Aamhi Have Aahot Ka Class 8 Marathi Chapter 10 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 10 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Textbook Questions and Answers

1. पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यासंदर्भात आहेत त्या प्राण्याचे नाव लिहा.

प्रश्न अ.
“जन्मापासून आंधळी आहे ती!” [ ]
उत्तरः
मांजरी

प्रश्न आ.
“सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!” [ ] पिलं
उत्तरः
कुत्रीची
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 1
उत्तरः
अ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 2
आ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 3
इ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 4

ई.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 5

3. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया. 

प्रश्न 1.
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया.
उत्तरः
मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.

प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसांपेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल, बालकत्व असते. ती प्रेमाची, मायेची भूकलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

व्याकरण व भाषाभ्यास

(अ) कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)

प्रश्न अ.
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ………………………………
उत्तरः
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही.

प्रश्न आ.
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ………………………….
उत्तरः
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

प्रश्न इ.
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ………………………….
उत्तरः
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले.

(आ) दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)

प्रश्न (आ)
दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)
(अ) रागीट
(आ) मोठे
(इ) मऊमऊ
उत्तरः
(अ) शांत
(आ) इवले
(इ) खरखरीत

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

(इ) जोडशब्द लिहा.

प्रश्न (इ)
जोडशब्द लिहा.
(अ) चढ
(आ) अंथरुण
(इ) इकडून
(ई) आले
उत्तरः
(अ) उतार
(आ) पांघरूण
(इ) तिकडून
(ई) गेले

विचार करा. सांगा.

प्रश्न 1.
आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का? या वाक्यातून तुम्हांला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत. पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हांला तुम्ही सांभाळले तर पर्यावरण संतुलन राहील. मानवाला लाभच होईल. आम्हांला तुम्ही हवे आहात पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल नं? आम्ही तुम्हांला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली. कुत्र्यांचे, मांजराचे विविध भाग न्याहाळले. त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले. प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले. प्रत्येक प्राणी प्रेमाकरिता आसुसला होता. आम्हांला घरी जायचेच आम्हांला कुरवाळा, आम्ही तुम्हांला हवे आहोत का? जणू असे आपल्या डोळ्यांनी बोलत होता. कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते. भरतने सर्व इस्पितळ दाखविले. छानशी माहिती दिली. तेथून बाहेर पडतांना लेखिकेला वाटले आज आपण एक वेगळेच जग पाहिले.

लिहिते होऊया.

प्रश्न 1.
पाऊस कोसळत असताना एक कुत्र्याचे छोटे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा. किंवा कुत्र्याचे पिल्लू भर पावसात दारात आले तर तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तरः
भर पावसात कुत्र्याचे पिल्लू दारात आले तर मी प्रेमाने स्वागतच करीन, त्याचे ओले अंग मऊ कापडाने पुसून घेईन. त्याला मऊ सुती कापडाचे अंथरुण तयार करून देईन. एक वाटी दूधाची व एक वाटी खाऊची त्याच्याजवळ ठेवीन. त्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवून त्याला आपलेसे करीन. पावसात जाऊ देणार नाही. त्याला कुशीत घेऊन मायेची ऊबही देईन.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा.
उत्तरः
जैव विविधता म्हणजे पृथ्वीवरील निरनिराळे सजीव. सामान्यपणे जैव विविधता म्हणजे जातिमधील विविधता व जीवशास्त्रीय संपन्नता. जैव विविधता परिसंस्था टिकवते. निसर्गातील कार्बनडायऑक्साईडचे चक्र सुरळीत ठेवते. सर्व घटक संतुलित ठेवते. म्हणून जलचक्र ही सुरक्षित राहते. पाणी शुद्ध ठेवते. जमिनीची धूप थांबवते. जैव विविधतेच्या नाशामुळे मानवी आरोग्य धोक्यात येईल. वेगवेगळे आजार होतील. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू चे विषाणू पसरतील. अगदी कीटकही आपणास उपयुक्त आहेत. परागकण पसरवून ते झाडांची निर्मिती करतात. त्यामुळे परिसंस्था टिकते. पर्यावरण संरक्षण आणि जैव विविधता संवर्धन कायदा 1999 चा अभ्यास करून जैव विविधता संपन्न करू या.

उपक्रम:

तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी दया. त्या घरातील लोक पाळीव
प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 6

सूचनाफलक

प्रश्न 1.
सूचनाफलक तयार करणे.

एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तव्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. यापूर्वी तुम्ही सूचनाफलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचनाफलक तयार करायला शिकणार आहात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
सूचनाफलकाचे विषय

  1. शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना.
  2. सहलीसंदर्भात सूचना.
  3. रहदारीसंबंधी सूचना.
  4. दैनंदिन व्यवहारातील सूचना.

प्रश्न 3.
सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी

  1. सूचना कमीत कमी शब्दांत असावी.
  2. सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे.
  3. सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत.
  4. सूचनेचे लेखन शुद्ध असावे.

प्रश्न 4.
सूचनाफलक तयार करा. त्यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा.
विषय- ‘उदया शहरातील पाणीपुरवठा बंद राहील.’
नमुना कृती 1
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 7

विषय- ‘कणखर’ गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन.
नमुना कृती 2
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 8

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 5.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन
करणारा सूचनाफलक तयार करा.

भाषासौंदर्य

प्रश्न 1.
खालील म्हणी पूर्ण करा.

  1. मूर्ती लहान पण ………………. .
  2. शितावरून …………………….. .
  3. सुंठीवाचून …………………….. .
  4. …………………. सोंगे फार.
  5. …………… खळखळाट फार.
  6. दोघांचे भांडण ……………… .
  7. ………………… सव्वालाखाची.
  8. ………………… चुली.
  9. ……………….. आंबट.
  10. अंथरूण पाहून…………… .
  11. इकडे आड…………………. .
  12. ………………… गावाला वळसा.

Class 8 Marathi Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 9

2. वाक्यपूर्ती करा.

प्रश्न 1.
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे;
2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला ………..
उत्तरः
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?
2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांना केलेलं ते आवाहन होतं.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

कृती 2: आकलन कृती

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
जनावरांचे इस्पितळ कुठे आहे?
उत्तरः
मुंबईच्या परळ भागात जनावरांचे इस्पितळ आहे.

प्रश्न 2.
गलेलठ्ठ बोका काय करत होता?
उत्तरः
गलेलठ्ठ बोका आपल्या मिशा साफ करत बसला होता.

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 10

प्रश्न 4.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 11

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
1.  छोटीशी अ. तसबीर
2. गलेलठ्ठ आ. रंग
3. उदी इ. बोका
4. मोठी ई. इमारत

उत्तर:

विशेषण विशेष्य
1. छोटीशी ई. इमारत
2. गलेलठ्ठ इ. बोका
3. उदी आ. रंग
4. मोठी अ. तसबीर

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
खालील शब्दांचा, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. योग येणे – वाक्य: आज ताजमहालचा ‘लाईट शो’ पाहण्याचा योग आला.
2. कार्यालय – वाक्यः सरकारी कार्यालय कागदपत्रांनी भरलेले असते.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
अफाट आणि निरपेक्ष प्राणी प्रेमाचे तुम्ही अनुभवलेले वा वाचलेले एखादे उदाहरण तुमच्या शब्दांत थोडक्यात मांडा.
उत्तर:
निरपेक्ष प्राणीप्रेम म्हणजे डॉ. प्रकाश आमटे. जणू प्राणी आणि डॉ.प्रकाश हे समीकरणच जुळले आहे. त्यांनी आदिवासींच्या सेवेसह हेमलकसा येथे अनाथ प्राण्यांचाही सांभाळ केला आहे. ज्यांची आई मेली, अशा प्राण्यांना भक्ष्य न होऊ देता त्यांनी प्राणी अनाथालयात आणले. त्यांना हवा असलेला आहार, औषध-पाणी या गोष्टींची सोय केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर पोटच्या मुलासारखे ते प्रेम करतात.

त्यांच्या संग्रहालयात कोल्हे, चित्ते, जंगली मांजरी, सांबर, हरिण, रानडुकरे, ससे, साप, अजगर, मगरी, सुसरी, नीलगाई आणि अन्य बरेच प्राणी आहेत. त्यांच्याशी ते गळाभेट करतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना गोंजारतात. हे सर्व प्राणी म्हणजेच त्यांचा परिवार आहे, इतक्या आपुलकीने व दयाबुद्धीने ते वागतात. www. anandwan.in या आंतरजालावर भेट देऊन त्यांचे कार्य पाहून आपण सारेच भूतदया शिकूया.

प्रश्न 2.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 12

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. बोक्याचे डोके कुरवाळले – [साहेबांनी]
2. इस्पितळ पाहण्याची परवानगी मागितली – [लेखिका]

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले?
“बाई, हा मांजराचा विभाग बघायचाय?”
उत्तरः
भरत लेखिकेस म्हणाले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
प्रत्येक खोलीत कोण होते?
उत्तरः
प्रत्येक खोलीत एक एक पेशंट होता.

प्रश्न 2.
लेखिकेने उत्सुकतेने कोठे पाऊल टाकले?
उत्तरः
लेखिकेने उत्सुकतेने मांजरांच्या विभागात पाऊल टाकले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मोठे
  2. अस्वच्छ
  3. डावीकडे
  4. बाहेर

उत्तरः

  1. छोटे
  2. स्वच्छ
  3. उजवीकडे
  4. आत

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
वचन बदलाः

  1. कट्टा
  2. जाळी
  3. पेशंट
  4. ओटा
  5. विभाग
  6. खण

उत्तरः

  1. कट्टे
  2. जाळ्या
  3. पेशंट
  4. ओटे
  5. विभाग
  6. खण

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही प्राण्यांचा डॉक्टर (व्हेटरनरी) झालात तर प्राण्यांवर कसे उपचार कराल? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
डॉक्टर सदैव पेशंटला मानसिक आधार देतात. त्यानेच त्यांचा अर्धा रोग बरा होतो. मी प्रेमाने प्राण्यांना कुरवाळेन. त्यांना गोंजारून त्यांच्याशी बोलेन. स्पर्शाची भाषा त्यांना लवकर कळते. मग योग्य ते औषधोपचार करून त्यांना बरे करीन.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 13

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तरः

  1. हिरव्या डोळ्यांनी, व्याकुळ नजरेने बघणारा – [काळाभोर बोका]
  2. कावरंबावरं झालेलं – [कबरं पिलू]
  3. चिडलेल्या वाघिणीसारखी – [एक मांजरी]
  4. आपल्या पंजानं तोंड, मिशा, ठिपक्याचं डोळे पुसून साफ करणारे – [ठिपक्याचं मांजर]

प्रश्न 3.
सकारण लिहा. एक मांजर खूप आजारी असावं –
उत्तरः
कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप पडलं आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 14

प्रश्न 2.
एक ते दोन शब्दांत उत्तर लिहून चौकट पूर्ण करा.
उत्तरः
1. प्रकृतीचे चढउतार दाखवतो – [तक्ता]
2. प्रत्येक पेशंटला बसायला हे आहे – [मऊ अंथरुण]

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकजण काय म्हणत आहे, असे लेखिकेस वाटते?
उत्तरः
प्रत्येकजण जणू म्हणते आहे, मला इथं फार एकट वाटतंय. जरा माझ्याकडे याहो, मला कुरवाळा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 4.
घटना व परिणाम लिहा.
उत्तरः

घटना परिणाम
लेखिका व
भरत खोलीत
पाऊल
टाकतात.
1. सारी मांजरं चमकतात,
2. त्यांच्या डोळ्यात आतुरता भरली होती.
3. काही मांजर जाळीवर नाक घासतात.
4. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
वचन बदला

  1. बशी
  2. तक्ता
  3. मांजर
  4. खोली
  5. भिंत
  6. पिलू
  7. डोळा
  8. ठिपका

उत्तरः

  1. बश्या
  2. तक्ते
  3. मांजरी
  4. खोल्या
  5. भिंती
  6. ठिपके
  7. पिल्ले
  8. डोळे
  9. ठिपके

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
खालील शब्दांचा / वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तरः

  1. कावरंबावरं होणे – गावाहून आलेला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात कावराबावरा झाला होता.
  2. व्याकूळ होणे – हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई व्याकूळ झाली होती.
  3. लक्ष वेधून घेणे – जादुगाराने आपल्या जादूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  4. कलकलाट होणे – मधल्या सुट्टीत मुलांचा कलकलाट होतो.

प्रश्न 3.
‘कलकलाट’ या शब्दासारखे ४ शब्द लिहा.
उत्तरः

  1. चिवचिवाट
  2. घमघमाट
  3. थरथराट
  4. झगमगाट

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही आपल्या आजोबांबरोबर वसतिगृहाला भेट दिली तेव्हाचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
मला आजोबांनी मुद्दाम वसतिगृह कसे असते ते दाखविण्यासाठी नेले होते. आम्ही जाताच मुलांचा एकच किलकिलाट सुरू झाला. आजोबांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. छोटीशी गोष्ट सांगितली. त्यांची राहण्याची, झोपण्याची जागा सुव्यवस्थित होती. गाडीच्या बर्थ सारखे झोपण्यासाठी बर्थ होते. मला खूप आश्चर्य वाटले. मुले स्वत:च स्वत:ची कामे करत होती.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 15

प्रश्न 2.
घटना व परिणाम लिहा.
उत्तरः

घटना परिणाम
लेखिका जाळीच्या छिद्रातून
बोट घालून कुणाचं डोक  खाजवते
कुणा गळा खाजवते.
1.  मांजर खूश होतात.
2. पोटांतून गुर्रगुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेखिकेला निरोप देताना कोणता गजर झाला?
उत्तरः
लेखिकेला निरोप देताना ‘मियाँव’ चा गजर झाला.

प्रश्न 2.
माजरांना एकटं का वाटत असलं पाहिजे?
उत्तरः
घरी लाड करून घ्यायची सवय असल्याने मांजरांना एकटं वाटत असल पाहिजे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 3.
परत जाताना लेखिकेला मांजराच्या चेहऱ्यावर काय दिसले?
उत्तरः
परत जाताना लेखिकेला मांजराच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसली.

कृती 2: आकलन कृती

कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
“या मांजरांना औषधपाणी माणसांसारखं करतात का रे?”
उत्तरः
लेखिका भरतला म्हणाल्या.

प्रश्न 2.
“त्याचं खाणंपिणं पथ्याचं असतं, बाई.”
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाल्या.

प्रश्न 3.
“शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथ जाऊ या जरा”
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 4.
उत्तरे लिहा.
उत्तरः

  1. हे टोपलीत होते – पिलं
  2. पिलं या रंगाची होती. – पांढरी
  3. कुत्रीचा रंग – तपकिरी
  4. पिलं हा आवाज करीत होते – कुई कुई

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचा, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तरः

  1. निरोप देणे – इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना आम्ही वर्षा अखेर निरोप देतो.
  2. विलक्षण – पाच वर्षांचा मुलगा एकटा विमान प्रवास करतो हे ऐकून मला विलक्षण आश्चर्य वाटले.
  3. खिन्न – क्रिकेट मॅचमध्ये भारत हरला, तेव्हा सगळे खिन्न झाले.

2. खालील अधोरेखित शब्दांसाठी उताऱ्यात आलेला समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
एक भली दांडगी अतिशय सुंदर कुत्री तिथं निजलेली दिसली.
उत्तरः
एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली.

खालील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
त्यांची आई तपकिरी रंगाची आहे.
उत्तरः
त्यांचे बाबा तपकिरी रंगाचे आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 16

‘का?’ ते लिहा.

प्रश्न 1.
एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो.
उत्तरः
पुढचे दोन्ही पंजे जुळवून नमस्कार करण्यासाठी.

प्रश्न 2.
साखळीला सारखे हिसके देणारे कुत्रे.
उत्तरः
सुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 17

कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
‘इथं आणखी कोणते प्राणी येतात रे?’
उत्तरः
लेखिका भरतला म्हणाल्या.

प्रश्न 2.
‘पुष्कळ येतात बाई,
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात …………………..
उत्तरः
आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते.

प्रश्न 2.
भरत मला म्हणतो, …………………
उत्तरः
भरत मला म्हणतो, ‘हात लावा बाई तिला.’

उचित पर्याय निवडून खालील रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. एका कुत्र्याच्या ……………… मोठं गळू झालं आहे. (कानामागं, पाठीवर, मानेवर)
2. एकाचा मोडलेला पाय …………….. घालून ठेवला आहे. (टबमध्ये, प्लॅस्टरमध्ये, वाळूमध्ये)
उत्तरः
1. कानामागं
2. प्लॅस्टरमध्ये

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 18
उत्तरेः

  1. लठ्ठ × रोड
  2. चिडकी × शांत
  3. स्वस्थ × अस्वस्थ
  4. आल्या × गेल्या

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
वचन बदला.

  1. शेळी
  2. मेंढी
  3. ससा
  4. माकड
  5. कुत्रा
  6. मांजर

उत्तर:

  1. शेळ्या
  2. मेंढ्या
  3. ससे
  4. माकडं
  5. कुत्रे
  6. मांजरी

लिंग बदला.

प्रश्न 3.

  1. पाहुणा
  2. मेंढी
  3. कुत्री
  4. बैल

उत्तर:

  1. पाहुणी
  2. मेंढा
  3. कुत्रा
  4. गाय

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 19

प्रश्न 2.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 20

कृती 2: आकलन कृती

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आंधळ्या मांजरीला बाहेर का सोडत नाही?
उत्तरः
तिचा बाहेर निभाव लागणार नाही म्हणून तिला बाहेर सोडत नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
लेखिकेला इस्पितळातून बाहेर आल्यावर काय वाटले?
उत्तरः
एक वेगळच जग पाहिलं असं तिला वाटलं.

रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. जन्मापासून ……… आहे ती.
2. आता मोठी …………………. झाली आहे.
उत्तर:
1. आंधळी
2. मांजरी

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. विश्वास
  2. आंधळे
  3. आत
  4. मोठी

उत्तरेः

  1. अविश्वास
  2. डोळस
  3. बाहेर
  4. लहान, छोटी

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

प्रश्न 2.
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का 21
उत्तरः

  1. ती मांजर आंधळी आहे.
  2. ते पिल्लू दचकले.
  3. कुत्रा इमानदार आहे.
  4. बिचारी मांजर दचकली.
  5. पिलू घाबरले.
  6. आम्ही कुत्र्याला घेऊन फिरून आलो.
  7. मांजरीचा विश्वासाने वावर आहे.
  8. ती आंधळी असली तरी आम्हांला आवडते.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत कां? या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्य शब्दांत मांडा.
उत्तरः
हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत. पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हांला तुम्ही सांभाळले तर पर्यावरण संतुलन राहील. मानवाला लाभच होईल. आम्हांला तुम्ही हवे आहात पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल नं? आम्ही तुम्हांला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत आहेत.

आम्ही हवे आहोत का? Summary in Marathi

पाठपरिचय:

लेखिका ‘शांता शेळके यांनी प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली तेव्हा तेथे त्यांना माणसांच्या प्रेमासाठी आसुसलेले प्राणी दिसले. प्रस्तुत पाठात त्यांनी या प्राण्यांच्या भावभावनांचे हुबेहुब चित्रण करून वाचकांना विचारप्रवृत्त केले आहे.

The writer Shanta Shelke visited veterinary hospital where she met animals who awaited for the love of human beings. In this lesson she has also depicted all emotions so perfectly that it induce us to think for their protection.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का?

शब्दार्थ:

  1. इस्पितळ – दवाखाना – hospital
  2. जनावर – प्राणी – animal
  3. योग – वेळ – chance
  4. इमारत – इमला – building
  5. बहुधा – कदाचित – probably
  6. कार्यालय – कचेरी – office
  7. तसबीर – चित्र – picture
  8. बैल – वृषभ – ox
  9. शेळी – बकरी – goat
  10. दयाबुद्धी – कणव – kind heartedness
  11. करुणा – दया – pity
  12. आवाहन – विनंती – request
  13. गलेलठ्ठ – जाडजूड – fat
  14. बोका – मांजराची नर जात – male cat
  15. मिशा – moustache
  16. कुरवाळणे – माया करणे, गोंजारणे- to fondle
  17. परवानगी – होकार – permission
  18. चुणचुणीत – चपळ – active and smart
  19. विभाग – कक्ष – ward
  20. जाळी – जाळीची चौकट – grille
  21. व्याकुळ – कासावीस – distressed
  22. कबरं – विविधरंगी – variegated colours
  23. कावरंबावरं – गोंधळलेला – bewildered through
  24. चिडणे – रागवणे – to get irritated
  25. ठिपक्या ठिपक्यांचे – गोलसर गोळे – dotted
  26. पंजा – paw
  27. बशा – बशी – saucer
  28. प्रकृती – तब्येत – health
  29. चढउतार – कमीजास्त – rise & fall
  30. तक्ता – chart
  31. अंथरुण – बिछाना – bed
  32. चमकणे – आश्चर्यचकित होतात – to suprise
  33. सावरी – झुडूप – a plant
  34. कापूस – रुई – cotton
  35. मऊमऊ – तलम – soft
  36. शेपट्या – शेपूट – tails
  37. इवल्या – लहान – tiny
  38. लालसर – तांबूस – reddish
  39. पोट – उदर – stomach
  40. त-हेत-हेची – वेगवेगळी – different
  41. लठ्ठ – जाड – fat
  42. रोड – बारीक – thin
  43. चिडकी – रागीट – angry
  44. शांत – संयमी – silent
  45. साखळी – कडी – chain
  46. स्वस्थ – अचल – quiet
  47. सालस – सुशील – decent
  48. सर्वांग – संपूर्ण शरीर – full body
  49. शहारणे – काटा येणे – to quack
  50. सावरणे – मूळ स्थितीत येणे – to recover
  51. थोपटणे – पाठीवरून हात फिरवणे – patting
  52. दचकणे – घाबरणे – to be taken aback
  53. ठार आंधळी – काहीच न दिसणे – total blind
  54. जन्मापासून – जन्मतः – by birth
  55. विश्वासाने – आत्मविश्वास – confidently
  56. वावरणे – भटकणे – to wander
  57. निभाव – टिकणे – survive
  58. गरज – जरुर – need

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Abhalachi Amhi Lekare Class 8 Marathi Chapter 6 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 6 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे Textbook Questions and Answers

1. खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा –
(आ) इच्छा –
(इ) अखंड –
(ई) आकाशप्र –

प्रश्न 1.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा – [ ]
(आ) इच्छा – [ ]
(इ) अखंड – [ ]
(ई) आकाशप्र – [ ]
उत्तर:
(अ) किनारा – [तीर]
(आ) इच्छा – [आस]
(इ) अखंड – [अभंग]
(ई) आकाश – [आभाळ]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

2. कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. 

प्रश्न 1.
कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
(i) इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे

(ii) माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते

(iii) कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढून नेऊ

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

3. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
1. आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
2. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
3. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।
4. माणुसकीचे अभंग नाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
5. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।

4. ‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा 

प्रश्न 1.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा
उत्तर:
कृती 3 : काव्यसौंदर्य मधील (1) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

5. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:

  1. तीरावरती – बसती
  2. नाव – गाव
  3. ठावे – करावे
  4. मार्ग – स्वर्ग
  5. नाते – भाग्यविधाते
  6. पंथ – संत
  7. बाहू – नेऊ
  8. आस – ध्यास

6. खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. 

(अ) आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.

(आ) इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे

प्रश्न अ.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
उत्तर:
वसंत बापट यांनी ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यांमध्ये एकी दिसून येत नाही.

