Santvani Ankila Mi Das Tuza Class 10 Marathi Chapter 2.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 2.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते ……………………………
(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते ……………………………
(इ) गाय हंबरत धावते ……………………………
(ई) हरिणी चिंतित होते ……………………………
उत्तरः
(i) माता धावून जाते – आगीत बाळ सापडल्यावर
(ii) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते – पिल्लू जमिनीवर पडताच
(iii) गाय हंबरत धावते – भुकेले वासरू पाहिल्यावर
(iv) हरिणी चिंतित होते – जंगलात वणवा लागल्यावर

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव 3

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
(अ) परमेश्वराचे दास
(आ) मेघाला विनवणी करणारा
उत्तरः
(i) परमेश्वराचे दास – [संत नामदेव]
(ii) मेघाला विनवणी करणारा – [चातक]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

प्रश्न 4.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तरः
आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो. प्राणी असो की पक्षी असो. तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच घालते.

प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखादया पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते.

(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात.

संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली (आई) मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पहात असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

(ई) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः
‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशुंची, पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकूळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेकवेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीन आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेकवेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशू असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Additional Important Questions and Answers

प्रश्न १.
खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(i) बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून येते?
उत्तर:
बाळाला वाचवण्यासाठी माता धावून येते.

(ii) भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते?
उत्तर:
भुकेल्या वासराला पाहून धेनू (गाय) हंबरत धावून येते.

(iii) चातक पक्षी कोणाची विनवणी करतो?
उत्तरः
चातक पक्षी मेघाची (ढगांची) विनवणी करतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) संत नामदेव यांचे दास – [श्री विठ्ठलाचे]
(ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात – [श्री विठ्ठलाला]
(iii) मेघांची विनवणी करणारा – [चातक]
(iv) पाडसासाठी चिंतित असणारी – [हरिणी]

प्रश्न 3.
खाली दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून अभंगांच्या ओळी पूर्ण करा.
अग्निमाजि पडे बाळू। ……………………….” धांवें कनवाळू।। (माता, जननी, आई)
(ii) तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी ……………………….” तुझा।। (मालक, स्वामी, दास)
(iii) भुकेलें वत्सरावें।………………………. हुंबरत धांवे।। (धेनु, गाय, गवा)
उत्तर:
(i) माता
(ii) दास
(ii) धेनु

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव 2
उत्तर:
(1 – क),
(ii – ड),
(iii – ब),
(iv – अ)

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
(i) कनवाळू : माता :: चिंतीत ……………………
(ii) धावे : धेनु :: झेंपावें ……………………
उत्तर:
(i) हरणी
(ii) पक्षिणी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

प्रश्न 3.
खाली दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा.
(i) आपले पिल्लू घरट्यातून येऊन खाली जमिनीवर पडताच पक्षिणी त्याच्यासाठी अगदी तत्परतेने झेपावून येते. त्याच्या सेवेला धावून जाते.
उत्तरः
सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिली पडतांचि धरणीं।।

(ii) नामदेव महाराज म्हणतात की, आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वत:ची तहान भागवण्यासाठी विनवणी करतो.
उत्तर:
नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा।।

प्रश्न 4.
कोण ते लिहा.
उत्तर:
(i) वासरासाठी हंबरणारी – [धेनु]
(ii) धरणीकडे झेपावणारी – [पक्षिणी]
(iii) बाळासाठी धावून जाणारी – [माता]

पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २

२. संतवाणी
(अ) अंकिला मी दास तुझा
अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू।।१।।
तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा।।२।।
सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिली पडतांचि धरणीं।।३।।
भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे।।४।।
वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी।।५।।
नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा।।६।।

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) अग्नी
(ii) माता
(iii) तैसा
(iv) काजा
उत्तर:
(i) आग
(ii) आई
(iii) त्याप्रमाणे
(iv) काम कृती

काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
लील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
‘अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।’
उत्तरः
वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्तपणे विठ्ठलाचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन , काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुम्ही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात व्याकूळ होऊन धावत या.

प्रश्न 2.
संत नामदेवांनी ‘आईकडून (विठ्ठलाकडून) व्यक्त केलेल्या अपेक्षा अभंगाच्या आधारे लिहा.
उत्तरः
या जगात (विश्वात) आपल्या मुलाबाळांपेक्षा मातेला कोणीही महत्त्वाचे नसते. आपल्या मुलापुढे मातेला दुसऱ्या सर्व गोष्टी गौण वाटतात, आई आपल्या मुलांच्या सुखातच आपले सुख मानत असते, आई आपल्या अपत्यासाठी काहीही करू शकते. मग ती आई प्राणी, पशु किंवा पक्षी कोणीही असू दया. संत नामदेव महाराज सांगतात की, आपले बाळ आगीत सापडले तर, त्या बाळाची आई व्याकूळ होऊन त्याला आगीतून वाचवण्यासाठी धावून जाते. घरट्यातून पिल्लू जमिनीवर पडले तर पक्षिणी त्यासाठी तत्परतेने जमिनीकडे झेपावते. भूकेल्या वासराला पाहून गाय हंबरून त्याच्याकडे धाव घेते. जंगलातल्या वणव्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी चिंतीत होते. त्याचप्रमाणे नामदेवांना वाटते, मी सर्वस्वी तुझा (विठ्ठलाचा) अंकित आहे. तेव्हा माझ्या आईने (विठ्ठलाने) माझ्यासाठी तत्परतेने धावून यावे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

प्रश्न 2.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
संत नामदेव

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
परमेश्वरकृपेची याचना.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
अग्निमाजी पडे बाळू। माता धांवे कनवाळू।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।

आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकूळ, अगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये. कारण मी पूर्णपणे, सर्वस्वी तुझा दास आहे. असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देवसुध्दा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठिशी उभा राहतो. त्यामुळेच आपण तन, मन, धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांच्या ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगातून मिळतो.

(५) प्रस्तुत कविता तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण:
संत नामदेवांचा ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण असे की, आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई-बाळ, पिल्लू-पक्षिणी, धेनू-वासरू, पाडस-हरिणी तसेच मेघ-चातक पक्षी या उदाहरणांतून अतिशय समर्पकपणे मांडलेला आहे. शिवाय आई-मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना ‘देवा, तू माझी आईच आहेस. तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये,’ अशी त्यांनी केलेली याचना मनाला भावते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) दास – सेवक
(ii) धरणी – धरती, भूमी
(iii) मेघ – ढग
(iv) धेनु – गाय (स्वाध्याय कृती)

(४) काव्यसौंदर्य.

(i) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो. प्राणी असो की पक्षी असो. तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच घालते.

प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखादया पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते.

(ii) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात.

संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली (आई) मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पहात असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव

(iii) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः
‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशुंची, पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकूळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेकवेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीन आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेकवेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशू असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते.

संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Summary in Marathi

संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव भावार्थ‌‌

अग्निमाजि‌ ‌पडे‌ ‌बाळू‌ ‌।‌ ‌माता‌ ‌धांवें‌ ‌कनवाळू।।‌१‌।।‌ ‌
तैसा‌ ‌धांवें‌ ‌माझिया‌ ‌काजा।‌ ‌अंकिला‌ ‌मी‌ ‌दास‌ ‌तुझा‌ ‌।।२।।‌‌

वारकरी‌ ‌संप्रदायाचे‌ ‌महान‌ ‌प्रचारक‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌अगदी‌ ‌मनापासून‌ ‌आर्ततेने‌ ‌परमेश्वराचा‌ ‌(विठ्ठलाचा)‌ ‌धावा‌ ‌करतात.‌ ‌त्यासाठी‌ ‌ते‌ ‌अतिशय‌ ‌समर्पक‌ ‌दृष्टान्त‌ ‌देतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌ज्याप्रमाणे‌ ‌नजरचुकीने‌ ‌अग्नीत‌ ‌सापडलेल्या‌ ‌बाळाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌व्याकूळ‌ ‌होऊन,‌ ‌काळजीने‌ ‌त्याच्याजवळ‌ ‌धावून‌ ‌जाते.‌ ‌त्याला‌ ‌मायेने,‌ ‌प्रेमाने‌ ‌उचलून‌ ‌घेते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌प्रभू,‌ ‌विठ्ठला,‌ ‌मी‌ ‌पूर्णपणे‌ ‌तुझा‌ ‌अंकित‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌तुझा‌ ‌दास,‌ ‌सेवक‌ ‌आहे.‌ ‌आईप्रमाणे‌ ‌तुही‌ ‌माझ्या‌ ‌अडचणीत,‌ ‌माझ्या‌ ‌कार्यात‌ ‌धावत‌ ‌ये.‌‌

सवेंचि‌ ‌झेपावें‌ ‌पक्षिणी‌ ‌।‌ ‌पिली‌ ‌पडतांचि‌ ‌धरणीं‌ ‌।।३।।‌‌

विठ्ठलाची‌ ‌आळवणी‌ ‌करताना‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌म्हणतात,‌ ‌‌झाडावरील‌ ‌घरट्यात‌ ‌असणारे‌ ‌पक्ष्याचे‌ ‌लहान‌ ‌पिल्लू‌ ‌घरट्यातून‌ ‌बाहेर‌ ‌येऊन‌ ‌उडण्याच्या‌ ‌प्रयत्नात‌ ‌खाली‌ ‌जमिनीवर‌ ‌पडताच‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌पक्षिणी‌ ‌आपल्या‌ ‌पिल्लाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌त्याच्या‌ ‌दिशेने‌ ‌तत्परतेने‌ ‌झेप‌ ‌घेते.‌ ‌त्याला‌ ‌पुन्हा‌ ‌घरट्यात‌ ‌नेण्यासाठी‌ ‌धडपडते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌परमेश्वरा,‌ ‌तुझ्या‌ ‌या‌ ‌सेवकासाठी‌ ‌तू‌ ‌असाच‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

भुकेलें‌ ‌वत्सरावें।‌ ‌धेनु‌ ‌हुंबरत‌ ‌धांवे‌ ‌।।४।।‌‌

संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌अगदी‌ ‌मनापासून‌ ‌विठ्ठलाचा‌ ‌धावा‌ ‌करतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात,‌ ‌भूकेने‌ ‌व्याकूळ‌ ‌झालेले‌ ‌वासरू‌ ‌गोठ्यात‌ ‌ओरडत‌‌ असते.‌ ‌त्याची‌ ‌ती‌ ‌अवस्था‌ ‌सहन‌ ‌न‌ ‌होऊन‌ ‌गाय‌ ‌मोठ्याने‌ ‌हंबरत‌ ‌आपल्या‌ ‌वासराच्या‌ ‌ओढीने‌ ‌त्याच्याजवळ‌ ‌धावत‌ ‌येते.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌विठ्ठला‌ ‌तूही‌ ‌माझ्यासाठी‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

वणवा‌ ‌लागलासे‌ ‌वनीं‌ ‌‌पाडस‌ ‌चिंतीत‌ ‌हरणी‌ ‌।।५।।‌‌

संत‌ ‌नामदेव‌ ‌श्री‌ ‌विठ्ठलाची‌ ‌मनापासून‌ ‌विनवणी‌ ‌करतात.‌ ‌अगदी‌ ‌व्याकूळ‌ ‌होऊन‌ ‌हरिणीचे‌ ‌उदाहरण‌ ‌ते‌ ‌देतात.‌ ‌ते‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌जंगलात‌ ‌वणवा‌ ‌पसरलेला‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌त्यात‌ ‌हरिणीचे‌ ‌पाडस‌‌ अडकलेले‌ ‌आहे.‌ ‌अशावेळी‌ ‌त्याची‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌हरिणी‌ ‌आपल्या‌ ‌पाडसाला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌खूप‌ ‌चिंतीत‌ ‌होते.‌ ‌त्या‌ ‌पाडसासारखीच‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌म्हणून‌ ‌तू‌ ‌माझ्यासाठी‌ ‌धावून‌ ‌ये.‌‌

नामा‌ ‌म्हणे‌ ‌मेघा‌ ‌जैसा‌ ‌।‌ ‌विनवितो‌ ‌चातक‌ ‌तैसा‌ ‌।।६।।‌‌

चातक‌ ‌पक्षी‌ ‌पावसाचा‌ ‌पहिला‌ ‌थेंब‌ ‌पिऊन‌ ‌जगतो.‌ ‌तेच‌ ‌त्याच्यासाठी‌ ‌जीवन‌ ‌असते‌ ‌असे‌ ‌मानले‌ ‌जाते.‌ ‌हाच‌ ‌दृष्टान्त‌ ‌देऊन‌ ‌संत‌ ‌नामदेव‌ ‌महाराज‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌ज्या‌ ‌प्रमाणे‌ ‌चातक‌ ‌पक्षी‌ ‌आकाशात‌ ‌जमलेल्या‌ ‌काळ्या‌ ‌काळ्या,‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेल्या‌ ‌ढगांना‌ ‌पाणी‌ ‌बरसवण्यासाठी‌ ‌विनवणी‌ ‌करतो.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌हे‌ ‌विठ्ठला,‌ ‌मी‌ ‌तुला‌ ‌विनवितो‌ ‌आहे.‌

संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव ‌शब्दार्थ‌ ‌

  • अग्निमाजि‌ ‌-‌ ‌आगीमध्ये‌‌ -‌ ‌(in‌ ‌the‌ ‌fire)‌ ‌
  • पडे‌ ‌-‌ ‌सापडे‌ ‌-‌ ‌(to‌ ‌be‌ ‌found)‌ ‌
  • कनवाळू‌ ‌-‌ ‌दयाळू‌‌ – (merciful)‌ ‌
  • तैसा‌ ‌-‌ ‌त्याचप्रमाणे‌‌ -‌ ‌(as‌ ‌like‌ ‌that)‌ ‌
  • माझिया‌ ‌-‌ ‌माझ्या‌ ‌-‌ ‌(my)‌ ‌
  • काजा‌ ‌-‌ ‌काम‌‌ – (work)‌ ‌
  • अंकिला‌ ‌-‌ ‌अंकित‌ ‌झालेला‌ ‌
  • सवें‌ ‌-‌ ‌लगेच‌‌ – (immediately)‌ ‌
  • पिल्ली‌ ‌-‌ ‌पिलू‌‌ -‌ ‌(a‌ ‌young‌ ‌one,‌ ‌acub)‌ ‌
  • वत्सर‌ ‌-‌ ‌वासरू‌‌ – (a‌ ‌calf)‌ ‌
  • धेनु‌ ‌-‌ ‌गाय‌‌ – (a‌ ‌cow)‌ ‌
  • हुंबरत‌ ‌-‌ ‌हंबरते‌‌ – (to‌ ‌low)‌ ‌
  • वनी‌ ‌-‌ ‌जंगलात‌‌ – (in‌ ‌the‌ ‌forest)‌ ‌
  • मेघा‌ ‌-‌ ‌ढगांना‌ ‌-‌ ‌(to‌ ‌cloud)‌ ‌
  • जैसा‌ ‌-‌ ‌ज्याप्रमाणे‌ ‌-‌ ‌(like,‌ ‌as)‌ ‌
  • वत्सरावे‌ ‌-‌ ‌वासराच्या‌ ‌आवाजाने‌ ‌
  • पाडस‌ ‌-‌ ‌हरिणीचे‌ ‌पिल्लू

Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१

Chudiwala Class 10 Marathi Chapter 6 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 6 चुडीवाला Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 6 चुडीवाला Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 6 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 6 चुडीवाला Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.

अब्दुल  रघुभैया

उत्तरः

अब्दुल रघुभैया
(i) सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकीची मानणारा.
(ii) साऱ्यांच्या जीवनात आनंद आपल्याच विश्वात रममाण निर्माण करण्यासाठी असणारा.
(iii) संवेदनशील.
फारशी जाण नसलेला.
धडपडणारा.
संवेदनांशी फारसा संबंध नसलेला.

प्रश्न 2.
खालील विधानांमागील कारणे लिहा.
(अ) रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून,
उत्तरः
रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो कारण त्याचा धंदयावर परिणाम होतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

(आ) आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
उत्तर:
आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच कारण या दिवशी अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबेरंगी बांगड्या आणि त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू घेऊन येत होता.

प्रश्न 3.
गुणविशेष लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 20
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 19

प्रश्न 4.
खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.

वाक्ये  अव्यये  प्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.

प्रश्न 5.
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

विरामचिन्हे नावे
(अ) “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.”
(आ) “अन्वर जेवला?”

उत्तर:

विरामचिन्हे नावे
(अ) “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.”
(आ) “अन्वर जेवला?”
दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्ण विराम/स्वल्प विराम.
दुहेरी अवतरण, प्रश्नचिन्ह

प्रश्न 6.
खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शोध घेऊन त्यांचा सराव करा.
अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 7.
स्वमत.
(अ) सत्यता पटवून दया- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
उत्तर:
अब्दुल हा बांगड्या विकणारा अत्यंत संवेदनशील मनाचा गृहस्थ होता. तपोवनातल्या कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी तो जात असे. त्यासाठी त्याला त्याच्या धंदयात झळ सोसावी लागत असे. त्याचा रोजगार बुडत असे. पण आजाराने ग्रस्त स्त्रियांचा आनंद बघून त्याला समाधान वाटत होते. समाजऋण मानणारा आणि माणुसकीला जपणारा व दुसऱ्याच्या आनंदासाठी धडपडणारा असा हा अब्दुल खरा समाजसेवक होता.

(आ) शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
इतर चार-चौघीसारखी शन्नू गृहिणी होती. आपला प्रपंच नीट चालावा, अब्दुलचा व्यवसाय वाढावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलचा ती राग करत असे. तपोवनातील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्यांचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ती सामान्य गृहिणी होती, अब्दुलची उदात्त वृत्ती, परोपकार, सेवाभाव यातलं तिला काही कळत नव्हते.

(इ) तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
आधी त्याने मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. आज कालच्या स्त्रिया, मुली कशा प्रकारच्या बांगड्या वापरतात, फॅशनचा ट्रेंड काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. गुगल, यु ट्युब, वॉटस अॅप यातून त्याने या सगळ्यांची माहिती मिळवली पाहिजे. वरील सगळ्या माध्यमांद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे त्यांच्याजवळ असलेल्या बांगड्यांची जाहिरात करु शकतो. ऑनलाईन व्यापार करू शकतो. अशा प्रकारे अब्दुलचा मुलगा आपला बांगड्यांचा व्यवसाय वाढवू शकतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

(ई) दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
उत्तरः
बस स्टॉपवर एक म्हातारी स्त्री उभी होती तिला ‘नानावटी’ हॉस्पिटलला जायचे होते. हॉस्पिटलपर्यंत थेट जाणारी बस नव्हती. रिक्षाला देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. मी एक रिक्षा थांबवली तिच्या हातात शंभर रुपये दिले. रिक्षावाल्याला तिला नानावटी हॉस्पिटलला सोडायला सांगितले. तिच्या डोळ्यातला कृतज्ञभाव आजही आठवतो.

एकदा रस्त्याने जात असतांना फुटपाथवर संसार असलेल्या ठिकाणी एक बाळ खूप कळवळून रडत होतं. आजूबाजूला कोणी दिसेना. मी त्याच्या जवळ गेले त्याच्या अंगाखाली आणि आजुबाजुला बरंच पाणी साचलेलं होतं. मी हिम्मत केली त्याला तिथून उचलले. त्याच्या ठेवलेल्या वस्तूमधून एक कापड काढून त्याला कोरडं केलं, कापडात गुंडाळून त्याला कोरड्या जागेत ठेवणार तोच त्याची आई आली, मी तिच्या हातात मुलं दिलं आपलं रडणं थांबवून ते बाळ माझ्याकडे अगदी टुकूटुकू बघत होते. मला खूप छान वाटलं.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 6 चुडीवाला Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 1

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) स्वेटरमधून अब्दुलला चांगलीच थंडी जाणवत होती कारण …………………………..
उत्तर:
स्वेटरमधून अब्दुलला चांगलीच थंडी जाणवत होती कारण अब्दुलचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवला होता.

(ii) लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली कारण
उत्तर:
लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली कारण अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबेरंगी बांगड्या घेऊन आला होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
(i) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(ii) अब्दुल खिडकीजवळ बसला.
(iii) पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.
(iv) अब्दुल बसस्टॉपवर आला.
उत्तर:
(i) अब्दुल बसस्टॉपवर आला.
(ii) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(iii) अब्दुल खिडकीजवळ बसला.
(iv) पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) अब्दुलचे दुकान बंद असल्याने कोणाचा धंदा तेजीत चालणार होता?
उत्तरः
अब्दुलचे दुकान बंद असल्याने रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार होता.

(ii) कोणाच्या डोळ्यांतला क्रोध अब्दुलच्या परिचयाचा होता?
उत्तरः
शन्नूच्या डोळ्यांतला क्रोध अब्दुलच्या परिचयाचा होता.

(iii) लहान लहान मुलींनी कोणाभोवती एकदम गलका करायला सुरुवात केली?
उत्तरः
लहान लहान मुलींनी अब्दुलभोवती गलका करायला सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

(iv) बस कोणत्या ठिकाणी रिकामी झाली?
उत्तर:
बस जिल्हाधिकारी कचेरीजवळ रिकामी झाली.

(v) अब्दुलने मफलर कानाला घट्ट का लपेटून घेतला?
उत्तर:
बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अब्दुलला त्रासदायक वाटू लागला होता, म्हणून अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) अब्दुलचा व्यवसाय → बांगड्या विकण्याचा
(ii) अब्दुल या ठिकाणी गेला → तपोवन

प्रश्न 2.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 2

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 3

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) शांतीवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले.
(ii) संक्रांत असल्याने अब्दुलचा धंदा तेजीत चालला होता
(iii) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(iv) थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच मजेदार वाटू लागला.
उत्तरः
(i) चूक
(ii) चूक
(iii) बरोबर
(iv) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
अब्दुलबद्दल माहिती लिहा.
उत्तरः
अब्दुलचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. अब्दुलचा व्यवसाय जेमतेमच चालत असावा असे वाटते. कारण त्याच्या अंगावरचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवलेला होता. थंडी वाऱ्याची पर्वा न करता तो आपली बांगड्यांची पेटी आणि पिशवी घेऊन तपोवनातल्या मुलींना बांगड्या भरण्यासाठी निघाला होता. यावरून असे दिसते अब्दुल हा अत्यंत करूणाशील व दयाशील वृत्तीचा, समाजाचे मूल्य जपणारा होता.

