य) डोंगरमाथ्यावर
(र) वाऱ्याबरोबर
(ल) उंबर माळीवर
(व) झाडांवर व कड्यांवर
उत्तर:
1. आदिवासी मुले हिंडतात ती झाडांवर व कड्यांवर.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी 6

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
घेऊ हातावं भाकर वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून देऊ खुशीत ढेकर
उत्तर:
प्रवरा नदीची बाळे म्हणतात-आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि शांतपणे खडकावर बसून पोटभर भाजीभाकरी खाऊन तृप्तपणे ढेकर देतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – वनवासी.
उत्तर:
वनवासी
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → तुकाराम धांडे.
2. कवितेचा विषय → कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे, हा कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. डोंगर = पर्वत
  2. खडक = दगड
  3. आभाळ = आकाश
  4. पृथ्वी = अवनी
  5. वाघ = व्याघ्र
  6. सूर्य = रवी
  7. चंद्र = शशी
  8. बोली = भाषा.

4. कवितेतून मिळणारा संदेश → आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवांच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा व त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सह-अनुभूती घ्यावी, हे उद्दिष्ट या कवितेचे आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसूआई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी-भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे-या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → वनामध्ये राहणारी आदिवासी मुले व त्यांची उत्साही वृत्ती यांचे दर्शन या कवितेतून घडते. ।

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
आम्ही सस्याच्या वेगानं
जाऊ डोंगर यंगून
हात लावून गंगना
येऊ चांदण्या घेऊन!
→ आम्ही सशाच्या गतीने डोंगर चढून जातो. आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. निसर्गात राहताना आम्हांला अनोखा आनंद होतो.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → आदिवासी लेकरांचे अनोखे भावविश्व या कवितेत मांडले आहे. डोंगरदऱ्यांत, उघड्या निसर्गात मुक्तपणे, निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही वनवासी मुले कशी जगतात, याचे प्रत्ययकारी चित्रण करणारी ही कविता आहे. संवेदनशील मनाला भावेल, असे वेगळे जीवनदर्शन व वेगळी जीवनदृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे ग्रामीण बोलीतील ही सहजसुंदर कविता मला आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘आम्ही डोंगरराजाची
पोहं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची’
उत्तर:
आशयसौंदर्य: सह्याद्रीच्या डोंगररांगांतील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी ‘वनवासी’ या कवितेत केले आहे. डोंगरदऱ्यांत आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा आशय आहे.

काव्यसौंदर्य: डोंगरदऱ्यांत, उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लेकरांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळींमध्ये साकारले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की, डोंगर आमचा राजा आहे. आम्ही डोंगरराजाची मुले आहोत. कळसूबाई शिखराच्या भवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडीबोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. भयमुक्तता व नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळींत केले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसूआई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी-भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे – या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत.

भाषाभ्यास:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

प्रश्न 1.
शब्दसंपत्ती:

  1. अनेकवचन लिहा:
  2. चांदणी
  3. पक्षी
  4. टेकडी
  5. डोंगर.

उत्तर:

  1. चांदणी – चांदण्या
  2. पक्षी – पक्षी
  3. टेकडी – टेकड्या
  4. डोंगर – डोंगर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

प्रश्न 2.
स्त्रीलिंगी रूपे लिहा:

  1. वाघ
  2. ससा
  3. सिंह
  4. वानर.

उत्तर:

  1. वाघ – वाघीण
  2. ससा – सशीण
  3. सिंह – सिंहीण
  4. वानर – वानरी.

प्रश्न 3.
जोडशब्दांचे सहसंबंध लावा: (डोंगर उघडी झाडे ) कडे )
( झुडपे ) कपारी) दऱ्या बोडकी )
उत्तर:

  1. डोंगर-दऱ्या
  2. उघडी-बोडकी
  3. झाडे-झुडपे
  4. कडे-कपारी

2. लेखननियम:

प्रश्न 1.
गटातील अचूक शब्द ओळखा:
1. खुषीथ, खूशीत, खुशीत, खूषीत.
2. घोगंडी, घोंगडी, घोंगडि, घोगडि.
उत्तर:
1. खुशीत
2. घोंगडी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा:
1. Clerk –

  1. अभियंता
  2. समावेशक
  3. लिपिक
  4. सहअध्यायी.

उत्तर:
3. लिपिक

प्रश्न 2.
Agent –

  1. अवांतर
  2. प्रतिनिधी
  3. हस्तक
  4. उपयोगी.

उत्तर:
2. प्रतिनिधी.

वनवासी Summary in Marathi

कवितेचा आशय:

वनामध्ये राहणारी आदिवासी मुले, त्यांचे जीवन, त्यांचे खेळ, खाणे-पिणे व त्यांची उत्साही वृत्ती यांचे मनोहारी वर्णन या कवितेत ग्रामीण शब्दकळेत केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

शब्दार्थ:

  1. वनवासी – रानांमध्ये राहणारे.
  2. पोहं – पोरे.
  3. उघडी बोडकी – अंगावर वस्त्र नसलेली.
  4. माई – आई (मोठी बहीण).
  5. हातावं – हातावर.
  6. खडकावं – दगडावर.
  7. वांदार – वानर, माकडे.
  8. वहाळ – ओहळ, ओढा, नाला.
  9. पल्याड – पलीकडे.
  10. माळीचे – माळरानावरचे.
  11. पहू – बघू.
  12. चंद्राकं – चंद्राकडे.
  13. बाज – शोभा.
  14. पेलीत – झेलीत.
  15. शिंव्ह – सिंह.
  16. चालीत – चालण्याची ढब.
  17. सस्या – ससा.
  18. यंगून – चढून.
  19. गंगना – आकाशाला.

टिपा:

  1. कळसू – भंडारदरा (नाशिक-घोटी) येथे असलेले सह्याद्रीचे सर्वांत उंच शिखर, कळसूबाईचे शिखर.
  2. परवरा माई – प्रवरा नदी ही माई आहे.
  3. भोकर – एक रान-वनस्पती. याच्या झाडपाल्याची व फळांची भाजी करतात.
  4. ढेकर – पोट भरल्यावर पोटातून ओठावर येणारा आवाज.
  5. वाघाचे लवण – डोंगरामधली खळगीची जागा, जिथे वाघ वस्ती करतात.
  6. वांदार नळी – डोंगरपठारावरची जागा, जिथे माकडे मोठ्या प्रमाणात असतात.
  7. उंबर माळ – जिथे उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात असतात, ते माळरान.
  8. बाज तिकिडा – आकाशातील तीन नक्षत्रांचा समूह.
  9. घोंगडी – जाड खरखरीत धाग्यांची सतरंजी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 16 वनवासी

कवितेचा भावार्थ:

डोंगर आमचा राजा आहे. आम्ही डोंगरराजाची मुले आहोत. कळसूबाई शिखराचा परिसर आमची आई आहे. उघडीबोडकी स्वच्छंद बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. (कळसूबाईच्या डोंगराचा परिसर व प्रवरा नदीचे खोरे हा आमचा रहिवास आहे.)

आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो नि निवांत खडकावर बसून भाजीभाकरी खाऊन आनंदाने तृप्त ढेकर देतो. आम्ही टेकडीभोवती खेळतो. वाऱ्याबरोबर पळतो. आम्ही आभाळ पांघरून घेतो नि माळरानाच्या जमिनीवर (पृथ्वीवर) लोळतो.

वाघ जिथे वस्तीवर असतात त्या लवणावर आम्ही असतो. वानरांचे (माकडांचे) वास्तव्य जिथे असते, त्या नळीत (घळीत) आमचा वावर असतो. ओढ्यापलीकडे आमचे गाव आहे. उंबराची झाडे असलेल्या उंबरमाळावर आम्ही असतो. दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो; पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो. रात्री आकाशातील तीन नक्षत्रांच्या तिकिड्याची शोभा बघतो नि घोंगडी अंगावर घेऊन नाचतो.

आम्ही डोक्यावर आभाळ पेलत सिंहाच्या सारखे डौलदार ऐटीत चालतो. झाडांवर चढतो, कड्यांवर चढून हिंडतो. आम्ही पक्ष्यांच्या भाषेत बोलतो. ‘3\आम्ही सशाच्या गतीने डोंगर चढून जातो. आकाशाला हात लावून , चांदण्या घेऊन येतो. (निसर्गात राहताना आम्हांला अनोखा आनंद होतो.)

9th Std Marathi Questions And Answers:

Kirti Kathiyacha Drushtant Question Answer Class 9 Marathi Chapter 3 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Question Answer Maharashtra Board

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Std 9 Marathi Chapter 3 Questions and Answers

1. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:

प्रश्न 1.
कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:
उत्तर:

  1. वानरेया – [ ]
  2. सर्वज्ञ – [ ]
  3. गोसावी – [ ]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 1

3. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

प्रश्न 1.
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उतारा:
डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करू लागलेः नाथोबाए म्हणीतलें: “नागदेयाः तू कैसा काही हीवसी ना?” तवं भटी म्हणीतलें: “आम्ही वैरागी: काइसीया हीवुः” यावरी सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि की गाः” यावरि भटी म्हणीतलें: “जी जी: निर्वीकार तो कवणः”

सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससिः” “हो कां जी:’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: “कव्हणी ऐकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असाः’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

4. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

प्रश्न 1.
पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 2

5. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच, नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.

6. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.
उत्तर:
आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विदयार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विदयार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण विदयार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वत:ची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

1. व्यतिरेक अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय – [ ] उपमान- [ ]

व्यतिरेक अलंकाराचे वैशिष्ट्य- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे मानले आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक’ अलंकार होतो.