मात्र कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात. आपले आई बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात, धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जातीधर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

प्रश्न आ.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
उत्तर:
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून, करुन, स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते.

कष्टांपुढे, कामापुढे त्यांना दुसरे काही महत्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्गसुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे स्पष्ट होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

भाषेची गंमत :

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (1) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(2) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे Important Additional Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे 1

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा.
उत्तर:

  1. कष्टकऱ्यांची आई – [काळी माती]
  2. अभंग राहणारे नाते – [माणुसकी]
  3. बळकट बाहूंनी हे ओढता येणे शक्य – [जगन्नाथ रथ]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. आभाळाची अम्ही लेकरे …………….. माती आई। (लाल, काळी, तांबडी, ओली)
  2. माणुसकीचे ……………. नाते, आम्हीच अमुचे भाग्यविधाते। (अभंग, अतूट, अखंड, अबाधित)
  3. कोटि कोटि हे ……………. बाहू। (दणकट, बळकट, बलशाली, सामर्थ्यवान)

उत्तर:

  1. काळी
  2. अभंग
  3. बळकट

प्रश्न 4.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा,

  1. श्रमगंगेच्या तीरावरती ………………..
  2. ………………. घाम गाळुनी काम करावे
  3. ……………. आम्हा ध्यास वेगळा नाही।।
  4. मार्ग वेगळा नाही आम्हा …………………

उत्तर:

  1. श्रमगंगेच्या तीरा वरती कष्टकऱ्यांची अमुची वसती
  2. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळुनी काम करावे
  3. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।
  4. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे 2

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
कष्टकऱ्यांची वस्ती कुठे आहे?
उत्तर:
कष्टकऱ्यांची वस्ती श्रमगंगेच्या तीरावरती आहे.

प्रश्न ii.
कष्टकऱ्यांना कोणते इमान ठाऊक आहे?
उत्तरः
कष्टकऱ्यांना घाम गाळून काम करत राहणे हे एकच इमान ठाऊक आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

प्रश्न iii.
कष्टकरी आपण कोणाची लेकरे असल्याचे सांगतात?
उत्तर:
आम्ही सारे कष्टकरी आभाळाची लेकरे असून काळी माती आपली आई असल्याचे कष्टकरी सांगतात.

प्रश्न iv.
कष्टकरी आपल्या बाहूंवरील विश्वास कसा दर्शवतात?
उत्तरः
कष्टकरी आपले बाहू जगन्नाथ रथ ओढून नेण्याइतके बळकट असल्याचे सांगत त्यांवर विश्वास दर्शवतात.

प्रश्न 3.
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नाव (अ) संत
2. मार्ग (ब) भाग्यविधाते
3. पंथ (क) गाव
4. आस (ड) स्वर्ग
5. नाते (ई) ध्यास

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नाव (क) गाव
2. मार्ग (ड) स्वर्ग
3. पंथ (अ) संत
4. आस (ई) ध्यास
5. नाते (ब) भाग्यविधाते

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

कृती 3 : काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
जात, धर्म, पंथाने विभागल्या गेलेल्या माणसाला स्वत:च्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी कोणा-ना-कोणाची गरज पडत असते. मात्र निसर्गाची लेकरे असलेल्या कष्टकऱ्यांना मात्र तशी कोणाचीच गरज पडत नाही. सर्व कष्टकरी सगळ्यांनी एकच जात, धर्म, पंथ मानतात व माणुसकीचे कधीही न दुभंगणारे नाते जपतात. म्हणूनच स्वत:ची प्रगती साधण्यासाठी, भाग्य उजळण्यासाठी त्यांना कोणाचीच गरज पडत नाही.

प्रश्न 2.
‘मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
कष्टकऱ्यांमध्ये असलेले माणुसकीचे अभंग नाते विशद करताना कवी त्यांच्यातील एकजूटही सहज, सोप्या भाषेत नमूद करतात. स्वतःला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी नाव, गाव, जात, धर्म, पंथ सर्व एकच आहे. त्यांचा मार्गही एकच अर्थात कष्टाचा मार्ग आहे.

स्वर्गप्राप्ती ही अंतिम इच्छा सामान्यतः माणूस ठेवत असताना कष्टकऱ्यांसाठी अंतिम ध्येय, उद्दिष्ट हे एकच आहे. कष्टकऱ्यांच्या उदात्त विचारांचे सहजसुंदर दर्शन प्रस्तुत काव्यपंक्तीतून दिसून येते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1.
दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तर:
1. कवी/कवयित्री – वसंत बापट
3. कवितचा रचनाप्रकार – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता यमक या रचनाप्रकारात लिहलिी आहे.
3. कवितेचा काव्यसंग्रह – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता शिंग फुकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
4. कवितेचा विषय – मानवतावादी उदात्त विचार व कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते या कवितेतून स्पष्ट केले आहे.
5. कवितेतून व्यक्त होणारा भाव – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून ‘शांत’ हा स्थायी भाव दिसून येतो.

6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – माणुसकीच्या अभंग नात्याशी सहज जोडणारी कविता म्हणजे ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता होय. या कवितेतून शांतरस दिसून येतो. कवीने अतिशय सोप्यासहज भाषाशैलीतून मानवतावादी विचार मांडले आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्ट हीच एक जात, पंथ, मार्ग, धर्म, ध्यास असल्याचे सांगून सर्व एकाच निसर्गाची लेकरे असल्याचा उदात्त विचार अधोरेखित केला आहे. यमक

7. साधल्यामुळे शाब्दिक सौंदर्य निर्माण झाले आहे. मध्यवर्ती कल्पना – सर्व कष्टकरी निसर्गाची, आभाळाची लेकरे असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद्रभाव नसतो. स्वकष्टावर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी जात, धर्म, नाव, गाव हे एकच असते. कष्टाचा मार्ग व अंतिम ध्येय ऐकच असते. आपल्या बाहूंवर, कष्टांवर विश्वास असणाऱ्या कष्टकऱ्यांची इच्छा व ध्यास एकच असतो आणि म्हणूनच कष्टकऱ्यांमधील हे नाते अभंग रहाते.

8. कवितेतून व्यक्त होणारा विचार – वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेत मानवतावाद व माणुसकीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी ‘माणुसकी’ हा एकच धर्म आहे. नाव, गाव, पंथ-संत एकच मानणाऱ्या कष्टकऱ्यांचा स्वत:च्या बाहूंवरील विश्वास त्यांच्यातील अभंग नात्याची ग्वाही देतो. माणुसकीचे अभंग, अतूट नाते व त्यातून निर्माण होणारा विश्वास या कवितेतून दिसून येतो.

9. कवितेतील आवडलेली ओळ –
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।

10. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
वसंत बापट यांनी आपल्या कवितेतून समाजात आवश्यक असणाऱ्या माणुसकीच्या कवितेतून समाजात आवश्यक असणाऱ्या माणुसकीच्या नात्याचे अनन्यसाधारण महत्त्व मांडले आहे. जात, धर्म, पंथ, संत वेगवेगळे मानून भेदभाव निर्माण करणाऱ्या माणसांपेक्षा ‘माणुसकी’ हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांचे वेगळेपण कष्टकरी समाजात मानवतावाद पसरवण्याची आस उरी बाळगतात. माणुसकी या अभंग नात्याचा पाया भक्कम करणारी ही कविता मनाला उभारी देते आणि म्हणूनच मनाला भावते.

11. कवितेतून मिळणारा संदेश – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेत मानवतावादी उदात्त विचार मांडले आहेत. आभाळाची निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहात नाही. स्वकष्टावर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी माणुसकीचे नाते अनमोल ठरते. स्वत:च्या कामावर निष्ठा ठेवून अविरत मेहनत घेऊन स्वर्गसुख प्राप्त करण्याचा ध्यास घेतल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचा संदेश आपल्याला प्रस्तुत कवितेतून मिळतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
उत्तरः
वसंत बापट यांनी ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यांमध्ये एकी दिसून येत नाही. मात्र कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात.

आपले आई बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात, धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जातीधर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात. आभाळ, काळी माती अशा शब्दांतून निसर्ग डोळ्यांसमोर उभा करण्याची किमया कवीने साधली आहे. कवीची, भाषाशैली सहजसोपी असून लयबद्ध पंक्तीतून ती वाचकांच्या सहज लक्षात येते.

प्रश्न 2.
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
उत्तरः
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेमधील या पंक्ती असून वसंत बापट यांनी त्यातून कष्टकऱ्यांसाठी श्रमाचे असलेले महत्त्व विशद केले आहे. नाव, गाव एक मानणाऱ्या कष्टकऱ्यांची एकी यातून पहावयास मिळते. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी श्रम हे गंगेसारखे पवित्र व महत्त्वाचे आहे.

कष्ट करून आपले जीवन घडवणारे कष्टकरीश्रमरूपी गंगेच्या तीरावरती कायमस्वरूपी आपली वस्ती असल्याचे सांगतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी गाव वेगवेगळे ठरत नाही. आपण सारे एकच आहोत म्हणूनच त्यांना आपल्या नावातील वेगळेपणही मान्य नाही. कष्टकऱ्यांची एकी स्पष्ट करताना तीरावरती, वसती, नाव, गाव असे शब्द वापरून कवीने यमक साधले आहे. त्यामुळे भाषिक सौंदर्यात भर पडली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

प्रश्न 3.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।
उत्तरः
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून, करून, स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते.

कष्टांपुढे, कामापुढे त्यांना दुसरे काही महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्गसुख सगळयांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे स्पष्ट होते. सतत काम करण्याचे कष्टकऱ्यांचे एक इमान ही कल्पना काव्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. शब्दांनी साधलेल्या यमकातून कष्टकऱ्यांचा दृढनिश्चय मनाला भिडतो. ध्येयपूर्तीची संकल्पनाही भाषिक सौंदर्य वाढवते.

प्रश्न 4.
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
उत्तरः
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या वसंत बापट लिखित कवितेतील वरील ओळी असून कधीही न दुभंगणाऱ्या अशा माणुसकीच्या नात्याचे व त्यामुळे होणाऱ्या फायद्याचे महत्त्व कवीने प्रस्तुत ओळीतून विशद केले आहे. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांना आपापसातील नात्याला कोणतेही नाव देणे मान्य नाही. त्या सर्वांना एकच नाते ठाऊक आहे, ते म्हणजे माणुसकीचे नाते. जे सदैव अभंग, अतूट राहणारे आहे. अशा नात्यामुळेच व कष्ट करण्याच्या जिद्दीमुळे त्यांना स्वत:चे भाग्य बदलण्यासाठी कोणाची गरज नाही.

ते स्वत:लाच आपले भाग्यविधाते मानतात. माणुसकीचे नाते श्रेष्ठ मानल्यामुळे ते कोणत्याही पंथाला, संताला, संप्रदायाला वा त्यांच्या विचारांना मानत नाही. त्यांच्यासाठी ‘कष्ट’ हा एकच पंथ आहे तर ‘माणुसकी’ हा एकच संत आहे. कधीही विचार न केलेल्या नात्यातून कवीने अत्यंत खुबीने माणुसकीचे व कष्टाचे समर्थन केले आहे. अत्यंत साध्या पण अर्थपूर्ण भाषाशैलीतून कवीने उत्कृष्ट संदेश दिला आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

प्रश्न 5.
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।
उत्तरः
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती व आपल्या बाजूंवर असणारा दृढ विश्वास हे कष्टकऱ्यांचे गुणविशेष वरील काव्यपंक्तीमधून दिसून येतात. कष्टाला आपले इमान मानणाऱ्या, स्वत:चे भाग्य स्वत: लिहिण्याची हिंमत ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांना आपल्या बाहूंवर प्रचंड विश्वास आहे.

सगळ्यांना समान मानणाऱ्या कष्टकऱ्यांचे अनेक हात एकत्र आल्यावर जगन्नाथ रथ ओढून नेण्याची क्षमताही त्यांच्यात असल्याचे ते आत्मविश्वासाने सांगतात. कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची त्यांची आस व ध्येयपूर्तीचा ध्यास त्या सगळ्या कष्टकऱ्यांसाठी एकच आहे.

उपरोक्त पंक्तीतून स्वत:वर असणाऱ्या विश्वासाचे व एकीचे, कार्यपूर्तीसाठी असणारे महत्त्व दाखवून दिल्याने आशय संपन्नता प्राप्त झाली आहे. आस, ध्यास अशा आत्मविश्वासपूर्ण शब्दांतून कवितेत आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

आभाळाची अम्ही लेकरे Summary in Marathi

काव्यपरिचय :

वसंत बापट लिखित प्रस्तुत कविता मानवतावादी उदात्त विचारांचे दर्शन घडवते. निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. आपल्या कष्टांवर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अभंग राहते.

The poet Vasant Bapat has described humanitarian noble thoughts through his poem ‘Abhalachi Amhi Lekare.’ All labourers are children of nature and they do not discriminate amongst themselves. They believe in hard work and share a common bond of humanity.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

भावार्थ :

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।

कष्टकऱ्यांमधील नाते स्पष्ट करताना कवी वसंत बापट सांगतात की, आम्ही सर्व निसर्गाची, आभाळाची लेकरे असून काळी माती आमुची आई आहे. म्हणूनच आमची जात अथवा धर्म वेगवेगळा नसून तो एकच आहे.

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही ।।

गंगेइतकीच पवित्रता कष्टकऱ्यांच्या श्रमामध्ये असल्याने कवी कष्टकऱ्यांची वस्ती ही श्रमरूपी गंगेच्या तीरावरती असल्याचे सांगतात. या सर्व कष्टकऱ्यांचे गावच नाही तर नावही | वेगळे नसून एकच असल्याचेही ते नमूद करतात.

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही ।।

स्वत:च्या कामावर निष्ठा असणाऱ्या कष्टकऱ्यांनी घाम गाळून, अविरत मेहनत घेऊन काम करत राहणे ही एकच गोष्ट माहीत आहे. त्यांच्यासाठी ते स्वर्गसुख आहे सर्व कष्टकरी आपला मार्ग व आपले ध्येय अर्थात स्वर्ग एकच मानतात.

माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही ।।

सर्वांना एकसमान मानणाऱ्या सगळ्या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे अखंड, कधीही न दुभंगणारे नाते आहे. आपल्या कष्टांवर विश्वास असणाऱ्या त्यांना आपणच आपले भाग्यविधाते असल्याची खात्री आहे. ‘माणुसकी’ हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी पंथ वा संत वेगळा नाही.

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओळुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ।।

कष्टकऱ्यांना स्वत:च्या बाहुंवर विश्वास आहे. त्यांचे खांदे इतके बळकट आहेत की ते जगन्नाथ रथ एकत्र ओढून नेऊ शकतात याची त्यांना खात्री आहे. मानवतावाद पसरवणाऱ्या या कष्टकऱ्यांची इच्छा, आस एक आहे व ध्यासही एक आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

शब्दार्थ :

  1. आभाळ – आकाश, गगन – sky
  2. लेकरे – मुले – children
  3. आई – माता, जननी – mother
  4. श्रम – कष्ट – hardship
  5. तीर – किनारा – shore, bank
  6. वसती – वस्ती, राहण्याचे ठिकाण – habitation
  7. इमान – निष्ठा – constant, loyalty
  8. ठावे – माहीत असणे – to know
  9. घाम – स्वेद – sweat
  10. मार्ग – दिशा, रस्ता – way, direction
  11. स्वर्ग – heaven
  12. माणुसकी – मानवता, सौजन्य- humanity
  13. अभंग – अखंड – unbroken/unbreakable
  14. संत – साधू – saint
  15. पंथ – संप्रदाय – creed
  16. बाहू – हात – arms
  17. आस – इच्छा – desire, wish

वाक्प्रचार :

  1. घाम गाळणे – कष्ट करणे
  2. ठाव असणे – माहीत असणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

टिप :

जगन्नाथ रथ – ओडिसा येथील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर हे भगवान कृष्णाच्या वैष्णव पंथाचे मंदिर आहे. भगवान कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. या मंदिराचा वार्षिक रथप्रवास उत्सव प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देवगिरीच्या तीन मुख्य देवता, भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र व सुभद्रा हे तीन वेगवेगळ्या भव्य व सुसज्ज रथांतून बाहेर पडतात व शहराच्या प्रवासासाठी जातात. ओडिसा येथील सर्वात महत्त्वाचा सणही ‘रथयात्रा’ मानतात.

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Santvani Class 8 Marathi Chapter 13 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 13 संतवाणी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 13 संतवाणी Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 13 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 13 संतवाणी Textbook Questions and Answers

(अ)

ऐका. वाचा. म्हणा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 1
सकलसंतगाथा खंड पहिला: संत सेना अभंग
अभंग क्रमांक 15
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1।।

उपरोक्त पंक्ती संत सेना महाराजांच्या ‘संतवाणी’ अभंगातील आहे. संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचा दिवस सोन्यासारखा झाल्याप्रमाणे त्यांना वाटत आहे. मौल्यवान अशा सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही मौल्यवान झाल्याचा त्यांचा भाव आहे. ‘सोन्याचे’ रुपक देऊन कवितेत सौंदर्य निर्माण झाले आहे.

जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।2।।

संत सेना महाराज आपल्या अभंगात सुखाची भावना व्यक्त करताना माहेरची उपमा देतात. संत दर्शनाने त्यांना माहेर भेटल्याचा आनंद होत आहे. सासरी गेलेली मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते तसेच संत भेटल्याने माहेर भेटले असा भाव त्यांनी व्यक्त केला आहे. सुखाला माहेरची उपमा देऊन काव्यसौंदर्य खुलवले आहे.

अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।

संसारातील कामांमध्ये विविध अडचणी, थकवा, चिंता काळजी असते. पण सेना महाराजांना जेव्हा संत चरण दिसले तेव्हा त्यांच्या सर्व काळज्या, शीण निघून गेला. त्यांना सुख प्राप्त झाले. संतांच्या सहवासात त्यांना
समाधान मिळाले.

आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।

संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना कदाचित खऱ्या दिवाळी व दसऱ्याबद्दल विशेष कौतुक नसेल ही पण जेव्हा संत आपल्या घरी येतात, त्यांचे चरण आपल्या घरी लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थी त्यांच्यासाठी दसरा किंवा दिवाळी असते. तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा असतो. त्यांच्या सान्निध्यात सेना महाराजांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. दसरा व दिवाळीचे रुपक घेऊन अभंगाला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘दसरा – घरा’ या शब्दांचे सुंदर यमक कवीने साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

संत सेना महाराज संतभेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, “संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संतचरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीण नाहीसा झाला असून घरी दिवाळी, दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.”

(आ)

ऐका. वाचा. म्हणा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 2
सकलसंतगाथा खंड पहिला: संत चोखामेळा अभंग
अभंग क्रमांक 37
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।

संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ या अभंगात, चंदनाच्या झाडाची संगत लाभली तर बोरी, बाभळीसारखी सामान्य झाडेही सुगंधित होतात. लहान-सहान झुडुपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. तसेच संतांच्या सहवासाने सामान्य जनांनाही लाभ होतो. असा आशय नमूद करून कवितेचे काव्यसौंदर्य खुलविले आहे. संतांना चंदनाची उपमा दिली आहे.

संतांचिया संगें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।2।।

चोखामेळा यांनी आपल्या अभंगात खात्रीने पटवून दिले आहे की, अभाविक जनांना संत सहवास लाभला की ते संतच होऊन जातात एवढी संतांची महती आहे. ते त्यांना आपल्यासारखेच करतात. त्यांच्यातील दुर्गुण काढून टाकतात. अत्यंत मोजक्या शब्दांत संत चोखामेळा यांनी मोठा आशय स्पष्ट केला आहे. कवितेचे भावसौंदर्य या उदाहरणाने आणखी खुलले आहे.

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा। नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।3।।

संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात, जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास घ्यावा. आपल्या वृत्तीत पालट करावा. संतांच्या सहवासाने हे शक्य होते. पण असे न केल्यास आपला जन्म वाया जातो व भूमीस भार झाल्यासारखे होते. म्हणून मानव जन्माचे सार्थक करून घेणे योग्य. चोखामेळांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून कवितेचे आशयसौंदर्य खुलविले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

संत चोखामेळा म्हणतात, “ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे व झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल.”

प्रश्न 2.
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीतील शब्दांचा उपयोग करुन अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 3
उत्तरः

  1. तुषार गुणी आहे.
  2. तो पिवळा चेंडू खेळतो.
  3. तुषारला मिठाई आवडते.
  4. मेथीची भाजी ताजी आहे.
  5. तो मोठा व्यक्ती आहे.
  6. तुषारला लाडू आवडतात.
  7. ताजी भाजी घे.
  8. तो खेळकर आहे.
  9. ती वस्तू सुंदर आहे.
  10. तो ताजी भाजी खातो.
  11. तो मोठा चेंडू रंगीत आहे.
  12. हिरवी, ताजी मेथी खावी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

हे नेहमी लक्षत ठेवा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 4

जीव धोक्यात घालू नका,
दरीत डोकावून पाहू नका.

भर रस्त्यात गाडी थांबवू नका,
इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका.

प्रश्न 1.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 5

Class 8 Marathi Chapter 13 संतवाणी Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 6

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा.
उत्तरः

  1. असा दिवस आहे – [सोनियाचा]
  2. दृष्टीस दिसले – [संत]
  3. सुख झाले – [जीवा]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत सेना महाराजांचा शीण कशामुळे गेला?
उत्तरः
संतचरण पाहून संत सेना महाराजांचा शीण गेला.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 7

प्रश्न 2.
जोया जुळवा.

1. सोनियाचा (अ) संतांस
2. देखिलें (आ) माहेर
3. भेटले (इ) दिवस
4. निरसला (ई) सुख
5. जीवा (उ) शीण

उत्तरः

1. सोनियाचा (इ) दिवस
2. देखिलें (अ) संतांस
3. भेटले (आ) माहेर
4. निरसला (उ) शीण
5. जीवा (ई) सुख

प्रश्न 2.
रिकाम्या जागा पूर्ण करा.

  1. दृष्टी देखिलें ……………..
  2. माझे …………….. भेटले.
  3. ………..”म्हणे आले घरा.

उत्तर:

  1. संतास
  2. माहेर
  3. सेना.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

कृती 3: काव्यसौंदर्य.

खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।
उत्तरः
संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची
तुलना माहेराशी करतात. संतांना माहेर हेरुपक देऊन संत हेच माहेरम्हणूनआनंददायीभावतेव्यक्तकरतात.सासरीगेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे व संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.
माहेर भेटले या रुपकाने काव्यसौंदर्य खुलवले आहे. झाले-भेटले या शब्दांचे यमक साधले गेले आहे.

प्रश्न 2.
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।
उत्तर:
संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना खऱ्या दिवाळी व दसरा सणांबद्दल विशेष उत्सुकता नाही. पप संत आपल्या घरी येतात तोच दिवस त्यांना विशेष आनंदाचा म्हणजे दिवाळी व दसऱ्यासारखा वाटतो. त्या दिवशी त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. दसरा व घरा या शब्दांचे यमक साधले आहे. संतांचे आगमन हाच दिवाळी दसरा असा उच्च भावार्थ सांगून कवितेचे भावसौंदर्य खुलवले आहे.