प्रश्न 2.
तपोवनाकडे येताना व आल्यावर अब्दुलने कोणत्या गोष्टी अनुभवल्या ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
जिल्हाधिकारी कचेरीजवळ येताच बहुतेक सगळीच बस रिकामी झाली. तपोवनाकडे जाणारे कोणीही प्रवासी नव्हते. तपोवनात आल्यावर त्याचे लक्ष कमानीकडे गेले. जेमतेम हातभर असलेली वेल आता खूप फुलली होती. अब्दुलला गेटजवळ बघताच तपोवनातील सगळया मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
“रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून” शन्नूच्या या विधानामागचे कारण तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
अब्दुल तपोवनात दर संक्रांतीला जात असे. तपोवन हे कुष्ठरोगी लोकांचे आश्रयस्थान होते. तेथील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना बांगड्या भरायला अब्दुल जातो, हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्याचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती. म्हणून वरील विधान अब्दुलला उद्देशून तिने म्हटले आहे.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 4

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) तपोवनातील स्त्रियांना अब्दुल कोणासारखा वाटे?
उत्तरः
तपोवनातील स्त्रियांना अब्दुल देवदूतासारखा वाटे.

(ii) अब्दुलला कोणती कला साधली होती?
उत्तरः
तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्याची कला अब्दुलला साधली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आंब्याच्या झाडाखाली असलेल्या …………………………. अब्दुल बसला. (चबुतऱ्यावर, चौथऱ्यावर, दगडावर, पारावर)
(ii) साऱ्या …………………………. तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस! (मधुबनातील, शांतिवनातील, तपोवनातील, तेजोवनातील)
(iii) प्रत्येकीला …………………………. बांगड्या भरायच्या होत्या. (प्रथम, आधी, रंगीबेरंगी, आवडीच्या)
उत्तर:
(i) चौथऱ्यावर
(ii) तपोवनातील
(iii) प्रथम

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) चिठ्ठीतला मजकूर वाचून दाखवणारा – रघुभैया
(ii) अब्दुलला सत्काराचे निमंत्रण देणारे – दाजीसाहेब
(iii) संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात चुडीवाल्याची वाट पाहणाऱ्या – स्त्रिया

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) चिट्ठीतला मजकूर वाचून अब्दुल आणि शन्नू यांना आनंद झाला कारण ………………………… .
उत्तर:
चिठ्ठीतला मजकूर वाचून अब्दुल आणि शन्नू यांना आनंद झाला कारण तपोवनात अब्दुलचा खास सत्कार होणार होता.

(ii) अब्दुलने रघुभैय्याला चिट्ठी वाचण्यास सांगितली कारण ………………………….
उत्तरः
अब्दुलने रघुभैय्याला चिठ्ठी वाचण्यास सांगितली कारण चिट्ठी मराठीतून होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 5

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विलक्षण : समाधान : : खास : ………………………….
(ii) हातात : बांगड्या : : झाडाखाली : ………………………….
उत्तर:
(i) सत्कार
(ii) चौथरा

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 6

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
तपोवनातील स्त्रिया व मुलींना अब्दुल देवदूतासारखा वाटे हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
तपोवनात कुष्ठरोगाने पिडित स्त्रिया आणि मुली राहत असत. या स्त्रिया व मुलींनाही इतर स्त्रियांसारखाच साज शृंगार करायला आवडत असे. त्या कुष्ठरोगासारख्या दुर्धर रोगाने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा हात बांगड्या भरण्यासाठी कोणीही हातात घेणार नव्हते. त्यांचा स्पर्श म्हणजे रोगाला निमंत्रण अशी सर्वसाधारण समजूत; पण अब्दुल मात्र असल्या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता त्यांच्या हातावरील व्रण, जखमा सांभाळून त्यांना हळूवारपणे बांगड्या भरत असे. हे काम तो वर्षातून दोनदा करत असे. रंगीबेरंगी बांगड्यांच्या रंगात त्या स्त्रिया काही काळ का होईना आपले दुःख विसरत असत.

आणि ही गोष्ट केवळ अब्दुलमुळे शक्य होत होती म्हणून अब्दुल त्यांना देवदूतासारखा वाटे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार का केला, सकारण लिहा.
उत्तरः
ज्या कुष्ठरोगी लोकांची सावली देखील लोकं टाळतात अशा कुष्ठरोगी स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचे काम अब्दुल अगदी निस्वार्थी भावनेने करायचा, त्यांच्या जीवनात आनंद फुलवायचा प्रसंगी व्यवसायात आपले नुकसान सोसून अविरतपणे तो हे काम करत होता. त्याच्या सेवाभावी वृत्तीचा व माणुसकीला जपणाऱ्या निर्मळ मनाच्या माणसाचा सत्कार झाला पाहिजे, त्याच्या कामाची पावती त्याला दिली पाहिजे या भावनेतून दाजीसाहेबांनी अब्दुलला सत्काराचे निमंत्रण दिले व त्याचा सत्कार केला.

प्रश्न 3.
‘इच्छा तिथे मार्ग’ – अब्दुलच्या उदाहरणावरून स्पष्ट करा.
उत्तरः
अनेक लोकांच्या मनात बऱ्याच इच्छा असतात. पण ते केवळ विचारच करत राहतात. हे नाही, ते नाही या सबबीखाली त्यांच्या इच्छेला किंवा विचाराला पूर्णत्व येत नाही. पण अब्दुलसारखा अगदी छोटा व्यावसायिक अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला, आपल्याजवळ जे आहे जसं आहे त्यातून निस्वार्थीपणे सेवेचं व्रत साकारतो. कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्याचं काम वर-वर अगदी साधं वाटत असलं तरी त्यामागे अब्दुलची उदात्त भावना, दुसऱ्याच्या आनंदासाठी झटण्याची वृत्ती दिसून येते. फार मोठा गाजा-वाजा, बडेजाव न करता अब्दुल हे काम अत्यंत सेवाभावी वृत्तीने करत होता. खरोखरच मनापासून काही करण्याची जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो हे अब्दुलच्या उदाहरणावरून जाणवते.

प्रश्न 4.
अब्दुल तपोवनात गेल्यावर तिथले वातावरण कसे होत असे, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
अब्दुल तपोवनात गेला की चुडीऽवाला आला, चुडीऽऽवाला आला असे म्हणत सगळ्या बायका-मुली त्याच्या भोवती जमत असत. प्रत्येकीला अब्दुलकडून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू, रंगीबेरंगी बांगड्या हव्या असत. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या असत म्हणून अब्दुलच्या भोवती त्या गर्दी करत असत. त्यांचा आवाज, गडबड, गोंधळ यामुळे आनंदवनाचा परिसर गजबजून उठे. सगळया स्त्रियांमध्ये आनंद आणि चैतन्य पसरत असे. तो सगळा अनुभव म्हणजे अब्दुलसाठी अत्यंत समाधानाची गोष्ट होती.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघ तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 7

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 8

प्रश्न 3.
कोण ते लिहा
(i) सेतूबंधन करणारा – राम
(ii) सेतूबंधनाला मदत करणारी – खार

प्रश्न 4.
उत्तरे लिहा
(i) संक्रात आणि जेष्ठ पौर्णिमेला हा प्रस्ताव समोर आला होता,
उत्तर:
तपोवनातील स्त्रिया व मुली यांना बांगड्या भरणे.

(ii) दाजीसाहेबांनी यांना विनंती केली होती.
उत्तर:
अनेक बांगडीवाल्यांना

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 9
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 10

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) दाजीसाहेबांचे वय किती वर्षे होते?
उत्तरः
दाजीसाहेबांचे वय चौऱ्याऐंशी वर्षे होते.

(ii) अब्दुलने दाजीसाहेबांना कोणते आश्वासन दिले ?
उत्तरः
ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला तपोवनात बांगड्या भरण्यासाठी येण्याचे आश्वासन अब्दुलने दाजीसाहेबांना दिले.

प्रश्न 3.
कारणे लिहा.
सत्काराच्या ठिकाणी अब्दुल तसाच उभा राहिला; कारण ……………………………………….
(अ) बसायला जागा नव्हती.
(आ) पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला.
(इ) अब्दुलच्या मनात भिती होती.
(ई) अब्दुल घाबरला होता.
उत्तरः
सत्काराच्या ठिकाणी अब्दुल तसाच उभा राहिला; कारण पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला.

(ii) अब्दुल अतिशय भारावून गेला; कारण ………………………………
(अ) तपोवनातील स्त्रियांचे दुःख पाहून.
(आ) दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला.
(इ) तपोवनात काम करायला मिळाले म्हणून.
(ई) तपोवनातील आनंद पाहून.
उत्तर:
अब्दुल अतिशय भारावून गेला; कारण दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 4.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………. सेतूबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. (रामानं, हनुमानानं, लक्ष्मणानं, सीतेनं)
(ii) …………………………. त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला (दाजीसाहेबांना, शन्नूला, रघुभैय्याला, अब्दुलला)
उत्तर:
(i) रामानं
(ii) अब्दुलला

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) आवाजातला : खणखणीतपणा : : बोलण्यातली : ………………………………
(ii) तेज : पुंज : चेहरा : : पांढरेस्वच्छ : ………………………………
उत्तर:
(i) ऐट
(ii) धोतर

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
दाजीसाहेबांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
दाजीसाहेब चौऱ्याऐंशी वर्षांचे होते. पण तरीही खूप काटक होते. उंच सडसडीत देहयष्ठी, तेज:पुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरेस्वच्छ धोतर ते नेसत असत. त्यांच्या आवाजात खणखणीतपणा होता आणि बोलण्यात ऐट होती. असे दाजीसाहेबांचे व्यक्तिमत्व होते.

प्रश्न 2.
दाजीसाहेबांच्या पोशाखाचे वर्णन करा,
उत्तरः
दाजीसाहेब पांढरे स्वच्छ धोतर परिधान करत असत. त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला उंच सडसडीत केशरी फेटा असा दाजीसाहेबांचा पोशाख असे. त्यांची शरीरयष्टी आणि पोशाख त्यामुळे ते खूप रुबाबदार दिसत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 3.
दाजीसाहेब आपल्या भाषणात अब्दुलबद्दल जे बोलले ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
दाजीसाहेब म्हणाले तपोवनासाठी मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती सुदैवाने आम्हाला लाभल्या. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव अब्दुल मियांनी स्वत:हून स्विकारला. दरवर्षी अब्दुलमियाँ न चुकता येतात व येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ हे काम करतात. त्यांचे हे समाजकार्य, मानवसेवा खरोखरच फार मोठी आहे, अनमोल आहे, अशा शब्दांत दाजीसाहेबांनी अब्दुलच्या कार्याचा गौरव केला.

प्रश्न 4.
प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या सहकार्यातून अनेक मोठी कामे होऊ शकतात. यावर तुमचे मत उदाहरणासह लिहा.
उत्तरः
दाजीसाहेबांना तपोवनासाठी काम करणारी, मदत करणारी माणसं मिळाली म्हणून एवढं काम ते चांगल्या प्रकारे करू शकले. एखाक्या चांगल्या कामासाठी प्रत्येकाने थोडासा जरी हातभार लावला तरी खूप मोठमोठी कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. अगदी अलिकडचेच उदाहरण घ्यायचे झाले तर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेले ‘नाम’ फाऊंडेशन. यात अनेकांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करणारे जलपुरुष ‘डॉ. राजेंद्रसिंह’ असोत किंवा अनाथांची आई झालेल्या ‘सिंधुताई सकपाळ’ असोत. या सगळ्यांच्या कामाला हातभार लावणारे, सहकार्य देणारे अनेक हात आहेत. सामाजिक सेतुबंधनाची मोठ मोठी कार्ये सहकार्यातूनच साकार होत असतात.

प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती.

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 11

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 12

प्रश्न 3.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी ……………………………… जाणार होती. (रिक्षातून, सायकलवरून, मोटारीतून, चालत)
(ii) ……………………………… पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. (शन्नूचे, रघुभैय्याचे, अन्वरचे, दाजीसाहेबांचे)
(iii) थाळीत चपाती आणि ……………………………… भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. (मेथीची, भोपळ्याची, वांग्याची, कारल्याची)
उत्तर:
(i) मोटारीतून
(ii) शन्नूचे
(iii) वांग्याची

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
(i) अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली.
(ii) दाजीसाहेबांनी अब्दुलला मोटारीत बसवले,
(iii) अब्दुल एखादया अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
(iv) अब्दुल येताच शन्नू उठली.
उत्तर:
(i) दाजीसाहेबांनी अब्दुलला मोटारीत बसवले.
(ii) अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली.
(iii) अब्दुल येताच शन्नू उठली.
(iv) अब्दुल एखादया अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) मोटार कोणत्या चौकात थांबली?
उत्तरः
मोटार अंबादेवीच्या चौकात थांबली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

(ii) शनू कोणत्या गोष्टींचा अब्दुलला नेहमी आग्रह करत होती?
उत्तरः
शन्नू अब्दुलला नवीन व्यवसाय करण्याचा आग्रह करत होती.

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) अब्दुलला बांगड्यांचा व्यवसाय सोडवत नव्हता; कारण …………………………..
(अ) त्याच्या अब्बाजानपासून चालत आलेला व्यवसाय होता.
(आ) बांगड्यांचा धंदा खूप तेजीत होता.
(इ) तो व्यवसाय त्याला मनापासून आवडत होता.
(ई) तो खूप आळशी होता.
उत्तर:
अब्दुलला बांगड्यांचा व्यवसाय सोडवत नव्हता; कारण त्याच्या अब्बाजानपासून चालत आलेला व्यवसाय होता.

(ii) शनू नेहमी नाराज असे; कारण …………………………..
(अ) अब्दुलने तिला तपोवनात नेले नव्हते.
(आ) अन्वर जेवला नव्हता.
(इ) वारंवार सांगूनही अब्दुल व्यवसाय बदलत नव्हता.
(ई) अब्दुल तिच्यावर नेहमी ओरडायचा.
उत्तरः
शनू नेहमी नाराज असे; कारण वारंवार सांगूनही अब्दुल व्यवसाय बदलत नव्हता.

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
गट अ – गट ब
(i) अष्टमीचा चंद्र (अ) वातावरण
(ii) उदास चेहरा (आ) आकाश
(iii) दुकानाला रंग (इ) अब्दुल
(iv) अंतर्बाह्य प्रसन्न (ई) रघुभैय्याच्या
उत्तर:
(i- आ)
(ii – इ)
(iii – ई)
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 4.
चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 13

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 14

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
(i) उदास : चेहरा :: मेघरहित : …………………………..
(ii) अष्टमीचा : चंद्र :: बांगड्यांचा : …………………………..
उत्तर:
(i) आकाश
(ii) धंदा

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
अब्दुलची जेवणावरची इच्छा मरून गेली! तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
अब्दुल पुरस्कार स्वीकारून तपोवनातून घरी आला. शन्नोने त्याला जेवायला वाढले. पण शन्नू जेवली नव्हती हे त्याला कळले. अन्वर जेवला पण खिम्यासाठी रुसून बसला होता. हे शनूने अब्दुलला सांगितले. अब्दुलचा धंदा चांगला चालत नव्हता. आणि त्याला धंदा सोडवतही नव्हता. आपल्या मुलांची व बायकोची आपण नीट काळजी घेऊ शकत नाही. त्यांच्या साध्या-साध्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, म्हणून अब्दुल खूप उदास झाला. जेवणावरची त्याची वासनाच उडाली. त्याच्या तोंडातला घास तोंडातच घोळू लागला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
शन्नू वारंवार कोणत्या गोष्टीचा आग्रह करत होती? का?
उत्तरः
अब्दुलचा बांगड्यांचा व्यवसाय होता. आधीच जेमतेम चालणारा व्यवसाय आणि नेमका सणाच्या दिवशी आपले दुकान बंद ठेवून अब्दुल तपोवनातल्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. शन्नू वारंवार अब्दुलला दुसरा व्यवसाय करण्यास सांगत होती. अत्यंत अल्प उत्पन्नात संसाराचा गाडा चालवणं तिला कठीण जात होतं. तिच्या मुलाच्या साध्या साध्या इच्छा तिला पूर्ण करता येत नव्हत्या. म्हणूनच ती, अब्दुलला नवीन धंदा सुरू करायला सांगत होती.

प्रश्न 3.
अब्दुल मोटारीतून प्रवास करतांना त्याच्या मनातले विचार व वातावरणाचे वर्णन करा.
उत्तर:
मोटार धावत होती. अब्दुलच्या मनात विचार आला, शन्नूला आज आणायला हवे होते. तिची नाराजी दूर झाली असती. धावत्या मोटारीतून त्याने बाहेर नजर टाकली. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न होते.

प्रश्न 4.
अब्दुलला नवीन धंदा का सुरू करता येत नव्हता?
उत्तरः
शन्नू वारंवार अब्दुलजवळ नवीन धंदा सुरू करण्याचा आग्रह धरत होती; पण अब्दुलला ते शक्य नव्हते. नवीन धंदयासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते. शिवाय बांगड्या विकण्याच्या या व्यवसायाशी त्याचे भावनिक नाते होते. त्याच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय होता. म्हणून तो त्याला बंद करावासा वाटत नव्हता.

प्रश्न ५. पुढील उताराच्या आधारे दिलेला सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 15

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) देवळात दोनचे टोले देणारा – पहारेकरी
(ii) गाढ झोपी गेलेला – अन्वर

प्रश्न 3.
पुढील घटनांचे परिणाम लिहा. घटना परिणाम
(i) तपोवन दाजीसाहेबांच्या धंदा करायला अब्दुलचं मन हाती राहिलं नाही हे लागत नाही. अब्दुलला कळलं.
(ii) सगळं काही विसरून अब्दुलचे मनोमन सुखावणे. स्त्रियांचे हसणे.

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) देऊळ (अ) हळवा
(ii) तपोवन (आ) पेटी
(iii) बांगड्या (इ) दाजीसाहेब
(iv) अब्दुल (ई) पहारेकरी
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) अन्वर ………………………….. झोपला होता. (गाढ, गप्प, शांत, आनंदी)
(ii) एखादया वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची एकाएकी ………………………….. उडून गेली. (इच्छा, जीवनेच्छा, आस, आसक्ती)
(iii) ………………………….. त्याला आवाज दिला. (शनूने, अन्वरने, दाजीसाहेबांनी, रघुभैय्याने)
उत्तर:
(i) गाढ
(ii) जीवनेच्छा
(iii) रघुभैय्याने

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 16

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) अब्दुलचं मन धंदयात लागत नव्हतं. कारण …………………………..
उत्तरः
अब्दुलचं मन धंदयात लागत नव्हतं कारण तपोवन दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं.

(ii) अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या कारण …………………………..
उत्तर:
अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या कारण त्या सगळ्या वस्तू तो संक्रांतीला तपोवनात नेणार होता.

प्रश्न 3.
खालील कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 17

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) अब्दुल हळवा का झाला?
उत्तर:
कष्टाने फुलवलेली कर्मभूमी सोडण्याच्या विचारानं दाजीसाहेबांना किती यातना होत असतील, या विचाराने अब्दुल हळवा झाला.

(ii) अब्दुल तपोवनात कोणत्या सणाच्या दिवशी जाणार होता?
उत्तर:
अब्दुल संक्रांतीला तपोवनात जाणार होता.

(iii) देवळातल्या पहारेकऱ्याने कितीचे टोल दिले?
उत्तर:
देवळातल्या पहारेकऱ्याने दोनचे टोल दिले.

(iv) अब्दुल वर्षातून किती वेळा दुसऱ्यासाठी जगण्यात त्या आनंदाचे सुख अनुभवायचा?
उत्तर:
अब्दुल वर्षातून फक्त दोनदाच दुसऱ्यासाठी जगण्यातल्या आनंदाचे सुख अनुभवायचा.

(v) साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलवर काय परिणाम झाला?
उत्तरः
साऱ्या वस्तूंकडे बघता-बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला 18

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदा अब्दुल अनुभवायचा. स्पष्ट करा.
उत्तर:
अब्दुलचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. वर्षातून दोनदा म्हणजे संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला अब्दुल तपोवनात जायचा. कुष्ठरोगाने पीडित स्त्रिया, मुली यांच्यासाठी तो टिकल्या, बांगड्या, पिना, आरसा, रिबिन, रुमाल अशा वस्तू घेऊन जायचा. अब्दुल तपोवनात जाताच तिथल्या सगळ्या बायका, मुलींना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या हातात कौशल्यपूर्वक तो बांगड्या भरायचा. बांगड्यांच्या विविध रंगात क्षणभर का होईना त्या आपले दुःख विसरत, त्यांचा तो आनंद बघून अब्दुल मनोमन सुखावत असे. स्वत:साठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद अब्दुल मिळवत होता.

प्रश्न 2.
एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली असे लेखिका का म्हणते?
उत्तरः
अब्दुल रंगीबेरंगी बांगड्या व इतर अनेक वस्तू घेऊन वर्षातून दोनदा तपोवनात जात असे. त्या रंगीबेरंगी बांगड्या म्हणजे तपोवनातल्या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी आनंददायी गोष्ट होती. बांगड्या भरण्याचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी चैतन्याचा आणि उत्साहाचा दिवस होता, आपलं सगळं दुःख विसरून बांगड्यांच्या रंगात त्या हरवून जात. हे सगळं बघून अब्दुल मनोमन सुखावत असे. दुसऱ्यासाठी जगण्यातल्या आनंदाचं सुख आता त्याला मिळणार नव्हतं, म्हणून तो खूप दुःखी झाला होता. कारण तपोवन आता राहणार नव्हतं. अब्दुलच्या जीवनातला आनंद संपला होता. त्यामुळेच एखादया वस्वाचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली, असे लेखिका म्हणते.