प्रश्न 1.
पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा:
तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतल ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 3
उत्तर:

उपमेय उपमान समानगुण
तू (परमेश्वर/गुरू) माउली मायाळूपणा
चंद्र शीतलता
पाणी पातळपणा

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Additional Important Questions and Answers

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 4

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 5

प्रश्न 3.
योग्य पर्याय ओळखून विधान पूर्ण करा :
………………………, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.
उत्तर:
(य) व्यापार चांगला व्हावा
(र) लोकांचे मनोरंजन व्हावे
(ल) नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा
(व) कामातले कष्ट कमी व्हावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:
1. डोमग्रामी सकाळी सकाळी पुढील काम चालू होते: (भोगस्थानाची शुश्रूषा / जीवाचे वैराग्य /मातीचा व्यापार/मातीकाम)
2. श्रीचक्रधरस्वामी यांनी ज्यांना दृष्टान्त सांगितला, तेः (गोसावी / कठीया / नागदेवाचार्य / पुजारी)

उत्तर:

1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 6

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 7

3. नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.

4. मातीकाम

  1. नागदेवाचार्य.

5. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश: आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली, तर त्याचासुद्धा अहंकार बाळगता कामा नये. हा अहंकार म्हणजे विकारच होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले, तर तो खरा वैरागी होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:

  1. महानुभाव पंथाचे संस्थापक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू)
  2. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ – (गोविंदप्रभुचरित्र, श्रीकृष्णचरित्र, लीळाचरित्र, दत्तात्रयप्रभुचरित्र)
  3. लीळाचरित्राचे लेखक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
  4. श्रीचक्रधरस्वामींचे गुरू – (भटोबास, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
  5. ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ हा दृष्टान्त कथन करणारे – (नाथोबास, नागदेव, म्हाइंभट, श्रीचक्रधरस्वामी)

उत्तर:

1. [नागदेवाचार्य]

  1. [श्रीचक्रधरस्वामी]
  2. [श्रीचक्रधरस्वामी]

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 8

3. श्रीचक्रधरस्वामी

  1. लीळाचरित्र
  2. म्हाइंभट
  3. श्रीगोविंदप्रभू
  4. श्रीचक्रधरस्वामी

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

समास:

  • कमीत कमी दोन शब्द एकत्र येण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात.
  • दोन शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
  • सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.

उदा.,

दोन शब्द सामासिक शब्द विग्रह
1. भाऊ/बहीण भाऊबहीण भाऊ आणि बहीण
2. नील/कमल नीलकमल नील असे कमल
3. तीन/कोन त्रिकोण तीन कोनांचा समूह

समासाचे प्रकार:

  1. समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
  2. समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
    पहिला शब्द → पहिले पद दुसरा शब्द → दुसरे पद
  3. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद ( – )

समासांचे मुख्य चार प्रकार होतात:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 9

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

लक्षात ठेवा:

  1. अव्ययीभाव समास → पहिले पद प्रधान (उदा., दररोज).
  2. तत्पुरुष समास → दुसरे पद प्रधान (उदा., विदयालय, क्रीडांगण).
  3. वंद्व समास → दोन्ही पदे प्रधान (उदा., भाऊबहीण).
  4. बहुव्रीही समास → दोन्ही पदे गौण (उदा., नीळकंठ).

या इयत्तेत आपल्याला:

1. कर्मधारय
2. द्विगू
3. वंद्व (इतरेतर/वैकल्पिक/समाहार)
हे समास शिकायचे आहेत.

1. कर्मधारय समास:

  • कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
  • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 10
म्हणून ‘नीलकमल, मातृभूमी’ हे कर्मधारय समास आहेत.

2. द्विगू समास

  • द्विगू समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
  • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या तत्पुरुष समासाला द्विगू समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 11
म्हणून ‘त्रिकोण, नवरात्र’ हे द्विगू समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. द्ववंद्ववं समास:

ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्याला वंद्व समास म्हणतात.

द्ववंद्ववं समासाचे उपप्रकार:

द्वंद्व समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे

  1. इतरेतर द्वंद्व
  2. वैकल्पिक द्वंद्व व
  3. समाहार वंद्व असे तीन उपप्रकार पडतात.

1. इतरेतर द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष
2. आईवडील → आई व वडील

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘आणि’, ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात, तेव्हा त्यास इतरेतर वंद्व समास म्हणतात.
म्हणून ‘स्त्रीपुरुष, आईवडील’ हे इतरेतर द्वंद्व समास आहेत.

2. वैकल्पिक द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:
1. सुखदुःख → सुख किंवा दुःख
2. भेदाभेद → भेद किंवा अभेद

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘किंवा’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला. जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘किंवा, अथवा, वा’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात व दोन्ही पदे परस्परविरोधी असतात, तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘सुखदुःख, भेदाभेद’ हे वैकल्पिक द्वंद्व समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. समाहार वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. गप्पागोष्टी → गप्पा, गोष्टी वगैरे
2. मीठभाकर → मीठ, भाकर वगैरे

वरील दोन्ही सामासिक शब्दांत अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणून त्यांचा विग्रह करताना आपण ‘वगैरे’ या शब्दाचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांत इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्यांचा विग्रह करताना ‘वगैरे, इतर, इत्यादी’ अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘गप्पागोष्टी, मीठभाकर’ हे समाहार वंद्व समास आहेत.

4. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:

  1. त्रिगुण
  2. भाऊबहीण
  3. नीलकमल
  4. स्त्रीपुरुष.

उत्तर:

  1. त्रिगुण → तीन गुणांचा समूह
  2. भाऊबहीण → भाऊ आणि बहीण
  3. नीलकमल → निळे असे कमल
  4. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

5. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द वाचून उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा: (नम्रता, उपवास, विरोधक, ममत्व)
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
उपवास नम्रता
विरोधक ममत्व

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
1. बरवे = ……………….
2. दृष्टान्त = ……………..
उत्तर:
1. बरवे = चांगले
2. दृष्टान्त = दाखला.

प्रश्न 2.
प्रचलित मराठीतील समानार्थी शब्द लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 12
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 13

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
1. सुरुवात × ……………
2. प्राचीन × ……………
उत्तर:
1. सुरुवात – शेवट
2. प्राचीन × अर्वाचीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
पुढील शब्दापासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा : वीकारावेगळा : ……………………
उत्तर:

  1.  काळा
  2. राग
  3. वेग
  4. वेळा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. निर्वीकार, निविर्कार, निर्विकार, नीर्विकार.
2. दृश्टांत, दुष्ट्रान्त, दृष्टान्त, दृष्टांत.
उत्तर:
1. निर्विकार
2. दृष्टान्त.

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Summary in Marathi

प्रस्तावना:

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. इ. स. 1283 च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला आहे. महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य म्हाइंभट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ते बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी होते.

‘लीळाचरित्र’ म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे चरित्र होय. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर म्हाइंभटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामींच्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणी म्हणजे ‘लीळाचरित्र’ होय. यांतील एकेक आठवण म्हणजे एकेक लीळा होय. येथे कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे.

प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार-वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हासुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. तीच या पाठात सांगितली आहे.

हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

पाठाचा सरळ अर्थ:

एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्रीचक्रधरस्वामींकडे मातीकाम चालू होते. त्या वेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र भटोबास (नागदेवाचार्य) यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना , विचारले, “नागदेवा, तुला कशी थंडी वाजत नाही?” तेव्हा नागदेव म्हणाले, “आम्ही वैरागी. आम्हां वैराग्यांना कसली आली थंडी!’

त्यावर स्वामी म्हणाले, “राजे हो, (हे नरश्रेष्ठा,) प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हासुद्धा एक विकारच आहे.” मग नागदेवांनी विचारले, “हो; तर मग निर्विकार कोण?”

स्वामी उत्तरले, “जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय?” नागदेव म्हणाले, “बरं, बरं.’ त्यावर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितला. तो दृष्टान्त असा: कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची (नैवेदयाच्या जागेची) देखभाल करीत असे. साफसफाई करीत असे. सडासंमार्जन करीत असे. (जमीन सारवून रांगोळी काढीत असे.) ते पाहून गावकरी म्हणू लागले, “गुरवांनो, तुम्ही खूप नेटके करीत आहात. छानच करीत आहात.” ते ऐकून तो पुजारी (स्तुतीने खूश झाला आणि) रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले. अन्य काही नाही.

शब्दार्थ:

  1. सी बाजत होते – थंडी वाजत होती.
  2. व्यापार – काम.
  3. होववे ना – होईना, करता येईना.
  4. हीवसी ना – गारठला नाहीस, थंडी वाजली नाही.
  5. काइसीया – कशी काय, का, कशाला, कोणत्या कारणाने.
  6. हीवु – थंडी, गारठा.
  7. कवण – कोण.
  8. केव्हेळाही – कधीही.
  9. जालाचि – झालाच.
  10. कठीया – गुरव, पुजारी.
  11. भोगस्थान – देवाला नैवेदय दाखवण्याची जागा.
  12. सडासंमार्जन – सकाळी झाडलोट करून, जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढणे.
  13. गावीचे – गावातले लोक, गावकरी.
  14. नीके – स्वच्छ, शुद्ध, नीटनेटके.
  15. बरवे – छान, चांगले.
  16. आइकौनी – ऐकून.
  17. दीसवडी – दररोज, प्रतिदिनी.
  18. नेदी – देत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

टिपा:

1. डोमग्राम – डोंबेग्राम (गावाचे नाव), सध्याचे नाव ‘कमालपूर’, ता. नेवासे, जिल्हा अहमदनगर.