प्रश्न 3.
तुम्हांला माहीत असलेल्या संतांविषयी तुमच्या शब्दांत विचार मांडा.
उत्तरः
मी सुट्टीत संतश्रीरामदास’ यांचे छोटेसे चरित्रवाचले. लहानपणी पोहण्यात पटाईत असलेला, झाडावरून उड्या मारणारा नारायण, मठिपणी तपश्चर्या करून सत रामदास होतात. समाजाला प्रयत्नांची कास धरायला शिकवतात. अक्षर कसे काढावे?, विदयार्थ्यांनी पाठांतर कसे करावे? हेही सांगतात. आळस करू नये असे बजावतात.

नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव पण त्यांनी ‘दास’ किंवा ‘रामदास’ या नावाने उदंड लेखन केले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम या त्यांच्या मुख्य रचना. विदयार्थ्यांनी मनाच्या श्लोकाचे पाठांतर केल्यास त्यांच्यावर सुविचारांचा प्रभाव राहील यात शंका नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत सेना महाराज
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिला संतसेना अभंग क्र. 14
4. कवितेचा विषय – संतांच्या सान्निध्यान मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे.
5. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) – शांत रसाचा भाव कवितेतून व्यक्त होतो.

6. कवी/कवयित्राची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साध्या, सोप्या शब्दांद्वारे मोठा आशय व्यक्त करण्याचे कसब सुंदर आहे. ‘दसरा-घरा, शीण-चरण’ यांचे यमक साधलल्याने नादमयता निर्माण झाली आहे.

7. मध्यवर्ती कल्पना – संतसेना महाराज संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करतात. दिवाळी-दसरा प्रत्यक्ष नसला तरी संतांची जेव्हा भेंट होते ते क्षणच दिवाळी दसऱ्या समान आनंददायी असतात. कवितेतून व्यक्त होणारा विचार – माहेर भेटणे वा दिवाळी दसरा साजरा करणे या जशा आनंदाच्या गोष्टी आहेत तशाच संत सज्जनांचा सहवास मिळणे हाही तेवढाच आनंददायी प्रवास आहे असा विचार कवितेतून व्यक्त होतो.

8. कवितेतील आवडलेली ओळ – आजि सोनियाचा दिवस दृष्टीं देखिलें संतांस. (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
मला ही कविता आवडली; कारण शांतरसाची निर्मिती झाल्याचे कवितेतून जाणवते. या कवितेतून संत सज्जनांच्या सहवासाची महती कळते.

9. कवितेतून मिळणारा संदेश – संत सज्जनांच्या सहवासाने अवर्णनीय आनंद मिळतो. सर्व शीण, थकवा निघून जातो. म्हणून संत-सज्जनांची संगत धरावी व चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याव्यात.

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 8

प्रश्न 2.
एक/दोन शब्दात उत्तरे दया.

  1. चंदनाच्या स्पर्शाने सुगंधित होते – [………….] [……………]
  2. हे जन संत दर्शनाने पावन होतात – [……………]

उत्तर:

  1. हेकळी, टाकळी
  2. अभाविक

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

कृती 2: आकलन कृती

एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न 1.
कोणाच्या सहवासात परमार्थ साधावा?
उत्तरः
संतांच्या सहवासात परमार्थ साधावा.

प्रश्न 2.
अभंगात कोणत्या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे?
उत्तरः
अभंगात ‘चंदन’ या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे.

प्रश्न 3.
खालील पंक्ती पूर्ण करा.

  1. ……….. संगे बोरीया बाभळी।
  2. तयाच्या ………………… तेचि होती।
  3. नाही तरी ……………….. वाहावा खरा ऐसा।

उत्तरः

  1. चंदनाच्या
  2. दर्शने
  3. भार

कृती 3: काव्यसौंदर्य

खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।
उत्तरः
उपरोक्त पंक्ती संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ मधून घेतली आहे. संतांच्या सान्निध्याने सामान्य जनांमध्ये कसे असामान्यत्व येते हे चोखामेळा यांनी उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे.

चंदनाच्या झाडाजवळ बोरी, बाभळीची काटेरी झाडे असतात. लहान-सहान झुडपेही असतात, पण चंदनाच्या सुगंधाने तीही प्रभावित होतात. त्यांनाही तोच सुगंध प्राप्त होतो. संतांना चंदनाची उपमा दिल्याने कवितेस काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. सत्संगतीने सामान्यांना ही लाभ होतो व त्यांच्यात चांगला बदल होतो हे सांगितले आहे. ‘बाभळी, हेकळी, टाकळी’ या शब्दांनी अभंगात अनुप्रास साधला गेला आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 2.
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा |
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।
उत्तरः
संत चोखामेळा यांनी ‘संतवाणी (आ)’ या अभंगात संत सान्निध्याचा सुपरिणाम विविध उदाहरणांनी दर्शवला आहे. जसे चंदनाच्या झाडाजवळची लहान मोठी झाडे सुगंधित होतात तसेच संतांच्या सहवासाने अभाविक जन संतांच्या समानच होतात. म्हणून प्रत्येकाने जन्माला येऊन खरा परमार्थ जाणला पाहिजे नाहितर भूमीला भार झाल्यासारखे होईल. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये. संत सहवासाने जीवन पावन करावे असा आशय चोखामेळा यांनी प्रदर्शित केला आहे.

प्रश्न 3.
‘मैत्री कशी असावी?’ या विषयीचे विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
मैत्रीशिवाय आनंद मिळत नाही. पण मैत्रीत भांडणे, द्वेष, मारामाऱ्या होऊ नयेत. चातक जसे पावसाच्या पाण्यासाठी वाट पहात असतो त्याशिवाय तो दुसरे पाणी पीतच नाही तशीच मैत्री हवी. चकोर फक्त चंद्राचे किरण पितो. मग चंद्र वेळेवर उगवला नाही तरी तो रागवत नाही. मैत्री तोडत नाही. मैत्री गुणीजनांशी करावी. चंदनाच्या झाडाने बाकीची झाडेही सुगंधीत होतात तशीच मैत्री करावी. मैत्रीने गुण जोडता यायला हवे.

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत चोखामळा
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिलाः संत चोखामेळा अभंग क्र. ६७
4. कवितेचा विषय – संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते हे चंदन, बोरी व बाभळी यांच्या उदाहणांद्वारे पटवून दिले आहे.

5. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साधी, सोपी, सरळ शब्दरचना. कवीतेत हेकळी, टाकळी, बाभळी या शब्दांची पुनुरुक्ती असल्याने नादमयता आली आहे. अत्यंत कमी शब्दात मोठा अर्थ सांगण्याचे कौशल्य जाणवते.

6. मध्यवर्ती कल्पना – संत चोखामळा यांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून खात्रीने पटवून दिले आहे की जशा सहवाससात आपण राहतो तसेच आपण होतो. संत सहवासाने आपले दुर्गुण कमी होतात. सुसंगती ने समान्यांना लाभ होऊन त्यांच्यात चांगला बदल होतो.

7. कवितेतून व्यक्त होणारा विचार – जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास ध्यावा. आपल्या वृत्तीत बदल करावा. मानव जन्माचे सार्थक करून ध्यावे.

8. कवितेतील आवडेळली ओळ – चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – मला ही कविता खूप आवडली; कारण ती तर्कदृष्ट्या पटणारी आहे. चंदनाची संगत लाभली तर त्याचा सुवास लागतोच. बाभळी ही सुगंधित होते. यावरून आपल्याला सत्संगाची महती कळते.

10. कवितेतून मिळणारा संदेश – गुणिजनांच्या सहवासात रहावे. आपल्या दुर्गुणांना दूर करावे. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकाव्यात. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये.

संतवाणी Summary in Marathi

काव्यपरिचय:

संत सेना महाराजांनी प्रस्तुत अभंगात संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन केले आहे. Saint Sena Maharaj elaborated a joy of having the company of Saints this poem.

प्रस्तुत अभंगात संत चोखामेळा यांनी संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते असे सोदाहरण पटवून दिले आहे. तसेच संत सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन त्यांनी या अभंगात केले आहे.

In this abhang Saint Chokhamela a describes with many examples that living in the company of saints, one can be virtuous and can attain happiness.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1॥

संत सेना महाराजांनी या अभंगात संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा झाला असे वर्णन केले आहे. त्यांच्या दर्शनाने त्यांना अपार आनंद झाला आहे.

जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।॥2॥

सासरी गेलेल्या मुलीला माहेरी जसा आनंद होतो. माहेरची माणसं पाहून ती अत्यंत प्रसन्न होते तसेच सेना महाराजांना संतांना पाहून झाले आहे. जणू काही आपले माहेरच आपल्याला भेटले आहे असे त्यांना वाटत आहे, तितकाच आनंद त्यांना झाला आहे.

अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।

संतांचे दर्शन घेऊन संसारातील सगळा थकवा, दु:ख, काळजी निघून गेली. संतांच्या चरणाचे दर्शन झाल्यावर सगळा शीण नाहीसा झाला, असे संत सेना महाराज म्हणतात.

आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।

दिवाळी आणि दसरा हे आनंदाचे सण. तेथे कशाची कमतरता नसते. सर्व आनंदी असतात. सगळं वातावरणच प्रसन्न, उत्साहाचे असते. जेव्हा संत माझ्या घरी येतात तेव्हा माझ्या घरी जणू दिवाळी आणि दसरा असतो. मला अपार सुख मिळते. सर्वत्र चैतन्य पसरते, असे संत सेना महाराज सांगतात.

चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।१।।

संत चोखामेळा यांनी या अभंगात संतांच्या सान्निध्यात राहिल्यास सामान्यांमध्येही असामान्य फरक होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या बोरी बाभळीच्या झाडांना, वाकड्या तिकड्या किंवा लहानश्या झुडूपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो.

संतांचिया संमें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।२।।

संतांच्या सहवासात जर अभाविक, नास्तिक लोक राहिले | तर त्यांच्या दर्शनानेही ते सज्जन, आस्तिक व भाविक होतात.

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।

चोखामेळा म्हणतात, जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल. संतांच्या सान्निध्याने आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे.

शब्दार्थ:

  1. आजि – आज – today
  2. सोनियाचा – सोन्यासारखा, सोन्याचा – like a gold, golden
  3. दृष्टी – डोळे – eyes
  4. देखिले – पाहिले – seen
  5. अवघा – संपूर्ण – all
  6. निरसला – दूर होणे, नाहीसे होणे – to put away
  7. माहेर – विवाह झालेल्या मुलीच्या आईवडीलांचे घर – the place of the parents of a married girl
  8. शीण – थकवा – fatigue
  9. संग – सोबत – in company, of
  10. बाभळी – काटेरी झाड – babul tree
  11. हेकळी – वाकडी – crooked
  12. टाकळी – झुडुप – shrub
  13. चंदन – चंदनाचे सुगंधी झाड- sandalwood
  14. अभाविक – नास्तिक – atheist
  15. जन – लोक – people
  16. भार – ओझे – burden

टिपा:

1. संत: संत म्हणजे महात्मा. प्रपंचात राहूनही संतांनी परमार्थ साधला. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांनी मराठी भाषेला वाड्:मयाचा मोठा वारसा दिला आहे. महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले.

2. संत सेना महाराज: संत सेना महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. त्यांच्या अभंगात देव आणि भक्ती यांचे नाते दिसून येते. सेना महाराजांनी अभंगातून भाक्तिरसाची उपासना केलेली आढळते.

3. अभंग: अभंग हा प्राचीन मराठी साहित्यातील एक काव्यप्रकार आहे. संतमेळ्यांचे विठ्ठलभक्तीपर काव्य अभंग स्वरूपात आहे. आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी स ंप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा उपयोग केला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

म्हण:

संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Uttam Lakshan Class 10 Marathi Chapter 4 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Kumarbharti Chapter 4 उत्तमलक्षण Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 4 Question Answer

Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 4 उत्तमलक्षण Textbook Questions and Answers

प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती १ : (आकलन)

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा :
(i)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 1
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 2

(ii)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 3
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 4

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 5
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 6

प्रश्न 3.
पुढील गोष्टींबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायला सांगतात. (मार्च ‘१९)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 7
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 8

कृती २ : (आकलन)

प्रश्न 1.
शब्दजाल पूर्ण करा :
(i)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 9
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 10

(ii)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 11
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 12
(iii)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 13
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 14

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

प्रश्न 2.
पुढील व्यक्तींशी कसे वागावे, असे संत रामदास म्हणतात :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 15
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 16

प्रश्न 3.
पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी, ते लिहा :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 17
उत्तर :
(i) तोंडाळासी भांडू नये.
(ii) संतसंग खंडू नये.
(iii) सत्यमार्ग सोडू नये.

प्रश्न 4.
असत्य विधान ओळखा :
(i) संतसंग सोडू नये.
(ii) अपकार घेऊ नये.
(iii) व्यापकपण सांडू नये.
(iv) खोटेपणाच्या पंथाला जाऊ नये.
उत्तर :
असत्य विधान – अपकार घेऊ नये.

प्रश्न 5.
अचूक विधान ओळखा : (मार्च ‘१९)
(i) पैज, होड लावावी.
(ii) सत्याची वाट धरावी.
(iii) पापद्रव्य सहज जोडावे.
(iv) नेहमी अभिमानाने वागावे.
उत्तर :
अचूक विधान – सत्याची वाट धरावी.

प्रश्न 6.
तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
उत्तर :
नमुना उत्तर :
गुण : (i) मी रोज व्यायाम करतो.
(ii) मी खोटे बोलत नाही.
(iii) मी आईला कामात मदत करतो.

दोष : (i) मला चटकन राग येतो.
(ii) मी ताटात अन्न टाकतो.
(iii) माझे अक्षर चांगले नाही.

कृती ३ : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
‘सभेमध्ये लाजों नये। बाष्कळपणे बोलों नये।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर :
‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.

प्रश्न 2.
‘आळसें सुख मानूं नये,’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
‘उत्तमलक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.

‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो!’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 4 उत्तमलक्षण Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा :

प्रश्न 1.
कविता-उत्तमलक्षण.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 20
उत्तर : उत्तमलक्षण.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.
(२) कवितेचा रचनाप्रकार : ओवी.
(३) कवितेचा काव्यसंग्रह : श्रीदासबोध.
(४) कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव : आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास.

(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये : प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. साहजिक कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.

(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना : प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे व काय टाळावे यांचे सुस्पष्ट शब्दांत निवेदन केले आहे. समाज नीतिमान व कर्तबगार व्हावा, ही तळमळ या पदयपाठातून स्पष्टपणे जाणवते.

(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार : प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी, व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे. इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.

(९) कवितेतील आवडलेलो ओळ :
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।।
विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ।।

(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. एकतर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे सांगितले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.

(११) कवितेतून मिलणाग संदेश : प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो.

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (इ) साठी…

प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :

प्रश्न 1.
‘जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’ (मार्च ‘१९)
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.

काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात – लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर . करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

प्रश्न 2.
‘अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।’ (मार्च ‘१९)
उत्तर :
आशयसौंदर्य : संत रामदासांनी ‘उत्तमलक्षण’ या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.

काव्यसौंदर्य : संत रामदास म्हणतात – लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती:

१. समास :

प्रश्न 1.
पुढील तक्ता पूर्ण करा : (ठळक अक्षरांत उत्तरे दिली आहेत.)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 21

२. अलंकार :
पुढील ओळी वाचून तक्ता पूर्ण करा :
प्रश्न 1.
‘ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी।।’

प्रश्न 2.
‘नयनकमल’ हे उघडित हलके जागी हो जानकी.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 22
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 23

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य)

३. वृत्त :
पुढील ओळींचे लगक्रम लिहा :

प्रश्न 1.
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 24

प्रश्न 2.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे.
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 4 उत्तमलक्षण (संतकाव्य) 25

उत्तमलक्षण Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :
उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात – श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. ।।१।।

पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये. फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. ।।२।।

लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. तिला अमान्य करू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. ।।३।।

जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ।।४।।

काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये.) ।।५।।

सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये. मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये, कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये. कुणाशीही स्पर्धा करू नये. ।।६।।

कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी, उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ।।७।।

स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये. कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ।।८।।

सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे, असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ।।९।।

अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।

उत्तमलक्षण शब्दार्थ

  • उत्तम – आदर्श, गुणसंपन्न,
  • लक्षण – गुणवैशिष्ट्य.
  • श्रोतीं – ऐकणाऱ्या लोकांनो.
  • सावधान – सावध होणे, सजग होणे.
  • उत्तम – उत्कृष्ट, जेणें – ज्याने.
  • बाणे – बाणणे, अंगिकारणे, सवय लागणे,
  • सर्वज्ञ – सारे जाणणारा.
  • पुसल्याविण – विचारल्याशिवाय,
  • येकायेकी – एकदम, पटकन.
  • जनीं – लोकांचे. आर्जव – विनंती.
  • पापद्रव्य – पापाने (कपटाने) मिळवलेली संपत्ती.
  • जोडू नये – साठवू नये.
  • पुण्यमार्ग – चांगला रस्ता, सद्वर्तन,
  • कदाकाळी – कोणत्याही वेळी.
  • तोंडाळ – वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ.
  • वाचाळ – व्यर्थ बडबड करणारा.
  • तंडो नये – तंटा (भांडण) करू नये.
  • संतसंग – सज्जन माणसाची संगत.
  • खंडू नये – तोडू नये.
  • अंतर्यामी – मनातून, हृदयातून.
  • आळस – काम न करणे.
  • चाहाडी – एखादयाबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा.
  • कार्य – काम,
  • सभा – समूहाची बैठक.
  • बाष्कळपणा – बालिशपणा.
  • पैज – स्पर्धा, शर्यत.
  • होड – पैज,
  • परपीडा – दुसऱ्याला छळणे, दुःख देणे.
  • विश्वासघात – बेइमानी.
  • व्यापकपण – (मनाचा) मोठेपणा.
  • पराधेन – परावलंबी, दुसऱ्यावर विसंबणे.
  • वोझें – (स्वत:चा) भार,
  • कोणीयेकासी – कोणावरही.
  • सत्यमार्ग – खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन.
  • असत्य – खोटेपणा.
  • पंथे – मार्गाने, वाटेने.
  • कदा – कधीही.
  • अभिमान – व्यर्थ गवं.
  • अपकीर्ति – बेअब्रू, वाईट प्रसिद्धी,
  • सत्कीर्ति – चांगली प्रसिद्धी.
  • वाडवावी – वाढवावी.
  • विवेके – चांगल्या विचाराने.
  • दृढ – ठाम, मजबूत, ठोस.

Marathi Kumarbharti Std 10 Digest Pdf भाग-१

Giryarohanacha Anubhav Class 8 Marathi Chapter 8 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 8 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 1
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 2

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 3

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

2. एका शब्दात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण – []
उत्तरः
उत्तरकाशी

प्रश्न आ.
अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण – []
उत्तरः
गंगोत्री

प्रश्न इ.
बहादूरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक- []
उत्तरः
वीरपदक

3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
शाळेत जाणाऱ्या ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. त्यासाठी त्याने प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. उत्कृष्ट प्रशिक्षणातून बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या. एवढ्या लहान वयात आपल्या वेड बनलेल्या छंदाचे जतन करणे व एकाग्रतेने नवीन गोष्टी शिकणे हे ईशानचे विशेष म्हणता येतील. गिर्यारोहण या प्रकारातून त्याची साहसीवृत्ती जाणवते. गंगोत्रीवर पोहोचल्यानंतर काळीज हेलावून टाकणारे दृश्य पाहून भावनिक झालेला ईशान दिसून येतो. पण दुसऱ्या क्षणी यात्रेकरूंना मदत करुन भुकेल्यांना आपल्याकडील अन्न देऊन तो मदतीच्या भावनेचे व मोठ्या मनाचे दर्शन घडवतो.

स्वत:ला भूक लागली असताना व विश्रांतीची गरज असताना देखील झाडात अडकलेल्या लोकांना वाचवून तो आपली नि:स्वार्थ वृत्ती दाखवून देतो. धूर करुन हेलिकॉप्टरला संकेत देणाऱ्या ईशानचे प्रसंगावधानही वाखाणण्याजोगे होते हे जाणवते. ईशानचे प्रसंगावधान, धैर्यशीलवृत्ती, नि:स्वार्थी, दानशूरता अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन प्रस्तुत पाठातून घडते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न आ.
ईशान व त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
कठिण व थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस नदीचे रौद्र रूप नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झालेली वित्तहानी व जीवितहानी बघून ते अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी सरसावले. जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी करून व औषधे देऊन प्रथमोपचार केले. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी इतर नातेवाईकांनी यात्रेकरूंची मदत केली. स्वत:च्या भुकेची पर्वा न करता स्वत:जवळ असलेला फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या त्या भुकेल्या मुलांना देऊन टाकल्या. हवाईदलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी येताच ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहचवायला हवाईदलातील जवानांना मदत केली. त्यांनी सर्व यात्रेकरूंना नि:स्वार्थी भावनेने जमेल त्या स्वरूपात मदत केली.

प्रश्न इ.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’ अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा.
उत्तरः
हिवाळा सुरू होताच थंडी हळूहळू जोर धरू लागते. स्वत:च्या घरात गोधडी घेऊन झोपल्यावरही थंडी सहन होत नाही. मात्र रस्त्यावरील असहाय्य व्यक्ती थंडीच्या दिवसातही रस्त्यावरच रात्र काढतात. अशा व्यक्तीला मी अंथरण्यासाठी एखादी चादर व अंगावर घेण्यासाठी उबदार गोधडी देईन. तसेच घरात असलेले उबदार कपड्यांपैकी स्वेटर, कान टोपी अशा गोष्टी मी त्या व्यक्तीला मदत म्हणून देईन.

खेकूया शब्दांशी.

प्रश्न अ.
खालील वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. काळजाला घरे पडणे (अ) त्रासून जाणे
2.  मनमानी करणे (आ) प्रचंड दु:ख होणे
3.  हैराण होणे (इ) मनाप्रमाणे वागणे

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1.  काळजाला घरे पडणे (आ) प्रचंड दु:ख होणे
2.  मनमानी करणे (इ) मनाप्रमाणे वागणे
3.  हैराण होणे (अ) त्रासून जाणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न आ.
खालील शब्दांचा वापर करुन प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
उत्तरः

  1. गिर्यारोहण: एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षम खेळ म्हणून गिर्यारोहणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  2. रौद्र रूप: जंगलात लागलेल्या वणव्याच्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले.
  3. भूस्खलन: भूस्खलन झाल्याने जमिनीचे रूपच पालटले.

प्रश्न इ.
‘बे’ हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करावलिहा.
उदा. – बेवारस

  1. जबाबदार
  2. इमान
  3. शिस्त
  4. रोजगार
  5. पर्वा

उत्तर:

  1. बेजबाबदार
  2. बेइमान
  3. बेशिस्त
  4. बेरोजगार
  5. बेपर्वा

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्य तयार करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 4
उत्तर:

विरामचिन्हे नावे वाक्य
, स्वल्पविराम दिवाळीसाठी लाडू, चिवडा, शंकरपाळे असा सगळा फराळ तयार असतो.
. पूर्णविराम मी आणि अनू शाळेत जातो.
; अर्धविराम मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते; पाहता-पाहता मैलाचे दगड मागे पडत जातात.
? प्रश्नचिन्ह तुझी परीक्षा कधी संपणार आहे?
! उद्गारवाचक अय्या! किती मोठी झालीस
‘….’ एकेरी अवतरण चिन्ह कितीही मोठे झालो तरी शाळेतले ‘ते क्षण’ पुसता पुसले जात नाहीत.
“….” दुहेरी अवतरण चिन्ह बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या आजीने आस्थेने विचारले, “कशी आहेस बाळा?”