प्रश्न 3.
वरील परिच्छेदावरून अब्दुलचा स्वभाव विशेष लिहा.
उत्तरः
अब्दुल हा अत्यंत संवेदनशील वृत्तीचा गृहस्थ होता. स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली नसतांना देखील तो आपल्या व्यवसायाची पर्वा न करता तपोवनात जात असे. तेथील मुलींना स्त्रियांना त्याच्या मनपसंत बांगड्या भरत असे. त्याला त्या मुलींचा, स्त्रियांचा आनंद बघून समाधान वाटत असे. यावरून असे दिसते की, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी धडपडणारा, व माणुसकीला जपणारा असा अब्दुल होता. तपोवन आता राहणार नाही हे कळल्यावर तो खूप दुःखी झाला यावरून असे कळते की, तो आपल्यापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा, आनंदाचा विचार करणारा परोपकारी वृत्तीचा होता. तो खूपच हळवा होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 चुडीवाला

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
इतर चार-चौघीसारखी शन्नू गृहिणी होती. आपला प्रपंच नीट चालावा, अब्दुलचा व्यवसाय वाढावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलचा ती राग करत असे. तपोवनातील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्यांचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ती सामान्य गृहिणी होती, अब्दुलची उदात्त वृत्ती, परोपकार, सेवाभाव यातलं तिला काही कळत नव्हते.

चुडीवाला शब्दार्थ‌ ‌

  • ‌उजळणी‌ ‌-‌ ‌सराव‌ ‌,‌ ‌शिकलेल्या‌ ‌भागाचा‌ ‌पुन्हा‌ ‌अभ्यास‌‌ – (revision)‌ ‌
  • चुडीवाला‌ ‌-‌ ‌बांगडीवाला‌ ‌-‌ ‌(bangle‌ ‌seller)‌ ‌
  • कुष्ठरोग‌ ‌-‌ ‌महारोग‌‌ – (leprosy)‌ ‌
  • वसाहत‌ ‌-‌ ‌वसतिस्थान‌‌ – (colony)‌ ‌
  • प्रस्ताव‌ ‌-‌ ‌ठराव‌‌ – (proposal)‌ ‌
  • संवेदनशील‌ ‌-‌ ‌भावनाशील‌ ‌-‌ ‌(sensitive)‌ ‌
  • वृत्ती‌ ‌-‌ ‌स्वभाव‌‌ – (nature)‌ ‌
  • पर्वणीच‌ ‌-‌ ‌सणाचा‌ ‌दिवस‌ ‌-‌ ‌(a‌ ‌festival)‌ ‌
  • उतारू‌ ‌-‌ ‌प्रवासी‌‌ – (passengers)‌ ‌
  • क्रोध‌ ‌-‌ ‌राग‌‌ – (anger)‌ ‌
  • चौथरा‌ -‌ ‌दगडी‌ ‌ओटा‌ ‌
  • कीव‌ ‌-‌ ‌करूणा‌ ‌-‌ ‌(mercy,‌ ‌pity)‌ ‌
  • मेघरहित‌ ‌-‌ ‌ढग‌ ‌नसलेले‌ ‌-‌ ‌(without‌ ‌clouds)‌ ‌
  • उसवलेला‌ ‌-‌ ‌शिवण‌ ‌सैल‌ ‌झालेला‌ ‌किंवा‌ ‌फाटलेला‌ ‌
  • जीवनेच्छा‌ ‌-‌ ‌जीवनातील‌ ‌इच्छा‌ ‌
  • वाऱ्याचा‌ ‌झोत‌ ‌-‌ ‌वाऱ्याची‌ ‌लाट‌ ‌-‌ ‌(a‌ ‌wave‌ ‌of‌ ‌air)‌ ‌
  • कमान‌ ‌-‌ ‌महिरप‌ ‌-‌ ‌(decorative‌ ‌half‌ ‌cirlce)‌ ‌
  • दिव्य‌ ‌-‌ ‌कसोटीचा‌ ‌प्रसंग‌ ‌/‌ ‌कठोर‌ ‌परीक्षा‌‌ -‌ ‌(an‌ ‌ordeal)‌ ‌
  • चैतन्य‌ ‌-‌ ‌जिवंतपणा‌ ‌-‌ ‌(liveliness)‌ ‌
  • देवदूत‌ ‌-‌ ‌देवाचा‌ ‌निरोप्या‌ ‌-‌ ‌(god’s‌ ‌messenger)‌ ‌
  • विलक्षण‌ ‌-‌ ‌वेगळे‌‌ -‌ ‌(uncommon)‌ ‌
  • समाधान‌ ‌-‌ ‌मनाचा‌ ‌संतोष,‌‌ – (satisfaction)‌ ‌
  • सत्कार‌ ‌-‌ ‌आदर‌‌ – (hospitality,‌ ‌respect)‌ ‌
  • संकोच‌ ‌-‌ ‌लाजणे‌ ‌-‌ ‌(to‌ ‌feel‌ ‌shy)‌‌
  • सडसडीत‌ ‌-‌ ‌उंच‌ ‌देखणा‌ ‌-‌ ‌(tall,‌ ‌slim‌ ‌and‌ ‌comely)‌ ‌
  • देहयष्टी‌ ‌-‌ ‌शरीराची‌ ‌ठेवण‌ ‌-‌ ‌(body‌ ‌structure)‌ ‌
  • तेजःपुंज‌ ‌-‌ ‌तेजस्वी‌‌ – (lustrous‌ ‌/‌ ‌brilliant)‌ ‌
  • ‌गौरवर्ण‌ ‌-‌ ‌गोरा‌ ‌रंग‌ ‌-‌ ‌(fair)‌‌
  • ‌रुबाब‌ ‌/दिमाख‌ ‌खार‌ ‌-‌ ‌एक‌ ‌चपळ‌ ‌प्राणी‌ ‌-‌ ‌(asquirrel)‌ ‌
  • आश्वासन‌ ‌-‌ ‌वचन/हमी‌ ‌-‌ ‌(promise)‌
  • ‌मोबदला‌ ‌-‌ ‌केलेल्या‌ ‌कामाचे‌ ‌वेतन‌‌ – (remuneration‌ ‌for‌ ‌the‌ ‌work‌ ‌done)‌ ‌
  • अनमोल‌ ‌-‌ ‌मौल्यवान,‌ ‌ज्याचे‌ ‌मूल्य‌ ‌होऊ‌ ‌शकत‌ ‌नाही‌ ‌असे‌‌ – (priceless)

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions भाग-२

Mothe Hot Aslelya Mulano Class 10 Marathi Chapter 4.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 4.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
टिपा लिहा.

(अ) बार्क.
उत्तरः
‘बार्क’ हे ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाचे लघुरूप आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे. अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या अनेक नवीन मुलांना तिथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक मुले इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:ला सक्षम करून स्वत:चे मार्ग शोधून पुढे जातात, आपले उज्ज्वल भविष्य घडवत असतात.

(आ) डॉ. होमी भाभा.
उत्तरः
डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. भारतातील अणुसंशोधन केंद्राला त्यांचेच नाव दिले आहे. ‘बार्क’ ही ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाने ओळखली जाते. अनेक मुलेमुली इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. या शिक्षण घेणाऱ्या मुलांना भेटायला, त्यांना प्रोत्साहित करायला डॉ. होमी भाभा नेहमी तिथे येत असत. डॉ. होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक असे व्यक्तिमत्त्व होते. लेखक स्वत: या ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. भाभा तीन-चार वेळा स्वतः तिथे आले होते. त्यावेळी स्वत:ला सक्षम कसे करावे, ऊर्जा कशी मिळवावी, स्वत:च स्वत:चे मार्ग कसे शोधावेत यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन लेखक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरले होते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो…

प्रश्न 2.
‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
उत्तरः
लेखक बार्क संस्थेत ट्रेनिंग स्कूलला गेले होते. तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्षे झाली होती. लेखक ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा तीन-चार वेळा तेथे आले होते. एकदा लेखकांनी त्यांना विचारलं, “आम्ही इतकी मुलं-मुली आहोत; पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे?” तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही त्याची काळजी न करता सर्वजण संशोधन करा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आता विचार करू नका. तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. बॉसने सांगितले तेवढचं काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.

भाभांनी सांगितलेल्या या मुद्द्यातून लेखकांनी स्वत:च स्वतःला सक्षम बनवले. त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळवता आली आणि स्वत:चे मार्ग शोधता आले. यावरूनच लेखकांना कळले की आकाशाला कितीही मोठी पोकळी असली तरी आपण स्वतःचा मार्ग स्वत:च कोणाचाही आधार न घेता सततच्या प्रयत्नाने शोधला तर तोही मिळतोच. अशावेळी ‘स्काय इज द लिमीट’ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

प्रश्न 3.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
उत्तरः
लेखक ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी लागणारी सामग्री तिथे होती, पण आतापर्यंत ती कोणीही वापरलेली नव्हती. त्यामुळे लेखक म्हणाले की, ते काम करण्यास तयार आहेत, केवळ त्यांना मदतीसाठी एक वेल्डर आणि एक फोरमनची गरज आहे. त्यावेळी त्यांना नकार देण्यात आला. आपल्याला स्वत:लाच सगळे करावे लागेल असेही सांगण्यात आले. वरिष्ठांची आज्ञा म्हणून लेखकाने सुरुवात केली. बरीच धडपड करून लेखकाने ते काम पूर्ण केले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो…

मग वरिष्ठांकडून या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली. ‘हे करूया, ते करूया’, असे बरेच काही काही बोलले गेले. नंतर वरिष्ठांनी लेखकाला विचारले की, “आता सांग, तुला काय काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी काही हवे असेल तर तेही मिळेल.” त्यावेळी लेखक म्हणाले की, “मला आता काहीच नको. मी स्वतः सगळे काम करीन.” त्यावेळी लेखकाला सांगण्यात आले की, काम सुरू करण्याआधीच लोक वेगवेगळ्या मागण्या करतात आणि त्यांच्या या वृत्तीमुळेच मेटलायझिंग प्रक्रियेवर काम अजिबात झालेले नव्हते. स्वत:ला काम करता येत नसताना दुसऱ्यांवर काम ढकलण्याच्या प्रक्रियेमुळेच मेटलायझिंग प्रक्रियेवर काम सुरू झालेले नव्हते, असे मला वाटते.

प्रश्न 4.
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
उत्तरः
महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. आधी केले, मग सांगितले या उक्तीप्रमाणे सर्व संतांनी कार्य करून दाखवले आहे.

उदाहरणे दयायचीच तर संतांनी प्राण्यांवर दया करण्याचा संदेश आपल्या अभंगातून फक्त दिला नाही तर संतांनी ते करूनही दाखवले. संत नामदेव भुकेल्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावत गेले. संत एकनाथांनी भर उन्हात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीहून आणलेल्या गंगेचे पाणी पाजून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर समाजसेवक व समाजसुधारक गाडगे महाराज यांनी स्वतः आधी हातात झाडू घेऊन गावातील केरकचरा दूर करण्यापासून ते विष्ठा उचलण्याची कामे केली. देवाच्या नावाने कर्मकांड करण्यापासून अडवले. मूर्तीपूजा न करता गोरगरीब मानवाची पूजा करा, त्यांची सेवा करा हे लोकांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पटवूनही दिले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो…

बाबा आमटे हे ही आधुनिक काळातील राष्ट्रसंतच म्हटले पाहिजेत. रस्त्यावर महारोग होऊन पडलेल्या तुळशीरामला पाहून त्यांच्या मनात कुष्ठरोग्यांच्या बद्दल सेवाभाव जागृत झाला व त्यातूनच चंद्रपूर येथे ‘आनंदवनाची’ निर्मिती झाली. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पाश्चात्य देशांनी त्यांना पुरस्कृतही केले.

या सर्व उदाहरणांवरून ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीची सार्थकता स्पष्ट झाल्यासारखे वाटते.

प्रश्न 5.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.
उत्तरः
शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. आपले गुरूजन आपणांस शिकवण्याचे काम करत असतात. आजच्या शिक्षणप्रणालीत शिक्षक वर्गात फळ्यावर जरी प्रत्येक गणित सोडवून देत असले तरी विदयार्थ्यांनी तीच गणिते पुन्हा घरी जाऊन सोडवली तर त्यातून मिळणारा स्वानुभव हा परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ शकतो.

विज्ञान प्रदर्शनात गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रयोग, एखादी प्रतिकृती तयार केली तरी ती बनवत असताना आलेला अनुभव हाच प्रदर्शनात परीक्षकांच्या पुढे उत्तरे देताना धाडस निर्माण करून देतो. याच अनुभवातून विदयार्थी परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अडखळत नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसून येतो.

यावरून असे लक्षात येते की, कोणतेही काम एखादयाने सांगितल्यावर त्याप्रमाणे कृती करून पूर्ण करणे व पुन्हा तेच काम कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतः करणे यातील अनुभव म्हणजेच खरा स्वानुभव होय असे म्हटले पाहिजे. शिवाय असे शिक्षण अधिक परिणामकारक असते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो…

टिपा लिहा.

प्रश्न  1.
‘कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत’ याबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तरः
कोणतेही काम लहान व मोठे नसते. आपण जर त्या कामाला सकारात्मक विचाराने स्वीकारून फक्त ते काम करण्यास सुरुवात जरी केली तरी ते काम अर्धेअधिक पूर्ण झालेच म्हणून समजा. राहिलेले अर्धे काम, काम करण्यास सुरुवात करताच पूर्ण होत जाते. कोणतेही काम लहान व कमी दर्जाचे आहे असे मानून ते कधीही टाळू नये, कारण कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. ते आपल्या करण्यावर अवलंबून असते.

आपणांस लहान-सहान कामाची सतत सवय असली पाहिजे. ही कामे आपण अगदी लहान वयातच करायला शिकले पाहिजे उदा. स्वत:चे कपडे स्वत: धुणे, फाटलेले कपडे स्वत: शिवणे, जेवताना स्वत:चे पान स्वत: वाढून घेणे, पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून घेणे, स्वत:च्या कपड्यांना इस्त्री करणे, स्वत:च्या बूटांना पॉलीश करणे इत्यादी कामांची सवय जर आपणांस लहानपणापासून असेल तर मोठेपणी जेव्हा घराची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर येऊन पडते तेव्हा, त्या कामांचे ओझे वाटत नाही. मोठी कामे अवघड वाटत नाहीत. सर्वप्रकारची कामे आपण सहज पूर्ण करू शकतो, अशा प्रकारच्या कामातून आनंद तर मिळतोच पण मानसिक समाधान मिळते ते वेगळेच.

मोठे होत असलेल्या मुलांनो… शब्दार्थ‌‌

  • खात्री‌ ‌-‌ ‌विश्वास‌ ‌-‌ ‌(trust)‌ ‌
  • अभ्यास‌ ‌-‌ ‌सराव‌ ‌-‌ ‌(study,‌ ‌practice)‌ ‌
  • लघुरूप‌ ‌-‌ ‌लहान‌ ‌रूप‌ ‌-‌ ‌(short‌ ‌form)‌
  • प्रचंड‌‌ -‌ ‌खूप‌ ‌‌-‌ ‌(excessive)‌ ‌
  • जेमतेम‌ ‌-‌ ‌सुमारे‌ ‌-‌ ‌(just)‌ ‌
  • पुरेल‌ ‌-‌ ‌पूर्ण‌ ‌होईल‌ ‌-‌ ‌(sufficient)‌ ‌
  • प्रवृत्ती/वृत्ती‌ ‌-‌ ‌स्वभाव‌ ‌-‌ ‌(nature)‌ ‌
  • स्वानुभव‌ ‌‌-‌ ‌स्वत:चा‌ ‌अनुभव‌ ‌-‌ ‌(self‌ ‌experience)‌ ‌
  • अंतिमतः‌ ‌-‌ ‌शेवटी‌ ‌-‌ ‌(at‌ ‌last)‌ ‌
  • सक्षम‌‌ -‌ ‌बलवान‌‌ -‌ ‌(strong)‌‌
  • सामग्री‌ -‌ ‌साहित्य‌ ‌-‌ ‌(equipment)‌
  • ‌वरिष्ठ‌ ‌-‌ ‌मोठे‌ ‌अधिकारी‌ ‌-‌ ‌(senior‌ ‌officer)‌ ‌
  • व्याप्ती‌ ‌‌-‌ ‌स्वभाव‌ ‌-‌ ‌(nature)‌
  • आशय‌‌ -‌ ‌विषय‌‌ ‌-‌ ‌(subject)

Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१

Jungle Diary Class 10 Marathi Chapter 11 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 11 जंगल डायरी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 11 जंगल डायरी Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 11 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 11 जंगल डायरी Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.
(i) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(ii) ___________________________
(iii) ___________________________
(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(v) ___________________________
(vi) ___________________________
उत्तर:
(i) जंगलच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(ii) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.
(iii) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(v) बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.
(vi) त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.
(vii) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण ……………………………..
(ii) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण ……………………………..
उत्तर:
(i) वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.
(ii) वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.

प्रश्न 3.
विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 1

प्रश्न 4.
स्वमत.
(अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तरः
अतुल धामनकर यांनी ‘जंगल डायरी’ या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करतांना आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन तसेच वाघिणीत दिसलेल्या ‘आईची झलक’ मार्मिक पणे व्यक्त केली आहे.

वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. संभाव्य शत्रूच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा दंगाधोपा सुरू होता. थोड्यावेळाने शिकारीपर्यंत पिल्लांना नेण्यासाठी ती उठली. बाबूंच्या गंजीत जिथे शिकार ठेवली होती तिथे पिल्ले आपल्यासोबत येताहेत की नाही हे पाहिले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली पण अदयाप दोघे पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला.

वाघिणीने चारही पिल्ले आपल्याबरोबर येताहेत याची पूर्ण खात्री केली. बाकीची दोन्ही पिल्ले आपला खेळ थांबून आईच्या मागे पळत सुटली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे वाघिणीनेही जबाबदारीने केले होते. आईचे कर्तव्य निभावले होते. त्याला वाघिणीतील आईची झलक अशाप्रकारे जाणवली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

(आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तरः
जंगल डायरी या पाठात अतुल धामनकर यांनी चंद्रपूर येथील जंगल प्रसंगाचे जीवंत चित्रण शब्दबद्ध केले आहे.

वाघीण चारही पिल्लांना वाघ, बिबळा, रानकुत्री यांच्यापासून धोका असल्याने नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीला गेली होती. तिने पिल्लांसाठी खास खबरदारी घेतली होती. ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली. थकलेली वाघीण पाण्यात विश्रांतीसाठी बसली.

पण पिल्लांना आईला बघून उधान आले. त्यातील एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. तिथून ते घसरले व धपकन पाण्यात पडले. वाघिणीच्या तोंडावर पाणी पडल्याने तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्ले खेळतच होती. आईच्या भोवती दंगाधोपा चालू होता. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे, आईला मायेने चाटणे असे खेळ चालू होते. आईच्या भेटीने लपवून ठेवलेली पिल्ले मनमोकळेपणाने खेळत होती.

(इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 11 जंगल डायरी Additional Important Questions and Answers

प्रश्न १. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 2
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) लेखकाने कोणता रस्ता धरला?
उत्तरः
लेखकाने डावीकडं जाणारा झरीचा रस्ता धरला.

(ii) वनमजूर अचानक का थबकला?
उत्तरः
नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं झरीच्या रस्त्यावर उमटलेली दिसली, म्हणून वनमजूर थबकला.

(iii) दुर्बिणीने काय स्पष्ट दिसले?
उत्तरः
तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बसलेला बिबळ्या दुर्बिणीने स्पष्ट दिसला.

(iv) बिबळ्या जंगलात अदृश्य का झाला?
उत्तर:
टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडून झालेल्या ‘कट्’ आवाजाने बिबळ्या सावध होऊन जंगलात अदृश्य झाला.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) गावातून ………………………………….. वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. (रेगे, टोंगे, दिघे, पोंगशे)
(ii) हा एक ………………………………….. असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच इथून गेला असावा. (वाघ, रेडा, नर, गेंडा)
(iii) एका ………………………………….. झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता. (आंब्याच्या, तेंदूच्या, बाभळीच्या, सागाच्या)
(iv) थोड्याच अंतरावर ………………………………….. जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. (रायबाकडं, ज्योतिबाकर्ड, पन्हाळ्याकडं, जंगलाकड)
उत्तर:
(i) टोंगे
(ii) नर
(iii) तेंदूच्या
(iv) रायबाकडं

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
सकारण लिहा.
(i) बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण –
(अ) लेखक लपून बसला होता.
(आ) झुडपांची दाट झाडी होती.
(इ) लेखकाकडे त्याची पाठ होती.
(ई) बांबूचे बन होते.
उत्तर:
बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण लेखकाकडे त्याची पाठ होती.

(ii) तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण
(अ) बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(आ) नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.
(इ) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(ई) रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता.
उत्तरः
तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.

प्रश्न 2.
‘बिबळ्याच्या निरीक्षणाची’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
कोणती चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक हळहळला?

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
(i) वनरक्षक : टोंगे :: तिखट कानांचा : …………………………………..
(ii) वाळक्या : काट्या :: दाटी : …………………………………..
उत्तर:
(i) बिबळ्या
(ii) झुडपांची

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले.
(ii) बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक आनंदी होते.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 5.
उताऱ्यानुसार पुढील वाक्यांचा योग्य क्रम लावा.
(i) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(ii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं.
(iii) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.
(iv) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.
उत्तर:
(i) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.
(ii) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(iii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिले.
(iv) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही अनुभवलेल्या जंगल सफारीचे वर्णन लिहा.
उत्तरः
मी इयत्ता ८ वीत असताना नाताळाच्या सुट्टीत जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. कोचीन, पेरीयार व टेकाडी या केरळाच्या टूरवर असताना. टेकाडीच्या घनदाट जंगलात हत्तीवरून जंगल सफारीची मजा लुटली. हत्तीवर बसण्याचा, संथ पण हेलकावे घेत जाण्याचा अनुभव निराळाच होता. आम्ही चारजण हत्तीवर बसून जंगल फिरलो. हरणांचे कळप दिसले, रानम्हशी दिसल्या. रानगव्यांचा कळप जाताना आमच्या गाईडने दाखवला. मुंग्यांची मोठ-मोठी वारूळे दिसली. मधमाश्यांचे पोळे पाहिले. वाघही पहायला मिळाला. खूप दूरवर असल्याने वाघाची अंधूकशी झलक दिसली. कोल्हे तर दोन-तीन वेळा दिसले. बहिरीससाणेही दिसले.