2. पाठात उल्लेखलेल्या व्यक्ती:

  1. गोसावी – श्रीचक्रधरस्वामी.
  2. भक्तीजन – श्रीचक्रधरस्वामींचे भक्त.
  3. भट – नागदेवाचार्य, ज्येष्ठ भक्त. यांनाच भट, भटोबास, नागदेव या नावांनीही संबोधले जाई. ते सतत चपळतेने वावरत. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी आपले भक्त नागदेव यांना प्रेमाने ‘वानरा’, ‘वानरेश’ असे संबोधित असत. ‘वानर’ किंवा ‘वानरेश’ यांमधील ‘वा’ हा प्रशंसावाचक शब्द असून, ‘नर’ किंवा ‘नरेश’ म्हणजे नरश्रेष्ठ राजा हा अर्थ पंथीय परंपरेनुसार रूढ झालेला आहे. ‘वानरा/वानरेश’ म्हणजे ‘वा राजे’ किंवा ‘वा नरश्रेष्ठा’ असा पंथीय परंपरेतील रूढ अर्थ आहे.
  4. सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी.
  5. कठीया – गुरव, पुजारी, मंदिरातील पूजाअर्चा, मूर्त्यांची देखभाल, गाभाऱ्याची देखभाल वगैरे कार्ये ज्याच्यावर सोपवलेली असतात ती व्यक्ती.
  6. गावीचे – गावचे, गावातील लोक, गावकरी, ग्रामस्थ.

3. दृष्टान्त – एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते, त्या वेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला ‘दृष्टान्त’ किंवा ‘दृष्टान्तकथा’ म्हणतात. इसापनीतीमधील सर्व कथा या दृष्टान्तकथाच होत.

4. महानुभाव पंथ: हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे. इसवी सनाच्या १३व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. , रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन पुढे दोन-तीन शतके या पंथाचा खूप प्रसार झाला. विशेषतः महाराष्ट्र, त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते मध्य भारत, पंजाब व काश्मीर एवढ्या भूभागांत या पंथाची वाढ है अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या झाली.

हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता. कर्मकांडांतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातिनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे आहेत.

5. श्रीचक्रधरस्वामी: हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत. रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र, ते कोमल अंत:करणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे, तर प्राणिमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे.

9th Std Marathi Questions And Answers:

Big 5 Chya Sahavasat Question Answer Class 9 Marathi Chapter 15.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Question Answer Maharashtra Board

‘बिग 5’ च्या सहवासात Std 9 Marathi Chapter 15.1 Questions and Answers

1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
उत्तर:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

2. टिपा लिहा:

प्रश्न 1.
केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2.
‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1.
प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

‘बिग 5’ च्या सहवासात Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लेखकांनी आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची माहिती त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह मांडली आहे. तसेच केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयी अनोखा तपशील दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. जंगलांचा फेरफटका मारणे व त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे, हे ‘थ्रिल’ असते.

2. आफ्रिकेतील जंगलांचे स्वरूप दोन प्रकारचे आहे: (1) काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचे जंगल. (2) काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल. घनदाट झाडीपेक्षा झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणे सोपे असते. जंगलात फिरताना ‘चिकाटी’ व ‘नशीब’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

3. केनिया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ चार-पाच तासांचा ‘गेम ड्राइव्ह’ (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटडोर गाड्या व फोरव्हीलर्सची व्यवस्था असते. जंगलात फिरताना या मोटारीचे छप्पर उघडण्यात येते. त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. त्यामुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो; आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो व जनावरांच्या ठिकाणांच्या सूचना देता येतात.

4. वासोनैरो नदीच्या काठी वसलेले ‘सरोवा साभा लॉज’ची रचना आकर्षक आहे. जणू झाडांवर उभारलेली पंचतारांकित झोपडी. वासोनैरो नदीची वैशिष्ट्ये:

  1. तिच्यात जवळजवळ सहा फूट लांबीच्या अजस्र शेकडो मगरी आहेत.
  2. दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.
  3. आदिवासी मगरींच्या नजरा चुकवून धाडसाने नदी ओलांडतात.
  4. कधी कधी सुस्त पडलेली मगर चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते.

5. अंबरडट्स नॅशनल पार्क हे घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्क लॉजची वैशिष्ट्ये:

  1. संपूर्ण लाकडांच्या खोल्या व सभोवती पाण्याचे मोठे डबके.
  2. डबक्याजवळ प्रचंड दलदलीत खनिजयुक्त मीठ मिसळल्यामुळे जनावरे आकर्षित होतात व पाणी पिण्यासाठी येतात.
  3. लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरी असल्यामुळे तिथून जनावरांचे दर्शन होते व फोटो काढता येतात.
  4. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट.
  5. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो.
  6. दुर्मीळ जनावरे आली की प्रवाशांना उठवण्यासाठी बेलची व्यवस्था.

6. नकुरू तलाव व पार्क हा आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर आहे. नकुरू तलाव व पार्कची वैशिष्ट्ये:

  1. गुलाबी रंगाच्या दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचे वास्तव्य.
  2. दुर्बिणीतून फ्लेमिंगोंच्या हालचाली, तुरुतुरु पळणे, त्यांची परेड प्रेक्षणीय असते.
  3. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव खाऱ्या पाण्याचा आहे.
  4. फ्लेमिंगो मूळचे इथले. याच्या निळ्याशार पाण्यात फ्लेमिंगो अन्न शोधतात.
  5. पक्षिप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क मोठा खजिनाच आहे.
  6. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत.

7. ‘बिग 5’ म्हणजे आकाराने मोठे असलेले पाच प्राणी :

  1. सिंह
  2. लेपर्ड-चित्ता
  3. गेंडा
  4. हत्ती
  5. जंगली म्हैस.

या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते.

8.  नकुरू तलाव ते मसाईमारा हा प्रवास लेखकांनी मोटारीने केला; कारण गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक होती. सरिना लॉजमध्ये जायच्या आधी लेखक व त्यांच्या साथीदारांना वनराज सिंह व त्याचे कुटुंब यांचे दर्शन घडले.

9. सिंहाची वैशिष्ट्ये:

  1. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात.
  2. सिंहीण अडचणीत असली, तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो.
  3. सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो. पण त्याचा स्टॅमिना खूप कमी. म्हणून 200 मीच्या टप्प्यात असलेलेच सावज पकडतो.
  4. सुमारे 30 जणांचे कुटुंब असते.
  5. सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते.
  6. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. तरस त्याची पिल्ले पळवतात.
  7. नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही; कारण तरस त्यांना खातात.
  8. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे.

10. लेपर्डची वैशिष्ट्ये:

  1. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. मारलेले जनावर तो ओढत झाडावर चढवू शकतो.
  2. लेपर्डची शेपटी लांब असते. टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.
  3. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो.
  4. त्याची दृष्टी व श्रवणयंत्रे खूप तीक्ष्ण असतात.
  5. त्याचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
  6. लेपर्डच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.

11. चित्ता व त्याची वैशिष्ट्ये:

  1. जगातील सर्वांत चपळ प्राणी. ताशी 100 किमी वेगाने पळतो.
  2. त्याचे शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व पाय लांब असतात.
  3. शिकार करायची पद्धत वेगळी आहे. सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला चढवतो नि गुदमरून टाकून त्याला मारतो.
  4. शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो; कारण तरस आयती मिळालेली शिकार खाऊन टाकतात.

12. केनियाची अर्थव्यवस्था प्रमुख चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे:

  1. पर्यटन
  2. कॉफी
  3. चहा
  4. फुले (गुलाब). यात पर्यटन महत्त्वाचे आहे.

केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची भूमिका: पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना पाळावयाचे नियम:

  1. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदीच दुर्मीळ प्राणी दिसला, तर झुडपात शिरावे; पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.
  2. जनावरांच्या जवळ बोलू नये; टाळ्या वाजवू नयेत, खायला घालू नये.
  3. ‘बिग 5’च्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये.
  4. जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये.
  5. नियम मोडणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार सरकारने रेंजर्सना दिले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani Jaisa Vruksha Nene Question Answer Class 9 Marathi Chapter 2.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Kumarbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Question Answer Maharashtra Board

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Std 9 Marathi Chapter 2.1 Questions and Answers

1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 1

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

2. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 2

3. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:

प्रश्न 1.
पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष
2. सुख
3. सम

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

प्रश्न (आ)
‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.

उपक्रम:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे….’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

भाषा सौंदर्य:

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा बाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार.

अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, आता उपमेय आणि उपमानातील साधावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया.

1. रूपक अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखा :
1. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 3
2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5

2. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये-

1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य.
2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे.
3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इ. साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर.

उपमेय व उपमान (कमल व नयन) यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे ‘रूपक’ अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत (उपमा) किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे (उत्प्रेक्षा) असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

3. जेव्हा वाक्यांत उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक’ अलंकार होतो.

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
उपमेय – [ ]
उपमान – [ ]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.

वृक्ष संत
मान-अपमान जाणत नाहीत. निंदा-स्तुती समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5.1

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. सज्जनांची भेट होणे म्हणजे ……..”ची गाठ पडणे होय. (भक्ती-मुक्ती/जिवा-शिवा/सुख-दु:ख/निंदा-स्तुती)
2. कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला ——— नका असे म्हणत नाहीत. (मोडू/सोडू/तोडू/छेडू)
उत्तर:
1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
2. सज्जनांची भेट होणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे होय.
कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला तोडू नका असे म्हणत नाहीत.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 6
उत्तर:
[पूर्ण धैर्यवंत] [संत]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कृती 4 : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.

लक्षात ठेवा:

1. इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (आ) हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न 2 (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 7

2. वरील 8 कृतींपैकी कृतिपत्रिकेत 1-1 गुणाच्या पहिल्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती विचारली जाईल.
उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

3. ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा:

1. कवींचे/कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.
2. कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
3. कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.