उपक्रम:

भारतातील गिर्यारोहण संस्थांबददल आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा व राज्यनिहाय संस्थांच्या नावांचे तक्ते बनवा.

वाचा.

प्रश्न 1.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 5

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय-
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार)-
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 6

Class 8 Marathi Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 7

कोण ते लिहा.

प्रश्न 1.
ईशानला पहाडावरील मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणारी.
उत्तरः
उत्तर काशीमधील गिर्यारोहण संस्था

प्रश्न 2.
गिर्यारोहणाचा विशेष छंद असणारा.
उत्तरः
ईशान

3. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशानला ई-मेल कोणी व का पाठवला होता?
उत्तरः
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेने आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण म्हणून ईशानला ई-मेल केला होता.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून काय फायदा झाला होता?
उत्तरः
ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. …………… खेळून त्याला कंटाळा आला होता. (क्रिकेट, बुद्धिबळ, व्हिडिओ गेम, बॅडमिंटन)
  2. त्याच त्याच ……………… कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. (साहसी, रोमांचक, गुढ, बाल)
  3. ………… च्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल प्राप्त झाला. (उत्तरकाशी, दार्जिलिंग, पहलगाम, गुलमर्ग)

उत्तर:

  1. व्हिडिओ गेम
  2. रोमांचक
  3. उत्तरकाशी

प्रश्न 2.
काय घडले ते लिहा. ईशानला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता.
उत्तरः
ईशानला सुट्टी कशी घालवायची हा प्रश्न पडलेला असतानाच त्याला दिलासा देणारी घटना घडली. उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्यांच्या एका मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण ईशानला ई-मेलच्या माध्यमातून मिळाले आणि तोच ई-मेल त्याच्या मित्रांना मिळाल्यामुळे गिर्यारोहणासाठी एकत्र जाण्याचा योग जुळला.

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी काय केले?
उत्तरः
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. तेथील उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याने गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
त्याच त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती.
उत्तरः
रोमांचक – विशेषण, कथा – नाम, त्याला – सर्वनाम, नव्हती – क्रियापद

प्रश्न 2.
त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला होता.
उत्तरः

  1. त्यांनी – सर्वनाम, वर – शब्दयोगी अव्यय,
  2. अनेक – क्रियाविशेषण अव्यय

लेखननियमांनुसार वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारिकसारिक गोष्टि समजल्या होत्या.
उत्तरः
त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फूटबॉल आणि बॅडमीटनही खेळता येऊ शकणार होते.
उत्तरः
मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते.

प्रश्न 3.
खालील शब्दांतून समानार्थी शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 8
उत्तरः

  1. सुट्टी – रजा,
  2. मित्र – सखा,
  3. कथा – गोष्ट,
  4. निमंत्रण – आमंत्रण.

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. सुट्टी
  2. कथा
  3. घटना
  4. संस्था

उत्तर:

  1. सुट्ट्या
  2. कथा
  3. घटना
  4. संस्था.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
गिर्यारोहणाची कारणे तसेच, त्यासाठी आवश्यक गुणांची माहिती लिहा.
उत्तरः
गिर्यारोहण हा पूर्वापार चालत आलेला उत्साही आणि धाडसी गिरीप्रेमींनी जोपासलेला छंद आहे. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे, शत्रूप्रदेशाची टेहाळणी करणे, हवामानविषयक अंदाज बांधणे, शास्त्रीय निरीक्षणासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या हिमनदयांचा शोधघेण्यासाठी गिर्यारोहण सुरू असते. सरळसोट डोंगरकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धैर्याची, संयमाची आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची. गिर्यारोहणामुळे नेतृत्व, अचूक व सत्वर निर्णयक्षमता या गुणांचा विकास होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 9

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र …………….. ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. (बसने, रेल्वेने, टॅक्सीने, सायकलने)
  2. वाटेत उंच उंच ……………. पाहून ते फार रोमांचित झाले होते. (पहाड, डोंगर, दऱ्या, झाडे)
  3. सर्व मित्रांनी मिळून माऊंटनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून …………….. ला जाण्याचा निश्चय केला. (दार्जिलिंग, पहलगाम, गंगोत्री, बद्रिनाथ)

उत्तर:

  1. टॅक्सीने
  2. पहाड
  3. गंगोत्री

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशान खूश का झाला?
उत्तरः
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान खूश झाला.

प्रश्न 2.
ईशानने पहाडावर जाण्याची तयारी कधी सुरू केली?
उत्तर:
शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच ईशानने पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
ईशान व त्याचे मित्र उत्साहित का झाले?
उत्तरः
गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यामुळे ईशान व त्याचे मित्र उत्साहित झाले.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनेनंतर काय घडले ते लिहा. गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचून ईशान खूश झाला.
उत्तरः
गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचताच ईशानने त्या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्व मित्र फार खूश झाले.

प्रश्न 2.
खालील विधानामागील कारण तुमच्या शब्दांत लिहा. गिर्यारोहक आवश्यक उपकरणे व सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जातात.
उत्तरः
गिर्यारोहण हा एक साहसी प्रकार असून उंच पहाडावर प्रतिकूल परिस्थितीतही चढाई करण्याची वेळ येऊ शकते. उंच उंच दगड, निसरड्या वाटा, खोल दऱ्या यांसारखे अडथळे सुलभरित्या पार करण्यासाठी काही उपकरणांची आवश्यकता भासते. तसेच गरजेचे मात्र कमीत कमी सामान सोबत घेणे गिर्यारोहणासाठी फायदेशीर असते. यशस्वी गिर्यारोहणासाठी म्हणूनच गिर्यारोहक सामानाची व आवश्यक उपकरणांची बॅग घेऊन जातात.

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशान व त्याच्या साथीदारांना कोण साद घालत होते? उत्तरः गिर्यारोहण करताना दिसणारे, आकाशाला स्पर्श
करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नदया, ईशान व त्याच्या साथीदारांना साद घालत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील विशेषण, विशेष्याच्या जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 10
उत्तर:

  1. विशालकाय – खडक
  2. पहाडी – नया
  3. हिरव्यागार – घाटी
  4. आवश्यक – उपकरणे.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द विभक्ती प्रत्यय विभक्ती
पाण्याच्या च्या षष्ठी (अनेकवचन)
साथीदारांना ना द्वितिया (अनेकवचन)
सुट्टीत सप्तमी (एकवचन)
पाहून हून पंचमी (एकवचन)

प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. स्वच्छ × [ ]
  2. आवश्यक × [ ]
  3. मित्र × [ ]
  4. आकाश × [ ]

उत्तर:

  1. अस्वच्छ
  2. अनावश्यक
  3. शत्रू
  4. पाताळ

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.

  1. !
  2. ?
  3. ;
  4. ,

उत्तर:

  1. ! उद्गारवाचक चिन्ह
  2. ? प्रश्नचिन्ह
  3. ; अर्धविराम
  4. , स्वल्पविराम

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
गिर्यारोहणाची आवश्यक उपकरणांची, सामानाची माहिती दया.
उत्तरः
गिर्यारोहण ही एक कला असून यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. उत्कृष्ट प्रशिक्षण, बारकाव्यांची समज व योग्य ते सामान सोबत असल्यास गिर्यारोहण यशस्वी होऊ शकते. गिर्यारोहणासाठी उत्कृष्ट प्रतीच्या मोठ्या व दणकट सॅक आवश्यक असतात. गिर्यारोहणासाठी जाण्याच्या जागेचे तापमान, पाऊस, वारा या गोष्टींचा विचार करून योग्य तो तंबू सोबत असणे महत्त्वाचे असते. दिशादर्शक नकाशे व होकायंत्र, प्रथमोपचार पेटी, दोरी, हार्नेस, योग्य प्रकारचे बूट, गॉगल अशा अनेक गोष्टी गिर्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 11

कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. बरीच घरे आणि ……………….. नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. (मंदिरे, धर्मशाळा, गेस्ट हाऊस, शाळा)
  2. या तांडवात आपल्या …………… गमावल्यामुळे लोक स्फुदून स्फुदून रडत होते. (नातेवाईकांना, आप्तेष्टांना, जवळच्यांना, मित्रांना)
  3. ………….. झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. (भूस्खलन, भूकंप, अतिवृष्टी, ढगफुटी)

उत्तर:

  1. गेस्ट हाऊस
  2. आप्तेष्टांना
  3. भूस्खलन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र कोठे पोहचले?
उत्तरः
अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहचले.

प्रश्न 2.
गंगोत्रीवर काय झाले होते?
उत्तरः
गंगोत्रीवर ढग अकस्मात फुटले होते व भीषण हाहाकार माजला होता.

प्रश्न 3.
लोक का रडत होते?
उत्तरः
गंगोत्रीवर झालेल्या तांडवामध्ये आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक रडत होते.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे दया. ईशान व त्याच्या साथीदारांना पहाडावरील दृश्य पाहून अंगावर काटे आले.
उत्तरः
गंगोत्रीला पोहोचल्यावर ईशान व त्याचे साथीदार खूश झाले होते. मात्र तेथील दृश्य पाहून ते हादरले. ढगफुटीमुळे गंगोत्रीवर हाहाकार माजला होता. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे खूप नुकसान झाले होते. अनेकजण मृत्युमुखी पडले होते. तीर्थयात्रा करण्यासाठी आलेले यात्रेकरू अडकले होते व त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. पहाडावर हे सर्व पाहून ईशान व त्याच्या साथीदारांच्या अंगावर काटे आले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

खालील घटनेनंतर काय घडले ते लिहा.

प्रश्न 1.
पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले.
उत्तरः
पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटल्यामुळे गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर, दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा उद्ध्वस्त झाल्या. बरीच घरे व गेस्ट हाऊस वाहून गेले. अनेक लोक मृत्युमुखी पडले.

प्रश्न 2.
ईशान व त्याच्या साथीदारांनी पहाडावरील भीषण तांडव पाहिले.
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी पहाडावरील भीषण तांडव पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले व त्यांचा गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहिसा झाला.

उत्तर दया.

प्रश्न 1.
गंगोत्रीवरील नदीच्या तांडवाचा लोकांवर काय परिणाम झाला?
उत्तरः
गंगोत्रीवरील नदीच्या तांडवामध्ये अनेक लोकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले. अनेक तीर्थयात्री तेथे चारधाम यात्रेसाठी आले होते. मात्र भूस्खलन झाल्यामुळे सारे तीर्थयात्री ठिकठिकाणी अडकले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
काळजाला घरे पडणे – प्रचंड दु:ख होणे.
वाक्यः अकस्मात झालेल्या भूकंपामध्ये झालेल्या जीवितहानीचा आकडा ऐकून काळजाला घरे पडली.

प्रश्न 2.
हाहाकार माजणे – घाबरून पळापळ होणे.
वाक्यः भर बाजारात सिलेंडरचा स्फोट झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला.

प्रश्न 3.
अंगावर काटे येणे – प्रचंड भीती वाटणे.
वाक्य: पावसाचे चढते रौद्ररूप पाहून अंगावर काटे येत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

अचूक शब्द ओळखा.

प्रश्न 1.

  1. मुत्युमूखी, मृत्यूमुखी, मृत्युमुखी, मृत्युमुखि
  2. भूस्खलन, भूस्खलन, भुस्खलन, भस्खलन
  3. उध्वस्त, उद्ध्वस्त, उद्ध्वस्त, उद्ध्वस्त

उत्तर:

  1. मृत्युमुखी
  2. भूस्खलन
  3. उद्ध्वस्त

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

  1. यात्रेकरूंना उतरण्यासाठीचे ठिकाण – [धर्मशाळा]
  2. तीर्थस्थानांना भेट देणारे लोक – [तीर्थयात्री]
  3. जवळील नातेवाईक – [आप्तेष्ट]

प्रश्न 1.
‘वान’ प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदा. : वेगवान
उत्तरः
धनवान, गाडीवान, विदयावान, बलवान.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. पहाड
  2. घर
  3. दुकाने
  4. नदी

उत्तर:

  1. पहाड
  2. घरे
  3. दुकान
  4. नदया

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
ढगफुटीची माहिती दया.
उत्तर:
काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यास ढगफुटी म्हणतात.

प्रश्न 2.
भूस्खलन म्हणजे काय?
उत्तरः
जमिनीच्या पोटातील हालचाली जसे दगड सरकणे वा पडणे, माती-खडक वाहून जाणे इत्यादी भूस्खलन या संकल्पनेतर्गत येतात. ही भूवैज्ञानिक घटना आहे. जोरदार पाऊस वा पूर किंवा भूकंप यामुळे भुस्खलन होते. त्याचप्रमाणे मानवनिर्मित कारणांमुळे, जसे झाडे, वनस्पती कापून टाकणे रस्त्याच्या कडेला असणारे डोंगर फोडणे, उंच कडा कापणे यांमुळेही ही आपत्ती ओढवू शकते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 12

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. एका मुलाने आपल्या वडिलांकडे ……मागणी केलेली ईशानने पाहिले. (पाण्याची, बिस्किटांची, चॉकलेटची, फळांची)
  2. दुकानदारांची ही …………….. पाहून ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले. (दादागिरी, अरेरावी, मिजास, मनमानी)
  3. ……………….. यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली. (अडकलेल्या, भरकटलेल्या, मनमानी, हरवलेल्या)

उत्तरः

  1. बिस्किटांची
  2. मनमानी
  3. हरवलेल्या.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किती किंमत वसूल करत होते?
उत्तर:
हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
दुकानदाराने वाढीव किंमतीबाबत विचारणा केली असता काय उत्तर दिले?
उत्तर:
दुकानदाराकडे वाढीव किंमतीबाबत विचारणा केली असता तो म्हणाला की, “येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल.”

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 13

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 14

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना कशी मदत केली?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली. भुकेल्या मुलांना आपल्यासोबत आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
कारणे दया. ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले.
उत्तरः
पहाडावरील दुकानदार पाच रुपयांच्या बिस्किट पुढ्याची किंमत शंभर रुपये तर पंधरा रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत दोनशे रुपये अशी सांगत होते. तर दुसरीकडे हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले होते.

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल दुकानदार रागाने म्हणाला
उत्तरः
“ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल.” दुकानदार रागाने म्हणाला.

प्रश्न 2.
भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या
उत्तरः
भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

प्रश्न 3.
काका ही तर सरळ लूटमार आहे
उत्तरः
“काका, ही तर सरळ लूटमार आहे.”

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
बिस्किट, दुकानदार, थाळी, किंमत, वस्तू, पहाड, यात्रेकरु, प्रथमोपचार, मलमपट्टी
उत्तरः

  1. पुल्लिंग स्त्रीलिंग
  2. नपुसकलिंग दुकानदार
  3. बिस्किट किंमत
  4. यात्रेकरू वस्तू प्रथमोपचार मलमपट्टी
  5. थाळी – पहाड

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

  1. शब्द मूळ शब्द सामान्यरुप दुकानदारांची दुकानदार
  2. दुकानदारां मुलांनो मुल – मुलां अडचणीत अडचण अडचणी
  3. बाटलीची बाटली बाटली

प्रश्न 6.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मालक
  2. खरेदी
  3. मागणी
  4. राग

उत्तरे:

  1. नोकर
  2. विक्री
  3. पुरवठा
  4. लोभ, प्रेम

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
एखादया दुकानदाराने वस्तूच्या किंमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी केल्यास तुम्ही काय कराल?
उत्तरः
प्रत्येक दुकानदार हा त्याच्याकडील उपलब्ध वस्तू छापील किंमतीत देण्यास बांधील असतो. मात्र कधी कधी दुकानदार वस्तूंच्या किंमती वाढवून पैसे उकळताना दिसतात. दुकानदाराने माझ्याकडे जास्त किंमतीची मागणी केल्यास मी त्याला योग्य व छापील किंमत घेण्याची विनंती करेन. त्याने न ऐकल्यास मी त्या दुकानातून वस्तू खरेदी करणार नाही व इतरांनाही त्या दुकानातून काहीही न घेण्याचा सल्ला देईन. तसेच त्या दुकानदाराची तक्रार ग्राहकमंचाकडे करीन.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 15

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
दुकानदाराने जेवणाची किंमत व खोलीचे भाडे किती सांगितले?
उत्तरः
दुकानदाराने जेवणाची किंमत दहा हजार रुपये व खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये सांगितले.

प्रश्न 2.
अचानक मोठा आवाज का झाला?
उत्तरः
पहाडावरील एक घर अचानक खाली कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
ईशानने गिर्यारोहण संस्थेत कुठले खास प्रशिक्षण घेतले होते?
उत्तरः
ईशानने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते.

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. त्यांना ……….. गरज जाणवत होती. (भुकेची, पाण्याची, विश्रांतीची, झोपेची)
  2. ईशान व त्याचे साथीदार आपापसात …………. करत होते. (विचारविनिमय, सल्ला-मसलत, खलबत, चर्चा)
  3. घरात राहणारे लोक ……………… झाडात अडकले होते. (देवदारच्या, वडाच्या, अशोकाच्या, पिंपळाच्या)

उत्तरः

  1. विश्रांतीची
  2. विचारविनिमय
  3. देवदारच्या

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 16

प्रश्न 2.
उत्तर दया. दुकानदाराने जेवण व खोलीचे भाडे जास्त सांगण्याचे कसे समर्थन केले?
उत्तरः
दुकानदाराने सांगितलेल्या भाड्याबद्दल ईशानने आक्षेप घेतला यावर दुकानदार म्हणाला, “जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जर भूक लागल्यावर तुम्हांला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील?” अशाप्रकारे दुकानदाराने स्वत:चे समर्थन केले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
खालील प्रसंगानंतर काय घडले ते लिहा. घरात राहणारे लोक देवदार झाडात अडकले होते.
उत्तरः
पहाडावरील घर अचानक कोसळल्यामुळे तेथील लोक देवदारच्या झाडात अडकले. ईशानने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले असल्यामुळे व त्याला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव असल्यामुळे ईशानने जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरुन अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांच्या जाती ओळखून त्यांचे वर्गीकरण करा. संध्याकाळ, त्यांना, थोडे, रुक्ष, म्हणाला, ईशान, ही, आवाज, कोसळले, त्याचे, देवदार, काढले, जाड, चांगला.
उत्तर:

खालील वाक्यातील अव्यये शोधा व लिहा.

प्रश्न 1.
ईशानला आता खूप भूक लागली होती.
उत्तरः
खूप – क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 2.
जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये दयावे लागेल.
उत्तरः
1. साठी – शब्दयोगी अव्यय
2. आणि – उभयान्वयी अव्यय

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.

प्रश्न 1.
“काका, आम्हांला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल?”
उत्तर:
”…..” – दुहेरी अवतरण चिन्ह
(,) – स्वल्पविराम
(?) – प्रश्नचिन्ह

प्रश्न 2.
ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता.
उत्तरः
(,) – पूर्णविराम

प्रश्न 3.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. हॉटेल
  2. खोली
  3. रुपये
  4. झाड

उत्तर:

  1. हॉटेल्स
  2. खोल्या
  3. रुपया
  4. झाडे

प्रश्न 4.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. संध्याकाळ
  2. रुक्ष
  3. घर
  4. आकाश
  5. किंमत
  6. पहाड

उत्तरः

  1. सायंकाळ
  2. कोरडा
  3. सदन, गृह
  4. गगन, नभ
  5. मूल्य
  6. पर्वत

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
भूकंपग्रस्त भागात तुम्ही कशाप्रकारे मदत कराल?
उत्तरः
भूकंपग्रस्त भागात झालेली मोठी हानी पाहून नडगमगता मी धीराने काम करेन. आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जमेल तितके ढिगारे उपसायला मदत करेन. अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. जखमी लोकांना बाजूला नेऊन त्यांवर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न करेन. तसेच त्यांना वैदयकीय सेवा लवकरात लवकर मिळावी याची काळजी घेईन. तसेच भूकंपग्रस्तांना अन्नपाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी जमेल तितके मदतीसाठी प्रयत्न करेन.

खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 17

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय वापरुन रिकाम्या जागा भरा.

  1. त्यांनी आपल्याबरोबर ……………. तंबू आणला होता. (कॉटनचा, प्लॅस्टिकचा, नायलॉनचा, कापडाचा)
  2. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती …………….. मिळाली होती. (सेनेला, पत्रकारांना, पोलिसांना, वृत्तवाहिन्यांना)
  3. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांना ………. मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. (वीरपदक, शौर्यपदक, कांस्यपदक, रौप्यपदक)

उत्तरः

  1. नायलॉनचा
  2. सेनेला
  3. वीरपदक

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशान व त्याच्या साथीदारांची गैरसोय का झाली नाही?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागणार होती. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. तो तंबू आधुनिक असल्यामुळे त्याची गैरसोय झाली नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
बचाव अभियान कोणी सुरू केले?
उत्तरः
पहाडावर झालेल्या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळताच हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले.

प्रश्न 3.
खूप धूर झाल्यामुळे काय झाले?
उत्तरः
खूप धूर झालेला पाहून हेलिकॉप्टर खाली आले व पहाडावर घिरट्या घालू लागले.

प्रश्न 4.
ईशान व त्याचे साथीदार कधी खूश झाले?
उत्तरः
ईशान व त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित पोहोचले, तेव्हा ते फार खूश झाले.

कृती 2: आकलन कृती.

प्रश्न 1.
कारणे दया. ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली.
उत्तरः
ईशान व त्याच्या मित्रांनी गोळा करून आणलेल्या लाकडांनाआगलावली.त्यातूनखूपधूर झाला.हवाईदलाच्या हेलिकॉप्टरसाठी धूराच्या माध्यमातून संकेत देण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणूनच आग लावण्यासाठी ईशान व त्याच्या मित्रांनी लाकडे गोळा करून आणली.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील प्रसंगानंतर काय घडेल ते लिहा. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादूरीचे कार्य समजले.
उत्तरः
हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादूरीचे कार्य समजताच त्यांची प्रशंसा केली. तसेच त्यांनी या मुलांना वीरपदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली.

प्रश्न 3.
उत्तर दया. ईशान व त्याच्या साथीदारांनी केलेल्या धुरामुळे काय घडले?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी केलेल्या धुरामुळे हवाईदलाच्या हेलिकॉप्टरला संकेत मिळाला. हेलिकॉप्टर खाली आले व पहाडावर घिरट्या घालू लागले. हवाईदलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित
ठिकाणी पोहचवले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखून लिहा.
1. हेलीकॉप्टर, हेलिकॉप्टर, हेलीकॉप्टर, हेलिकोप्टर
2. आधूनिक, आधुनीक, आधुनिक, आधुनीक
उत्तर:
1. हेलिकॉप्टर
2. आधुनिक

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
‘करू’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उत्तर:
1. यात्रा – यात्रेकरू
2. भाडे – भाडेकरू

प्रश्न 3.
‘निक’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा. – आधुनिक
उत्तरः

  1. काल्पनिक
  2. रासायनिक
  3. भावनिक
  4. सपत्निक

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांतील अव्यय ओळखून प्रकार लिहा.