आमच्या रस्त्यावरून मुंगूस जाताना पाहिले. त्याची मोठी तुरेदार शेपूट शोभून दिसत होती. सांबरशिंग काळ्याकभिन्न रंगाचे होते. त्याची शिंगे मोठी डौलदार होती. हत्तींचा कळप टेकडीच्या नदीवर पाणी प्यायला आला होता. हत्तींची दोन पिल्ले फारच मोहक होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. दाट जंगलातून जाताना पानांची सळसळ होती. झाडांच्या फांदया अक्षरश: आमच्या अंगाखांदयाला लागत होत्या. हत्तीवर असल्याने कोणत्याही वन्यप्राण्यापासून आम्हाला धोका नव्हता. दिवस कसा संपला हे कळलेही नाही. जंगलातील अनुभवांचे गाठोडे घेऊन आम्ही परतलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 4

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला ओलसर चिखलात काय दिसले?
उत्तरः
लेखकाला ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली.

(ii) लेखक कशासाठी अधीर होता?
उत्तर:
लेखक वाघिणीची पिल्ले बघण्यासाठी अधीर होता.

(iii) लेखकाचे हृदय केव्हां धडधडू लागले?
उत्तर:
पाणवठा जवळ आला तसे लेखकाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले.

(iv) वाघीण कोठे लपली असावी असे लेखकाला वाटते?
उत्तरः
वाघीण जांभळीच्या झुडपात लपली असावी असे लेखकाला वाटते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) प्रचंड ………………………………….. दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. (थंडीचे, उष्णतेचे, पावसाचे, गरमीचे)
(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक दडपण आलं होतं. (अनामिक, सहज, भरभरून, दु:खाचे)
(iii) जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका ………………………………….. साचून होता. (पाचोळा, पालापाचोळा, पाला, कचरा)
उत्तर:
(i) उष्णतेचे
(ii) अनामिक
(iii) पाचोळा

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात …………………………………..
(अ) उत्तम जनावर!
(आ) धोकादायक जनावर!
(इ) विश्वासू प्राणी!
(ई) घाबरट जनावर!
उत्तर:
लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर!

(ii) आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच.
(अ) खूण करून सूचना केली.
(आ) सावध करून इशारा केला.
(इ) खूणवत संकेत केला.
(ई) इशारा करून सावध केला.
उत्तर:
आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
चूक की बरोबर लिहा.

(i) लेखकांना वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती.
(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर एक अनामिक दडपण आलं नव्हतं.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
(i) ओलसर : चिखल :: पानांची : …………………………………..
(ii) पिल्लांच्या : पाऊलखुणा :: वाघीणीचे : …………………………………..
उत्तर:
(i) सळसळ
(ii) गुरगुरणे.

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या सर्कशीमधील चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तरः
आजही तो प्रसंग डोळ्यांसमोर जसाचा तसा आठवतो. ‘द ग्रेट रॉयल सर्कस’ चा अविस्मरणीय प्रसंग चित्तथरारक होता, सर्कशीची सुरुवात अतिशय शानदार झाली. एका पायावरच्या कसरती झाल्या. मग खास आकर्षण असणारा सिंह पिंजऱ्यात आणला गेला. पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढले, मग रिंग मास्टर ने त्याला पेटलेल्या चक्रातून उडी मारण्याचा हुकूम दिला. सिंहाने ५ उड्या मारल्या, सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. रिंग मास्टरने देखील त्याला हंटर दाखवून पुन्हा पिंजऱ्यात जाण्याचा आदेश दिला. आता मात्र सिंहाने तो आदेश साफ नाकारला. तो तेथूनच रिंगणातून पळत सुटून प्रेक्षकांच्या दिशेने धावत गेला. एकच हाहा:कार माजला. सगळे लोक गडबडले. किंचाळ्या आणि आक्रोशांनी परिसर गंभीर झाला. लोक इतस्तत: धावू लागले. चेंगराचेंगरीत अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. सिंह येऊन आपल्याला खाणार या भीतीने मृत्यूच डोळ्यांपुढे दिसू लागला. सर्कशीतील कलाकारांची तारांबळ उडाली. अनेक खुर्ध्या तुटल्या. सर्कशीच्या तंबूलाही आग लागली. जो तो जीव घेऊन पळत सुटला. अनेकांच्या प्रयत्नांनी परिस्थिती आटोक्यात आली.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) वाघीण कशाबद्दल दक्ष असते?
उत्तर:
वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष असते.

(ii) पिल्लांना कां उधाण आले होते?
उत्तर:
आईला पाहून पिल्लांना उधाण आले होते.

(iii) वाघिणीने शिकारीला जाण्यापूर्वी पिल्लांना कोठे लपवले होते?
उत्तर:
शिकारीला जाण्यापूर्वी वाघिणीने पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपविले होते.

(iv) लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच का थबकला?
उत्तरेः
‘ऑऽव्हऽऽ!’ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच थबकला.

(v) बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात कोणी उडी मारली?
उत्तर:
वाघिणीच्या एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी मारली.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………………….. पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. (सिंहीण, वाघीण, हरीण, कोल्हीण)
(ii) ………………………………….. च्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. (आई, वाघीणी, पिल्लां, लेखका)
उत्तर:
(i) वाघीण
(ii) आई

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.

(i) वाघीण विश्रांती घेत होती, कारण …………………………………..
(अ) पिल्लांचा जबरदस्त दंगाधोपा चालू होता
(आ) रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.
(इ) पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल दक्ष होती.
(ई) तीनही पिल्लं पाण्यात उतरली होती.
उत्तरः
वाघीण विश्रांती घेत होती, कारण रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
घटनेनुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली.
(ii) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.
(iii) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.
(iv) मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.
उत्तरः
(i) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.
(ii) मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.
(iii) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेड पाण्यात उडी घेतली होती.
(iv) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
(i) वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती.
(ii) पिल्लांच्या उत्साहाला लेखक बघताच उधाण आलं होतं.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३: स्वमत.

प्रश्न 1.
‘भारताचा राष्ट्रीय पशू-वाघ’ याबद्दल तुम्हांला असलेली माहिती तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
वाघ हा जंगलात राहणारा मांसाहारी सस्तन पशू आहे. हा भूतान, नेपाळ, भारत, कोरिया, अफगाणिस्तान व इंडोनेशिया मध्ये जास्त संख्येने आढळतो. लाल, पिवळ्या पट्ट्यांचे याचे शरीर असून पायाकडचा भाग पांढरा असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘पॅथेरा टिग्रिस’ आहे. संस्कृत मध्ये ‘व्याघ्र’ असे संबोधले जाते. दाट वनांत, दलदलीच्या भागात रहाणारा हा प्राणी आहे. सांबर, चित्ता, म्हैस, हरणे यांची तो झडप घालून शिकार करतो. वाघीण साडेतीन महिन्यानंतर साधारणत: दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले शिकार करण्याची कला आपल्या आईकडून म्हणजे वाघिणीकडून शिकतात. साधारणपणे १९ वर्षांचे आयुर्मान यांना लाभलेले असते. असा हा ‘वाघ’ आपल्या भारताचा राष्ट्रीय पशू आहे.

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 6

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) वाघिण पिल्लांना कोठे घेऊन जात होती?
उत्तर:
वाघिण पिल्लांना शिकारीकडे घेऊन जात होती.

(ii) वाघिणीने पिल्लांना कोणता इशारा केला?
उत्तर:
वाघिणीने पिल्लांना ‘ऑऽव’ आवाज करून मागे येण्याबद्दल इशारा केला.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आई वळून एखादया पिल्लाला ………………………………….. चाटत होती. (ममतेने, प्रेमाने, आपुलकीने, मायेने)
(ii) वाघिणीनं ………………………………….. पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. (नाला, ओढा, नदी, ओहोळ)
(iii) ………………………………….. मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. (चारच, पाचच, एकच, दोनच)
उत्तर:
(i) मायेने
(ii) नाला
(iii) दोनच

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
एका शब्दात चौकटी पूर्ण करा,
(i) दोनच मिनिटांत वाघीण येथे गेली दिसेनाशी झाली.
(ii) लेखकाच्या यात मोलाची भर पडली.
उत्तर:
(i) जंगलात
(ii) व्याघ्रअनुभवात.

प्रश्न 2.
परिच्छेदात आलेल्या वन्यप्राण्यांची नावे लिहा.
उत्तर:
सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर, वाघीण

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 3.
ओघतक्ता योग्यक्रमाने पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 7

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
(ii) लेखकांच्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव नव्हता.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

(स्वाध्याय कृती)

प्रश्न 1.
(i) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, या विषयावर तुमचे मत लिहा.
उत्तर:
डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.

जंगल डायरी Summary in Marathi

जंगल डायरी पाठपरिचय‌ ‌

‘जंगल‌ ‌डायरी’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌लेखक‌ ‌’अतुल‌ ‌धामनकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌ताडोबा‌ ‌अभयारण्यात‌ ‌सफर‌ ‌करताना‌ ‌आलेले‌ ‌अनुभव‌ ‌रोमहर्षक‌ ‌पद्धतीने‌ ‌मांडले‌ ‌आहेत.‌ ‌त्याचबरोबर‌ ‌वाघिणीमध्ये‌ ‌दडलेल्या‌ ‌’आईचे’‌ ‌रोमहर्षक‌ ‌वर्णन‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌

जंगल डायरी Summary in English

“Jungle‌ ‌Diary’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Atul‌ ‌Dhamankar.‌ ‌Thrilling‌ ‌experiences‌ ‌are‌ ‌mentioned,‌ ‌of‌ ‌a‌ ‌jungle‌ ‌safari‌ ‌at‌ ‌Tadoba‌ ‌Sanctuary.‌ ‌The‌ ‌motherhood‌ ‌of‌ ‌a‌ ‌tigress‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌depicted‌ ‌in‌ ‌this‌ ‌lesson.

जंगल डायरी ‌शब्दार्थ‌ ‌

  • विश्रामगृह‌ ‌–‌ ‌आरामालय‌ ‌–‌ ‌(guest‌ ‌house)‌ ‌
  • थबकणे‌ ‌– थांबणे‌ ‌–‌ ‌(pause)‌ ‌
  • चारही‌ ‌बाजूंना‌ ‌–‌ ‌चारही‌ ‌दिशांना‌ ‌–‌ ‌(in‌ ‌all‌ ‌directions)‌ ‌
  • कोपरा‌ ‌–‌ ‌आडोसा‌ ‌–‌ ‌(corner)‌ ‌
  • अदयाप‌ ‌–‌ ‌अजूनही‌ ‌–‌ ‌(till‌ ‌now)‌ ‌
  • वाळकी‌ ‌–‌ ‌सुकलेली‌ ‌–‌ ‌(dried)‌ ‌
  • काटकी‌ ‌–‌ ‌वाळक्या‌ ‌काटक्या‌ ‌–‌ ‌(twings)‌ ‌
  • अदृश्य‌ ‌–‌ ‌दिसेनासा‌ ‌–‌ ‌(disappear)‌ ‌
  • वन्यप्राणी‌ – ‌रानटी‌ ‌प्राणी‌ ‌–‌ ‌(wild‌ ‌animals)‌
  • ‌हळहळणे‌ ‌–‌ ‌वाईट‌ ‌वाटणे‌ ‌–‌ ‌(to‌ ‌feel‌ ‌bad)‌
  • ‌शरमिंदा‌ ‌–‌ ‌लाजणे‌ ‌– (awkward)‌ ‌
  • दाट‌ –‌ ‌गर्द‌ ‌– (dense)‌ ‌
  • सावध‌ ‌–‌ ‌दक्ष‌ ‌–‌ ‌(careful)‌ ‌
  • अनामिक‌ ‌–‌ ‌नाव‌ ‌नसलेले‌ ‌–‌ ‌(unknown)‌ ‌
  • ओलसर‌ ‌ओला‌ ‌–‌ ‌(damp)‌ ‌
  • परिसर‌ ‌–‌ ‌आजुबाजूची‌ ‌जागा‌ ‌–‌ ‌(surrounding)‌ ‌
  • पानगळ‌ – ‌पानझड‌ ‌– (fall) ‌
  • वाळका‌ ‌पाचोळा‌ ‌–‌ ‌सुकलेली‌ ‌पाने‌ ‌–‌ ‌(dry‌ ‌leaves)‌ ‌
  • ‌कसरत‌ ‌‌–‌ ‌कठीण‌ ‌बाब‌ ‌–‌ ‌(difficult‌ ‌task)‌ ‌
  • चौकस‌ ‌– जिज्ञासू,‌ ‌–‌ ‌(inquisitive)‌, ‌काळजीपूर्वक‌ ‌–‌ ‌(careful)‌ ‌
  • खूण‌ ‌–‌ ‌इशारा‌ ‌–‌ ‌(a‌ ‌sign)‌ ‌
  • दडपण‌ ‌–‌ ‌ताण‌ ‌– (pressure)‌ ‌
  • पाणवठा‌ ‌–‌ ‌पाण्याची‌ ‌जागा‌ ‌–‌ ‌(reservoiour)‌ ‌
  • आश्वासक‌ ‌–‌ ‌पाठींबा‌ ‌देणारा‌ ‌– (supportive)‌ ‌
  • विरळ‌ ‌–‌ ‌संख्येने‌ ‌कमी‌ ‌–‌ ‌(rare)‌ ‌
  • संभाव्य‌ ‌–‌ ‌अपेक्षित‌ ‌– (expected)‌ ‌
  • खबरदारी‌ ‌–‌ ‌काळजी‌ ‌– (precaution)
  • आवश्यक‌ ‌– जरुरी‌ ‌– (necessary)
  • राबता – ये‌ ‌जा‌ ‌–‌ ‌(movements)
  • ‌भलतीच‌ ‌– खुप – ‌(too‌ ‌much)
  • दडून‌ ‌बसणे‌ ‌–‌ ‌लपून‌ ‌बसणे‌ ‌–‌ ‌(to‌ ‌hide)
  • विश्रांती‌ ‌– आराम‌ – (to‌ ‌take‌ ‌rest)‌
  • गुरगुरणे‌ ‌‌–‌ ‌वाघाचा‌ ‌आवाज‌ –‌ ‌(roaring)
  • मायेने‌ ‌‌–‌ ‌प्रेमाने – (with‌ ‌love)‌
  • घटकाभर‌ ‌‌–‌ ‌थोडावेळ‌ ‌–‌ ‌(for‌ ‌a‌ ‌while)
  • झलक‌ – रूप –‌ ‌(glimpse)
  • व्याघ्र – वाध‌ – ‌(tiger)‌ ‌

जंगल डायरी वाक्प्रचार‌

  • हातची‌ ‌संधी‌ ‌गमावणे‌ ‌–‌ ‌हातचा‌ ‌मोका‌ ‌घालवणे,‌
  • ‌सरसरून‌ ‌काटा‌ ‌येणे‌ ‌–‌ ‌घाबरणे.‌ ‌
  • पारंगत‌ ‌असणे‌ ‌– तरबेज‌ ‌असणे.‌ ‌
  • दंग‌ ‌होणे‌ ‌– मग्न‌ ‌होणे.‌ ‌
  • उधाण‌ ‌येणे‌ ‌– उत्साह‌ ‌संचारणे.‌ ‌
  • आश्चर्याने‌ ‌थक्क‌ ‌होणे‌ ‌–‌ ‌नवल‌ ‌वाटणे.

Marathi Akshar Bharati Class 10th Digest भाग-३

Shaal Class 10 Marathi Chapter 3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 3 शाल Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 3 शाल Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 3 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 3 शाल Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख – [              ]
(आ) २००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – [              ]
(इ) पाठात उल्लेख असणारी नदी – [              ]
(ई) सभासंमेलने गाजवणारे कवी – [              ]
उत्तर:
(अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख – [पुलकित शाल]
(आ) २००४च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – [लेखक रा. ग. जाधव]
(इ) पाठात उल्लेख असणारी नदी – [कृष्णा]
(ई) सभा संमेलने गाजवणारे कवी – [नारायण सुर्वे]

प्रश्न 2.
शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 22

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 3.
खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
(अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
उत्तर:
लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व पाचपन्नास रुपयांच्या नोटा दिल्या.

(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.
उत्तर:
लेखकाने त्याला आपल्याजवळील दोन शाली दिल्या.

प्रश्न 4.
कारणे शोधून लिहा.
(अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ………………………… .
उत्तर:
त्यामागे लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती. शिवाय त्या शालीच्या उबेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती.

(आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ………………………… .
उत्तरः
ते स्वभावत:च शालीन होते.

(इ) लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ………………………… .
उत्तर:
सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो.

प्रश्न 5.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 23

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 6.
खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
(आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!
(इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.
उत्तर:
(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या – [माणूसकी]
(आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते! – [नम्रता]
(इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या – [उदारता]

प्रश्न 7.
खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
(अ) जवळपास
(आ) उलटतपासणी
उत्तर:
(i) जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ इ.
(ii) उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात इ.

प्रश्न 8.
अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.
उत्तर:
नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.

(आ) खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.
उत्तरः
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद/निमुळत्या प्रवाहावर होत्या.

(इ) मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.
उत्तरः
मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 9.
‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
(i) लेखकाने सूटकेसमधील कोणती शाल काढली?
(ii) लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले या घटनेची ऊब कोणत्या शालीच्या ऊबेपेक्षा अधिक होती?

प्रश्न 10.
शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’, ‘आळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 3

प्रश्न 11.
अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) लेखक सुंदर लेखन करतात.
उत्तर:
लेखिका सुंदर लेखन करतात.

(आ) तो मुलगा गरिबांना मदत करतो.
उत्तरः
ती मुलगी गरिबांना मदत करते.

प्रश्न 12.
स्वमत.
(अ) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे. तर शालीनता ही ‘चरित्रात्मक’ आहे. आपल्या मनात असलेली, एखाद्या व्यक्तिबद्दलची आदराची भावना. आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तिमध्ये असलेला गुण दिसून येतो. तो म्हणजे शालीनता (नम्रता). व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते, त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते, ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे. चारित्र्याचे एक अंग आहे ‘शालीनता’! आणि म्हणून मला वाटते की, ‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे; तर शालीनता ही चरित्रात्मक आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

(आ) “भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
मानवाच्या तीन मुलभूत गरजा – अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकऱ्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, निवारा म्हणजे राहायला घर नाही म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील एक नाही तर दोन शाली दिल्या. पण दोन दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल; पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली हे माझ्या मते योग्यच आहे.

(इ) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
आमचे एकत्र कुटुंब, १५ जणांचा हसता खेळता परिवार कुटुंबप्रमुख-आजी आजोबा नंतर आई-बाबा, काका-काकी, भाऊ-बहिणी. लहानपणी आजीने माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्यांची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही-शरीराने; पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्यासोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडावीशी वाटत नाही. हां! आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो तो भाग वेगळा! पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 3 शाल Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 4

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल
प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) एकदा लेखक पु.ल.देशपांडे यांच्याकडे कशासाठी गेले होते?
उत्तर:
एकदा लेखक पु.ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेले होते.

(ii) सुनिताबाईंनी शालीबद्दल विचारताच लेखकाने लगेच हो का म्हटले?
उत्तर:
पु.ल, व सुनीताबाईंनी लेखकाला शाल दयावी हा त्यांना त्यांचा गौरव वाटला, म्हणून लेखकांनी लगेच त्यांना हो म्हटले.

(iii) कडाक्याच्या थंडीने कोण कुडकुडत रडत होते ?
उत्तर:
कडाक्याच्या थंडीने मासे पकडणाऱ्या बाईचे बाळ कुडकुडत होते.

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 4.
कोण ते लिहा
उत्तर:
(i) लेखकांना थांबवणाऱ्या – [सुनीताबाई]
(ii) काम झाल्यावर निघण्याच्या बेतात असणारे – [लेखक]
(iii) एका पायावर हो म्हणणारे – [लेखक]

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
(i) ती शाल लेखकांनी सुटकेसमध्ये ठेवली.
(ii) ती शाल वापरली मात्र कधीच नाही.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) बरोबर

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
कारण लिहा.
(i) बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती, कारण…
उत्तर:
बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती, कारण ती मासे पकडण्याच्या उद्योगात होती.

प्रश्न 2.
नावे लिहा.
उत्तर:
(i) लेखक विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले ते ठिकाण – [वाई]
(ii) लेखक या शाळेत राहत होते – [प्राज्ञ पाठशाळा]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
(i) खोलीच्या खिडक्या: दक्षिणेकडे: चिंचोळा प्रवाह: ………………………………
(ii) पुलकित: शाल: पाचपन्नास रुपयांच्या: ………………………………
उत्तर:
(i) कृष्णा नदीचा
(ii) नोटा

प्रश्न 4.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 6
(ii) लेखकाने सुटकेसमधील ही शाल काढली – [पुलकित]

प्रश्न 5.
आकृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 7

प्रश्न 6.
खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) एका बाईने तिचे छोटे मूल कशात ठेवले होते?
उत्तरः
एका बाईने तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवले होते.

(ii) वाईला लेखक कोण म्हणून गेले होते?
उत्तरः
वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेले होते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 7.
कंसातील योग्य शब्दांचा वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा.
(i) तिचे बाळ कडाक्याच्या ……………………………… कुडकुडत रडत होते. (उन्हाने, पावसाने, थंडीने, वाऱ्याने)
(ii) या घटनेची ……………………………… पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक (गरमी, नरमी, ऊब, मजा)
(iii) “त्या बाळाला आधी ……………………………… गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” (कापडात, साडीत, शालीत, फडक्यात)
उत्तर:
(i) थंडीने
(ii) ऊब
(iii) शालीत

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
उत्तर:
(i) सभा संमेलने गाजवणारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – [नारायण सुर्वे]
(ii) शालींच्या वर्षावाखाली कधीच हरवली नाही की क्षीणही झाली नाही – [शालीनता]

प्रश्न 2.
चूक की बरोबर लिहा.
(i) शालीमुळे शालीनता येते.
(ii) कविवर्य, नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले,
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 3.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 8

प्रश्न 4.
खालील गोष्टींचा परिणाम लिहा.
(i) नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.
(ii) प्रत्येक कार्यक्रमात त्यांना शाल व श्रीफळ मिळे.
उत्तर:
(i) त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असायची.
(ii) या शाली घेऊन ते ‘शालीन’ बनू लागले.