महत्त्वाची नोंद: परीक्षेत आठपैकी कोणत्याही 3 कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृतींचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व 8 कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत. आशयावर आधारलेल्या प्रत्येकी 2 गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विदयार्थी स्वत:च्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिह शकतात.

उत्तर: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
  2. कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
  3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)
  4. वृक्ष = झाड
  5. चित्त = मन
  6. निंदा = नालस्ती
  7. सम = समान
  8. धैर्य = धीर
  9. जीव = प्राण.

4. कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

रसग्रहण:

इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

1. पठित पदयांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
2. काव्यसौंदर्य: यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
3. भाषिक वैशिष्ट्ये: यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: ‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:
नोंद : सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. निंदा करणे
2. स्तुती करणे.
उत्तर:
1. निंदा करणे – अर्थ : नालस्ती करणे.
वाक्य: कुणीही कुणाची कधीही निंदा करू नये.
2. स्तुती करणे – अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य: गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मोहितची सरांनी वर्गात स्तुती केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

  1. वृक्ष
  2. सुख
  3. सम.

उत्तर:

  1. वृक्ष = झाड, तरू
  2. सुख = आनंद, समाधान
  3. सम = समान, सारखेपणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मान
  2. निंदा
  3. सुख
  4. पूर्ण.

उत्तर:

  1. मान × अपमान
  2. निंदा × स्तुती
  3. सुख × दुःख
  4. पूर्ण × अपूर्ण.

प्रश्न 3.
पुढे दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा:
नोंद: सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद (रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे)
उत्तर:

  1. रेखणे – रेखीव – रेखीव आकृती
  2. कोरणे – कोरीव – कोरीव काम
  3. ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्ट
  4. घोटणे – घोटीव – घोटीव शिल्प
  5. राखणे – राखीव – राखीव जागा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. सतजन, सज्जन, सजन्न, साज्जन.
2. स्तुती, स्तूती, स्तुति, स्तूति.
उत्तर:
1. सज्जन
2. स्तुती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

उपक्रम:

प्रश्न 1.
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Summary in Marathi

कवितेचा आशय:

या अभंगात संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ:

  1. जैसा – जसा.
  2. वृक्ष – झाड.
  3. नेणे – जाणत नाही.
  4. मान – सन्मान, गौरव.
  5. अपमान – अवमान.
  6. तैसे – तसे.
  7. सज्जन – संत.
  8. वर्तताती – वागतात, वर्तन करतात.
  9. चित्ती – मनात.
  10. तया – त्यांना.
  11. अथवा – किंवा. छेदू
  12. नका – तोडू नका.
  13. निंदा – नालस्ती, अपमानकारक बोलणे.
  14. स्तुती – प्रशंसा.
  15. सम – समान, सारखे.
  16. धैर्यवंत – हिंमतवान, गंभीर, निश्चल.
  17. भेटी – गाठभेट.
  18. जीव – प्राण.
  19. शिव – परब्रह्म, परतत्त्व.
  20. गांठी – एकत्र येणे.
  21. जाय – होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात – ज्याप्रमाणे वृक्षाला (झाडाला) मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत; त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे (सज्जनांचे) वर्तन असते. ।।1।।

कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली, तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. ।।2।।
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना ‘तोडू नका’ असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।3।।

तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।4।।

संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।5।।

9th Std Marathi Questions And Answers:

Olympic Vartulancha Gof Question Answer Class 9 Marathi Chapter 17 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Question Answer Maharashtra Board

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Std 9 Marathi Chapter 17 Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न (आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 4

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
पहिले ऑलिंपिक व्हिलेज ……….. येथे वसले.
(अ) ग्रीस
(आ) मेलबोर्न
(इ) फ्रान्स
(ई) अमेरिका
उत्तर:
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
पहिले ऑलिंपिक सामने ……… साली झाले.
(अ) 1894
(आ) 1956
(इ) इ. स. पूर्व 776
(ई) इ. स. पूर्व 394
उत्तर:
पहिले ऑलिंपिक सामने इ. स. पूर्व 776 साली झाले.

3. पुढील वाक्य वाचा. त्यातील शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला पुढील मुद्दे लागू नसतील, तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ या शब्दासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.

प्रश्न 1.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 5.1

4. स्वमत:

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

उपक्रम:

प्रश्न 1.
सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून पुढील तक्त्यात लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 6

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

ब्रीदवाक्यातील शब्द अर्थ
1. सिटियस 1. ………………….
2. …………………….. 2. ………………….
3. …………………….. 3. तेजस्विता

उत्तर:

ब्रीदवाक्यातील शब्द अर्थ
1. सिटियस 1. गतिमानता
2. ऑल्टियस 2. उच्चता
3. फॉर्टियस 3. तेजस्विता

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
ऑलिंपिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग:

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. काळा.

उत्तर:

  1. लाल
  2. पिवळा
  3. निळा
  4. हिरवा
  5. काळा.

प्रश्न 2.
विधाने पूर्ण करा:
ऑलिंपिक ध्वजावरील पाच वर्तुळे म्हणजे जगातील

  1. …………………
  2. …………………
  3. …………………
  4. …………………
  5. युरोप हे पाच खंड.

उत्तर:

  1. आफ्रिका
  2. अमेरिका
  3. आशिया
  4. ऑस्ट्रेलिया

प्रश्न 3.
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे
उत्तर:
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिकच्या खेळांचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा.
उत्तर:
माणूस हा मुळात प्राणीच आहे. त्याच्या मनात हिंसा ठासून भरलेली आहे. या ना त्या कारणाने मनातली हिंसा स्फोटासारखी बाहेर पडते आणि माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. आदिमानवाच्या काळापासून हे चालू आहे. परका एखादा माणूस दुसऱ्या माणसाला दिसला, तरी ते एकमेकाला ठार मारायला धावत. आतासुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढाया करतात हे थांबावे, आपापसात प्रेम वाढावे, जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिंपिकसारखे खेळ भरवले जातात. या खेळांमुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते. दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान मिळते. जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते, ऑलिंपिक खेळांचा हा फार मोठा फायदा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 8

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1.
……………. या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.
(अ) इ. स. पू. 1936
(आ) इ. स. पू. 18965
(इ) इ. स. पू. 394
(ई) इ. स. पू. 776
उत्तर:
(३) इ. स. पू. 394 या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 10

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 12

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
सूचनेनुसार कृती करा:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती लिहा.

  1. …………………………….
  2. ……………………………
  3. ……………………………

उत्तर:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती:

  1. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येई.
  2. अनेक शहरे भेदभाव विसरून यशस्वी खेळाडूंचे प्रचंड स्वागत करीत असत.
  3. राष्ट्रीय सणांच्या वेळी या खेळाडूंना मानाचे स्थान देण्यात येई.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
ऑलिंपिक स्पर्धांचा तुम्हांला जाणवणारा महत्त्वाचा गुण सांगा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर:
विराटता हा ऑलिंपिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे, असे मला वाटते. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व देश यात सहभागी होतात. त्यामुळे ऑलिंपिकच्या स्पर्धा संपूर्ण जगाला व्यापून टाकतात. या स्पर्धांचे आयोजनही विराट असते. एक विशाल ऑलिंपिक गाव वसवले जाते. खेळांसाठी एक विशाल मैदान केले जाते. त्याभोवती एक प्रचंड प्रेक्षागार उभारले जाते. रहदारीसाठी खास सडका, लोहमार्ग बांधले जातात.

खेळाडूंसाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे उभारली जातात. त्याच्या जोडीने विशाल उपाहारगृहे बांधली जातात. संपूर्ण जगातून आलेले पाच-सहा हजार खेळाडू सहभागी होतात. लाखभर प्रेक्षक मैदानातील खेळ प्रत्यक्ष पाहतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप तिथे अवतरते. या विराटतेमुळे आपण कोणा एका देशाचे, धर्माचे राहत नाही. सर्व मानवजात एक बनते. संकुचितपणा कमी होतो. वैर नाहीसे होते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे कार्य ऑलिंपिक स्पर्धा करतात. हे ऑलिंपिक स्पर्धांचे सर्वांत मोठे कार्य आहे.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. आधुनिक ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा.
2. 1936 सालच्या ऑलिंपिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला.
उत्तर:
1. कुबर टीन
2. फ्रान्समध्ये

प्रश्न 2.
कुठे ते लिहा:
1. 1894 साली ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली.
2. 1936 साली ऑलिंपिक स्पर्धा भरल्या.
उत्तर:
1. जेसी ओवेन्स.
2. बर्लिनमध्ये.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. 1894 सालच्या ऑलिंपिक काँग्रेसमध्ये प्राचीन ऑलिंपिक सामन्यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
2. क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते.
उत्तर:
1. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि विविध देशांतील मैत्री वाढवण्यासाठी.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही म्हणून.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोणी ते लिहा:
1. ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवली.
2. अनवाणी पायाने मॅरेथॉन शर्यत जिंकली.
उत्तर:
1. एमिल झेटोपेक याने.
2. अबेबे बिकिला याने.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडणारी.
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू.
उत्तर:
1. फॅनी बँकर्स
2. ध्यानचंद.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 14

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 15
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 16

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
खेळामुळे एकात्मतेचा संदेश देणारा तुमच्या आठवणीतील प्रसंग लिहा.
उत्तर:
सचिन तेंडुलकर हा माझा अत्यंत लाडका क्रिकेट खेळाडू अवस्था झाली होती. पाकिस्तानातील क्रीडारसिकही तन्मयतेने त्याचे आहे. माझा एकट्याचाच नव्हे, तर तो सर्वांचाच, सर्व क्रीडारसिकांचा भाषण ऐकत होते. ही खरी एकात्मता. ती सचिन या अलौकिक . लाडका खेळाडू आहे. त्याला भारतरत्न देण्याची सूचना जेव्हा पुढे का खळाडू आह. त्याला भारतरत्न चाचा सूचना जहा पुन , खेळाड़मळे निर्माण झाली होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:

सामासिक शब्द समास
1. त्रिभुवन द्विगू
2. छोटेमोठे वैकल्पिक द्ववंद्ववं
3. गंधफुले समाहार द्ववंद्ववं
4. गुणिजन कर्मधारय
5. अहिनकुल इतरेतर द्ववंद्ववं

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
तक्ता भरा: (सामाजिक, राष्ट्रीय, अनंत, विशेष)
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
अनंत सामाजिक
विशेष राष्ट्रीय

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:

  1. पर्वणी असणे
  2. हास होणे
  3. ख्याती मिळवणे
  4. प्रशंसा करणे.