प्रश्न 1.
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली.
उत्तरः

  1. व – उभयान्वयी अव्यय,
  2. ती – विशेषण,
  3. वर – शब्दयोगी अव्यय

प्रश्न 2.
पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती.
उत्तरः
वर – शब्दयोगी अव्यय

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. रात्र
  2. आधुनिक
  3. संकेत
  4. प्रशंसा
  5. बहादुरी
  6. मदत

उत्तर:

  1. निषा, रजना
  2. प्रगत
  3. खूण, इशारा
  4. स्तुती
  5. धैर्य
  6. सहकार्य

प्रश्न 4.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दिवस
  2. आधुनिक
  3. प्रशंसा
  4. स्मरण
  5. गैरसोय
  6. सुरक्षित

उत्तरः

  1. रात्र
  2. प्राचीन
  3. निंदा
  4. विस्मरण
  5. सोय
  6. असुरक्षित

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या हातून एखादे बहादुरीचे कार्य घडले आहे का? घटना नमूद करा.
उत्तरः
अशी एक घटना आमच्या इथे घडली होती. आमच्या घरापासून काही अंतरावर एक नदी वाहते तिथे बरीच मंडळी पोहण्यासाठी, पाण्यात डुंबण्यासाठी येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मीही तिथे पोहायला गेलो असता, थोड्या अंतरावरुन मला एक आवाज ऐकू आला ‘वाचवा वाचवा’. मी त्या दिशेने पाहिले तर एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात ओढला जात होता आणि त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते.

मी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उतरलो. पोहण्यात तरबेज असल्याने लागलीच त्याच्याजवळ पोहोचलो व त्याला बाहेर काढले. मग त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले व त्याला श्वास पुरवला. तो मुलगा शुद्धीवर आला. मला खूप आनंद झाला. त्याला घेऊन त्याच्या घरी सोडले. त्या घटनेने गावात सगळीकडे माझ्या कार्याचे, साहसाचे कौतुक झाले.

गीर्यारोहणाचा अनुभव Summary in Marathi

पाठपरिचय:

रमेश महाले लिखित ‘गिर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अनेक रोमांचकारी घटनांनी भरला आहे. ईशान व त्याचे मित्र गिर्यारोहणासाठी गंगोत्री येथे गेले असताना ते सर्व विदयार्थी गंगोत्री येथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या संकटातून यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवतात. या पाठातून अशा बऱ्याच गोष्टी आपणास शिकावयास मिळतात.

The lesson ‘Giryarohanacha Anubhav’ is filled with many exciting incidents. Ishan and his friends goes to the Gangotri for mountaineering. But beacuse of the crisis like cloudburst and landslide many visitors at Gangotri gets affected. Ishan and his friends help everyone to get out of these crisis and shows humanity. There are lot of things to learn through this chapter.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

शब्दार्थ:

  1. रोमांचक – अंगावर काटे उभे करणारे – thriller,exciting
  2. कथा – गोष्ट – story
  3. गोडी – आवड – liking
  4. दिलासा – समाधान – assurance
  5. गिर्यारोहण – पर्वत चढणे/चढाई – mountaineering
  6. निमंत्रण – आमंत्रण – invitation
  7. छंद – आवड – hobby
  8. प्रशिक्षण – शिकवणी – training
  9. विशाल – खूप मोठे – huge
  10. घाटी – टेकडीवरील चढ असलेली लहान वाट – a hill passage with a mild ascent
  11. उपकरणे – साधनसामुग्री – equipments
  12. संदेश – निरोप – massage
  13. सोपे – सहज – easy
  14. थकवा – शीण – fatigue
  15. ढगफुटी – एकाएकी कोसळणारा मुसळधार पाऊस – cloudburst
  16. भीषण – भयानक – terrible
  17. धोकादायक- च्यापासून धोका आहे अशी – dangerous
  18. प्रवाह – वाहणे, वाहण्याचा ओघ – stream, flow
  19. मंदिर – देऊळ – temple
  20. आप्तेष्ट – जवळचे नातेवाईक – close relative
  21. भूस्खलन – जमीन खचणे – landslide
  22. तीर्थयात्री – तीर्थयात्रा करणारे – pilgrim
  23. प्रथमोपचार – प्राथमिक उपचार – firstaid
  24. रुक्ष – कोरडा – arid, dry
  25. खुल्या – मोकळ्या – open
  26. विचारविनिमय – विचारांची देवाणघेवाण – exchange of views
  27. संकेत – खूण, इशारा – indication, hint
  28. बहादुरी – धैर्य – courage
  29. दुर्घटना – वाईट घटना – calamity

वाक्प्रचार:

  1. गोडी नसणे – आवड नसणे
  2. प्राप्त होणे – मिळणे
  3. साद घालणे – हाक मारणे
  4. काळजाला घरे पडणे – प्रचंड दुःख होणे
  5. हाहाकार माजणे – घाबरून पळापळ होणे
  6. मृत्युमुखी पडणे – मरण पावणे
  7. स्फुदून स्फुदून रडणे – हुंदके देऊन रडणे
  8. अंगावर काटे येणे – प्रचंड भीती वाटणे
  9. भुकेने व्याकूळ होणे – अतिशय भूक लागल्याने अस्वस्थ होणे
  10. मनमानी करणे – मनाला वाटेल तसे वागणे
  11. हैराण होणे – त्रासून जाणे
  12. प्रशंसा करणे – कौतुक करणे
  13. शिफारस करणे – दुसऱ्याजवळ केलेली प्रशंसा

टिपा

1. गिर्यारोहण: गिर्यारोहण म्हणजे पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडामंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात दहा-पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात.

2. ढगफुटी: काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रतितास 100 मिली मीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते.

3. भूस्खलन: जमिनीच्या पोटातील हालचाली जसे दगड सरकणे वा पडणे, माती खडक वाहून जाणे, इत्यादी भूस्खलन या संकल्पनेअंतर्गत येतात. ही भूवैज्ञानिक घटना आहे.

4. चारधाम यात्रा: हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चारधाम म्हटले जाते. बद्रीनाथ (उत्तराखंड), केदारनाथ (उत्तराखंड), गंगोत्री (उत्तराखंड), यमुनोत्री (उत्तराखंड) या उत्तराखंडातील धार्मिक क्षेत्रांना तसेच द्वारका (गुजरात), रामेश्वर (तामिळनाडू) व जगन्नाथपुरी (ओरिसा) या इतर तीन ठिकाणच्या धार्मिक क्षेत्रांची यात्रा म्हणजेच चारधाम यात्रा होय.

5. देवदार झाड: देवदार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हे झाड शंकू आकाराचे असून त्याची उंची 40 ते 50 मीटर असते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Ghatat Ghat Varandha Ghat Class 8 Marathi Chapter 5 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 5 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Textbook Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 1

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 1
उत्तर:
पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा:
1. सोसाट्याचा वारा
2. मातीचा सुगंध

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

2. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 2

प्रश्न 1.
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 2

उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 3

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

3. खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
अ. जिगरबाज भटके – वरंधा घाटात बघावयास मिळणारे निसर्गाचे विहंगम दृश्य व टपऱ्यांवर मिळणारा राजेशाही खाना यांबरोबर कावळ्या किल्ला वरंधा घाटात सज्ज आहे. मात्र ह्या किल्ल्यावर ट्रेक करताना अरूंद पायवाट, अरूंद सपाटी, उतरण-चढणीचा रस्ता हृदयाची धडधड वाढवतो. डेअरिंग करणाऱ्या, न घाबरता ट्रेक करणाऱ्या प्रवाशांना जिगरबाज भटके म्हटले आहे.

आ. रंगिली पायवाट – श्री वाघजाई मंदिराच्याबरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ असणाऱ्या टाक्या काळ्याशार पाषाणात खोदलेल्या आहेत. या टाक्यांच्या पाण्यामुळे तेथील पायवाट ओली झाली आहे. त्यामुळे त्या ओल्या वाटेने जाताना घसरून पडल्यामुळे वा चिखल अंगावर उडाल्यामुळे कपडे रंगतात. म्हणूनच या पायवाटेला रंगिली पायवाट म्हणतात.

इ. डोंगराची सोंड – उंच डोंगराच्या माथ्यावरील शेवटच्या टप्प्याला डोंगराची सोंड असे म्हणतात.

4. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

प्रश्न अ.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
वरंधा घाटातील निसर्गाची वेगळीच जादू बघायला मिळते. वरंधा घाटातून दिसणारे निसर्गाचे दृश्य अतिशय विलोभनीय असते. हिरव्यागार झाडांनी भरलेल्या कपारीतून धबधबे जोरदार आवाज करत वाहत असतात. दरीतील हिरवे रान डोळ्यांना सुखद गारवा देते. डोंगरावर ढग उतरल्यामुळे ढगांवर पांढरे आच्छादन घातल्यासारखे वाटते. पावसाची संततधार वातावरणात उत्साह निर्माण करते, धबधब्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर जास्त असल्याने ते पाणी जणू दगडांवर चाबूक मारत पुढे जात असल्यासारखे वाटते. निसर्गाचे हे सुंदर दृश्य नजरेचे पारणे फेडून टाकते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न आ.
कावळ्या किल्ला
उत्तर:
कावळ्या किल्ला – वरंधा घाटातल्या डोंगरमाथ्याजवळील नऊ टाक्यांच्या समूहापासून ओल्या पायवाटेने पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताची पायवाट कावळ्या किल्लाकडे जाते, बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून कावळ्या किल्ल्यावर ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेत पसरलेल्या डोंगरावरून डावीकडे कोकणात उतरत जाणाऱ्या रस्त्यावरून पाय सटकला तर थेट समर्थांच्या शिवथरघळीत माणूस पोहचतो.

तेथून पुढे जाणारी अरूंद पायवाट सपाटीवर येऊन थांबते. तिथून एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते व तेथून वरंधा घाटाचे दर्शन घडते, डोंगराच्या सोंडेला शेवटी जोत्याचे अवशेष व ढासळलेल्या बुरूजाचे अवशेष दिसतात. हा कावळ्या किल्ला जिगरबाज भटक्यांसाठी आवडीचा ठरतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

खेळूया शब्दांशी.

(आ) खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 4

प्रश्न 1.
खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 4
उत्तर:

विशेषण विशेष्य
1. विहंगम दृश्य
2. गरमागरम कांदाभजी
3. घोंघावणारा वारा
4. काळाशार पाषाण
5. अरूंद पायवाट

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.

प्रश्न अ.
पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.
उत्तर:
शब्दयोगी अव्यये – कडे, वर

प्रश्न आ.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
उत्तर:
शब्दयोगी अव्यय – सारखी

प्रश्न इ.
जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
उत्तर:
शब्दयोगी अव्यय – साठी

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

(इ) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. 

प्रश्न अ.
घाटात घाट वरंधाघाट बाकी सब घाटियाँ !
उत्तरः
! – उद्गारवाचक चिन्ह

प्रश्न आ.
गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात,
उत्तर:
‘_’ एकेरी अवतरण चिन्ह. . पूर्ण विराम.

चर्चा करूया.

वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

प्रश्न 1.
वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

शोध घेऊया

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

प्रश्न 1.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

बातमी लेखन

दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी. व्ही., रेडिओ यांसारख्या माध्यमांतून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते.

बातमी लेखनासाठी आवश्यक गुण

  1. लेखन कौशल्य.
  2. भाषेचे उत्तम ज्ञान.
  3. व्याकरणाची जाण.
  4. सोपी, सुटसुटीत वाक्यरचना.
  5. चौफेर वाचन.

बातमीची विविध क्षेत्रे : सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, दैनंदिन घटना.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक : 20 डिसेंबर

लोकप्रतिभा
चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 ते 7.00 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.
या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

1. कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

2. उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थीची संख्या
(आ) शिबिरार्थीनी शिबिरात शिकलेली कला
(इ) शिबिराचे ठिकाण
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख

3. वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 5

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 6

प्रश्न 2.
कोण ते लिहा
उत्तर:

  1. भिजल्याबद्दल मार देणारे – [आईवडील]
  2. कागदी होड्या करायला शिकवणारे – [आजी – आजोबा]
  3. पावसात चिंब भिजणारे – [लेखक]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी …………….. येत असे. (हिवाळा, ऊन्हाळा, पाऊस, ज्येष्ठ)
  2. मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात असणाऱ्या रंगांचे अर्थ ………………… लागतात. (उमगू, कळू, समजू, जाणवू)
  3. असं बरंच काही अनुभवायंच असेल तर ………………घाट गाठलाच पाहिजे. (माळशेज, ताम्हिणी, वरंधा, कुंभार्ली)

उत्तर:

  1. पाऊस
  2. उमगू
  3. वरंधा

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखक बालपणी कोणत्या कवितेच्या तालावर पावसात भिजत असत?
उत्तर:
लेखक बालपणी ‘ये गं ये गं सरी, माझे मडके भरी’ या कवितेच्या तालावर पावसात भिजत असत.

प्रश्न ii.
पावसाचे वेध कधी लागतात?
उत्तर:
ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात.

प्रश्न iii.
पावसाळ्यात प्रत्येक वर्षी येणाऱ्या, तरीही दरवेळी नवीन वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या?
उत्तर:
सोसाट्याचा वारा व मातीचा सुगंध या गोष्टी पावसाळ्यात प्रत्येक वर्षी येतात, तरीही दरवेळी नवीन वाटतात.

प्रश्न 2.
खालील प्रसंगानंतर काय घडले ते लिहा. लेखक पावसात चिंब भिजले.
उत्तर:
लेखक पावसात चिंब भिजल्यामुळे त्यांनी आई वडिलांकडून पोटभर मार खाल्ला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
कारणे शोधा.
लेखक पावसाची आतुरतेने वाट पाहत असत; कारण…
उत्तर:
पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटत असतानाच आजी-आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी लेखक पावसाची आतुरतेने वाट पाहत असत.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. वेध लागणे – एखाद्या गोष्टीकडे लक्ष लागणे.
वाक्य: उन्हाळा सुरू होताच सगळ्यांना आंब्याचे वेध लागतात.

2. पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे.
वाक्यः अभ्यास न केल्यामुळे राजूने गुरूजींचा पोटभर मार खाल्ला.

3. आतुरतेने वाट पाहणे – मनापासून वाट पाहणे.
वाक्य: तब्बल दोन वर्षांनी परदेशातून घरी येणाऱ्या आपल्या मुलाची राधाबाई आतुरतेने वाट पाहत होत्या.

4. प्रत्यय येणे – अनुभव येणे
वाक्यः आमच्या शेजारी झालेल्या चोरीचा निकाल पोलिसांनी दोन दिवसात लावल्याने त्यांच्या तत्पर कार्याचा प्रत्यय आला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
खालील इंग्रजी शब्दांसाठी उताऱ्यात आलेले मराठी शब्द शोधा.

  1. मंथ
  2. रेन्बो
  3. मोमेंट
  4. पास्ट

उत्तर:

  1. महिना
  2. इंद्रधनुष्य
  3. क्षण
  4. गतकाळ

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुगंध × …………
  2. आगमन × …………
  3. गतकाळ × …………..
  4. जिवंत × ………….

उत्तर:

  1. दुर्गध
  2. निर्गमन
  3. भविष्यकाळ
  4. मृत

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
महिना, माती, वारा, मडके, होडी, पाऊस, इंद्रधनुष्य, क्षण, पापणी, घाट

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
महिना माती मडके
वारा होडी इंद्रधनुष्य
पाऊस पापणी क्षण
घाट

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 5.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. महिना – [ ]
  2. सरी – [ ]
  3. होडी – [ ]
  4. रंग – [ ]

उत्तर:

  1. महिने
  2. सर
  3. होड्या
  4. रंग

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
‘पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.’ या वाक्यातील ते क्षण यामधून काय अभिप्रेत होते?
उत्तर:
लेखक व पावसाळा यांचे एक वेगळे नाते आहे. दरवर्षी पाऊस येत असला तरी लेखकाला तो दरवर्षी नवीन वाटतो. बालपणीच्या साऱ्या आठवणी लेखकाच्या डोळयासमोर येत राहतात. मोठे झाल्यावर पावसाचा, इंद्रधनुष्याचा अर्थ वेगळा उमगू लागला असला तरी लेखकाच्या गतकाळातील पावसाच्या आठवणी बदलत नाहीत. बालपणीच्या या सर्व कडू-गोड आठवणी ‘ते क्षण’ या शब्दांमधून अभिप्रेत होतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
‘मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही.’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ सांगा.
उत्तर:
पावसाशी वेगळे नाते सांगणाऱ्या लेखकाच्या अनेक आठवणी या पावसाशी निगडीत आहेत. लहानपणी खाल्लेला मार ते मोठे झाल्यावर पावसाचा उमगू लागलेला वेगळा अर्थ यांमधील लेखकाचा प्रवास आठवणींमध्ये साठवलेला आहे. पावसाचे आगमन होताच त्या साऱ्या आठवणी जिवंत होतात व अणूंच्या रूपाने वाहू लागतात. अशावेळेस मनातील पाऊस व बाहेरील पाऊस एकरूप होतात. पावसाचे पाणी की डोळ्यांमधील पाणी हेच कळेनासे होते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 7

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 8

कंसातली योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
i. मनाला ……………….. देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. (प्रसन्नता, चैतन्य, उभारी, नवजीवन)
ii. निसर्गाचे ………………….. दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते. (अप्रतिम, विहंगम, विलोभनीय, अवर्णनीय)
उत्तर:
i. उभारी
ii. विहंगम

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

एका वाक्यात उत्तरे दया.

प्रश्न i.
पावसाळ्यात प्रवास करण्याची मजा कोणत्या प्रकारच्या गाडीत जास्त येते?
उत्तर:
पावसाळ्यात प्रवास करण्याची मजा बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यापेक्षा दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात जास्त येते.

प्रश्न ii.
वरंधा घाटात आल्यावर काय वाटते?
उत्तर:
‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वरंधा घाटात आल्यावर वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न iii.
प्रवासात कुठून कुठे जाताना वरंधा घाट लागतो?
उत्तरः
पुण्याहून महाडकडे जाताना वरंधा घाट लागतो.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर:

  1. हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे – [धबधबे]
  2. दगडांवर आसूड मारत धावणारे [खळाळत वाहणारे पाणी]
  3. नजरेचे पारणे फेडून टाकणारे [निसर्गाचे विहंगम दृश्य]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
का ते लिहा.
वरंधा घाटात आल्यावर ‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वाटते.
उत्तर:
वरंधा घाटात पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतले हिरवे रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी असे नजरेचे पारणे फेडून टाकणाऱ्या निसर्गाच्या विहंगम दृश्याकडे पाहून ‘घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ !’ असे वाटते.

कृती 3 : व्याकरण कृती.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे विभक्तीप्रत्यय सांगून विभक्ती ओळखा.
उत्तर:

शब्द विभक्तीप्रत्यय विभक्ती
पुण्याहून हुन पंचमी एकवचन
रंगाची ची षष्ठी एकवचन
मनाला ला चतुर्थी एकवचन

प्रश्न 2.
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा.

प्रश्न i.
असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते.
उत्तरः
शरीर – सामान्यनाम, आणि – उभयान्वयी अव्यय, वाटते – क्रियापद

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न ii.
असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते.
उत्तर:
विहंगम – विशेषण, समोर – शब्दयोगी अव्यय, अन् – उभयान्वयी उव्यय

प्रश्न 3.
योग्य जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
1. आवडती (अ) वारा
2. बेफाम (आ) रान
3. हिरवं (इ) गाणी
4. कुंद (ई) वातावरण

उत्तर:

विशेषण विशेष्य
1. आवडती (इ) गाणी
2. बेफाम (अ) वारा
3. हिरवं (आ) रान
4. कुंद (ई) वातावरण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. झाड – [ ]
  2. चाक – [ ]
  3. दगड – [ ]
  4. दृश्ये – [ ]

उत्तर:

  1. झाडे
  2. चाके
  3. दगड
  4. दृश्य

कृती 4 स्वमत

प्रश्न 1.
बंदिस्त चारचाकी गाडीपेक्षा दोनचाकी गाडीवर पावसाळ्यात प्रवास करणे आल्हाददायक असते का? तुम्हाला काय वाटते?
उत्तरः
पावसाळ्यात दोनचाकी गाडीवरून प्रवास करताना अधिक आल्हाददायक वाटते. हिरव्या नवलाईने नटलेले डोंगर डोळे भरून पाहता येतात. पावसाचे थंड तुषार चेहऱ्यावर झेलत प्रवास करण्यास अधिक मजा येते. थंड वाऱ्याची झुळूक मनस्थिती बदलून टाकते. हवे तिथे उभे राहून पावसाचा आनंद घेत निसर्गाची सुंदरता डोळ्यांत साठवता येते. म्हणूनच मला पावसाळ्यात दोन चाकीने प्रवास करणे जास्त आल्हाददायक वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 13

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. पावसाळी वातावरणातील चमचमीत मेनू – [ ]
  2. जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज किल्ला – [ ]
  3. काळ्याशार पाषाणात खोदलेली गोष्ट – [ ]

उत्तरः

  1. पावसाळी वातावरणातील चमचमीत मेनू – [भजी, वडे, चहा]
  2. जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज किल्ला – [कावळ्या किल्ला]
  3. काळ्याशार पाषाणात खोदलेली गोष्ट – [पाण्याची टाकी]

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा कसा तयार केला आहे?
उत्तर:
बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला फोडून वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
नऊ टाक्यांचा समूह कोठे आहे?
उत्तर:
श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ नऊ टाक्यांचा समूह आहे.

प्रश्न 3.
पायवाटच रंगिली असल्याने काय घडते?
उत्तर:
पायवाटच रंगिली असल्याने त्या ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात.

कृती 2 : आकलन कृती

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा …………………खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. (उत्कृष्ट, राजेशाही, बढिया, गरमागरम)
2. …………….. पाषाणात खोदलेली पाण्याची टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असते. (काळ्याशार,काळ्याकुट्ट,काळ्याभोर,काळ्याकुळकुळीत)
उत्तर:
1. राजेशाही
2. काळ्याशार

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत वेळ कसा जातो ते का कळत नाही?
उत्तरः
बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत भजी-वडे-चहाचा आस्वाद घेत, रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकतं, विजेचं लखकन् चमकणं, अन् कडाडणं, मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत वेळ कसा जातो ते कळत नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
कावळ्या किल्ला कोणासाठी सज्ज आहे?
उत्तरः
बरसणारा पाऊस पाहत बराच वेळ गेल्यानंतर थोडे भिजावेसे वाटणाऱ्यांसाठी, पाय मोकळे करावेसे वाटणाऱ्यांसाठी, थोडं डेअरिंग करावसं वाटणाऱ्यांसाठी, जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.

योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

अ गट ब गट
1. वरंधा घाटातील (अ) कावळ्या किल्ला सज्ज टपऱ्या
2. जिगरबाज भटके (आ) नऊ टाक्यांचा समूह
3. डोंगरमाथा (इ) भजी-बडे-चहा

उत्तर:

अ गट ब गट
1. वरंधा घाटातील (इ) भजी-बडे-चहा
2. जिगरबाज भटके (अ) कावळ्या किल्ला सज्ज टपऱ्या
3. डोंगरमाथा (आ) नऊ टाक्यांचा समूह

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखून लिहा.

  1. हार्ट डिस्क / हारट डिस्क / हार्ट डीस्क / हार्ट डिस्क्
  2. डेयरिंग / डेअरिंग / डेअरींग / डेयरींग

उत्तर:

  1. हार्ट डिस्क
  2. डेअरिंग

प्रश्न 2.
खालील शब्दांचे सामान्यरूप लिहा.