प्रश्न 5.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 9

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) “या शाली घेऊन घेऊन मी आता ………………………………….. बनू लागलो आहे.’ (शालीन, कुलीन, मलीन, आदर्श)
(ii) शाल व ………………………………….. यांचा संबंध काय? (शालीनता, कुलीनता, मलीनता, शाली)
(iii) प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व ………………………………….. त्यांना मिळत राही. (नारळ, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ढाल)
उत्तर:
(i) शालीन
(ii) शालीनता
(iii) श्रीफळ

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 7.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 10

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध लिहा.
(i) शाल: शालीनता:: उपरोधिक: …………………………………..
(ii) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष: नारायण सुर्वे:: …………………………………..
कार्यक्रमांना अहोरात्र:
उत्तर:
(i) खोच
(ii) भरती

प्रश्न 2.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 11

प्रश्न 3.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
(i) नारायण सुर्वे यांचा मुळातला स्वभाव → [शालीन]
(ii) कविवर्य नारायण सुर्वे यांच्यावर शालींचा झालेला → [वर्षाव]

प्रश्न 4.
विधाने पूर्ण करा.
(i) “शालीमुळे शालीनता येत असेल तर …………………………………..
(ii) “पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एकेक शाल …………………………………..
उत्तर:
(i) मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन.
(ii) लगेचच नेऊन देईन.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 5.
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायांची निवड करून वाक्य पूर्ण करा. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर
(अ) कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती.
(आ) सर्वांच्या सहजपणे लक्षात येणारी होती.
(इ) समाजाच्या सहजपणे लक्षात येणारी होती.
(ई) इतरांच्याही सहजपणे लक्षात येणारी होती.
उत्तरः
त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती.

(ii) शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी …………………………………. .
(अ) नाहिशी झाली नाही.
(आ) उफाळून आली नाही.
(इ) हरवली नाही.
(ई) गायब झाली नाही.
उत्तर:
शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही.

प्रश्न 6.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 12

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे विचारलेल्या कृती सोडवा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.
(i) लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते साल.
(ii) लेखकाची खोली.
(iii) लेखकाने शालींचे गाठोडे याच्याकडे ठेवले.
उत्तर:
(i) २००४
(ii) आठ बाय सहाची
(iii) निकटवर्ती मित्राकडे,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 2.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तर:
(i) लेखकाने मित्राला दिलेले अधिकार → [शाली वापरण्याचे वगैरे]
(ii) शालींचे बांधले → [गाठोडे]
(iii) लेखकाने यांना शाली वाटल्या → [गरीब श्रमिकांना]

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) लेखक साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले.
(ii) लेखकांनी सर्व शालींचे गाठोडे बांधून मित्राकडे दिले.
(iii) मित्र अप्रमाणिक होता.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) बरोबर
(iii) चूक

प्रश्न 4.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
(i) निकटवर्ती मित्राचा स्वभाव – अतिप्रामाणिक
(ii) तत्कालीन एक-दोन वर्षांत लेखकावर झालेला वर्षाव – शालींचा

प्रश्न 5.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 6.
खालील गोष्टींचा झालेला परिणाम लिहा.
(i) तत्कालीन एक-दोन वर्षांत लेखकावर शालींचा वर्षाव झाला.
(ii) आठ बाय सहाच्या खोलीत जमलेल्या शाली ठेवणे शक्य नव्हते.
उत्तर:
(i) एवढ्या शाली जमत गेल्या, की लेखकांच्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते.
(ii) त्याचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ते ठेवण्यास दिले.

प्रश्न 7.
सहसबंध लिहा.
(i) निकटवर्ती: मित्र:: गरीब: …………………………
(ii) शालीचे: गाठोडे:: आठ बाय सहा: …………………………
उत्तर:
(i) श्रमिक
(ii) खोली

कृती २: आकलन कृती।

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 14

प्रश्न 2.
कृती पूर्ण करा,
उत्तर:
(i) लेखकांना आवडणारी गोष्ट – कट्ट्यावर बसणे
(ii) लेखक रोज संध्याकाळी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर येथे जात असत – मंदिराच्या पुलावर

प्रश्न 3.
फक्त नावे लिहा.
(i) शनिवार पेठेतील मंदीर – ओंकारेश्वर
(ii) चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसलेला – म्हातारा
(iii) कट्ट्यावर बसणारे – लेखक

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा
(i) शनिवार: पेठ:: मंदीर: …………………………
दिवस: थंडीचे:: म्हातारा: …………………………
उत्तर:
(i) ओंकारेश्वर
(i) भिक्षेकरी

प्रश्न 5.
योग्य पर्याय निवडून अपूर्ण वाक्य पूर्ण करून लिहा.
(i) लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा ……………………….. .
(अ) रोज सकाळी जात असे.
(ब) रोज दुपारी जात असे.
(क) रोज संध्याकाळी जात असे.
(ड) रोज रात्री जात असे.
उत्तर:
लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे.

(ii) दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या ……………………….. .
(अ) कट्ट्यावर आलो.
(ब) पायऱ्यांवर आलो.
(क) मंदिरात आलो.
(ड) बागेत आलो.
उत्तर:
दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो.

प्रश्न 6.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 15
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 16

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 7.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(i) हळूहळू मी सगळ्या शाली ………………………… टाकल्या, गरीब श्रमिकांना! (देऊन, वाटून, फेकून, विकून)
(ii) त्याने थरथरत्या हातांनी मला ………………………… केला. (नमस्कार, अभिवादन, नमस्ते, सलाम)
उत्तर:
(i) वाटून
(ii) नमस्कार

प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 17

प्रश्न 2.
कारण लिहा.
(i) लेखक चार-पाच दिवस संध्याकाळी ओंकारेश्वराला गेले नाहीत, कारण …
उत्तर:
लेखक चार-पाच दिवस संध्याकाळी ओंकारेश्वराला गेले नाहीत, कारण त्यांना कामांमुळे उसंत लाभली नाही.

प्रश्न 3.
घटनेचा परिणाम लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 18

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास ………………………… .
(अ) वेळ मिळाला नाही.
(ब) उसंत लाभली नाही.
(इ) सवड मिळाली नाही.
(ई) फुरसत मिळाली नाही.
उत्तरः
पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही.

(ii) तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व ………………………… .
(अ) रस्त्यावरून चालू लागलो.
(ब) कट्ट्यावरून चालू लागलो.
(इ) पुलावरून चालू लागलो.
(ई) पायवाटेवर चालू लागलो.
उत्तरः
तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो.

प्रश्न 5.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
(i) त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे करत राहिले – ये-जा
(ii) लेखकांना काही कामामुळे एवढे दिवस ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही – चार-पाच दिवस

प्रश्न 6.
फक्त नावे लिहा.
उत्तर:
(i) लेखकांना एकदम आठवण झाली – [भिक्षेकरी वृद्धाची]
(i) भिक्षेकरी म्हाताऱ्याकडे लगबगीने जाणारे – [लेखक]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 19

प्रश्न 2.
घटनेचा परिणाम लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 20

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 3.
वाक्याचा योग्य क्रम लावून वाक्ये पुन्हा लिहा.
(i) तुझं लई उपकार हायेत बाबा.
(ii) त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट!
(iii) आमचं हे असलं बिकट जिणं।
(iv) मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा!
उत्तर:
(i) त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट!
(ii) मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा!
(iii) आमचं हे असलं बिकट जिणं!
(iv) तुझं लई उपकार हायेत बाबा.

प्रश्न 4.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल 21

प्रश्न 5.
सहसबंध लिहा.
(i) भला: माणूस:: शालीची: …………………. .
(ii) बिकट: जिणं:: पोटाची: …………………. .
उत्तर:
(i) शोभा
(ii) आग

प्रश्न 6.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
(i) भिकाऱ्यास न शोभणाऱ्या → [शाली]
(ii) शाली विकून पोटभर जेवणारा → [म्हातारा भिक्षेकरी]
(iii) म्हाताऱ्यावर उपकार करणारा → [लेखक]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

प्रश्न 7.
उताऱ्यात आलेल्या शरीराच्या तीन अवयवांची नावे लिहा.
उत्तर:
मान, हात, पोट

प्रश्न 8.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) पुलाच्या जवळपास मध्यावर तो …………………. म्हातारा दिसला. (वयस्कर, सभ्य, भिक्षेकरी, नम्र)
(ii) अभाग्यांना सन्मानाच्या …………………. तरी दयाव्यात! (शाली, चादरी, पोथ्या, गोधडी)
उत्तर:
(i) भिक्षेकरी
(ii) शाली

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
तुम्हांला समाजात असणाऱ्या गरीब, दीनदुबळ्या लोकांना कशी मदत करावी वाटते ते लिहा.
उत्तर:
आजकाल घरातून बाहेर पडल्यावर समाजात वावरताना.

कुठे प्रवास करताना, वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी देताना ठिक-ठिकाणी आपणास गरीब, लाचार, दीन लोकं दिसतात. ज्यांच्या अंगावर साधे स्वच्छ, नीटनेटके कपडेही नसतात. त्यांना राहायला व्यवस्थित जागाही नसते. अंथरण्यास पांघरण्यास काही कपडेही नसतात.

अशा सर्व प्रकारच्या लोकांना पाहिल्यावर वाटते, की त्यांना योग्य आश्रमात नेऊन आश्रय दयावा. घरातील काही, न वापरण्याजोगे परंतु चांगले स्वच्छ न फाटलेले कपडे त्यांना यावेत. घरातील ठेवणीच्या शाली, चादरी ज्या आपण उपयोगात आणत नाही, त्या अशा लोकांना याव्यात, भुकेल्यांना दोन घास भरवावेत. तहानलेल्यांना पाणी पाजून शांत करावे. जेणेकरून त्यांचे थोडेतरी दुःख कमी व्हावे.

प्रश्न 2.
स्वमत.

(i) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे. तर शालीनता ही ‘चरित्रात्मक’ आहे. आपल्या मनात असलेली, एखाद्या व्यक्तिबद्दलची आदराची भावना. आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तिमध्ये असलेला गुण दिसून येतो. तो म्हणजे शालीनता (नम्रता). व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते, त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते, ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे. चारित्र्याचे एक अंग आहे ‘शालीनता’! आणि म्हणून मला वाटते की, ‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे; तर शालीनता ही चरित्रात्मक आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल

(ii) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
मानवाच्या तीन मुलभूत गरजा – अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकऱ्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, निवारा म्हणजे राहायला घर नाही म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील एक नाही तर दोन शाली दिल्या. पण दोन दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल; पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली हे माझ्या मते योग्यच आहे.

(iii) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
आमचे एकत्र कुटुंब, १५ जणांचा हसता खेळता परिवार कुटुंबप्रमुख-आजी आजोबा नंतर आई-बाबा, काका-काकी, भाऊ-बहिणी. लहानपणी आजीने माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्यांची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही-शरीराने; पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्यासोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडावीशी वाटत नाही. हां! आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो तो भाग वेगळा! पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

शाल शब्दार्थ‌ ‌

  • शाल‌‌ –‌ ‌खांदयावरून‌ ‌पांघरण्याचे‌ ‌उबदार‌ ‌वस्त्र,‌‌ महावस्त्र‌ ‌– (a‌ ‌Shawl)‌ ‌
  • निमित्त‌ ‌–‌ ‌कारण‌‌ – (a‌ ‌purpose,‌ ‌a‌ ‌reason)‌ ‌
  • चिंचोळ्या‌ ‌–‌ ‌निमुळत्या‌ ‌– (narrow)‌ ‌
  • प्रवाह‌ ‌‌–‌ ‌वाहण्याचा‌ ‌ओघ‌ ‌– (a‌ ‌flow)‌ ‌
  • कडाक्याची‌ ‌थंडी‌ ‌–‌ ‌खूप‌ ‌थंडी‌‌ – (very‌ ‌cold)‌ ‌
  • ‌कुडकुडणे‌‌ – थरथर‌ ‌कापणे,‌ ‌थंडीने‌ ‌गारठून‌ ‌थरथरणे‌ ‌– (shiver‌ ‌from‌ ‌cold)‌ ‌
  • हाक‌ ‌मारणे‌ ‌–‌ ‌बोलावणे‌ ‌(to‌ ‌call)‌‌
  • शालीन‌ ‌–‌ ‌नम्र,‌ ‌लीन‌ ‌– (gentle,‌ ‌humble)‌ ‌
  • ‌उपरोधिक‌ ‌–‌ ‌टोमणा‌ ‌असलेले,‌‌ मनाला‌ ‌लागेल‌ ‌अस‌ ‌– (Sarcastic,‌ ‌ironical)‌ ‌
  • क्षीण‌ ‌–‌ ‌कमी,‌ ‌दुर्बल‌‌ – (weak)‌ ‌
  • शेकडो‌ ‌–‌ ‌शंभर‌‌ – (hundred)‌ ‌
  • तत्कालीन‌ ‌‌–‌ ‌त्या‌ ‌काळातील‌ ‌– (of‌ ‌that‌ ‌time)‌ ‌
  • गाठोडे‌ ‌‌–‌ ‌कपडे‌ ‌इत्यादीचे‌ ‌बोचके‌ ‌– (a‌ ‌bundle)‌ ‌
  • निकटवर्ती‌ ‌–‌ ‌जवळचा‌‌ – (very‌ ‌close)‌ ‌
  • सर्वाधिकार‌ ‌–‌ ‌सर्व‌ ‌अधिकार‌ ‌– (full‌ ‌power)‌ ‌
  • श्रमिक‌ ‌–‌ ‌काम‌ ‌करणारे,‌ ‌कष्ट‌ ‌करणारे‌ ‌– (hard‌ ‌worker)‌ ‌
  • बहुधा‌ ‌–‌ ‌बहुतेक‌ ‌करून‌ ‌– (most‌ ‌probably)‌‌
  • कट्टा‌‌ –‌ ‌दगडांचा‌ ‌चौकोनी‌ ‌ओटा‌‌ – (a‌ ‌raised‌ ‌platform‌ ‌of‌ ‌stones)‌‌
  • ‌चिरगुटे – कपड्यांच्या‌ ‌चिंध्या‌ ‌चिंध्या‌ ‌– (a‌ ‌shred‌ ‌of‌ ‌cloth)‌ ‌
  • पांघरून‌ ‌–‌ ‌अंग‌ ‌झाकून,‌ ‌अंगावर‌ ‌घेऊन‌ ‌– (a‌ ‌coverlet)‌ ‌
  • वृद्ध‌ ‌–‌ ‌म्हातारा,‌ ‌वय‌ ‌झालेला‌ ‌माणूस‌ ‌– (aged)‌‌
  • भिक्षेकरी‌‌ –‌ ‌भीक‌ ‌मागणारा‌ ‌– (a‌ ‌beggar)‌ ‌
  • लगबगीने‌‌ –‌ ‌त्वरीत,‌ ‌जलद‌ ‌– (hurriedly)‌ ‌
  • भल्या‌ ‌माणसा‌ ‌–‌ ‌मोठ्या‌ ‌माणसा,‌ ‌सज्जन‌‌ – (good‌ ‌natured‌ ‌person)‌ ‌
  • इकल्या‌ ‌–‌ ‌विकल्या‌ ‌– (to‌ ‌sold)‌ ‌
  • बिकट‌ ‌–‌ ‌वाईट‌‌ – (bad)‌ ‌
  • जिणं‌ ‌–‌ ‌आयुष्य‌‌ – (life)‌‌
  • लई‌‌ –‌‌ खूप – (many,‌ ‌much)‌ ‌
  • अभागी‌ ‌–‌ ‌गरीब,‌ ‌दीन,‌ ‌लाचार‌ ‌(unlucky)‌‌

Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१

Jagna Cactus Che Class 10 Marathi Chapter 12.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 12.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.

प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.

मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 3.
टिपा लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 7
उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.

प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.

उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.

जगणं कॅक्टसचं Summary in Marathi

जगणं कॅक्टसचं पाठपरिचय

‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं 2

जगणं कॅक्टसचं Summary in English

“Jagna Cactus Che’ is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cactuses, their utility and adaptation to less amounts of water. He has offered detailed information about the cactus.

जगणं कॅक्टसचं शब्दार्थ

  • वाळवंटी प्रदेश – वाळूकामय प्रांत – (a desert region)
  • कोरडेपणा – शुष्कपणा – (dryness)
  • दुर्भिक्ष – टंचाई, दुष्काळ – (scarcity)
  • ठणठणीत – कोरडा व रिकामा – (dry & empty)
  • जीवन – आयुष्य – (life)
  • जादूगार – जादू करणारा – (a magician)
  • जीवसृष्टी – सचेतन सृष्टी – (the living world)
  • बहादुरी – पराक्रम – (valour)
  • चमत्कार – आश्चर्य – (a wonder, a mircale)
  • अवर्षण – दुष्काळ, अनावृष्टी – (drought)
  • प्रदीर्घ – लांबलचक, खूप लांब – (very long)
  • वैराण – ओसाड, पडीक – (barren, desolate)
  • रक्ष – कोरडे, शुष्क – (dry)
  • निष्माण – प्राण / जीव नसलेला – (lifeless)
  • पालवी – झाडाला फुटलेले नवे अंकुर – (fresh foliage)
  • सुप्तावस्था – झोपलेली अवस्था – (sleeping stage)
  • रोप – वनस्पती, रोपटे – (a plant)
  • मरुभूमी – वाळवंट – (desert)
  • नंदनवन – (येथे अर्थ) स्वर्ग (इंद्राचे उपवन) – (the pleasure garden of indra’s paradise)
  • तवा – पोळ्या भाजण्याचे लोखंडी पसरट भांडे – (pan)
  • करपणे – भाजणे, होरपळणे – (to get scorched)
  • भकास – ओसाड, उजाड – (gloomy, desolate)
  • हंगाम – ऋतू, मौसम – (season)
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • मंद गती – धिम्यागतीने – (slow motion)
  • दिवाणखाना – बैठकीची खोली – (living room, hall)
  • प्रतिनिधी – (representative)
  • राक्षस – दानव – (monster)
  • पेर – दोन सांध्यांमधील भाग – (the portion between two joints)
  • पन्हाळी – पाणी वाहून नेण्याची नळी – (a pipe)
  • बाष्पीभवन – वाफ होणे – (evaporation)
  • वयं – दूर करणे – (to avoid)
  • गर – गीर, मगज – (pulp)
  • बिशाद – हिम्मत, धाडस – (daring)
  • बुंधा – बुडखा – (tree trunk)
  • निमुळता – क्रमाने अरूंद होत जाणारा, चिंचोळा – (tapering)
  • सरळसोट – सरळ, उभा – (upright)
  • कुंपण – संरक्षक भिंत – (a fence)
  • सायाळ – अंगावर काटे असणारा प्राणी, साळू, साळींदर – (hedgehog)
  • सांबर – फाटे फुटलेली शिंगे असणारा हरणासारखा – दिसणारा प्राणी – (horned deer)
  • शिंग – शंग – (horm)
  • शेंडा – टोक, शिखर – (the top)
  • गेंदेदार – गोंड्याच्या फुलांसारखी भरलेली
  • मोरावळा – साखरेच्या पाकात आवळ्याचे बारीक तुकडे शिजवून तयार केलेला गोडपदार्थ – (jam)
  • जिकिरीचे – त्रासदायक – (trouble some)
  • साल – झाडावरचे जाड आवरण – (bark, rind)
  • सोलणे – वरचा पापुद्रा (साल) काढून टाकणे – (to peel, to skin)
  • तुरट – तुरटीसारखी चव असलेला – (astringent)
  • निरुपाय – अगतिक – (helpless)
  • खटाटोप – दगदग, आटापिटा – (strenous efforts)
  • पंचाईत – अडचण – (problem)
  • परजून – परिधान करून – (to wear)
  • स्वसंरक्षण – स्वत:चे संरक्षण – (self–defence)
  • जबाबदारी – उत्तरदायित्व – (responsibility)

जगणं कॅक्टसचं वाक्प्रचार

  • भूगा होणे – चूरा होणे
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • धाडी पडणे – अकस्मात हल्ला करणे – (to attack)
  • शोषून घेणे – ओढून घेणे – (to absorb)
  • मात करणे – विजय मिळवणे – (to overcome)
  • अभाव असणे – कमतरता असणे, उणीव असणे – (lack of)
  • व्याकूळ होणे – बेचैन होणे – (to feel uneasy)

Marathi Akshar Bharati Class 10th Digest भाग-३

Rang Majeche Rang Udyache Class 10 Marathi Chapter 12 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 12 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
(अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 5
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 3

(आ) आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 6
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 4

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [          ]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [          ]
उत्तरः
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [फुलाफुलांचे ताटवे]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [सृषृ]

प्रश्न 3.
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(i) आभाळाचे छत्र ……………………………………
(ii) गर्भरेशमी सळसळ ……………………………………
उत्तरः
(i) आभाळाचे छत्र – पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन
(ii) गर्भरेशमी सळसळ – हिरव्या पानांची, हिरव्याशार गवताची वाऱ्यामुळे सळसळ.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 4.
कृती पूर्ण करा.

(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
उत्तरः
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.

(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
यंत्रांच्या संगतीने काय मिळणार आहे?

(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
उत्तरः
सृष्टी-दृष्टी, वृष्टी-कष्टी, तुष्टी-गोष्टी.

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’

(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Additional Important Questions and Answers

प्रश्न १.पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 1

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) फुलाफुलांचे दाट …………………………………… जिथे पोचते दृष्टी. (थवे, गुच्छ, ताटवे, झुडपे)
(ii) …………………………………… देईना संगणक हा, काळी आई जगवू. (पैसे, दौलत, संपत्ती, धान्य)
(iii) उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील …………………………………… झाडे. (निलगिरी, आंब्याची, देशी, घनदाट)
(iv) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी …………………………………… (दृष्टी, तुष्टी, वृष्टी, पुष्टी)
उत्तर:
(i) ताटवे
(ii) धान्य
(iii) देशी
(iv) तुष्टी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कवी कोणाला पुष्टी क्यायला सांगतात?
उत्तर:
कवी मातीमध्ये काम करणाऱ्या हातांना पुष्टी दयायला सांगतात.