उत्तर:
1. पर्वणी असणे- अर्थ: आनंदसोहळा असणे.
वाक्य: ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणी असते.

2. -हास होणे- अर्थ : नाश होणे.
वाक्य : पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

3. ख्याती मिळवणे- अर्थ : प्रसिद्धी मिळवणे.
वाक्य : ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली.

4. प्रशंसा करणे- अर्थ : स्तुती करणे.
वाक्य: ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रतिशब्द लिहा:

  1. ध्वज
  2. धवल
  3. श्रम
  4. देश.

उत्तर:

  1. ध्वज = झेंडा
  2. धवल = पांढरे
  3. श्रम = कष्ट
  4. देश = राष्ट्र.

प्रश्न 2.
वचन ओळखा:

  1. वर्तुळ
  2. गोफ
  3. क्रीडा
  4. खेळ.

उत्तर:

  1. नपुंसकलिंग
  2. पुल्लिग
  3. स्त्रीलिंग
  4. पुल्लिग.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील शब्द शुद्ध करून लिहा:

  1. वसतीगृहे
  2. तेजस्वीता
  3. अंतरराष्ट्रिय
  4. बलंसर्वधन
  5. ईतीहास
  6. वीश्वबंधूत्त्व

उत्तर:

  1. वसतिगृहे
  2. तेजस्विता
  3. आंतरराष्ट्रीय
  4. बलसंवर्धन
  5. इतिहास
  6. विश्वबंधुत्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1.  साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला केवढे कौतुक केले

2. रहदारीसाठी अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती वसतिगृहे बांधली.
उत्तर:
1. साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले!
2. रहदारीसाठी अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती, वसतिगृहे बांधली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
1. Government Letter
2. Medical Examination.
उत्तर:
1. शासकीय पत्र
2. वैदयकीय तपासणी.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Summary in Marathi

प्रस्तावना:

बाळ ज. पंडित हे ख्यातनाम क्रीडासमालोचक होते. विशेष म्हणजे ते मैदानावरही क्रिकेट प्रत्यक्ष खेळले होते. रणजी चषक सामन्यांत त्यांचा सहभाग होता. त्यांना महाराष्ट्र संघातही स्थान मिळाले होते. मात्र, समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले. खेळ व खेळाडूंवर त्यांनी भरपूर लेखन केले. साध्यासोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष होता.

प्रस्तुत पाठात लेखकांनी ऑलिंपिकचे स्वरूप मोजक्या शब्दांत कथन केले आहे. ऑलिंपिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिंपिकचे महत्त्व, ऑलिंपिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती त्यांनी प्रस्तुत पाठात दिली आहे. ऑलिंपिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

शब्दार्थ:

  1. अनन्यसाधारण – एकमेव, त्याच्यासारखे तेच.
  2. ब्रीदवाक्य – घोषवाक्य.
  3. शिकस्त – प्रयत्न.
  4. बलसंवर्धन – सामर्थ्याची जोपासना.
  5. बसवण्याची – स्थापन करण्याची, निर्माण करण्याची.
  6. पुनरुज्जीवन – नूतनीकरण, जीर्णोद्धार, मृतवत असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे.
  7. अनवाणी – पायात चपला वगैरे काहीही न घालता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. पुनरुज्जीवन करणे – बंद पडलेली, स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे.
2. ज्योत तेवत ठेवणे – चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Hasyachitratli Mula Question Answer Class 9 Marathi Chapter 5.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Question Answer Maharashtra Board

हास्यचित्रांतली मुलं Std 9 Marathi Chapter 5.1 Questions and Answers

1. खालील फरक लिहा:

प्रश्न 1.
खालील फरक लिहा:

व्यंगचित्र हास्यचित्र

उत्तर:

व्यंगचित्र हास्यचित्र
हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो. केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

2. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 1
उत्तर:

  1. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
  2. केवळ हसवणे हा हेतू नसतो.
  3. आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
  4. गमतीदार विचार मांडलेला असतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे.

या चित्रांतून-(1) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते; ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे व (2) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांची रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत.

भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सर्जनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मलाही वाटते.

उपक्रम:

प्रश्न 1.
5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.

प्रश्न 2.
खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा. सांगा:

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर… कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं 2
उत्तर:
1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.

2. योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे; पाण्याचा गैरवापर करणे ; पाणी प्रदूषित करणे; उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली.

3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.

4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:

  1. पाण्याची बचत करणे.
  2. पाण्याचा गैरवापर टाळणे.
  3. पाण्याचा योग्य साठा करणे.
  4. जलप्रदूषण टाळणे.
  5. पाणी वाया न दवडणे.
  6. पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
  7. पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.

5. घोषवाक्ये:

  1. पाण्याचा गैरवापर करू नका
  2. जलप्रदूषण थांबवा
  3. पाणी साठवा, पाणी वाचवा
  4. पाणी वाया दवडू नका
  5. पाणी आहे, तर जीवन आहे पाणी नाही, तर मरण आहे
  6. पाण्याची बचत म्हणजे
  7. जीवनाची बचत
  8. जल-अभियान सुरू करा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

भाषाभ्यास:

1. चेतनगुणोक्ती अलंकार:

1. खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., “नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
…. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।” (कृ. ब. निकुम्ब)

1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या ? [ ] [ ]
2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? [ ] [ ]
3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? [ ] [ ]

चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये –

1. अचेतन वस्तूंना सचेतन मानले जाते.
2. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.

2. अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.

3. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट – [ ]
2. अचेतन गोष्टीने केलेली कृती – [ ]
3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? – [ ]

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लहान मुलांसाठी/मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे दिली आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र यांत फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो.
2. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद , करणे सोपे असते पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे.

काही हास्यचित्रांचे विश्लेषण:

1. शि. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे.

2. पहिल्या चित्रात उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. दुसऱ्या चित्रात एक बालक देवाला ‘बॅडमिंटनचे शटल’ (फूल) वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सदयः परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केले आहे. चित्र व हास्यचित्र यांत मूलभूत फरक – चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार है हुबेहूब नक्कल असते.

3. डेव्हिड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही दोन हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा ‘लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा’ फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव – बिचकणे, घाबरणे, कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शिताफी – हे सर्व पाहून हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा अहे. काहीतरी मिळावे म्हणून एरव्ही लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली ‘सेफ्टी पिन’ टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते.

4. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसवून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव, यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते.

5. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू, ‘नदीचे पाणी कुठे जाते?’ असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे. ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात ‘नदीत चावी पडली, म्हणून विचारतोय.’ या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे.

6. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते – हा विचार किती खुबीने सांगितला आहे!

7. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला देह (शरीर) हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे सिद्ध होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं

अशा प्रकारे, लहान मुलांचे चित्र काढताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात:

  1. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते.
  2. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात.
  3. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात.
  4. लहान मुलांना दाढी-मिशी नसते.
  5. व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.

9th Std Marathi Questions And Answers:

Dupar Question Answer Class 9 Marathi Chapter 7 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 7 दुपार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 7 दुपार Question Answer Maharashtra Board

 दुपार Std 9 Marathi Chapter 7 Questions and Answers

1. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 1
उत्तर:

कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
1. कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. कार्यालयात खुर्चीत बसून काम  करतात.
2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात. सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात.
3. शारीरिक कष्ट अमाप. शारीरिक कष्ट कमी.
4. साधने कष्टाची असतात. संगणकासारखे आधुनिक उपकरण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

2. कोण ते लिहा:

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
(आ) दुपारला आनंद देणारा घटक – [ ]
(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी – [ ]
(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक – [ ]
(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार – [ ]
(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ – [ ]
उत्तर:
(अ) शेतकरी
(आ) मधल्या सुट्टीत खेळणारी मुले.
(इ) कार्यालयांतील लेखनिक व हिशोबतपासनीस.
(ई) दुपार
(उ) तारुण्य.
(ऊ) दुपार

3. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 3

4. डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.

प्रश्न 1.
डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.
उत्तर:
हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
स्पष्टीकरण: खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूंवर) मानवी भावनांचे आरोपण केले अहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

5. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:
उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती

  1. रस्ता – बाट, मार्ग, पादचारी, पथ
  2. पर्वत – नग, गिरी, शैल, डोगर
  3. ज्ञानी – मुश, सुकर, डोळस, जाणकार
  4. डौल – जोम, ऐट, दिमाख, स्वाब
  5. काळजी – चिंता, स्याबदारी, विवंचना, फिकीर.