  1. घाट
  2. टपरी
  3. वातावरण
  4. रानवारा

उत्तर:

  1.  घाटा
  2. टपऱ्या
  3. वातावरणा
  4. रानवाऱ्या

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. वीज – [ ]
  2. शेवटचा – [ ]
  3. पाणी – [ ]
  4. पाषाण – [ ]
  5. तहान – [ ]
  6. किल्ला – [ ]

उत्तर:

  1. विद्युत
  2. अंतिम
  3. जल, जीवन, नीर
  4. दगड
  5. तृष्णा
  6. गड

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
भजी-वडे-चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या दहा-पंधरा मिनिटातच इथे जाऊन पोहोचता येते.
उत्तर:
भजी-वडे-चहाच्या टपरीच्या बाजूने अवघ्या दहा-पंधरा मिनिटातच इथे जाऊन पोहोचता येते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे.
उत्तर:
काळ्याशार पाषाणात खोदलेल्या पाण्याच्या त्या टाक्या कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे,

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही भेट दिलेल्या एका किल्ल्याची माहिती दया.
उत्तरः
आमच्या शाळेच्या सहलीत रायगड या किल्ल्यावर जाण्याचा योग आला. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासात त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान व महत्त्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेकही याच किल्ल्यात झाला.

सागरी दळणवळणासही हा किल्ला उपयुक्त होता. अशा या रायगडावर फिरताना सगळा इतिहास समोर उभा राहिला. रायगडाचं जुनं नाव रायरी होतं. या गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला शिवरायांचा पुतळा पाहून आम्हा सगळ्यांनाच एक स्फुरण चढले. अशा प्रकारे त्या भेटीत रायगडाचा सहवास घडला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 10

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 11

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. परत एकदा आपण ………….. रस्त्यावर येतो. (दगडी, डांबरी, मातीच्या, कच्च्या)
  2. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरूंद पायवाट एका .. ….. येऊन थांबते. (झाडापाशी, सपाटीवर, उंचीवर, कड्यावर)
  3. कोकणातला ………. पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं. (समुद्र, मेवा, पाऊस, निसर्ग)

उत्तर:

  1. डांबरी
  2. सपाटीवर
  3. निसर्ग

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेपासून ट्रेक कसा सुरू होतो?
उत्तर:
किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेपासून बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
वरंधा घाटाच्या कोकणात उतरत जाणाऱ्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून पाय घसरला तर काय होते?
उत्तर:
वरंधा घाटाच्या कोकणात उतरत जाणाऱ्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून पाय घसरला, तर थेट समर्थांच्या शिवथरघळीत माणूस पोहोचतो.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट 12

उत्तर लिहा.

प्रश्न 1.
वरंधा घाटाचे मस्त दर्शन कोठून घडते?
उत्तरः
डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरूंद पायवाट एका अरूंद सपाटीवर येऊन थांबते. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडे बाजूला करत शेवटी एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते. तिथूनच वरंधा घाटाचे मस्त दर्शन घडते.

प्रश्न 2.
खालील प्रसंगांनंतर काय घडते ते लिहा.
परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो.
उत्तरः
परत एकदा डांबरी रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते.

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

प्रश्न 1.
इथून पाय सटकला, कि थेट समर्थांच्या शिवथरघळीत!
उत्तरः
(,) = स्वल्पविराम, (!) = उद्गारवाचक चिन्ह.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 2.
निसर्गगीत अनुभवायला हवं.
उत्तरः
(.) = पूर्णविराम

प्रश्न 3.
खालील शब्दांचे नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सर्वांमध्ये वर्गीकरण करा.. डांबरी, किल्ला, स्थिरावते, बांधीव, आपण, दिसतात, अरूंद, ते, पायवाट
उत्तर:

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
किल्ला आपण डांबरी स्थिरावते
पायवाट ते बांधीव दिसतात
अरूंद

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

प्रश्न 4.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. काळजात लख्ख होणे – मनात भीती दाटून येणे.
वाक्य: पावसाचा रौद्र अवतार पाहून मुंबईकरांच्या काळजात लख्ख झाले.

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्य रूप
हाताच्या हात हाता
कोकणात कोकण कोकणा
पायवाटेवरून पायवाट पायवाटे
वळवायला वळवणे वळवाय

खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. सावध × ………..
  2. शांत × ………….
  3. अरूंद × ………..
  4. हसणे × ………..

उत्तर:

  1. बेसावध
  2. अशांत
  3. रूंद
  4. रडणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
ट्रेकला जाण्यापूर्वी कोणती तयारी करणे आवश्यक असते?
उत्तरः
आजकालच्या तरुणाई सोबतच शालेय विद्यार्थांमध्ये गड-किल्ल्यांवर ट्रेकला जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र ट्रेकला जाताना अनेक प्रकारची पूर्व तयारी करणे आवश्यक ठरते. ट्रेकला जाण्यापूर्वी ज्या गडावर ट्रेकसाठी जायचे आहे त्या गडाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. एखादा स्थानिक मार्गदर्शक सोबत असणे आवश्यक असते.

पादत्राणे अर्थात बूट ट्रेकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्तम प्रतीचे बूट घालूनच ट्रेक करावा. उन्हाळ्यात ट्रेक करताना पाण्याचा साठा असणाऱ्या गडाची निवड करावी. सूती कपडे घालावे. टोपी व गळयाभवती रूमाल बांधावा. पुरेसे पाणी जवळ बाळगावे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी रात्रीचा प्रवास करावा. पुरेशी दक्षता घेऊन केलेला ट्रेक निश्चितच आनंददायी ठरतो.

घाटात घाट वरंधाघाट Summary in Marathi

पाठपरिचय :

‘भटकंती अनलिमिटेड’ या पुस्तकातून घेतलेल्या ‘घाटात घाट वरंधाघाट’ या पाठात सह्याद्रीमधील वरंधाघाट, वरंधाघाटाची वैशिष्ट्ये व तेथील स्वानुभव लेखकांनी चपखलपणे मांडले आहेत.

The lesson ‘Ghatat Ghat Varandhaghat’ has been taken from the book ‘Bhatkanti Unlimited’ describes the specialities of ‘Varandha Ghat’ which is situated at Sahyadri. The writer also narrates his experiences about the Ghat in this chapter.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

शब्दार्थ :

  1. महिना – मास – month
  2. वारा – पवन, वायू – wind
  3. वार्ता – बातमी, वृत्त – news, message
  4. सरी – पावसाच्या धारा – showers
  5. सुगंध – सुवास – fragrance
  6. इंद्रधनुष्य – आकाशात दिसणारे – rainbow
  7. सप्तरंगी धनुष्य हुरहूर – अपेक्षा – expectancy
  8. गतकाळ – भूतकाळ – past
  9. कुंद – दमट – humid
  10. बंदिस्त – सगळया बाजूंनी बंद असलेले – closed
  11. पाणी – जल, उदक, नीर – water
  12. घाटी – चढण – ascent
  13. रान – जंगल, वन – forest
  14. विहंगम दृश्य – विलोभनीय दृश्य – panoramic view
  15. चमचमीत – मसालेदार, रूचकर – delicious
  16. चापणे – खाणे – to eat
  17. डोंगरमाथा – डोंगराचा सगळ्यात वरचा भाग – top of the mountain
  18. समूह – समुदाय – group
  19. पाषाण – दगड – stone
  20. वेध – लक्ष्य – attention, watch over
  21. बेफाम – बेभान – unrestrained
  22. प्रत्यय – अनुभव – experience
  23. रोरावत – रों रों आवाज करत – sound of water
  24. तहान – तृष्णा – thurst
  25. बांधीव – बांधलेल्या – built up
  26. अरूंद – मर्यादित, छोटे, संकुचित – narrow
  27. कारवी – एक झाड – one of the trees
  28. जोता – पाया – base
  29. अवशेष – शिल्लक राहिलेला भाग – relic, residue
  30. परतीचा प्रवास – return journey
  31. थरार – thrills

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट

वाक्प्रचार :

  1. वेध लागणे – एखाद्या गोष्टीकडे लक्ष लागणे, वाट पाहणे
  2. पोटभर मार खाणे – भरपूर मार खाणे
  3. आतुरतेने वाट पाहणे – मनापासून वाट पाहणे
  4. अर्थ उमगणे – अर्थ कळू लागणे
  5. प्रत्यय येणे – अनुभव येणे
  6. नजरेचे पारणे फिटणे – नजरेला अप्रतिम असे काही दिसणे
  7. सज्ज असणे – तयार असणे
  8. काळजात लख्ख होणे – मनात भीती दाटून येणे

टिपा :

शिवथरघळ – शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. या घळीला ‘समर्थ रामदासस्वामी सुंदर मठ’ म्हणत असत. घळीमध्ये रामदास स्वामींची मूर्ती आहे. समर्थ रामदास यांच्या ‘दासबोधाचा’ जन्म घळीत झाला. शिवथरघळाच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे.

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Prabhat Class 8 Marathi Chapter 3 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 3 प्रभात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 3 प्रभात (कविता) Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 3 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
उत्तरः
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला-गुणांच्या क्षितिजावर होणार आहे.

प्रश्न आ.
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
उत्तरः
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत तत्त्वांचे गुण रुजतील.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
उत्तर:
नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

2. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1

प्रश्न 1.
गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 2

3. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
1. सूर्योदय होऊन सकाळ झाली.
2. नवे युग उजाडले.
3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
उत्तरः
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न आ.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे
1. मानवांचे युग.
2. नव्या विचारांचे युग.
3. माणसांच्या प्रगतीचे युग.
4. भेदाभेद नसलेले युग.
उत्तरः
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे भेदाभेद नसलेले युग.

4. योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात (अ) व्यक्तित्वाची जडणघडण
2. प्रतिभेची प्रभात (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची (इ) नवनिर्मितीची पहाट
4. व्यक्तिमत्त्वाची (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात (इ) नवनिर्मितीची पहाट
2. प्रतिभेची प्रभात (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
4. व्यक्तिमत्त्वाची (अ) व्यक्तित्वाची जडणघडण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (1) चे उत्तर पहा.

प्रश्न आ.
तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (2) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (3) चे उत्तर पहा.

6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
(अ) नभात –
(आ) मनोहर –
(इ) अस्तित्त्वाची –
(ई) युगात –
उत्तर:
(अ) नभात – प्रभात
(आ) मनोहर – सुंदर
(इ) अस्तित्त्वाची – व्यक्तित्वाची
(ई) युगात – प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

प्रश्न अ.
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 3
उत्तर:
(अ) आकाश – [नभ]
(आ) सुगंध – [सुवास]
(इ) सुंदर – [मनोहर]
(ई) शरीर – [तन]

(आ) विशेष्ये व विशेषणांच्या योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न आ.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भव्य (अ) मन
2. अमूल्य (आ) युग
3.  नवे (इ) शिकवण
4. सुंदर (ई) पटांगण
5. विशाल (उ) जग

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भव्य (ई) पटांगण
2. अमूल्य (इ) शिकवण
3.  नवे (आ) युग
4. सुंदर (उ) जग
5. विशाल (अ) मन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

उपक्रम: ‘सुदृढ शरीर’ बनवण्यासाठी खालील मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा व वर्गात त्याचे वाचन करा.
1. व्यायाम
2. सवयी
3. आहार

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Important Additional Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
(i) नव्या युगाच्या नभात पसरलेले – [ज्ञानाचे तेज]
(ii) कलागुणांच्या क्षितिजावरती – [प्रतिभेची प्रभात]

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितीजावर उगवली आहे ?
उत्तरः
प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितीजावर उगवली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न ii.
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे?
उत्तरः
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण गुरुजनांनी दिली आहे.

प्रश्न 3.
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरुन कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या ……………………….
(नभात, आकाशात, ढगात, मेघात)
उत्तर:
नभात

प्रश्न ii.
कला गुणांच्या क्षितीजावरती ही प्रतिभेची ………………….
(सकाळ, दुपार, प्रभात, संध्याकाळ)
उत्तर:
प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
खालील पर्यायांपैकी योग्य पर्यायांची निवड करून कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या ………………….
(अ) धकाधकीच्या युगात
(आ) धावपळीच्या युगात
(इ) स्पर्धेच्या युगात
(ई) औक्योगिक युगात
उत्तरः
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात

प्रश्न ii.
मिटवून सारे भेद चला रे …………………
(अ) स्पर्धेच्या युगात
(आ) मानवतेच्या युगात
(इ) औक्योगिक युगात
(ई) धकाधकीच्या युगात
उत्तर:
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 5.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 4

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 5

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 6

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 7

प्रश्न 2.
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

  1. नव्या युगाच्या या आकाशात या ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे.
  2. इथे निरंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आपलेपणाचा, प्रेमाचा सुवास पसरला आहे.
  3. आपल्यातील सारे भेद मिटवून मानवतेच्या युगात सर्वांनी चालू या.

उत्तरः

  1. ‘हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात’
  2. ‘आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर’
  3. ‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पायाभरणी (अ) व्यक्तित्वाची
2. प्रयोगशाळा (आ) तत्त्वांची
3.  रुजवणूक (इ) अस्तित्त्वाची

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पायाभरणी (इ) अस्तित्त्वाची
2. प्रयोगशाळा (अ) व्यक्तित्वाची
3.  रुजवणूक (आ) तत्त्वांची

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
स्पर्धेच्या युगात गुरुजनांची अमूल्य शिकवण मिळाल्यामुळे या जगात वावरताना आमच्या अस्तित्त्वाची जाणीव आम्हांला झाली आहे. येथे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालविली जाते. त्या प्रयोगशाळेत रोज नवनवीन प्रयोग घडत असतात. आणि त्यामुळेच अशा वातावरणात आमचे तन (शरीर) सुदृढ बनले आहे आणि आमच्या मनाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत असे मला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 2.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तरः
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात आमचे तन सुदृढ झाले आहे. आमच्या मनाने नवीन विचार स्वीकारले असून त्याची कक्षा रुंदावली आहे. येथे नवीन आदर्श, नवीन मूल्य या तत्त्वांची रुजवणूक झाली आहे. ही नव विचारांची धारा आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या मनात नवीन स्वप्ने व नवीन आशा निर्माण होऊ लागल्या आहेत. हीच आमच्या प्रगतीची नवीन परिभाषा आहे असे मला वाटते.

प्रश्न 3.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तरः
आपल्या समाजाला लागलेली किड म्हणजे ‘भेदभाव’ होय. समाजातील सर्वच ठिकाणी सर्व प्रकारचा भेदभाव पहावयास मिळतो. त्यामुळे आपल्या समाजाची पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होताना दिसत नाही. माणूस म्हणून घ्यायचे असेल तर समाजातील हा भेदभाव समूळ नष्ट करावा लागेल आणि म्हणून कवी म्हणतात, की परिश्रमाने, अभ्यासाने आपल्या देशाला श्रेष्ठ, प्रगत बनवायचे असेल तर आपण सर्वांनी सारे भेद विसरून मानवतेच्या युगात जायला पाहिजे.

हा मला कळलेला वरील ओळींचा सरळ अर्थ आहे. ‘गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात’ या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः नव्या युगाच्या आश्वासक वातावरणात देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्यासाठी येथील गुरुजनांची अमूल्य अशी शिकवण या स्पर्धेच्या युगात महत्त्वाची आहे. अशाप्रकारे कला-गुणांच्या या क्षितीजावरती ही अलौकिक बुद्धिमत्तेची प्रभात झालेली आहे. असा या ओळींचा अर्थ आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती करा.
उत्तरः
1. कवी/कवयित्रीचे नाव – किशोर बळी
2. कवितेचा रचनाप्रकार – स्फूर्ती काव्य
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रस्तुत कविता किशोर, फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे.
4. कवितेचा विषय – देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

5. कवितेतून व्यक्त होणारा भाव –
नव्या युगात गुरूजनांच्या अमूल्य शिकवणूकीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. नवीन मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधारा आमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. सतत अभ्यास करून आपण आपल्या देशला प्रगतीपथावर नेऊया आणि आपल्यातील सर्वप्रकारचा भेदाभेद विसरून नव्या मानवतेच्या युगात आपण प्रवेश करुयात. असा भाव येथे कवी प्रकट करतात.

6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
कवीने आपल्या काव्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगाचे वर्णन करताना तशीच आवाहनात्मक भाषा वापरली आहे. नभात-प्रभात-युगात, मनोहर-सुंदर-निरंतर, युगात-प्रभात-रगारगांत अशा सारख्या यमक जुळवणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेत गेयता आणण्याचा प्रयत्न केला आहे. भव्य-पटांगण, अमूल्य-शिकवण, नवे-युग यांसारखी विशेषणे व विशेष्ये यांचा वापर करून कवितेतून त्या-त्या नामांची भव्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

7. मध्यवर्ती कल्पना –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत, अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा रुंदावत आहेत. नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे. सतत अभ्यास, सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्वप्रकारचे भेदाभेद मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे.

8. कवितेतून व्यक्त होणारा विचार –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभेद विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

9. कवितेतील आवडलेली ओळ –
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

10. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे –
आजकालची नवी पिढी ही आधुनिक विचारांनी भारलेली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाच्या एक पाऊल पुढे टाकणारी अशी आहे. परंतु या पिढीला कोणत्याही गोष्टीची आत्मीयता दिसत नाही. आदर, मान, सन्मान अशा नैतिक मल्यांचा न्हास होताना दिसत आहे. अशा वातावरणात नव्या पिढीला पुन्हा एकदा ही कविता आपल्या गुरुजनांची शिकवण आठवण्यास भाग पाडते.

आपले मन, व्यक्तीत्व कसे विशाल करावे याचे भान कविता करून देते. नव्या पिढीची नवी स्वप्ने, नव्या आशा पूर्ण करायच्या असतील तर त्याला परिश्रम, अभ्यास करावाच लागेल असे ही कविता सांगते. शेवटी आधुनिक विचाराने भारलेले आपण सारा भेद मिटवून माणूसकी फक्त टिकवून ठेवू असे सांगते. म्हणून ही कविता मला आवडते.

11. कवितेतून मिळणारा संदेश –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात तरुण पिढीला स्वत:मधील कलागुण विकसित करण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण आपल्या गुरूजनांचा मान ठेवून, त्यांच्या शिकवणीने पुढे पुढे वाटचाल करत समाजातील हर प्रकारचा भेद नष्ट करत देशाचे भविष्य उज्ज्वल करुया. असा संदेश या कवितेतून आपणास मिळतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा

प्रश्न 1.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. अशा या नव्या युगाच्या क्षितिजावरती एका वेगळ्या अलौकिक ज्ञानाची पहाट उगवलेली आहे असे कवीने वेगवेगळ्या अलंकारिक भाषेत प्रगट केलेले दिसते. कवीने येथे निसर्ग व आधुनिक माणूस यांची सांगड घातली आहे.

प्रश्न 2.
भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवी या कडव्यात आपल्या काव्यमय चमत्कृतीपूर्ण रचनेने सृष्टीतील विविध घटकांना वेगवेगळी वैशिष्ट्ये लावत आहेत असे दिसते. सृष्टी म्हणजे त्याला भव्य पटांगण वाटते. तेथील झाडे-झुडपे, शेत-मळे, डोंगर-दन्या त्याला बाग-बगीच्या सारखे वाटतात. या बागेत वावरणारे किटक, फुलपाखरे, पशू-पक्षी यांचे अस्तित्व सुंदर भासते.

येथील सर्व सजीव सृष्टीत आपुलकी, आपलेपणा भरल्यासरखा वाटतो आणि त्याच आपुलकीचा सुवास प्रत्येकाच्या मनामनात सतत आहे असे वाटते. या स्पर्धेच्या युगात गुरूजनांनी दिलेल्या शिकवणीला तो मौल्यवान मानतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
पायाभरणी अस्तित्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
या कडव्यातून कवीला वीररसाचा प्रत्यय येताना दिसतो. गुरूजनांनी शिकवलेल्या अमूल्य शिकवणूकीतून या सृष्टीत जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्याची जाणीव होऊन भूतलावरचे आमचे अस्तित्व कसे व किती आहे हे आम्हांला समजले आहे. त्याचबरोबर या सृष्टीच्या शाळेत अनेक नवे-नवे प्रयोग घडत असतात. त्यामुळे आमची जडण – घडण होते असे कवी सांगतात.

या सर्वांमुळे आमचे शरीर सुदृढ व मन विशाल होत आहे असे कवी वर्णन करतात. तसेच जी विचारसरणी आहे, त्याची जी शिकवण आहे ती आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते असे म्हणून कवीने वीर रसाचे वर्णन केले आहे.

प्रश्न 4.
नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवीने या कडव्यातून, आपल्या रचनेच्या माध्यमातून एक आशा व्यक्त केलेली दिसते. प्रस्तुत कवितेत नवीन स्वप्ने, नवीन आशा स्वत:जवळ बाळगून प्रगतीची जी नवी परिभाषा तयार करण्यात आलेली आहे. तिच्यायोगे आपण परिश्रम व अभ्यास करून आपल्या देशाची प्रगती करूया आपल्या देशाची शान वाढवूया.

आपल्या समाजात पसरलेला जो भेद आहे त्याला हद्दपार करून नव्या मानवतेच्या युगात पदार्पण करू असे कवी सांगतात. या वर्णनावरून कवीच्या मनातील आशावाद व राष्ट्रभक्ती हे दोन गुण प्रकर्षाने निदर्शनास येतात.

प्रभात Summary in Marathi

काव्यपरिचय :

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

The modern era of science and technology has opened new ways of knowledge for young generation. The new generation is getting new opportunities to develop their skills. In this promising atmostphere, the poet has asked everyone to forget differences and take our nation towards success.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

भावार्थ :

हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या नव्या युगात ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरलेला आहे. अशा या युगाच्या क्षितिजावरती कला-गुणांची एका उच्च प्रकारच्या | ज्ञानाची रम्य अशी पहाट उगवलेली आहे.

भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.

गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

फुला-पाखरांनी भरलेल्या अशा या सुंदर जगात भव्य असे पटांगण आहे. सुंदर अशी बाग आहे. येथील प्रत्येकाच्या मनात आपुलकीचा एक सुंदर सुवास निरंतर पसरलेला आहे. येथील गुरुजनांनी दिलेली शिकवण अमूल्य अशीच आहे. त्या शिकवणूकीची किंमत करता येत नाही. अशा प्रकारे या नव्या कला-गुणांनी भरलेल्या युगाच्या क्षितिजावर एक सुंदर अशी अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन ही पहाट उगवलेली आहे.

पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत,
रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात गुरुजनांच्या अमूल्य शिकवणीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. येथे आमचे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालते. अशा वातावरणात आमचे शरीर सुदृढ बनले आहे. मन विशाल होत आहे. आमच्या मनाच्या कक्षा रुंदावत आहेत. अशा वातावरणात आमच्यामध्ये आदर्शाची – मूल्यांची रुजवणूकच होत आहे. याच आदर्शाची – मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधाराआमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. अशा प्रकारे या नव्या युगात कला-गुणांच्या क्षितिजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आमच्या प्रगतीची नवी परिभाषा (व्याख्या) आहे. परिश्रम (कष्ट) करून, सतत अभ्यास करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर | घेऊन जाऊया. आपल्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवून नव्या विचारांच्या नव्या मानवतेच्या युगात प्रवेश करूया. अशा प्रकारे कलागुणांच्या या नव्या युगाच्या क्षितीजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

शब्दार्थ :

  1. तेज – प्रकाश – light
  2. युग – कालखंड – an era
  3. नभ – आकाश, गगन – sky
  4. कलागुण – अंगातील कौशल्य – skill
  5. प्रतिभा – अलौकिक बुद्धिमत्ता – genius
  6. प्रभात – पहाट – dawn
  7. भव्य – उत्तुंग, प्रशस्त – grand
  8. पटांगण – मोठे आवार, मैदान – a big open space, a courtyard
  9. बाग – बगीचा, उदयान – garden
  10. मनोहर – मनोवेधक, आकर्षक- attractive, charming
  11. आपुलकी – जवळीक, जिव्हाळा, आपलेपणा – affection, attachment
  12. सुवास – सुगंध – fragrance
  13. निरंतर – अखंड, नेहमी – always
  14. अमूल्य – बहुमोल, मौल्यवान – precious
  15. तन – शरीर, तनू – body
  16. सुदृढ – सशक्त, बळकट – healthy and strong
  17. नस – शीर, नाडी – vein
  18. रगारगात – पूर्ण शरीरात – in full body
  19. नव – नवीन – new
  20. परिभाषा – व्याख्या – definition
  21. उन्नत – उंच, श्रेष्ठ – raised, eminent

टीप :

क्षितीज – आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती वर्तुळकार मर्यादा.

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Natwandas Patra Class 8 Marathi Chapter 7 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 नातवंडांस पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 8th Marathi Chapter 7 नातवंडांस पत्र Question Answer Maharashtra Board

Std 8 Marathi Chapter 7 Question Answer

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 1

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 4

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
उत्तरः

(अ)
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 2

आ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 3

इ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 5

2. एका शब्दांत उत्तरे लिहा. 

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 6

प्रश्न 1.
एका शब्दांत उत्तरे लिहा.
उत्तरः
(अ) लेखक जेथे शिकले ते गाव – [सांगली]
(आ) लेखकाला मिळालेला पुरस्कार – [अर्जुन पुरस्कार]
(इ) खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण – [जिम]
(ई) लेखकाचा आवडता खेळ – [बॅडमिंटन]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.
उत्तरः
लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो. त्याप्रमाणे व्यायामही आपण न चुकता केला पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसांतून किमान तास – दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात.

प्रश्न आ.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.
उत्तरः
खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. प्रसगांचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे हरायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्यानं टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहर, हे स्वत:चा पडताळतो व त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून दयायचा हे ठरवतो, त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ही आपणच ठरवायला शिकू लागतो. खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

4. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.

प्रश्न 1.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
उत्तरः
दरवर्षी गणपतीसाठी गावाला जाणे हा आमचा नेम आहे. मागील वर्षीदेखील या निमित्ताने कोकणात जाण्याची वेळ आली. पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे डोंगर हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभा होता. कोकणात सूर्योदय पाहण्याची मज्जा काही औरच. पूर्व दिशेला पसरणारा लाल गुलाबी रंग मन मोहून टाकतो. शेतांच्या कामांची लगबग सुरू असते. काका व भावंडांसोबत नदीवर जाण्याचा कार्यक्रम ठरलेला, नदीचे थंड पाणी व वर मोकळे निरभ्र आकाश हा योग म्हणजे दुधात साखरच, एकूणच गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळणारे निसर्गसौंदर्य नजरसुखच म्हणता येईल.

खेळ्या शब्दांशी.

(अ) खालील तक्ता पूर्ण करा.
(आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न अ.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 7
उत्तरः

एकवचन अनेकवचन
पुस्तक पुस्तके
गाव गावे
मैदाने मैदान
नदी नदया

आ.
खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 8
उत्तरः

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
सांगली हे महाराष्ट्रातले आहे
गाव तुमचे कळते
तुम्हाला

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

चर्चा करूया :

‘वनडे क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.

लिहिते होऊया :

खालील मुद्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 11
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाचा :

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो. असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पत्रलेखन :

पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारिक पत्र

यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्हांला ‘अनौपचारिक’ या पत्र प्रकारांची ओळख झालेली आहे. आता आपण ‘औपचारिक’ __ पत्रप्रकाराची ओळख करून घेणार आहोत.
लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.
औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :

  1. ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा.
  2. भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी.
  3. पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे.
  4. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा.
  5. पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.

औपचारिक पत्र प्रारूप :

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 9
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 10

कृती- वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.

टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

भाषासौंदर्य :

आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

  • गळ्यातला ताईत – अत्यंत प्रिय व्यक्ती
  • बाळकडू – लहानपणीचे संस्कार
  • काथ्याकूट – निष्फळ चर्चा अष्टपैलू – अनेक बाबींमध्ये प्रवीण
  • अळवावरचे पाणी – अल्प काळ टिकणारे
  • अजातशत्रू – ज्याला कोणी शत्रू नाही असा
  • झाकले माणिक – गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य
  • इतिश्री – शेवट
  • अक्षरशत्रू – निरक्षर, अशिक्षित

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 12

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 13

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 14

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. मी माझे ……………. कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. (लहानपण, म्हातारपण, तरुणपण, बालपण)
  2. मी शिकायला ……………. होतो. (मिरजेला, सांगलीला, पुण्याला, कोल्हापुरला)
  3. सांगली हे ……………. तले एक गाव आहे. (तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, बंगाल)

उत्तर:

  1. बालपण
  2. सांगलीला
  3. महाराष्ट्र

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये काय होती?
उत्तर:
लेखकाच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती.

प्रश्न ii.
लेखक बागेत काय काय करायचे ?
उत्तर:
लेखक बागेत मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे, झाडांवर चढायचे, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचे.

प्रश्न iii.
सुट्टीमध्ये नातवंडांनी काय करावे असे लेखकाला वाटते?
उत्तर:
सुट्टीमध्ये नातवंडांनी मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी जावे असे लेखकाला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न iv.
शाळेच्या मैदानाजवळ काय होते?
उत्तर:
शाळेच्या मैदानाजवळ बाग होती.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 15

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 16

कारणे क्या.

प्रश्न 1.
लेखकाला पत्र लिहावे वाटले, कारण….
उत्तर:
लेखकाला नातवंडांशी प्रत्यक्षात बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येईलच असे वाटत नव्हते. म्हणूनच त्यांना नातवंडांना उद्देशून पत्र लिहावे वाटले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येतेच असे नाही. म्हणून वाटले, की तुम्हाला हे पत्र लिहावे.
उत्तर:

  • सारखे – शब्दयोगी अव्यय
  • म्हणून – उभयान्वयी अव्यय
  • हे – सर्वनाम
  • लिहावे – क्रियापद

प्रश्न 2.
जंगलातील विविध पशुंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो.
उत्तर:

  • आवाज – नाम
  • हा – सर्वनाम
  • मजेशीर – विशेषण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
खालील विशेषण व विशेष्यांच्या जोड्या जुळवा.

विशेषण विशेष्य
1.  मनसोक्त (अ) आकाश
2.  मोठे (आ) नदी
3.  मोकळे (इ) मैदान
4.  वाहती (ई) गप्पा

उत्तर:

विशेषण विशेष्य
1.  मनसोक्त (ई) गप्पा
2.  मोठे (इ) मैदान
3.  मोकळे (अ) आकाश
4.  वाहती (आ) नदी

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. मित्र – [ ]
  2. शिक्षिका – [ ]
  3. आई – [ ]
  4. पणजोबा – [ ]

उत्तर:

  1. मित्र – [मैत्रिणी]
  2. शिक्षिका – [शिक्षक]
  3. आई – [वडील]
  4. पणजोबा – [पणजी]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 4.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. बालपण – [ ]
  2. बाग – [ ]
  3. पक्षी – [ ]
  4. नदी – [ ]

उत्तर:

  1. लहानपण
  2. बगीचा
  3. खग
  4. सरिता

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा अनुभव सांगा.
उत्तर:
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब महाबळेश्वराला गेलो होतो. सातारा जिल्ह्यातील हे गिरीस्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी यांचा आस्वाद घेताना खूप मज्जा आली. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिंग पॉइंट या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन खूप प्रसन्न वाटले. पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर ही मंदिरे फक्त देवांचेच दर्शन घडवत नाही तर सृष्टीचा सुंदर देखावाही इथून पाहता आला. एकंदरीत महाबळेश्वर भेटीचा अनुभव अविस्मरणीय होता.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 17

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाला बॅडमिंटनची आवड कधी लागली होती?
उत्तर:
लेखकाला बॅडमिंटनची आवड त्यांच्या लहान वयातच लागली होती.

प्रश्न ii.
लेखक विजेते खेळाडू कसे होऊ शकले ?
उत्तरः
सातत्यपूर्ण परिश्रम करून लेखक विजेते खेळाडू होऊ शकले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. …………सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. (राष्ट्रीय, तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, आंतरराष्ट्रीय)
  2. मला …………….. पुरस्कार मिळाला. (खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य)
  3. खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात …………… येते. (शिस्त, समृद्धी, एकाग्रता, कुशलता)
  4. ………………….. आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, क्रिकेटची, हॉकीची, कबड्डीची)

उत्तर:

  1. आंतरराष्ट्रीय
  2. अर्जुन
  3. शिस्त
  4. बॅडमिंटनची

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 18

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
उत्तरे क्या.
उत्तर:

  1. लेखकाच्या फोटोत लेखकाच्या – [निरनिराळे चषक हाती असणाऱ्या गोष्टी वढाली]
  2. लेखकाच्या मते दररोज हे – [व्यायाम केले पाहिजे.]
  3. पत्र लिहिताना लेखकाचे वय – [66 वर्षे]

काय घडले ते सांगा.

प्रश्न 1.
लेखकाचा व्यायाम झाला नसेल, तर……
उत्तर:
लेखकाचा व्यायाम झाला नसेल तर त्यांना जेवावेसे वाटत

कारणे क्या.

प्रश्न  1.
‘मला वेळ नाही, ही सबब सांगू नका’ असे लेखक म्हणतात.
उत्तर:
प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा ही लेखकाची इच्छा आहे. व्यायामासाठी वेळ नाही हे म्हणणे त्यांना पटत नाही. आपण वेळ नाही म्हणून जेवण करायचे थांबत नाही. जेवणासाठी बरोबर वेळ काढतो. असे असताना व्यायामही वेळातवेळ काढून करावा ही इच्छा असल्याने मला वेळ नाही, ही सबब सांगू नका असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यातील अव्यये ओळखून प्रकार लिहा.

प्रश्न i.
माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो.
उत्तरः

  • पुरते : शब्दयोगी अव्यय
  • मध्ये : शब्दयोगी अव्यय
  • फारसा : क्रियाविशेषण अव्यय
  • तर : उभयान्वयी अव्यय

प्रश्न ii.
प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे.
उत्तर:
दररोज – क्रियाविशेषण अव्यय.

खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न i.
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो
उत्तर:
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो?

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न ii.
मग तो क्रिकेट टेनिस बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे
उत्तरः
मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हांला जो कोणता आवडत असेल तो असू दे.

तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द विभक्ती प्रत्यय विभक्ती
1. खेळायला ला चतुर्थी एकवचन
2. सातत्याने ने तृतीया एकवचन
3. आयुष्यात सप्तमी एकवचन
4. वयाच्या च्या षष्ठी अनेकवचन

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. ढाली – [ ]
  2. खेळ – [ ]
  3. सबब – [ ]
  4. वर्ष – [ ]

उत्तरः

  1. ढाली – [ढाल]
  2. खेळ – [खेळ]
  3. सबब – [सबबी]
  4. वर्ष – [वर्ष]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सतत काम, अवेळी जेवण, ताणतणावपूर्ण आयुष्य यांवर मनाला तजेला देणारा व शरीर निरोगी ठेवणारा उपाय म्हणजे व्यायाम, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना दीर्घ जीवनाचे वरदान मिळते त्यांची कार्यक्षमता वाढते. हाडांची मजबुती, शरीराच्या अवयवांचा समन्वय, नितळ त्वचा यांसारखे अनेक फायदे व्यायामामुळे होतात, व्यायाम करणाऱ्याचे शरीर सुडौल राहते. माणसाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाचे अगणित फायदे आहेत, असे म्हणता येईल.

खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती

1. आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 19

ii
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 20

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या मते, व्यायामासाठी किती तास काढले पाहिजेत?
उत्तर:
लेखकाच्या मते व्यायामासाठी तास – दोन तास काढले पाहिजेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न i..
ई-मेल, इंटरनेटचा काय फायदा होतो?
उत्तरः
ई-मेल, इंटरनेटमुळे आपल्याला घरबसल्या, हवी ती माहिती मिळू शकते.

प्रश्न iii.
लेखक आपल्या नातवंडांना काय सल्ला देतात?
उत्तरः
लेखक आपल्या नातवंडांना मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू न देण्याचा सल्ला देतात.

खालील इंग्रजी शब्दांना उताऱ्यात आलेले मराठी शब्द शोधा.

प्रश्न  1.

  1. ग्राऊंड
  2. सेल्फडिपेंडन्ट
  3. मिडियम ऑफ कॉन्टॅक्ट
  4. बॉल

उत्तर:

  1. मैदान
  2. स्वावलंबी
  3. संपर्कमाध्यमे
  4. चेंडू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 2: आकलन कृती

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे ……………………….. व्हा. (पालक, शिक्षक, मार्गदर्शक, उद्धारक)
  2. येत्या ……………. तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, नववर्षासाठी, दशकासाठी, शतकासाठी)

उत्तर:

  1. शिक्षक
  2. सहस्त्रकासाठी

खालील विधानांमागील कारणे शोधा.

प्रश्न 1.
तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे शिक्षक व्हा.
उत्तरः
लेखकाच्या मते, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते. आयुष्यात येणारे प्रत्यक्ष अनुभव खूप काही शिकवून जात असतात. त्याकरता स्वत:बरोबरच आजूबाजूलाही लक्ष देणे गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत: चे शिक्षक व्हा, असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
तुम्ही स्वत:वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे.
उत्तर:
आयुष्यात शाळा कॉलेजात जे शिकवले जात नाही ते सगळे प्रत्यक्ष अनुभव शिकवत असतात. आपण स्वत:च आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय ते ओळखायला शिकायचे असते. म्हणजे थोडक्यात स्वत: वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे.

प्रश्न 3.
उत्तर लिहा. तिसऱ्या सहस्त्रकाचे कोणते विशेष लेखकाने सांगितले आहेत.
उत्तरः
तिसऱ्या सहस्त्रकामध्ये संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाका वाढतो आहे. आता आपल्या घरी, बसल्या जागी, हवी ती माहिती आपल्याला ई-मेल व इंटरनेट द्वारे मिळू शकते. हे तिसऱ्या सहस्त्रकाचे विशेष लेखकाने सांगितले आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1. आयुष्यातील आयुष्य आयुष्यात
2. आवाकाही आवाका आवाका
3. मित्रांशी मित्र मित्रां
4. रेषेच्या रेष रेषे

प्रश्न 2.
खालील शब्दांचे त्यांच्या लिंगानुसार वर्गीकरण करा.
व्यायाम, मैदान, शाळा, चेंडू, कुटुंबिय, रेष, ई-मेल
उत्तरः

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
1. व्यायाम शाळा मैदान
2. चेंडू रेष कुटुंबिय
3.  ई-मेल    

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. खुला × [ ]
  2. शिक्षक × [ ]
  3. स्वावलंबी × [ ]
  4. मित्र × [ ]

उत्तर:

  1. बंद
  2. विदयार्थी
  3. परावलंबी
  4. शत्रू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न i.
तुम्हि व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहीजे.
उत्तर:
तुम्ही व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहिजे.

प्रश्न ii.
येत्या सहसत्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!
उत्तर:
येत्या सहस्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
‘तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका’ या वाक्याचा तुम्हांला कळलेल्या अर्थ लिहा.
उत्तरः
आपण तिसऱ्या सहस्त्रकात प्रवेश केला असून अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला भुरळ घालत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली साधने वापरण्यास सोपी असल्याने अशा गोष्टींचा वापर करून आप्तेष्टांशी संपर्कात राहणे सोपे झाले आहे. व्हॉटस्अप फेसबूक, ट्वीट्, इन्स्टाग्राम यांसारख्या अॅप्समुळे आपण कधीही न पाहिलेल्या नातेवाईकांशीही संपर्कात राहत असलो तरी पूर्वीइतके प्रेम, प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटितला ओलावा त्यातून जाणवत नाही. ते तोंडदेखले नाते उरते. म्हणूनच आपण मित्रांशी, कुटुंबियांशी व्यक्तिगत संपर्क ठेवणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

नातवंडांस पत्र Summary in Marathi

पाठपरिचय :

लेखक नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटनपटू राष्ट्रीय विजेते आहेत. आपल्या नातवंडांशी पत्ररूपाने संवाद साधताना लेखक त्यांना निसर्ग सान्निध्यात गेलेले बालपण, आपली बॅडमिंटनची आवड, त्यासाठी लागणारे सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले उज्ज्वल यश यांविषयी मार्गदर्शन करतात.

The writer of this chapter Nandu Natekar is Famous batminton champion. In this letter, writer narrates to his grandchild about his own childhood memories which had been spent in nature, his love towards badminton, continouous dedication towards it and success gained through it.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

शब्दार्थ :

  1. माया – प्रेम – love
  2. हुंदडणे – फिरणे – to rome
  3. मनसोक्त – मन भरेपर्यंत – to one’s heart’s content
  4. गिरिस्थान – पर्वतावरील ठिकाण – mountain place
  5. थवा – पक्ष्यांचा समूह – flock of birds
  6. आकाश – आभाळ, गगन – sky
  7. नदी – सरिता – river
  8. नजराणा – मौल्यवान भेट – precious gift
  9. चषक व ढाली – trophy & shield
  10. परिश्रम – कष्ट – hardwork
  11. सबब – कारण – reason
  12. स्वावलंबी – स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर – self reliant
  13. सहस्त्र – हजार – thousand
  14. दळणवळण – परस्पर संपर्क – inter – अथवा व्यवहार communication
  15. आवाका – विशालता, आकार – magnitude
  16. व्यक्तिगत – स्वत:पुरते – individual
  17. संपर्क – संबंध – contact

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाक्प्रचार :

  1. मजा लुटणे – आनंद घेणे
  2. सामना करणे – तोंड देणे, परिस्थितीला सामोरे जाणे
  3. पडताळून पाहणे – बरोबर असल्याची खात्री करून घेणे

टिप :

अर्जुन पुरस्कार – राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार होय. ही प्रथा 1961 मध्ये सुरू करण्यात आली. 3 लाख रूपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे, हा या पुरस्करामागील उद्देश आहे.

Marathi Sulabhbharati Class 8 Solutions

Vishwakosh Question Answer Class 9 Marathi Chapter 20.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20.1 विश्वकोश Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 20.1 विश्वकोश Question Answer Maharashtra Board

विश्वकोश Std 9 Marathi Chapter 20.1 Questions and Answers

1. टिपा लिहा:

प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग.
उत्तर:
शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अदययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

प्रश्न 2.
विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया.
उत्तर:
मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले – मुख्य, मध्यम व लहान नोंदी. त्यांतील मुद्द्यांची टाचणे करण्यात आली.

नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारांनुसार यादया तयार करण्यात आल्या. अकारविल्यानुसार या यादया क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत.

2. ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.

प्रश्न 1.
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
विविध मासिकांमधून व वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने-नवे शब्द कळतात. आपली शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दांचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो.

उदाहरणार्थ, जंगल या शब्दाला – अरण्य, रान, वन, कानन, विपीन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो. शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या यांची जाण शब्दकोड्यामुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.

3. विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तर:
आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतनीस होतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषयसाखळीमुळे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात.

4. केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
उत्तर:
मोकळे केस इतरांना दिसू नयेत, म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा. लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढवणे हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे, हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो. केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

5. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
उत्तर:
मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची व्युत्पत्ती, तिचा इतिहास, वेदांपासून ते अदययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास मदत होईल.

भाषा सौंदर्य:

विश्वकोश अकारविल्ल्यानुसार (अनुज्ञेय) पाहाबा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णमाला (आता अँव ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णाची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).

प्रश्न 1.
पुढील कोडे सोडवा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 1

  1. पैसे न देता, विनामूल्य.
  2. पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
  3. जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
  4. रहस्यमय.
  5. खास महाराष्ट्रीय पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 2
वरील कोडे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्य व गंमत लक्षात येईल. अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घ्या व अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

मैत्री तंत्रज्ञानाशी:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 3
वडील: (सोनालीच्या आईशी बोलताना.) “अग, लाईटबिल भरण्याची अंतिम तारीख आजच आहे; पण आज माझी ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे. काय करावं बरं?”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 4
सोनाली: “बाबा, एवढी काळजी कशाला करता, लाईट बिलच भरायचय ना? आणा इकडे, मी भरते एका मिनिटांत, तेही उन्हातान्हात बाहेर न जाता, धावपळ न करता.”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 5
सोनाली: “अग आई, एवढं आश्चर्यानं काय पाहतेस? आपल्याकडे संगणक आहे, आंतरजाल आहे. आता आपण ऑनलाईन बिल घरच्या घरी भरू शकतो. चल आई, मी तुला ऑनलाईन बिल कसे भरायचे ते दाखवते.”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 6
आई: (मुलगी ऑनलाईन बिल भरते. आई-वडील तिच्या कृतींचे निरीक्षण करतात.) “शाबास बाळा! किती आत्मविश्वासाने संगणक हाताळतेस. बाजार करणं, बिलं भरणं, खरेदी करणं, वस्तू विकणं, असे ऑनलाईन व्यवहार मलाही शिकव.”

प्रश्न 1.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
उत्तर:

  1. लाईट बिल भरणे
  2. टेलिफोन बिल भरणे
  3. गॅसचे बिल भरणे
  4. आवश्यक वस्तू खरेदी करणे
  5. वस्तू विकणे
  6. गृहोपयोगी वस्तूंची मागणी करणे
  7. प्रवासासाठी बस, रेल्वे, विमान किंवा खाजगी वाहन यांची बुकिंग करणे
  8. भेटवस्तू पाठवणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

उपक्रम:

प्रश्न 1.
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध अॅप्स कोणते?
त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.

विश्वकोश Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात विश्वकोशाची ओळख करून दिली आहे. विश्वकोश का व कसा तयार झाला, वेगवेगळे संदर्भ मिळवण्याची आनंददायी प्रक्रिया, भाषासमृद्धी, तसेच एका विषयाच्या निमित्ताने अनेक संलग्न विषयांची माहिती मिळणे, ही विश्वकोशाची वैशिष्ट्ये आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. आपल्या शाळेत, गावात, शहरात ग्रंथालय (वाचनालय) असते. मराठीतील विविध साहित्यसंपदा व अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध होतात. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, मराठी व्युत्पत्तिकोश इत्यादी ग्रंथसंपदा हा प्रत्येक ग्रंथालयाचा ‘मानबिंदू’ आहे.
2. मानव्यविदया (Social sciences), विज्ञान (Pure science) व तंत्रज्ञान (Technology) यांतील सर्व विषयांचे आजतागायतचे ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो.
3. विश्वकोशाची गरज: भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊ लागला. वाढत्या औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध होऊ लागली. त्यामुळे सर्वविषयसंग्राहक अशा विश्वकोशाची गरज निर्माण झाली.

उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झाला. त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भग्रंथांची तीव्र आवश्यकता, तसेच शासनव्यवहाराची भाषा म्हणून राज्यपातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्वविषयसंग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवली.