(ii) यंत्राबरोबर राहिल्यास काय मिळेल?
उत्तरः
यंत्राबरोबर राहिल्यास पैसा, दौलत मिळेल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
(i) जिथे दृष्टी पोचते तेथे असतात – [फुलांचे ताटवे]
(ii) संगणक हे देत नाही – [धान्य]
(iii) जगास या गोष्टी सांगू – [गर्भरेशमी सळसळण्याच्या]

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 2
उत्तरे:
(i- क),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – ब)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.
(i) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .
(ii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iv) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
उत्तर:
(i) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
(ii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iv) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) फूल
(ii) दाट
(iii) ताटवे
(iv) दृष्टी
उत्तरे:
(i) कुसूम, सुमन
(ii) गच्च
(iii) बगिचे, उद्यान
(iv) नजर

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
अंजली कुलकर्णी

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ:
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?

आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे व त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दु:खे विसरून जाऊ व निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ, खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली सारी दुःखे राहणारच नाहीत, आपण कष्टी होणारी नाही? असे कवयित्री म्हणते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः

निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो, पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपसना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :

‘रंग मजेचे रंग उदयाचे’ ही ‘अंजली कुलकर्णी’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थः
(i) जपणे – सांभाळणे
(ii) सृष्टी – निसर्ग, जग
(i) माती – मृदा
(ii) पुष्टी – पाठबळ, पाठिंबा

स्वाध्याय कती

प्रश्न 1.
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 2.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in Marathi

रंग मजेचे रंग उदयाचे काव्यपरिचय‌
‘रंग‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌उदयाचे’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’अंजली‌ ‌कुलकर्णी’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌जागतिकीकरणाच्या‌ ‌या‌ ‌काळात‌ ‌तंत्रज्ञानाशी‌ ‌मैत्री‌ ‌करणारा‌ ‌मानव‌ ‌निसर्गाकडे‌ ‌पाठ‌ ‌फिरवत‌ ‌आहे,‌ ‌पण‌ ‌निसर्गाचे,‌ ‌पर्यावरणाचे‌ ‌रक्षण‌ ‌करणे‌ ‌ही‌ ‌अतिमहत्त्वाची‌ ‌बाब‌ ‌आहे.‌ ‌पर्यावरणाची‌ ‌जोपासना‌ ‌केली‌ ‌तर‌ ‌माणसाला‌ ‌कधीच‌ ‌काही‌ ‌कमी‌ ‌पडणार‌ ‌नाही,‌ ‌असा‌ ‌विचार‌ ‌कवयित्रीने‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌मांडला‌ ‌आहे.‌

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in English

As‌ ‌a‌ ‌result‌ ‌of‌ ‌globalization,‌ ‌a‌ ‌human‌ ‌being‌ ‌appears‌ ‌to‌ ‌be‌ ‌more‌ ‌connected‌ ‌to‌ ‌technology‌ ‌rather‌ ‌than‌ ‌nature.‌ ‌The‌ ‌preservation‌ ‌of‌ ‌nature‌ ‌and‌ ‌environment‌ ‌should‌ ‌be‌ ‌the‌ ‌first‌ ‌priority‌ ‌of‌ ‌a‌ ‌human‌ ‌being.‌ ‌Only‌ ‌then‌ ‌can‌ ‌he‌ ‌live‌ ‌a‌ ‌satisfied‌ ‌life.‌ ‌The‌ ‌poetess‌ ‌has‌ ‌tried‌ ‌to‌ ‌elaborate‌ ‌on‌ ‌this‌ ‌understanding‌ ‌in‌ ‌her‌ ‌poem.‌

भावार्थ‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌दाट‌ ‌ताटवे,‌ ‌जिथे‌ ‌पोचते‌ ‌दृष्टी‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उद्याचे‌ ‌जपून,‌ ‌ठेवू‌ ‌सृष्टी….‌

निसर्ग‌ ‌हा‌ ‌खरा‌ ‌जादूगार‌ ‌आहे.‌ ‌त्याच्या‌ ‌जादूई‌ ‌दुनियेमध्ये‌ ‌रंगा–गंधाचे‌ ‌साम्राज्य‌ ‌पसरले‌ ‌आहे.‌ ‌आभाळाची‌ ‌निळाई‌ ‌पाहत,‌ ‌पाण्याची‌ ‌खळखळ‌ ‌आणि‌ ‌वाऱ्याची‌ ‌अंगाई‌ ‌ऐकत‌ ‌धरतीच्या‌ ‌कुशीत‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌म्हणजेच‌ ‌अनेक‌ ‌रंगाच्या‌ ‌फुलांचे‌ ‌बाग‌ ‌बगीचे‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌आणि‌ ‌हे‌ ‌बगीचे‌ ‌फक्त‌ ‌एका‌ ‌ठिकाणी‌ ‌फुलवायचे‌ ‌नाहीत‌ ‌तर‌ ‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌जिथे‌ ‌जिथे‌ ‌नजर‌ ‌पोचते‌ ‌तेथे‌ ‌तेथे‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग,‌ ‌उद्याच्या‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌म्हणजेच‌ ‌निसर्गाच्या‌ ‌रंगात‌ ‌आणि‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌राहून‌ ‌जो‌ ‌आनंद,‌ ‌जी‌ ‌मजा‌ ‌मिळणार‌ ‌आहे.‌ ‌अशी‌ ‌एक‌ ‌सुंदर‌ ‌सृष्टी‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्यासाठी‌ ‌जपून‌ ‌ठेवूया.‌

धान्य‌ ‌देईना‌ ‌संगणक‌ ‌हा,‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌जगवू‌
‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌राबती,‌ ‌तयांस‌ ‌देऊ‌ ‌पुष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌आजचे‌ ‌युग‌ ‌कितीही‌ ‌आधुनिक‌ ‌झाले,‌ ‌तंत्रज्ञान‌ ‌विकसित‌ ‌झाले‌ ‌तरी‌ ‌निसर्ग‌ ‌तुमचा‌ ‌खरा‌ ‌मित्र‌ ‌आहे.‌ ‌तुमचा‌ ‌पोषण–कर्ता‌ ‌आहे.‌ ‌कारण‌ ‌तंत्रज्ञानाच्या‌ ‌विकासामुळे‌ ‌संगणकाची‌ ‌निर्मिती‌ ‌झाली.‌ ‌पण‌ ‌हा‌ ‌संगणक‌ ‌तुम्हांला‌ ‌धान्य‌ ‌देऊन‌ ‌तुमचे‌ ‌पोषण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌तर‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌धरतीमाता‌ ‌आपण‌ ‌जगवली‌ ‌तरच‌ ‌आपण‌ ‌जगू‌ ‌शकतो.‌ ‌तीच‌ ‌खरी‌ ‌आपले‌ ‌पोषण‌ ‌करणारी‌ ‌जननी‌ ‌आहे.‌ ‌तिला‌ ‌आपण‌ ‌जगवूया‌ ‌असे‌ ‌कवयित्री‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌काळ्या‌ ‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌राबतात,‌ ‌कष्ट‌ ‌करतात‌ ‌आणि‌ ‌तिचे‌ ‌संगोपन‌ ‌करतात‌ ‌अशा‌ ‌शेतकऱ्याचे,‌ ‌भूमिपुत्राचे‌ ‌सुद्धा‌ ‌आपण‌ ‌संरक्षण‌ ‌केले‌ ‌पाहिजे‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टांना‌ ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌ ‌दिला‌ ‌पाहिजे.‌ ‌तरच‌ ‌आपल्याला उदयाच्या‌ ‌उज्ज्वल‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग‌ ‌व‌ ‌जीवनातील‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌पाहायला‌ ‌मिळतील‌ ‌आणि‌ ‌ही‌ ‌धरती‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌सुजलाम्‌ ‌सुफलाम्‌ ‌होऊन‌ ‌इथला‌ ‌मनुष्यप्राणी‌ ‌सुखी‌ ‌होईल.‌

उधळू,‌ ‌फेकू‌ ‌बिया‌ ‌डोंगरी,‌ ‌रुजतील‌ ‌देशी‌ ‌झाडे‌
‌गच्च‌ ‌माजतील‌ ‌राने,‌ ‌होईल‌ ‌आभाळातून‌ ‌वृष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

‘झाडे‌ ‌लावा,‌ ‌झाडे‌ ‌जगवा’.‌ ‌हा‌ ‌मंत्र‌ ‌सत्यात‌ ‌उतरविण्यासाठी‌ ‌आपण‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌कोणती‌ ‌कृती‌ ‌केली‌ ‌पाहिजे‌ ‌हे‌ ‌सांगताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌की,‌ ‌आपण‌ ‌आपल्या‌ ‌देशामध्ये‌ ‌पिकणारी,‌ ‌उगवणारी‌ ‌जी‌ ‌फळे,‌ ‌फुले‌ ‌आहेत,‌ ‌त्यांच्या‌ ‌बिया‌ ‌डोंगरावर,‌ ‌पर्वतावर‌ ‌उधळूया‌ ‌म्हणजे‌ ‌डोंगरावर‌ ‌त्या‌ ‌रुजतील‌ ‌आणि‌ ‌देशी‌ ‌झाडांनी‌ ‌आपली‌ ‌जंगले‌ ‌परत‌ ‌गच्च‌ ‌भरून‌ ‌जातील,‌ ‌माजतील‌ ‌ज्यामुळे‌ ‌जमिनीची‌ ‌धूप‌ ‌थांबेल‌ ‌आणि‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌भरपूर‌ ‌पाऊस‌ ‌पडला‌ ‌तर‌ ‌ही‌ ‌सृष्टी‌ ‌हिरवी‌ ‌समृद्ध‌ ‌होईल‌ ‌आणि‌ ‌समृद्ध‌ ‌अशा‌ ‌भविष्याचे‌ ‌आपले‌ ‌स्वप्न‌ ‌पूर्ण‌ ‌होईल.‌

डोंगरातून‌ ‌वाहात‌ ‌येते,‌ ‌खळाळते‌ ‌हे‌ ‌पाणी‌
‌फेनधवलशा‌ ‌तुषारांमध्ये,‌ ‌राहाल‌ ‌कैसे‌ ‌कष्टी?‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

आभाळातून‌ ‌होणाऱ्या‌ ‌पावसाच्या‌ ‌वृष्टीमुळे‌ ‌डोंगरातून‌ ‌खळाळत‌ ‌पाणी‌ ‌वाहत‌ ‌येईल.‌ ‌डोंगर‌ ‌दऱ्यातून‌ ‌वाहणारे‌ ‌धबधबे,‌ ‌त्यातून‌ ‌फेसाप्रमाणे‌ ‌उधळणाऱ्या‌ ‌पांढऱ्या‌ ‌तुषारांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌आपण‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌दुःखे‌ ‌विसरून‌ ‌जाऊन‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌जावू.‌ ‌खळाळत्या‌ ‌पाण्याला‌ ‌पाहून‌ ‌आपल्याही‌ ‌मनात‌ ‌हास्याचे‌ ‌तुषार‌ ‌उधळले‌ ‌जातील‌ ‌व‌ ‌आपली‌ ‌दुःखे‌ ‌राहणारच‌ ‌नाहीत.‌ ‌किंबहुना‌ ‌त्यांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌कसे‌ ‌राहू‌ ‌आपण‌ ‌कष्टी?‌ ‌असाच‌ ‌प्रश्न‌ ‌कवयित्री‌ ‌आपल्याला‌ ‌विचारते‌ ‌आहे.‌

मिळेल‌ ‌पैसा,‌ ‌मिळेल‌ ‌दौलत,‌ ‌यंत्रांच्या‌ ‌संगती‌ ‌
आभाळाच्या‌ ‌छत्राखाली,‌ ‌एक‌ ‌अनोखी‌ ‌तुष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

तंत्रज्ञानामुळे‌ ‌आपल्याला‌ ‌पैसा,‌ ‌दौलत‌ ‌मिळेल‌ ‌पण‌ ‌त्या‌ ‌कागदी‌ ‌नोटांना‌ ‌समाधानाचा,‌ ‌तुष्टीचा‌ ‌गंध‌ ‌येणार‌ ‌नाही.‌ ‌त्यातून‌ ‌स्पर्धा,‌ ‌अवहेलना‌ ‌वाढेल,‌ ‌दुसऱ्याचे‌ ‌दुःख‌ ‌जाणून‌ ‌घेण्याची‌ ‌मनाची‌ ‌दौलत‌ ‌तिथे‌ ‌नसेल.‌ ‌परंतु‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌एकाच‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌सारे‌ ‌भेदभाव‌ ‌विसरून‌ ‌जाऊ,‌ ‌कुणी‌ ‌लहान–मोठा,‌ ‌श्रीमंत,‌ ‌गरीब‌ ‌राहणार‌ ‌नाही,‌ ‌आभाळाची‌ ‌आम्ही‌ ‌लेकरे,‌ ‌काळी‌ ‌माती‌ ‌आई‌ ‌असे‌ ‌म्हणण्यातच‌ ‌आपल्याला‌ ‌खरी‌ ‌तुष्टता,‌ ‌समाधान‌ ‌मिळेल‌ ‌आणि‌ ‌एकत्वाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌

हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌मने‌ ‌भोवती,‌ ‌किती‌ ‌छटा‌ ‌हिरव्याच्या‌ ‌
गर्भरेशमी‌ ‌सळसळण्याच्या‌ ‌जगास‌ ‌सांगू‌ ‌गोष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

या‌ ‌निळ्या‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌साऱ्यांची‌ ‌मने‌ ‌हिरवी‌ ‌होतील,‌ ‌आनंदी‌ ‌होतील.‌ ‌नवीन‌ ‌विचारांनी,‌ ‌सुखा–समाधानाने‌ ‌भरून‌ ‌जातील‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌आनंदाच्या‌ ‌विविध‌ ‌छटा‌ ‌आपल्याला‌ ‌आपल्या‌ ‌अवतीभोवती‌ ‌पाहता‌ ‌येतील.‌ ‌पर्यावरणाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌डोंगरावर‌ ‌उधळलेल्या‌ ‌बियांमुळे‌ ‌झाडे‌ ‌निर्माण‌ ‌होतील.‌ ‌घनदाट‌ ‌जंगले‌ ‌तयार‌ ‌होतील‌ ‌व‌ ‌त्यामुळे‌ ‌भरपूर‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वत्र‌ ‌उगवलेल्या‌ ‌गवताची‌ ‌रेशमासारखी‌ ‌नाजूक,‌ ‌मऊ‌ ‌पाती‌ ‌डोलतील.‌ ‌हिरव्यागार‌ ‌धरणीमुळे‌ ‌मनाला‌ ‌समाधान‌ ‌मिळेल.‌ ‌निसर्गसौंदर्यामुळे‌ ‌जगण्याचा‌ ‌खराखुरा‌ ‌आनंदही‌ ‌मिळेल.‌ ‌आपली‌ ‌मनेही‌ ‌हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌अर्थात‌ ‌प्रसन्न‌ ‌होतील,‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌जगाला‌ ‌या‌ ‌हिरवाईचा‌ ‌आनंद‌ ‌सांगूया.‌ ‌सगळ्या‌ ‌जगाला‌ ‌आनंदी‌ ‌करत‌ ‌आपण‌ ‌उदयाच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌ ‌

‌रंग मजेचे रंग उदयाचे शब्दार्थ‌

  • ‌दृष्टी‌ ‌– ‌नजर‌ ‌– ‌(sight)‌
  • सृष्टी‌ ‌– ‌निसर्ग,‌ ‌जग‌ ‌– (nature)‌
  • संगणक‌ ‌– ‌(computer)‌ ‌
  • काळी‌ ‌आई‌ ‌– ‌माती‌ ‌– (earth)
  • पुष्टी‌ ‌– ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌‌ ‌– ‌(support)
  • वृष्टी‌ ‌– ‌पाऊस‌ ‌– ‌(rain)‌ ‌
  • आभाळ‌ ‌– ‌आकाश,‌ ‌नभ‌ ‌– ‌(sky)‌ ‌
  • छटा‌ ‌– ‌विविध‌ ‌रंग,‌ ‌स्तर‌ ‌– ‌(shades)‌ ‌
  • गर्भरेशमी‌ ‌– ‌मऊ‌ ‌– ‌(soft‌ ‌silk)‌ ‌
  • सळसळणे‌ ‌– ‌पानांच्या‌ ‌हालचालीचा‌ ‌आवाज‌ ‌– (rustling)‌ ‌
  • फुल‌ ‌‌– ‌सुमन,‌ ‌पुष्प‌ ‌– ‌(flower)‌ ‌
  • घाट – ‌गच्च‌ ‌– ‌(dense)‌ ‌
  • ताटवे‌ ‌– ‌बगीचे‌ ‌– ‌(gardens)‌
  • ‌मजा‌ ‌– ‌गंमत‌ ‌– (‌fun)‌ ‌
  • जपणे‌ – ‌सांभाळून‌ ‌ठेवणे‌ ‌– (to‌ ‌preserve‌ ‌carefully)‌ ‌
  • माती‌ ‌– मृदा (Soil)
  • हात‌ ‌– ‌कर‌ ‌– ‌(hand)‌ ‌
  • राबती‌ ‌– ‌राबणे,‌ ‌कष्ट‌ ‌करणे‌ ‌– ‌(to‌ ‌work‌ ‌hard)‌ ‌
  • उधळू‌ ‌– ‌उडवू,‌ ‌उडवणे‌ ‌– ‌(throw)‌ ‌
  • बीया‌ ‌– ‌बीज‌ ‌– (seeds)‌ ‌
  • डोंगर‌ ‌– ‌पर्वत‌ – (mountain)‌
  • ‌रुजणे‌ ‌– ‌अंकुरणे‌ ‌– (to‌ ‌germinate)‌ ‌
  • झाड‌ ‌– ‌वृक्ष‌ ‌– (tree)‌ ‌
  • रान‌ ‌– ‌जंगल,‌ ‌वन‌ ‌– ‌(forest)‌
  • ‌पाणी – ‌जल‌ ‌– (water)‌ ‌
  • फेनधवलशा‌ ‌– ‌फेसाप्रमाणे‌ ‌पांढऱ्या‌ ‌– ‌(white‌ ‌like‌ ‌foam)‌ ‌
  • कष्टी‌ ‌– ‌थकलेले,‌ ‌दुःखी‌ ‌– ‌(Sad)‌ ‌
  • पैसा‌ ‌– ‌अर्थ‌ ‌– ‌(money)‌ ‌
  • दौलत‌ ‌– ‌संपत्ती‌ ‌– (wealth)‌ ‌
  • संगत‌ ‌सोबत‌ ‌– ‌(company)‌ ‌
  • छत्र‌ ‌– ‌सावली‌ ‌– (shade)‌ ‌
  • अनोखी‌ ‌– ‌वेगळी‌ ‌– (special)‌ ‌
  • तृष्टी‌ ‌– ‌तृप्ती,‌ ‌समाधान‌ ‌– ‌(satisfaction)‌ ‌
  • मन‌ – ‌चित्त‌ ‌– (mind)‌

Marathi Akshar Bharati Class 10th Digest भाग-३

Jata Astala Class 10 Marathi Chapter 8.1 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 8.1 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8.1 जाता अस्ताला Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू लागते. म्हणून अस्ताला जातांना सूर्याच्या मनात विचार येतो, मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा/पृथ्वी अंधारात बुडून जाईल. माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना? या विश्वाच्या चराचरात/अणुरेणूत सामावलेले जीवन, चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना? एक अनामिक भीती त्याला छळू लागते. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. विश्वाचे कोणीतरी भले करावे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते.

कवितेतली आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे, असे वाटते. एखादया पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील धरेची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते.

प्रश्न 2.
पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तरः
पणती म्हणजे अदम्य विश्वासाचे आणि साहसाचे प्रतिक आहे. वास्तविक पाहता सूर्य म्हणजे प्रकाशाचा लखलखता स्रोत, अनंत पसरलेल्या विश्वाला उजळून टाकण्याचे सामर्थ्य असलेला; म्हणून त्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस कोणी करत नाही; पण साधी मातीची पणती पुढे येते आणि नम्रपणाने म्हणते, “हे स्वामी, तेजोमय भास्करा, तुझ्याएवढा धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही, पण जमेल तसा या पृथ्वीवरील अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन.” आपल्याकडे जे काही चांगलं आहे. ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

इतरांची मदत करू शकतो असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक कार्य करावे. पणतीच्या उदाहरणातून हाच विचार कवी रविंद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे. पणतीच्या प्रकाशाने सगळा अंधार जरी दूर होणार नसला तरी दहा पावलांची वाट ती नक्कीच उजळू शकते, हा विश्वास पणतीच्या ठिकाणी दिसतो. म्हणजेच प्रत्येकाने आपली समता जाणून चांगले कार्य करावे. जे नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे मग ते थोडं, थोडच का असेना त्याचाच उपयोग करून आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची प्रेरणा कवीने पणतीच्या प्रतिकातून व्यक्त केली आहे.

प्रश्न 3.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा,
उत्तर:
वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य, वेगळे भाव, वेगळे रंग निर्माण करत असतो. माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात.

वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त. वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मऊसार किरणे पसरवत असतो. मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जातो. तेथील वाळूचा सागर हळूहळू थंड होत जातो. शितल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. मानव, पशू, पक्षी सुखावून जातात. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. त्या सुवर्णमयी वातावरणात नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. कवी, लेखक, चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात.

समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. हळू हळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की, हा सागरात मिसळून जातो. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात सामावतो तेव्हा आपोआप त्या सृष्टीका पुढे आपण नतमस्तक होतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

प्रश्न 4.
कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर:
सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतिक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून, कळवळून साद घालणारा तो व्याकूळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखादयाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करूणा हृदयात निर्माण करावी लागते.

सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले, श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतिकातून दिसून येते. त्या उलट, पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटाशा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतिकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पणतीच्या प्रतिकातून जाणवते.

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 23
उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला! Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.

सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.

पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.

सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?

पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.

पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.

सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.