उत्तर:

  1. पादचारी
  2. नग
  3. सुकर
  4. जोम
  5. जबाबदारी

6. स्वमत

प्रश्न (अ)
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
उत्तर:
आठवीनंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यांत आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठाच आधार असतो. क्वचित केव्हातरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले.

क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी! पिझ्झा पार्टी, आइस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हांला खूप आवडते. त्या वेळी आम्ही आमचे राजे असतो. त्या वेळी “पुरे झाले, आता चला घरी,’ असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन-तीन वेळा तरी मे महिना यायला हवा!

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न (आ)
‘दुपार’ या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
‘दुपार’ या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला तो. तो वाचताक्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झर्रकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिटसुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डबा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. सातवीपर्यंत मी शाळेत डबा नेत असे. आठवी-नववीत मात्र डबा बंद केला. शाळेच्या कँटीनमधला वडापाव आम्हां सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय.

तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनीसुद्धा हसतहसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता! या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दांत लिहिला आहे. पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दांत उभी राहते. म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे.

7. अभिव्यक्ती

प्रश्न (अ)
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवालेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

प्रश्न (आ)
पाठात आलेल्या ‘दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

भाषाभ्यास:

रसविचार

मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव समतेवर अवलंबून असते. ही अनुभवक्षमता शालेय वयापासून वृदपिंगत व्हावी, या दृष्टीने ‘रसास्वाद’ ही संकल्पना आपण समजून घेऊया. मानवाच्या अंत:करणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना ‘स्थाविभाव’ असे म्हणतात. उदा., राग, दुःख, आनंद इ. कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यांतून रसनिपती होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 4
साहित्यामध्ये गय-पदय घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गदा-पदय घटकांतून चपखलपणे व्यक्त होणारा आशय, दोन ओळींमधील गर्भितार्थ, रूपकात्मक भाषा, पदय घटकांतील अलंकार, सूचकता, प्रसाद, मापुर्व हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात शाली, की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषासमूदधीसाठी ‘रसास्वाद’ या घटकाकडे आवर्जून लश देऊया.

मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. मनातल्या दुःखाचा निचरा, विरेचन होऊन (कथार्सिसच्या सिद्धांतानुसार) कारण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो. आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दाखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदात्तीकरण होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा या पलिकडे जाऊन व्यक्तींच्या व समाजाच्या भावनांचा आदर कण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्तीव्यक्तींमधील भावसंबंधाचे दृढीकरण होते.

कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाफूती दिलगे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टणे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाष, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे याविषयी दोन ओळींमधील दडलेला मथितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णाशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठयपुस्तकातील प्रत्येक पात्र, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 7 दुपार Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 6

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा:
1. सूर्याची धमकी – [ ]
2. सूर्याचे प्रखर तेज – [ ]
उत्तर:
1. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस, तर डोळे जाकून टाकीन.
2. सर्व पृथ्वीला टिपवून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी – [ ]
उत्तर:
1. शेतकऱ्याची पत्नी

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य ही सूर्याची वेगवेगळी रूपे आहेत. या वेगवेगळ्या रूपांमुळेच सकाळ व दुपार या कालावधींना वेगवेगळी नावे मिळाली आहेत. सकाळ प्रसन्न असते. तिच्यात उल्हास ठासून भरलेला असतो; तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते. डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमतही होणार नाही. अशी ही तप्त, रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते. सकाळपासून केलेल्या कष्टाचा शीण घालवण्यासाठी तो वडा-पिंपळाच्या झाडाखाली विसावतो. पत्नीने आणलेला भाकरतुकडा तो समाधानाने खातो. त्याची पत्नी त्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहते. या दृश्याने दुपारला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकामी जागा भरा:
कष्टकऱ्यांच्या दुपारचे वर्णन: ………………………………………
उत्तर:
खेडोपाडी गावे सुस्तावतात. घरकाम सांभाळणाऱ्या स्त्रिया घरकामे आटपून घटकाभरासाठी डोळे मिटून विसावतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
पक्ष्यांची विश्रांती:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: …………………………………….
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: ……………………..
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: ……………………………………..
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: ………………………………………..

उत्तर:

  1. वडाच्या झाडावरील पक्षी: किलबिलाट थांबवून सावलीत छानशी डुलकी घेत विश्रांती घेतात.
  2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेतात.
  3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: कुठे कुठे विश्रांती घेण्याच्या प्रयत्नात असतात.
  4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: गुटगू थांबवून कुठे तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 8

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 10

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा:
…………………….. हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.
उत्तर:
पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी सर्वांना काही क्षण विश्रांती मिळावी, हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा.
उत्तर:
आमच्याकडे दुपार तशी शांत शांतच असते. मी शाळेतून येतो. बाबा शेतावरून येतात. हातपाय धुवून जेवायला बसतात. आम्ही सगळेच जण एकत्र जेवायला बसतो. जेवल्यानंतर बऱ्याच वेळा बाबा शेतीतल्या कामांसंबंधी बोलतात. बोलता बोलता आईबाबा काही निर्णय घेतात. आई स्वयंपाकघराची आवराआवर करते. आम्हीपण कधी कधी तिला मदत करतो. बाबा अंगणातल्या बाकड्यावर पहडतात. क्षणातच झोपी जातात. आई चटई पसरून पहुडते. आमचा कुत्रा बाबांच्या बाकड्याखाली मुटकुळे करून पहुडतो. तो झोपण्यासाठी डोळे मिटतो खरा, पण प्रत्यक्षात जागाच असतो.

मधून केव्हातरी चटकन कान टवकारून पाहतो आणि पुन्हा शांत होतो. आवारातल्या आम्हा मुलांची मात्र त्या वेळी मजा होते. सगळे विश्रांती घेत असतात, म्हणून टीव्ही बंद ठेवावा लागतो. आम्ही मित्रमंडळी घराच्या मागच्या बाजूला पडवीत जमतो. कधी पत्त्यांचा खेळ, कधी गोट्यांचा खेळ रंगतो. हे सर्व अर्थातच शांतपणे. पण केव्हातरी आवाज वाढतो. मग मोठी माणसे कुठून तरी ओरडून दम देतात. मग सगळे शांत. केव्हातरी मी नववीत असल्याची आठवण कोणीतरी करून देतोच. मग थोडा वेळ पुस्तक घेऊन बसावे लागते. अशी ही मजेची दुपार असते.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन.
2. सायकलरिक्षावाल्याची दुपार.
3. कारखान्यातील कामगारांची दुपार.
उत्तर:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन: हातगाडीवाला म्हणजे हातगाडीवरून लोकांचे सामान वाहून नेणारा हमाल. यात अमाप कष्ट असतात. दुपारपर्यंत बऱ्यापैकी कमाई झाली. उरलेल्या अवधीत चांगली कमाई होईल का, अशी चिंता करीत तो विश्रांती घेण्याच्या बेतात असतो. तेवढ्यात त्याला वर्दी मिळते. विश्रांतीची गरज असतानाही तो आळस झटकून गाडी ओढायला सिद्ध होतो.

2. सायकलरिक्षावाल्याची दुपार: सायकलरिक्षा तळपत्या उन्हात चालवून चालवून रिक्षावाला एखादी डुलकी घेण्याच्या विचारात असतो. पण तेवढ्यात त्याला लांबची वर्दी मिळते. म्हणजे जास्त पैसे मिळणार. म्हणून दमलेल्या शरीराची पर्वा न करता तो सायकलरिक्षा दामटतो. या रिक्षावाल्याची दुपार ही अशी असते.

3. कारखान्यातील कामगारांची दुपार: कारखान्यात पहिल्या पाळीचे कामगार कामावर हजर होण्यासाठी पहाटेच उठतात. दिवसभर यंत्राशी झगडत काम करतात. त्यामुळे दुपारी विश्रांतीची गरज असते. कामावरून सुटल्यावर डोळ्यांवरील झापड दूर सारत सारत धडपडत घरी पोहोचतात. त्याच वेळी त्यांचे दुसरे सहकारी विश्रांती हवी असताना कामावर हजर होण्यासाठी येतात. हे सुद्धा पोटासाठीच धावतपळत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
उत्तर:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [कष्टकरी]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते.
2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते.
3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते.
उत्तर:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते : हातगाडीवाला हा काबाडकष्ट करणारा असतो. त्याच्या कामाला काळवेळेची मर्यादा नसते. किती वजन ओढायचे यालाही मर्यादा नसते. पैसे बहुधा त्या मानाने कमीच मिळतात. त्यामुळे दुपारची विश्रांती पुरेशी झालेली नसतानाही तो कष्ट करायला सिद्ध होतो. जीवन चालू ठेवायला सिद्ध होतो. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते: सायकलरिक्षा जिथे आजही चालू आहे, तो परिसर प्रचंड उकाड्याचा आहे. तळपत्या उन्हात सायकलरिक्षा चालवणे हे कोणालाही थकवणारे असते. त्याला दुपारी विश्रांतीची नितांत गरज असते. तरीही वर्दी मिळताच पोटाची खळगी भरण्याकरिता तो भर दुपारी सायकल मारत निघतो. त्याची ही जीवनावरची निष्ठाच असते. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते: कारखान्यातील काम तीन पाळ्यांमध्ये चालते. सकाळीच कामावर हजर झालेला कामगार दुपारी घराकडे निघतो. त्याच्या डोळ्यांवर झोपेची झापड असते. विश्रांतीसाठी तो अधीर झालेला असतो. त्याच्यानंतर दुसरे कामगार येतात. त्यांनाही खरे तर दुपारची विश्रांती हवी असते. पण सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून दुपारला त्यांचे कौतुक वाटते.