1. विश्वकोश असा तयार झाला…

  1. विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली.
  2. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली.
  3. मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली.
  4. नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या.
  5. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या यादया तयार केल्या गेल्या.
  6. अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या.

1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे अठरा खंड प्रसिद्ध आहेत.

2. विश्वकोश यासाठी पाहावा…

  1. आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी.
  2. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयांतील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी.
  3. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी.
  4. सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी.

3. विश्वकोश असा पाहावा…
1. शब्द अकारविल्हे (अनुज्ञेय) नुसार पाहावेत.
2. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा.

4. मूलध्वनी (मराठी वर्णमाला):
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 7.1

5. व्यंजने (34)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 8
स्वर + व्यंजने = अक्षरे/अर्थपूर्ण क्रमाने येणारी अक्षरे = शब्द/ अर्थपूर्ण शब्दांचा समूह = वाक्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

चौदाखडी:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 9
तुम्हांला आवडणारे कोणतेही शब्द… त्यांचे अर्थ… संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता एका क्लिकवर – https://en.wikipedia.org/wiki/Marathi_Vishwakosh

1. मुलांना आवडणारी शब्दकोडी व फँशनपैकी केशरचना या ” शब्दांचे संदर्भ विश्वकोशाच्या आधारे दिले आहेत.

1. शब्दकोडी:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 10
अशा कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो.

1. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्याचे लेखक ओळखण्यास सांगणे.
2. एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे.
3.  काही शब्दांतील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे.

2. पुढील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा:

  1. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
  2. एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण …’
  3. तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
  4. ‘सुधारक’चे संपादक.
  5. कवी यशवंत यांचे आडनाव.
  6. एका विनोदी साहित्यिकाचे आडनाव.
  7. मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
  8. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

उत्तरांसह कोड्याची आकृती : (पाठ्यपुस्तकानुसार)

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 11

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

2. केशभूषा:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 12

आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरिता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावत.
( केशभूषेचा उगम यातून झाला असावा. )
(केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी.)
अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात.

9th Std Marathi Questions And Answers:

12th Sociology Chapter 1 Exercise Introduction to Indian Society Question Answer Maharashtra Board

Sociology Class 12 Chapter 1 Introduction to Indian Society Question Answers Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society Textbook Exercise Questions and Answers.

Introduction to Indian Society Class 12 Sociology Chapter 1 Questions and Answers

1A. Complete the following statements by choosing the correct alternative given in the brackets and rewrite it.

Question 1.
Monks in Buddhist monasteries were called __________ (Bhikkus, Bhikkhunis, Rishis)
Answer:
Bhikkus

Question 2.
The Special Marriage Act was passed in the year __________ (1950, 1952, 1954)
Answer:
1954

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

1B. Correct the incorrect pair and rewrite it.

Question 1.
(a) Raj Marg – Hinduism
(b) Teerthankar – Jainism
(c) Saint Thomas – Sikhism
(d) Eight-fold Path – Buddhism
Answer:
(c) Saint Thomas – Christianity

1C. Identify the appropriate term from the given options in the box and rewrite it against the given statement.

Brahmo Samaj, Dr. B. R. Ambedkar, Harijan Sevak Sangh

Question 1.
An association was established by Raja Rammohan Roy.
Answer:
Brahmo Samaj

Question 2.
Head of the Drafting Committee of the Constitution of India.
Answer:
Dr. B.R Ambedkar

1D. Correct underlined words and complete the statement.

Question 1.
Elementary education was imparted in Khanqahs during the medieval period.
Answer:
Elementary education was imparted in Maktab during the medieval period.

Question 2.
The Theosophical Society was the Initiative of Mahatma Gandhi.
Answer:
The Theosophical Society was the Initiative of Annie Besant.

2. Write short notes.

Question 1.
Education during the Early Vedic period.
Answer:
During the Early Vedic period the content of education was based on sacred literature which was written in Sanskrit – which was not the language of the masses. The Yajur Veda commands education for all classes including women. The Atharva Veda states that “all classes have an equal right to study the Veda”.

To enter Vedic schools, it was a prerequisite for students of the first three Varnas to perform the Upanayana thread ceremony and they had to observe Brahmacharya for as long as they lived at the school to study the Vedas. There was an oral tradition of imparting knowledge, which was through rote-learning. Enunciation and pronunciation were an integral part of the oral tradition of learning. The aim of education was to sharpen the intellect as well as for character formation. Value was attached to being truthful, carrying out one’s duties (dharma), devotion to the guru and to one’s parents, hospitality, faith, and generosity.

The Kshatriyas learned the art of warfare and administration. Vaishyas studied trade and commerce and Shudras learned agriculture and animal husbandry. The Brahmanas stayed in the school until they attained mastery of the four Vedas They were known as Brahmanas – the possessors of Brahman (supreme knowledge)

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Question 2.
Status of women during the Medieval period.
Answer:
The status of women deteriorated in Medieval India. Invasions from the Central Asian region along with zealous Brahmanical iron laws were the main causes for the degradation were Invasions from the Central Asian region and zealous Brahmanical iron laws.

Freedom of women was curtailed, knowledge of the scriptures and literacy was denied to them and her status was reduced to being dependent on men throughout her lifetime. Only women from upper castes and aristocracy were given education in private.

Widow remarriage which was permitted in the Vedic period came to be considered taboo. Women continued to be excluded from family inheritances. Practices of child marriage, sati, purdah system, and Devadasi system made women the objects of exploitation.

The patriarchal joint family, the customs of polygamy, and early marriage – all contributed to Curtailing the free development and growth of women.

3. Write differences.

Question 1.
Status of Women in the Early Vedic period and Later Vedic period.
Answer:

Status of Women in the Early Vedic period Status of Women in the Later Vedic period
(i) Status: Indian women enjoyed a high status during the early Vedic period. (i) Status: There was a decline in the status of women in society in the Later Vedic period.
(ii) Education: Women during the Early Vedic period had access to Vedic education. (ii) Education: Women during the later Vedic period were denied access to education.
(iii) Participation in Social Activities: Women during the Early Vedic period could participate in social assemblies (vidath). (iii) Participation in Social Activities: Women during the Later Vedic period were barred from attending social assemblies.
(iv) Marriage: Women during the Early Vedic period could pursue their education just until they were married or could remain unmarried. Adult marriage was practiced. (iv) Marriage: Later Vedic period was the beginning of the practice of dowry and child marriage.

Question 2.
Education in the Ancient Period and Colonial Period in Indian society.
Answer:

Education in the Ancient Period in Indian society Education in the Colonial Period in Indian society
(i) Education: In ancient times, education was provided on the basis of the caste system under the guidance of a guru. (i) Education: Schools and colleges were open to all individuals, irrespective of caste, creed, gender, etc.
(ii) Medium of Instruction: During the ancient period education was imparted orally and the medium of instruction was Sanskrit. (ii) Medium of Instruction: During the coloanal period medium of instruction was English and in written form.
(iii) The Content of Education: The content of education was religion-oriented. (iii) The Content of Education: The content of education was not religion-oriented It was secular.
(iv) Values: The education was based on values like truthfulness, carrying out one’s duties (dharma), devotion to the guru and to one’s parents, hospitality, faith, and generosity. (iv) Values: The education was based on values like rationality, equality, social justice, secular approach, and individualism.
(v) Centre of Education: During ancient times Buddhists established Nalanda and Takshashila which were centers of education. Centre of Education: During the Buddhist period, the British established Universities, at Calcutta, Bombay, and Madras.

4. Explain the following concepts with examples.

Question 1.
Varna
Answer:
During the ancient period, Hindu society was divided into four Varna’s namely: The Kshatriyas learned the art of warfare and administration. Vaishyas studied trade and commerce and Shudras learned agriculture and animal husbandry.

The Brahmanas stayed in the school until they attained mastery of the four Vedas. The first three varnas began to call themselves the upper varnas. They became the ‘twice-born (dvija) because they were entitled to the initiation ceremony (upanayana)

In the beginning, there was flexibility and fluidity with respect to occupation. It was only towards the end of the Vedic period that Varna turned into a rigid jati (caste) hierarchy based on the ideology of purity and pollution. Notions of purity and pollution continue to be followed in everyday practices such as food and water intake, dressing, occupation, worship, social interactions, travel, etc. Thus, the flexible varna system was converted into a rigid caste system.
Example:

  • Brahmin – priests, teachers, intellectuals
  • Kshatriya – rulers, and warriors
  • Vaishya – merchants’ traders, farmers
  • Shudra – menial work

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Question 2.
Social Legislation
Answer:
It refers to laws passed to promote social justice, social welfare, desirable social change, as well as protection of vulnerable and weaker sections of Indian society.

The increase in the number of reformative groups enabled Indians to exert pressure upon the British government, for passing laws against prevalent social evils. Concerns and problems of people and administration get recognized through academic research, scientific studies, media, advocacy groups, and interest groups. Laws are enacted accordingly.

It may be noted that laws by themselves cannot transform society, but they provided hope to those who were victims of injustice oppression, exploitation, and abuse.

Example:
Some significant legislation include

  • 1829 – The Sati Prohibition Act
  • 1843 – The Indian Slavery Act
  • 1856 – The Hindu Widow Remarriage Act
  • 1872 – The Civil (or Special) Marriage ACT
  • 1929 – The Child Marriage Restraint Act

5A. Complete the concept map.

Question 1.
Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society Q5A
Answer:
Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society Q5A.1

5B. State whether the following statements are True or False with reasons.

Question 1.
The colonial rule has a significant impact on Indian society.
Answer:
This statement is True.

The British continued to rule India till the 20th century. Several systems were set in place under British rule in India. Some of the social reforms were also possible because of British policies. Let us look at some consequences of colonialism in India which had a significant impact on Indian society.

Education: The British set up a system of education that had a far-reaching impact on Indian society. The medium of instruction in the high school communication among the learned people now became English, schools, and colleges were open to all individuals, irrespective of caste, creed, gender, etc.

The content of education was secular – which included subjects like Mathematics, Science, Philosophy, Sociology, History, etc.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

This led to the rise of a new class of intelligentsia, who were of Indian origin but trained in ‘Western’ values, customs, and practices. Some of them played a significant role in the reform movements.

New values like rationality, equality, social justice, secular approach, and individualism gained firmer ground in Indian society.

Culture: Many of the educated elite took to the lifestyle of the British with respect to food habits, dressing, customs mannerisms, attitudes, beliefs, language, sports, and entertainment, etc., M. N. Srinivas referred to this process of imitation of the British, as ‘westernization’.

Administration: The British started new systems of administration like the Economic Service, Education Service, Revenue Service, and Administrative Service. It was the English-educated Indians who entered the administrative services to assist the British rulers in governing the land and its people.

A new judiciary system was created, which took into consideration the earlier legal traditions of the Indian communities. However, its implementation was carried out on a secular basis; each individual was judged on an equal basis, irrespective of one’s caste and creed.

The Indian Councils Act, The Indian High Court Act, and The Indian Civil Service Act of 1861, all led to major changes in the Executive, Legislative and Judicial administration of India.

Question 2.
Buddhism spread to several parts of India and beyond.
Answer:
This statement is True.

The teachings of Gautama Buddha did not make reference to the concept of God. Also, the sacred literature (Tripitkas) was written in the language of the common people, namely, Pali. Buddha made monasticism an inseparable part of his creed. The function of monasticism was to provide suitable conditions for personal and societal development.

Thus, Jainism and Buddhism are perceived as ‘protest religions’. Both these religious traditions opened their doors to all sections of society. The right to salvation was no longer limited to a particular stratum of society. Understandably, Buddhism with its fewer rigid rules and regulations in comparison to Jainism was embraced by many.

Buddhism gave great importance to the moral upliftment of human beings and directed people to lead moral lives. It insisted on virtues like charity, self-sacrifice, control over passions, and non-injury in thought and action. These virtues are also advocated in the Upanishads and also widely practiced through the Buddhist way of life.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Buddhism thus spread far and wide even beyond the boundaries of India because of the patronage of the Mauryan emperor, Ashoka. As a missionary religion, Buddhism spread to foreign lands like Tibet, China, Japan, Mongolia, Burma, Java, Sumatra, and Sri Lanka.

6. Give your personal response.

Question 1.
Jainism and Buddhism provided hope to all people.
Answer:
In the Later Vedic period, the caste system and Brahminic supremacy became entrenched. Caste groups became rigid with the passage of time. The varna system now turned into an oppressive Jati (caste) system.

In all this, women became doubly oppressed. Jainism and Buddhism are perceived as “protest religions”. Both these religious traditions opened their doors to all sections of society.

The right to salvation was no longer limited to a particular stratum of society. Understandably, Buddhism with its fewer rigid rules and regulations in comparison to Jainism was embraced by many.

Gautama Buddha permitted women to join his monastic community and to fully participate in it. Buddhist doctrines do not differentiate between women and men, since everyone, regardless of gender, status or age, is subject to old age, illness, and mortality, thus suffering applies to all.

Several Jain nuns have played a very active part in the abolition of sati practice, abolition of slavery of women, and in the prohibition of animal sacrifices.

Jainism, being a religion of religious equality, is devoted to recognizing the rights of all living creatures. Jainism and Buddhism opposed the caste system in India. Thus, Jainism and Buddhism provided hope to all people.

Question 2.
Social reform movements are present even in 21st century India.
Answer:
A social movement is a mass movement and a collective attempt of people to bring about a change or to resist any change. In the 21st century, India, Industrialisation, and urbanisation technological advancements, and ongoing democratization have allowed people to push for change collectively, and question the legitimacy of the existing order. Social movements can be defined as collective challenges based on common purposes.

The emancipation of women, the spread of mass education, the removal of untouchability, the equality of opportunity for both the sexes and the growth of secularism are some examples of cultural drift which have led to the emergence of social movements today.

Changing society is, to some extent, disorganized because changes in different parts of society do not take place simultaneously. One part changes more rapidly than the other, thereby producing numerous lags. When there is an absence of social justice and a threat to the environmental system, social movements emerge.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

For example, Meira Paibi struggle in Manipur was for the safety and well-being of their community. They have shifted their focus from anti-alcoholism to human rights. Women played a major role in this movement. Meria Paibi led a boycott of elections and used relay hunger strikes as means to fight for their rights. Irom Sharmila had been on hunger strike for nearly 16 years.

7. Answer the following question in detail. (About 150-200 words)

Question 1.
Discuss with relevant examples, how the following factors have changed Indian society today.
(i) English medium of instruction
(ii) Lowering the age for voting
(iii) Social legislations
(iv) Transport and Communication
Answer:
(i) English medium of instruction: Education in the English language was introduced by the British in India. The increased economic and cultural influence of globalisation has spread English, as has the rapid spread of the Internet and other technologies. As a result of this, in many states throughout Indian society where English is not the predominant language, there are English-medium schools. Also in higher education, due to the recent trend towards internationalization an increasing number of degree courses, are being taught through the medium of English.

(ii) Lowering the age for voting: The present-day youth are literate and enlightened and the lowering of the voting age has provided the unrepresented youth of the country an opportunity to express their feelings and opinions and help them become a part of the political process. It has increased the political participation of the people and the creation of public opinion.

(iii) Social Legislation: It refers to laws passed to promote social justice, social protection of vulnerable and weaker sections of Indian society. Concerns and problems of people and administration get recognized through academic research, scientific studies, media, advocacy groups, and interest groups.

Laws are made by the Indian Parliament. Several laws related to civil and criminal matters have been enacted, which may be amended or repealed. The problems of differences in caste, sex, religion, poverty, terrorism are serious and therefore, the impetus is given to enactment and enforcement of laws.

For example, the untouchability offense act 1955, is enacted and enforced to curb the problem of practice untouchability, to eradicate gender inequality the government has passed various legislations. The Special Marriage Act 1954, The Hindu Dowry Prohibition Act 1961. Prohibition of early marriage and fixing the minimum age of marriage under the Child Marriage Restraint Act 1929, and the Hindu Marriage Act, 1955, have lengthened the period of education for girls.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Now the position of women is far better as a result of the enactment of laws. Similarly, the distinction between touchable and untouchable is not much felt in modern times.

(iv) Transport and Communication: Transport facilitates trade and commerce by carrying goods from the areas of production to that of consumption. Goods from the areas that have surplus are shifted to those areas which are deficient in those items. Movement of people from one place to another place in search of job, education, and emergency through transport facility. Communication keeps us informed about the world’s events and trends. It has brought in positive changes in the life of the people and thereby enhancing their economic conditions.

Class 12 Sociology Chapter 1 Introduction to Indian Society Intext Questions and Answers

Check your progress (Textbook Page No. 15)

1. What was the nature of education during the Early Vedic Period?
Answer:

  • During the Early Vedic period the content of education was based on sacred literature which was written in Sanskrit.
  • The Yajur Veda commands education for all classes including women.
  • To enter Vedic schools it was a prerequisite for students of the first three Varnas to perform the upanayana (thread) ceremony and they had to observe Brahmacharya for as long as they lived at the school to study the Vedas.
  • There was an oral tradition of imparting knowledge, which was through rote-learning. Enunciation and pronunciation were an integral part of the oral were to sharpen the intellect as well as for character formation. Most scholars hold the view that the art of writing was unknown during this period.
  • Value was attached to being truthful, carrying out one’s duties (dharma), devotion to the guru and to one’s parents, hospitality, faith, and generosity.
  • The Kshatriyas learned the art of warfare and administration. Vaishyas studied trade and commerce and Shudras learned agriculture and animal husbandry. The Brahmanas probably stayed in the school until they attained mastery of the four Vedas.

2. State two indicators of the declining status of women during the Later Vedic Period.
Answer:
The first indicator of the declining status of women during the Later Vedic Period, is education being replaced by marriage and the practice of child marriage. In the Later Vedic Period, since education for girls was stopped, so was the sacrament of upanayana (thread ceremony) which initiated them into the Gurukul. It was replaced with marriage (‘vivaha) and child marriage. Marriage now became the only sacrament (samskara) permissible for women.

The second indicator of the declining status of women during the Later Vedic Period is the practice of dowry. The birth of a daughter began to be looked down upon and there is evidence to suggest the beginning of the practice of dowry.

3. Mention any two characteristics of Indian society in the Medieval Period.
Answer:
Status of women:
The status of women deteriorated in Medieval India. Invasions from the Central Asian region along with zealous Brahmanical iron laws were the main cause for this degradation. Freedom of women was curtailed; knowledge of the scriptures and literacy was denied to them and her status was reduced to being dependent on men throughout her lifetime.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Nature of education:
Education during the Medieval Period is centered on the Quran. The Prophet Mohammed exhorts all people of faith to acquire knowledge. Unlike the previous systems of learning, there was no requirement for being through with Vedic schools nor renunciation of the world. The Islamic system of education is open to all followers of the faith irrespective of one’s status.

Check your progress (Textbook Page No. 18)

With reference to the Colonial period:
1. Name two educational changes.
2. State two economic changes.
3. Cite two administrative changes.
Answer:
1. Name two educational changes.

  • The medium of instruction in high school now became English which also became the common language of communication among the learned people.
  • Schools and colleges were open to all individuals, irrespective of caste, creed, gender, etc.

2. State two economic changes.

  • The economic system got transformed by industrial growth and the process of urbanization. Caste-based skills and occupations and social relationships gradually changed due to the impact of a changing economy and the rise of factories.
  • New revenue systems were started by the British in different parts of India which affected the peasants adversely. There was the commercialization of agriculture also. The subsistence economy was replaced by a market system that was profit-oriented.

3. Cite two administrative changes.

  • A new judiciary system was created, which took into consideration the earlier legal traditions of the Indian communities. However, its implementation was carried out on a secular basis, each individual judged on an equal basis, irrespective of one’s caste and creed.
  • The authority of feudal lords and zamindars was abolished, affecting the gradual spread of democratic values into Indian society.

Activity 1 (Textbook Page No. 4)

Find out about the Eight-Fold Path of Buddhism.
Answer:
The Eightfold Path is composed of eight primary teachings that Buddhists follow and use in their everyday lives:

  • Right View or Right Understanding: Insight into the true nature of reality
  • Right Intention: The unselfish desire to realize enlightenment
  • Right Speech: Using speech compassionately
  • Right Action: Using ethical conduct to manifest compassion
  • Right Livelihood: Making a living through ethical and no harmful means
  • Right Effort: Cultivating wholesome qualities and releasing unwholesome qualities
  • Right Mindfulness: Whole body-and-mind awareness
  • Right Concentration: Meditation or some other dedicated, concentrated practice
  • In Buddhist symbolism, the Noble Eightfold Path is often represented by means of the dharma wheel (dharma chakra), in which its eight spokes represent the eight elements of the path.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Activity 2 (Textbook Page No. 8)

Discuss whether there are similarities between the status of women in the Later Vedic period and modern Indian women. To what extent are there changes? Do some beliefs and practices still continue in 21st century India?
Answer:
Similarities between the status of women in the Later Vedic:

  • The status of Hindu women in India has been fluctuating. It has gone through several changes during various historical stages.
  • The Rig-Vedic society was a free society. During later Vedic, Women were deprived of the Upanayana ceremony and thereby of education. Many evil social practices, like the practice of prepuberty marriages, denial of the right of women to education and also to mate selection, etc. were imposed on women. Efforts have been taken to improve the status of women. According to India’s Constitution, women are legal citizens of the country and have equal rights with men.
  • Because of the lack of acceptance from the male dominant society, Indian women suffer immensely. Women are responsible for bearing children, yet they are malnourished and in poor health. Most Indian women are uneducated, the constitutional dream of gender equality is miles away from becoming a reality.
  • Even today, ‘the mainstream remains very much a male stream’.
  • As compared to the past, the status of women in modern times has changed a lot but in reality, they have to still travel a long way.

Activity 3 (Textbook Page No. 12)

Find out more about the impact of Muslim rule on the following:

  • Painting
  • Architecture
  • Music

Present your findings in class.
Answer:
Painting: Both Hindus and Muslim artists were encouraged at Mughals courts. The development of painting was very fast in the reign, of Jahangir. King Jahangir was interested in collecting pictures of historical interests. Hindu artists were also famous during this period.

Architecture: Mugal architecture started during the reign of Babar. During Mughal, reign mosques were built at Dholapur, Gwalior, and any other places. Akbar was a lover of art. Akbar fort and many other beautiful buildings were constructed during Akbar’s reign. Shahjahan was a great lover of architecture. The Red Fort of Delhi, Jama Masjid, Taj Mahal erected in the memory of his wife Mumtaj are the unforgettable work of Shahjahan.

Maharashtra Board Class 12 Sociology Solutions Chapter 1 Introduction to Indian Society

Music: Babar and Humayun were interested in music. Tansen was one of the nine jewels of Akbar. Singers and musicians were encouraged during the Mughal period. Indian instruments were also influenced by Islam. The Indian Veena and the Irani Tambura merged together to emerge as Sitar.

Activity 4 (Textbook Page No. 18)

Discussion: Social reform movements are still present in India.
Answer:
Today, social movements have raised diverse demands pertaining to the environment, human rights, and equality. These are powerful means for ordinary people to participate directly in creating positive social change. These are deeply rooted in values of justice and democracy and many a time secure public support.

Example of social movements which we can see today: During the last few decades tribal and marginal farmers are also being threatened by commercial farmers, mining corporations, and dam projects. The Narmada Bachao Andolan (NBA) movement combines in itself many strands like the movement of indigenous people, the movement against neo-liberal policies, the struggle of farmers to hold on to their land as attempts are being made to take them over for dams, urbanization, industries, mines, and forests.

Class 12 Sociology Textbook Solutions Digest