जाता अस्ताला Summary in Marathi

जाता अस्ताला पाठपरिचय‌‌

‘जाता‌ ‌अस्ताला’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌’गुरूदेव‌ ‌रविंद्रनाथ‌ ‌टागोर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌मुळात‌ ‌बंगाली‌ ‌कवितेचे‌ ‌मराठीत‌ ‌स्वैर‌ ‌रूपांतर‌ ‌श्यामला‌ ‌कुलकर्णी‌ ‌यांनी‌ ‌केले‌ ‌आहे‌ ‌.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌टागोर‌ ‌यांनी‌ ‌सूर्य‌ ‌आणि‌ ‌पणतीच्या‌ ‌प्रतीकांद्वारे‌ ‌अगदी‌ ‌छोट्या‌ ‌जीवातही‌ ‌जगाला‌ ‌काहीतरी‌ ‌देण्याची,‌ ‌जग‌ ‌सुंदर‌ ‌करण्याची‌ ‌क्षमता‌ ‌असते‌ ‌हे‌ ‌सांगितले‌ ‌आहे.‌‌

जाता अस्ताला Summary in English

This‌ ‌is‌ ‌a‌ ‌translation‌ ‌of‌ ‌a‌ ‌poem‌ ‌(originally‌ ‌written‌ ‌by‌ ‌Rabindranath‌ ‌Tagore‌ ‌in‌ ‌Bengali)‌ ‌by‌ ‌Shyamala‌ ‌Kulkarni.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌is‌ ‌a‌ ‌comparison‌ ‌between‌ ‌the‌ ‌sun‌ ‌and‌ ‌a‌ ‌small‌ ‌lamp‌ ‌both‌ ‌of‌ ‌which‌ ‌give‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌In‌ ‌this‌ ‌own‌ ‌way,‌ ‌the‌ ‌lamp‌ ‌is‌ ‌small‌ ‌yet‌ ‌spreads‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌Its‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌shown‌ ‌how‌ ‌small‌ ‌creatures‌ ‌or‌ ‌things‌ ‌have‌ ‌the‌ ‌capacity‌ ‌to‌ ‌make‌ ‌a‌ ‌world‌ ‌beautiful.‌‌

जाता अस्ताला भावार्थ‌ ‌

जाता‌ ‌अस्ताला‌ ‌सूर्याचे‌ ‌
डोळे‌ ‌पाणावले‌ ‌
जाईन‌ ‌मी‌ ‌जर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌
होईल‌ ‌कैसे‌ ‌भले‌ ‌

‌सूर्य‌ ‌आपल्या‌ ‌प्रखर‌ ‌उष्णतेने‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशित‌ ‌करून‌ ‌टाकतो.‌ ‌सूर्योदयापासून‌ ‌ते‌ ‌सूर्यास्तापर्यंत‌ ‌न‌ ‌थकता‌ ‌न‌ ‌दमता‌ ‌तो‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌म्हणजेच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वीला‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌सूर्याने‌ ‌उचललेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीची‌ ‌काळजी‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌कुटुंबाचा‌ ‌प्रमुख‌ ‌या‌ ‌नात्याने‌ ‌चिंतातुर‌ ‌आहे.‌ ‌

‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌जाणार‌ ‌तेव्हा‌ ‌ही‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारमय‌ ‌होईल,‌ ‌ही‌ ‌भीती‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌याच‌ ‌भीतीने‌ ‌व‌ ‌पृथ्वीच्या‌ ‌काळजीपोटी‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌पाणावले‌ ‌आहेत.‌ ‌सूर्याला‌ ‌वाईट‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌माझ्यानंतर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌काय‌ ‌होईल?‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌लागलेली‌ ‌आहे.‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌लगेच‌ ‌सारी‌ ‌धरा‌ ‌कुणी‌ ‌वाचवा‌ ‌या‌ ‌पृथ्वीला‌ ‌करा‌ ‌करा‌ ‌हो‌ ‌त्वरा‌‌ मावळतीला‌ ‌चाललेल्या‌ ‌सूर्याला‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीचे‌ ‌काय‌ ‌होईल‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌लागली‌ ‌आहे.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌लगेचच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌करणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌असायला‌ ‌हवे,‌ ‌तिला‌ ‌कोणीतरी‌ ‌वाचवायला‌ ‌हवे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌त्यासाठी‌ ‌कोणीतरी‌ ‌पुढाकार‌ ‌घ्यावा,‌ ‌त्वरेने‌ ‌यावे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌आपला‌ ‌कोणीतरी‌ ‌उत्तराधिकारी‌ ‌असावा,‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌कोणीतरी‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌उचलावे‌ ‌अशी‌ ‌सूर्याची‌ ‌आंतरिक‌ ‌इच्छा‌ ‌आहे.‌‌

कुणी‌ ‌न‌ ‌उठती‌
‌ये‌ ‌ना‌ ‌पुढती‌
‌कुणास‌ ‌ना‌ ‌शाश्वती‌ ‌
इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌हळूचि‌
‌पणती‌ ‌ये‌ ‌पुढती‌‌

सूर्याच्या‌ ‌प्रचंड‌ ‌तेजाला‌ ‌दुसरा‌ ‌पर्यायच‌ ‌नाही.‌ ‌त्याच्यासारखा‌ ‌तोच!‌ ‌त्याची‌ ‌जागा‌ ‌कोण‌ ‌चालवील?‌ ‌त्याच्यासारखे‌ ‌प्रचंड‌ ‌कार्य‌ ‌कोणालाही‌ ‌जमणार‌ ‌नाही.‌ ‌या‌ ‌पृथ्वीतलावरील‌ ‌कोणीही‌ ‌सूर्याची‌ ‌जागा‌ ‌घेऊ‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌कोणीही‌ ‌पुढे‌ ‌यायला‌ ‌तयार‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌अंधार‌ ‌दूर‌ ‌करण्याची‌ ‌कोणाकडेच‌ ‌ताकद‌ ‌नाही.‌‌

तेवढ्यात‌ ‌हळू‌ ‌हळू‌ ‌मनाचे‌ ‌धाडस‌ ‌करत,‌ ‌इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌एक‌ ‌पणती‌ ‌पुढे‌ ‌येते.‌ ‌खरे‌ ‌तर‌ ‌पणतीचा‌ ‌केवढा‌ ‌तो‌ ‌प्रकाश,‌ ‌पण‌ ‌ती‌ ‌पुढाकर‌ ‌घेते.‌ ‌अंधारल्या‌ ‌रात्री‌ ‌पृथ्वीवर‌ ‌थोडाफार‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌ती‌ ‌स्विकारते.‌ ‌ती‌ ‌तेवढे‌ ‌धाडस‌ ‌दाखवते.‌

‌विनम्र‌ ‌भावे‌ ‌लवून‌ ‌म्हणे‌ ‌ती‌ ‌
तेजोमय‌ ‌भास्करा‌ ‌
मम‌ ‌तेजाने‌ ‌जमेल‌ ‌तैसी‌
‌उजळून‌ ‌टाकीन‌ ‌धरा‌

‌सूर्यापुढे‌ ‌आकाराने‌ ‌अगदीच‌ ‌लहान‌ ‌असणारी‌ ‌पणती‌ ‌सूर्याचे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌जाणते‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌तेजोमय‌ ‌प्रकाश‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌त्याच्यापुढे‌ ‌आपण‌ ‌क्षुल्लक‌ ‌आहोत‌ ‌हेही‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌तरीही‌ ‌ती‌ ‌धाडस‌ ‌करते‌ ‌आणि‌ ‌अतिशय‌ ‌विनम्रपणे‌ ‌सूर्यदेवाला‌ ‌नमस्कार‌ ‌करून‌ ‌म्हणते,‌ ‌”हे‌ ‌तेजोमय‌ ‌भास्करा,‌ ‌तुझ्याकडे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌बापडी‌ ‌लहानशी.‌ ‌माझ्याकडेही‌ ‌प्रकाश‌ ‌आहे‌ ‌पण‌ ‌त्याची‌ ‌तुझ्याशी‌ ‌तुलना‌ ‌होऊच‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌मी‌ ‌माझ्याकडे‌ ‌असणाऱ्या‌ ‌थोड्याशा‌ ‌प्रकाशाने‌ ‌जेवढी‌ ‌जमेल‌ ‌तेवढी‌ ‌पृथ्वी‌ ‌उजळून‌ ‌टाकू‌ ‌शकते.‌ ‌माझा‌ ‌तेवढाच‌ ‌’खारीचा‌ ‌वाटा’.‌ ‌माझ्यामुळे‌ ‌खूप‌ ‌मोठी‌ ‌प्रखरता‌ ‌निर्माण‌ ‌होणार‌ ‌नाही,‌ ‌परंतु‌ ‌अंधाराला‌‌ छिद्र‌ ‌पाडण्याची‌ ‌ताकत‌ ‌माझ्यात‌ ‌आहे.‌ ‌तुझ्या‌ ‌जाण्याने‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌अंधार‌ ‌मी‌ ‌थोडाफार‌ ‌तरी‌ ‌भेदू‌ ‌शकते.‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌मी‌ ‌करू‌ ‌शकते”,‌ ‌तसे‌ ‌आश्वासन‌ ‌ती‌ ‌सूर्याला‌ ‌देते.‌ ‌

वच‌ ‌हे‌ ‌ऐकुनि‌ ‌त्या‌ ‌तेजाचे‌ ‌
डोळे‌ ‌ओलावले‌
‌तृप्त‌ ‌मनाने‌ ‌आणि‌ ‌रवि‌ ‌तो‌
‌झुकला‌ ‌अस्ताकडे‌‌

दैदिप्यमान‌ ‌असणाऱ्या‌ ‌सूर्यापुढे‌ ‌एवढीशी‌ ‌पणती‌ ‌बोलत‌ ‌होती. तिच्या‌ ‌बोलण्यात‌ ‌तेज‌ ‌होते.‌ ‌धाडस‌ ‌होते.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌चालू‌ ‌राहील‌ ‌याची‌ ‌शाश्वती‌ ‌सूर्याला‌ ‌मिळाली.‌ ‌छोट्याशा‌ ‌पणतीचे‌ ‌हे‌ ‌धाडस‌ ‌पाहून‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌ओलावले,‌ ‌त्याच्या‌ ‌डोळ्यांत‌ ‌आनंदाश्रू‌ ‌आले.‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌घेणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌तो‌ ‌तृप्त‌ ‌झाला.‌ ‌पृथ्वीमातेची‌ ‌काळजी‌ ‌घेण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌पणतीने‌ ‌उचलली‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌मनाला‌ ‌आनंद‌ ‌देणाऱ्या‌ ‌विचारातच‌ ‌सूर्य‌ ‌अस्ताकडे‌ ‌झुकला.‌ ‌सूर्य‌ ‌मावळला‌ ‌पण‌ ‌त्याचे‌ ‌कार्य‌ ‌सुरू‌ ‌राहिले.‌ ‌त्याचे‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌पण‌ ‌पणती‌ ‌करत‌ ‌राहिली.‌‌

जाता अस्ताला शब्दार्थ‌ ‌

  • जाईन‌ –‌ ‌जाणे‌
  • ‌कैसे‌ – ‌कसे‌‌
  • भले‌ –‌ ‌चांगले‌ ‌
  • धरा‌ –‌ ‌पृथ्वी‌‌ –‌ ‌(earth)‌ ‌
  • त्वरा‌ –‌ ‌घाई,‌ ‌लवकर‌ –‌ ‌(to‌ ‌be‌ ‌hurry)‌ ‌
  • शाश्वती‌ ‌–‌ ‌विश्वास,‌ ‌खात्री,‌ ‌भरवसा‌ –‌ ‌(surety)‌ ‌
  • पुढती‌ –‌ ‌समोर‌‌ –‌ ‌(in‌ ‌front‌ ‌of)‌ ‌
  • विनम्र‌ –‌ ‌नम,‌ ‌विनयशील‌ –‌ ‌(humble)‌ ‌
  • लवून‌ –‌ ‌वाकून,‌ ‌नम्र‌ ‌होऊन‌ –‌ ‌(to‌ ‌bend)‌‌
  • भाव‌ –‌ ‌भावना‌‌ –‌ ‌(emotions)‌ ‌
  • ‌भास्कर‌‌ –‌ ‌सूर्य‌ –‌ ‌(sun)‌ ‌
  • मम‌‌ –‌ ‌माझ्या,‌ ‌माझे –‌ ‌(mine)‌ ‌
  • तेजाने‌ –‌ ‌प्रकाशाने –‌ ‌(lustre)‌ ‌
  • ‌वच‌‌‌‌ –‌ ‌बोलणे‌‌ –‌ ‌(saying)‌ ‌
  • तृप्त‌‌ –‌ ‌समाधानी,‌ ‌संतोष‌ –‌ ‌(satisfied)‌ ‌
  • ‌झुकणे –‌ ‌कलणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌incline)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions भाग-२

Urja Shakti Cha Jagar Class 10 Marathi Chapter 8 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 8 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 20

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 21

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
कारणे लिहा.
(अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागे कारण लेखकाची शाळा गरीब होती. फक्त तीन पैसे किंमत असलेली उत्तरपत्रिका शाळा विदयार्थ्यांना देऊ शकत नव्हती.

(आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाई.

(इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाला गिरगांवातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण प्रवेश फी ची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.

प्रश्न 4.
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
(अ) आपण सगळ्यांनी …………………………. मदत केली पाहिजे. (आई)
उत्तर:
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

(आ) आमच्या बाईंनी प्रमुख …………………………. आभार मानले. (पाहुणे)
उत्तर:
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

(इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …………………………. रुजू झाला. (नोकरी)
उत्तर:
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार
(१)
(१) उपमेय
(२) उपमान

प्रश्न 6.
स्वमत.
(अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले ‘माशेलकर तुमची उर्जा एकत्र करा. काहीही जाळता येतं.’ – याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे, त्यात पूर्णपणे स्वत:ला झोकून दया, कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दांतून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली.

(आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा
उत्तरः
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.

त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.

शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

उत्तरः
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्यासा पहिल्या माळ्यांवर राहिली तरीही लेखकांनी आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत ते आईबरोबर राहिले.

हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर एकवीस रूपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नव्हती तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला.

उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठीचे फक्त तीन पैसे एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. हे पाहून लेखकांच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अति जोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणांतून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते.

(ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शिक्षकांचे स्थान फार महत्त्वपूर्ण असते. माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली. मी आज ज्या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
ओघ तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 4

प्रश्न 3.
योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………….. हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. (ताई, माई, आई, बाई)
उत्तर:
(i) आई

(ii) आमचे मूळ गाव ……………………….. गोव्यातील माशेल. (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण)
उत्तर:
(ii) दक्षिण

(iii) मी आणि माझी आई ……………………….. येऊन पोहोचलो. (गोव्यात, अमरावतीत, मुंबईत, पुण्यात)
उत्तर:
(iii) मुंबईत

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) दारिद्र्याशी संषर्घ करणारी – लेखकाची आई
(ii) शाळेत कसा जाऊ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे – लेखक माशेलकर

प्रश्न 3.
घटना आणि परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव काय होते?
उत्तरः
लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव ‘युनियन हायस्कूल’ असे होते.

(ii) लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात?
उत्तरः
युनियन हायस्कुल व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क यांच्यामुळे आला म्हणून लेखक आईचे व मामाचे ऋण मानतात.

(iii) लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते?
उत्तर:
लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व आई होती.

(iv) उदहनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले?
उत्तरः
उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले.

प्रश्न 5.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 6
उत्तर:
(i – आ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – इ)

प्रश्न 6.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
(ii) माझे बालपण तिथेच गेले.
(iii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iv) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
उत्तर:
(i) माझे बालपण तिथेच गेले.
(ii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iii) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
(iv) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 7.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 7

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखकाचे बालपण गोव्यातील माशेल या गावी गेले. आई, वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहात होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या, तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावे लागले.

प्रश्न 2.
आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
उत्तरः
वयाच्या ६व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावे लागले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते. पण फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण शाळेत जाऊ शकू की, नाही असे त्यांना वाटत असे.

प्रश्न 3.
माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती ते थोडक्यात लिहा.
उत्तरः
वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणेही त्यांच्या आईला शक्य नव्हते.

प्रश्न 4.
लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दल माहिती तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
लेखक सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळूवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण सुरू झाले. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. या शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळाली.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण . . .
उत्तर:
माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण . . .
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 8

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला?
उत्तर:
लेखकाच्या मामांमुळे त्यांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला.

(ii) लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती.

(iii) लेखकाच्या आईने कशाप्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात केली?
उत्तरः
लेखकाच्या आईने आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून पैसे जमवण्यास सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती …………………………… होती. (चांगली, गुणवत्तापूर्वक, बेताचीच, हालाखीची)
(ii) पण तोपर्यंत …………………………… त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. (गोरेगावातील, मुंबईतील, गिरगावातील, गोव्यातील)
(iii) अखेर …………………………… हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. (युनिटी, युनियन, न्यू इंग्लिश)
उत्तर:
(i) बेताचीच
(ii) गिरगावातील
(iii) युनियन

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) माशेलहून मुंबईला आलेले. – [लेखकाचे मामा]
(ii) यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला – [लेखकाला]
(iii) मनानं श्रीमंत असलेले – [लेखकाचे शिक्षक]

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(ii) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
(iii) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(iv) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
उत्तर:
(i) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
(iii) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(iv) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 10
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) प्राथमिक : शाळा :: माध्यमिक : ……………………..
(ii) अपूरी : जागा :: पूरक : ……………………..
उत्तर:
(i) शिक्षण
(ii) वातावरण

प्रश्न 6.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 11

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूल शिक्षणाच्या वेळी लेखकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अनवाणी शाळेत गेले. छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडत होती. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अनेक अडीअडचणी आणि अभाव सहन करून लेखक जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगले यश मिळवले.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईचे वर्णन उताऱ्याच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. मिळेल ते, पडेल ते काम तिने केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला शरण न जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती.

प्रश्न 3.
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळाला?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूल प्रवेशाच्या वेळी लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केले आणि एका सहृदय मातेने मदत केली. अशा प्रकारे २१ रुपये फी जमवली. तो पर्यंत सर्व चांगल्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच युनियन हायस्कूलमधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकासमोर निर्माण झाल्या.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पुर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………….. एक आंतरिक ओढ वाटू लागली. (शिक्षणाबद्दल, खेळाबद्दल, कलेबद्दल, शाळेबद्दल)
(ii) त्यावेळी उत्तरपत्रिकेची किंमत फक्त ……………………….. पैसे असायची. (एक, दोन, तीन, चार)
(iii) अखंड ……………………….. मला मिळणं अवघड होतं. (पेन्सिल, पेन, वही, फळा)
उत्तर:
(i) शिक्षणाबद्दल
(ii) तीन
(iii) पेन्सिल

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 14
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 15

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीन लेखकाला लिहावं लागे कारण . . . . .
उत्तर:
जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनं लेखकाला लिहावं लागे कारण अखंड पेन्सिल विकत घेण्याएवढे पैसे लेखकाच्या आईकडे नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ का गेली?
उत्तर:
तिथे काही काम मिळणार आहे, अशी बातमी कळाल्याने लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ गेली.

(ii) लेखकाच्या आईने लेखकासाठी कशाप्रकारे वह्या बनवल्या?
उत्तर:
कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद एकत्र जमा करून लेखकाच्या आईने लेखकासाठी वह्या बनवल्या.

(iii) लेखकाच्या हायस्कूलमध्ये नेहमी कोणत्या दिवशी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

(iv) काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने लेखकाच्या आईने काय ठरविले?
उत्तर:
काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने आपल्या मुलाला म्हणजेच लेखकाला खूप शिकवेन, असे त्यांच्या आईने ठरवले.

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) तिनं ठरवलं, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
उत्तर:
(i) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) तिनं ठरवलं, की ‘मी माझ्या मुलाला खूप शिकवीन,

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) सेवाभावी : वृत्ती :: प्रचंड : …………………………….
(ii) अंगावर : काटा :: डोळ्यांत : …………………………….
उत्तर:
(i) कष्ट
(ii) पाणी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने सांगितलेल्या आठवणी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
युनियन हायस्कूलमधले सगळे शिक्षक खूप प्रेमळ होते. त्यांची वृत्ती सेवाभावी होती. विदयार्थ्यांना शिकवताना ते स्वत:ला झोकून देत असत. लेखकाच्या शालेय जीवनात त्यांनी अगदी निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन केले. यामुळे लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असे नाही तर आयुष्याचा पाया देखील पक्का झाला. त्यामुळेच लेखकाच्या मनात शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसजवळ काम मिळाले नाही याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखकाच्या शाळेत दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची उत्तरपत्रिका घरून आणावी लागे. तिची किंमत तीन पैसे असायची पैशाची व्यवस्था करण्यासाठी ती काँग्रेस हाऊसजवळ काम मिळेल या आशेने खूप वेळ रांगेत ताटकळत उभी राहिली. त्यानंतर तिला कळले की, तिसरी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाच या ठिकाणी काम मिळतं. त्यामुळे तिची खूप निराशा झाली. तेव्हाच आपल्या मुलाला खूप शिकवायचं असा निश्चय तिने केला.

प्रश्न 3.
लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईने कोणते कष्ट सोसले ते लिहा.
उत्तरः
लेखकासोबत ती अत्यंत छोट्याशा घरात राहिली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. व लेखकाच्या शिक्षणासाठी पैसे जमवले. कोरे,पाठकोरे कागद जमवून ती लेखकासाठी वह्या तयार करायची. छोट्या-छोट्या का होईना त्या पेन्सिली ती लेखकाला लिहायला यायची. कोणत्याही परिस्थितीत लेखकाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची.

प्रश्न 4.
आपल्या आईबद्दलच्या लेखकाच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखक म्हणतात माझ्या आईच्या श्रमाला, कष्टाला तोड नाही. तिच्या श्रमाचं वर्णन करताना ते भावूक होऊन म्हणतात की, माझ्या आईचे श्रम आठवले की, माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा या प्रचंड कष्ट करणाऱ्या आईचे लेखक सदैव ऋण मानतात. तिला ते आपली पहिली शिक्षक व सर्वस्व मानतात. प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
पुढील कृती करा.

(i) ‘भौतिक शास्त्र’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा?
उत्तरः
भावे सर कोणता विषय शिकवत असतं?

(ii) विषयाची गोडी लावली, असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
विज्ञान शिकवताना भावे सरांनी आणखी कोणती गोष्ट साधली?

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 16
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 17

प्रश्न 3.
रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………………. हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली. (भूगोलातील, मराठीतील, इंग्रजीतील, विज्ञानातील)
(ii) भिंगाच्या साहाय्यानं ……………………………. शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. (चंद्रकिरणांची, ऊर्जेची, सूर्यकिरणांची, विजेची)
(iii) माझी शाळा हे ‘माझे ……………………………. केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. (संस्कार, स्मरणीय, आवडते, संस्कारक्षम)
उत्तर:
(i) विज्ञानातील
(ii) सूर्यकिरणांची
(iii) संस्कार

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 18
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलनकृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) लेखकाला जीवनाचे तत्त्वज्ञान देणारे – [भावे सर]
(ii) पुन्हा मनोमनी शाळेत जाणारे – [लेखक]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 19

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला भावे सर कोणत्या हायस्कूलमध्ये भेटले?
उत्तर:
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये भावे सर भेटले.

(ii) लेखकाला कोणते क्षण आठवतात?
उत्तरः
प्रचंड दारिद्र्याशी सामना करतानाचे क्षण लेखकाला आठवतात.

(iii) भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला?
उत्तर:
भावे सरांनी भिंगाच्या साहाय्याने कागद जाळण्याचा प्रयोग करून दाखवला.

(iv) लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून काय गवसलं?
उत्तरः
लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान गवसलं.

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विषयाची : गोडी :: जगण्याचे : ……………………………..
(ii) एकाग्रतेचा : मंत्र :: संघर्षासाठी : ……………………………..
उत्तर:
(i) भान
(ii) आत्मविश्वास

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाने आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दलच्या भावना कशाप्रकारे व्यक्त केल्या आहेत ते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तरः
लेखक म्हणतात की, माझ्या जीवनाच्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. भावे सरांकडून एकाग्रतेचा मंत्र आणि जीवनाचे तत्वज्ञान मिळाले. जोशी सर शिर्के सर, मालेगाववाला सर यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. आयुष्याच्या उभारणीसाठी संस्कार आणि संघर्षासाठी सामना करण्याचं बळ मिळालं. जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्या सगळ्या शिक्षकांकडून त्यांना मिळाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
लेखकाने संस्कार केंद्र कोणाला म्हटले आहे ? का?
उत्तरः
लेखकाने ‘संस्कार केंद्र’ त्यांची आई, शाळा आणि शिक्षक यांना म्हटले आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करणारी आई. परिस्थितीपुढे शरण न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग तिने लेखकाला दाखवला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून, शिकवणुकीतून लेखकाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या सगळ्यामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.

प्रश्न 3.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत शाळा किती महत्त्वाची भूमिका बजावते यावर तुमचे विचार लिहा.
उत्तरः
विदयार्थी हा बालपणापासून शाळेत असतो त्याचा अधिकाधिक वेळ शाळेत जातो आणि त्या वयात तो जे शिकतो अनुभवतो ते त्याच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करते. शाळेतले शिक्षक, उपक्रम, शाळेतले वातावरण, या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. बालपणापासून ते किशोरवयापर्यंत अनेक गोष्टीतून तो शिकतो. म्हणून विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेची फार महत्त्वाची भूमिका असते असे मला वाटते. स्वाध्याय कृती

प्रश्न 4.
कारणे लिहा.

(i) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण . . .
उत्तरः
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण युनियन हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले शिक्षण

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in Marathi

ऊर्जाशक्तीचा जागर पाठपरिचय‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 24

‘उर्जाशक्तीचा‌ ‌जागर’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌’डॉ.‌ ‌रघुनाथ‌ ‌माशेलकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌त्यांनी‌ ‌आपल्या‌ ‌लहानपणीच्या‌ ‌आठवणी‌ ‌दिलेल्या‌ ‌आहेत.‌ ‌लहानपणीच‌ ‌पित्याचे‌ ‌छत्र‌ ‌हरपलेल्या‌ ‌माशेलकरांना‌ ‌त्यांच्या‌ ‌आईने‌ ‌अत्यंत‌ ‌प्रतिकूल‌ ‌परिस्थितीतून‌ ‌जिद्दीने‌ ‌शिक्षण‌ ‌घेण्यास‌ ‌प्रवृत्त‌ ‌कसे‌ ‌केले,‌ ‌त्याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in English

‘Urjashakticha‌ ‌Jagar’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Dr.‌ ‌Raghunath‌ ‌Mashelkar.‌ ‌He‌ ‌has‌ ‌written‌ ‌about‌ ‌his‌ ‌childhood‌ ‌memories.‌ ‌He‌ ‌lost‌ ‌his‌ ‌father‌ ‌at‌ ‌an‌ ‌early‌ ‌age.‌ ‌Thereafter,‌ ‌the‌ ‌manner‌ ‌in‌ ‌which‌ ‌his‌ ‌mother‌ ‌helped‌ ‌and‌ ‌inspired‌ ‌him‌ ‌to‌ ‌get‌ ‌an‌ ‌education,‌ ‌irrespective‌ ‌of‌ ‌all‌ ‌odds,‌ ‌has‌ ‌been‌ ‌beautifully‌ ‌explained.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर शब्दार्थ‌‌

  • मुलभूत‌ ‌– ‌पायाभूत‌ ‌– ‌(basic)‌ ‌
  • ‌बौद्धिक‌ ‌– ‌बुद्धिशी‌ ‌संबंधित‌ ‌– ‌(intellectual)‌‌
  • क्षमता‌ ‌– ‌सामर्थ्य‌ ‌– ‌(ability)‌ ‌
  • नियोजन‌ ‌– ‌योजना‌ ‌– ‌(planning)‌ ‌
  • शास्त्रज्ञ‌ ‌– ‌वैज्ञानिक‌ ‌– ‌(a‌ ‌scientist)‌ ‌
  • तंत्रज्ञान‌ ‌– ‌(technology)‌ ‌
  • धोरण‌ ‌उद्दिष्ट‌ ‌– ‌(aim)‌ ‌
  • महत्कार्य‌ ‌– ‌महान‌ ‌कार्य‌ ‌– ‌(great‌ ‌work)‌ ‌
  • कष्ट‌ ‌– ‌मेहनत‌ ‌– ‌(hard‌ ‌work)‌ ‌
  • शिस्त‌ ‌– ‌वळण‌ ‌– ‌(discipline)‌ ‌
  • नेतृत्वगुण‌ ‌–‌ (leadership‌ ‌quality)‌
  • संरक्षण‌ ‌– ‌(protection)‌
  • ‌हरपणे‌ ‌– ‌गमावणे‌ ‌– ‌(to‌ ‌lose)‌
  • ‌प्रतिकूल‌ ‌– ‌उलट,‌ ‌विरोधी‌ ‌– ‌(adverse)‌
  • ‌जिद्द‌ ‌– ‌आग्रह‌ ‌– ‌(ambition)‌ ‌
  • आपुलकी‌ ‌– ‌आपलेपणा‌ ‌– ‌(affection)‌‌
  • संस्कार‌ ‌– ‌चांगले‌ ‌गुण‌ ‌– ‌(values)‌
  • ‌ऋण‌ ‌– ‌उपकार‌ ‌– ‌(obligation)‌‌
  • संपर्क‌ ‌– ‌संबंध‌ ‌– ‌(contact)‌
  • ‌सर्वस्व‌ ‌– ‌सर्व‌ ‌काही‌ ‌– ‌(one’s‌ ‌all)‌ ‌
  • पिंपळकट्टा‌ ‌– ‌(raised‌ ‌platform‌ ‌of‌‌ stones‌ ‌around‌ ‌fig‌ ‌tree)‌ ‌
  • निवांतपणा‌ ‌– ‌शांतपणा‌ ‌– ‌(silence)‌
  • ‌पुसट‌ ‌– ‌अस्पष्ट‌ ‌– ‌(faint)‌
  • ‌लहर‌ ‌– ‌वाऱ्याची‌ ‌झुळूक‌ ‌– ‌(a‌ ‌breeze)‌‌
  • वारले‌‌‌ ‌– ‌मृत्यु‌ ‌पावले‌ ‌– ‌(die)‌ ‌
  • उदरनिर्वाह‌ ‌– ‌उपजीविका‌ ‌– ‌(livelihood)‌‌
  • ‌माडी‌ ‌– ‌(a‌ ‌lott)‌ ‌
  • आर्थिक‌ ‌परिस्थिती‌ ‌– ‌(financial‌ ‌condition)‌ ‌
  • खालावणे‌ ‌– ‌बिघडणे‌ ‌दारिद्रय‌ ‌– ‌गरिबी‌ ‌– ‌(poverty)‌
  • ‌संघर्ष‌ ‌– ‌झुंज‌ ‌– ‌(struggle)‌
  • ‌आसुसणे‌ ‌– ‌तीव्र‌ ‌इच्छा‌ ‌होणे‌ ‌– ‌(to‌ ‌lust)‌ ‌
  • अनवाणी‌ ‌– ‌पायात‌ ‌वहाणा‌ ‌व‌ ‌काहीही‌ ‌न‌ ‌घालता‌‌ – (‌footed)‌ ‌
  • नामांकित‌ ‌– ‌प्रख्यात‌ ‌– ‌(famous)‌ ‌
  • टप्पा‌ ‌– ‌मजल‌ ‌– ‌(a‌ ‌stage)‌ ‌
  • अपुरी‌ ‌– ‌पुरेशी‌ ‌नसलेली‌ ‌– ‌(insufficient)‌ ‌
  • पुरक‌ ‌– ‌योग्य‌ ‌– ‌(suitable)‌ ‌
  • सेवाभाव‌ ‌– ‌मदतीची‌ ‌वृत्ती‌ ‌– ‌(servitude)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions भाग-२

Bij Perle Gele Class 10 Marathi Chapter 14 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 14 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 14 बीज पेरले गेले Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.

(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….
उत्तरः
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.

(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….
उत्तरः
दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 11

प्रश्न 3.
ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 12

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
(i) सही
(ii) निवास
(iii) क्रीडा
(iv) प्रशंसा
उत्तरः
(i) सही – स्वाक्षरी
(ii) निवास – घर
(iii) क्रीडा – खेळ
(iv) प्रशंसा – स्तुती

प्रश्न 5.
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
उत्तरः
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
उत्तरः
अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
उत्तरः
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
उत्तर:
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

(आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

(इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
उत्तर:
लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.

(ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.
उत्तर:
प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वत:चा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 14 बीज पेरले गेले Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते.
उत्तर:
लेखकाचे वडील त्या वेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे घरखर्च भागवताना फार त्रास होत असे म्हणून पैशाअभावी ते मुलांना खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

(ii) लेखक व त्यांच्या थोरल्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची बदली वडगावला झाली. चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांना व त्यांच्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.
(ii) वडिलांची बदली वडगावला झाली.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
उत्तर:
(i) वडिलांची बदली वडगावला झाली.
(ii) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाचा जन्म कुठे झाला?
उत्तर:
लेखकाचा जन्म पुण्यात झाला.

(ii) लेखकाचे वडील कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत?
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत.

(iii) वडिलांची बदली कोठे झाली?
उत्तरः
वडिलांची बदली वडगावला झाली.

(iv) लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी कोठे रहावे लागले ?
उत्तर:
लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यातच त्यांच्या काकांकडे रहावे लागले.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) दुसऱ्या मुलांच्या हातात ……………………….. पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. (वही, पेन, खेळणी, विटी)
(ii) तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती ……………………….. प्रेमळ कुशीत. (आईच्या, ताईच्या, बायकोच्या, बाबांच्या)
(iii) ……………………….. नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. (शालेचे, गावाचे, घराण्याचे, देशाचे)
उत्तर:
(i) खेळणी
(ii) आईच्या
(iii) घराण्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) पोलीस खात्यात नोकरी करणारे – [लेखकाचे वडील]
(ii) लेखक व भाऊ शिक्षणासाठी यांच्याकडे राहिले – [काकांकडे]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 4

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.
(i) बॅट – लाकडी फळी
(ii) स्टंप – यष्टी
(iii) बॉल – चेंडू
(iv) कॅम्प – शिबीर

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) वडिलांची बदली मडगावला झाली.
(ii) लेखक खेळकर होते.
(iii) भाऊ व लेखक यांना शिक्षणासाठी मामांकडे रहावे लागले.
(iv) मुलांनी ऑफिसर व्हावे अशी मामीची इच्छा होती.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून का निरोप घेतला असेल? तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपले मूल मोठे व्हावे, आपले व आपल्या घराण्याचे नाव त्याने उज्ज्वल करावे. मुलांच्या नावाने आपण ओळखले जावे. प्रत्येक पालकांची ही एकच इच्छा असते की, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी. त्याप्रमाणेच लेखकांच्या आईवडिलांचीही लेखक व त्यांचे भाऊ मोठे व्हावे, मोठे ऑफिसर व्हावे, आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा होती. लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना काकांकडे पुण्यातच ठेवण्यात आले. आपल्या मुलांना सोडून राहणे आईवडिलांना त्रासदायक होते; परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन घट्ट करून लेखकाच्या आईवडिलांनी निरोप घेतला असेल असे मला वाटते.

प्रश्न २. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे?
उत्तर :
सर्व खेळात लेखकांना क्रिकेट खेळ आवडत असे.

(ii) लेखकाचे काका कुठे राहत?
उत्तर :
लेखकाचे काका पुण्याच्या वाय.एम.सी.ए. कंपाऊंडमध्ये राहत.

(iii) लेखकांनी काय व्हायचे ठरविले?
उत्तर :
लेखकांनी क्रिकेट खेळाडू व्हायचे ठरविले.

(iv) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे?
उत्तर :
लेखक सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
(ii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iii) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(iv) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत,
उत्तर:
(i) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(ii) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iv) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) साहजिकच याचा …………………………… माझ्या बालमनावर होई. (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)
(ii) कोणी नाही असे पाहून ते मला …………………………… फेकायला (दगड, गोळा, चेंडू, भाला)
(iii) दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी …………………………… आनंदाने मदत करत असे. (खेळाडूंना, पोलिसांना, ग्राऊंड्समनला, पंचना)
उत्तर:
(i) परिणाम
(ii) चेंडू
(iii) ग्राऊंड्समनला

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 6

प्रश्न 2.
उत्तरे लिहा

(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था – वाय. एम. सी. ए.
(ii) लेखकाचा आवडता खेळ – क्रिकेट

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.
(iv) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) बरोबर
(iv) चूक

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा,

(i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन
(अ) मी प्रथम सिनेमागृहात हजर होत असे.
(आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.
(इ) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
(ई) मी प्रथम नाट्यगृहात हजर होत असे.
उत्तर :
शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन!’ असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
लेखक शिक्षणासाठी जेव्हा काकांकडे राहण्यास गेले. त्यावेळी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. काका वाय, एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे वाय.एम.सी.ए.चे सभासद क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यामुळे लेखक हा खेळ पाहण्यासाठी जात असत. त्याचवेळी त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा वाढीस लागली. शाळा सुटली रे सुटली की ते ग्राऊंडवर हजर होत असत. त्यावेळी ते सभासद लेखकास खेळण्यासाठी बोलवत. त्यांना चेंडू फेकण्यास सांगत आणि लेखकही त्या कामासाठी सदैव तयार होत असत.

अशाप्रकारे क्रिकेटची आवड आणि प्रत्यक्ष खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद व्यक्त करताना लेखक ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे मत व्यक्त करतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न ३. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 7

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांनी संतापाने लेखकास छड्या मारल्या.
उत्तरः
लेखक एके दिवशी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहण्यास गेले. त्यामुळे वडिलांनी लेखकास छड्या मारल्या.

(ii) लेखकांस त्यांचे वडील खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.
उत्तरः
लेखकांचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते लेखकांस खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) लेखकाची धडपड सुरू झाली.
(ii) मैदानावर कनात घालण्यास आली.
(iii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iv) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
उत्तर:
(i) मैदानावर कनात घालण्यास आली.
(ii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iii) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
(iv) लेखकाची धडपड सुरू झाली,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
सातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) माझे ………………………….. स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. (वडील, काका, मामा, तात्या)
(ii) मी तसाच ती बॅट घेऊन ………………………….. दाखवत सुटलो. (आईला, मित्रांना, खेळाडूंना, सभासदाना)
(iii) ………………………….. साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक संघ पुण्यात आला होता. (१९६०, १९४०, १९४५, १९८३)
उत्तर:
(i) वडील
(ii) मित्रांना
(iii) १९४५

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर वाय. एम. सी. ए. चे – उद्गार काढणारे खेळाडू
(ii) वडील या खेळात चॅम्पियन होते – व्हॉलीबॉल

प्रश्न 2.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.

(i) चॅम्पियन – सर्वोत्कृष्ट खेळाडू
(ii) ग्राऊंड – मैदान

प्रश्न 3.
चूकी की बरोबर ते लिहा.

(i) वडील फूटबॉल चॅम्पियन होते.
(ii) पूना क्लब ग्राऊंडवर एक मॅच झाली.
(iii) आईने लेखकास संतापाने छड्या मारल्या.
(iv) वडिलांनी जुनी बॅट विकत घेतली.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) बरोबर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(i) ………………………….. ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.
(अ) पूना क्लबच्या.
(आ) मुंबई क्लबच्या.
(इ) सातारा क्लबच्या.
(ई) महाराष्ट्र क्लबच्या.
उत्तर:
पूना क्लबच्या ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.

(ii) त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा …………………………. .
(अ) तीस रूपये होता.
(आ) शंभर रूपये होता.
(इ) चोवीस रूपये होता.
(ई) दहा रूपये होता.
उत्तरः
त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रूपये होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकांचे वडील कोणत्या खेळात चॅम्पियन होते?
उत्तर:
लेखकांचे वडील ‘व्हॉलीबॉल’ या खेळात चॅम्पियन होते.

(ii) लेखकांच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट किती रूपयांची होती?
उत्तर:
लेखकाच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट सहा रूपयांची होती.

प्रश्न ४. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 8
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

(i) मॅच संपल्यावर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते – खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी.
(ii) या तासाला लेखकांच्या स्वाक्षरीने वही भरत असे – गणित

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.
(ii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iv) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
उत्तर:
(i) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
(ii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iv) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे …………………………….. व्हावे. (कलाकार, पंच, खेळाडू, नट)
(ii) माझ्या मनात क्रिकेटचे …………………………….. पेरले गेले आणि उगवले ते असे. (बीज, रोप, स्थान, रहस्य)
उत्तर:
(i) खेळाडू
(ii) बीज

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
उत्तरः
लेखकांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. त्यांचे नाव शाळेच्या बोर्डावर झळकले म्हणून विदयार्थी व शिक्षकांनी कौतुकासाठी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

(i) विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य …………………………..

(अ) मनाला लागले.
(आ) काळजात भिडले.
(इ) आनंद मिळाला.
(ई) सुंदर होते
उत्तरः
विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य काळजात भिडले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला काय वाटले?
उत्तरः
क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला धन्य-धन्य वाटले.

(ii) लेखक दिवसभर कोठे बसून मॅच पाहत हाते?
उत्तरः
लेखक दिवसभर झाडावर बसून मॅच पाहत होते.

स्वाध्याय कृती

*(६) स्वमत

(१) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

(२) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

बीज पेरले गेले Summary in Marathi

बीज पेरले गेले पाठपरिचय

‘बीज पेरले गेले’ हा पाठ लेखक ‘चंदू बोर्डे’ यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले हे सांगितले आहे.

बीज पेरले गेले Summary in English

‘Bij Perle gele’ is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.

बीज पेरले गेले शब्दार्थ

  • कष्ट – मेहनत – (hard work)
  • यथेच्छ – मन भरे पर्यंत, मनसोक्त – (to one’s heart’s content)
  • संध्याकाळ – सांजवेळ – (evening time)
  • आऊट – बाद करणे – (out)
  • इच्छा – मनिषा, मनोकामना – (wish)
  • पॅक्टिस – सराव – (practice)
  • ग्राऊंड – मैदान – (a playground)
  • स्तुती – कौतुक, प्रशंसा – (praise)
  • मित्र – सखा – (friend)
  • संताप – राग – (violent anger)
  • क्लब – मंडळ – (club)
  • मनसोक्त – मनापासून – (from one’s heart)
  • स्वाक्षरी – सही – (signature)
  • बालमित्र – लहानपणीचे सवंगडी – (childhood friends)
  • खेळकर – (asportive)
  • खोडकर – खोड्या करणारा – (naughty)
  • उपद्व्यापी – खोडकर, त्रासदायक – (mischievous)
  • तुटपुंजा – गरजेपेक्षा कमी, अपुरा, पुरेसा नसलेला – (meagre)
  • परिस्थिती – (condition)
  • खेळणी – खेळण्याच्या वस्तू (बाहूली, चेंडू इ.) – (a toy)
  • विटीदांडू – विटी व दांडू घेऊन खेळायचा खेळ – (the game of trapstick)
  • पतंग – (akite)
  • तक्रार – गा–हाणे – (complaint)
  • पाऊल – पाय, पाऊलखूण – (footmark, a foot)
  • चापटपोळी – थप्पड – (slap)
  • परिणाम – प्रभाव – (an effect)
  • हट्ट – हेका – (obstinacy)
  • उद्देश – (intention)
  • सभासद – सदस्य – (a member)
  • प्रयत्न – मोठा यत्न – (an attempt)
  • प्रार्थना – आराधना – (a prayer)
  • उद्गार – बोल, उच्चार – (utterance, word)
  • मासिक पगार – महिन्याला मिळणारा पगार – (salary)

बीज पेरले गेले बाकाचार

  • भुरळ पडणे – आवड निर्माण होणे
  • शाबासकीची थाप देणे – कौतुक करणे
  • आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
  • धन्य वाटणे – कृतकृत्य होणे
  • खूणगाठ मनाशी बांधणे – पक्का निश्चय करणे
  • छाती आनंदाने फुगणे – खूप आनंद होणे
  • नाव उज्ज्वल करणे – कीर्ती मिळवणे/प्रसिद्धी मिळणे

SSC Marathi Textbook Class 10 Solutions भाग-४