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले कष्टकऱ्यांचे मोठेपण सांगा.
उत्तर:
हातगाडीवाले व सायकलरिक्षावाले हे कष्टकरी आहेत. किती ओझे वाहून न्यावे लागेल, किती अंतर जावे लागेल व त्यासाठी किती कष्ट पडतील, हे त्यांना ठाऊक नसते. पैसे बहुतेक वेळा कमीच मिळतात. तरी ते विश्रांतीची पर्वा करीत नाहीत. पोटाची खळगी भरण्याकरिता धावत असतात. एक प्रकारे ते जीवनचक्र चालू ठेवण्यासाठीच धडपडत असतात.

हेच कारखान्यातील कामगारांबाबतही घडते. त्यांचेही काम कष्टाचेच असते. मात्र या कामगारांच्या वेळा ठरलेल्या असतात. तरीही वेळा पाळण्यासाठी स्वत:च्या आरामाचा, स्वास्थ्याचा त्याग करतात. ही त्यांची स्वत:च्या कामावरची निष्ठा असते. कष्टकऱ्यांच्या त कामगारांच्या निष्ठेमुळेच हे जीवनाचे चक्र चालू असते. माझ्या मते, समाजाने त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड
2. पटापट डबा खातात व हात धुतात.

उत्तर:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड उल्हास
2. पटापट डबा खातात व हात धुतात. खेळाची ओढ

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. ……………………………………………………………………..
2. ……………………………………………………………………..
3. ……………………………………………………………………..

उत्तर:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. आरडाओरड करीत वर्गातून धूम ठोकतात.
2. पटापट डबा खाऊन हात धुतात.
3. राहिलेल्या थोड्या वेळात खेळ व मस्ती करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. समोर काम येऊ नये, असे वाटते ती वेळ:
उत्तर:
1. दुपार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
का ते लिहा:

  1. शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशोबतपासनिसांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते.
  2. समोर नवीन काम येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.
  3. जिवाभावाच्या गप्पा मारतात.
  4. एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात.

उत्तर:

  1. भूक लागलेली असते व डबा खायचा असतो म्हणून.
  2. निवांतपणे जेवता यावे म्हणून.
  3. ताजेतवाने होण्यासाठी.
  4. एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून आणि विविध चवींचा आस्वाद मिळावा म्हणून.

उतारा क्र. 4

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 12

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 14

प्रश्न 2.
गाळलेल्या जागा भरा:
वृद्ध माणसांचे चिंतन:
1. ………………………..
2. ……………………….
उत्तर:
1. आतापर्यंतच्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, याचा विचार करतात.
2. स्वत:च्या भविष्याची चिंता करीत बसतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हाला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
उत्तर:
निसर्गात ऋतूंचे चक्र असते, पाण्याचे चक्र असते. प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड वायू यांची चक्रे असतात. तसेच मानवी जीवनाचेही चक्र दिसून येते. बालपण व विदयार्थिदशा ही पहिली अवस्था आहे. तारुण्याची दुसरी अवस्था आणि वृद्धत्वाची तिसरी अवस्था असते. या अवस्था एकेका पिढीनुसार बदलत राहतात. आता बाल्यावस्थेत असलेली मुले पुढच्या पिढीत तरुण बनतात. त्याच व्यक्ती नंतरच्या पिढीत वृद्ध होतात. यांतील मधली पिढी ही तारुण्याची होय. या पिढीतील माणसे कर्ती-धर्ती असतात.

त्यांच्या कर्तबगारीवरच कुटुंबाचा व समाजाचाही गाडा चालू असतो. या टप्प्यात माणसे कामात गुंतलेली असतात, अपार कष्ट करतात. म्हणून संसाराचे रूप बदलते. दुपार हीसुद्धा दिवसाची मधली म्हणजे तारुण्यावस्था असते. म्हणूनच समाजाच्या विकासाची, पालनपोषणाची सर्व कार्ये या अवधीतच चालू असतात. दुपार ही तारुण्याचे प्रतीकच आहे.

उतारा क्र. 6

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. तेजाने न्हाऊन निघणारी – [ ]
2. दुपारच्या रौद्र रूपाने अचंबित होणारी – [ ]
उत्तर:
1. बर्फाच्छादित गिरिशिखरे
2. बर्फाच्छादित गिरिशिखरे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
उत्तर लिहा:
अचंबित करणारे दुपारचे कार्य – ………………………..
उत्तर:
समुद्राच्या पाण्याची वाफ करणे आणि डोंगरावरच्या बर्फाचे पाणी करणे, हे दुपारचे अचंबित करणारे कार्य आहे.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पाण्याचे चक्र काढा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 15

प्रश्न 2.
दुपारचे मोठेपण सांगणारे उताऱ्यातील शब्द लिहा.
उत्तर:
दुपारचे मोठेपण सांगणारे लेखकांचे शब्द : कर्तृत्ववान, कामाची प्रेरणा देणारी, सृष्टीला कार्यरत करणारी, कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी, हितकर्ती, रक्षणकर्ती, हवेतले कीटक व जंतू यांचा नाश करणारी, उदास नसून उल्हास आहे. अचेतन नसून सचेतन आहे. दीर्घकर्तृत्ववाहिनी, कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
लेखकांनी दुपारला उद्देशून केलेल्या दुपारच्या स्तुतीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
लेखकांनी दुपारला उद्देशून लिहिलेला मजकूर म्हणजे दुपारचे स्तोत्रच आहे. ते अत्यंत योग्य आहे. एरवी लोकांच्या मनात दुपार म्हणजे कंटाळवाणा, त्रासदायक, नकोसा काळ असतो. पण लेखकांनी दुपारचे खरे रूपच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे दुपारबद्दलचे आपले मत बदलण्यास मदत होते. दुपारचा लखलखीत सूर्य म्हणजे दुपारचे तेज होय. या काळात माणसाच्या हिताची सर्व कार्ये चालू असतात. कंटाळा आला, थकवा आला, तरी लोक ही कार्ये चालू ठेवतात.

त्यामुळे मानवी समाजाची भरभराट होते. म्हणूनच लेखकांनी दुपारला मानवाची हितकर्ती, दीर्घ कर्तृत्ववाहिनी, कार्यप्रवण करणारी, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळातच कर्तबगारीला बहर येतो. म्हणून दुपार ही अचेतन नसून चेतना आहे, हे लेखकांचे विधान यथोचित आहे. एकंदरीत लेखकांनी दुपारला उद्देशून म्हटलेले सर्व काही मला पूर्णपणे पटते.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा:

2. समास:

प्रश्न 1.
सामासिक शब्दांवरून समास ओळखा:

  1. चौकोन →
  2. भारतमाता →
  3. बापलेक →
  4. धावपळ →
  5. खरेखोटे

उत्तर:

  1. विगू समास
  2. कर्मधारय समास
  3. इसमेतर वंद्व समास
  4. समाहार वंद्व समास
  5. वैकल्पिक वंदन समास.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘आळू’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

  1. दयाळू
  2. ममतालू
  3. कृपाळू
  4. मायाळू.

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. कृतकृत्य होगे
2. ताव मारणे
3. धूम ठोकणे.
उत्तर:
1. कृतकृत्य होगे – अर्थ : धन्य होगे.
वाक्य: वंदा पास छान पडल्यामुळे शेतकरी कृतकृत्य झाले.
2. ताव मारणे – अर्थ : भरपूर जेबगे.
वाक्य: लानातील जेवणात जिलेबीवर बापूने ताव मारला.
3. धूम ठोकणे – अर्थ : पळून जाणे.
वाक्य: बापाची चाहूल लागताच हरणांनी धूम ठोकली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा:

  1. धरती
  2. पाणी
  3. समुद्र
  4. पक्षी.

उत्तर:

  1. धरती = (1) धरणी (2) भूमी
  2. पाणी = (1) जल (2) नीर
  3. समुद्र = (1) सागर (2) रत्नाकर
  4. पक्षी = (1) खग (2) विहग.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. आनंद
  2. दिवस
  3. काळोख
  4. पुष्कळ.

उत्तर:

  1. आनंद × दुःख
  2. दिवस × रात्र
  3. काळोख × उजेड
  4. पुष्कळ × कमी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 3.
वचन बदला:

  1. चिमणी
  2. सागर
  3. पक्षी
  4. खेडी.

उत्तर:

  1. चिमणी – चिमण्या
  2. सागर – सागर
  3. पक्षी – पक्षी
  4. खेडी – खेडे.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. आशिर्वाद, आर्शीवाद, आर्शिवाद, आशीर्वाद.
  2. अवाढव्य, अवढव्य, अवाडव्य, अव्हाढव्य.
  3. विवचंना, वीवंचना, विवंचना, विहिवंचना.
  4. गिरीशिखरे, गिरिशिखरे, गीरिशीखरे, गीरीशीखरे.
  5. भूमीका, भूमिका, भुमिका, भुमीका.
  6. प्रतीनीधी, प्रतिनीधी, प्रतिनिधि, प्रतिनिधी.

उत्तर:

  1. आशीर्वाद
  2. अवाढव्य
  3. विवंचना
  4. गिरिशिखरे
  5. भूमिका
  6. प्रतिनिधी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशू पक्षी झाडे वेली
2. दुपार म्हणते उठा आराम बास
उत्तर:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली.
2. दुपार म्हणते, ‘उठा-आराम बास.’

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Calligraphy
  2. Secretary
  3. Action
  4. Comedy

उत्तर:

  1. सुलेखन
  2. सचिव
  3. कार्यवाही
  4. सुखात्मिका.

दुपार Summary in Marathi

पाठाचा परिचय:

राजीव बर्वे हे प्रसिद्ध लेखक आहेत. तसेच, त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांचाही त्यांना चांगलाच परिचय आहे. लोकांना साधारणपणे सकाळचा व संध्याकाळचा अवधी खूप आवडतो. त्यांची वर्णनेही खूप केली जातात. सकाळ-संध्याकाळवर कविताही लिहिल्या जातात. कथा-कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये सकाळ-संध्याकाळची वर्णने, प्रसंग खूप येतात. मात्र दुपारबद्दल अशी वर्णने जवळजवळ नसतात.

दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते. प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे. जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्मी दुपारमध्येच दिसते. जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य दुपार पार पाडते. दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात. म्हणून या पाठात दुपारचे लोभस वर्णन आले आहे. शहरात, गावात, जंगलात दुपार कशी वेगवेगळ्या | रूपांत अवतरते, त्यांचे सुंदर वर्णन या पाठात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

शब्दार्थ:

  1. उल्हास – आनंदाने भरलेला उत्साह.
  2. मध्यान्ह – दुपारची वेळ, दिवसाचा मध्य.
  3. रौद्र – प्रचंड क्रोध, संताप यांनी भरलेले अत्यंत भयंकर व भीतिदायक असे रूप.
  4. शिणवटा – थकवा.
  5. घरची लक्ष्मी – पत्नी.
  6. कृतकृत्य – धन्य.
  7. रपेट – फेरफटका.
  8. सांदीत – खाचेत, दोन बाजूंमधील अत्यंत चिंचोळ्या जागेत.
  9. सैलावलेली – सुस्तावलेली.
  10. घासाघीस – जास्तीत जास्त नफा मिळवू पाहणारा विक्रेता व कमीत कमी किमतीत वस्तू मिळवू पाहणारा ग्राहक यांच्यात
  11. किमतीवरून होणारी खेचाखेच.
  12. कार्यरत – कामात मग्न, कामात गुंतलेला.
  13. अव्याहत – सतत, न थांबता.
  14. अथांग – ज्याचा थांग (पत्ता) लागत नाही असा.
  15. मैलोगणती – कित्येक मैल.
  16. काहिलीने – प्रचंड उष्ण्याने.
  17. अचंबित – आश्चर्यचकित.

टीप:

मध्यान्ह:

मध्य+अन्ह, अहन् म्हणजे दिवस, ‘अन्ह:’ हे अहन्चे षष्ठीचे रूप, म्हणून अन्हः=दिवसाचा. ‘अन्हः’ हा शब्द मराठीत येताना त्यातील विसर्ग लोप पावला आहे. यावरून मध्यान्ह दिवसाचा मध्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. घाम गाळणे – खूप कष्ट करणे.
  2. कृतकृत्य होणे – धन्य होणे, धन्य धन्य वाटणे.
  3. चार पैसे गाठीला बांधणे – पैशांची बचत करणे.
  4. बेगमी करणे – भविष्यासाठी तरतूद करणे.
  5. भ्रांत असणे – विवंचना असणे.
  6. ताव मारणे – भरपूर खाणे, पोटभर खाणे.
  7. धूम ठोकणे – पळून जाणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Nirop Question Answer Class 9 Marathi Chapter 15 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15 निरोप Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 15 निरोप Question Answer Maharashtra Board

निरोप Std 9 Marathi Chapter 15 Questions and Answers

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न (अ)
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण
1. मुलाचा वाढदिवस आहे.
2. तो रणांगणावर जाणार आहे.
3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर:
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर जाणार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:
अशुभाची साउली.
उत्तर:
अशुभाची साउली: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण.
उत्तर:
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.

3. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची भाषा कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. ओजस्वी आई व मुलगा जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज विजयी होऊन आलास
की माझ्या हाताने दूधभात भरवीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी,’ या काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तशीच तुझ्या शस्त्रांना-अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.

प्रश्न (आ)
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन,’ या काव्यपंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

5. अभिव्यक्ति:

प्रश्न (अ)
कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते – तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न (आ)
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.

भाषा सौंदर्य:

मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाइल, ठंडा कोल्ड्रिंक, वटवृक्षाच्या झाडाखाली, शब्दाखाली अधोरेखित, हाय वे रोड, रायटिंगमध्ये लिहून दया, शेवटी एन्ड मस्त केलाय, पिवळा पितांबर.

शब्दांच्या या रचनेची ही गंमत पाहा. खरं म्हणजे भाषिकदृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची आहे; परंतु आपण बोलताना सहजगत्या अशा चुका वारंवार करतो. इतर भाषांच्या प्रभावामुळे हे असे घडत असले, तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात. आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक/साप्ताहिक रोज येते, असे म्हणते तेव्हा नक्कीच हशा पिकणार.

अशा विविध रचनांतील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 15 निरोप Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 7

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांदयावरी या विसावे
शांति उदयाच्या जगाची.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी
1. पाय
2. डोळे
3. हात
4. कान.
उत्तर:
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी हात.

प्रश्न 2.
बाळाच्या खांदयावर विसावणारी ………………………..
1. उदयाच्या जगाची क्रांती.
2. भविष्यातील जगाची शांती.
3. आजच्या जगाची शांती.
4. आजची क्रांती.
उत्तर:
बाळाच्या खांदयावर विसावणारी भविष्यातील जगाची शांती.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.

  1. शस्त्रांना शक्ती देणारी – [ ]
  2. आई स्वत:ला याची कन्या समजते – [ ]
  3. आईने धार लावून ठेवलेली – [ ]
  4. बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे – [ ]

उत्तर:

  1. भवानीमाता
  2. महाराष्ट्रकन्या
  3. तलवार
  4. शिवरायांचे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण
उत्तर:
सीमेवर लढावयास जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते-बाळा, तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या उजळलेल्या ज्योतींनी मी तुला ओवाळते आहे.

कृती 4 : (विचारसौंदर्य | भावसौंदर्य / अर्थसौंदर्य / रस)

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – निरोप.
उत्तर:
निरोप
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
2. कवितेचा विषय → रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. घर = सदन
  2. औक्षण = ओवाळणी
  3. बाहू = हात
  4. डोळा = नेत्र
  5. मुख = तोंड
  6. सावली = छाया
  7. शक्ती = बळ
  8. हात = हस्त.

4. कवितेतून मिळणारा संदेश → वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!
→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रिंनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
उत्तर:
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते – तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द अभ्यासा.

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा:

  1. पंचप्राण
  2. महाराष्ट्र
  3. रणांगण
  4. दूधभात.

उत्तर:

  1. पंचप्राण : पाच प्राणांचा समूह -द्विगू.
  2. महाराष्ट्र : महान असे राष्ट्र-कर्मधारय.
  3. रणांगण : रण हेच अंगण-कर्मधारय.
  4. दूधभात : दूध आणि भात -इतरेतर द्वंद्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. सावली
  2. दुःख
  3. स्वतंत्रता
  4. विजय.

उत्तर:

  1. सावली × ऊन
  2. दुःख × सुख
  3. स्वतंत्रता × परतंत्रता
  4. विजय × पराजय.

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिलेली आहेत.)
उत्तर:

एकवचन हुंदका ज्योत शस्त्र डोळा
अनेकवचन हुंदके ज्योती शस्त्रे डोळे

प्रश्न 3.
पुढील शब्दांपासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. चाललास
2. तलवारीला.
उत्तर:
1. चाललास – चाल, लस, सल, लाल.
2. तलवारीला – तरी, वारी, वाल, रीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमानुसार शुद्ध लिहा:

  1. ओक्षन
  2. वीक्रमि
  3. स्वरुप
  4. वीजयि.

उत्तर:

  1. औक्षण
  2. विक्रमी
  3. स्वरूप
  4. विजयी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:

  1. Lyric
  2. Action
  3. Exchange
  4. Exhibition.

उत्तर:

  1. भावगीत
  2. कार्यवाही
  3. देवाण-घेवाण
  4. प्रदर्शन.

निरोप Summary in Marathi

कवितेचा आशय:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रींनी ओजस्वी शब्दांत घडवले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

शब्दार्थ:

  1. रणा – रणांगणात.
  2. तोरण – शुभपताकांची माळ.
  3. विक्रमी – पराक्रमी.
  4. बाहू – हात.
  5. राखायची – रक्षण करायची.
  6. विसावे – विश्रांती घेते, थांबते.
  7. जाणते – उमगते, समजते.
  8. हुंदका – गहिवर.
  9. मुखावाटे – तोंडातून.
  10. अशुभ – वाईट गोष्ट.
  11. साउली – सावली.
  12. माझिया – माझ्या.

टिपा:

  1. औक्षण – पंचारतीने ओवाळणे.
  2. महाराष्ट्रकन्या – महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता, पराक्रमी स्त्रिया.
  3. जिजा – शिवछत्रपतींची आई, जिजामाता.
  4. लक्षुमी – झाशीची राणी लक्ष्मीबाई.
  5. भवानी – श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत, भवानीमाता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. निरोप देणे – जाण्यासाठी परवानगी देणे.
  2. अशुभाची सावली पडणे – विपरीत घडणे, अमंगल घडणे.
  3. कूस धन्य करणे – जन्म सार्थकी लागणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कवितेचा भावार्थ:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते – बाळा, तू रणांगणावर चालला आहेस हा शुभशकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण लावते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे. तुझे शुभ चिंतते आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांदयांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उदयाच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. माझे डोळे आसवांनी ओथंबले नाहीत. मी सुद्धा महाराष्ट्रकन्या आहे. मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे.

तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला (शस्त्राला) धार मीच लावून ठेवली आहे. (संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे.)

अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही. वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवय्यी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. तुझ्या शस्त्रांना (बंदुकांना) अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल. भवानीमातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्रीछत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचे स्मरण कर. विजयी होऊन ये नि माझ्यापोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूधभात भरवीन.

9th Std Marathi Questions And Answers: